मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन

पुष्कर ·

प्राजु 11/07/2008 - 19:08
पुष्करला पंतांचा परमेश्वर पावला. पुष्करने पंतांना पुरंदरला पाठवले पण पुष्कर पावमिसळवर पहाटे पासून पासरला...(ह्.घे.) मस्त आहे वर्णन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सहज 11/07/2008 - 19:09
पटकथाकार पुष्करनी पंत, पोलीस, पंकजला पळवुन पळवुन पब्लीकला पार पिडलं. पाचकळपणा पुरे. ;-)

In reply to by सहज

पुष्कर 12/07/2008 - 11:16
हे मात्र मनापासून पटलं. याबाबतीत आमची प्रतिभा जरा कमीच पडली. छोटी चिंगी, मिरमिर्‍या, प्राजू आणि सहज, मनापासून आभार..

अनिल हटेला 12/07/2008 - 09:41
प -प -प प !!! पुष्कर !! पूरे !! पण!!! प्याक!!! म्हणजे झ्याक!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

प्राजु 11/07/2008 - 19:08
पुष्करला पंतांचा परमेश्वर पावला. पुष्करने पंतांना पुरंदरला पाठवले पण पुष्कर पावमिसळवर पहाटे पासून पासरला...(ह्.घे.) मस्त आहे वर्णन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सहज 11/07/2008 - 19:09
पटकथाकार पुष्करनी पंत, पोलीस, पंकजला पळवुन पळवुन पब्लीकला पार पिडलं. पाचकळपणा पुरे. ;-)

In reply to by सहज

पुष्कर 12/07/2008 - 11:16
हे मात्र मनापासून पटलं. याबाबतीत आमची प्रतिभा जरा कमीच पडली. छोटी चिंगी, मिरमिर्‍या, प्राजू आणि सहज, मनापासून आभार..

अनिल हटेला 12/07/2008 - 09:41
प -प -प प !!! पुष्कर !! पूरे !! पण!!! प्याक!!! म्हणजे झ्याक!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले. पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला. पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले.

अमराठी मुलखात अस्सल मराठी बालनाट्य

विसुनाना ·

विसोबा खेचर 10/06/2008 - 03:18
नानासाहेब, आपण दिलेली बातमी मला नक्कीच कौतुकास्पद वाटते. सर्व कलाकारांना आणि नाटकाला माझ्या मनापासून शुभेच्छा! :) आपला, (मराठीचा अभिमानी) तात्या.

सर्व कलाकारांना मास्तरांच्या शुभेच्छा.... दणक्यात वाजवा प्रयोग... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सर्व बालकरांना, दिग्दर्शकाला मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा... प्रयोगाला येऊ शकत नाही. (पुण्यात आहे). पण प्रयोग झाला की मिपावर फोटो जरूर चढवा..

प्रमोद देव 10/06/2008 - 19:10
सर्व बालकलाकारांचे,त्यांच्या पालकांचे आणि इतर संबंधित मंडळींचे जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आणि ही बातमी दिल्याबद्दल विसुनानांचेही कौतुक वाटते. आपल्या मातृभाषेची ओढ ही चीजच काही और असते. :) हा प्रयोग धमाल होऊन जाऊ द्या! तथास्तु! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

इनोबा म्हणे 10/06/2008 - 21:14
सर्व बालकलाकारांचे,त्यांच्या पालकांचे आणि इतर संबंधित मंडळींचे जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आणि ही बातमी दिल्याबद्दल विसुनानांचेही कौतुक वाटते. आपल्या मातृभाषेची ओढ ही चीजच काही और असते. हेच म्हणतो... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

याच वयात जर प्रोत्साहन मिळाले तर ही मुले अधिक उत्साहाने काम करतील. प्रोत्साहन व सदिच्छा प्रकाश घाटपांडे

चतुरंग 10/06/2008 - 19:52
कौतुकास्पद आहे. परभाषिक मुलखात मराठीचे कार्यक्रम बसवणे हेच मुळात कष्टाचे असते त्यातून नाटकासारखा सर्वांची एकाच वेळी तालीम आवश्यक असणारा प्रकार करणे हे जिद्दीचेच काम आहे! सर्वाना अनेक शुभेच्छा!! (मी हैद्राबादला रहात असताना तिथल्या महाराष्ट्र मंडळात काही कार्यक्रम झालेले बघितलेत. अजूनही होत असणार. मला स्वतःला हे शहर फार आवडते.) विसुनाना ह्याची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद! नाटकाचे फोटोही नंतर देता आले तर मजा येईल. चतुरंग

मुक्तसुनीत 10/06/2008 - 19:54
कौतुकास्पद आहे. परभाषिक मुलखात मराठीचे कार्यक्रम बसवणे हेच मुळात कष्टाचे असते त्यातून नाटकासारखा सर्वांची एकाच वेळी तालीम आवश्यक असणारा प्रकार करणे हे जिद्दीचेच काम आहे! हेच म्हणतो.

सर्किट 11/06/2008 - 02:03
सर्व बाळगोपाळांना शुभेच्छा. २००६ च्या जानेवारीत बे एरियातील कला या संस्थेतर्फे बालनाट्याअचा प्रयोग केला होता. त्याविषयी http://www.calaaonline.com/events/gammat/index.html येथे अधिक. - सर्किट

विसुनाना 11/06/2008 - 11:25
बालकलाकारांना प्रोत्साहन देणारे प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. हे प्रतिसाद मी त्यांच्यापर्यंत पोहोचवीनच! प्रयोग सादर होण्यापूर्वी शिबिराचे आणि सादर झाल्यानंतर प्रयोगाचे फोटो येथे नक्की देईन. पुनःश्च धन्यवाद.

कलंत्री 12/06/2008 - 17:57
विसुनाना, बर्‍याच दिवसानंतर चांगली वार्ता वाचण्याचा / ऐकण्याचा योग आला. मनापासून धन्यवाद. इतर मराठी भाषिकांना आवाहन, इतरत्र राहणार्‍या मराठी भाषिकांनी असेच प्रयोग करावे ही विनंती आणि आवाहन. कलंत्री

विसोबा खेचर 10/06/2008 - 03:18
नानासाहेब, आपण दिलेली बातमी मला नक्कीच कौतुकास्पद वाटते. सर्व कलाकारांना आणि नाटकाला माझ्या मनापासून शुभेच्छा! :) आपला, (मराठीचा अभिमानी) तात्या.

सर्व कलाकारांना मास्तरांच्या शुभेच्छा.... दणक्यात वाजवा प्रयोग... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सर्व बालकरांना, दिग्दर्शकाला मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा... प्रयोगाला येऊ शकत नाही. (पुण्यात आहे). पण प्रयोग झाला की मिपावर फोटो जरूर चढवा..

प्रमोद देव 10/06/2008 - 19:10
सर्व बालकलाकारांचे,त्यांच्या पालकांचे आणि इतर संबंधित मंडळींचे जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आणि ही बातमी दिल्याबद्दल विसुनानांचेही कौतुक वाटते. आपल्या मातृभाषेची ओढ ही चीजच काही और असते. :) हा प्रयोग धमाल होऊन जाऊ द्या! तथास्तु! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

इनोबा म्हणे 10/06/2008 - 21:14
सर्व बालकलाकारांचे,त्यांच्या पालकांचे आणि इतर संबंधित मंडळींचे जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आणि ही बातमी दिल्याबद्दल विसुनानांचेही कौतुक वाटते. आपल्या मातृभाषेची ओढ ही चीजच काही और असते. हेच म्हणतो... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

याच वयात जर प्रोत्साहन मिळाले तर ही मुले अधिक उत्साहाने काम करतील. प्रोत्साहन व सदिच्छा प्रकाश घाटपांडे

चतुरंग 10/06/2008 - 19:52
कौतुकास्पद आहे. परभाषिक मुलखात मराठीचे कार्यक्रम बसवणे हेच मुळात कष्टाचे असते त्यातून नाटकासारखा सर्वांची एकाच वेळी तालीम आवश्यक असणारा प्रकार करणे हे जिद्दीचेच काम आहे! सर्वाना अनेक शुभेच्छा!! (मी हैद्राबादला रहात असताना तिथल्या महाराष्ट्र मंडळात काही कार्यक्रम झालेले बघितलेत. अजूनही होत असणार. मला स्वतःला हे शहर फार आवडते.) विसुनाना ह्याची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद! नाटकाचे फोटोही नंतर देता आले तर मजा येईल. चतुरंग

मुक्तसुनीत 10/06/2008 - 19:54
कौतुकास्पद आहे. परभाषिक मुलखात मराठीचे कार्यक्रम बसवणे हेच मुळात कष्टाचे असते त्यातून नाटकासारखा सर्वांची एकाच वेळी तालीम आवश्यक असणारा प्रकार करणे हे जिद्दीचेच काम आहे! हेच म्हणतो.

सर्किट 11/06/2008 - 02:03
सर्व बाळगोपाळांना शुभेच्छा. २००६ च्या जानेवारीत बे एरियातील कला या संस्थेतर्फे बालनाट्याअचा प्रयोग केला होता. त्याविषयी http://www.calaaonline.com/events/gammat/index.html येथे अधिक. - सर्किट

विसुनाना 11/06/2008 - 11:25
बालकलाकारांना प्रोत्साहन देणारे प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. हे प्रतिसाद मी त्यांच्यापर्यंत पोहोचवीनच! प्रयोग सादर होण्यापूर्वी शिबिराचे आणि सादर झाल्यानंतर प्रयोगाचे फोटो येथे नक्की देईन. पुनःश्च धन्यवाद.

कलंत्री 12/06/2008 - 17:57
विसुनाना, बर्‍याच दिवसानंतर चांगली वार्ता वाचण्याचा / ऐकण्याचा योग आला. मनापासून धन्यवाद. इतर मराठी भाषिकांना आवाहन, इतरत्र राहणार्‍या मराठी भाषिकांनी असेच प्रयोग करावे ही विनंती आणि आवाहन. कलंत्री
लेखनप्रकार
हैदराबाद: येथील 'रंगधारा' या नाट्यसंस्थेच्या वतीने दि. १२ मे २००८ पासून बालनाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. यात भाग घेणारी सर्व मुले अमराठी शाळेत शिकतात. त्यांना मराठी नीटसे बोलताही येत नाही. कारण घराबाहेर (क्वचित घरातही) असलेले अमराठी वातावरण. (मराठी वाचण्याची तर बातच सोडा. ) परंतु तरीही ती ८ ते १३ वर्षे वयाची मुले एक अस्सल मराठी बालनाट्य सादर करणार आहेत. ते आहे -"राजकन्येची बाहुली".

मजेशीर शब्द

आर्य ·

ईश्वरी 30/05/2008 - 22:18
अमेरिकेत बर्‍याचदा कानावर पडलेले स्पॅनिश शब्द स्पॅनिश शब्द: अर्थ Hola : (उच्चार) ओला - हॅलो , Gracias - धन्यवाद Amigo: अमिगो - मित्र Cero सिरो - शून्य Uno, dos, tres, cuatro(क्वात्रो), cinco (सिंको) : एक दोन तीन चार पाच Negro - काळा (रंग) , blanco (ब्लांको)- पांढरा Esposo , Esposa - (एस्पोसो - एस्पोसा) नवरा बायको Hijo - इहो - मुलगा (son) (स्पनिश मधे j चा उचार ह करतात ) Hija- इहा - मुलगी (daughter) Nino - Nina : छोटा मुलगा - छोटी मुलगी Padre / Papa / Papi : वडील Madre/ mama/ mami : आई Luna: चंद्र Perfecto: perfect तसेच Fantastico ईश्वरी

आजानुकर्ण 30/05/2008 - 22:12
कुमारस्वामी यांनी कुंडी हा शब्द भाषणात वापरला? कुमारस्वामींचे आडनाव ठाकरे तर नाही ना? आपला, (नवनिर्माणसैनिक) आजानुकर्ण ठोकरे

विसोबा खेचर 31/05/2008 - 00:10
तसे अनेक शब्द आहेत, परंतु आमच्या देवगडी बोलीभाषेतले दोन खास शब्द! १) आंडिलपाड्या - जेव्हा एखादी बाई एखाद्या पुरुषाला 'ठेवते' तेव्हा त्या पुरुषाला आमच्याकडे 'आंडिलपाड्या' असं म्हणतात! २) अक्करमाश्या - अनौरस अपत्याला अक्करमाश्या असे संबोधतात! तूर्तास इतकेच. बाकी अनेक शब्द आहेत. सांगेन सवडीने! आपला, (सध्या कुणाचाही 'आंडिलपाड्या' नसलेला!) तात्या देवगडकर.

पक्या 31/05/2008 - 00:20
यूएस मधे असताना एका चायनिज कलीग कडून शिकलेले शब्द Ni Hao - हॅलो Shi shi - धन्यवाद Shing - हो (येस) Dong budong - do you understand? Zou ba - Let's go Sheshiao - शाळा ba ba : बाबा (सबोंधन , वडील नव्हे) ma ma: आई ye ye : ये ऽऽऽ ये - आजोबा (वडीलांचे वडील) Nei nei - नेय ऽ ने - आजी (वडीलांची आई) ga ga - ग ग - मोठा भाऊ di di- दी दी - लहान भाऊ gu gu - आत्या Ji Ji - मोठी बहीण mei mei - लहान बहीण Jiu Jiu - मामा shooooshu - काका Tai tai - बायको (साधीसुधी नव्हे बरं का- गर्भ श्रीमंताची) बाकी चायनीज उच्चार ऐकताना मजा वाटते. दोन चायनीज बोलत असतील तर भांडतात की काय असे वाटते. चायनीज ग्रेट वॉल ला 'चांग चंग ' म्हणतात. -- आपलाच पक्या त्सेंग

धनंजय 31/05/2008 - 01:59
जनेलाकडे कदेल वर : खिडकीपाही खुर्ची ने बांगड्यां रेशियाद : भरलेले बांगडे हे झाले केवळ अनोळखी शब्द. पण पुढचे जरा अभावित विनोद करून जातात. कुलेर-लात दी : चमचा-डबा दे. शी खाता : थंडी वाजते

राजे 31/05/2008 - 11:16
"कुंडी" - हा शब्द तुमची चुकीचा लिहला आहे.. तो " खुंडी " - बसा !!! "कुंडी"- अर्थ जरा वेगळा आहे (जो भाग बसण्यासाठी वापरतात तो ;) ) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजुभाऊ 31/05/2008 - 11:36
" खुंडी " - बसा !!! मग राखुंडी म्हणजे काय? पूर्वी लोक राखुंडीने दात घासायचे भांडी घासायचे. आणखी मजेदार गुजराती शब्द. नवरा = रिकामटेकडा खाकरा = कडक भाजलेली पोळी पादर = भाग /गल्ली पोळ = बोळ / विभाग अघोरी = झोपल्यावर घोरणारे. चिबुक = हनुवटी घुटण = गुढगा चकली = चिमणी (पक्षी)

In reply to by विजुभाऊ

अभिज्ञ 31/05/2008 - 12:09
अघोरी = झोपल्यावर घोरणारे. मग जागे पणि घोरण्या-यांना काय म्हणावे? ह.घ्या. (अनभिज्ञ) अभिज्ञ.

आनंद घारे 31/05/2008 - 12:05
सध्या मी मैसूरला आल्यावर माझ्या कानडीच्या (अ)ज्ञानाची उजळणी करतो आहे आणि घरातील इतर लोकांना ती भाषा शिकवण्याचा प्रयत्न. कानाला एकासारखे वाटणारे पण वेगळ्या अर्थांचे काही शब्दः एले (यले)= पान ---- कानडीत र्‍हस्व व दीर्घ असे दोन ए आणि ओ स्वर आहेत. र्‍ह्स्व ए चा उच्चार ऐकतांना थोडा य सारखा वाटतो. र्‍हस्व ओ चा उच्चार व सारखा. एल्ले (यल्ले)= कोठे इल्ले = इथे इल्ला = नाही एल्ला(यल्ला) = सर्व एळ= ऊठ एळु = सात गोंधळ उडवणारे कांही शब्द : मरा = सूप हाल = दूध कसा = केरकचरा माडी = करा अंगडी = दुकान मने = घर बेक री = पाहिजे हो

सीधा = सरळ रो / रा = जा मरातब = गादी (मान मरातब?) हिंद = हिंदुस्तान हिंदसा = इंजिनीरिंग किंवा गणित या संबंधीचे ज्ञान -- ज्याला पाश्चात्य 'अरेबिक न्यूमरल' म्हणतात त्याला अरब 'हिंदसा' म्हणतात. कारण त्यांनी ते आकडे हिंदुस्तानातून शिकले. मुहंदेस = इंजिनीयर तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ) कम = किती? नुस = अर्धा अख्खु = भाऊ उख्ति = बहिण वालिद / वालिदा = वडिल / आई मोया = पाणी बहर = समुद्र साबुन = साबण वाहेद, इथनेन, तलाता, अरबा, खमसा, सित्ता, सबाह, तमानिया, तिस्सा, आशरा... = १,२,३,४,५,६,७,८,९,१०

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अरबस्थानातही देशा-देशांमध्ये शब्दांचे उच्चार बदलतात. निळ्या अक्षरातील उच्चार मस्कतमध्ये प्रचलीत आहेत. मुहंदेस = इंजिनीयर = मुहांदिस तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... तबीब (पुरूष डॉक्टर); तबीबा (स्त्री डॉक्टर) शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ)= मु = काय? व्हॉट? अख्खु = भाऊ = अखोई मोया = पाणी= माई बहर = समुद्र = बहार (बहारेन = दोन समुद्रांनी वेढलेला प्रदेश) मैदान = मैदान सेम सेम = तसेच (इंग्रजी सेम ह्या अर्थी) गोल =गोल (गोलाकार) कमर = दिवा, चंद्र खमर = दारू (व्हिस्की)

अरुण मनोहर 01/06/2008 - 09:55
सिंगापूर इथे मलय, तामीळ, मॅन्डेरिन आणि इंग्लीश च्या मिश्रणातून तयार झालेली सिंग्लीश बोली भाषा कधी कधी इनफॉरमली वापरल्या जाते. ह्या बोली भाषेत इंग्लीशच्या व्याकरणाची वाट लावली जाते, म्हणून क्वीन्स इंग्लीश वापरणारे दु:खी होतात. Kiasu (adj) Pronounced 'kee-a-soo'. Derived from the Hokkien dialect meaning afraid to lose out to others or not to lose face. Example: He sent his family to line up in different queues for the same item, so kiasu. Arrow (verb) Derived from the English language meaning to be given a task that you don't want to do. Example: I was arrowed to paint this wall. Lah The most famous of Singaporean expressions used at the end of sentences for emphasis. Example: Very funny, lah! Langgar (verb) Derived from the Malay language meaning to collide. Example: This van suddenly pulled out and langgar my car. Sotong (adj) Derived from the Malay language meaning does not know what is going on. Similar meaning to 'blur'. (Sotong is the Malay word for octopus which squirts ink and clouds everything.) Example: This has been going on for months, didn't you know? Sotong! Goondu: stupid or acting stupid Can meh: are you certain?

आर्य 02/06/2008 - 11:06
मित्रांनो ! काय कुंडी घेऊन बसलाय यालाच अंडू पण म्हणतात. याप्रांतात आल्यावर हे शब्द जरा जपून ऊच्चारा ऐवढेच, बेळगांवकरच यावर जास्त प्रकाष टाकू शकतील ! बाकी आणखी काही कन्नड शब्द अळु - रडणे कुत कोळी / कुळी तिको - बसा सुमने कुतको - गप्प बस बीडी - सोड (माड बीडी / होग बिडी - करुन सोड / जाऊदे सोड) ताई - आई बायको - बाई / स्त्री सर्वात गंमतीची बाब म्हणजे - गणेशोत्सव -कधीही साजरा करतात गणेश चतुर्थी पासुन अगदी नोव्हेंबर पर्यंत गणपती बसवायला आणि विर्सजनाला काही ताळ-मेळच नाही राव ! अगदी पक्ष पंधरड्यात सुध्दा बसवता. आणि विधी-निषेध तर सोडाच ! बाजारात जाऊन पिशवीत घालून ऐका काकूंनी गणपती घरी नेला. काय बोंबलायच यावर ?

मन 02/06/2008 - 17:48
मी काल "हलवा:-ओरिजनल ग्रीक स्वीट"-मेड इन मॅसिडोनिया असा लिहिलेला बॉक्स आणला. खाउन पाह्यला तर राव चव अगदि थेट आपल्या गज्जग सारखेच की राव. काय म्हंजी काय बी फरक नाय. फक्त नाव "हलवा" दिलय त्ये लोकांनी त्येला. (ज्यांना गज्जग माहित नाही त्यांच्यासाठी:- ही मिठाई महाराश्ट्रात तितकीशी लोकप्रिय नाही दिसत््इचं खर ं प्रस्थ कळत मध्य प्रदेशात, आणी त्यातही इंदुरमध्ये.) आपलाच, मनोबा

ईश्वरी 30/05/2008 - 22:18
अमेरिकेत बर्‍याचदा कानावर पडलेले स्पॅनिश शब्द स्पॅनिश शब्द: अर्थ Hola : (उच्चार) ओला - हॅलो , Gracias - धन्यवाद Amigo: अमिगो - मित्र Cero सिरो - शून्य Uno, dos, tres, cuatro(क्वात्रो), cinco (सिंको) : एक दोन तीन चार पाच Negro - काळा (रंग) , blanco (ब्लांको)- पांढरा Esposo , Esposa - (एस्पोसो - एस्पोसा) नवरा बायको Hijo - इहो - मुलगा (son) (स्पनिश मधे j चा उचार ह करतात ) Hija- इहा - मुलगी (daughter) Nino - Nina : छोटा मुलगा - छोटी मुलगी Padre / Papa / Papi : वडील Madre/ mama/ mami : आई Luna: चंद्र Perfecto: perfect तसेच Fantastico ईश्वरी

आजानुकर्ण 30/05/2008 - 22:12
कुमारस्वामी यांनी कुंडी हा शब्द भाषणात वापरला? कुमारस्वामींचे आडनाव ठाकरे तर नाही ना? आपला, (नवनिर्माणसैनिक) आजानुकर्ण ठोकरे

विसोबा खेचर 31/05/2008 - 00:10
तसे अनेक शब्द आहेत, परंतु आमच्या देवगडी बोलीभाषेतले दोन खास शब्द! १) आंडिलपाड्या - जेव्हा एखादी बाई एखाद्या पुरुषाला 'ठेवते' तेव्हा त्या पुरुषाला आमच्याकडे 'आंडिलपाड्या' असं म्हणतात! २) अक्करमाश्या - अनौरस अपत्याला अक्करमाश्या असे संबोधतात! तूर्तास इतकेच. बाकी अनेक शब्द आहेत. सांगेन सवडीने! आपला, (सध्या कुणाचाही 'आंडिलपाड्या' नसलेला!) तात्या देवगडकर.

