Skip to main content

कविता

कुठे गेली सगळी माणसे

लेखक निनाव यांनी बुधवार, 16/03/2011 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे गेली सगळी माणसे नाहिच कसे कुणी मज दिसेना? तो पान वाला पण दिसत नाहिये आज ज्याच्या दुकाना च्या बाहेर उभे राहुन विविध आकॄत्यांमधे ...धुर उडायचे ओठांचे चंबु मग शुन्यात बसायचे बाजार ही रिकामेच दिसते आहे आज कुणास ठाउक का? न ते आवाज न ते गोंगाट सगळे संपले कि..विकले गेले आज? तिथं त्या कडु-लिंबाच्या बाजुला असायचा एक -बस-थांबा तो ही दिसत नाहिये मला प्रवासी गेले आहेत निघुन कि संपले आहे प्रवास? डोंबारीच दिसत आहेत फक्त आज ओसाड रस्त्यांवर मला तोल सांभाळतांना हसत आहेत का त्या दोरी चीच आहे कास? मारुन पाहिल्या हाका त्यांना पण कुणी काही बाहेर येईना जात नसेल का माझा आवाज कि यायचेच नसेल त्यांना? कुठ

त्सुनामी

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी मंगळवार, 15/03/2011 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा पुन्हा तू येतोस तुझा मीट्ट अंधार, गडद काळोख घेउन पुन्हा पुन्हा ते पाशवी, ऋद्र, आक्राळ -विक्राळ विद्रुप क्षण होऊन पुन्हा मी लढते, जीव तोडुन सत्याची अखंड तेवणारी ज्योत घेऊन, स्वत:तील सत्व जपत तू घोंघावत येतोस सुनामी सारखा आपल्या आक्राळ विक्राळ, विद्रुप विनाशकारी लाटेत मला संपवून टाकायला पण मी जिवाच्या आकांताने लढते स्वत:च्या आत्म्यात तेवणा-या सत्याच्या ज्योतीच्या आधाराने लढते लढते लढते त्या आक्राळ विक्राळ विनाशकारी सुनामीला पुन्हा एकदा परतवून लावते माझा मेंदु पुन्हा थोडा मरतो पण मी जिवंत रहाते मी पुन्हा त्या जिवनरुपी वेताळाला अन्गावर घेवुन पुढच्या प्रवासाला निघते
काव्यरस

आयुष्याची दोरी

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 15/03/2011 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याची दोरी हे सजीवसंख्येचे नियमन करणार्‍या मृत्यो, कधीही, कुठेही आणि कसेही आयुष्याची दोरी कापून टाकण्याचे तुझे अधिकार मान्य आहेत मला पण सन्मानाने मरण्याचे अधिकार मलाही असावेत की नाही? हे “जीवन” तुझे असले तरी “मी” तर “माझा” आहे ना? तुझ्यामुळे आयुष्य सरणार असले तरी मी मात्र उरणारच आहे.

यावे तरी तु का समोर

लेखक निनाव यांनी सोमवार, 14/03/2011 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
यावे तरी तु का समोर जवळ मज नसतांना तहानले मन माझे नयन हे भिजतांना अजुनच कमी होते अंतर तु लांब जातांना आठवेस तु अधिकच मी तुज विसरतांना शब्द अबोल करणारे वियोगात मी लिहितांना कंठी दाटून येतात ह्रदयातुनी उतरतांना का असावी अशी ही वेदना न दिसे कुणास दुखतांना श्वासही करते परके मला तु जवळ नसतांना!
काव्यरस

