Skip to main content

जीवनमान

''मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या'' आंदोलन!

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 03/09/2010 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात उद्या, म्हणजे ४ सप्टेंबर २०१० रोजी, शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीने ''मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या'' आंदोलन! सध्या महाराष्ट्र शासन मराठी शाळांना मान्यता देण्याऐवजी मराठी माध्यमाच्या ज्या शाळांना अद्याप मान्यता मिळालेली नाही त्या शाळाच बंद करत आहे. केंद्र सरकारच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराच्या कायद्यामुळे मराठी माध्यमाच्या व शासनाची मान्यता नसलेल्या सर्व शाळांपुढे अस्तित्त्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

कुणी जाल का? सांगाल का?

लेखक स्पंदना यांनी शुक्रवार, 03/09/2010 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
सुचवाल का त्या कोकिळा ? बाई रात्रीच नव्हे पण दिवसा सुद्धा नको ग गाऊ !. या घरा बद्दल आवडलेली खरतर ही पहिली गोष्ट, की अपार्टमेंट मध्ये मांडलेल्या माझ्या अधांतरी संसाराला तुम्हा अधांतरी घरट बांधणाऱ्या पाखरांची जोड असावी.! तुमच हितगुज पाहता पाहता माझ विश्व रंगून जाव ! सकाळी सकाळी जाग यावी ती तुमच्या किलबिलाटान ! अन डोळे मिटावेत ते झोपेत हळूच स्वप्न पाहता पाहता चुकून निघालेल्या ' चीवक चीवक' न ! पण आज नको ग ! नका करू किलाबिलाट ! माझ्या शेजारणीचा खोपा मोडलाय ! तिन चिमण्या अन एक माता , अजून जाणीवेच्या पलीकडे जगताहेत.! आज आठ दिवस झाले. तस म्हंटल तर काय नात आमच?

दंगल-ए-खास

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 02/09/2010 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
''ए बच्ची, अंदर जा, अंदर जा....'' माझ्या बालमूर्तीला उद्देशून लॉजचा मॅनेजर खेकसला तशी मी घाबरून त्या जुनाट लॉजच्या लाकडी दरवाज्यातून आत स्वागतकक्षात गेले आणि आईला घट्ट बिलगून बसले. बाहेर जोरजोरात कानडी भाषेतील घोषणा ऐकू येत होत्या. सकाळच्या रम्य, शांत प्रहरी त्या घोषणांचा असंतुष्ट सूर वातावरण ढवळून काढत होता. गणपतीच्या सुट्टीतले ते सुंदर, सोनेरी दिवस. शाळेच्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन माझे व धाकट्या बहिणीचे गाठोडे बांधून आई-वडील आम्हाला दक्षिण भारताच्या सफरीसाठी घेऊन गेले होते. मी होते जेमतेम दहा - अकरा वर्षांची तर बहीण आठ वर्षांची!

बालकांचा चिम्मणचारा

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 01/09/2010 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
बालकेच ती, खेळणारच. जन्मजात स्वभावच त्यांचा, इकडे तिकडे हुंदडण्याचा. त्यामुळे त्यांनी पोटभर खाल्ले नाही की आईच्या पोटात कालवाकालव होते. मुळात बालकांचे वयच खाण्यापेक्षा खेळण्याकडे ओढा असणारे. त्यांनी पुरेसे म्हणजे एक चपाती, थोडी भाजी, वाटीभर वरणभात वगैरे खाल्लं नाही म्हणजे ती मुलं अर्धपोटी खेळत आहेत हा समजच चुकीचा! खरे तर तासाभराने घासभर 'चरण्याची' बालकांची मूळ वृत्ती असते. परंतु आपण मोठी माणसं उगाचच त्यांचे खाणे वेळेत अन् वजनमापात तोलत बसतो. त्यांना वेळेनुसार खायला देण्याऐवजी वेळोवेळी द्यावे लागते तरच ते पचते, अंगी लागते.

लव्ह युवर जॉब. डु यु?

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 01/09/2010 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. आजकालच्या शक्यतो तरुण मंडळींच्या गप्पांमधे एक सर्रास आढळणारा विषय. आमीर खानच्या थ्री ईडीयट्स मधे सुद्धा हाच संदेश दिला आहे. जे आवडते ते मन लावुन करा, यशस्वी आणि आनंदी व्हाल. उगाच पैसे कमवायचे म्हणुन एखादे काम करु नका, त्यातुन पैसा मिळेल पण जीवनाचा आनंद नाही. ह्या विषयावर मी/तुम्ही सुद्धा कित्येक जणांशी चर्चा केली असेल. पण याच खरं उत्तर एखादा सामान्यवर्गीय (सामान्यवर्गीयांची व्याख्या व्यक्तीसापेक्ष) देऊ शकेल?

प्रिय राहूल देशपांडे,

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 01/09/2010 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय राहुल देशपांडे, (केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद, मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू म्हणून कुठेही दुराभिमान नाही, बडेजाव नाही, की त्यांची कुठे भ्रष्ट नक्कल नाही.

काही बाही - २

लेखक अवलिया यांनी बुधवार, 01/09/2010 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ एकदा वाचुन झाल्यावर कधीही कुठुनही वाचता येतो, त्यातील कुठलेही पान काढून वाचता येते, त्यावर मनन वा चिंतन करता येते असा ग्रंथ म्हणजे दासबोध. दासबोधातील मराठी खुपच सुलभ आहे. फार कमी ठिकाणी शब्दकोशाचे सहाय्य घ्यावे लागते. रोजच्या जीवनातील घटनांमधे प्रचिती येणारे रोकडे पुस्तक असं म्हटलं तरी चालेल. ब्रह्मचारी माणसाने प्रापंचिक माणसाला केलेला उपदेश असला तरी समर्थांच्या तळागाळातील लोकांना असलेल्या समस्यांचे भान थक्क करुन सोडते. पहिल्याच दशकातील पहिला समास. ग्रंथारंभलक्षण.

टाईल्स लावता घरा..... !!

लेखक जयवी यांनी मंगळवार, 31/08/2010 02:25 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात, “घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करुन” !! म्हणजे काय की घर बांधणं, लग्न समारंभ आयोजित करणं…. ही फार मोठी कामं आहेत. अगदी मान्य !! ह्या कामात खरोखरंच जीव मेटाकुटीला येतो. पण घरात टाईल्स बसवणं हे सुद्धा इतकं जिकीरीचं काम असेल असं आम्हाला परवा-परवा पर्यंत तरी वाटलं नव्हतं. तर त्याचं असं झालं. नवीन नवीन आखातात आलो तेव्हा सगळ्या घरातल्या wall to wall गालिच्याचं कसलं कौतुक होतं !! अगदी वेगवेगळ्या कोनातून, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या लाईट्स मधे आपल्या घरचा गालिचा किती सुरेख दिसतो ह्याचं कोण अप्रूप होतं !! पण जसजशी वर्ष जायला लागली…तसतसा ह्या कौतुकाचा भर ओसरायला लागला.