Skip to main content

कथा

ग्रहण-२

लेखक स्पा यांनी मंगळवार, 20/09/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रहण-१ किचनमध्ये भांडी पडल्याचा आवाज आला. आता तर पाय लटपटायला लागले होते. आत कोणीतरी होतं, नक्कीच. "कोण आहे आत?" मी घाबरुन बरळलो. हसल्यासारखा आवाज आला. आत जाऊ नको कि नाही? असहाय झालो होतो. बाजुला उभी केलेली एक मोडकी छत्री हातात घेतली, बुडत्याला काडीचा आधार. एक एक पाऊल टाकत आत शिरलो.

आठवणी

लेखक मराठे यांनी मंगळवार, 20/09/2011 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या आयुष्यात काही काही आठवणी अशा असतात की कितीही प्रयत्न केला तरी त्या विसरल्या जात नाहीत. आयुष्याच्या संध्याकाळी मग कधी कधी ह्या आठवणी मनात पिंगा घालायला लागतात. जसं जसं मागं जावं तशा तशा ह्या आठवणी थोड्या विरळ होत जातात. एकाद्या धूसर चित्रांचा अल्बम बघावा तशा.... एखाद्या सुराचा, एखाद्या गंधाचा किंवा एखाद्या प्रसंगाचा संदर्भ घेउन अडगळीत पडलेल्या असतात. अडगळीप्रमाणेच.. कधी कधी तर आठवणी अगदीच असंबद्ध असतात. त्या स्मृतींची अडचण अजून का डोक्यात साठली आहे असा प्रश्न पडतो. प्रत्येक स्मृती एखाद्या अद्भुत स्वप्नासारखी वाटते आताशा. लहानपणीच्या त्या आठवणी ..

आंदोलन

लेखक जयनीत यांनी सोमवार, 19/09/2011 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटीश सरकार विरुद्ध अधून मधून एखादी आंदोलनाची लाट उसळून जायची , मग काही दिवसांनी सगळं पूर्वपदावर येत होतं . कालपर्यंत अगदी उत्साहात असलेले कार्यकर्ते निराश होत होते . एकदा आंदोलनाचं लोण ओसरलं की मग पुन्हा आपल्या आयुष्याची जुळवाजुळव करत होते . निराशा झटकून परत उत्साहानी जमवा जमव करणारे विरळेच , तसे लोकं संख्येनी फार कमी होते . त्यातलाच माझा मित्र होता विश्वास . लहानपणा पासूनचा शेजारी , वर्गमित्र , बालमित्र . लहान असताना मी पण एका आंदोलनात भाग घेतला होता , सरकारी कचेरीवर पिकेटिंग होतं , आम्ही मुलांनी त्यात मोठ्या उत्साहानी भाग घेतला होता .

पाठीवरले बिर्‍हाड

लेखक चित्रा यांनी रविवार, 18/09/2011 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/19173 येथून पुढे नगरीजनांचे काय झाले ते पुढच्या काही काव्यसदृश पंक्तींमध्ये. मागील शैलीशी काही संबंध नाही.

ग्रहण-१

लेखक स्पा यांनी गुरुवार, 15/09/2011 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
सायबानू मीच त्यो .... अंतिम आता पुढे .......... **************************************************************************** माणसाचं आयुष्य मोठं अनाकलनीय आहे. प्रत्येक पुढचा क्षण हा अनपेक्षित असतो. काही काही लोकांच आयुष्य तीस-चाळीस वर्ष तसच्या तसं जातं, काही बदल नाही..साचलेल्या डबक्याप्रमाणे.! पण काहींच आयुष्य.....

जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा !!!

लेखक सुहास झेले यांनी गुरुवार, 15/09/2011 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आता आपल्याला वेध लागलेत दिवाळी अंकाचे. जालरंग प्रकाशनातर्फे आपणही दिवाळीचे स्वागत साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांनी करूया. आपण नवोदित असाल किंवा अनुभवी, आम्ही सगळ्यांना सामावून घेतो. तेव्हा चला,उठा आणि सज्ज व्हा आता. आपल्या दिवाळी अंकासाठी कोणताही एक विशिष्ट असा विषय नाहीये.

निष्पर्ण

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 14/09/2011 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, आईला पण घेऊन जा ना आज; तिची खूप इच्छा आहे..." "असं काय करतोस, गौतम? तुला माहिती आहे ना काय होतं ते?" "मला माहिती आहे हो...पण...अपूर्वापण मला सांगत होती की आज बाबांना आईला सोबत घेऊन जायला सांग म्हणून...आई रडली तिच्याजवळ काल दुपारी." "गौतम, मला वाटत नाही का तिला सोबत घेऊन जावं म्हणून? मागच्या वेळेस मी आणि ती गेलो होतो सुधाकरच्या घरी. मग घरी परत आल्यावर ती कितीतरी वेळ रडत बसली होती कुणी तिच्याशी बोलत नाही म्हणून..." "मग तुम्ही तिला सहभागी करून घेत जा ना तुमच्या गप्पांमध्ये. म्हणजे आपोआप सगळे बोलतील, बरं वाटेल तिला...सुधाकरकाका, विमलकाकू, अजय, स्मिता...सगळ्यांना माहिती आहेच ना.