पक्या 31/05/2008 - 00:20
यूएस मधे असताना एका चायनिज कलीग कडून शिकलेले शब्द Ni Hao - हॅलो Shi shi - धन्यवाद Shing - हो (येस) Dong budong - do you understand? Zou ba - Let's go Sheshiao - शाळा ba ba : बाबा (सबोंधन , वडील नव्हे) ma ma: आई ye ye : ये ऽऽऽ ये - आजोबा (वडीलांचे वडील) Nei nei - नेय ऽ ने - आजी (वडीलांची आई) ga ga - ग ग - मोठा भाऊ di di- दी दी - लहान भाऊ gu gu - आत्या Ji Ji - मोठी बहीण mei mei - लहान बहीण Jiu Jiu - मामा shooooshu - काका Tai tai - बायको (साधीसुधी नव्हे बरं का- गर्भ श्रीमंताची) बाकी चायनीज उच्चार ऐकताना मजा वाटते. दोन चायनीज बोलत असतील तर भांडतात की काय असे वाटते. चायनीज ग्रेट वॉल ला 'चांग चंग ' म्हणतात. -- आपलाच पक्या त्सेंग

धनंजय 31/05/2008 - 01:59
जनेलाकडे कदेल वर : खिडकीपाही खुर्ची ने बांगड्यां रेशियाद : भरलेले बांगडे हे झाले केवळ अनोळखी शब्द. पण पुढचे जरा अभावित विनोद करून जातात. कुलेर-लात दी : चमचा-डबा दे. शी खाता : थंडी वाजते

राजे 31/05/2008 - 11:16
"कुंडी" - हा शब्द तुमची चुकीचा लिहला आहे.. तो " खुंडी " - बसा !!! "कुंडी"- अर्थ जरा वेगळा आहे (जो भाग बसण्यासाठी वापरतात तो ;) ) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजुभाऊ 31/05/2008 - 11:36
" खुंडी " - बसा !!! मग राखुंडी म्हणजे काय? पूर्वी लोक राखुंडीने दात घासायचे भांडी घासायचे. आणखी मजेदार गुजराती शब्द. नवरा = रिकामटेकडा खाकरा = कडक भाजलेली पोळी पादर = भाग /गल्ली पोळ = बोळ / विभाग अघोरी = झोपल्यावर घोरणारे. चिबुक = हनुवटी घुटण = गुढगा चकली = चिमणी (पक्षी)

In reply to by विजुभाऊ

अभिज्ञ 31/05/2008 - 12:09
अघोरी = झोपल्यावर घोरणारे. मग जागे पणि घोरण्या-यांना काय म्हणावे? ह.घ्या. (अनभिज्ञ) अभिज्ञ.

आनंद घारे 31/05/2008 - 12:05
सध्या मी मैसूरला आल्यावर माझ्या कानडीच्या (अ)ज्ञानाची उजळणी करतो आहे आणि घरातील इतर लोकांना ती भाषा शिकवण्याचा प्रयत्न. कानाला एकासारखे वाटणारे पण वेगळ्या अर्थांचे काही शब्दः एले (यले)= पान ---- कानडीत र्‍हस्व व दीर्घ असे दोन ए आणि ओ स्वर आहेत. र्‍ह्स्व ए चा उच्चार ऐकतांना थोडा य सारखा वाटतो. र्‍हस्व ओ चा उच्चार व सारखा. एल्ले (यल्ले)= कोठे इल्ले = इथे इल्ला = नाही एल्ला(यल्ला) = सर्व एळ= ऊठ एळु = सात गोंधळ उडवणारे कांही शब्द : मरा = सूप हाल = दूध कसा = केरकचरा माडी = करा अंगडी = दुकान मने = घर बेक री = पाहिजे हो

सीधा = सरळ रो / रा = जा मरातब = गादी (मान मरातब?) हिंद = हिंदुस्तान हिंदसा = इंजिनीरिंग किंवा गणित या संबंधीचे ज्ञान -- ज्याला पाश्चात्य 'अरेबिक न्यूमरल' म्हणतात त्याला अरब 'हिंदसा' म्हणतात. कारण त्यांनी ते आकडे हिंदुस्तानातून शिकले. मुहंदेस = इंजिनीयर तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ) कम = किती? नुस = अर्धा अख्खु = भाऊ उख्ति = बहिण वालिद / वालिदा = वडिल / आई मोया = पाणी बहर = समुद्र साबुन = साबण वाहेद, इथनेन, तलाता, अरबा, खमसा, सित्ता, सबाह, तमानिया, तिस्सा, आशरा... = १,२,३,४,५,६,७,८,९,१०

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अरबस्थानातही देशा-देशांमध्ये शब्दांचे उच्चार बदलतात. निळ्या अक्षरातील उच्चार मस्कतमध्ये प्रचलीत आहेत. मुहंदेस = इंजिनीयर = मुहांदिस तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... तबीब (पुरूष डॉक्टर); तबीबा (स्त्री डॉक्टर) शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ)= मु = काय? व्हॉट? अख्खु = भाऊ = अखोई मोया = पाणी= माई बहर = समुद्र = बहार (बहारेन = दोन समुद्रांनी वेढलेला प्रदेश) मैदान = मैदान सेम सेम = तसेच (इंग्रजी सेम ह्या अर्थी) गोल =गोल (गोलाकार) कमर = दिवा, चंद्र खमर = दारू (व्हिस्की)

अरुण मनोहर 01/06/2008 - 09:55
सिंगापूर इथे मलय, तामीळ, मॅन्डेरिन आणि इंग्लीश च्या मिश्रणातून तयार झालेली सिंग्लीश बोली भाषा कधी कधी इनफॉरमली वापरल्या जाते. ह्या बोली भाषेत इंग्लीशच्या व्याकरणाची वाट लावली जाते, म्हणून क्वीन्स इंग्लीश वापरणारे दु:खी होतात. Kiasu (adj) Pronounced 'kee-a-soo'. Derived from the Hokkien dialect meaning afraid to lose out to others or not to lose face. Example: He sent his family to line up in different queues for the same item, so kiasu. Arrow (verb) Derived from the English language meaning to be given a task that you don't want to do. Example: I was arrowed to paint this wall. Lah The most famous of Singaporean expressions used at the end of sentences for emphasis. Example: Very funny, lah! Langgar (verb) Derived from the Malay language meaning to collide. Example: This van suddenly pulled out and langgar my car. Sotong (adj) Derived from the Malay language meaning does not know what is going on. Similar meaning to 'blur'. (Sotong is the Malay word for octopus which squirts ink and clouds everything.) Example: This has been going on for months, didn't you know? Sotong! Goondu: stupid or acting stupid Can meh: are you certain?

आर्य 02/06/2008 - 11:06
मित्रांनो ! काय कुंडी घेऊन बसलाय यालाच अंडू पण म्हणतात. याप्रांतात आल्यावर हे शब्द जरा जपून ऊच्चारा ऐवढेच, बेळगांवकरच यावर जास्त प्रकाष टाकू शकतील ! बाकी आणखी काही कन्नड शब्द अळु - रडणे कुत कोळी / कुळी तिको - बसा सुमने कुतको - गप्प बस बीडी - सोड (माड बीडी / होग बिडी - करुन सोड / जाऊदे सोड) ताई - आई बायको - बाई / स्त्री सर्वात गंमतीची बाब म्हणजे - गणेशोत्सव -कधीही साजरा करतात गणेश चतुर्थी पासुन अगदी नोव्हेंबर पर्यंत गणपती बसवायला आणि विर्सजनाला काही ताळ-मेळच नाही राव ! अगदी पक्ष पंधरड्यात सुध्दा बसवता. आणि विधी-निषेध तर सोडाच ! बाजारात जाऊन पिशवीत घालून ऐका काकूंनी गणपती घरी नेला. काय बोंबलायच यावर ?

मन 02/06/2008 - 17:48
मी काल "हलवा:-ओरिजनल ग्रीक स्वीट"-मेड इन मॅसिडोनिया असा लिहिलेला बॉक्स आणला. खाउन पाह्यला तर राव चव अगदि थेट आपल्या गज्जग सारखेच की राव. काय म्हंजी काय बी फरक नाय. फक्त नाव "हलवा" दिलय त्ये लोकांनी त्येला. (ज्यांना गज्जग माहित नाही त्यांच्यासाठी:- ही मिठाई महाराश्ट्रात तितकीशी लोकप्रिय नाही दिसत््इचं खर ं प्रस्थ कळत मध्य प्रदेशात, आणी त्यातही इंदुरमध्ये.) आपलाच, मनोबा
आज काल भाषाशुद्धी-शुद्धलेखन या आणि अशा बर्‍याच विषयांवर बराच काथ्याकुट करुन झाला आहे. शब्दकोश हा धनकोशापेक्षा वेगळाच आहे! तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्‍ह्सा होतो, हाच धागा पकडून ऐक नविन चर्चा पुढे चालू करु. मिपावर फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नसून जगातल्या विविध भागातले सदस्य आहेत / गेलेत. चला तर मग आपला शब्द संग्रह वाढवूया.

भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ

आजानुकर्ण ·

विकास 28/05/2008 - 22:28
मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. आपल्याला गेल्या शतकाच्या असे म्हणायचे आहे का? (हे भाषाशुद्धीसाठी सुचवले नाही बरकां! :-) )

In reply to by विकास

आजानुकर्ण 28/05/2008 - 22:30
मपलं न्हाई ह्ये. ( म्ह. इदं न मम. ;) ) पुस्तकप्रकाशन/लेखन १९९० व्या दशकात. त्यामुळे तुमची दुरुस्ती बरोबर. (स्पष्टीकरणोत्सुक!) आजानुकर्ण

मन 28/05/2008 - 22:38
ह्या लेखाचा. सही. पण एक नाही समजलं.भौगोलिक सलगता पाहिल्यास, तामिळ प्रांत कुठे महाराष्ट्राला लागुन आहे? मुख्यतः त्या काळात तरी, संस्कृती आणि भाषा ह्यांचं आदान-प्रदान व्हायचं ते सलग भु-भागातुन. त्ये "कानडाउ विट्टलु..." वगैरे ऐकुन होतो. म्हणजे मराठी-कन्नड नातं वगैरे.पण थेट तमिळ म्हंजे कमाल आहे बुवा. त्या काळात इतका संपर्क तरी कुठं होता एकमेकांशी? बरं मग संस्कृत्-मराठी-हिंदी ह्यांची एक्मेकांच्या अत्यंत जवळ जाणारी देवनागरी लिपी तरी कशी शिल्लक राहिली? मराठी लिहिताना त्या तामिळ लिपीचा वापर का होत नाही? (जर मराठी-तमिळ भाषा संबंध इतका दृढ असेल तर त्याच लिपीत मराठी लिहिणं जास्त नैसर्गिक्/सोयीचं राहील. नाही का?) (स्वगतः- तरिच म्हटलं, त्या चर्चेतुन हिरिरिनं बोलताना अचानक आ'कर्ण राव गायब कुठं झाले? ह्यांनी तर सरळ नवा लेखच टाकला की राव) आपलाच, मनोबा

चतुरंग 28/05/2008 - 23:27
ह्यातली जवळजवळ सगळीच मला नवीन होती. मराठी आणि तमिळ ह्या इतक्या मिळून मिसळून असतील असे माहीत नव्हते. ;) धन्यवाद आ.कर्णा! चतुरंग

अभिज्ञ 28/05/2008 - 23:51
आजानुकर्ण साहेब, मनोबांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या लेखाचा आवाका खरोखर खुप मोठा आहे. त्यावर काहि लिहावे एवढी आमची पात्रताही नाही.तरीहि काही मुलभुत प्रश्न मनात आले, त्याचे निराकरण आपण केल्यास उत्तम होइल. खैरे ह्यांनी मराठी-तमिळ संबंधांचा बराच अभ्यास केलेला दिसतोय.परंतु त्यांनी मांडलेले विचार हे एकांगी वाटतात.अहो गेल्या हजारो वर्षात तमिळ भाषेत काहीच फ़रक पडला नाही काय? मराठी भाषेचेच पहा ना. ज्ञानेश्वरीच्या काळातील मराठी व आत्ताची मराठी ह्यात केवढा फ़रक जाणवतो. खुद्द तमिळ भाषेत बरेच संस्क्रृत शब्द आढळ्तात.तमिळ भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे. अहो तमिळच कशाला, मराठी व बंगाली भाषेत सुध्दा तोंडात बोटे घालावीत (कोणीहि कोणाच्या) अशी साम्य स्थळे आहेत. उदा.सकाळ,वाटी,भातवाढी,डाव,पाडा,.......... पण माझ्या माहीति प्रमाणे हेच शब्द इतर भाषांत जसेच्या तसे वापरले जात नाहीत.(काहि प्रमाणात ओडिया,व आसामी भाषेत) किंबहुना,समस्त कोंकण पट्टय़ात बोलल्या जाणा-या भाषेत आणि मराठीत तसेच बंगालीत कमालीचे साम्य आढळते. ते हि कसे काय? असे बरेच प्रश्न आहेत.त्यामूळॆ काहि शब्दात साम्य आढळले म्हणुन तेच मराठी भाषेचे मुळ मानणे पटत नाही. थोडे सविस्तर लिहिल्यास उत्तम. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:39
भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे.
बहुधा संस्कृत भाषा ही इतकी यमनियमांनी बांधलेली आहे की तिला श्वास घेण्यापुरतीही जागा मिळाली नाही आणि शुद्धाशुद्धतेच्या कल्पनांपायी ती गुदमरून मृतप्राय झाली असे काही लोक म्हणतात ते खरे असावे! याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. आपला, (पिंडावरचा कावळा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 29/05/2008 - 08:09
याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. सहमत आहे... ;) तात्या.

विसोबा खेचर 28/05/2008 - 23:54
क्रुपया हे वाचावे! हे लेखन इथून उडवले जाण्याची शक्यता आहे, हे जाणूनच पुढील प्रतिसाद द्यावेत! भाषा, भाषा शुद्धी, व्याकरण, शुद्धलेखन, संस्कृत भाषेची सो कॉल्ड महती या विषयावर चर्चा करावयास माझे मित्र शशांक जोशी यांचे उपक्रम हे संस्थळ फार छान आहे! मिसळपाववर वरील विषय सहसा एन्करेज केले जात नाहीत याची नोंद घ्यावी..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:24
हाती घ्याल ते तडीस न्या असे आमचे गुरूदेव म्हणतात. एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. आपला, (अवलंबनपर्णोद्गमसूत्रोत्सुक!) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 29/05/2008 - 08:09
एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. ठीक आहे! मिपावरील एक्स पंचायत समिती सदस्य हा आपला रुतबा ध्यानात घेऊन आम्ही तूर्तास काहीच बोलत नाही. चालू द्यात चर्चा..! परंतु या पुढे कृपया कुणीही भाषा, भाषेचा विकास, भाषेचं यांव, भाषेचं त्यांव, शुद्धलेखन, व्याकरण या विषयांवरील चर्चा मिपावर करून मिपाचं वातावरण घाण करू नये अशी सर्वांना हात जोडून, नम्र व कळकळीची विनंती! मिपा जसं आहे तसंच राहू द्या! त्याला विद्वान संकेतस्थळांच्या रांगेत नेऊन बसवायचा प्रयत्न करू नका एवढीच विनंती! :) तात्या.

वरील उतार्‍याच्या संदर्भात एक लेख जालावर सापडला आहे. जो खैरे साहेबांच्या दाव्याच्या विरोधी आहे. http://groups.google.com/group/alt.language.hindi/browse_thread/thread/cfc7d78c964dd86b कदाचित वरील तामिळ शब्द महाराष्ट्री प्राकृतामधून दक्षिणेत गेले असण्याचा संभव आहे. कारण महाराष्ट्री पा़कृताबद्द्ल ख्रिस्तपूर्व ५व्या शतकापासून उल्लेख आढळतात. अधिक माहीती इथे वाचता येईल http://en.wikipedia.org/wiki/Maharashtri पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:36
पुणेकर पेशवेसाहेब, खैरे साहेबांनी मराठी ही फक्त तमिळकडून आली असा कुठेही दावा केलेला नाही. मात्र शुद्धिकरणचळवळे लोक मराठीचा संबंध फक्त संस्कॄताशी जोडू इच्छितात आणि इतर भाषा अस्पृश्य असल्याप्रमाणे त्यांचा विटाळ मानला जातो. खैरे साहेबांच्या लेखात शास्त्रीय प्रयोग केल्यानंतर मराठी व तमिळचा संबंध कसा आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे. मात्र मराठीचा संबंध फक्त संस्कृताशी आहे अशीएकांगी भूमिका मांडणार्‍यांनी पुन्हा (शक्य असल्यास) विचार करावा यासाठीच तो प्रतिसाद. मराठी ही फक्त तमिळ किंवा फॉर दॅट मॅटर संस्कृताशीच संबंधित आहे व इतर (फारसी, अरबी, इंग्रजी, कन्नड) भाषांचा तिला विटाळ होतो असे मानू नये! अवांतरः जय महाराज या लेखकाचा 'आवाका' गुगल ग्रुप्सवर वावरणार्‍या अनेकांना माहिती आहे. केवळ भावनिक उद्दीपन करून इतरांच्या नावाखाली भूमिका मांडणे असा त्यांचा खाक्या केवळ ह्याच समुदायावर नसून. या व अशा इतर समुदायांवरही लोकप्रिय आहे. सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. मात्र त्यांनी दिलेले रामायणाचे पुरावे हास्यास्पद आहेत. हे लेखही वाचा यापेक्षा अधिक काय सांगू शकतो? दुवा १ दुवा २ दुवा ३ आपला, (गारदी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 29/05/2008 - 09:10
सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. http://www.gisdevelopment.net/application/archaeology/site/archs0001.htm http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/2073159.stm आणि हा विकीचा http://en.wikipedia.org/wiki/Sarasvati_River

In reply to by विकास

आजानुकर्ण 29/05/2008 - 09:15
सरस्वती नदीचा पुरावा नको. ही नदी आणि भाषा यांचा संबंध जो सुब्रम्हण्यम यांना अपेक्षित आहे त्याबाबतचा पुरावा.

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 10:19
हा लेख बराचसा एकतर्फी वाटला. संस्कृतावरं टिका करायची म्हणुन कहिहि... तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे.... (माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.) असो अधिक माहितिसाठी कदचीत हा दुवा उपयोगी पडेल http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India#Classical_languages_of_India अजुन एक प्रश्न म.टा.मध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यापैकी बहुतेक बरेच शब्द नेहमीच वापरले जातात. जर एकदा नीट पहावे http://www.misalpav.com/node/1897 चुकभुल द्यावी घ्यावी (हे कुठल्या भाषेतुन आले बां? कायं करायचयं B) सुसंस्कृत चेतन

In reply to by चेतन

आजानुकर्ण 29/05/2008 - 10:32
माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.)
तुम्हाला खैरे यांच्या तुलनेत बरीच माहिती दिसते (किती तरी पटींनी जास्त) . तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? आपला, (तौलनिक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 10:58
एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? तेलुगू-कन्नड या भाषांबद्दल आपण थोडं आधिक वाचावं आणी मगचं हे विचारावं http://en.wikipedia.org/wiki/Telugu_language माझ्यामते तुम्हाला ह्या दुव्याची देखिल गरज आहे http://en.wikipedia.org/wiki/Sanskrit अवांतरः तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. १५३४३६७ संस्कृत ५३४९ तमिळ २३८९ कन्नड १२३४ तेलगु हा अकबरासारखा प्रश्न झाला राजधानीत कावळे किती? ह. घ्या. स्वगतः भाषा हा शब्द कोठुन आला बरं?

In reply to by अमोल केळकर

चेतन 29/05/2008 - 12:24
जरा हा दुवा पहावा http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language#cite_note-bhasha-9 येथे एक वाक्य आहे Marathi has taken words from and given words to Sanskrit, Kannada, Hindi, Urdu, Arabic, Persian, and Portuguese. At least 50% of the words in Marathi are either taken or derived from Sansrit. हे आणखिन काही Literature in all Dravidian languages owes a great deal to Sanskrit, the magic wand whose touch raised each of the languages from a level of patois to that of a literary idiom". (Sastri 1955, p309) सर्वज्ञानी गूगल आणी en.wikipedia.org च्या सहाय्याने अज्ञानी चेतनमार्फत ज्ञानीलोकांकरिता अवांतरः ज्ञानेश्वर, अम्रुतानुभव हे शब्द कोठुन आले बरं? अतिअवांतरः महाराष्ट्र हा शब्द कोठुन आला बरं...? मी मराठीचं पण संस्कृत थोडफार कळणारा चेतन

In reply to by चेतन

आजानुकर्ण 29/05/2008 - 13:05
संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही! मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठीला संस्कृतची झेरॉक्स कॉपी करायची असेल तर करा. मग मराठीही संस्कृताप्रमाणेच चोपड्यांमध्ये बंद राहील. सुदैवाने आमच्यासारखी सामान्य जनता अशा प्रयत्नांची खिल्ली उडवेल यात शंका नाही. सोबत हे देखील वाचा. आपला, (स्पष्टवक्ता) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 14:32
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे. भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे या लेखात मलातरी हा प्रकार थोडासा जाणवला. आपण दिलेला दुवा वाचनिय आहे पण इथे तुलना कोठेहि नाहि आणी ती होउ नये असे मला वाटते संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही हे म्हणुनसुद्धा लेखात तरी सुर नाकरण्याचाच दिसतोयं असो तुम्हि हे नाकारत नाही ह्यातच समाधान. मी तरी मराठीप्रमाणे संस्कृतलाही आपलीच मानतो त्यामुळे कदाचित माझा सुर कडवटही असेल. कडवट चेतन

In reply to by चेतन

कोलबेर 29/05/2008 - 20:59
चेतनरावांनी आकडेवारी देऊन संस्कृतातुन किती शब्द आले आणि इतर भाषांमधून किती ह्याची तौलनिक माहिती देऊन अजानुकर्ण ह्यांच्या मुद्द्याचे खंडन केले आहे. श्री.अजानुकर्ण ह्यांनी त्याची कसलीही नोंद न घेता संस्कृत विरोधाचा सुर लावला आहे तो एकांगी वाटतो.
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे.
ह्या चेतनरावांच्या भुमिकेशी आम्ही देखिल सहमत आहोत. आंधळी भक्ती आणि विरोधासाठी विरोध हे दोन्हीही अयोग्य!

