Skip to main content

हे ठिकाण

फासले ऐसेभी होंगे - भावानुवाद - असेल अंतर असेही...

लेखक ॐकार यांनी गुरुवार, 07/02/2008 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ गझल फासले ऐसे भी होंगे.......ये कभी सोचा ना था ..... सामने बैठा था मेरे.....और वो मेरा ना था!!!!!! वो की खुश्बू की तरह.....फैला था मेरे चार सू...... मैं उसे महसूस कर सकता था......छू सकता ना था..... रात भर उस ही की आहट कान में आती रही...... ....झाँक कर देखा गली में....कोई भी आया ना था...... अक्स तो मौजूद थे पर .....

जडणघडण

लेखक सरपंच यांनी गुरुवार, 07/02/2008 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव वर अधिकाधिक सोयी उपलब्ध करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अनेकांच्या ते लक्षात आले असेलही. तरीही येथे नव्या सोयी बद्दल माहिती दिली जाईल. तसेच काही अडचणी असल्यास त्या सुद्धा येथे मांडल्यास हरकत नाही. सदस्य व्यवस्थापनासाठी सदस्यं संरचनेत थोडा बदल केलेला आहे. त्यामुळे तुमच्या काही सोई ज्या तुम्ही आधी वापरत होतात आणि आता त्या दिसत नाहीत असा काहिसा प्रकार असेल तर येथे तसे नमुद करावे. सोई पुर्ववत करण्यात येतील.

स्वतः लिहिलेल्या लेखनाचे संपादन कसे करावे?

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 04/02/2008 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
मला हा प्रश्न पडला आहे. मी दिलेल्या प्रतिक्रीयांचे किंवा उत्तरांचे संपादन करता येते कारण "संपादन" पर्याय तिथे दिसतो. परंतु मूळ लेखनातच काही दुरुस्ती करावयाची असल्यास तसा पर्याय नाही. तांत्रिक विभागाने पहाणी करुन योग्य तिथे दुरुस्ती करावी ही विनंती. अवांतर - माझ्याप्रमाणेच आणखीही काही जणांना हा प्रश्न पडल्याचे वाचले आहे. चतुरंग

ठाण्यात 'क्रांतिचा झंझावात'

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 04/02/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक एक, दोन व तीन फेबृवारी असे तीन दिवस ठाण्यातील ऍड. माधवी नाईक यांच्या ’अर्थ फाउंडेशन’ या संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला गेला. ठाणेकर नागरिकांसाठी व विशेषत: नवीन पिढीला १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या कालखंडात देशासाठी सर्वस्वाचा होम करणार्‍या क्रांतिकारकांचे सचित्र चरित्र दाखविणे हा या उपक्रमाचा हेतू होता. दुर्दैवाने आज स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊन गेल्यानंतरही बहुसंख्य जनतेला अनेक क्रांतिकारकांची नावे सुद्धा माहित नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

निवेदन- नावातील साधर्म्य

लेखक वरदा वैद्य यांनी शुक्रवार, 01/02/2008 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी वरदा वैद्य. मनोगत आणि उपक्रमावर वरदा नावाने माझे सदस्यत्व आहे आणि विज्ञान विषयावर काही प्रमाणात लेखन केले आहे. त्यामुळे मिसळपावावरील वरदा ही मीच असेन असा काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनी माझ्याकडे त्याबद्दल विचारणा केली. काहींचा गैरसमज होऊनही त्यांनी विचारणा केली नसेल. वरदा हे तसे सहज आढळणारे नाव नव्हे. तसेच, मिसळपावावरील वरदाप्रमाणे मीही अमेरिकेत राहत असल्यामुळे कोणाचा गैरसमज होणं साहजिक आहे, जरी माझी लेखनशैली येथील वरदाशी मिळतीजुळती नसली तरी. मिसळपावावर माझे सदस्यत्व आजपर्यंत नव्हते.

प्रेम

लेखक विवेकवि यांनी गुरुवार, 31/01/2008 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही रात्री छान च असतात .......... तिच्या स्वप्नानी भरलेल्या देऊन जातात उभारी ..... मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला प्रेम कधी सफल होते तर कधी नाही ........

"मैञीण"

लेखक विवेकवि यांनी बुधवार, 30/01/2008 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक तरी मैञीण अशी हवी जरी न बघता पुढे गेलो तरी मागुन आवाज देणारी आपल्या साठी हसणारी वेळ आलीयतर अशॄही पुसणारी स्वताःच्या घासातला घास आठवणीने काढून ठेवणारी वेळप्रसंगी आपल्या वेड्या मिञाची समजूत काढणारी वाकड पाऊल पडताणा माञ मुस्काडात मारणारी यशाच्या शिखरांवर आपली पाठ थोपटणारी सगळ्य़ाच्या घोळकात आपणांस सैरभैर शोधणारी आपल्या आठवणीनं आपण नसतांना व्याकूळ होणारी खरच!अशी एक तरी जीवा भावाची "मैञीण" हवी जी आपणास मिञ म्हणणारी ........

आधार कुणाचा?

लेखक तळेकर यांनी रविवार, 27/01/2008 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
आधार कुणाचा? चांगल्या नोकरीच्या, गलेलठ्ठ पगाराच्या आशेने मुलं परदेशी जातात ते परतीचे दोर कापूनच. दोन वर्षांनी येऊ, चार वर्षांनी येऊ, असं म्हणत ग्रीन कार्ड कधी घेतात आणि कायमचे अमेरिकावासी कधी होतात, ते कळतही नाही. एकदा तिथल्या जीवनशैलीची सवय झाली, की इथे परत यायला नको वाटतं. आईवडिलांनाही मुलांच्या नसण्याची सवय होते आणि शेजारी, मित्र किंवा नातेवाईकांच्या आधाराने ते आयुष्य घालवतात. 'इथे सगळं ठीक आहे,' असं सांगितलं जातं तब्येत बरी नसली तरी. मुलं तिथे दूर अमेरिकेत, आपली दुखणी त्यांना काय सांगणार? भारतात यायचं, तर खर्च ! रजा पाहिजे? नातवांच्या आठवणीन व्याकूळ होनं आहेच.

खच्चीकरणाची पंचवीस वर्षं.. म.टा.तील लेख.

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 25/01/2008 02:48 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला हा लेख मनाला भिडला. ७९ साली जन्मलेल्या मला यातील काहीच कल्पना नव्हती. फक्त दत्ता सामंत यांच नाव कधितरी कानावर पडलं होतं. पण या लेखाने मन हेलावून गेलं. डॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला यावर्षीच्या १८ जानेवारीला पंचवीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो.