पोलीस राइस

लेखनप्रकार
स्थळ : छत्रपती शिवाजी टर्मिनल च्या आसपास चा परिसर वेळ : साधारण रात्रीचे ८ अशीच एक स्त्याच्या कडेची चायनिस ची गाडी ... कुठल्याही सामान्य इतर खाण्याच्या गाड्या असतात तशीच , लालभडक रंगात रंगवलेली द्र्यागन ची भडक चित्र असलेली , आणि तसंच काहीसं नाव असलेली .. फक्त C .S .T . परिसरात म्हणून, सोन्याची किंमत.. गाडीच्या आजूबाजूला ४ फळकुट ,४ टेबलं, गाडीच्या आतल्या बाजुला गिऱ्हाइकांच "उरलेलं ,उष्ट-माष्ट" टाकण्यासाठी एक डबा, पाण्याचं एक पिंप एवढीच काय ती investment आजूबाजूच्या ५ स्टार,2 स्टार , किंव्हा अतिशय सामान्य हाटेलात सुद्धा जायची ऐपत नसणाऱ्या लोकांचं आश्रय स्थान .

देहाची तिजोरी

लेखनविषय:
लेखनप्रकार
"काल तुझी निलू दिसली होती मार्केटात. मला बघितलं पण ओळख नाही दिली तिनी. तुला भेटते का गं अजून ती?" आवराआवर संपवून खोलीत येत ताई म्हणाली. "नाही गं आता काही संपर्कच नाही राह्यला तिच्या लग्नानंतर. पंकजशीच लग्न झालंय तिचं. दोन मुली आहेत एवढं माहितीये." "केवढ्या थापा मारायचीस तू तिच्यासाठी आठवतंय का? अगदी आईला तिचा सगळा घोळ कळल्यावरही तिच्यासाठी खोटं बोलणं संपलं नव्हतं तुझं. नशीब तुझं की मला खरं काय ते कळलेलं होतं. नाहीतर आईनी तर तुला कैदेतच ठेवलं असतं शिक्षण संपेपर्यंत." "हा हा ताई! मी काय कैदेत बियदेत टिकले नसते.

एक होती म्हातारी .............

लेखनविषय:
लेखनप्रकार
हाय मि पियुशा पहिलच प्रयत्न आहे माझा ,लिखनतिल चुका बद्दल साम्भालुन घ्या, एक होती म्हातारी ............. खूप खूप वर्षापूर्वी आट-पाट नगर होते , त्यात एक खावून पिवून सुखी असे कुटुंब राहत होते ,नवरा बायको आणि ४ मुले ,थोडीशीच शेती त्यावर संसार अवलंबून होता , मुले मोठी होऊ लागली तशा-तशा गरजा वाढू लागल्या ,त्यांची शाळा वही पुस्तके ,यांचा खर्चामुळे घरच्या माऊलीला शेतात मजुरी करावी लागायची ,आईबापाने जणू चंगच बांधला होता कि आपण अडाणी राहिलो पण मुलांना शिकवून मोठे साहेब करायचे , म्हणून मायबाप रात्रीचा दिवस करू लागली मुलांच्या गरजा

कथा: चंद्या सख्याची सहल

लेखनविषय:
लेखनप्रकार
कथा: चंद्या सख्याची सहल
चंद्या आन सखाराम दोघं जिगरी दोस्त हुते. शाळंत जायचं बरूबर. इटीदांडू खेळायचं बरूबर. त्याल, साकर, बा ची तमाखू, इडी आनाया गावात बरूबर जात. सकाळची शाळा सुटली म्हंजे संगच दोघांच्या बकर्‍या बरूबर चरायला रानात न्येत आसत. चंद्याच्या ५ आन सख्याच्या ८ बकर्‍या व्हत्या. रानात जातांनाबी त्ये मजा करत जात. कुनाच्या बांधावरच्या बोरी झोडपाया थांबत तर कधी कुनाच्या उसात शिरून मनगटाएवढा जाड उस तोडून खायाला सुरुवात करत. शेळ्या घेवून तसं त्ये मदुनच माळावरनं जात. तिथं थोड्या येड्या बाभळी व्हत्या.

आत्महत्या २० -२२व्या वर्षी.

लेखनविषय:
आत्महत्या ---- का करावी वाटते आत्महत्या, आणि ते सुद्धा वयाच्या २० -२२व्या वर्षी. जमलेले सगळे झालेल्या घटनेला अतर्क्य, अकल्पित वगॆरे म्हणत होते, पण आदर्शला का वाटलं असेल या मार्गानं जावं असं, असतील काही समस्या, प्रश्न आणि जटिल पण असतिल तरी हे पाउल घेण्याआधी सगळे इतर मार्ग संपल्याची खात्री केली होती त्यानं ?
Subscribe to कथा