Skip to main content

इतिहास

मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 09/11/2013 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
मालिकेचे नाव : महाभारत निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * ) संगीत दर्जा : उत्तम ( * * * * ) पुनर्प्रसारणाबद्दल : सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र.

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 03/11/2013 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, यंदाच्या मिपाच्या दिवाळी अंकातली एक कथा तुम्ही वाचली असेल, त्यातील कथानायक 'मदनकेतु' याच्यावर श्रीकृष्णाने एक महत्वाची जबाबदारी टाकली होती. ती म्हणजे नरकासुराच्या वधानंतर मुक्त केलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना प्राग्जोतिष्पुराहून द्वारकेपर्यंत सुखरूपपणे घेऊन जाणे. याबद्दल मदनकेतु म्हणतो: "... एवढ्या हजारो स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना घेऊन द्वारकेपर्यंतचे शेकडो योजने अंतर कसे पार करणार? एवढा मोठा जथा पायी चालून जाणार म्हणजे किती दिवस लागतील? वाटेत रानटी पशु किंवा रानटी लोकांच्या टोळ्या यांच्यापासून संरक्षण कसे करायचे ?

रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी !

लेखक राजु भारतीय यांनी बुधवार, 30/10/2013 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पार्श्वभूमी : १) शाखेत गेला नाही तर रात्री जेवेण नाही अशा गल्लीत, वाड्यात, वातावरणात जन्म आणि बालपण. २) वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली. ३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय.

भाग २ बाबक खुर्रामुद्दिन --पारशी लोकांचे शिवाजी महाराज किंवा राणा प्रताप

लेखक मन यांनी सोमवार, 28/10/2013 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
मागील अंकाचा दुवा:- http://www.misalpav.com/node/25982 तिथून पुढची कथा आता देतोय. हा भाग २ आहे नोटः- जवळपास निम्म्या जगात मुस्लिम धर्म असणारे सत्ताधारी मध्ययुगात कसे कसे पसरले ते माझ्या चश्म्यातून लिहितोय. (सध्याच्या भारतीय मुस्लिम नागरिकांबद्द्ल मला राग आहे असे कुणीही समजून घेउ नका प्लीझ. मी मध्य युगाबद्दल लिहितोय.) . इस ६५० पर्यंत आपण मागच्या वेळेस पाहिलं. त्यानंतर दीडेक्शे वर्षे हळूहळू अरबी सत्तेने आपली पकड सर्वत्र घट्ट करत नेली. जिथे तिथे अरबी संस्कृतीचा प्रसार प्रचार सुरु झाला.

भाग १ बाबक खुर्रामुद्दिन --पारशी लोकांचे शिवाजी महाराज किंवा राणा प्रताप

लेखक मन यांनी रविवार, 27/10/2013 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी जालावर शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पब्लिकचं लक्ष वेधून घेणं सोपं नाही. सातव्या आठव्या शतकात तत्कालीन ज्ञात जगातील फार मोठ्या भागावर इस्लामी राज्य पसरत होते. त्यांना कुणी यशस्वी आव्हान देणे हे ही दिव्यच मानले जाई. खरेतर असे कुनी आव्हान दिले होते, हे सुद्धा अल्पपरिचित असल्याचे दिसते. तर अशा एका योद्ध्याचा हा संक्षिप्त परिचय. पारशी लोकांचं गेलेलं राज्य त्यानं काही काळापुरतं पुन्हा उभं केलं.

ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - ४ (www आणि टीम बार्नर्स ली)

लेखक नानबा यांनी बुधवार, 23/10/2013 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेटच्या वाढत्या वापराबरोबरच त्याच्याशी निगडीत बाकी गोष्टींवरदेखील संशोधन होऊ लागल्यामुळे त्यांचाही वेगाने विकास होऊ लागला होता. इंटरनेटच्या सुरूवातीच्या काळात वेबसाईट्स चे पत्ते http:// ने सुरू होत असत. परंतु सामायिक डेटाबेस आणि presentation softwares च्या अभावामुळे माहितीच्या आदानप्रदानात बरेच अडथळे येत होते. त्यावर उपाय काढण्यासाठी बरीच संशोधनं चालली होती. टीम बार्नर्स ली या अडथळ्यावर मात करण्यासाठी एका सामायिक वेब पत्त्याची संकल्पना सर्वप्रथम मांडली ती टीम बार्नर्स ली यांनी.

