Skip to main content

इतिहास

अवकाशाचा वेध १ : सप्तर्षी व कृष्ण विवर

Published on सोमवार, 27/01/2014
रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे सप्तर्षी उर्फ Big Dipper म्हणजे हे वेद व पुराणात उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. आकाशात जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे :
  1. अंगिरस (Epsilon of Ursa Major)
  2. अत्रि (Delta Ursae Majoris)
  3. क्रतु (Dubhe; Alpha of Ursae Majoris)
  4. पुलस्त्य (Gamma Ursae Majoris)
  5. पुलह (Merak; Beta Ursae Mejoris)
  6. मरीचि (Alkaid; Benetnasch; Eta Ursae Majoris)
  7. वसिष्ठ (Mizar; Zeta Ursae Majoris).

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

लेखक मोदक
Published on शुक्रवार, 24/01/2014
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

लेखक मोदक
Published on बुधवार, 22/01/2014
काय..? कुठे..? कधी..? (पुणे) अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर..

शिव: मूर्तीशास्त्र

लेखक प्रचेतस
Published on रवीवार, 19/01/2014
भारतात जे दैवत सर्वाधिक पुजले जाते ते म्हणजे शिव. शिव हा दोन्ही प्रकारे पुजला जातो. लिंग स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात. लिंग पूजा ही पार सिंधू संस्कृतीपासून पाहण्यात येते. अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे.

गुगल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार

Published on शुक्रवार, 10/01/2014
गेल्या महिन्यात एक छान जाहिरात बघण्यात आली.बघताच त्याच क्षणी आपल्या सन्माननीय तात्यारावांची (स्वातंत्र्यवीर सावरकरांची) प्रकर्षाने आठवण झाली. जाहिरात परत परत बघाविसी वाटली. व्वा! काय उत्तम संदर्भ, हृदयस्पर्शी कथा, संगीत, संकलन व सादरीकरण!!! "एक दौर था ,मन मन मोर था" वरून ही मराठीमाणसाने(संदर्भ: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला) बनवलेली आहे ह्या विचारावर ठाम झालो. आता लवकरच "अटकेपार" च्या ऐवजी "गुगलवर" हा शब्द प्रयोग येईल असे वाटते.

महाभारतातील “चलाख” महापुरुष - भाग १

लेखक Atul Thakur
Published on रवीवार, 29/12/2013
mahabharat महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच. पराक्रमी, कसलातरी पीळ घेऊन जगणारी. प्रत्येकाचे पाय मातीचे. हर्ष, खेद, सुख, दु:ख, वेदना, लोभ, सूड, कौर्य अशा अनेकानेक भावनांचा विविधरंगी पट या कथेत गुंफला आहे. हा इतिहास पराक्रमी पुरुषांचा असला तरी त्यामागे कुशल राजकारणाचा देखिल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि या राजकारणाचे धागेदोरे महाभारतात फार दुरवर जाणारे आहेत. या राजकारणाचा विचार करताना तीन महापुरुषांनी केलेल्या घडवुन आणलेल्या घटनांचा परामर्ष या लेखात घेतलेला आहे.

मिर्झा ग़ालिब...........भाग-१

Published on शुक्रवार, 27/12/2013
Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रांनो, हातातील सर्व लिखाण बाजूला ठेवून हा लेख लिहायला घेतला आहे याचे कारण आज बरोबर २१६ वर्षापूर्वी एक थोर शायर या पृथ्वीतलावर परमेश्वराने धाडला आणि अगणित अक्षरश: अगणित रसिकांना त्याने त्याच्या शायरीने वेड लावले. नजिकच्या काळात वेड लागलेला मीही त्यातलाच. त्याच्यावर आज लिहिले नाही तर त्याच्या दरबारात क्षमा मिळेल की नाहे याची शंकाच आहे.

कुणी घडवून आणले 'महाभारत'?

Published on गुरुवार, 26/12/2013
मदनकेतु उवाच: श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदीतून मुक्त केलेल्या स्त्रियांना द्वारकेपर्यंत सुखरूप घेऊन जाण्याची कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडल्यामुळे मी देवलोकाचा कायमचा निवासी झालो. मला फिरण्याची फार आवड, त्यामुळे मी नित्य नवनवीन जागी फिरत असतो. नारदमुनिंनी मला दिलेल्या ‘गगनगामी परिभ्रमण सूचना’ यंत्राचा मला फार उपयोग होतो. (याला भूतलावर ‘जीपीएस’ असे म्हणतात, म्हणे). एकदा फिरताना एका घरातून मला मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला. खिडकीतून डोकावून बघतो, तो आत दोन किरीटधारी द्यूताचा पट मांडून बसलेले दिसले.

अनाहिता ठाणे कट्टा

Published on गुरुवार, 26/12/2013
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या ……… तर दिनांक २२ डिसेंबर २०१३ रोजी अतिचर्चित आणि दर वेळे प्रमाणे फाटे न फुटता खूप वेळेपासून गाजत असलेला अनाहिताचा पहिला वाहिला कट्टा हा ठाणे येथील स्वाद उपहारगृहामध्ये नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा का होईना पार पडला. परदेशी वास्तव्यास असलेल्या आमच्या काही मिपा अनाहिता अनाहुतपणे भारतवारी करण्यास आल्या होत्या आणि त्या आपसुकच या आमच्या कट्ट्या मध्ये गवसल्या. या कट्ट्याचे सर्वेसर्वा लिमाउजेट उर्फ माऊ यांनी अनाहितावर धागा काढला आणि बाकी सर्वं अनाहिताना पिंगवले.

आज ग. दि. मा यांचा स्मृती दिन

लेखक psajid
Published on शनीवार, 14/12/2013
ग. दि. मा यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये शेटफळे या गावी झाला. अभंग, भावगीत, बालगीत, लावणी, आरत्या, भूपाळी, अंगाई, समूहगीते, राष्ट्रगीते इत्यादी बरोबरच 'दो आंखे बारह हाथ', 'पेडगावचे शहाणे', 'जगाच्या पाठीवर' यासारखे दर्जेदार चित्रपट लिहणारे अद्वितीय शब्दप्रभू ! 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी', 'कानडा राजा पंढरीचा' या सारखे अभंग, 'नाच रे मोरा', 'गोरी गोरी पान' या सारखी बालगीते, 'जाळीमंधी पिकली करवंध', 'बुगडी माझी सांडली गं' यासारख्या लावण्या लिहणाऱ्या गदिमांनी 'जग हे बंदिशाळा' सारखे कटू सत्य जगापुढे मांडले.