In reply to by कोलबेर

विकास 29/05/2008 - 22:30
कोलबेर ने योग्य आणि थोडक्यात मांडले असल्याने "+१" व्यतिरीक्त अजून काही नाही!

In reply to by विकास

आजानुकर्ण 30/05/2008 - 07:32
कोलबेरशेठ आणि तुम्ही दोघांनीही मी दिलेला दुवा न वाचताच ही प्रतिक्रिया दिली आहे हे खेदाने म्हणावे लागत आहे. आपला, (सखेद) आजानुकर्ण

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 30/05/2008 - 07:29
अहो संस्कृतविरोधाचा आणि एकांगी सूर कोणी लावला आहे येथे? चेतनरावांनी दिलेल्या आकडेवारीतील ह.घ्या. हे वाचले का? समजा चेतनरावांनी गंभीरपणे ती आकडेवारी दिली आहे असे मानू. मग मी दिलेल्या दुव्यावर दाते कर्वे यांच्या कोशानुसार मराठीतील एकूण शब्द 1,12,189 आहेत हे स्पष्ट लिहिले आहे. मग चेतनरावांनी दीड लाखाहून जास्त शब्द संस्कृतातून आलेत याचा पुरावा देणे आवश्यक नाही का? मी विरोधासाठी विरोध करत असल्याचा एकही पुरावा द्यावा मी सपशेल माफी मागण्यास तयार आहे! आपला, (सहसदस्य) आजानुकर्ण अवांतरः श्री. जनरलपंत डायर यांच्या वटहुकूमाची अंमलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र आमचे मित्र कोलबेर शेठ यांच्या प्रतिसादात 'आजानुकर्ण' या आमच्या नावाचा वैयक्तिक उल्लेख झाल्याने प्रतिसाद देत आहोत याची जनरलपंतांनी नोंद घ्यावी ही विनंती. आपला, (स्पष्ट) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 30/05/2008 - 07:37
आता सर्वांनी हा विषय इथेच थांबवावा! काही चर्चा करायची असेल तर ती खरडवहीतून किंवा व्य नि तून करावी. अन्यथा हा संपूर्ण थ्रेडच अप्रकाशित करण्यात येईल.. तात्या.

मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, आणि मराठी तामिळीचे भाषिक नातेसंबध एका माहितीपूर्ण लेखनात वाचायला मिळाले, आणि ते आवडले. अवांतर : मिसळपाव मराठी संकेतस्थळावर सर्व लेखन संवाद हे मराठी भाषेतून होत असतांना भाषिक लेखांना संस्थळाच्या मालकाचा विरोध होतो, ही गोष्ट मराठी भाषाप्रेमी म्हणुन दुखः देणारी वाटते. ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 29/05/2008 - 09:46
मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, हा हा हा! हे शब्द वाचूनच करमणूक झाली! :) नथ नाकानं साजिरवानी, गला भरून सोन्याचे मनी कोलीवार्‍याची मी गं रानी रात पुनवेला नाचून करतंय मौजा! काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) काय रे बाला, हिर्‍याच्या कुडाचे तुज्या कुल्ल्यावर पोकल बांबूचे फटके मारू का दोन? रांडच्या, हिकू का तुला?! :) काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) मराठी भाषा ही अठरापगड जातीजमातीत बोलली जात असताना आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे! :) आपला, (आग्र्या-कोळ्यात लहानाचा मोठा झालेला) दर्याचा राजा -तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 29/05/2008 - 09:59
तात्या शाळेत असताना तुमचा व्याकरणाचा मास्तर लैच मारकुटा होता का हो? नाही.. भाषाशास्त्र ह्याविषयी कुणीही काहीही बोलले की त्यामधुन 'शुदद्धलेखनाची सक्ती लादली जाते आहे' ह्या एकमेव निष्कर्षावर तुम्ही कायम येताना पाहुन मनात आलेली ही शंका वाढत जाते.

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 29/05/2008 - 10:09
हम्म! कोलबेरा, प्रत्यक्षात भेटू तेव्हा या विषयावर तुझ्याशी बोलीन सवडीने! अगदी नक्की...! :) तूर्तास, गोमू संगतीनं माज्या तू येशील काय आरं संगतीनं तुज्या मी येनार नाय ह्या ओळी भाषेच्या आणि भाषाशास्त्राच्या दृष्टीनं चूक की अचूक, ह्या विचारात मी अडकलो आहे आणि बाप खपल्यासारखा चेहेरा करून त्यावर गहन विचार करतो आहे! तेव्हा, प्लीज डोन्ट डिष्टर्ब मी! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे सोकॊल्ड, भाषा शुद्धीचे आग्रही, शुद्धलेखनाचे पुरस्कर्ते, बोजड भाषेचे महागुरु, संस्कृतप्रेमी, फुगीर सुशिक्षित, म्हणजे आम्ही की काय ? च्यायला आमची प्रतिमा इतकी कशी उंचावली !!! ;) आपल्याप्रमाणेच, अठरापगड जातीजमातीची बोलल्या जाणारी बोली ही आमची जीव का प्राण आहे, आम्ही त्यावर नुसते प्रेम करत नाही तर, रहाटगाड्यात ती भाषा लिहितो, बोलतो आणि जगतोही !!! :) -दिलीप बिरुटे (बोली भाषा लेखनात वापरणारा )

विजुभाऊ 29/05/2008 - 13:14
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. यातच काय ते समजावे. सामान्यांच्या या भाषेला पुन्हा एकदा उच्चेतरांची भाषा बनवण्याचा घाट कशासाठी घालत आहोत? हा पुन्हा द्रावीडी प्राणायामाचा हट्ट कशासाठी.

In reply to by विजुभाऊ

चेतन 29/05/2008 - 15:03
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. आता ज्ञानेश्वरीतली बोली भाषा ही कळत नाही म्हणुन आपण त्याचाही अनुवाद करुन वर बोलीला शब्दबंबाळ म्हणणार का? (आपल्याच शब्दात उच्चेतरांची भाषा वगैरे वगैरे ठरवणार का?) संस्कृतला खाली दाखवण्याचा हा अट्टाहास कशापायी? कडवट चेतन अवांतरः अनेक उत्तम साहित्याचे मराठित अनुवाद झाले आहेत म्हणुन मुळ भाषेला नावे ठेवावी का? संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन (ह. घ्या.)

In reply to by चेतन

विजुभाऊ 29/05/2008 - 15:19
संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन
चेतन भौ म्या संथ न्हाय पन ज्ञानेश्वरी लिव्हुन बी काही शतके उलटली. ती बोली बी आता मागं र्‍हायली. म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण. जिवंत भाषा जिवंत नदी सारखी असते. ती वाहती रहायला तिला छोट्या नद्या/ ओढे/ प्रसंगी नालेही मिळतात. कल्पना करा उद्या गंगा किंवा कृष्ण नदीच्या सर्व उपनद्या शुद्धीच्या नावाखाली अडवल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल. उगमाजवळ असेल तेवढेच राहील. उरल समुद्राबाबतीत असे झाले आणि आता उरल समुद्र आटुन त्याचे आस्तित्व एक मोठे डबके म्हणुन राहीले आहे

limbutimbu 29/05/2008 - 15:06
सन्स्कृत राहुदे बाजुला, ज्ञानेश्वरी तरी नीट समजते का आपल्याला? (आणि मुळात कितीक जण वाचतात्/वाचणारेत?) इकडे पुढच्या पिढ्या इन्ग्रजी माध्यमातून शिकवुन "देशी इन्ग्रज" तयार करण्याचे कारखाने सुरू असताना स्वातन्त्रवीरान्नी भाषा शुद्धीबाबत जे केल ते योग्य की अयोग्य हा वाद आता हवाचे कशाला? कोण बोलणार लिहिणार वाचणार तुमची ती दरिद्री दळभद्री मराठी जिच्यात म्हणे ज्ञानाचे काहीही कण नाहीत म्हणुन तर इन्ग्रजी माध्यमातून लहानग्यान्ना शिक्षाण देतात ना हल्ली? अन जन्तेच्या पुढल्या पिढ्या जर मराठी शिकणारच नसतील तर हवित कशाला म्हणतो मी ही थेर? त्यापेक्षा एमटीव्ही बघा, ऐश करा! :D (जे खानदानी(?), उच्चवर्णीय(?), मराठीप्रेमी असतील ते टिकवतीलच मराठी, ती ही शुद्ध स्वरुपात! नाहीतर शेवटी "पुणे" आहेच!:D ) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

प्रियाली 29/05/2008 - 15:20
अजानुचा लेख चांगला आहे, बरीच नवी माहिती मिळाली. मराठी भाषा ही जशी फक्त संस्कृतापासून बनली नाही तशी ती फक्त तमिळपासूनही बनलेली नाही. (तसे अजानुने लिहिल्याचा दावाही नाही) संस्कृती आणि भाषा यांच्यात कालानुसार होत जाणारी सरमिसळ जुनी आहे. उद्वेग तेव्हा येतो जेव्हा संस्कृत आम्हाला आवडते (हे म्हणणार्‍या लोकांना संस्कृतात चार वाक्ये लिहिता येतात का देवजाणे! उगीच इथून तिथून पाठ केलेले श्लोक देणे म्हणजे आपल्याला संस्कृत येते अशी काहीजणांची समजूत असावी) म्हणून आम्ही संस्कृतातले शब्द प्रतिशब्द म्हणून घेणार हा पोरकटपणा वाटतो. संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. संस्कृतात सर्व काही आहे हा आणखी एक पोरकट ग्रह लोकांनी काहीही माहित नसताना करून ठेवलेला असतो. जी भाषा एका विशिष्ट गटाच्या बाहेर पडलीच नाही, जिच्यात काळानुसार फारसा (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) बदल झाला नाही तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. असाच एक ग्रह की संस्कृतात सर्व उच्चार आहेत. संस्कृत बोलल्याने वाणी शुद्ध होते. यावर अनेक स्थळांवर झालेल्या चर्चांमध्ये हा दावा किती फोल आहे यावर चर्चा झाली आहेच. मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. मराठीत संस्कृतातील बरेचसे शब्द रूळल्याने बरेचदा अभियांत्रिकी (अभिवादन, अभिमान, अभिनंदन हे शब्द मराठीत आधीच आहेत) आणि यंत्र हा शब्दही मराठीत रूळलेला आहे तेव्हा अभियांत्रिकी हा शब्द मराठी प्रतिशब्द नसून संस्कृत प्रतिशब्द ठरतो आणि "म्हणजे काय आहेत का तुमच्याकडे पर्याय संस्कृताशिवाय?" असे पोरकट प्रश्न विचारले जातात. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? कारण ते उत्तर पोरासोराला आले असते की अभियांत्रिकी= इंजिनिअरींग पण भाषा पोरासोरांना येऊ नये हीच या मंडळींची इच्छा असते का काय कोणास ठाऊक. हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून का द्यावेत तर कोणीतरी उठून भाषाशुद्धीचं खूळ निर्माण करतो. रूळलेल्या शब्दांची भाषाशुद्धी आणि भाषेत येणार्‍या नव्या शब्दाला प्रतिशब्द शोधणे यातला फरक काही श्रेष्ठींना जाणवला नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. असो.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 29/05/2008 - 15:53
असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हा हा हा! :) तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. अगदी १०० टक्के सहमत आहे.. ! :) आपला, (प्रियालीचा मित्र) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आंबोळी 29/05/2008 - 17:16
संस्कृतचा आग्रह धरणारे जे कोण पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक आहेत त्यापैकी कुणीही हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून द्या आणि संस्कृतोत्भवच शब्द घ्या असा आग्रह धरल्याचे मिसळपाववरील तिनही चर्चेत दिसला नाही. (असल्यास ते मुर्ख आहेत असे माझे वैयक्तीक मत आहे.). जर दुसर्‍याकुठल्या संस्थळावर असा अग्रह त्यानी धरला असेल तर ती धुणी मिसळपाववर का धुतली जात आहेत? संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हे कस बरोब्बर बोललात प्रियालीताई.... अहो एकदा भाषा वाहत्या नदीसारखी म्हटली की जड धोंडे अपोआपच तळाला जाणार. चांगले आसेल ते तुकारामाच्या गाथेप्रमाणे आपोआप वरती येइल त्यासाठी मुद्दामहून कष्ट घ्यायची सुध्धा गरज पडणार नाही. त्यामुळे ज्याना कोणाला असले जड शब्द वापरायचेत त्याना वापरुदे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाकीचे पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतील. अवांतर : मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. कुठल्या चित्रपटात त्या मराठी माणसाची वाणी संस्कृतमुळे शुध्ध होती तरी त्याचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे दाखवले आहे. असली उदाहरणे देउन संस्कृतमुळे मराठी लोकांचे हिंदी-इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.

In reply to by आंबोळी

प्रियाली 29/05/2008 - 17:48
दिनांक (तारीख) मूल्य (किंमत) उपस्थित (हजर) वेतन (पगार) निर्बंध (कायदा) झरणी(फाउंटनपेन) मी केवळ काही वेगळी उदाहरणे दिली, मूळ उदाहरणे मटात आणि मिपावर आली आहेतच. माझ्या उदाहरणात वरील उदाहरणेही टाका कारण मी दिलेली उदाहरणे आणि वरील उदाहरणे ही मराठीतील प्रचलीत शब्द आहेत. तेव्हा ज्यांना मूर्ख म्हणालात :SS त्यांचे प्रेमी धावत येतीलच असे मानू. =)) (खरे म्हणजे नाही येणार कारण त्यांना आपला फोलपणा कळला आहे तेव्हा ते सध्या इकडची वाक्ये तिकडच्यांच्या नावावर खपवायच्या मागे आहेत.) आणि हो! मूळ लेख मटावरचा ना मग ती धुणी चालतात का भौ तुम्हाला की इथे तुमच्या मर्जीची धुणी धुवावी लागतात?
यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.
अजिबात नाही. हास्यास्पद दावे जसे की संस्कृताची भरणा केल्याने आमची वाणी शुद्ध होते असे दावे करणार्‍यांवर ती टिप्पणी आहे, अर्थात ते तुम्हाला मानवेल असे वाटत नाही. उलट जेव्हा आपली नाणी खोटी ठरू लागतात तेव्हा मग इतरांवर संस्कृत द्वेष्टे असल्याचे, भट-बामनांना बोलणी लावल्याचे दावे केले जातात.

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 16:58
गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. हाच प्रश्न तुम्हाला... संस्कृतची ऍलर्जी का? गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का? म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच. हे मात्र खरे... असो चुकभुल दयावीघ्यावी सावरकर आणि संस्कृतप्रेमी मराठी चेतन

In reply to by चेतन

प्रियाली 29/05/2008 - 17:11
हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे. मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. संस्कृताचा मराठीवर प्रभाव कोणी नाकारत नाही.
संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का?
हाहाहाहा!!!! नाही याला मी हास्यास्पद विधान म्हणते, माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर कळले असते. हल्ली सुसंस्कृतांची भाषा इंग्रजी. संस्कृताचा काही संबंध नाही. म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले.
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की
भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे
. ती खरी मराठी नाहीच.
हे वाक्य माझे नाही. मी असे काही सांगणारे भाष्यही केलेले नाही. संस्कृतही ब्राह्मणांनी आपल्यापुरती मर्यादीत ठेवली होती असे काहीसे म्हटले आहे. तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे!

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 18:07
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे १००%खरं फक्त कोणाबाबतं...... (क्षमस्व) म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले मला वाटतं इंजिनिअरींगला अभियांत्रिकी हा प्रतिशब्द दिला होता.... त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ती खरी मराठी नाहीच. हे वाक्य माझे नाही. हे मलाही माहीते तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे! तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?) असो राग नसावा... क्षमोत्सुक चेतन (दुसरा शब्द आठवला नाही)

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 18:32
हा "अभिज्ञ " यांचा शेवटचा प्रतिसाद फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- सिप्पस्तथ्य स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद. हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय? =)) धन्यवाद क्षमाशील प्रियाली ताई हे थोडेसे कुठुन तरी forward आलेले लढत मूर्ख कोठेही 'खुट्ट' काही | संताप यास येई | आंदोलनास जाई | तो लढत मूर्ख | पिळत मूर्ख तोंडी भिजे न तीळ | मारे अफाट पीळ | ऐकून 'दातखीळ' | तो पिळत मूर्ख| मूर्ख चावट (विशेषण चिकटवलेला) चेतन

In reply to by चेतन

प्रियाली 30/05/2008 - 03:46
आपल्याला कारण नसताना मूर्ख म्हटल्याबद्दल क्षमस्व! परंतु, मी न लिहिलेले शब्द दुसर्‍यांच्या प्रतिसादातून उचलून मला चिकटवण्याचा प्रकार पसंत नाही.
तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?)
याला मी हो असे उत्तर देईन परंतु तुम्हाला पटावा असा अट्टहास नाही.

In reply to by प्रियाली

विकास 29/05/2008 - 20:32
मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. हे मी सतत वाचतोय तुमच्याकडून अजानूकर्णाकडून म्हणून हा प्रश्नः कृपया "फक्त संस्कृत" वापरा असे नक्की या चर्चांमधे कोण म्हणाले? संदर्भ मिळाले तर बरे वाटेल. वास्तवीक चर्चा सावरकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त चालली होती. त्यात त्यांनी तयार केलेले प्रतिशब्द लिहीले. त्या माझ्या लिहीण्यात मी काही संस्क्रूतचा उल्लेख देखील केला नव्हता. (त्यांच्या हिंदूत्व आणि क्रांतिकार्याबद्दल बरेच बोलले जाते त्यामानाने भाषाशुद्धीबद्दल कमी बोलले जाते. म.टा. मधील या बातमीत सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे ती स्वातंत्र्यवीरांना नम्र अभिवादन करत येथे देत आहे) त्यांनी संस्कृत लिहीले त्यांना तसे वाटले, त्यांना सुचले आणि तुम्हि वापरत असा अथवा नसा पण एक झरणीचा अपवाद सोडल्यास दिनांक, मूल्य, उपस्थित, वेतन, निर्बंध, हे शब्द आजही वापरात आहेत आणि मला नाही वाटत ते कोणी संस्कॄतच्या अभिमानाने वापरतात. पण मूळ विषय बाजूला जाऊन "मराठीचे अतोनात नुकसान झाले असे म्हणले गेले.." पुढे जेंव्हा "संस्कृत मधले शब्द असले तर काय बिघडले" असे काही जण म्हणायला लागले. तेंव्हा, त्यात नको इतका ओंकार नी म्हणल्याप्रमाणे हा विषय चघळायला सुरवात झाली आणि जणू काही हे सर्वजण फाक्त संस्कृतचेच शब्द वापरा असे म्हणतात अशी हवा केली गेली. त्यात परत "बहूजन समाज" वगैरे शब्द आणायचे. त्यातून नकळत जातीय चष्मे तयार होतात आणि ते चालू शकतात... असो. माझ्या पुरते बोलाल तर मी काही फक्त संस्कॄत असा कधी आग्रह धरलेला नाही पण त्याचा अथवा इतर भाषेतून मराठीत रूळलेल्या शब्दांना पण विरोध केलेला नाही. माझा विरोध असेलच तर कुठल्याही पद्धतीने जातीचे चष्मे वापरण्याला आहे. आपल्या देशाचा त्यामुळे आत्तापर्यंत झालेला विचका आपण पाहून त्यावरून या काळात पण काही शिकणार नसलो तर आपल्याला भारत म्हणून आणि जगात कुठेही असलात तरी भारतीय म्हणून काही भविष्य नाही. मुकी बिचारी कुणीही हाका अशी मेंढरेच आपण बनणार कधी राजकीय दास्याने तर कधी वैचारीक....म्हणून अस्ल्या चष्म्यांचा मला तिरस्कार येतो. नळाच्या पाण्यावर भांडल्यासारख्या या चर्चा चालू आहेत असे वाटायला लागले आहे. हे सांगण्याचे कारण इतकेच की हा सर्व गहजब (कुठल्या भाषेतला शब्द?) मी चालू केलेल्या लेखातून चालू झाला. माझ्या पुरता हा विषय मी बंद करतो.

In reply to by प्रियाली

विकास 29/05/2008 - 20:51
प्रश्न विचारून विषय बंद करताय यातच सगळं आलं. ह्यात पण आपण उत्तर दिले नाहीत यात पण सगळ आले का? :-( मी वाद घालण्यासाठी विषय बंद केला आहे. उत्तर मिळाले तर त्याला उत्तर देईन. अजून ही उत्तराची वाट बघत आहे.

