Skip to main content

कथा

दिवाकरांच्या नाट्यछटा

लेखक खेडूत यांनी बुधवार, 30/09/2015 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी! शतशब्दकथा लिहून आणि वाचून आपणा सर्वांना भरपूर विरंगुळा मिळाला असेल.असाच काहीसा, पण शब्दमर्यादा नसलेला, मराठी साहित्यातला एक वेगळा अन जुना प्रकार म्हणजे दिवाकरांच्या नाट्यछटा. का कोणास ठाऊक, पण शतशब्दकथा आणि नाट्यछटा यांच्यात काहीतरी नातं- साम्य तरी आहे असं नेहमी वाटतं . मागे २०१२ मधे पुण्याला सकाळ वृत्तपत्रातर्फे मुले आणि मोठ्यांसाठी एक नाट्यछटा स्पर्धा घेण्यात आली. त्यात दिवाकर यांच्या मूळ आणि काही नव्या लेखकांच्या नाट्यछटा सहभागी झाल्या होत्या. हे अन्य लेखक प्रसिद्ध नसल्याने असेल, पण मोठ्या संख्येने सहभाग असूनही त्या नाट्यछटा वाचकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत.

कालचक्र

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 30/09/2015 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
कोण्या एका काळी एका दुरदेशी एक महान तपस्वी एका निबिड अरण्यात एकाकी भटकत होता. त्याची गृहस्थी सर्वदुर प्रदेशात एका कुटित आपल्या मुलांना घेऊन त्याची वाट पाहत अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली. दऱ्या डोंगरे चिखल दलदल आणि ऊष्ण वाळवंट तुडवणारा तपस्वी आता या दिशाहीन प्रवासाला थकला होता. एके दिवशी एका चवदार तळयाकाठी त्याला एक बंदिस्त शुभ्र मडके सापडले. वैफल्याने ग्रासलेल्या आपल्या मळकट झोळीत त्याने ते ठेऊन दिले. एका अवाढव्य शिळेवर चढुन त्याने ते खोलुन पाहिले.

मटणाचं कालवण! (शतशब्द्कथा)

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 30/09/2015 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
फाट्यावरच्या ट्रकमधून गर्दी सांडून ओघळ फुटल्यासारखी गाव आणि वस्त्यांकड निघालेली. कलंडलेल्या उन्हातनं तिघी वस्तीकडं निघाल्या. गर्दीत मिसळू न देण्यासाठी सासूने त्या दोघींचे हात धरलेले! भयानक दुष्काळ पडलेला! दुष्काळी कामावरूनच तिघी परतत होत्या. स्वयंपाकासाठी काय करायचं हा नेहमीचा प्रश्नही सोबत चालत होता. पण कुणीच काही बोलत नव्हत. मुक्याच जणू! नेहमीच्या वळणावर तिघी थांबल्या. थोरली सून रस्ता उतरली, ढासळलेल्या पवळंवरून पलिकडं गेली. कंबरेच्या विळ्याने 'विचका' स्वयंपाकासाठी काढू लागली.

अकबर बिरबल (मोत्यांची शेती)

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 28/09/2015 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचा भाग: अकबर बिरबल (मेहुण्याची शिफारस) -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अकबर बिरबल (मोत्यांची शेती) -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- [दृश्य: अकबराच्या लाडक्या बेगमच्या महालातील सुंदर शयनकक्ष.

रांगडी रात्र

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 28/09/2015 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे नऊ वाजत आलेत. बेडवर ती 'इनसाईड मॅडेलाइन' वाचत पडलीय. छकुलीचा पण होमवर्क झालाय, तसाही उद्या संडे होता. तिच्या रुममध्ये एव्हाना ती झोपलीही असेल. किचन ही आवरले होते. काही वेळापुर्वीच तिचे मिस्टर दुर कुठेतरी दोन दिवसांच्या अॉफिसटुरला गेले होते. तिने अगदी फोन करुन ट्रॅव्हल भेटल्याची खात्री करुन घेतली. दिवस तसा धावपळीतच गेला होता. एक अनामिक हुरहुर तिला लागुन राहीलेली. घड्याळाकडे वारंवार नजर चालली. तसही करण्यासारखं काही काम नव्हतं. रोजचा छंद म्हणुन बेडटाईम स्टोरीज वाचत पडली होती. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडुन तिने त्याला लगबगीने आत घेतलं. आज त्यानं चक्क बियरचं आणलीये.

