Skip to main content

मांडणी

महात्मा गांधी.. एक विचार

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 06/01/2012 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
नोट : सदर लेखन हे माझे नसुन माझा नेट फ्रेंड 'दिपक साळुंखे' याचे आहेत. हे लेखन येथे देण्याचे कारण फक्त येव्हडेच आहे कीहे लेखन वाचुन कोणा एकाच्या जरी विचारात बदल झाला तर या धाग्याचे उद्दीष्ट्य साध्य होयील. तसेच मागे एकदा सांगितल्या प्रमाणे गांधीजींच्या बद्दल असणारा विचार माण्डणार असे बोलण्याने हा धागा देत आहे. पार्श्वभुमी : मी अगोदर गांधीजींचा उल्लेख आजचे कित्येक तरुण मंडळी करतात तसाच "टकल्या" म्हणुन करायचो. तेव्हा "मी नथुराम गोडसे बोलतोय.." नाटक पाहिलं होतं आणि त्याच्या प्रचंड प्रभावाखाली होतो.

|| || माझे गाव माझे बालपण || ||

लेखक विवेकखोत यांनी गुरुवार, 01/12/2011 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
" लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा " काल अचानक गप्पाच्या ओघात लहानपणा विषयी गप्पा निघाल्या आणि मन अचानक गावाकडे चक्कर मारून आले. लहान पणाची मजा काही औरच, ती मजा, ती धमाल, तो बिनधास्त पणा मोठे पणी नाही सापडत हो. प्रत्येक गोष्टी मला आठवतात अजून. आमच्या गावाला पाणी टंचाई खूप मला तर आमच्या नळाला पाणी कधी आले ते पण आठवत नाही. नळाच्या खड्डया चा उपयोग आम्ही लपंडाव खेळायला करत असू , एखादा माणूस सहज गडप होईल असे ते खड्डे असत. मग प्रत्येक मोसमात सगळ्या मित्र मंडळीची स्वारी कुठल्या तरी शेतावर असायची.

नावडतीचे मीठ अळणी!

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 29/10/2011 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
नावडतीचे मीठ अळणी!
‘नावडतीचे मीठ अळणी’ म्हण सहज आठवली... पुरुषांना एक आवडती तर दुसरी नावडती असे असते. निदान खाण्याच्या बाबतीत तरी. एक आई व दुसरी पत्नी. पैकी कोणीतरी आवडते असेल तर दुसरे नावडते ठरते. एकीचा स्वैपाक मिळमिळीत तर दुसरीचा चवदार वाटतो. नावडतीने कितीही मनलाऊन पदार्थ बनवला तरी त्यात काहीतरी उणे काढले जाते असे म्हण सुचवते. असो. तीच गोष्ट अन्य ठिकाणीही लागू होते असे व्यवहारात दिसते. एखाद्या गोष्टीचा तिटकारा निर्माण झाला की त्याला नावे ठेवण्यासाठी मनात कल्पना विस्तार सुरू होतो. नाडी ग्रंथांना असेच नावडतेपण सहन करावे लागते.

उत्तम मिसळ मिळणारी ५1 ठिकाणे

लेखक विवेक वि यांनी मंगळवार, 18/10/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तम मिसळ मिळणारी ५1 ठिकाणे १) अण्णा बेडेकर, पुणे २) मनशक्ती के॑द्र, लोणावळ ३) मामलेदार, ठाणे ४) मूनमून मिसळ, डो॑बिवली ५) संजिवनी- माडिवालेकॉलनी, टिळक रोड ६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड ७) श्री- शनिपारा जवळ ८) नेवाळे- चिंचवड ९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी. १०) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा. ११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन १२) जुन्नर बस स्थानक. १३) फडतरे, कलानगरी. १४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर १५) गोखले उपहार गृह, ठाणे १६) भगवानदास, नाशिक १७) फडतरे मिसळ कोल्हापुर १८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे १९) प्रकाश, दादर २०) दत्तात्रय, दादर २१) वृंदावन, दादर २२) आस्वाद, दादर

माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११

लेखक कौन्तेय यांनी रविवार, 16/10/2011 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११ रामराम! सप्टेंबरात मिपा.करांकडून माझ्या माळशेज सहलीबाबत कौल मागितला होता ( http://www.misalpav.com/node/19017 ). त्यावेळी शैलेन्द्र, अजितजी, वल्ली, विक्षिप्त अदिती, योगप्रभू, परीकथेतील राजकुमार नि सुनील यांच्या उद्बोधक तर बाकी बऱ्याच जणांचा रंजक प्रतिक्रीया आल्या. त्यां सगळ्यांवर विसंबूनच आमची सहल सुरू केली आणि सुफ़ळ संपूर्णही झाली. सर्वांना धन्यवाद! मुंबई - नाणेघाट रस्त्यावरचा जलविहार - माळशेज - मुक्काम - शिवनेरी - माळशेज - विश्रांती - मुंबईप्रस्थान असा कार्यक्रम केला.

'नीम का पेड' आणि त्याचं शीर्षक गीत - मूँह की बात सुने हर कोई

लेखक प्रास यांनी मंगळवार, 11/10/2011 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
९०च्या दशकाच्या मध्यात, बहुतेक ९४-९५ च्या सुमारास दूरदर्शनवर रात्री ९ वाजता एक सुंदर मालिका लागायची. तिचं नाव होतं 'नीम का पेड'. तेव्हाही ती मालिका बघत असताना सारखं वाटायचं की आपण काही क्लासिकल किंवा अभिजात बघतोय. कथा एका बुधाई राम नावाच्या गरीब माणसाची होती. हा बुधाई राम खरं तर एक हरकाम्या असतो, गावच्या मुसलमान जमीनदाराकडे. जमीनदाराचं काहीही काम असलं की त्याला याचीच आठवण होत असे.

शुभेच्छा !!!

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 28/09/2011 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरु होत आहे. सर्व मिपाकरांना हार्दीक शुभेच्छा ! अमोल केळकर ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ मला इथे भेटा

३२ रुपये आहेत मग तुम्ही गरीब नाही

लेखक शाहिर यांनी गुरुवार, 22/09/2011 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या खिशात ३२ रुपये असतील तर तुम्ही गरीब नाहीत, असा आपल्या सरकारचा म्हणाना आहे . आयोगाच्या मते, देशातील शहरात राहणारी व्यक्ती ३२ रुपयांत तर ग्रामीण भागातील व्यक्ती २६ रुपयांत सहज एका दिवसाची गुजराण करू शकतो. पूर्ण हिशोब केला असता शहरात राहणार्‍या एका माणसाला एका महिन्याच्या खर्चासाठी ९६५ रुपये पुरेसे आहेत. ग्रामीण भागात असाल, तर खर्च ७८१ रुपये इतका होऊ शकतो.