माउली

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 14/03/2011 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
माउली अपरिचित बंधुत्व त्या दोघांचे अनाकलनीय खेळ त्या नियतीचे अपरंपार हाल मात्र त्या माउलीचे भय दाटे हृदयी त्या अंतिम युद्धाचे ते दोघे आज सामोरे ठाकले मातेचे काळीज विद्ध जाहले एकाच हृदयीचे दोन ठोके 'चुकले' अन् जन्माचे वैरी जाहले एक अंश त्या अविनाशी तेजाचा दुजा तो प्राणसखा त्या मनमोहनाचा सुदैवी मातेवर कैसा फेरा हा दुर्दैवाचा आपल्याच पिल्लांमध्ये डावे-उजवे करण्याचा तेज:पुंज कवचकुंडलांचा धनी तो सदा सोसतो अपमानांचे आघात तो कौन्तेय असूनही जगाला राधेय तो राधेच्या सौभाग्याचा कुंतीला हेवा वाटतो तरीही जपले अन् साधले दुज्याचेच हित तिने मागितले दुज्यासाठीच अभयदान तिने ठरवले खुशाल दोषी तिल
काव्यरस

आयूष्य एक रंगभूमी....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
आयूष्याच्या ह्या रंगभूमीवरचे, आपण जणू एक कलाकारच असतो । आपापल्या परीने प्रत्येक जण, आपापली भूमिका ति बजावत असतो । प्रत्येक दीवस तो नवा प्रयोग ह्या, रंगमंच्यावर मांडत असतो । असंख्य अंकांतले विविध प्रवेश हे, आपण येथे साकारत असतो । कुणास जमतो-कुणास न जमतो, अभिनय येथे परी करावाच लागतो । दुःखात हसून डोळे हळूच पुसून, नाट्यमय देखावा उभाऱ्हावाच लागतो । कितीही लांबला जरी खेळहा तरी तो, शेवट त्याचा अपूल्या हातीच नसतो । खेळावेच लागते म्हणूनी खेळत राहणे, ह्या परी कोणता मग मार्गच नसतो । ह्या खेळाचा सुत्रधार तो, एकमेव हा देवच असत

आयूष्य एक रंगभूमी....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
आयूष्याच्या ह्या रंगभूमीवरचे, आपण जणू एक कलाकारच असतो । आपापल्या परीने प्रत्येक जण, आपापली भूमिका ति बजावत असतो । प्रत्येक दीवस तो नवा प्रयोग ह्या, रंगमंच्यावर मांडत असतो । असंख्य अंकांतले विविध प्रवेश हे, आपण येथे साकारत असतो । कुणास जमतो-कुणास न जमतो, अभिनय येथे परी करावाच लागतो । दुःखात हसून डोळे हळूच पुसून, नाट्यमय देखावा उभाऱ्हावाच लागतो । कितीही लांबला जरी खेळहा तरी तो, शेवट त्याचा अपूल्या हातीच नसतो । खेळावेच लागते म्हणूनी खेळत राहणे, ह्या परी कोणता मग मार्गच नसतो । ह्या खेळाचा सुत्रधार तो, एकमेव हा देवच असत

असे कुणीतरी यावे.....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
असे कुणीतरी यावे, जिच्यात आपण हरवूनी जावे । शोधिता अपुल्यास अपुल्यात अपुल्याला, तिचेच दर्शन व्हावे । हे असे कुणीतरी यावे..... ओठांतले ते शब्द तिने मग, अलगद झेलुनी घ्यावे । अबोल अश्या ह्या डोळ्यांतले ते, भाव समजोनी जावे । हे असे कुणीतरी यावे..... मौन धरिले तिनेच जरका, मी अस्वस्थ असावे । अश्या क्षणिमग बोलुनी काही, मौन तिने सोडावे । हे असे कुणीतरी यावे..... बोल लाविले तिला कुणी तर, घाव मलाच मिळावे । घाव लागता अंगी माझ्या, आईग...

शब्दांचे खेळ...

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
किती सोपं असत नाई शब्दांचे असे हे खेळ करणं, भावनांच्या गुंत्यात गुंतवून ह्या शब्दांना वाक्यांमध्ये पाडणं । पडताना मात्र वाक्यांमध्ये हे शब्द काहिना-काही अर्थ घेऊन पडतात, थोडीशी जागा चुकली तर मात्र हेच... अर्थाचा अनर्थ करून टाकतात । पण चुकल्या वाक्यांतील ते शब्द देखील काहिना-काही सांगत असतात, चुकीचीच का असेनात..