In reply to by चेतन

विसोबा खेचर 29/05/2008 - 17:31
संस्कृतची ऍलर्जी का? कारण ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे. शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 29/05/2008 - 17:37
त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. :))

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 29/05/2008 - 18:13
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. अजून मिपावर आणिबाणी सुरू आहे त्यामुळे ह्या संदर्भात लवकरच एक वटहुकूम जारी केला जाईल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ऋषिकेश 29/05/2008 - 18:17
हे ऐकुन आता कसं मोकळं मोकळं वाटतय :) वाट पाहतोय तात्या! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by विसोबा खेचर

मन 29/05/2008 - 18:04
.... शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! १००% सहमत. अहो ते लोक (समोरच्याला संस्कृत फारसे समजत नाही ह्याची खात्री झाली की )तसले उच्चार ऐकवुन समोरच्याला घाबरवुन टाकतात. आपलेच, असल्या विद्वानांना टरकलेले जन सामान्यांचे मन.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 29/05/2008 - 21:07
किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे!
ह्यातुन तुम्हाला त्या *** लोकांची ऍलर्जी पाहिजे संस्कृतची कशाला? संस्कृतच्या ऍलर्जीसाठी ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे इतके पुरेसे आहे. शाणपट्टी करणार्‍या लोकांची लोकांची जगात ददात नाही पण म्हणून कशाकशाची ऍलर्जी लावून घेणार?

In reply to by प्रियाली

अट्टाहास, आग्रह आणि संस्कृतप्रेम..........सुरेख प्रतिसाद !!! (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) खल्लास !!! :)

विजुभाऊ 29/05/2008 - 15:31
बायको सोडुन द्यायची? ते किमान या जन्मी तरी शक्य नाही. तिच्या बरोबर सात जन्माची नातीचरामी अशी शपथ घेतली आहे (बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या :) ) )

In reply to by विजुभाऊ

बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या ) काय वाट्टेल ते काय विजुभाऊ? गेला जन्म सातवा होता. हा बोनस जन्म आहे. (सात जन्म बायकोशी नीट वागल्या बद्दल.)

मुक्तसुनीत 29/05/2008 - 15:53
एक चांगला गोषवारा दिल्याबद्दल अजानुकर्णाचे अनेक आभार. एक सामान्य मराठी भाषिक , वाचक नि नागरिक म्हणून मला असे दिसते की, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत लागू होणारे "अति सर्वत्र वर्जयेत्" हे सूत्र भाषेच्या बाबतीतही लागू पडतेच. भाषाशुद्धीकरणाच्या नावाखाली बोजड संस्कृत शब्द माथी मारणे हे जसे चुकीचे , तसेच ऊर्दु, फारसी, इंग्रजी, या पैकी कुठल्याही भाषेची शिरजोरी/प्राबल्य होऊ देणेही चुकीचेच. शेवटी भाषेच्या शुद्धीचा प्रश्न दुय्यम ठरतो. महत्त्वाचा प्रश्न हा की लोकशाही व्यवस्थेमधला जो महत्त्वाचा घटक - सामान्य जनता - त्यांना डोळ्यासमोर ठेवून भाषेची धोरणे अमलात यायला हवीत. गावाकडचा शेतकरी , इतर व्यावसायिक या लोकांना सरकारी कागदपत्रे भरायची असतील , शरी असो की ग्रामीण , अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. बस्स. मग त्यात ऊर्दु, फारसी, इंग्रजी, संस्कृत या भाषेतले शब्द येवोत - न येवोत. एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच.

In reply to by मुक्तसुनीत

ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ....एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच. .... आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल? म्हणजे शासकिय वेगळी आणि अशासकिय वेगळी अशा दोन मराठी भाषा प्रत्येकाला आल्या पाहिजेत. शाळे पासूनच सर्वांना 'खेडवळ' भाषा शिकवावी. त्यात पुन्हा, कोकणातील खेडं वेगळं, विदर्भातील खेडं वेगळं आणि देशावरील खेडं वेगळं. कोळ्या-आगर्‍यांची मराठी वेगळी, बाल्यांची मराठी वेगळी, वसईच्या ख्रिश्चनांची मराठी वेगळी. शाळेपासून ह्या सर्व मराठी भाषा प्रत्येकाने शिकल्या पाहीजेत. त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.

In reply to by प्रभाकर पेठकर

limbutimbu 29/05/2008 - 16:31
ह ह पु वा झाली प्रभाकरपन्त! अचूक निशाणा! >>>>> त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ग्यानबाची खरी मेख तिथच हे प्रभाकरपन्त! भाषा (शुद्ध वा अशुद्ध) हे केवळ निमित्त! आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

In reply to by प्रभाकर पेठकर

विकेड बनी 29/05/2008 - 16:36
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.
जळतंय पण वळत नाही!!! =))

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्तसुनीत 29/05/2008 - 18:09
आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल? मिसळपाववर लिहीलेले प्रत्येक वाक्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक खेडुताला समजावे असा तुमचा इशारा दिसतोय. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो .

In reply to by मुक्तसुनीत

अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ह्या तुमच्याच मागणीनुसार सरकारी (शासकिय की शासकीय?) आणि मिपावरील भाषा वेगवेगळी असावी असे सूचित केले आहे. मला व्यक्तिशः मराठी भाषेत आजपर्यंत रुळलेल्या इतरभाषांतील शब्दांबद्दलही तिव्र आक्षेप नाही आणि संस्कृतातून आलेल्या शब्दाबद्दलही आक्षेप नाही. माझ्याकडून जमेल तेंव्हा जमेल तितके (मला समजणारे)शुद्ध मी लिहीतो/बोलतो. कधी 'मूड' नसला तर इतर भाषिक शब्दही वापरतो. पण तो माझा भाषिक स्वभाव नाही. हे म्हणजे रोज घरी 'सात्विक' जेवण जेवल्यावर कधी कधी कंटाळा येऊन बाहेर हॉटेलातील 'तामसी' जेवणही जेवतो. पण रोजच्या जीवनात 'सात्विक'तेचा आग्रह धरतो, पुरस्कार करतो. ही सर्व चर्चा मला तरी रुचली नाही. मुद्यांना मुद्यांनी उत्तरे देण्यापेक्षा चर्चा वैयक्तिक पातळीवर भरकटली. संबंधितांनी तशी भरकटवू दिली ह्याचे दु:ख आहे. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो . माझे मराठी १००% शुद्ध आहे असा मी दावा कधीच केलेला नाही. मिपावर 'शुद्धते'चा बाऊ केला जात नाही, शुद्धीचिकित्सक मला सापडला नाही, त्यामुळे र्‍हस्व-दीर्घच्या चुका जशा माझ्या होतात तशा इतरांच्याही होतातच. पण त्यालाही मी आक्षेप घेतलेला नाही. ह्म्म! कोणी मुद्दामहून चुकीचे मराठी लिहून वाचकांच्या वेळेचा अपव्यय करीत असेल तर त्याला जरूर आक्षेप घेतला आहे. मिपावर शुद्धिचिकित्सक सुरू केला तर तो मी आनंदाने आवर्जून वापरेन. माझे लेखन र्‍हर्स्व-दीर्ध चुकांविरहीत असेल तर मला स्वतःलाच वाचायला आवडेल. स्वान्तसुखाय म्हणतात तसे. मुद्दाम जड-जड संस्कृत शब्द जोडून मराठीला पर्यायी शब्द बनविणारे एक गंमत म्हणून असे शब्द बनवित असतात. सर्वांनी ते वापरावेच असा आग्रह नसतो. जे संस्कृतोद्भव मराठी शब्द आहेत ते समजायला, वापरायला कठीण असतील तर कोणी कितीही जंग जंग पछाडले तरीही ते शब्द वापरात येणार नाहीत. 'शासकीय' भाषेत कॉरिडरला 'छन्न विभाग' असा शब्द आहे. 'लिफ्ट' ला 'उद्वाहक' असा शब्द आहे. कोण वापरतो? पण 'वेतन' हा समजायला, वापरायला सोपा शब्द असेल तर तो फक्त संस्कृतोद्भव शब्द आहे (अस मी वरील चर्चेतून अर्थ काढला आहे) म्हणून वापरायचा नाही का? माझ्या माहिती नुसार, 'पगार' हा शब्द 'आश्रीताला खर्चासाठी दिलेली रक्कम' अशा अर्थी आहे. आपण नोकर्‍या करून वेतन मिळवितो त्याला 'पगार' म्हणून स्वतःला आश्रीत घोषित करायचे का? आपण आश्रीत असतो का? त्या पेक्षा 'वेतन' शब्दात सन्मानही आहे. असो. भाषा विषयावर माझा अभ्यास तरी बराच उथळ आहे. त्यांमुळे भाषा शास्त्रातले मोठमोठ्या संशोधकांचे दाखले मी देऊ शकत नाही. ह्याहून जास्त वाद मी घालू शकणार नाही, माझी इच्छाही नाही. लाथाळ्यांपेक्षा चांगले विचार, चांगले साहित्य वाचायला मिळावे म्हणून मी मिपावर येतो. असेच चालणार असेल तर मिपा उघडून बसण्यापेक्षा दुसरे कांही महत्त्वाचे काम करणे मी पसंद करीन. धन्यवाद.

ऋषिकेश 29/05/2008 - 17:38
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच
:P हा हा हा हा :))) =)) -('मिसळ'लेला भट बामन) ऋषिकेश

विकास 28/05/2008 - 22:28
मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. आपल्याला गेल्या शतकाच्या असे म्हणायचे आहे का? (हे भाषाशुद्धीसाठी सुचवले नाही बरकां! :-) )

In reply to by विकास

आजानुकर्ण 28/05/2008 - 22:30
मपलं न्हाई ह्ये. ( म्ह. इदं न मम. ;) ) पुस्तकप्रकाशन/लेखन १९९० व्या दशकात. त्यामुळे तुमची दुरुस्ती बरोबर. (स्पष्टीकरणोत्सुक!) आजानुकर्ण

मन 28/05/2008 - 22:38
ह्या लेखाचा. सही. पण एक नाही समजलं.भौगोलिक सलगता पाहिल्यास, तामिळ प्रांत कुठे महाराष्ट्राला लागुन आहे? मुख्यतः त्या काळात तरी, संस्कृती आणि भाषा ह्यांचं आदान-प्रदान व्हायचं ते सलग भु-भागातुन. त्ये "कानडाउ विट्टलु..." वगैरे ऐकुन होतो. म्हणजे मराठी-कन्नड नातं वगैरे.पण थेट तमिळ म्हंजे कमाल आहे बुवा. त्या काळात इतका संपर्क तरी कुठं होता एकमेकांशी? बरं मग संस्कृत्-मराठी-हिंदी ह्यांची एक्मेकांच्या अत्यंत जवळ जाणारी देवनागरी लिपी तरी कशी शिल्लक राहिली? मराठी लिहिताना त्या तामिळ लिपीचा वापर का होत नाही? (जर मराठी-तमिळ भाषा संबंध इतका दृढ असेल तर त्याच लिपीत मराठी लिहिणं जास्त नैसर्गिक्/सोयीचं राहील. नाही का?) (स्वगतः- तरिच म्हटलं, त्या चर्चेतुन हिरिरिनं बोलताना अचानक आ'कर्ण राव गायब कुठं झाले? ह्यांनी तर सरळ नवा लेखच टाकला की राव) आपलाच, मनोबा

चतुरंग 28/05/2008 - 23:27
ह्यातली जवळजवळ सगळीच मला नवीन होती. मराठी आणि तमिळ ह्या इतक्या मिळून मिसळून असतील असे माहीत नव्हते. ;) धन्यवाद आ.कर्णा! चतुरंग

अभिज्ञ 28/05/2008 - 23:51
आजानुकर्ण साहेब, मनोबांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या लेखाचा आवाका खरोखर खुप मोठा आहे. त्यावर काहि लिहावे एवढी आमची पात्रताही नाही.तरीहि काही मुलभुत प्रश्न मनात आले, त्याचे निराकरण आपण केल्यास उत्तम होइल. खैरे ह्यांनी मराठी-तमिळ संबंधांचा बराच अभ्यास केलेला दिसतोय.परंतु त्यांनी मांडलेले विचार हे एकांगी वाटतात.अहो गेल्या हजारो वर्षात तमिळ भाषेत काहीच फ़रक पडला नाही काय? मराठी भाषेचेच पहा ना. ज्ञानेश्वरीच्या काळातील मराठी व आत्ताची मराठी ह्यात केवढा फ़रक जाणवतो. खुद्द तमिळ भाषेत बरेच संस्क्रृत शब्द आढळ्तात.तमिळ भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे. अहो तमिळच कशाला, मराठी व बंगाली भाषेत सुध्दा तोंडात बोटे घालावीत (कोणीहि कोणाच्या) अशी साम्य स्थळे आहेत. उदा.सकाळ,वाटी,भातवाढी,डाव,पाडा,.......... पण माझ्या माहीति प्रमाणे हेच शब्द इतर भाषांत जसेच्या तसे वापरले जात नाहीत.(काहि प्रमाणात ओडिया,व आसामी भाषेत) किंबहुना,समस्त कोंकण पट्टय़ात बोलल्या जाणा-या भाषेत आणि मराठीत तसेच बंगालीत कमालीचे साम्य आढळते. ते हि कसे काय? असे बरेच प्रश्न आहेत.त्यामूळॆ काहि शब्दात साम्य आढळले म्हणुन तेच मराठी भाषेचे मुळ मानणे पटत नाही. थोडे सविस्तर लिहिल्यास उत्तम. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:39
भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे.
बहुधा संस्कृत भाषा ही इतकी यमनियमांनी बांधलेली आहे की तिला श्वास घेण्यापुरतीही जागा मिळाली नाही आणि शुद्धाशुद्धतेच्या कल्पनांपायी ती गुदमरून मृतप्राय झाली असे काही लोक म्हणतात ते खरे असावे! याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. आपला, (पिंडावरचा कावळा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 29/05/2008 - 08:09
याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. सहमत आहे... ;) तात्या.

विसोबा खेचर 28/05/2008 - 23:54
क्रुपया हे वाचावे! हे लेखन इथून उडवले जाण्याची शक्यता आहे, हे जाणूनच पुढील प्रतिसाद द्यावेत! भाषा, भाषा शुद्धी, व्याकरण, शुद्धलेखन, संस्कृत भाषेची सो कॉल्ड महती या विषयावर चर्चा करावयास माझे मित्र शशांक जोशी यांचे उपक्रम हे संस्थळ फार छान आहे! मिसळपाववर वरील विषय सहसा एन्करेज केले जात नाहीत याची नोंद घ्यावी..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:24
हाती घ्याल ते तडीस न्या असे आमचे गुरूदेव म्हणतात. एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. आपला, (अवलंबनपर्णोद्गमसूत्रोत्सुक!) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 29/05/2008 - 08:09
एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. ठीक आहे! मिपावरील एक्स पंचायत समिती सदस्य हा आपला रुतबा ध्यानात घेऊन आम्ही तूर्तास काहीच बोलत नाही. चालू द्यात चर्चा..! परंतु या पुढे कृपया कुणीही भाषा, भाषेचा विकास, भाषेचं यांव, भाषेचं त्यांव, शुद्धलेखन, व्याकरण या विषयांवरील चर्चा मिपावर करून मिपाचं वातावरण घाण करू नये अशी सर्वांना हात जोडून, नम्र व कळकळीची विनंती! मिपा जसं आहे तसंच राहू द्या! त्याला विद्वान संकेतस्थळांच्या रांगेत नेऊन बसवायचा प्रयत्न करू नका एवढीच विनंती! :) तात्या.

वरील उतार्‍याच्या संदर्भात एक लेख जालावर सापडला आहे. जो खैरे साहेबांच्या दाव्याच्या विरोधी आहे. http://groups.google.com/group/alt.language.hindi/browse_thread/thread/cfc7d78c964dd86b कदाचित वरील तामिळ शब्द महाराष्ट्री प्राकृतामधून दक्षिणेत गेले असण्याचा संभव आहे. कारण महाराष्ट्री पा़कृताबद्द्ल ख्रिस्तपूर्व ५व्या शतकापासून उल्लेख आढळतात. अधिक माहीती इथे वाचता येईल http://en.wikipedia.org/wiki/Maharashtri पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:36
पुणेकर पेशवेसाहेब, खैरे साहेबांनी मराठी ही फक्त तमिळकडून आली असा कुठेही दावा केलेला नाही. मात्र शुद्धिकरणचळवळे लोक मराठीचा संबंध फक्त संस्कॄताशी जोडू इच्छितात आणि इतर भाषा अस्पृश्य असल्याप्रमाणे त्यांचा विटाळ मानला जातो. खैरे साहेबांच्या लेखात शास्त्रीय प्रयोग केल्यानंतर मराठी व तमिळचा संबंध कसा आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे. मात्र मराठीचा संबंध फक्त संस्कृताशी आहे अशीएकांगी भूमिका मांडणार्‍यांनी पुन्हा (शक्य असल्यास) विचार करावा यासाठीच तो प्रतिसाद. मराठी ही फक्त तमिळ किंवा फॉर दॅट मॅटर संस्कृताशीच संबंधित आहे व इतर (फारसी, अरबी, इंग्रजी, कन्नड) भाषांचा तिला विटाळ होतो असे मानू नये! अवांतरः जय महाराज या लेखकाचा 'आवाका' गुगल ग्रुप्सवर वावरणार्‍या अनेकांना माहिती आहे. केवळ भावनिक उद्दीपन करून इतरांच्या नावाखाली भूमिका मांडणे असा त्यांचा खाक्या केवळ ह्याच समुदायावर नसून. या व अशा इतर समुदायांवरही लोकप्रिय आहे. सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. मात्र त्यांनी दिलेले रामायणाचे पुरावे हास्यास्पद आहेत. हे लेखही वाचा यापेक्षा अधिक काय सांगू शकतो? दुवा १ दुवा २ दुवा ३ आपला, (गारदी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 29/05/2008 - 09:10
सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. http://www.gisdevelopment.net/application/archaeology/site/archs0001.htm http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/2073159.stm आणि हा विकीचा http://en.wikipedia.org/wiki/Sarasvati_River

In reply to by विकास

आजानुकर्ण 29/05/2008 - 09:15
सरस्वती नदीचा पुरावा नको. ही नदी आणि भाषा यांचा संबंध जो सुब्रम्हण्यम यांना अपेक्षित आहे त्याबाबतचा पुरावा.

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 10:19
हा लेख बराचसा एकतर्फी वाटला. संस्कृतावरं टिका करायची म्हणुन कहिहि... तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे.... (माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.) असो अधिक माहितिसाठी कदचीत हा दुवा उपयोगी पडेल http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India#Classical_languages_of_India अजुन एक प्रश्न म.टा.मध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यापैकी बहुतेक बरेच शब्द नेहमीच वापरले जातात. जर एकदा नीट पहावे http://www.misalpav.com/node/1897 चुकभुल द्यावी घ्यावी (हे कुठल्या भाषेतुन आले बां? कायं करायचयं B) सुसंस्कृत चेतन

In reply to by चेतन

आजानुकर्ण 29/05/2008 - 10:32
माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.)
तुम्हाला खैरे यांच्या तुलनेत बरीच माहिती दिसते (किती तरी पटींनी जास्त) . तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? आपला, (तौलनिक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 10:58
एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? तेलुगू-कन्नड या भाषांबद्दल आपण थोडं आधिक वाचावं आणी मगचं हे विचारावं http://en.wikipedia.org/wiki/Telugu_language माझ्यामते तुम्हाला ह्या दुव्याची देखिल गरज आहे http://en.wikipedia.org/wiki/Sanskrit अवांतरः तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. १५३४३६७ संस्कृत ५३४९ तमिळ २३८९ कन्नड १२३४ तेलगु हा अकबरासारखा प्रश्न झाला राजधानीत कावळे किती? ह. घ्या. स्वगतः भाषा हा शब्द कोठुन आला बरं?

In reply to by अमोल केळकर

चेतन 29/05/2008 - 12:24
जरा हा दुवा पहावा http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language#cite_note-bhasha-9 येथे एक वाक्य आहे Marathi has taken words from and given words to Sanskrit, Kannada, Hindi, Urdu, Arabic, Persian, and Portuguese. At least 50% of the words in Marathi are either taken or derived from Sansrit. हे आणखिन काही Literature in all Dravidian languages owes a great deal to Sanskrit, the magic wand whose touch raised each of the languages from a level of patois to that of a literary idiom". (Sastri 1955, p309) सर्वज्ञानी गूगल आणी en.wikipedia.org च्या सहाय्याने अज्ञानी चेतनमार्फत ज्ञानीलोकांकरिता अवांतरः ज्ञानेश्वर, अम्रुतानुभव हे शब्द कोठुन आले बरं? अतिअवांतरः महाराष्ट्र हा शब्द कोठुन आला बरं...? मी मराठीचं पण संस्कृत थोडफार कळणारा चेतन

In reply to by चेतन

आजानुकर्ण 29/05/2008 - 13:05
संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही! मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठीला संस्कृतची झेरॉक्स कॉपी करायची असेल तर करा. मग मराठीही संस्कृताप्रमाणेच चोपड्यांमध्ये बंद राहील. सुदैवाने आमच्यासारखी सामान्य जनता अशा प्रयत्नांची खिल्ली उडवेल यात शंका नाही. सोबत हे देखील वाचा. आपला, (स्पष्टवक्ता) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 14:32
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे. भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे या लेखात मलातरी हा प्रकार थोडासा जाणवला. आपण दिलेला दुवा वाचनिय आहे पण इथे तुलना कोठेहि नाहि आणी ती होउ नये असे मला वाटते संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही हे म्हणुनसुद्धा लेखात तरी सुर नाकरण्याचाच दिसतोयं असो तुम्हि हे नाकारत नाही ह्यातच समाधान. मी तरी मराठीप्रमाणे संस्कृतलाही आपलीच मानतो त्यामुळे कदाचित माझा सुर कडवटही असेल. कडवट चेतन

In reply to by चेतन

कोलबेर 29/05/2008 - 20:59
चेतनरावांनी आकडेवारी देऊन संस्कृतातुन किती शब्द आले आणि इतर भाषांमधून किती ह्याची तौलनिक माहिती देऊन अजानुकर्ण ह्यांच्या मुद्द्याचे खंडन केले आहे. श्री.अजानुकर्ण ह्यांनी त्याची कसलीही नोंद न घेता संस्कृत विरोधाचा सुर लावला आहे तो एकांगी वाटतो.
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे.
ह्या चेतनरावांच्या भुमिकेशी आम्ही देखिल सहमत आहोत. आंधळी भक्ती आणि विरोधासाठी विरोध हे दोन्हीही अयोग्य!

