मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

घोळ झाला घोळ

कहर ·
घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ तुला आठवता कागदावरी उतरून आली ओळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ स्पर्शता तुला विसरून गेलो करायची अंघोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ तुझ्या सयीने हृदयाच्या छिद्राचे झाले बोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ तुझ्या अदा टोमणे बहाणे मिसळून झाला कोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ झोप नाही रात्रीला सोबत घुबड नि वटवाघोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ पाहताच तू दुजाकडे उठतात आगीचे लोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ कोरेगाव तू पार्क प

# राजे छत्रपती

sanket gawas ·
लेखनविषय:
शिवनेरी दारी तोफा कडाकल्या सह्याद्रीच्या कुशीत विजा चमकल्या.... जिजावुंच्या पोटी रत्न जन्मलं स्वराज्याच्या स्वप्नात राजे बाळ रंगल.... हाती घेऊन तलवार करी अन्यायाचा प्रतीकार प्रत्येकी जाहला देवाचा साक्षात्कार...... केली स्वराज्याची स्वारी घेऊनी आर्शिवाद भवानी मातेचा शत्रूंवर बरसला मस्तकी लावूनी टीळा भगव्या रक्ताचा ..... स्वधैर्याने गाजवले द्दिल्लीचेही तख्त कोणत्याही परिस्थितीत झुकले नाही मराठ्यांच रक्त .... जन्मभर फक्त आणि फक्त रयतेसाठी झिजला स्वराज्याच स्वप्न उरी बांधूनी तो एकटाच लढला.... शिव छत्रपती राजा प्रत्येकी मनी बसला असा एक शिवसुर्य रायगडी कुशीत निजला......

Coffee आणि ति २

sanket gawas ·
लेखनविषय:
#Coffee2 आपली भेट ,Coffee आणि बरच काही आज समोर बसूनही काही आपण बोललोच नाही... कारण आज नव्हतीस तू समोर फक्त भास होता मनाचा सोबत बसलोय तुझ्या हाच प्रयन्त होता स्वतःला समजवण्याचा... स्वतःला तुझ्यात हरवून खूप काही आज बोलायचं होत डोळे बंद करून तुझ्या गप्पांमध्ये स्वतःला गुंतवायच होत.... खरतर आज खूप तक्रारी करणार होतो तुझ्याकडे मागणार होतो स्वतःसाठी हक्काची अशी वेळ तुझ्याकडे... पण समोर होती रिकामी खुर्ची तीहि वाट बघत होती तुझी कदाचीत आज तिलाही परीक्षा घेऊन बघायची होती माझी... हातातला कॉफी चा कप मागत होता काही प्रशांची उत्तरे पुन्हा पुन्हा तुला आठवून मन मात्र आतून रडत होत बिचारे... म्हटल तू

Coffee आणि ति

sanket gawas ·
लेखनविषय:
आपली भेट ,Coffee आणि बरच काही आज समोर बसूनही काही आपण बोललोच नाही... ओळख असुनही अनोळखीच वाटत होतो एकमेकांची नजर चुकवून हळूच बघत होतो ... चेहऱ्यावर शांतता पण मनातून भलतेच खुश होतो पहिले कोण बोलेल ह्याचीच वाट बघत होतो.... तक्रारी तर एकमेकांच्या खूपच होत्या पण मनातल्या भावना ओठांवरच थांबल्या होत्या ... लाजुन का होइना,शेवटी सुरूवात तुच केली काॕफी सोबत गप्पांना मजा काही औरच आली... बोलताना कधी म्हणायची तु ,तर कधी म्हणायची तुम्ही खरंतर काय बोलावं यातच फसलो होतो आम्ही .... वाटलही असेल की तुझ्या समोर मी थोडा घाबरत होतो पण काय सांगणार ,बावरलेल्या मनाला मी सावरत होतो .... तुझी मात्र बिनधास्त बडबड

#आई

sanket gawas ·
लेखनविषय:
#आई आई आज तुझ्या आठवणी मध्ये रमून रहावस वाटतं तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावासा वाटतं ..... किती मस्त झाले असते जर गेलेला वेळ परत आला असता तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण पुन्हा जगायला भेटला असता.... लहानपणापासून माझे अडखळणारे पाऊल सांभाळले वाट चुकलो तेव्हा बोटाला पकडून सरळ चालायला शिकवले.... आमच्या भोवती असताना कधीच स्वतःचा विचार तु केला नाही कितीही दुःख असले तरी चेहऱ्यावर कधीच दाखविले नाही ... कधी कधी वाटतं फक्त स्वतःच्या सुखासाठी घर सोडले म्हातारपणात आधार न देता तुला मी एकट टाकले ... सतत वाट बघत उभी असतेस डोळे लावूनी दारी.. माझही चुकत कारण येतो फक्त पाहुणा बनुनी घरी ....