(खंड्याचे मनोगत)

लेखक तिमा यांनी शनिवार, 19/10/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेरणास्थानः खंड्या जन्मल्यापासून,आकाशात भाईबंधांबरोबर थव्याने स्वच्छंद उडायचे आणि फळे खायची हा माझा दिनक्रम होता. फार छान दिवस चालले होते. एके दिवशी आम्ही सग़ळे एका झाडावर येऊन बसलो. खाली काहीतरी चकाकत होते. आमचा ग़टनेता, 'खाली बघू नका" असे ओरडून सांगत होता. तरी आम्ही एकदोघांनी खाली डोकावून पाहिलेच. खाली एक फासेपारधी आरसा हातात घेऊन सूर्याचे प्रतिबिंब आमच्या डोळ्यावर पाडण्याचा प्रयत्न करत होता. अचानक, माझ्या डोळ्यांवर ती तिरीप पडली आणि जी भोवळ आली! तिरमिरत खाली पडलो. पडताना एका फांदीचा फटका माझ्या डाव्या डोळ्याला लागला, एवढे आठवते आहे. त्यानंतर जो शुद्धीवर आलो तो एका पिंजर्‍यात!

ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - ३ (ARPANET चा अस्त आणि TCP/IP चा उदय)

लेखक नानबा यांनी सोमवार, 14/10/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
भाग - १ भाग - २ १९६९ मध्ये प्रो. क्लाईनरॉक यांनी ARPANET साठी पहिला संदेश पाठवला आणि इंटरनेट संकल्पनेला मूर्त स्वरूप येण्यास सुरूवात झाली. ARPA नंतर जगभरातील संगणक अभियंत्यांनी आणखी आधुनिक, जलद आणि जास्त क्षमतेच्या संदेशवहन नेटवर्क्सवर संशोधन सुरू केलंच होतं. १९७२ मध्ये संगणक अभियंता रॉबर्ट काह्न हे DARPA च्या Inoformation Processing Technology Office मध्ये रुजू झाले.

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ?

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 14/10/2013 00:48 या दिवशी प्रकाशित केले.

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ? (मला समजलेले गांधीजी भाग २ )

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ? ********************************************************************************* संदर्भ स्पष्टीकरण : धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्राची दहावी आवृत्ती संदर्भ म्हणुन वापरली आहे . खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्रही संदर्भाला घेतले आहे - ( खैरमोडे ३-६७) हा संदर्भ खैरमोडे लिखित चरित्रातील तिसर्या खंडातील ६ ७ वे पान असा वाचावा . बहिष्कृत भारत या पत्रातले बाबासाहेबांचे लेख उद्धृत केले आहेत त्यापुढे वर्तमान पत्राचा दिनांक दिला आहे.

एका रशियन गुप्तहेराची थरारकथा !!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 07/10/2013 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक: वर्ल्ड फ़ेमस अडव्हेंचर्स लेखक: अभय कुमार दुबे आवृत्ती: 2008 प्रकरण 21: द सिक्रेट एजंट हू सेव्ह्ड द वर्ल्ड अनुवाद: निमिष न. सोनार, धानोरी, पुणे एका रशियन गुप्तहेराची थरारकथा !! सोर्गि हा देशभक्त गुप्तहेर होता. केवळ पैसे आणि वलय यासाठी तो या क्षेत्रात आला नाही. तो देशभक्त होता आणि त्याची इच्छा नाझींचे निर्दालन करून रशियाला आणि जगाला त्यांच्यापासून वाचवणे ही होती. त्याने हे प्रत्यक्षात आणले ते अशी एक माहिती रशियाला पुरवून की जी हिटलर ची सद्दी संपवायला पुरेशी ठरली. जागतिक दुसरे महायुद्ध अगदी जोरात होते त्यावेळची ही गोष्ट.