मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हे ठिकाण

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

संपादक मंडळ ·
मंडळी, दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

माझी दिवाळी

संपादक मंडळ ·
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

दिवाळी अंक २०१३

संपादक मंडळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर हो, कळविण्यास आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २३/१०/२०१३ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे.

अंडा घोटाला-बालकथा

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
अंडा घोटाला-बालकथा --------------------------------------------------------- रविवार सकाळची वेळ. अनया आणि अनिलला जाम भूक लागली होती. ते आईच्या मागे लागलेच होते ,तोच आईला एक फोन आला. वरच्या आजींना बरं वाटेनासं झालं होतं. आई गडबडीने त्यांच्या घरी गेली. आता काय करायचं ? बाबाही मित्राकडे गेलेले. अनिल मोठा होता. तो म्हणाला , ' अने, घाबरू नकोस. मी आहे ना. मी अंड्याचं ऑम्लेट करतो.एकदम खुसखुशीत !’ ‘ऑम्लेट अन खुसखुशीत ? ओके ! ते खुसखुशीत ऑम्लेट तूच खा हं. मला आपलं साधंच दे,’ तीही बोलायला भारीच होती. अन्याने मोठया ऐटीत आईचा ऍप्रन पोटावर बांधला. काळ्या - पांढऱ्या चौकडीचा.

[ताज्या जिलब्या] आचरटपणा

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
[ताज्या जिलब्या] आचरटपणा =============== -- राजीव उपाध्ये टीप - आजच्या जिलब्यांचा नैवेद्य श्री० चंद्रसूर्यकुमार यांना समर्पित करण्यात येत आहे. मानवी इतिहास अनेक अंगांनी अनेकांनी लिहिला आहे. पण आचरटपणाच्या अंगाने लिहीला गेला नसावा असा माझा अंदाज आहे. आचरटपणा म्हणजे अतार्किक गोष्टींवर ठाम विश्वास, योग्य काय अयोग्य काय याच्या मनमानी कल्पना इ० आचरट कल्पना कशामुळे जन्म घेत असाव्यात. सामुहिक रित्या मानवी मेंदूची क्षमता अचाट असली तरी व्यक्तीगत पातळीवर ती मर्यादितच असते.

सर्वांना शुभेच्छा!

युयुत्सु ·
लेखनविषय:
 प्रभु येशूच्या जन्मदिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा! :) ए०आय० चिरायु होवो! येणारा काळ आणि तंत्रज्ञान तुम्हाला उत्कर्ष साधण्यास मदत करो!

थॅंक यु संक्षी !

उन्मेष दिक्षीत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ज्यात देह वावरतोय ते आपण आहोत ! मला माहीत नव्ह्ती अध्यात्माची जादू ! यु न्यु बेटर ! तुम्ही माझ्या चुकांना माफ करत आलात , पण आता शेवटच्या चुकीनंतर माझ्याकडून माफी मागण्याचही डेरिंग झालं नाही ! पण आभार व्यक्त केल्याशीवाय राहावत नाही ! थँक यु फॉर ऑल्वेज केरींग फॉर मी ! वेअर एम आय ? :) - उन्मेष

कधी निसटले धागे

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
कधी निसटले धागे मज कळलेच नाही कशी उसवली वीण मज कळलेच नाही त्या निवांत भेटी त्या एकांत गाठी डोळ्यांत हर्षाचे झरे अन देहांची मिठी क्षण ते सरले जरी मन ते भरलेच नाही ती मधाहूनी गोड कुठे हरवली ओढ ? अशी कशी मुक्याने मोडली माझी खोड माणसाचे मन ते मज उमगलेच नाही येते रात सजुनी येतो पाऊस अजुनी शालीन थंडी गुलाबी मारते मिठी बाजूनी मग कसा प्रेमाचा ग्रीष्म गेला विझुनी ? काय खरं नि खोटं तू मज वरलेच नाही ?

कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध.

भागो ·
लेखनविषय:
consciousness’ किंवा जाणीव याची याची सर्वमान्य व्याख्या अजूनही करता आलेली नाही, जाणीव हा शब्द आपण नेहमीच्या व्यवहारात वापरतो, उदाहरणार्थ “तिला ह्या गोष्टीची जाणीव नाही” “त्याच्या टेबलाखाली एक उंदीर आला होता त्याची त्याला जाणीव नव्हती,” एखादे दृश्य बघितल्यावर आपल्याला ज्या भावनांची अनुभूती होते त्याला मनोवैज्ञानिक म्हणतात “qualia.” क्वालीआ हे जाणिवेचे व्यवच्छेदक लक्षण आहे, म्हणजे जुहूच्या चौपाटीवरून जेव्हा आपण सूर्यास्त बघतो तेव्हा आपण आपला डिजिटल कामेऱ्यामध्ये ते दृश्य कप्चर करून ठेवतो. सूर्यास्त पाहिल्यावर आपल्या मनात काय भावना येतात? ती अनुभूती कामेऱ्याला येते का?

धुके असे पडले की

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
धुके असे पडले की धुके असे पडले की धुक्याचा महाल आकाशी सोपान त्याचा असा की त्यावरी उभी तू टोकाशी तू परी अस्मानीची मी फकीर धरतीचा वाट अशी भयंकर मार्ग नसे परतीचा विचार तरी काय करावा ? तोही थांबला तर्कापाशी सोपानावरून खुणवू नको जीवाची होईल तडफड तुजसवे वर जायाचे तर प्राणपाखरू करेल धडपड इथे जगुनी काय करावे ? आता जावे स्वर्गलोकाशी