Skip to main content

जीवनमान

एका नव्या सभ्यतेची ओळख.

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 26/09/2010 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, एकदा असाच मनात विचार आला, आपण काय जपुन ठेवतो बरं? पैसा? माणसं? सुखं? ईतर काही? नाही.. मग काय? तर आठवणी. ज्या कायम सोबत राहतात, अगदी मरेपर्यंत. बाकी सगळं क्षणिक. नाही का? ************************************************** आज नविनच लोकांना भेटलो, कधी विचारच काय तर कल्पना सुद्धा केली नव्हती. एका मित्राला भेटायला काय गेलो आणि एक नविन विश्व पाहुन आलो. शनिवार रात्र म्हणुन पार्टी चालु होती तिथे, नविन चेहरे, नविन लोकं, खरं तर मित्राला बरोबर घेउन लगेच निघायचे होते तिथुन पण हे लोकं एवढे आग्रही होते की मला तिथे तास दोन तास थांबायला भाग पडलं. पहिल्यांदाच मार्गारिटा प्याली, आवडली.

काय?आठवतंय तुला?

लेखक ऋयाम यांनी रविवार, 26/09/2010 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
देशपांडे गल्लीत त्यांचं घर... तिथं देशपांडेंचा मोठा वाडा... वडिलोपार्जित! म्हणुनच ती देशपांडे गल्ली! तिथंच शेजारी असलेल्या पाटलांच्या त्या दोन मजली घरात, वरच्या मजल्यावर ह्यांचं बिर्‍हाड. शेजारी आणखीही काही भाडेकरु... त्या गल्लीत किराणा मालाचं एकमेव दुकान पाटलांचं.. त्या दुकानाच्या मालकांचच हे घर... पुढं दुकान, मागं घर, आणि वरचा मजला भाड्यानं दिलेला... तर... तिथला जिना चढुन दुसर्‍या मजल्यावर यायचं आणि उजवीकडे पहिलंच घर यांचं... तो जिना चढुन वर आला... दरवाजा उघडुन आत जाऊ लागला, तेव्हा दाराचा जोरात आवाज झाला.. "कररर्र......... " "किती आवाज होतोय... तेल घालायला हवं....

धक धक करने लगा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 26/09/2010 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आमच्या काळजात कळ निघाली की आमचे दिल धकधक करु लागते. हा अनुभव प्रत्येकाने एक दोनदा तरी घेतलेला असावा. छातीत धडधड वाढली की कोठेतरी काहीतरी पडझड झालीय याचा अंदाज बांधता येतो. कधी ती कौटुंबिक कलहाची खडखड असते तर कधी मनोभावे पाहिलेल्या नजरतीराने उडालेली गडबड असू शकते. फाटलेले शिवण्याची धडपडदेखील कट्यार काळजात रोवून जाते. एकूणच ही काळजातली धडधड काळजी करायला लावणारी.

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 24/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

पाहावेसे असे काहीतरी- नितळ!!!

लेखक मस्त कलंदर यांनी शुक्रवार, 24/09/2010 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
नितळ.... आजकालच्या तेच ते रटाळ विनोद दाखवणार्‍या चित्रपटांच्या भाऊगर्दीत हरवलेला एक सर्वांगसुंदर चित्रपट. चित्रपट अगदी सरळधोपट आहे. कुठे फ्लॅशबॅक, धक्कातंत्र, मालमसाला, खलनायक-खलनायिका, दुष्मन जमाना असले काहीही नाही. अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात आणि चित्रपट हळूहळू उलगडत जातो.नायिका नीरजा कौशिक ही एक हुशार नेत्रतज्ञ आहे. अनन्य रानडे हा तिचा मित्र. दोघे बंगळुरातल्या एका दवाखान्यात काम करतात. अनन्यच्या आजीचे डोळ्यांचे ऑपरेशन व्हायचेय, त्यासाठी सेकंड ओपिनिअन म्हणून तो तिला आपल्या पुण्याच्या घरी आणतो.

