Skip to main content

जीवनमान

म्हातारबाँचा दिवस...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 01/10/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल आमचे म्हातारबॉ भलतेच खुश असतात. कारण त्यांचे दिवटे चिरंजीव म्हणजे आम्ही आता स्वतःच्या पायावर उभे राहिलेलो असून आम्हांमुळे म्हातारबाँच्या कितीतरी आगंतुकांना बांडगुळासारखे हक्काचे शोषण करुन घेण्याची नामी संधी त्यायोगे मिळालीय. खायचं, प्यायचं अन् ह्याचं जुळव, त्याचं मोड अशी लावालावी करीत गावोगाव उंडारायचं. हेच त्यांचं ज्येष्ठ काम उरलंय. त्यांची साठी उलटली तेव्हा आम्हांला वाटलं त्यांच्या हाती काठी येईल पण छे! म्हातारबाँनी अनेक सवलतीच्या पासांची ताटीच बांधली... यष्टी, रिल्वे यांचे तर अर्ध्या तिकिटाचे पास आहेतच.

माझं काय चुकलं?

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 30/09/2010 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब. सगळ अगदीच सामान्य. अशाच घरात माझा जन्म झाला.. लहानपणाचं आयुष्य आजुबाजुचं जग बघत बघत मोठं झालं, कधी गरीबी कधी श्रीमंती, म्हणजे कधी साधी भाजी पोळी तर कधी पुरणपोळी अशा अर्थाने. भारतात जन्म घेतलास म्हणजे मार्बल्स्,विटी-दांडू, क्रिकेट आवडायलाच हवे असा मनावर एक कोरला गेलेला ईतिहास, मला बास्केटबॉल आवडायचं. आयुष्य म्हणजे जे आपले आई-बाबा, शेजारी जगताहेत तेच असतं असा परिस्थितीचा आग्रह. पण मला हे कधीच पटत नव्हतं, हे असं नको- असं असायला हवं अशी माझी जिज्ञासा आणि अपेक्षा. त्यामुळे घरात आणि घरा बाहेर मी नेहमीच एक रेबल (ईंग्रजी).

शर्यत

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 28/09/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
अमरचे डोळे ' रिसर्च टुडे 'मासिकामधल्या एका बातमीवर खिळले होते- जुलै २००७ उंदरांना जवळ जवळ ३५ कॉन्सन्ट्रेटेड बाटल्या खास द्राक्षासव पाजले की त्यांचे आयुष्य वाढते असे असे पाहणीत आढळले आहे. उंदरांची पाहणी केली असता त्या खास द्राक्षासवातील काही घटक विशेषतः 'लाइफसेवर ' हे आयुष्यमान वाढवण्यात सक्रिय असतात असे सुद्धा एका अभ्यासात आढळले आहे. या ओळी वाचूनच अमर थबकला. त्याच्यापेक्षा अधिक वेगाने कोणीतरी हाच धागा पकडून संशोधन करत होते तर...

फिरायला चला..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 27/09/2010 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी दोन पायांच्या गाडीने मानवाचा प्रवास व्हायचा. त्याला जमेल तितके प्रांत त्यानं ओलांडले. चिनी प्रवासी ह्युआन ए त्सांग आपल्या पाठीवरील अवजड ओझे सांभाळीत आशियाभर फिरला, तेव्हा कोठे भारताचं नालंदा साऱ्‍या जगाला कळून चुकलं. कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावून अख्ख्या जगावर सत्ता गाजवू शकेल अशा अपरिचित भूमीचा परिचय जुन्या दुनियेला करुन दिला. वास्को द गामा चुकून भारतात टपकला व इथल्या मसाल्याचं वेड जगभर पोचवून गेला.