In reply to by कोलबेर

विकास 29/05/2008 - 22:30
कोलबेर ने योग्य आणि थोडक्यात मांडले असल्याने "+१" व्यतिरीक्त अजून काही नाही!

In reply to by विकास

आजानुकर्ण 30/05/2008 - 07:32
कोलबेरशेठ आणि तुम्ही दोघांनीही मी दिलेला दुवा न वाचताच ही प्रतिक्रिया दिली आहे हे खेदाने म्हणावे लागत आहे. आपला, (सखेद) आजानुकर्ण

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 30/05/2008 - 07:29
अहो संस्कृतविरोधाचा आणि एकांगी सूर कोणी लावला आहे येथे? चेतनरावांनी दिलेल्या आकडेवारीतील ह.घ्या. हे वाचले का? समजा चेतनरावांनी गंभीरपणे ती आकडेवारी दिली आहे असे मानू. मग मी दिलेल्या दुव्यावर दाते कर्वे यांच्या कोशानुसार मराठीतील एकूण शब्द 1,12,189 आहेत हे स्पष्ट लिहिले आहे. मग चेतनरावांनी दीड लाखाहून जास्त शब्द संस्कृतातून आलेत याचा पुरावा देणे आवश्यक नाही का? मी विरोधासाठी विरोध करत असल्याचा एकही पुरावा द्यावा मी सपशेल माफी मागण्यास तयार आहे! आपला, (सहसदस्य) आजानुकर्ण अवांतरः श्री. जनरलपंत डायर यांच्या वटहुकूमाची अंमलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र आमचे मित्र कोलबेर शेठ यांच्या प्रतिसादात 'आजानुकर्ण' या आमच्या नावाचा वैयक्तिक उल्लेख झाल्याने प्रतिसाद देत आहोत याची जनरलपंतांनी नोंद घ्यावी ही विनंती. आपला, (स्पष्ट) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 30/05/2008 - 07:37
आता सर्वांनी हा विषय इथेच थांबवावा! काही चर्चा करायची असेल तर ती खरडवहीतून किंवा व्य नि तून करावी. अन्यथा हा संपूर्ण थ्रेडच अप्रकाशित करण्यात येईल.. तात्या.

मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, आणि मराठी तामिळीचे भाषिक नातेसंबध एका माहितीपूर्ण लेखनात वाचायला मिळाले, आणि ते आवडले. अवांतर : मिसळपाव मराठी संकेतस्थळावर सर्व लेखन संवाद हे मराठी भाषेतून होत असतांना भाषिक लेखांना संस्थळाच्या मालकाचा विरोध होतो, ही गोष्ट मराठी भाषाप्रेमी म्हणुन दुखः देणारी वाटते. ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 29/05/2008 - 09:46
मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, हा हा हा! हे शब्द वाचूनच करमणूक झाली! :) नथ नाकानं साजिरवानी, गला भरून सोन्याचे मनी कोलीवार्‍याची मी गं रानी रात पुनवेला नाचून करतंय मौजा! काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) काय रे बाला, हिर्‍याच्या कुडाचे तुज्या कुल्ल्यावर पोकल बांबूचे फटके मारू का दोन? रांडच्या, हिकू का तुला?! :) काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) मराठी भाषा ही अठरापगड जातीजमातीत बोलली जात असताना आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे! :) आपला, (आग्र्या-कोळ्यात लहानाचा मोठा झालेला) दर्याचा राजा -तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 29/05/2008 - 09:59
तात्या शाळेत असताना तुमचा व्याकरणाचा मास्तर लैच मारकुटा होता का हो? नाही.. भाषाशास्त्र ह्याविषयी कुणीही काहीही बोलले की त्यामधुन 'शुदद्धलेखनाची सक्ती लादली जाते आहे' ह्या एकमेव निष्कर्षावर तुम्ही कायम येताना पाहुन मनात आलेली ही शंका वाढत जाते.

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 29/05/2008 - 10:09
हम्म! कोलबेरा, प्रत्यक्षात भेटू तेव्हा या विषयावर तुझ्याशी बोलीन सवडीने! अगदी नक्की...! :) तूर्तास, गोमू संगतीनं माज्या तू येशील काय आरं संगतीनं तुज्या मी येनार नाय ह्या ओळी भाषेच्या आणि भाषाशास्त्राच्या दृष्टीनं चूक की अचूक, ह्या विचारात मी अडकलो आहे आणि बाप खपल्यासारखा चेहेरा करून त्यावर गहन विचार करतो आहे! तेव्हा, प्लीज डोन्ट डिष्टर्ब मी! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे सोकॊल्ड, भाषा शुद्धीचे आग्रही, शुद्धलेखनाचे पुरस्कर्ते, बोजड भाषेचे महागुरु, संस्कृतप्रेमी, फुगीर सुशिक्षित, म्हणजे आम्ही की काय ? च्यायला आमची प्रतिमा इतकी कशी उंचावली !!! ;) आपल्याप्रमाणेच, अठरापगड जातीजमातीची बोलल्या जाणारी बोली ही आमची जीव का प्राण आहे, आम्ही त्यावर नुसते प्रेम करत नाही तर, रहाटगाड्यात ती भाषा लिहितो, बोलतो आणि जगतोही !!! :) -दिलीप बिरुटे (बोली भाषा लेखनात वापरणारा )

विजुभाऊ 29/05/2008 - 13:14
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. यातच काय ते समजावे. सामान्यांच्या या भाषेला पुन्हा एकदा उच्चेतरांची भाषा बनवण्याचा घाट कशासाठी घालत आहोत? हा पुन्हा द्रावीडी प्राणायामाचा हट्ट कशासाठी.

In reply to by विजुभाऊ

चेतन 29/05/2008 - 15:03
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. आता ज्ञानेश्वरीतली बोली भाषा ही कळत नाही म्हणुन आपण त्याचाही अनुवाद करुन वर बोलीला शब्दबंबाळ म्हणणार का? (आपल्याच शब्दात उच्चेतरांची भाषा वगैरे वगैरे ठरवणार का?) संस्कृतला खाली दाखवण्याचा हा अट्टाहास कशापायी? कडवट चेतन अवांतरः अनेक उत्तम साहित्याचे मराठित अनुवाद झाले आहेत म्हणुन मुळ भाषेला नावे ठेवावी का? संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन (ह. घ्या.)

In reply to by चेतन

विजुभाऊ 29/05/2008 - 15:19
संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन
चेतन भौ म्या संथ न्हाय पन ज्ञानेश्वरी लिव्हुन बी काही शतके उलटली. ती बोली बी आता मागं र्‍हायली. म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण. जिवंत भाषा जिवंत नदी सारखी असते. ती वाहती रहायला तिला छोट्या नद्या/ ओढे/ प्रसंगी नालेही मिळतात. कल्पना करा उद्या गंगा किंवा कृष्ण नदीच्या सर्व उपनद्या शुद्धीच्या नावाखाली अडवल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल. उगमाजवळ असेल तेवढेच राहील. उरल समुद्राबाबतीत असे झाले आणि आता उरल समुद्र आटुन त्याचे आस्तित्व एक मोठे डबके म्हणुन राहीले आहे

limbutimbu 29/05/2008 - 15:06
सन्स्कृत राहुदे बाजुला, ज्ञानेश्वरी तरी नीट समजते का आपल्याला? (आणि मुळात कितीक जण वाचतात्/वाचणारेत?) इकडे पुढच्या पिढ्या इन्ग्रजी माध्यमातून शिकवुन "देशी इन्ग्रज" तयार करण्याचे कारखाने सुरू असताना स्वातन्त्रवीरान्नी भाषा शुद्धीबाबत जे केल ते योग्य की अयोग्य हा वाद आता हवाचे कशाला? कोण बोलणार लिहिणार वाचणार तुमची ती दरिद्री दळभद्री मराठी जिच्यात म्हणे ज्ञानाचे काहीही कण नाहीत म्हणुन तर इन्ग्रजी माध्यमातून लहानग्यान्ना शिक्षाण देतात ना हल्ली? अन जन्तेच्या पुढल्या पिढ्या जर मराठी शिकणारच नसतील तर हवित कशाला म्हणतो मी ही थेर? त्यापेक्षा एमटीव्ही बघा, ऐश करा! :D (जे खानदानी(?), उच्चवर्णीय(?), मराठीप्रेमी असतील ते टिकवतीलच मराठी, ती ही शुद्ध स्वरुपात! नाहीतर शेवटी "पुणे" आहेच!:D ) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

प्रियाली 29/05/2008 - 15:20
अजानुचा लेख चांगला आहे, बरीच नवी माहिती मिळाली. मराठी भाषा ही जशी फक्त संस्कृतापासून बनली नाही तशी ती फक्त तमिळपासूनही बनलेली नाही. (तसे अजानुने लिहिल्याचा दावाही नाही) संस्कृती आणि भाषा यांच्यात कालानुसार होत जाणारी सरमिसळ जुनी आहे. उद्वेग तेव्हा येतो जेव्हा संस्कृत आम्हाला आवडते (हे म्हणणार्‍या लोकांना संस्कृतात चार वाक्ये लिहिता येतात का देवजाणे! उगीच इथून तिथून पाठ केलेले श्लोक देणे म्हणजे आपल्याला संस्कृत येते अशी काहीजणांची समजूत असावी) म्हणून आम्ही संस्कृतातले शब्द प्रतिशब्द म्हणून घेणार हा पोरकटपणा वाटतो. संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. संस्कृतात सर्व काही आहे हा आणखी एक पोरकट ग्रह लोकांनी काहीही माहित नसताना करून ठेवलेला असतो. जी भाषा एका विशिष्ट गटाच्या बाहेर पडलीच नाही, जिच्यात काळानुसार फारसा (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) बदल झाला नाही तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. असाच एक ग्रह की संस्कृतात सर्व उच्चार आहेत. संस्कृत बोलल्याने वाणी शुद्ध होते. यावर अनेक स्थळांवर झालेल्या चर्चांमध्ये हा दावा किती फोल आहे यावर चर्चा झाली आहेच. मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. मराठीत संस्कृतातील बरेचसे शब्द रूळल्याने बरेचदा अभियांत्रिकी (अभिवादन, अभिमान, अभिनंदन हे शब्द मराठीत आधीच आहेत) आणि यंत्र हा शब्दही मराठीत रूळलेला आहे तेव्हा अभियांत्रिकी हा शब्द मराठी प्रतिशब्द नसून संस्कृत प्रतिशब्द ठरतो आणि "म्हणजे काय आहेत का तुमच्याकडे पर्याय संस्कृताशिवाय?" असे पोरकट प्रश्न विचारले जातात. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? कारण ते उत्तर पोरासोराला आले असते की अभियांत्रिकी= इंजिनिअरींग पण भाषा पोरासोरांना येऊ नये हीच या मंडळींची इच्छा असते का काय कोणास ठाऊक. हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून का द्यावेत तर कोणीतरी उठून भाषाशुद्धीचं खूळ निर्माण करतो. रूळलेल्या शब्दांची भाषाशुद्धी आणि भाषेत येणार्‍या नव्या शब्दाला प्रतिशब्द शोधणे यातला फरक काही श्रेष्ठींना जाणवला नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. असो.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 29/05/2008 - 15:53
असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हा हा हा! :) तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. अगदी १०० टक्के सहमत आहे.. ! :) आपला, (प्रियालीचा मित्र) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आंबोळी 29/05/2008 - 17:16
संस्कृतचा आग्रह धरणारे जे कोण पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक आहेत त्यापैकी कुणीही हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून द्या आणि संस्कृतोत्भवच शब्द घ्या असा आग्रह धरल्याचे मिसळपाववरील तिनही चर्चेत दिसला नाही. (असल्यास ते मुर्ख आहेत असे माझे वैयक्तीक मत आहे.). जर दुसर्‍याकुठल्या संस्थळावर असा अग्रह त्यानी धरला असेल तर ती धुणी मिसळपाववर का धुतली जात आहेत? संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हे कस बरोब्बर बोललात प्रियालीताई.... अहो एकदा भाषा वाहत्या नदीसारखी म्हटली की जड धोंडे अपोआपच तळाला जाणार. चांगले आसेल ते तुकारामाच्या गाथेप्रमाणे आपोआप वरती येइल त्यासाठी मुद्दामहून कष्ट घ्यायची सुध्धा गरज पडणार नाही. त्यामुळे ज्याना कोणाला असले जड शब्द वापरायचेत त्याना वापरुदे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाकीचे पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतील. अवांतर : मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. कुठल्या चित्रपटात त्या मराठी माणसाची वाणी संस्कृतमुळे शुध्ध होती तरी त्याचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे दाखवले आहे. असली उदाहरणे देउन संस्कृतमुळे मराठी लोकांचे हिंदी-इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.

In reply to by आंबोळी

प्रियाली 29/05/2008 - 17:48
दिनांक (तारीख) मूल्य (किंमत) उपस्थित (हजर) वेतन (पगार) निर्बंध (कायदा) झरणी(फाउंटनपेन) मी केवळ काही वेगळी उदाहरणे दिली, मूळ उदाहरणे मटात आणि मिपावर आली आहेतच. माझ्या उदाहरणात वरील उदाहरणेही टाका कारण मी दिलेली उदाहरणे आणि वरील उदाहरणे ही मराठीतील प्रचलीत शब्द आहेत. तेव्हा ज्यांना मूर्ख म्हणालात :SS त्यांचे प्रेमी धावत येतीलच असे मानू. =)) (खरे म्हणजे नाही येणार कारण त्यांना आपला फोलपणा कळला आहे तेव्हा ते सध्या इकडची वाक्ये तिकडच्यांच्या नावावर खपवायच्या मागे आहेत.) आणि हो! मूळ लेख मटावरचा ना मग ती धुणी चालतात का भौ तुम्हाला की इथे तुमच्या मर्जीची धुणी धुवावी लागतात?
यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.
अजिबात नाही. हास्यास्पद दावे जसे की संस्कृताची भरणा केल्याने आमची वाणी शुद्ध होते असे दावे करणार्‍यांवर ती टिप्पणी आहे, अर्थात ते तुम्हाला मानवेल असे वाटत नाही. उलट जेव्हा आपली नाणी खोटी ठरू लागतात तेव्हा मग इतरांवर संस्कृत द्वेष्टे असल्याचे, भट-बामनांना बोलणी लावल्याचे दावे केले जातात.

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 16:58
गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. हाच प्रश्न तुम्हाला... संस्कृतची ऍलर्जी का? गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का? म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच. हे मात्र खरे... असो चुकभुल दयावीघ्यावी सावरकर आणि संस्कृतप्रेमी मराठी चेतन

In reply to by चेतन

प्रियाली 29/05/2008 - 17:11
हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे. मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. संस्कृताचा मराठीवर प्रभाव कोणी नाकारत नाही.
संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का?
हाहाहाहा!!!! नाही याला मी हास्यास्पद विधान म्हणते, माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर कळले असते. हल्ली सुसंस्कृतांची भाषा इंग्रजी. संस्कृताचा काही संबंध नाही. म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले.
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की
भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे
. ती खरी मराठी नाहीच.
हे वाक्य माझे नाही. मी असे काही सांगणारे भाष्यही केलेले नाही. संस्कृतही ब्राह्मणांनी आपल्यापुरती मर्यादीत ठेवली होती असे काहीसे म्हटले आहे. तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे!

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 18:07
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे १००%खरं फक्त कोणाबाबतं...... (क्षमस्व) म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले मला वाटतं इंजिनिअरींगला अभियांत्रिकी हा प्रतिशब्द दिला होता.... त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ती खरी मराठी नाहीच. हे वाक्य माझे नाही. हे मलाही माहीते तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे! तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?) असो राग नसावा... क्षमोत्सुक चेतन (दुसरा शब्द आठवला नाही)

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 18:32
हा "अभिज्ञ " यांचा शेवटचा प्रतिसाद फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- सिप्पस्तथ्य स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद. हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय? =)) धन्यवाद क्षमाशील प्रियाली ताई हे थोडेसे कुठुन तरी forward आलेले लढत मूर्ख कोठेही 'खुट्ट' काही | संताप यास येई | आंदोलनास जाई | तो लढत मूर्ख | पिळत मूर्ख तोंडी भिजे न तीळ | मारे अफाट पीळ | ऐकून 'दातखीळ' | तो पिळत मूर्ख| मूर्ख चावट (विशेषण चिकटवलेला) चेतन

In reply to by चेतन

प्रियाली 30/05/2008 - 03:46
आपल्याला कारण नसताना मूर्ख म्हटल्याबद्दल क्षमस्व! परंतु, मी न लिहिलेले शब्द दुसर्‍यांच्या प्रतिसादातून उचलून मला चिकटवण्याचा प्रकार पसंत नाही.
तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?)
याला मी हो असे उत्तर देईन परंतु तुम्हाला पटावा असा अट्टहास नाही.

In reply to by प्रियाली

विकास 29/05/2008 - 20:32
मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. हे मी सतत वाचतोय तुमच्याकडून अजानूकर्णाकडून म्हणून हा प्रश्नः कृपया "फक्त संस्कृत" वापरा असे नक्की या चर्चांमधे कोण म्हणाले? संदर्भ मिळाले तर बरे वाटेल. वास्तवीक चर्चा सावरकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त चालली होती. त्यात त्यांनी तयार केलेले प्रतिशब्द लिहीले. त्या माझ्या लिहीण्यात मी काही संस्क्रूतचा उल्लेख देखील केला नव्हता. (त्यांच्या हिंदूत्व आणि क्रांतिकार्याबद्दल बरेच बोलले जाते त्यामानाने भाषाशुद्धीबद्दल कमी बोलले जाते. म.टा. मधील या बातमीत सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे ती स्वातंत्र्यवीरांना नम्र अभिवादन करत येथे देत आहे) त्यांनी संस्कृत लिहीले त्यांना तसे वाटले, त्यांना सुचले आणि तुम्हि वापरत असा अथवा नसा पण एक झरणीचा अपवाद सोडल्यास दिनांक, मूल्य, उपस्थित, वेतन, निर्बंध, हे शब्द आजही वापरात आहेत आणि मला नाही वाटत ते कोणी संस्कॄतच्या अभिमानाने वापरतात. पण मूळ विषय बाजूला जाऊन "मराठीचे अतोनात नुकसान झाले असे म्हणले गेले.." पुढे जेंव्हा "संस्कृत मधले शब्द असले तर काय बिघडले" असे काही जण म्हणायला लागले. तेंव्हा, त्यात नको इतका ओंकार नी म्हणल्याप्रमाणे हा विषय चघळायला सुरवात झाली आणि जणू काही हे सर्वजण फाक्त संस्कृतचेच शब्द वापरा असे म्हणतात अशी हवा केली गेली. त्यात परत "बहूजन समाज" वगैरे शब्द आणायचे. त्यातून नकळत जातीय चष्मे तयार होतात आणि ते चालू शकतात... असो. माझ्या पुरते बोलाल तर मी काही फक्त संस्कॄत असा कधी आग्रह धरलेला नाही पण त्याचा अथवा इतर भाषेतून मराठीत रूळलेल्या शब्दांना पण विरोध केलेला नाही. माझा विरोध असेलच तर कुठल्याही पद्धतीने जातीचे चष्मे वापरण्याला आहे. आपल्या देशाचा त्यामुळे आत्तापर्यंत झालेला विचका आपण पाहून त्यावरून या काळात पण काही शिकणार नसलो तर आपल्याला भारत म्हणून आणि जगात कुठेही असलात तरी भारतीय म्हणून काही भविष्य नाही. मुकी बिचारी कुणीही हाका अशी मेंढरेच आपण बनणार कधी राजकीय दास्याने तर कधी वैचारीक....म्हणून अस्ल्या चष्म्यांचा मला तिरस्कार येतो. नळाच्या पाण्यावर भांडल्यासारख्या या चर्चा चालू आहेत असे वाटायला लागले आहे. हे सांगण्याचे कारण इतकेच की हा सर्व गहजब (कुठल्या भाषेतला शब्द?) मी चालू केलेल्या लेखातून चालू झाला. माझ्या पुरता हा विषय मी बंद करतो.

In reply to by प्रियाली

विकास 29/05/2008 - 20:51
प्रश्न विचारून विषय बंद करताय यातच सगळं आलं. ह्यात पण आपण उत्तर दिले नाहीत यात पण सगळ आले का? :-( मी वाद घालण्यासाठी विषय बंद केला आहे. उत्तर मिळाले तर त्याला उत्तर देईन. अजून ही उत्तराची वाट बघत आहे.

In reply to by चेतन

विसोबा खेचर 29/05/2008 - 17:31
संस्कृतची ऍलर्जी का? कारण ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे. शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 29/05/2008 - 17:37
त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. :))

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 29/05/2008 - 18:13
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. अजून मिपावर आणिबाणी सुरू आहे त्यामुळे ह्या संदर्भात लवकरच एक वटहुकूम जारी केला जाईल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ऋषिकेश 29/05/2008 - 18:17
हे ऐकुन आता कसं मोकळं मोकळं वाटतय :) वाट पाहतोय तात्या! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by विसोबा खेचर

मन 29/05/2008 - 18:04
.... शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! १००% सहमत. अहो ते लोक (समोरच्याला संस्कृत फारसे समजत नाही ह्याची खात्री झाली की )तसले उच्चार ऐकवुन समोरच्याला घाबरवुन टाकतात. आपलेच, असल्या विद्वानांना टरकलेले जन सामान्यांचे मन.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 29/05/2008 - 21:07
किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे!
ह्यातुन तुम्हाला त्या *** लोकांची ऍलर्जी पाहिजे संस्कृतची कशाला? संस्कृतच्या ऍलर्जीसाठी ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे इतके पुरेसे आहे. शाणपट्टी करणार्‍या लोकांची लोकांची जगात ददात नाही पण म्हणून कशाकशाची ऍलर्जी लावून घेणार?

