मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

६: पाउलखुणा

गणेशा ·
लेखनविषय:
५ : मी ..एक स्त्री प्रश्नचिन्ह .. ? आता उत्तरे ही रुसली आहेत.. सारखे सारखे तेच प्रश्न आणि तोच कंटाळलेपणा आणि मागोवा कशाचा ?.. कश्यासाठी ... ? बहुदा तो आहे एक अखंड प्रवास एका प्रश्नमालिकेतून, दूसर्‍या प्रश्नमालिकेत जाण्याचा माझ्यासारखीच गुरफ़टलेली ही रात्र आहे .. उद्यास्ताच्या रंगात न्हाऊनही काळवंडली आहे बिच्चारी माझे काय आहे मग त्यापुढे ?.. माझी सावली ही रुसली आहे माझ्यावर माझ अस्तित्वच संपत चाललय .. पण तरिही या रात्रीच्या सोबतीनेच मी जगते आहे..

जा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत)

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
जा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत) राधा : जा रे कान्हा नटखट, तू सोड माझे मनगट मोडेन तुझी खोड कान्हा सारी रे मला समजू नको भोळीभाळी रे ......॥१॥ कृष्ण : तू मस्त मदनाची नार, गोमटी झुंजार बोलीचालीत अंगार सखे, भरला गं तुझ्या पदराला हात राधे धरला गं ...॥२॥ राधा : अधरी धरुनी पावा, का रे धून छेडीते? सुरांच्या लहरीने, धुंदी मज जडते नंदाच्या नंदलाला, रंगीला रंगलाला मुरलीचा मोह नच पाडी रे मला समजू नको भोळीभाळी रे ......॥३॥ कृष्ण : गार गार वारं वाहे, बहरिले अंग

कुणा कुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा ??

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
कुणाकुणाचा आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवायचा ? अगदी लहानपणापासून डोक्यात होते शिकवणारे ,सल्ला देणारे पोटभर होते आमच्या आदर्शांचे बाबा जब्लिंग झाले ....! कुठला आदर्श समोर ठेवायचा ..? सगळे गणितच चुकीचे झाले ..!! तुम्ही कुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला ? कृपया सांगाल का मला ? शाळेमध्ये गेलो नि मित्र आमचा आदर्श झाला ओठाचे वर्तुळ करून शीळ घालणारा लखू आमचा हिरो झाला कशी गिर गिर घालायचा मस्त शीळ कोठल्यातरी सिनेमाचे गाणे मस्त सोडायचा मस्त मस्त कसा स्वप्न बघायचा मान असा झटकायचा आम्ही बघतच बसायचो ओठ गोलगोल करून फक्त आम्ही हवाच सोडायचो शीळ अशी कधी घालता आलीच नाही मला मग तोंड पाडून आ

अंगाई

धनंजय ·
लेखनविषय:
काव्यरस
अंगाई - - - - - आठवतंय ना? मी गाडी चालवताना सावध बसायचास मुठी आवळून - दमलायस रगड आहेत पापण्या जड तर येऊ दे डुलकी घे शांत निजून - - - - -

तो कवी..ती कवियित्री..

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
काव्यरस
तो कवी..ती कवियित्री.. ------------------------------------- तो कवी थोर बंडखोर..ती हळवी कवियित्री.. हात एकमेका हाती देवुन हसली मग नियती..

जागरण गोंधळ : आई देवी अंबेचा जागर मी करीतो

पाषाणभेद ·
लेखनविषय:
जागरण गोंधळः आई देवी अंबेचा जागर मी करीतो
आई देवी अंबेचा जागर मी करीतो जागर करीतो देवी अंबेचा गोंधळ मी घालीतो ||धृ|| आई तू ग माझी गुणी नउवारी पातळ नेसूनी कपाळी मळवट लाल लेवूनी आई बसली सिंहावरी देवी अंबेमातेला वंदन करीतो वंदन करीतो तुळजाभवानीच्या पायी नमीतो पायी नमीतो आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||१|| सुरू होई अश्विन महिना मनी आनंद काही मावेना नवरात्राच्या ग सोहळी नऊ दिवस आरती ओवाळी नऊ दिवसांचे उपास मी करीतो उपास करीतो सप्तश्रूंगीची मी ओटी भरीतो ओटी भरीतो आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||२|| साडीचोळी खणा

" ने मजसी ने परत मातृ भूमीला " या गीताला १०१ वर्ष पूर्ण

चिंतामणी ·
उद्या १० डिसेंबर २०१० स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी ब्रायटन च्या समुद्र किनार्यावर १० डिसेंबर १९०९ साली लिहिलेल्या " ने मजसी ने परत मातृ भूमीला सागरा प्राण तळमळला" या गीताला १०१ वर्ष पूर्ण होत आहेत. ज्यांच्या आथक परिश्रमामुळे देशाला स्वातंत्र मिळाल. मरे पर्यंत देशाचीच सेवा करणार्या, आश्या या महान क्रांतीकारकाला विनम्र अभिवादन.

चोरटा मुरारी - गौळण

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
चोरटा मुरारी - गौळण शिंके हा तोडी, माठ हा फ़ोडी सांगा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥धृ०॥ शेला पागोटा काठी हातात अवचित येवुनिया घुसतो घरात खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी बांधा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥१॥ यमुनेचा चोरटा, मथुरा मुरारी पकडाया जाता, होतो फ़रारी चव हा चाखी, ओठ हा माखी टांगा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥२॥ व्दारकेचा व्दाड, ऐकेना कुणाशी अरविंद मागे लोणी, हरी चरणाशी कमरेशी बांधा, पायाशी टांगा कोंडा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी...

इतिहास

स्पंदना ·
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या मिटल्या डोळ्यातली स्वप्न भोळी भाबडी, अगदी साधी. तुझ्या न माझ्या साथीची आयुष्याच्या वाटचालीची.
तु उघड्या डोळ्यांनी साकारतोयस, शिल्पकारान कष्टान लेणी कोरावीत तशी. मी अन तु , अगदी भिन्न माणस. मी अधिर , आवेगी, तु शांत , संयमी. मी स्वप्नाळु, कल्पनेत रमणारी. तु वास्तवाच्या खडकाचा जाणकारी. अन तरीही मला जपतोयस, वास्तवाच्या दाहक उन्हात , सावली होतोयस. एव्हढ्या वेगवान जगात घटकाभर थांबुन मला डोळे मिटुन स्वप्न बघायला संधी द्यायची धडपड करतोस . आयुष्याच्या वाटचालीत खुप खुप पुढ गेल्यावर कधी तरी आपण माग वळु, सगळी वाटचाल डोळे भरुन निरखु, त