Skip to main content

कविता

पाणी लाऊन हजामत

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 02/08/2013 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी लाऊन हजामत

गुदस्ता पाऊस आलाच नव्हता
कुठं पडला, कुठं पडलाच नव्हता
पीक उगवलंच नव्हतं
जे उगवलं ते जगलंच नव्हतं
जे जगलं ते वाढलंच नव्हतं
जे वाढलं ते फ़ळलंच नव्हतं
निसर्गानंच केली होती! हजामत केली होती!! बिनापाण्यानं केली होती!!!

सरकार आलं होतं, मुठभर घेऊन आलं होतं
आमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं होतं
घेन्न! आता कसं वाटsssssते?
आम्ही म्हणालो होतो
मsssssस्त वाटते! गोsssssड वाटते!!

पण एक येडं होतं, सर्वांच्या पुढं होतं
Taxonomy upgrade extras

मला एका कवितेच्या ओळी कुणी सांगू शकेल का?

लेखक वाचक्नवी यांनी रविवार, 28/07/2013 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक मला लहानपणच्या पाठ्य पुस्तकात असलेली जुनी कविता आठवली. अधल्या मधल्या ओळी आठवल्या, पण पूर्ण आणि सलग ओळी नाही. ती कविता कुणाच्या स्मरणात असेल तर, किंवा कुणी शोधून सांगेल? एक वडारीण किंवा तत्सम जातीची बाई आपला संसार घेऊन एका गावाहून दुसर्‍या गावाला जात आहे तिचे वर्णन या कवितेत आहे. कवितेच्या सुरुवातीच्या ओळी अशा. मूल पाठिवर विणीत चटई पेंगत पेंगत बाई जाई घोड्यावरती फुटकी भाणडी त्यावर फडफड करी कोंबडी, वगैरे. ....वाचक्नवी

रंजनभ्रमरी

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 27/07/2013 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजक्त मनाने झुरलो मी झरल्यात कळा अनुबंध तळी मदनाची बाधा भवभोळी गंधात न्हाइली मूक कळी चाहूलक्षणांची पागोळी दंवस्पर्शकोवळ्या अंघोळी अंगणी श्वेत केशर ओळी मातीवर ओल्या; रांगोळी अलवार स्पर्श हळुवार उरी दरवळ परिमळ मन गाभारी गोकुळी रास रंजनभ्रमरी वेदना जरा विरल्या दारी ……………. अज्ञात
काव्यरस

वाटते मजला भिती - (गझल)

लेखक विदेश यांनी शनिवार, 27/07/2013 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनाची सांगता ही वाटते मजला भिती ऐकण्याला कोणि नाही वाटते मजला भिती सागरावर का उसळती जीवघेणी वादळे हा किनारा एकटा ही वाटते मजला भिती ढोलताशा ऐकुनी मज खूप होतो त्रास हा देवळातिल शांततेची वाटते मजला भिती वाटले घ्यावा विसावा टेकुनी खांद्यावरी वाट ती अडवील कोणी वाटते मजला भिती माजलो पैशात लोळत चेहरा सुजला किती ओळखेना आरसाही वाटते मजला भिती जागणे अन् झोपणे का फरक नाही राहिला जीवनाची ओढ नुरली वाटते मजला भिती .
काव्यरस

काही अठवणी...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 26/07/2013 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
काही अठवणी...उन्हातल्या काही अठवणी...पावसातल्या काही नुसत्या...तालातल्या काही गुलाबी...गालातल्या काही आनंदी...सुखाच्या काही त्रासिक...दु:खाच्या काही केवळ..जनातल्या कित्येकांच्या..मनातल्या! काही..हसर्‍या मुलांच्या काही..गळल्या फुलांच्या देठांनाही सोडून गेल्या.. उमलणार्‍या कळ्यांच्या! काही माझ्या गावाच्या काहि..तर,नुसत्या नावाच्या काही...दूरं देशांच्या तळहातांवरिल..रेशांच्या! काही..मंद वासांच्या काही..धूंद श्वासांच्या तिच्या माझ्या मिठितल्या कूंद मोहक स्पर्शांच्या!!! बेबंदिच्या अठवणी काही.. मुक्त मोकळ्या वाटांच्या फुलांनिही बहरून यावे अश्या गोजिर्‍या क्षणांच्या अठवणींच्या प्रदेशा बा घ्यावा
काव्यरस

एक प्रेमपत्र लिहले होते

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 26/07/2013 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रेमपत्र लिहले होते,शब्दाऐवजी प्राणच ओतला होता त्यात. संदभ्र होते तिचे नि माझे आणि ईंद्रधनुचे सप्तरंग होते त्यात सात लिहताना काने-मात्रे एकसलग येत नव्हते, हाथ थोडा थरथरत होता नि तुझे नाव कोरले कि डावा डोळा नुसता फरफरत होता..... मध्येच एखादा अश्रू ठीबकात , माझ्या नावाला पुसायचा प्रयत्न करत होता तर कोरलेला तो बाण ह्रधयाभोवती कसला तरी यज्ञ करत होता.

