लालीची गोष्ट भाग २
भाग १
लाली थोडी हिरमुसली. पण तिचा तिच्या माईवर पूर्ण विश्वास होता. ती बर म्हणाली आणि शीलाचा हात सोडून संस्थेच्या दारातून आत गेली. लालीला वाटल होत की निर्मला ताई तिला जवळ बोलावतील तिच्याशी बोलतील. पण तस काहीच झाल नाही. ती रात्र नेहेमीप्रमाणे गेली. आणि मग त्यानंतरच्या २-३ रात्री देखील.
पण ३ दिवसांनंतरच्या रात्री निर्मला ताईंनी सर्व मुलांना एकत्र केल आणि विचारल;"कोणा-कोणाला रात्र शाळेत जायचं आहे? त्यांनी हात वर करा बघू. लालीला खूप आनंद झाला. तिने लग्गेच हात वर केला. तिथेच एक अनोळखी थोडे म्हातारेसे आजोबा बसले होते.
मिसळपाव