In reply to by प्रियाली

अट्टाहास, आग्रह आणि संस्कृतप्रेम..........सुरेख प्रतिसाद !!! (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) खल्लास !!! :)

विजुभाऊ 29/05/2008 - 15:31
बायको सोडुन द्यायची? ते किमान या जन्मी तरी शक्य नाही. तिच्या बरोबर सात जन्माची नातीचरामी अशी शपथ घेतली आहे (बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या :) ) )

In reply to by विजुभाऊ

बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या ) काय वाट्टेल ते काय विजुभाऊ? गेला जन्म सातवा होता. हा बोनस जन्म आहे. (सात जन्म बायकोशी नीट वागल्या बद्दल.)

मुक्तसुनीत 29/05/2008 - 15:53
एक चांगला गोषवारा दिल्याबद्दल अजानुकर्णाचे अनेक आभार. एक सामान्य मराठी भाषिक , वाचक नि नागरिक म्हणून मला असे दिसते की, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत लागू होणारे "अति सर्वत्र वर्जयेत्" हे सूत्र भाषेच्या बाबतीतही लागू पडतेच. भाषाशुद्धीकरणाच्या नावाखाली बोजड संस्कृत शब्द माथी मारणे हे जसे चुकीचे , तसेच ऊर्दु, फारसी, इंग्रजी, या पैकी कुठल्याही भाषेची शिरजोरी/प्राबल्य होऊ देणेही चुकीचेच. शेवटी भाषेच्या शुद्धीचा प्रश्न दुय्यम ठरतो. महत्त्वाचा प्रश्न हा की लोकशाही व्यवस्थेमधला जो महत्त्वाचा घटक - सामान्य जनता - त्यांना डोळ्यासमोर ठेवून भाषेची धोरणे अमलात यायला हवीत. गावाकडचा शेतकरी , इतर व्यावसायिक या लोकांना सरकारी कागदपत्रे भरायची असतील , शरी असो की ग्रामीण , अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. बस्स. मग त्यात ऊर्दु, फारसी, इंग्रजी, संस्कृत या भाषेतले शब्द येवोत - न येवोत. एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच.

In reply to by मुक्तसुनीत

ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ....एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच. .... आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल? म्हणजे शासकिय वेगळी आणि अशासकिय वेगळी अशा दोन मराठी भाषा प्रत्येकाला आल्या पाहिजेत. शाळे पासूनच सर्वांना 'खेडवळ' भाषा शिकवावी. त्यात पुन्हा, कोकणातील खेडं वेगळं, विदर्भातील खेडं वेगळं आणि देशावरील खेडं वेगळं. कोळ्या-आगर्‍यांची मराठी वेगळी, बाल्यांची मराठी वेगळी, वसईच्या ख्रिश्चनांची मराठी वेगळी. शाळेपासून ह्या सर्व मराठी भाषा प्रत्येकाने शिकल्या पाहीजेत. त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.

In reply to by प्रभाकर पेठकर

limbutimbu 29/05/2008 - 16:31
ह ह पु वा झाली प्रभाकरपन्त! अचूक निशाणा! >>>>> त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ग्यानबाची खरी मेख तिथच हे प्रभाकरपन्त! भाषा (शुद्ध वा अशुद्ध) हे केवळ निमित्त! आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

In reply to by प्रभाकर पेठकर

विकेड बनी 29/05/2008 - 16:36
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.
जळतंय पण वळत नाही!!! =))

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्तसुनीत 29/05/2008 - 18:09
आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल? मिसळपाववर लिहीलेले प्रत्येक वाक्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक खेडुताला समजावे असा तुमचा इशारा दिसतोय. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो .

In reply to by मुक्तसुनीत

अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ह्या तुमच्याच मागणीनुसार सरकारी (शासकिय की शासकीय?) आणि मिपावरील भाषा वेगवेगळी असावी असे सूचित केले आहे. मला व्यक्तिशः मराठी भाषेत आजपर्यंत रुळलेल्या इतरभाषांतील शब्दांबद्दलही तिव्र आक्षेप नाही आणि संस्कृतातून आलेल्या शब्दाबद्दलही आक्षेप नाही. माझ्याकडून जमेल तेंव्हा जमेल तितके (मला समजणारे)शुद्ध मी लिहीतो/बोलतो. कधी 'मूड' नसला तर इतर भाषिक शब्दही वापरतो. पण तो माझा भाषिक स्वभाव नाही. हे म्हणजे रोज घरी 'सात्विक' जेवण जेवल्यावर कधी कधी कंटाळा येऊन बाहेर हॉटेलातील 'तामसी' जेवणही जेवतो. पण रोजच्या जीवनात 'सात्विक'तेचा आग्रह धरतो, पुरस्कार करतो. ही सर्व चर्चा मला तरी रुचली नाही. मुद्यांना मुद्यांनी उत्तरे देण्यापेक्षा चर्चा वैयक्तिक पातळीवर भरकटली. संबंधितांनी तशी भरकटवू दिली ह्याचे दु:ख आहे. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो . माझे मराठी १००% शुद्ध आहे असा मी दावा कधीच केलेला नाही. मिपावर 'शुद्धते'चा बाऊ केला जात नाही, शुद्धीचिकित्सक मला सापडला नाही, त्यामुळे र्‍हस्व-दीर्घच्या चुका जशा माझ्या होतात तशा इतरांच्याही होतातच. पण त्यालाही मी आक्षेप घेतलेला नाही. ह्म्म! कोणी मुद्दामहून चुकीचे मराठी लिहून वाचकांच्या वेळेचा अपव्यय करीत असेल तर त्याला जरूर आक्षेप घेतला आहे. मिपावर शुद्धिचिकित्सक सुरू केला तर तो मी आनंदाने आवर्जून वापरेन. माझे लेखन र्‍हर्स्व-दीर्ध चुकांविरहीत असेल तर मला स्वतःलाच वाचायला आवडेल. स्वान्तसुखाय म्हणतात तसे. मुद्दाम जड-जड संस्कृत शब्द जोडून मराठीला पर्यायी शब्द बनविणारे एक गंमत म्हणून असे शब्द बनवित असतात. सर्वांनी ते वापरावेच असा आग्रह नसतो. जे संस्कृतोद्भव मराठी शब्द आहेत ते समजायला, वापरायला कठीण असतील तर कोणी कितीही जंग जंग पछाडले तरीही ते शब्द वापरात येणार नाहीत. 'शासकीय' भाषेत कॉरिडरला 'छन्न विभाग' असा शब्द आहे. 'लिफ्ट' ला 'उद्वाहक' असा शब्द आहे. कोण वापरतो? पण 'वेतन' हा समजायला, वापरायला सोपा शब्द असेल तर तो फक्त संस्कृतोद्भव शब्द आहे (अस मी वरील चर्चेतून अर्थ काढला आहे) म्हणून वापरायचा नाही का? माझ्या माहिती नुसार, 'पगार' हा शब्द 'आश्रीताला खर्चासाठी दिलेली रक्कम' अशा अर्थी आहे. आपण नोकर्‍या करून वेतन मिळवितो त्याला 'पगार' म्हणून स्वतःला आश्रीत घोषित करायचे का? आपण आश्रीत असतो का? त्या पेक्षा 'वेतन' शब्दात सन्मानही आहे. असो. भाषा विषयावर माझा अभ्यास तरी बराच उथळ आहे. त्यांमुळे भाषा शास्त्रातले मोठमोठ्या संशोधकांचे दाखले मी देऊ शकत नाही. ह्याहून जास्त वाद मी घालू शकणार नाही, माझी इच्छाही नाही. लाथाळ्यांपेक्षा चांगले विचार, चांगले साहित्य वाचायला मिळावे म्हणून मी मिपावर येतो. असेच चालणार असेल तर मिपा उघडून बसण्यापेक्षा दुसरे कांही महत्त्वाचे काम करणे मी पसंद करीन. धन्यवाद.

ऋषिकेश 29/05/2008 - 17:38
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच
:P हा हा हा हा :))) =)) -('मिसळ'लेला भट बामन) ऋषिकेश
भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे. मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले :) म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते.

एका उपक्रमाची ओळख

नीलकांत ·

विसुनाना 24/04/2008 - 18:45
तात्या, सर्किट, ॐकार आणि शशांक यांचे (हे मानपत्र मिळाल्याबद्दल) अभिनंदन. आपल्या कार्यास उत्तरोत्तर यश लाभो. द्वारकानाथांनी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांचे आभार.

In reply to by स्वाती राजेश

व्यंकट 24/04/2008 - 19:31
म्हणतो. गमभन ची निर्मिती हा ह्या संप्रदायाचा पाया तर मनोगत, मिसळपावादी संस्थळांची निर्मिती हा कळस. विशेष म्हणजे एवढा वाचकवर्ग असूनही पैसे मिळवण्याचा प्रयत्न न करता, उलट आपल्या पदरीचे घालून, ह्या सर्व भगिरथांनी आपापल्यावेळात काम करून ही गंगा आंतर्जालावर आणली हे आपले लेखन साभार परत मिळवणार्‍या नवप्रतिभावंतांवर, दूर देशी रहाणार्‍या, घरच्या पदार्थांच्या चवी/रेसेपीज ला आसुसलेल्या, मराठीत लिहू बोलू पहाणार्‍यांवर मोठे उपकार आहेत. व्यंकट

विकास 24/04/2008 - 19:07
द्वारकानाथांचा हा उपक्रम पण छान आहे! मानपत्र मिळालेल्या सर्वांचेच अभिनंदन!

मराठी संवर्धनासाठी कलंत्री यांची एक उत्तम चळवळ आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा !!! तसेच आपापली कामे सांभाळून माय मराठीचा जीवनव्यवहारात अधिक सहजपणे उपयोग व्हावा यासाठी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष काम करणा-या सर्वच व ज्यांना या मानपत्राने गौरवण्यात आले आहे ते आणि आपले सर्वांचेच असलेले मित्र तात्या, सर्किट, ॐकार आणि शशांक यांचेही आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो. -दिलीप बिरुटे

कलंत्री 24/04/2008 - 20:22
प्रिय मित्रांनो, मुख्य म्हणजे हे मानपत्र नसून कृतज्ञता पत्र आहे. आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी इतके लोक, संस्था, व्यक्ति आपापल्या पध्दतीनी कार्यमग्न आहे ही खरोखर गौरवाची गोष्ट आहे. एक सामान्य माणुस म्हणून मी या सर्वाबद्दल नेहमीच कृतज्ञ राहील. आपल्याला हा उपक्रम प्रत्येक वर्षी करावयाचा असून आपल्या आजुबाजूला होत असणार्‍या उपक्रमाची माहितीची नोंद घेणे, संकलन करणे आणि मला कळविणे ही आपणा सर्वांना आग्रहाची विनंती. पूढील वर्षापासून कृतज्ञता पत्र आणि रोख रक्कम असे स्वरुप ठेवण्याचा विचार आहे. मुख्य म्हणजे असा समारंभ बाल गंधर्व मध्ये व्हावा अशी इच्छा आहे. कृपया आपणही याच्या आयोजनात, निवडसमिती मध्ये भाग घेऊ शकाल. आपल्या प्रत्येक विचाराचे स्वागत आहे. यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची अपेक्षा नाही याची कृपया नोंद घ्यावी. या उपक्रमाचा विचार कसा मनात आला याबद्दल कधीतरी. या उपक्रमाच्या रुपरेषा आखण्यात सर्वसाक्षी आणि वेदश्री यांचाही सहभाग होता याचीही नोंद घ्यावी. आणि हो, नीलकांत याच्या सहकार्याशिवाय हा उपक्रम अशक्यच होता. पत्राचा मसूदा, मराठीसाठी प्रयत्न करीत असलेल्या अनेक लोकांचे संपर्क क्रमांक त्वरीत देणे आणि माझ्या मनातील वावदूक शंकाचे योग्य परिने आणि न थकता निरसन करणे अश्या अनेक बाबी नीलकांत याने सांभाळ्ल्या. ही केवल सुरवात आहे आणि मायमराठीला आपल्या हक्क मिळावा, लोकभाषा, शिक्षणाची आणि ज्ञानभाषा म्हणून तिचा उल्लेख व्हावा हे आपल्यासर्वांचे स्वप्न आहे. असो, अगत्य असू द्यावे, आपला, द्वारकानाथ आणि सर्व सवगंडी

मैत्र 24/04/2008 - 21:28
+१ अतिशय उत्तम उपक्रम... श्री द्वारकानाथ यांचे विशेष आभार... मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे नसे आज ऐश्वर्य त्या माउलीला यशाची पुढे दिव्य आशा दिसे....

श्री. तात्या आणि त्यांच्या कंपनीचे जोरदार अभिनंदन. श्री. द्वारकानाथ कलंत्री, आपल्या ह्या स्तुत्य उपक्रमास आमच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा..!

ओंकार जोशींचे 'गमभन' निर्माण करून आम्हाला मराठीत लिहायला उद्युक्त केल्याबद्दल आणि तात्या अभ्यंकरांचे लिहायला हक्काचे स्थळ उपलब्ध करून दिल्याबद्द्ल विशेष अभिनंदन!! बाकीचे आमच्या ओळखीचे नाहीत, तरी त्यांनी केलेल्या कार्याबद्द्ल त्यांचेही अभिनंदन!! -पिवळा डांबिस

इनोबा म्हणे 25/04/2008 - 01:45
हा स्तूत्य उपक्रम सुरु केल्याबद्दल सर्वप्रथम श्री. द्वारकानाथ कलंत्री यांना एक मराठी माणूस व मिपाकर या नात्याने हे कृतज्ञता पत्र. द्वारकानाथ आपला हा उपक्रम फारच छान आहे.खरेतर मराठी आणि महाराष्ट्रासाठी योगदान देणार्‍यांना प्रोत्साहन देण्याचा अथवा त्या कार्यासाठी कृइतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रमच सर्वप्रथम कौतूकास पात्र आहे.तेव्हा आमच्या ह्या दोन शब्दांचा 'कृतज्ञता पत्र' म्हणून स्विकार करा. आपल्याकडून अशाच उत्तमोत्तम उपक्रमांची अपेक्षा करतो. आपल्या भावी उपक्रमांस शुभेच्छा! आपल्या भावी उपक्रमांमध्ये आमची मदत लागल्यास अवश्य कळवा.आमचा भ्रमणध्वनी क्र.: ९३७२-९३७२-१८ नीलकांत यांना कृतज्ञता पत्र नीलकांता पडद्यामागे राहून तू आम्हा मिपाकरांसाठी जे काही करतोयस त्यासाठी तुझे कौतूक करण्याची आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आयती चालून आली आहे.आम्हा मिपाकरांसाठी तू जितका झटतो आहेस त्याबद्दल तू कौतूकास पात्र आहेस. धन्यवाद! कृतज्ञता पत्र मिळालेल्या इतर सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

विसुनाना 24/04/2008 - 18:45
तात्या, सर्किट, ॐकार आणि शशांक यांचे (हे मानपत्र मिळाल्याबद्दल) अभिनंदन. आपल्या कार्यास उत्तरोत्तर यश लाभो. द्वारकानाथांनी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांचे आभार.

In reply to by स्वाती राजेश

व्यंकट 24/04/2008 - 19:31
म्हणतो. गमभन ची निर्मिती हा ह्या संप्रदायाचा पाया तर मनोगत, मिसळपावादी संस्थळांची निर्मिती हा कळस. विशेष म्हणजे एवढा वाचकवर्ग असूनही पैसे मिळवण्याचा प्रयत्न न करता, उलट आपल्या पदरीचे घालून, ह्या सर्व भगिरथांनी आपापल्यावेळात काम करून ही गंगा आंतर्जालावर आणली हे आपले लेखन साभार परत मिळवणार्‍या नवप्रतिभावंतांवर, दूर देशी रहाणार्‍या, घरच्या पदार्थांच्या चवी/रेसेपीज ला आसुसलेल्या, मराठीत लिहू बोलू पहाणार्‍यांवर मोठे उपकार आहेत. व्यंकट

विकास 24/04/2008 - 19:07
द्वारकानाथांचा हा उपक्रम पण छान आहे! मानपत्र मिळालेल्या सर्वांचेच अभिनंदन!

मराठी संवर्धनासाठी कलंत्री यांची एक उत्तम चळवळ आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा !!! तसेच आपापली कामे सांभाळून माय मराठीचा जीवनव्यवहारात अधिक सहजपणे उपयोग व्हावा यासाठी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष काम करणा-या सर्वच व ज्यांना या मानपत्राने गौरवण्यात आले आहे ते आणि आपले सर्वांचेच असलेले मित्र तात्या, सर्किट, ॐकार आणि शशांक यांचेही आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो. -दिलीप बिरुटे

कलंत्री 24/04/2008 - 20:22
प्रिय मित्रांनो, मुख्य म्हणजे हे मानपत्र नसून कृतज्ञता पत्र आहे. आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी इतके लोक, संस्था, व्यक्ति आपापल्या पध्दतीनी कार्यमग्न आहे ही खरोखर गौरवाची गोष्ट आहे. एक सामान्य माणुस म्हणून मी या सर्वाबद्दल नेहमीच कृतज्ञ राहील. आपल्याला हा उपक्रम प्रत्येक वर्षी करावयाचा असून आपल्या आजुबाजूला होत असणार्‍या उपक्रमाची माहितीची नोंद घेणे, संकलन करणे आणि मला कळविणे ही आपणा सर्वांना आग्रहाची विनंती. पूढील वर्षापासून कृतज्ञता पत्र आणि रोख रक्कम असे स्वरुप ठेवण्याचा विचार आहे. मुख्य म्हणजे असा समारंभ बाल गंधर्व मध्ये व्हावा अशी इच्छा आहे. कृपया आपणही याच्या आयोजनात, निवडसमिती मध्ये भाग घेऊ शकाल. आपल्या प्रत्येक विचाराचे स्वागत आहे. यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची अपेक्षा नाही याची कृपया नोंद घ्यावी. या उपक्रमाचा विचार कसा मनात आला याबद्दल कधीतरी. या उपक्रमाच्या रुपरेषा आखण्यात सर्वसाक्षी आणि वेदश्री यांचाही सहभाग होता याचीही नोंद घ्यावी. आणि हो, नीलकांत याच्या सहकार्याशिवाय हा उपक्रम अशक्यच होता. पत्राचा मसूदा, मराठीसाठी प्रयत्न करीत असलेल्या अनेक लोकांचे संपर्क क्रमांक त्वरीत देणे आणि माझ्या मनातील वावदूक शंकाचे योग्य परिने आणि न थकता निरसन करणे अश्या अनेक बाबी नीलकांत याने सांभाळ्ल्या. ही केवल सुरवात आहे आणि मायमराठीला आपल्या हक्क मिळावा, लोकभाषा, शिक्षणाची आणि ज्ञानभाषा म्हणून तिचा उल्लेख व्हावा हे आपल्यासर्वांचे स्वप्न आहे. असो, अगत्य असू द्यावे, आपला, द्वारकानाथ आणि सर्व सवगंडी

मैत्र 24/04/2008 - 21:28
+१ अतिशय उत्तम उपक्रम... श्री द्वारकानाथ यांचे विशेष आभार... मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे नसे आज ऐश्वर्य त्या माउलीला यशाची पुढे दिव्य आशा दिसे....

श्री. तात्या आणि त्यांच्या कंपनीचे जोरदार अभिनंदन. श्री. द्वारकानाथ कलंत्री, आपल्या ह्या स्तुत्य उपक्रमास आमच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा..!

ओंकार जोशींचे 'गमभन' निर्माण करून आम्हाला मराठीत लिहायला उद्युक्त केल्याबद्दल आणि तात्या अभ्यंकरांचे लिहायला हक्काचे स्थळ उपलब्ध करून दिल्याबद्द्ल विशेष अभिनंदन!! बाकीचे आमच्या ओळखीचे नाहीत, तरी त्यांनी केलेल्या कार्याबद्द्ल त्यांचेही अभिनंदन!! -पिवळा डांबिस

इनोबा म्हणे 25/04/2008 - 01:45
हा स्तूत्य उपक्रम सुरु केल्याबद्दल सर्वप्रथम श्री. द्वारकानाथ कलंत्री यांना एक मराठी माणूस व मिपाकर या नात्याने हे कृतज्ञता पत्र. द्वारकानाथ आपला हा उपक्रम फारच छान आहे.खरेतर मराठी आणि महाराष्ट्रासाठी योगदान देणार्‍यांना प्रोत्साहन देण्याचा अथवा त्या कार्यासाठी कृइतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रमच सर्वप्रथम कौतूकास पात्र आहे.तेव्हा आमच्या ह्या दोन शब्दांचा 'कृतज्ञता पत्र' म्हणून स्विकार करा. आपल्याकडून अशाच उत्तमोत्तम उपक्रमांची अपेक्षा करतो. आपल्या भावी उपक्रमांस शुभेच्छा! आपल्या भावी उपक्रमांमध्ये आमची मदत लागल्यास अवश्य कळवा.आमचा भ्रमणध्वनी क्र.: ९३७२-९३७२-१८ नीलकांत यांना कृतज्ञता पत्र नीलकांता पडद्यामागे राहून तू आम्हा मिपाकरांसाठी जे काही करतोयस त्यासाठी तुझे कौतूक करण्याची आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आयती चालून आली आहे.आम्हा मिपाकरांसाठी तू जितका झटतो आहेस त्याबद्दल तू कौतूकास पात्र आहेस. धन्यवाद! कृतज्ञता पत्र मिळालेल्या इतर सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
लेखनविषय:
माय मराठीच्या हितसंवर्धनासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पातळींवर काम करतांना दिसत आहेत. कुणी संस्था काढतं, तर कुणी व्यक्तीगत पातळीवर काम करतं. आपापल्या कार्यक्षेत्रात काम करतांना सोबतच हे मराठीचं काम करणारे हे लोक. कुणाकडूनही कसलीच अपेक्षा न ठेवता मौन साधकासारखे यांचे काम आहे. अश्या लोकांपैकी काही लोकांना एक त्यांच्या कामाची दखल घेतल्याची जाणीव करून देण्यासाठी मराठीसाठी काम करणारे जेष्ठ कार्यकर्ते श्री द्वारकानाथ कलंत्री यांनी अश्या लोकांना मानपत्र देण्याचे ठरवले. मानपत्र सोबतच इतरही अश्याच वेगवेगळ्या उपक्रमी लोकांची माहिती देण्यात आलेली आहे. जेणे करून अश्या लोकांची माहिती समाजाला व्हावी.

