मी कविता लिहू लागलो,तुला मनात ठेउन
भारावून गेलो मी,प्रिये,तुला प्रत्यक्ष पाहुन
ते रुप,ते लावण्य कसे मनात साठवावे
तुझ्या नशिल्या डोळ्यातून किती मद्य प्यावे
तुझ्या मोहक चेहरयात गेलो मी न्हाउन
भारावून गेलो मी,प्रिये.......................!!१!!
तुझी चाल,तुझ्या बोलण्याला तोड नाही
गर्व,स्वार्थीपणा याची जरासुध्दा जोड नाही
कसा जगू आता मी क्षणभर जरी विसरुन
भारावून गेलो मी,प्रिये.......................!!२!!
माझ्या जीवनातील आता तूच प्रकाश आहे
केवळ तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे
तुझ्या प्रकाशाने गेले माझे जीवन उजळून
भारावून गेलो मी,प्रिये.......................!!३!!