मनस्वी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 23/09/2010 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
"आली साली रांड !" केतन 'किव्हाजच्या' दाराकडे बघत फाडकन म्हणाला आणी माझी मान पण आपसुकच दाराकडे वळली. दारातुन २४/२५ वर्षाची मुलगी सुहास्य वदनाने आत येत होती. अगदी अप्रतिम सौंदर्यवती वगैरे म्हणता येणार नाही पण आकर्षक नक्कीच होती मुख्य म्हणजे मस्त 'फॉर्म' राखुन होती. केत्या भाड्या, एखादी मुलगी जोवर सिंगल असते तोवर तुझ्यासाठी ती अप्सरा असते. एकदा ती दुसर्‍या कोणाला पटली किंवा तुला अप्राप्य आहे हे तुला कळले की तुझ्यासाठी ती लगेच वेश्या कॅटेगरीत मोडायला सुरुवात होते, नाही ? मी वैतागुन म्हणालो. "हाड बे ! तसले काही नाही. हि साली पोरगी 'तसलीच' आहे. रात्रीला ५०००/- घेते मोजुन. " "काय बोलतो ?

अनंत.....

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 23/09/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
सोहोळ्यातुन सोहळ्याकडे चालले आयुष्य सारे, सोहळा हरेक घडी क्षणी बदलताच वारे ॥ चाहुल लागता जन्माची प्रथम सोहळा घडे, मातृपद देउन तिजला हळुवार पाउल पुढे ॥ नामकरण अन उष्टावण भरभरुन जमती जन, वाढदिसांची त्यातच गणती वर्षांचे उठवुन व्रण ॥ सोहळे शिक्षणा आधी सोहळे शिक्षणा नंतर, कळे न जीवनी कशास सोहोळ्यांचा हवा मंतर ॥ सोहळा प्रत्येक पायरी विवाह; नोकरी; यश भर त्यातच सणासुदिंची उस्तव, आठवुन तो ईश ॥ आला संपत जन्म पण सोहळे पुरुन उरले, रौप्य, सुवर्ण, हिरक जरतारी वस्त्र लाभले ॥ उपस्थिती चे संपले सोहळे अन, अनुपस्थिती आता, श्राद्ध, वर्षस्मरण, पुण्यतीथीच्या घडती जनात बाता
काव्यरस

जीवन एक महामार्ग

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 22/09/2010 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनमार्ग असो वा वाहतूकमार्ग चढ आणि उतार ठरलेलेच. कधी कधी इतकी धोकादायक वळणे येतात की मनाला उत्तम ब्रेक असेल तरच कवटी शाबूत राहते. अन्यथा वाहनही बेकाबू होऊन सर्व सर्व ब्रेक अप होण्याचा संभव असतो. अंधारी बोगदे पार केल्याशिवाय सुखाचा प्रकाश संभवत नाही. कधी कधी तर इतका गुळमुळीत अन् मोकळा ढाकळा महामार्ग गवसतो की स्पीडचं थ्रिल अनुभवावंसं वाटतं. परंतु मध्येच येणाऱ्‍या ब्रेकरमुळे मनाला, तनाला अन् वाहनालाही वेसण बसल्याने थ्रिलचं किल मध्ये रुपांतर होत नाही. काही मार्ग निसरडे व ओलसर लागतात. अशाठिकाणी कोणताही सैलसरपणा अंगावर चमडी ठेवत नसतो. वळणदार घाटरस्त्याने झोकदार वळण घ्यायचे मनात घाटत असते.

खराब रस्त्यांचे फायदे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 21/09/2010 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
खराब रस्त्यांचे फायदे
भारतातील रस्ते अन त्यांची स्थिती यावर मी पिएचडी करायची ठरवीलेली आहे. भारतात कोठेही जा. बिहार, झारखंड, महाराष्ट्र, पश्विम बंगाल, उत्तरप्रदेश, तमिळनाडू. सगळ्या ठिकाणी सारखीच परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात गुजरात मध्ये थोडीफार परिस्थिती बरी आहे. ग्रामिण भागात तर रस्ता १० चा २० होतो. काही ठिकाणी बरा रस्ता असल्याने तो १० चा १५ होतो. १० चा १० असणारे रस्ते फारच दुर्मीळ. (१० चा x असणे हे रस्त्याची परिस्थिती मोजण्याचे आमच्याकडचे परिमाण आहे.