भाषा आणि प्रमाण

नीलकांत ·

प्रमोद देव 20/04/2008 - 13:27
नीलकांत अगदी सुंदर,स्वच्छ आणि पटेल अशा भाषेत लिहिलेला हा लेख तुझ्या अभ्यासूपणाची तसेच नम्र, तरीही कणखरपणाची जाणिव करून देतोय.(मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास,कठीण वज्रास भेदू ऐसे... च्या चालीवर) आवडले तुझे विचार. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे...

In reply to by भडकमकर मास्तर

मदनबाण 20/04/2008 - 22:21
उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे... मी सुद्धा १००% सहमत आहे. (करा व्यक्त स्वःला मराठी मधेच )असे म्हणणारा..... मदनबाण

तुमच्या परिश्रमांचे. लेख वाचण्याइतका वेळ आत्ता नही मिळाला आणि लेखाची लांबी पाहून दमलेच. तसाही माझा या विषयात रस जरा कमीच आहे पण एखादी पिंक टाकायला काही हरकत नाही कधीतरी, काय? टाईम मॅनेज कसा करायचा या चिंतेत सध्या भरपूर टाईमपास करणारी, ऐश्वर्या

विदेश 20/04/2008 - 16:44
प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. अगदी मनातलं टंकलात!

ॐकार 20/04/2008 - 17:08
इंग्रजीचे स्पेलिंग आणि मराठीतील शुद्धाशुद्धता यात बराच फरक आहे. नॉट म्हटले तर इंग्रजीत काय लिहाल? naught? not? तिथे स्पेलिंग्ज बदलल्याने अर्थ बदलतो. मराठीत अर्थावरून कोणी हरकत घेतली तर एकवेळ समजू शकते. इंग्रजीत स्पेलिंग बरोबर लिहावे लागते म्हणून मराठीला मात्र त्या पंक्तीला बसवू नये. 'न्हाय' म्हणण्यातला दमदारपणा जसा सूटाबुटातल्या 'नाही'त नाही तसाच 'नाही' शब्दातला शिष्टपणा मुंडासे बांधलेल्या न्हायमध्ये न्हाय. मात्र, भावाच्या आधी घरी पोचल्यावर 'म्ह्या अदुगर आली' म्हणत भावाला चिडवणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातला आनंद हा काही 'मी अगोदर आले' म्हणणार्‍या बहिणीच्या डोळ्यातल्या आनंदापेक्षा वेगळा नक्कीच नाही. मुंबई-पुण्यात हरवलेली वस्तू भेटत नसते तर सापडत/मिळत असते. तीच वस्तू नागपूरात मात्र भेटू शकते. तुम्ही नाशकात जा किंवा नाशिकला, द्राक्ष जर आंबट असतील तर ती आंबटच राहतील. असे फरक लिहिण्या-बोलण्यात दोन्हीकडे येतात. पण म्हणून त्यातले एकच एक बरोबर आहे हे म्हणणे म्हणजे दुराग्रह आहे. आपल्या घरी जे बोललं जातं ते बरोबर हा साधा व्यवहार आपण कळत नकळत मानतोच. जे शाळेत जसं शिकलो ते घरी पडताळून पाहतो. आपणच भाषेची चौकट बनवत असतो; आपल्यापुरती. आणि इथेच मर्यादा येतात. आपण जे लिहितो-बोलतो-वाचतो फक्त ते आणि तेच शुद्ध म्हणायच्या आधी दुसर्‍याच्या घरात जाऊन एकदा 'चहा घेऊन' किंवा 'चहा मारून' किंवा नुसतं 'चहाला' जाऊन या. चहा सगळ्यांकडेच मिळेल, पण फक्त 'अमृततुल्य'चा चहा प्रमाण मानणार काय ( इथे हशा मिळेल अशी आमची खात्री आहे ;) )? आम्ही बिनसाखरेचा पितो म्हणून तुम्हाला तो आवडेलच ह्याची शाश्वती नाही, आणि तुम्ही पाणचट(पांचट) चहा आनंदाने पित असाल मात्र आम्हाला तो वंगाळही लागू शकतो. ह्या 'आम्ही' आणि 'तुम्ही'चे 'आपण' व्हायला दोन्ही बाजू तितक्या लवचिक असायला हव्यात.

In reply to by ॐकार

विजुभाऊ 22/04/2008 - 10:01
प्रमाण मर्‍हाटी म्हणजे ती पुन्या ३० मदे बोल्ली जाते ती त नव्हं? म्या आसच बोल्लनार.ती माजी मायची भाषा हाये.चान्ग्लं झेकपॅक लुगाडं नेस्यत न्हाय ,दिसायला आक्षी झैरातीतल्या बाईवानी दिसत न्हाय ;म्हनुन माजी माय काय वंगाळ म्हनायची व्हय? आता मना सांगा भौ तुमच्या प्रमाण मर्‍हाटीत १)"व्हतं"म्हननं हे चूक आन "नव्हतं" हे म्हननं बरुबर हे कसं काय? २) पास हा शब्द इंग्रजी आन नापास तेव्हढा देशी असं कसं काय? इंग्रजीत अनेक बोलीभाषा आहेत. जसे कॉकने , अमेरिकन , स्कॉटीश , तशा त्या प्रत्येक भाषेत असतात. मराठीमध्ये सुधा आहेत. प्रत्येकबोली भाषेचे सौन्दर्य वेगळे असते त्यामुळे एका प्रमाण भाषेचा आग्रह हे चूकच. ॐकारभौ तुमी लिवेले ते लै झ्याक केलत बगा. शुद्धलेखनाचे नियम पाळायला हवेत पण त्याचा अर्थ अस नव्हे की बोली भाषाना हिणकस ठरवुन त्याना हद्दपार करणे. अन्यथा बहिणाबाई वगैरेंसारखे हिरे उरणारच नाहीत. मराठीचा सार्थ अभिमान बाळगणारा : गुज्जुभाऊ विजुभाऊ

अविनाश ओगले 20/04/2008 - 20:45
नीलकांतजी, आपला ले़ख उत्तम. आपल्या ले़खातील "चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य." या विधानासंदर्भात काही नवीन संशाधनाची माहिती नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती इथे वाचा

नीलकांत 20/04/2008 - 21:04
अविनाशजी धन्यवाद. ही माहिती नवीन आहे. तसे कोकणातील उल्लेख या आधी केवळ ऐकून माहिती होता. अद्ययावत झालेला - नीलकांत

व्यंकट 20/04/2008 - 22:07
नामदेव ढसाळांनी १-१.५ वर्षापूर्वी सर्व काही समष्टीसाठी ह्या सामनातील लेखमालेत प्रस्तुत विषयावर एक शोधपूर्ण निबंध लिहीला होता.. व्यंकट

प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. +१ लेख आवडला हेवेसांनल. स्वाती

हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल. अगदी खरे! नीलकांतरावांनी खूपच छान लेख लिहिला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...! मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. ह्या वाक्यास मिपा व्यवस्थापनाची पूर्ण सहमती आहे! येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. नीलकांतरावांशी पुन्हा एकदा सहमत! आणि असा अट्टाहास कुणी करू पाहिल तर त्याचे लेखन तर उडवून लावले जाईलच, शिवाय त्याचे सभसदत्वही रद्द केले जाईल, मग भले सभासदांवाचून मिसळपाव बंद पडले तरी बेहत्तर! अशीच या बाबतीत व्यवस्थपनाची भूमिका राहील, हे आम्ही व्यवस्थापनातर्फे सांगू इच्छितो! अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. सहमत आहे! मिपावर प्रमाण लादण्याला मिपा व्यवस्थापनाचा प्रखर विरोधच राहील! प्रमाणभाषेचा आग्रह असणार्‍यांनी आपला आग्रह आपल्याजवळच ठेवावा! तो त्यांनी मिसळपाववर करू नये! खरं तर प्रमाणभाषेची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍यांसाठी मिसळपाव हे संकेतस्थळ नाही. सबब, त्यांनी इथे येऊ नये हेच उत्तम! -- जनरल डायर.

चित्रा 22/04/2008 - 08:14
प्रथम लेख अतिशय वाचनीय आहे आणि विचार जवळजवळ सर्वच पटले. तरी अंशतः सहमती अशासाठी की, बोली भाषा एखाद्याची बरोबर किंवा चूक असे मानण्याचा अधिकार कोणालाच नसावा हे मान्य. पण लेखनाचे काही एका प्रमाणात प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) करणे हे आवश्यक मात्र नक्की आहे, नाहीतर लेखनाचा अर्थ न कळण्यापलिकडे जाईल असे वाटते. भाषाशास्त्रात फोनेटिक्स किंवा उच्चारशास्त्र हा एक महत्त्वाचा अभ्यास करावा लागतो. लिखित भाषा सर्वत्र समजली जावी अशी अपेक्षा असल्यास काहीएक उच्चार हे अभ्यासाच्या परिघात आणावे लागतील (कारण तसे ते आत्ता नाहीत म्हणून) आणि भाषेचे प्रमाणीकरण करताना त्यात सामावून घ्यावे लागतील. ते सरळसोट वापरात आणून (म्हणजे ब्रूट फोर्सने) करण्याचा पायंडा पाडणे सर्वस्वी बरोबरच असेल असे मला वाटत नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागातील लोक हे शेवटच्या "र" चा उच्चार करत नाहीत ( जसे "कार" मधला र). पण लिहीताना स्पेलिंग बरोबर एकाच पद्धतीने लिहीले जाते. बोली भाषेची वैशिष्ट्ये जपली नक्कीच गेली पाहिजेत पण लिहीताना मात्र प्रमाणीकरणाचा वापर शक्य तेवढा व्हावा. त्या प्रमाणीकरणाची सीमा विस्तृत करावी ही अपेक्षा मात्र योग्य आहे आणि तशी करण्यास कोणाचा नकार नसावा. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे पूर्णपणे मान्य.

In reply to by चित्रा

ॐकार 22/04/2008 - 09:11
कार मधल्या र च उच्चार न करणे पण लिहिताना मात्र 'आर्' लिहिणे हे उदाहरण म्हणून ह्या अनुषंगाने पटत नाही. इंग्रजी उच्चारानुसार लिहिली जाणारी भाषा नाहीच. स्पेलिंगचे घोळ होतात म्हणूनच तिथे प्रमाणीकरण गरजेचे आहे. एखाद्या उच्चार करता येण्याजोग्या शब्दाचे स्पेलिंग पाठ करायला लागावे यासारखे दुर्दैव मराठीच्या नशिबी नक्कीच नाही. किंबहुना (काय शब्द आहे!) क चा उच्चार इंग्रजीत c,q,k,ch कशानेही करता येईल. असे असल्याने तिथे प्रमाणीकरण हवेच. मराठीत क्वार्टर (क्वॉटअ), कार(क्खाअ), कॅन , काइट् (काइच्ट), ऑक्शन लिहा. तिथे 'क' म्हणजे 'क'च. ह्या वादात इंग्रजीला प्रमाण (रेफ़रन्स) मानणे नक्कीच सयुक्तिक नाही. भाषिक तुलनेचं (तुलनेचे असं लिहिलं की कसे पुस्तकी वाटते हे वेगळे सांगायला नको!) आणखी उदाहरण द्यायचं झालं तर थाई भाषेत काही वर्णांचे चार उच्चार आहेत उदा. प् , प , पअ ( लो टोन), प? (हाय टोन). हे उच्चार लिहायला त्या भाषेत वेगळे वर्ण आणि वर्णसंकर(!) आहेत. पा?क (का? सारखे पा? असे विचारा आणि मग क म्हणा) आणि पाक (आपला साखरेचा पाक असतो तसा उच्चार) यांचे लेखन आणि अर्थ वेगळे. त्यांनी उच्चारांच्यादृष्टीने समृद्ध(!) अशी मराठी भाषा/ देवनागरी लिपी प्रमाण मानावी का? मराठीत किमान असे फारसे प्रकार आढळत नाहीत (क्ष = क्श , ज्ञ = द्न्य, ष/श अशा कुरापती काढायला वाव आहे). प्रश्न उरतो तो समोच्चारी वर्णांचा जसे ट-त , द-ड, ण-न, ळ-ल; र्‍हस्व दीर्घाचा आणि प्रत्ययांचा. हा प्रश्नही (प्रश्ण का नाही? ) काही ठरावीक शब्दांपुरताच आहे. (बाकी सामान्य व्याकरण जसे वचन , लिंग, काळ इ. इ. मात्र प्रमाण आहेत हे नाकारता येत नाही). केवळ अशा काही शब्दभेदांमुळे जर मराठी बाटणार असेल तर ती लोकभाषा कधीच होणार नाही. अवांतरः सारेगमप मधल्या पल्लवी जोशीने पुरुषाला स्पर्धक आणि स्त्रीलाही स्पर्धक म्हणणे खटकते का कोणाला? गायक-गायिका, लेखक-लेखिका सारखे स्पर्धक-स्पर्धिका वगैरे का नाही असा प्रश्न पडला का कोणाला? :)

In reply to by ॐकार

चतुरंग 22/04/2008 - 20:22
तो स्पर्धक - पुल्लिंग, ती स्पर्धक - स्त्रिलिंग, ते स्पर्धक - अनेकवचन. ह्यात मूळ 'स्पर्धक' हा शब्द उदासीन आहे असे वाटते. असेच आणखी एक उदाहरण 'वादक' (वादिका?) - तो वादक, ती वादक, ते वादक. जाणकार आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील. चतुरंग

In reply to by मनस्वी

इनोबा म्हणे 22/04/2008 - 11:04
लई छान लिवलंय.. यक नंबर. ह्येच म्हंतू. च्यामारी परमाण का काय ते आपल्याला नाय कळत. आपल्याला पायजे तसंच लिवनार आपण. इरोध करणारे गेले खड्ड्यात. फारच मस्त लेख... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा, प्रामाण्य सांभाळले नाही तर तुम्ही ज्या भाषेत इथे संवाद साधू चाहता ती भाषाही गाळात जाते हो. तुम्ही 'निवड'पूर्वक बोली अवश्य वापरा. विलासरावजी "निचितपने" ह्याचे अनुमोदन करतील. मात्र लेखनात (संवादलेखन, संबोधन, वगळता) प्रमाण भाषा वापरा. त्याचे फायदे अनेक आहेत. हेच ह्या संकेतस्थळ सांभाळणार्‍याचे मत झालेले ह्या लेखातून दिसून येते. अर्थात् ज्या स्वातंत्र्याखातर तुम्ही इथे वावरता त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे निर्विवाद.

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.
सहमत आहे. नीलकांता असेच चांगले लेख येवो. एका भाषा शुद्धीचा आग्रह असणार्‍या लेखिकेकडे एकदा गेलो होतो. तिथे दुरदर्शन वर एक कार्यक्रम लागला होता. चर्चा असावी. त्यात एक प्राध्यापक आनि पानि लोनि असे उच्चार करत होता त्या कडे त्या विदुषीने माझे लक्ष वेधले. मी त्यांना एवढेच म्हणालो माझे लक्ष आशया कडे होते. किती वास्तव तो सांगत होता याकडे होतं. बलुत या पुस्तकाच्या मुद्रित शोधनात असंख्य 'चुका' मुद्रित शोधका ने दाखवल्या होत्या असे ऐकून आहे. प्रकाश घाटपांडे

अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'. >> नीलकांत, विचारपूर्वक लिहीलेल्या विचारप्रवर्तक लेखाखातर मन:पूर्वक धन्यवाद. प्रमाणभाषा असण्याचे अनेक फायदे असतात. उदाहरणार्थ वरील वाक्यात चुकून 'दर्पन' लिहील्या गेले असावे असा समज होण्याची शक्यता आहे. जर खरोखरीचे ते 'दर्पन'च असेल आणि त्याचा यथार्थ बोध व्हावा असे वाटत असेल तर, एरव्ही लिहीतांना प्रमाण भाषेत 'दर्पण' लिहीणे गरजेचे आहे. मग, प्रमाणभाषेत लिखाण केलेले आहे आणि जे आहे ते बिनचूक आहे अशी खात्री दिल्यास योग्य तो बोध निस्संदिग्धपणे मिळू शकतो. मात्र, संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता लेखात व्यवस्थित प्रकटली आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

नीलकांत 23/04/2008 - 18:32
मराठीतील पहिले नियतकालीक 'दर्पण' आहे. गोळेसर, माझा प्रमाणभाषेला विरोध नाहिये. विरोध आहे तो त्या प्रमाणाचा अतिआग्रहाला. अहो, मला नाही जमत १००% प्रमाण लिहायला. मग का मी लिहूच नये की काय? केवळ प्रमाण हीच एकमेव भाषा आहे असं नाही, आणि प्रमाणभाषेत झालेलीच केवळ अभिव्यक्ती बाकीचा सगळा दुय्यम गावठी माल असंही काही नाही. प्रमाण असावी, ती सर्वसंमत,सर्वमान्य असावी, त्यामुळे अर्थाबाबत संदेह उरत नाही. हे खरं आहे. या बाबत कुणाचंही दुमत नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

दर्पण हे पहीले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारीते साठी दर्पण पुरस्काल दिला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ गाव पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधूदूर्ग. तेथे असलेल्या पोंभुर्ले गावच्या ग्रामदेवतेचे(जांभई देवी)पुजारी म्हणूने त्याना जांभेकर हे आडनाव प्राप्त झाले. आजही पोंभुर्ले गावी त्यांच्या जन्मघरी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथे जवळच असलेले जांभई देवीचे मंदिर हे कोकणातील काष्ठशिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. पुण्याचे पेशवे

बॅटमॅन 07/06/2012 - 18:47
चेंगट्पना न कर्ता हा लेख वर आन्ल्याबद्दल श्री श्री नाना चेंगट यांचे त्रिवार हाबिणंदण!!! लै गरज व्हती या अशा लेखाची!! लै माजलेत प्रमाण-ब्रिगेडी अलिकडे ;)

In reply to by सुनील

मृगनयनी 07/06/2012 - 22:06
अरे वा वा!.. चान चान!...एकन्दर ह्या धाग्यास वर खेचण्याचे काम 'समिती' कडूनच चालू आहे तर!!!.. गुड.. कीप इट अप!!! ___________________________________ मूळचे उत्तर भारतीय असणार्‍या कृष्णाजीराव यादवां'ची राजधानी "द्वारका" गुजराथमध्ये असताना.. त्यांनी महाराश्ट्रातल्या ( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! ..

In reply to by मृगनयनी

बॅटमॅन 07/06/2012 - 22:11
महाराश्ट्रातल्या....( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! .. आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.

In reply to by बॅटमॅन

मृगनयनी 08/06/2012 - 09:56
आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.
:| :| :| .. इथे निषेध नोन्दवण्यासारखं काय आहे ? .. माझ्या "त्या" वाक्याचा अर्थ कळला नाही का तुम्हाला? ... मुळात वरच्या दोन प्रतिसादांमध्ये कृष्णाला "यादव" हे आडनाव प्रदान करणारे लोक्स वेगळे आहेत!... (सम्पादकही आहेत !) (पक्षी: मी नाही) ... आणि कृष्णाच्या पहिल्या पत्नीचे नाव- 'रुक्मिणी' असे असून तिचे माहेर विदर्भातले होते... अश्याप्रकारे कृष्णपत्नी'मुळे यादवांचा महाराष्ट्राशी संबंध जोडला गेलेला आहे... आणि "यादवांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे" हे राज ठाकरेंचे विधान आहे!!!... त्यामुळे मला नाही वाटत की यामुळे इथे मिसळपाव'वरती फार मोठा गदारोळ निर्माण व्हावा!... :| टीप :- सरळ साध्या वाक्यांचे अर्थ समजून घेण्यात कृपया चूक करू नये...... कुणीही

In reply to by मृगनयनी

नाना चेंगट 08/06/2012 - 13:22
एक प्रश्नः- हा लेख "नाना चेंगट" यांनी (किन्वा यांच्या करवी) इतक्या दिवसांनी वर काढण्यामागचा नक्की हेतू कळू शकेल का?... तुमच्या प्रश्न विचारण्यामागचा हेतु कळू शकेल काय? :)

प्रमोद देव 20/04/2008 - 13:27
नीलकांत अगदी सुंदर,स्वच्छ आणि पटेल अशा भाषेत लिहिलेला हा लेख तुझ्या अभ्यासूपणाची तसेच नम्र, तरीही कणखरपणाची जाणिव करून देतोय.(मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास,कठीण वज्रास भेदू ऐसे... च्या चालीवर) आवडले तुझे विचार. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे...

In reply to by भडकमकर मास्तर

मदनबाण 20/04/2008 - 22:21
उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे... मी सुद्धा १००% सहमत आहे. (करा व्यक्त स्वःला मराठी मधेच )असे म्हणणारा..... मदनबाण

तुमच्या परिश्रमांचे. लेख वाचण्याइतका वेळ आत्ता नही मिळाला आणि लेखाची लांबी पाहून दमलेच. तसाही माझा या विषयात रस जरा कमीच आहे पण एखादी पिंक टाकायला काही हरकत नाही कधीतरी, काय? टाईम मॅनेज कसा करायचा या चिंतेत सध्या भरपूर टाईमपास करणारी, ऐश्वर्या

विदेश 20/04/2008 - 16:44
प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. अगदी मनातलं टंकलात!