बाकी काही नाही.............. माझी ८वन काढतंय कुणीतरी

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 26/07/2013 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
काहूर का साचंलया आज मनी पाखरासंग फिरतया रानभरी पापनीभी फरफरतीया परापरी १ घास अडकतुया गळ्यापरी कुरणं भी खुलल्याती मळ्यापरी ठसका भी लागतुया कधीतरी बाकी काही नाही.............. माझी ८वन काढतंय कुणीतरी डावी कुशी बदलतुया कधीतरी झोप उसनी द्याहो कुणीतरी जागा राहतुया एका निश्याच्यापरी भास होतुया एका पिश्याच्यापरी सरळ रस्त्यावरून जाता कधीतरी बीना दगडाची ठेच लागतीया मधीतरी बाकी काही नाही..............

रात्रीस उखाणा सुचला

लेखक प्रसाद साळवी यांनी गुरुवार, 25/07/2013 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी शब्द तुला सुचलेला, उधळून लावीतो कविता मी सूर उसवले दोन्ही, तिसर्‍याच्या उदयाकरता बघणार्‍या नजरांमधले वाटेत थांबले अंतर नजरेच्या क्षितिजाआडून सतरंगी जंतरमंतर वाजवता रंग उद्याचे, शत-गंध मोकळे होती ओघळत्या सेकंदांचे अडवून ठेवले मोती देऊळ-खांबा पक्षी क्षत-पंख पुसे इवलासा रदबदली अंधाराशी, हा निव्वळ फोल दिलासा वितळत्या भूतकाळातून निसरडी पाऊले आली घमघमत्या आज-उद्याशी आडवी-तिडवी रमली कधी स्तब्ध उभ्या असलेल्या, डोंगरमाथ्याआडून मुक्त स्वरांनी सरिता नाचते जाणीवा विसरून
काव्यरस

तान्हुला

लेखक Bhagwanta Wayal यांनी गुरुवार, 25/07/2013 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
चिमुकला तान्हा ठेऊन घरी आई त्याची जाते कामावरी असते गरज आणिक मजबुरी करते मग ती लोभाची चाकरी कोणी ठेविती त्याच्यासाठी दाई परी आईची माया कोण देई जीवापाड सांभाळ करू पाही तरी आईची सर येणार नाही पूर्ण वेळ ऑफिसात जातो घरी येण्यास रोज ऊशिर होतो वाट बघून बाळ झोपी जातो झोपेतच तो आई आई म्हणतो बाळ वाढले पाळ्णा घरात आईबाबांच्या आठणी ऊरात आसवांचा पुर लोट्ला जोरात रडे तेंव्हा तो भावनेच्या भरात आई मित्रांना शाळेत घेऊन जाती बघुन त्याच्या डोळ्यांत आश्रु येती आई वडिल आणिक नाती-गोती पैशापुढे सर्वच विसरुन जाती कोणी जाणा हो त्यांच्या भावनेला नका छळू त्या कोवळ्या मनाला भुकेले ते मातेच्या वात्सल्याला द्यावे प

" आरती कंत्राटदाराची - "

लेखक विदेश यांनी गुरुवार, 25/07/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
' जीव जाई, जीव जाई, कंत्राटदारा थैली झटकुन खड्डेदुरुस्ती करा || साटे लोटे तुमचे जमले असेल आगाऊ रक्कम घेतली असेल लाज शर्म थोडी शिल्लक असेल नैतिकता काही ध्यानीमनी धरा || पावसाळ्यात नेमके खड्डे पडावे सगेसोयरे तुमचे त्यात धडपडावे विरोधी प्रतिनिधीनी गृही ओरडावे खाल्लेल्या पैशावर उपकार करा || अपचन अजीर्ण होऊ देऊ नका डोळ्यावर कुणाच्या तुम्ही येऊ नका आयकरवाले पहा घालतील डाका घरच्या लक्ष्मीची आठवण करा || .
काव्यरस