Skip to main content

जीवनमान

स्वातंत्र्यदिनाचा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 15/08/2010 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःच्या तंत्राचा अवलंब करुन इतरांना पारतंत्र्याची हवा खाऊ देण्याची सोय म्हणजे स्वातंत्र्य! देश स्वतंत्र झाला. साठीच्या घरात पोचला. परंतु लोकांचं राज्य अजूनतरी स्वप्नच ठरलंय. लोकशाही अस्तित्वात आली म्हणजे स्वतंत्रता नव्हे. लोकशाहीच्या तंबूलाच भ्रष्टाचाराचा बांबू आधार देऊन दिमाखात उभाय. एकेका मताला कितीतरी महत्त्व आलंय, आणि त्यामुळेच लालची मतदारराजा एका क्षणिक मोहापायी आपले मतदानाचे स्वातंत्र्य विकून टाकतो. मताच्या प्रत्येक बटनाला नेता अमूक तमूक रक्कम अदा करीत असतो. हे सर्वश्रुत उघड गुपित आहे. अशी ठराविक संख्येची बटने विकत घेतली की खुर्ची फिक्स!

माझे पोहणे

लेखक शिल्पा ब यांनी शनिवार, 14/08/2010 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
आता यात काय लिहायचे असे वाटेल तुम्हाला...पोहता येत नसेल तर क्लास लावायचा आणि हात पाय मारताना थोडेफार नाका-तोंडात पाणी जाऊन काही काळाने पोहायला जमते.. खरं तर हीच प्रक्रिया आहे...पण... मला आत्तापर्यंत पोहता येत नव्हते...म्हणजे आता येते अशातला भाग नाही पण आताशा मी पाण्याला घाबरून काठावर उभी राहत नाही एवढंच..मला पाण्याची फार्फारच भीती वाटत आलीये...अजूनही वाटते...अंघोळ करताना डोक्यावरून जास्त पाणी घेतलं तरी एकदम धबधब्याखाली आले असं वाटून डोळे उघडून कितीतरी वेळा साबण डोळ्यात गेला असेल...

मला आलेला अनुभव

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 13/08/2010 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार... मी इथे नवा आहे त्या मुळे माझा लेख इंग्रजीमधुन लिहीत आहे.

सावरकर आजोबा गेले.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 13/08/2010 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
आताच समजलेल्या बातमीनुसार गुरुवार दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री झोपेतच त्यांचे निधन झाले. एक अविश्रांत धडपडणारा, कर्तबगार, करारी जीव मृत्यूला शांतपणे सामोरा गेला. त्यांना शेवटपर्यंत काहीही मोठे आजारपण नव्हते. सगळे काही अचानक घडल्याने त्यांचा मुलगा अभिजित इकडून लगेच जाऊ शकलेला नाही. मागल्या वर्षी आजोबांची भेट इथे झाली आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित लेखमाला मला लिहिण्याचे भाग्य प्राप्त झाले हा माझ्या आयुष्यातला एक मोठा आनंदाचा आणि आगळ्या समाधानाचा काळ होता. त्यांचे थोडे तरी अनुभव शब्दबद्ध होऊ शकले हा मोठा योगच.

आपले आवडते वुत्तपत्र व काही सुझाव.

लेखक शानबा५१२ यांनी गुरुवार, 12/08/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुझाव??????? असो...नमस्कार्,नमस्कार....... आम्ही आजच पेपरवाल्या अण्णाला 'कल से ये न्युजपेपर बंद करना है" अस सांगितल.त्याने "ठीक है,फीर कोनसा पेपर लोगे?' हा अपेक्षित प्रश्न विचारला. मी विचार तर नव्हता केला म्हणून "बाद मे बताता हुं,१५ तारीख तक यही पेपर देना" अस सांगितल. तर मला एक मराठी व एक ईंग्लिश असे दोन पेपर रोजच्या वाचनात आणायचे आहेत.बाहेर जाउन DNA,Mumbai-Mirror व Mid-Day आणला,त्यात ,Mumbai-Mirror आवडला पण फार मर्यादीत असतो.बाकी काही लिखाण छान होतं.आपण कोणता ईंग्रजी पेपर सुचवाल?तो आपल्याला का आवडतो हेही सांगा.पेपरात नोकरी(आम्हाला हाय बर्का!)),शिक्षण व विज्ञान ह्या विषयावर अलग विभाग असावा ह

मुंबई मीटर जाम.

लेखक हैयो हैयैयो यांनी गुरुवार, 12/08/2010 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई मीटर जाम. जे औटोरिक्षा / टैक्सि ने प्रवास करतात अशांसाठी विशेष: आज १२ अगस्ट आहे, आणि आज मीटर जाम चा दिवस आहे. आज आपण लोक औटोरिक्षा / टैक्सि चा उपयोग नाही करणार. आज आपण आपल्या आफिसास बस ने / लोकली ने / चालत चालत येणार. बस ने / लोकली ने / चालत चालत येणेजाणे सफलतापूर्व असो तसेच औटोरिक्षा / टैक्सि वाल्यांस बरी अद्दल घडो ही शुभकामना! बघुया काय मिजाज राहतो येथील जनते चा आणि औटोरिक्षा / टैक्सिवाल्यां चा!! हैयो! हैयैयो!!

जगन्याचि कला

लेखक अशक्त यांनी गुरुवार, 12/08/2010 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आपल्या इथे पुष्कळ बाबा आहेत पण त्यात उठुन दिसतात ते रवि शंकर. त्यांचा भक्तवर्ग बहुतांश युवक-युवति आहेत हे विशेष. ज्या पद्धतिने आर्ट ओफ लिविंग चे कार्य चालते ते पाहुन हा एक जस्ट अनादर कल्ट चा प्रकार आहे असे वाटते. कल्ट कसा सुरु करावा हे इथे पहा, http://www.youtube.com/watch?v=mnNSe5XYp6E. त्यांनी समाजसेवाहि बरिच केलि आणि करत आहे अस ऐकुन आहे. बरयाच जनांच जीवन हि बदलुन टाकलय असे दावा करनारे हि आहेत. परंतु जेव्हा माझे हुशार मित्र काम-धंदा सोडुन बाबाच्या मागे फिरताना (सत्सन्ग करताना) दिसतात तेव्हा कीव वाटते.