एका नव्या सभ्यतेची ओळख.
नमस्कार मंडळी,
एकदा असाच मनात विचार आला, आपण काय जपुन ठेवतो बरं? पैसा? माणसं? सुखं? ईतर काही?
नाही.. मग काय? तर आठवणी. ज्या कायम सोबत राहतात, अगदी मरेपर्यंत. बाकी सगळं क्षणिक. नाही का?
**************************************************
आज नविनच लोकांना भेटलो, कधी विचारच काय तर कल्पना सुद्धा केली नव्हती. एका मित्राला भेटायला काय गेलो आणि एक नविन विश्व पाहुन आलो. शनिवार रात्र म्हणुन पार्टी चालु होती तिथे, नविन चेहरे, नविन लोकं, खरं तर मित्राला बरोबर घेउन लगेच निघायचे होते तिथुन पण हे लोकं एवढे आग्रही होते की मला तिथे तास दोन तास थांबायला भाग पडलं. पहिल्यांदाच मार्गारिटा प्याली, आवडली.
मिसळपाव
नितळ.... आजकालच्या तेच ते रटाळ विनोद दाखवणार्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत हरवलेला एक सर्वांगसुंदर चित्रपट.
चित्रपट अगदी सरळधोपट आहे. कुठे फ्लॅशबॅक, धक्कातंत्र, मालमसाला, खलनायक-खलनायिका, दुष्मन जमाना असले काहीही नाही. अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात आणि चित्रपट हळूहळू उलगडत जातो.नायिका नीरजा कौशिक ही एक हुशार नेत्रतज्ञ आहे. अनन्य रानडे हा तिचा मित्र. दोघे बंगळुरातल्या एका दवाखान्यात काम करतात. अनन्यच्या आजीचे डोळ्यांचे ऑपरेशन व्हायचेय, त्यासाठी सेकंड ओपिनिअन म्हणून तो तिला आपल्या पुण्याच्या घरी आणतो.