रूपगर्विता

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 27/09/2015 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास चार वाजता एस. टी. भेटली. मधल्या शिटावर बसुन माझा प्रवास सुरू झाला. खिडकीतुन बाहेर बघत बसलो. कंटाळा आला. हेडफोन कानात घालुन मस्त ताणुन दिली. "फुल मांगुना बहार मांगु......" वाह! काय मस्त गाणं आहे अगदी तिनचं गायल्यासारखं. गाडीने वेग घेतला. हायवेवरचा वेग. तुफान. तासाभरानं एक गाव आलं. तिथ उतरायचचं होतं. कसलं हे गाव 'थिरडी'. अजुन इथनं आठ-दहा किलोमीटर लांब होतं म्हणे. एकतर संध्याकाळची वेळ. तिथं काही खायला भेटणं अवघडचं. एका गाड्यावर भुर्जी-पाव हाणली, डब्बल. एक पार्सल पण घेतली. मग टमटमनं निघालो 'थिरडी' कडं. महामार्गापासुन आत जाणारा गावठी रस्ता आता सुरु झाला.

श्श..... सांभाळून बोला! भाग ३ (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 27/09/2015 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 3 रामुकाकानी दिलेलं तांब्या भांड घेऊन अवनीच्या हातात देत खाली पडलेल्या मैथिलीला त्याने उचलल. मैथिली बेशुद्ध पडली होती. तिला त्याने पलंगावर ठेवल. पाणी देऊन रामुकाका गेले होते. अवनीने दरवाजा लावून घेतला. सगळेच मैठीलीच्या भोवती जमले. अभिने मैथिलीच्या चेहऱ्यावर पाणि शिपडल. मैथिली पाण्याच्या स्पर्शने जागी झाली. क्षणभर तिला लक्षात नाही आल ती कुठे आहे; पण पूर्ण जागी झाली आणि तिचा चेहेरा भितीने गोठुन गेला. ती दचकुन पलंगावरून उठली. "चला आधीच्या आधी आपण या वाड्यातून बाहेर पडूया या." सामान उचलत ती म्हणाली. "मैथिलि काय झाल? तू अशी एकदम का ओरडलिस? का निघायच आपण? अग आता साधारण 3 वाजले आहेत.

श्श..... सांभाळून बोला! भाग २

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 27/09/2015 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 2 "रामुकाका... ओ.. रामुकाका..... काय झाल? काय पडल?" वर्धाने जोरात हाक मारत रामुकाकाना विचारले. "काही नाही जी. तुम्ही म्हणाल तस जी." खालून उत्तर आले. एकमेकांकडे बघत परत खोलीकडे वळले. पण जिन्याच्या उजव्या बाजूकडे खोलीच दारच नव्हत. समोर एक आणि डावीकडे दोन अशी एकूण अरेन्ज्मेंट होती. सगळेच गोंधळले. "अरे आपण उजवीकडच्या खोलीकडे गेलो होतो न?" मंजूने विचारले. अभी डावीकडे वाळला आणि एका खोलीच्या दारात उभ रहात म्हणाला,"अरे आपल सामान इथे आहे. उजवी डावी सोडा... या जेवण तयार होईपर्यंत जरा फ्रेश होऊया." सगळे अभिच्या मागे डावीकडच्या खोलीकडे वळले. अवनीला मात्र हे थोड विचित्र वाटल.

स्क्रिन शॉट भाग -५

लेखक राजू यांनी रविवार, 27/09/2015 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत..... आता आपण नेमके काय करावे असा तो विचार करत असतानाच अचानक त्याच्या पाठिवर कोणीतरी हात ठेवला. आणि अमितला परत एकदा जबरदस्त धक्का बसला आणि तो मोठ्याने ओरडला..... " शक्यच नाही ?" पुढे चालु....
स्क्रिन शॉट भाग -५ "शक्यच नाही ? " जिने आपल्या वॉलवर स्क्रिन शॉट टाकला ती अभिषा व तिच्या सोबत सुधीर, जगदीश, विशाल, सुषमा,नेहा,सोहम,सार्थक सगळे एकत्र पाहुन अमित आश्चर्यचकित झाला त्याला त्या वाक्यानंतर काहिच बोलता येत नव्हते.

शितोळे (शतशब्द्कथा)

लेखक खेडूत यांनी रविवार, 27/09/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
''कुठे चालले ? सातारा का?'' ''नाई सांगलीला'' . ''अरे वा ! मी पण !'' 'त्यात काय अरे वा ?' बाबासाहेब वैतागले. डोळे मिटून बसले . ''तुम्हाला प्रवासात झोप येते? '' ''हं '' ''बरंय बाबा !'' शेजारचा प्रवासी सतत काहीबाही बोलत होता. जरा डुलकी आली की नवा विषय काढून बोलत राही. भिडस्तपणामुळे बाबासाहेब त्याला 'गप्प बसा 'म्हणत नव्हते . ''हल्ली लोकांना ना, कशाचाही कौतुक !