महागाईच्या गप्पा

बी.डी.वायळ ·
लेखनविषय:
ऑफिसमध्ये काल बायका मारत होत्या गप्पा | महागाईचा विषय होता साधा आणि सोपा | काल जेंव्हा बाई मी मार्केटला गेले | भाज्यांचे भाव बघुन हैराणच झाले| पंधरा रुपयाला एक होती मेथीची जुडी| एक रुपयाला एक कोथिंबीरीची काडी | एकरुपयाचे लिंबु पाच रुपयाला झाले | कांदे व बटाटे पंचविस रुपयावर गेले | बारा रुपये पाव किलो वांगी व कारले | फ्लावर व कोबी बघुन डोकेच फिरले | पंचविस तीस रुपये किलो होते तेथे गहू | तांदुळ म्हणाला मला हातच नका लावू | शंभर रुपये किलो झाली तुरीची डाळ | भडकलेले होते हरबरे आणि वाल | साखरेचा भाव तर चाळीसवर गेला | तेलाचा डबा पण किती महाग झाला| दुध झाले महाग पन्नास रुपये लिटर | विचारा

पाणी

शिव कन्या ·
इतक्या पाण्याचे शरीरमन बनवताना विचार करायचा देवा, पाण्याला इतके झोके देताना उसंत घ्यायची देवा.... उसळून पुन्हा आदळते पाणी खडक द्यायचा देवा... दोन डोळे पुरत नाहीत पाण्याचा संसार पेलताना... देवा, आता पाण्याचे तीर्थ करा अन् पाण्यातून मुक्ती द्या.... शिवकन्या

सांज

प्रणया ·
लेखनविषय:
सहज असे चालतांना भेट ती फुलांची,तू मला दिलेली ओंजळीत त्या प्राजक्ताचा गंध राहुनी गेला... हात नाही हातात माझ्या पण तूझा स्पर्श राहुनी गेला.... ना किनारा फेसाळणारा ना लाट एकसारखी झेपावणारी, अस्पष्ट जाहले होते सारे नव्हतीच जणू उरली क्षणे पुन्हा एकदा स्मरणारी.... असे घाबरे मन झाले शहारे सरसरुन आले बोटांमध्ये रुतलेली बोटे तूझी, अचानक तेव्हा घट्ट होती झाली... वेड कोणते भोवती होते की हवेत नशा वाहू लागली, आसुसलेली पहाट होती की अस्तास जानारी रविकिरणे गुलाली..... न उमगले मला क्षणात काय झाले तेव्हा, तू असताना समोर तिथे लाजलेली नजर माझी शोधत होती फक्त तूझी सावली.... सरलीच सांज ती अबोली येणारी रात्र

असे असावे

अन्या बुद्धे ·
लेखनविषय:
असतो दगड तर कदाचित जमले असते कोरडे राहणे हिरव्या पावसात देखील आतून रुजून न उमलणे निळ्या नभात ढग व्हावे अमृताने पूर्ण भरलेला द्यावे आणिक निघून जावे इतकेच ठाऊक असलेला बासरीतून संगीत जन्मते रसिक मनांना भिजविते श्वास थांबता फुंकलेला पोकळ रिक्त शांत उरते फक्त असावे या जगती नसो अभिलाषा जगताना सहजस्फुर्त अस्तित्व असावे भार नसावा श्वासांना -अनुप

तू चंद्र माझा

प्रणया ·
लेखनविषय:
तू चंद्र माझा शांत,शुभ्र, साजिरा तूज स्पर्शिण्या तूज मागे धावणारे उथळ अभ्र मी.... येवून कवेत तूझ्या नीखळ उब मनी भरावी प्रकाशावे मी एवढे की लाजावी मजसमोर चांदणी....