पंचायतसमीती.....

लेखनविषय:
लेखनप्रकार
ह्या वर्षी आमचा गण महीला राखीव झाला. भल्याभल्यांची तारांबळ उडाली. मागच्या पंचवार्षीकला आम्हाला जनतेने विजयी कौल दिला नव्हता. यावेळेस सौ.ला उमेदवारी मिळाली. प्रचारासाठी अधिकृत दिवस फक्त पाच. १ते५ फेब्रु. अनेक युक्त्या क्लृप्त्यानि प्रचार केला. अनेक ठक बेटले. एकेक अनुभव शेअर करण्यासारखा आहे. त्यातला एक. वडगावची प्रचार सभा आटोपून पुढच्या प्रचारसभेला निघालोच होतो तर गववाला गपक्कन गाडीत घुसला. हे प्रकार होतच असतात. त्यामुळे विषेष काही वाटले नाही. माह्याकडं १० मतं हायेत..... ते आपुन सांगु तेच करणार......... तुम्ही काळजी करु नका.....

राजगड संवर्धन मोहीम २०१२

लेखनप्रकार
रामराम मंडळी, राजगड! श्री शिवछत्रपतिंची प्रथम राजधानी! नावाप्रमाणेच असलेल्या ह्या राजगडाची आज अवस्था मोठी वाईट आहे. पडझड, रानगवत, पर्यटकांनी केलेला कचरा अशा निरनिराळ्या अडचणींनी हा गड आपलं मुळचं वैभव हरवून बसला आहे. गडाची देखभाल तसेच दुरुस्ती करुन हा सांस्कृतिक ठेवा जतन करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. काही दुर्गप्रेमी..खरेतर गड-किल्लेवेड्या मित्रांनी एकत्र येऊन अशाच निरनिराळ्या गड-किल्ल्यांची, लेण्यांची गुहांची दुरवस्था न पहावून ह्या ऐतिहासिक ठेव्यांचे संगोपनाचे शक्य तितके वैयक्तिक प्रयत्न सुरु केले.

धन्य ते आजकालचे निब॑ध आणि त्या॑चे विषय !

लेखनविषय:
लेखनप्रकार
धन्य ते आजकालचे निब॑ध आणि त्या॑चे विषय ! आमच्य लहानपणी निब॑धलेखन आणि एकूणच (मराठी) भाषा या विषयाला मोठेच महत्व आणि प्रतिष्ठा होती. सायन्स, गणित, इ. शत्रुराष्ट्रा॑ना जरी घाबरुन असले तरी फारशा सन्माननीय नजरेने कुणी पहात नसे. काव्य, निब॑ध, वक्त्रुत्व अशा क्षेत्रातील पटुत्व सिद्ध करण्यार्या विद्यार्थ्या॑ना मोठ्या आदराने पाहिले जात असे. दुर्दैवाने आम्ही मात्र त्याकाळी सायन्स आणि गणितातच केवळ मार्क पाडू शकत होतो. भाषा, इतिहास, भूगोल, इ. विषयात आम्ही प्रथमपासूनच अ॑मळ कच्चे ! म्हणुन आता जरा आम्ही सुधरायच॑ मनावर घेतलय. ( तसही, अभिया॑त्रिकीचा प्रवेश व पदवी इ.

चित्रपट निर्माते गजानन जागीरदर यांच्यावर बुद्धिवाद्यांनी केलेला अन्याय - प्रकरण 9

मित्र हो, ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांच्या ब्लॉगमधील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा. विचार करावा. खालील अभिप्राय बोलका आहे. दैनिक तरुण भारत... ...विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हे पुस्तक अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल आंधळी श्रद्धा व विश्वास बाळगणाऱ्यां लोकांनी तर वाचलेच पाहिजे. पण विज्ञान व त्याची सामाजिक बांधिलकी या विषयाची आस्था बाळगणाऱयांनीही अवश्य वाचले पाहिजे, असे आग्रहाने सांगावेसे वाटते. - रामचंद्र रेडकर बेळगाव. दैनिक लोकमत ...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे.

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -१ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -२ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -३ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -४ सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला. झपाट्याने पुढे गेलो. मागच्या आश्रमाच्या पायर्‍यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ‍ती त्रिमूर्ती डगर चढताना दिसली.
Subscribe to मांडणी