ॐकार 20/04/2008 - 17:08
इंग्रजीचे स्पेलिंग आणि मराठीतील शुद्धाशुद्धता यात बराच फरक आहे. नॉट म्हटले तर इंग्रजीत काय लिहाल? naught? not? तिथे स्पेलिंग्ज बदलल्याने अर्थ बदलतो. मराठीत अर्थावरून कोणी हरकत घेतली तर एकवेळ समजू शकते. इंग्रजीत स्पेलिंग बरोबर लिहावे लागते म्हणून मराठीला मात्र त्या पंक्तीला बसवू नये. 'न्हाय' म्हणण्यातला दमदारपणा जसा सूटाबुटातल्या 'नाही'त नाही तसाच 'नाही' शब्दातला शिष्टपणा मुंडासे बांधलेल्या न्हायमध्ये न्हाय. मात्र, भावाच्या आधी घरी पोचल्यावर 'म्ह्या अदुगर आली' म्हणत भावाला चिडवणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातला आनंद हा काही 'मी अगोदर आले' म्हणणार्‍या बहिणीच्या डोळ्यातल्या आनंदापेक्षा वेगळा नक्कीच नाही. मुंबई-पुण्यात हरवलेली वस्तू भेटत नसते तर सापडत/मिळत असते. तीच वस्तू नागपूरात मात्र भेटू शकते. तुम्ही नाशकात जा किंवा नाशिकला, द्राक्ष जर आंबट असतील तर ती आंबटच राहतील. असे फरक लिहिण्या-बोलण्यात दोन्हीकडे येतात. पण म्हणून त्यातले एकच एक बरोबर आहे हे म्हणणे म्हणजे दुराग्रह आहे. आपल्या घरी जे बोललं जातं ते बरोबर हा साधा व्यवहार आपण कळत नकळत मानतोच. जे शाळेत जसं शिकलो ते घरी पडताळून पाहतो. आपणच भाषेची चौकट बनवत असतो; आपल्यापुरती. आणि इथेच मर्यादा येतात. आपण जे लिहितो-बोलतो-वाचतो फक्त ते आणि तेच शुद्ध म्हणायच्या आधी दुसर्‍याच्या घरात जाऊन एकदा 'चहा घेऊन' किंवा 'चहा मारून' किंवा नुसतं 'चहाला' जाऊन या. चहा सगळ्यांकडेच मिळेल, पण फक्त 'अमृततुल्य'चा चहा प्रमाण मानणार काय ( इथे हशा मिळेल अशी आमची खात्री आहे ;) )? आम्ही बिनसाखरेचा पितो म्हणून तुम्हाला तो आवडेलच ह्याची शाश्वती नाही, आणि तुम्ही पाणचट(पांचट) चहा आनंदाने पित असाल मात्र आम्हाला तो वंगाळही लागू शकतो. ह्या 'आम्ही' आणि 'तुम्ही'चे 'आपण' व्हायला दोन्ही बाजू तितक्या लवचिक असायला हव्यात.

In reply to by ॐकार

विजुभाऊ 22/04/2008 - 10:01
प्रमाण मर्‍हाटी म्हणजे ती पुन्या ३० मदे बोल्ली जाते ती त नव्हं? म्या आसच बोल्लनार.ती माजी मायची भाषा हाये.चान्ग्लं झेकपॅक लुगाडं नेस्यत न्हाय ,दिसायला आक्षी झैरातीतल्या बाईवानी दिसत न्हाय ;म्हनुन माजी माय काय वंगाळ म्हनायची व्हय? आता मना सांगा भौ तुमच्या प्रमाण मर्‍हाटीत १)"व्हतं"म्हननं हे चूक आन "नव्हतं" हे म्हननं बरुबर हे कसं काय? २) पास हा शब्द इंग्रजी आन नापास तेव्हढा देशी असं कसं काय? इंग्रजीत अनेक बोलीभाषा आहेत. जसे कॉकने , अमेरिकन , स्कॉटीश , तशा त्या प्रत्येक भाषेत असतात. मराठीमध्ये सुधा आहेत. प्रत्येकबोली भाषेचे सौन्दर्य वेगळे असते त्यामुळे एका प्रमाण भाषेचा आग्रह हे चूकच. ॐकारभौ तुमी लिवेले ते लै झ्याक केलत बगा. शुद्धलेखनाचे नियम पाळायला हवेत पण त्याचा अर्थ अस नव्हे की बोली भाषाना हिणकस ठरवुन त्याना हद्दपार करणे. अन्यथा बहिणाबाई वगैरेंसारखे हिरे उरणारच नाहीत. मराठीचा सार्थ अभिमान बाळगणारा : गुज्जुभाऊ विजुभाऊ

अविनाश ओगले 20/04/2008 - 20:45
नीलकांतजी, आपला ले़ख उत्तम. आपल्या ले़खातील "चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य." या विधानासंदर्भात काही नवीन संशाधनाची माहिती नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती इथे वाचा

नीलकांत 20/04/2008 - 21:04
अविनाशजी धन्यवाद. ही माहिती नवीन आहे. तसे कोकणातील उल्लेख या आधी केवळ ऐकून माहिती होता. अद्ययावत झालेला - नीलकांत

व्यंकट 20/04/2008 - 22:07
नामदेव ढसाळांनी १-१.५ वर्षापूर्वी सर्व काही समष्टीसाठी ह्या सामनातील लेखमालेत प्रस्तुत विषयावर एक शोधपूर्ण निबंध लिहीला होता.. व्यंकट

प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. +१ लेख आवडला हेवेसांनल. स्वाती

हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल. अगदी खरे! नीलकांतरावांनी खूपच छान लेख लिहिला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...! मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. ह्या वाक्यास मिपा व्यवस्थापनाची पूर्ण सहमती आहे! येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. नीलकांतरावांशी पुन्हा एकदा सहमत! आणि असा अट्टाहास कुणी करू पाहिल तर त्याचे लेखन तर उडवून लावले जाईलच, शिवाय त्याचे सभसदत्वही रद्द केले जाईल, मग भले सभासदांवाचून मिसळपाव बंद पडले तरी बेहत्तर! अशीच या बाबतीत व्यवस्थपनाची भूमिका राहील, हे आम्ही व्यवस्थापनातर्फे सांगू इच्छितो! अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. सहमत आहे! मिपावर प्रमाण लादण्याला मिपा व्यवस्थापनाचा प्रखर विरोधच राहील! प्रमाणभाषेचा आग्रह असणार्‍यांनी आपला आग्रह आपल्याजवळच ठेवावा! तो त्यांनी मिसळपाववर करू नये! खरं तर प्रमाणभाषेची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍यांसाठी मिसळपाव हे संकेतस्थळ नाही. सबब, त्यांनी इथे येऊ नये हेच उत्तम! -- जनरल डायर.

चित्रा 22/04/2008 - 08:14
प्रथम लेख अतिशय वाचनीय आहे आणि विचार जवळजवळ सर्वच पटले. तरी अंशतः सहमती अशासाठी की, बोली भाषा एखाद्याची बरोबर किंवा चूक असे मानण्याचा अधिकार कोणालाच नसावा हे मान्य. पण लेखनाचे काही एका प्रमाणात प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) करणे हे आवश्यक मात्र नक्की आहे, नाहीतर लेखनाचा अर्थ न कळण्यापलिकडे जाईल असे वाटते. भाषाशास्त्रात फोनेटिक्स किंवा उच्चारशास्त्र हा एक महत्त्वाचा अभ्यास करावा लागतो. लिखित भाषा सर्वत्र समजली जावी अशी अपेक्षा असल्यास काहीएक उच्चार हे अभ्यासाच्या परिघात आणावे लागतील (कारण तसे ते आत्ता नाहीत म्हणून) आणि भाषेचे प्रमाणीकरण करताना त्यात सामावून घ्यावे लागतील. ते सरळसोट वापरात आणून (म्हणजे ब्रूट फोर्सने) करण्याचा पायंडा पाडणे सर्वस्वी बरोबरच असेल असे मला वाटत नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागातील लोक हे शेवटच्या "र" चा उच्चार करत नाहीत ( जसे "कार" मधला र). पण लिहीताना स्पेलिंग बरोबर एकाच पद्धतीने लिहीले जाते. बोली भाषेची वैशिष्ट्ये जपली नक्कीच गेली पाहिजेत पण लिहीताना मात्र प्रमाणीकरणाचा वापर शक्य तेवढा व्हावा. त्या प्रमाणीकरणाची सीमा विस्तृत करावी ही अपेक्षा मात्र योग्य आहे आणि तशी करण्यास कोणाचा नकार नसावा. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे पूर्णपणे मान्य.

In reply to by चित्रा

ॐकार 22/04/2008 - 09:11
कार मधल्या र च उच्चार न करणे पण लिहिताना मात्र 'आर्' लिहिणे हे उदाहरण म्हणून ह्या अनुषंगाने पटत नाही. इंग्रजी उच्चारानुसार लिहिली जाणारी भाषा नाहीच. स्पेलिंगचे घोळ होतात म्हणूनच तिथे प्रमाणीकरण गरजेचे आहे. एखाद्या उच्चार करता येण्याजोग्या शब्दाचे स्पेलिंग पाठ करायला लागावे यासारखे दुर्दैव मराठीच्या नशिबी नक्कीच नाही. किंबहुना (काय शब्द आहे!) क चा उच्चार इंग्रजीत c,q,k,ch कशानेही करता येईल. असे असल्याने तिथे प्रमाणीकरण हवेच. मराठीत क्वार्टर (क्वॉटअ), कार(क्खाअ), कॅन , काइट् (काइच्ट), ऑक्शन लिहा. तिथे 'क' म्हणजे 'क'च. ह्या वादात इंग्रजीला प्रमाण (रेफ़रन्स) मानणे नक्कीच सयुक्तिक नाही. भाषिक तुलनेचं (तुलनेचे असं लिहिलं की कसे पुस्तकी वाटते हे वेगळे सांगायला नको!) आणखी उदाहरण द्यायचं झालं तर थाई भाषेत काही वर्णांचे चार उच्चार आहेत उदा. प् , प , पअ ( लो टोन), प? (हाय टोन). हे उच्चार लिहायला त्या भाषेत वेगळे वर्ण आणि वर्णसंकर(!) आहेत. पा?क (का? सारखे पा? असे विचारा आणि मग क म्हणा) आणि पाक (आपला साखरेचा पाक असतो तसा उच्चार) यांचे लेखन आणि अर्थ वेगळे. त्यांनी उच्चारांच्यादृष्टीने समृद्ध(!) अशी मराठी भाषा/ देवनागरी लिपी प्रमाण मानावी का? मराठीत किमान असे फारसे प्रकार आढळत नाहीत (क्ष = क्श , ज्ञ = द्न्य, ष/श अशा कुरापती काढायला वाव आहे). प्रश्न उरतो तो समोच्चारी वर्णांचा जसे ट-त , द-ड, ण-न, ळ-ल; र्‍हस्व दीर्घाचा आणि प्रत्ययांचा. हा प्रश्नही (प्रश्ण का नाही? ) काही ठरावीक शब्दांपुरताच आहे. (बाकी सामान्य व्याकरण जसे वचन , लिंग, काळ इ. इ. मात्र प्रमाण आहेत हे नाकारता येत नाही). केवळ अशा काही शब्दभेदांमुळे जर मराठी बाटणार असेल तर ती लोकभाषा कधीच होणार नाही. अवांतरः सारेगमप मधल्या पल्लवी जोशीने पुरुषाला स्पर्धक आणि स्त्रीलाही स्पर्धक म्हणणे खटकते का कोणाला? गायक-गायिका, लेखक-लेखिका सारखे स्पर्धक-स्पर्धिका वगैरे का नाही असा प्रश्न पडला का कोणाला? :)

In reply to by ॐकार

चतुरंग 22/04/2008 - 20:22
तो स्पर्धक - पुल्लिंग, ती स्पर्धक - स्त्रिलिंग, ते स्पर्धक - अनेकवचन. ह्यात मूळ 'स्पर्धक' हा शब्द उदासीन आहे असे वाटते. असेच आणखी एक उदाहरण 'वादक' (वादिका?) - तो वादक, ती वादक, ते वादक. जाणकार आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील. चतुरंग

In reply to by मनस्वी

इनोबा म्हणे 22/04/2008 - 11:04
लई छान लिवलंय.. यक नंबर. ह्येच म्हंतू. च्यामारी परमाण का काय ते आपल्याला नाय कळत. आपल्याला पायजे तसंच लिवनार आपण. इरोध करणारे गेले खड्ड्यात. फारच मस्त लेख... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा, प्रामाण्य सांभाळले नाही तर तुम्ही ज्या भाषेत इथे संवाद साधू चाहता ती भाषाही गाळात जाते हो. तुम्ही 'निवड'पूर्वक बोली अवश्य वापरा. विलासरावजी "निचितपने" ह्याचे अनुमोदन करतील. मात्र लेखनात (संवादलेखन, संबोधन, वगळता) प्रमाण भाषा वापरा. त्याचे फायदे अनेक आहेत. हेच ह्या संकेतस्थळ सांभाळणार्‍याचे मत झालेले ह्या लेखातून दिसून येते. अर्थात् ज्या स्वातंत्र्याखातर तुम्ही इथे वावरता त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे निर्विवाद.

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.
सहमत आहे. नीलकांता असेच चांगले लेख येवो. एका भाषा शुद्धीचा आग्रह असणार्‍या लेखिकेकडे एकदा गेलो होतो. तिथे दुरदर्शन वर एक कार्यक्रम लागला होता. चर्चा असावी. त्यात एक प्राध्यापक आनि पानि लोनि असे उच्चार करत होता त्या कडे त्या विदुषीने माझे लक्ष वेधले. मी त्यांना एवढेच म्हणालो माझे लक्ष आशया कडे होते. किती वास्तव तो सांगत होता याकडे होतं. बलुत या पुस्तकाच्या मुद्रित शोधनात असंख्य 'चुका' मुद्रित शोधका ने दाखवल्या होत्या असे ऐकून आहे. प्रकाश घाटपांडे

अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'. >> नीलकांत, विचारपूर्वक लिहीलेल्या विचारप्रवर्तक लेखाखातर मन:पूर्वक धन्यवाद. प्रमाणभाषा असण्याचे अनेक फायदे असतात. उदाहरणार्थ वरील वाक्यात चुकून 'दर्पन' लिहील्या गेले असावे असा समज होण्याची शक्यता आहे. जर खरोखरीचे ते 'दर्पन'च असेल आणि त्याचा यथार्थ बोध व्हावा असे वाटत असेल तर, एरव्ही लिहीतांना प्रमाण भाषेत 'दर्पण' लिहीणे गरजेचे आहे. मग, प्रमाणभाषेत लिखाण केलेले आहे आणि जे आहे ते बिनचूक आहे अशी खात्री दिल्यास योग्य तो बोध निस्संदिग्धपणे मिळू शकतो. मात्र, संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता लेखात व्यवस्थित प्रकटली आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

नीलकांत 23/04/2008 - 18:32
मराठीतील पहिले नियतकालीक 'दर्पण' आहे. गोळेसर, माझा प्रमाणभाषेला विरोध नाहिये. विरोध आहे तो त्या प्रमाणाचा अतिआग्रहाला. अहो, मला नाही जमत १००% प्रमाण लिहायला. मग का मी लिहूच नये की काय? केवळ प्रमाण हीच एकमेव भाषा आहे असं नाही, आणि प्रमाणभाषेत झालेलीच केवळ अभिव्यक्ती बाकीचा सगळा दुय्यम गावठी माल असंही काही नाही. प्रमाण असावी, ती सर्वसंमत,सर्वमान्य असावी, त्यामुळे अर्थाबाबत संदेह उरत नाही. हे खरं आहे. या बाबत कुणाचंही दुमत नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

दर्पण हे पहीले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारीते साठी दर्पण पुरस्काल दिला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ गाव पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधूदूर्ग. तेथे असलेल्या पोंभुर्ले गावच्या ग्रामदेवतेचे(जांभई देवी)पुजारी म्हणूने त्याना जांभेकर हे आडनाव प्राप्त झाले. आजही पोंभुर्ले गावी त्यांच्या जन्मघरी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथे जवळच असलेले जांभई देवीचे मंदिर हे कोकणातील काष्ठशिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. पुण्याचे पेशवे

बॅटमॅन 07/06/2012 - 18:47
चेंगट्पना न कर्ता हा लेख वर आन्ल्याबद्दल श्री श्री नाना चेंगट यांचे त्रिवार हाबिणंदण!!! लै गरज व्हती या अशा लेखाची!! लै माजलेत प्रमाण-ब्रिगेडी अलिकडे ;)

In reply to by सुनील

मृगनयनी 07/06/2012 - 22:06
अरे वा वा!.. चान चान!...एकन्दर ह्या धाग्यास वर खेचण्याचे काम 'समिती' कडूनच चालू आहे तर!!!.. गुड.. कीप इट अप!!! ___________________________________ मूळचे उत्तर भारतीय असणार्‍या कृष्णाजीराव यादवां'ची राजधानी "द्वारका" गुजराथमध्ये असताना.. त्यांनी महाराश्ट्रातल्या ( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! ..

In reply to by मृगनयनी

बॅटमॅन 07/06/2012 - 22:11
महाराश्ट्रातल्या....( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! .. आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.

In reply to by बॅटमॅन

मृगनयनी 08/06/2012 - 09:56
आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.
:| :| :| .. इथे निषेध नोन्दवण्यासारखं काय आहे ? .. माझ्या "त्या" वाक्याचा अर्थ कळला नाही का तुम्हाला? ... मुळात वरच्या दोन प्रतिसादांमध्ये कृष्णाला "यादव" हे आडनाव प्रदान करणारे लोक्स वेगळे आहेत!... (सम्पादकही आहेत !) (पक्षी: मी नाही) ... आणि कृष्णाच्या पहिल्या पत्नीचे नाव- 'रुक्मिणी' असे असून तिचे माहेर विदर्भातले होते... अश्याप्रकारे कृष्णपत्नी'मुळे यादवांचा महाराष्ट्राशी संबंध जोडला गेलेला आहे... आणि "यादवांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे" हे राज ठाकरेंचे विधान आहे!!!... त्यामुळे मला नाही वाटत की यामुळे इथे मिसळपाव'वरती फार मोठा गदारोळ निर्माण व्हावा!... :| टीप :- सरळ साध्या वाक्यांचे अर्थ समजून घेण्यात कृपया चूक करू नये...... कुणीही

In reply to by मृगनयनी

नाना चेंगट 08/06/2012 - 13:22
एक प्रश्नः- हा लेख "नाना चेंगट" यांनी (किन्वा यांच्या करवी) इतक्या दिवसांनी वर काढण्यामागचा नक्की हेतू कळू शकेल का?... तुमच्या प्रश्न विचारण्यामागचा हेतु कळू शकेल काय? :)
लेखनप्रकार
गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं? 'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई.

मटाचं मराठी पर्व

नीलकांत ·

कलंत्री 18/04/2008 - 20:38
हा उपक्रम छानच आहे. मराठी भाषेच्या वर्धिष्णु करण्यासाठी आता हालचाली हव्यात. त्यासाठी शाळा बळकट व्हायला हव्यात आणि मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मार्गदर्शन करायला हवे. बाकी असे फुटकळ कार्यक्रम अधुनमधुन व्हायला हवे.

कलंत्री 18/04/2008 - 20:38
हा उपक्रम छानच आहे. मराठी भाषेच्या वर्धिष्णु करण्यासाठी आता हालचाली हव्यात. त्यासाठी शाळा बळकट व्हायला हव्यात आणि मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मार्गदर्शन करायला हवे. बाकी असे फुटकळ कार्यक्रम अधुनमधुन व्हायला हवे.
महाराष्ट्र टाईम्स ने गुढीपाडव्या पासून ते १ मे पर्यंत मराठी पर्व साजरा करायचे ठरवले आहे. या पर्वाच्या प्रत्येक दिवशी महाराष्ट्राच्या संबंधीत माहिती ते देताहेत. सोबतच त्या दिवशी कुणाची जयन्ती किंवा पुण्यातिथी असेल तर त्या व्यक्तीमत्वावर विशेष माहितीचं सदर असतं. त्यानंरचं विशेष आकर्षण म्हणजे, मराठी वॉलपेपर. झकास मराठी रंग असलेले वॉलपेपर ते देताहेत. एकदा नक्की पहावं, वाचवंस सदर आहे हे. दुवे देत आहे. महाराष्ट्र टाईम्स.कॉम मराठी पर्व मराठी - नीलकांत

थोडे असे, थोडे तसे

देवदत्त ·

विसोबा खेचर 12/04/2008 - 01:18
हम्म! लेखन बर्‍यापैकी वैचारिक झाले आहे! छान आहे! :) गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. मुख्य म्हणजे पुढे ढकललेले इपत्र येथे जसेच्या तसे प्रकाशित न करता त्यातील मुद्द्यावर देवदत्तरावांनी स्वत:ही काही लेखन केले आहे, हे मी महत्वाचे मानतो! 'सभासदांनी येथे स्वत:चे लेखन करावे' या मिपाच्या धोरणाला हे साजेसेच आहे. अभिनंदन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 28/04/2008 - 23:08
धन्यवाद तात्या.. आणखी बरेच विचार असतात असे पण इथे येऊन लिहेपर्यंत काही विसरून जातो, काही वेळा दोन्ही मुद्दे आठवत नाही. आता एक आठवला तो लिहितो... वीजमंडळ भारनियमन करते काही कारणाकरीता. पण त्यातूनही असे वाटते. भारनियमन चांगले आहेच. ठराविक वेळ वीज न वापरल्याने वीजेची बचत होतेच. पण मग लगेच वाटते, अरे पण फायदा काय? जी वीजेची उपकरणे मी ती दिवसभरात त्याच प्रकारे वापरणार. त्यात जवळपास तेवढाच वीज वापर आहेच. पण मग तेच क्रिकेट, इतर समारंभात आपण वीज खर्ची घालतोच.

विसोबा खेचर 12/04/2008 - 01:18
हम्म! लेखन बर्‍यापैकी वैचारिक झाले आहे! छान आहे! :) गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. मुख्य म्हणजे पुढे ढकललेले इपत्र येथे जसेच्या तसे प्रकाशित न करता त्यातील मुद्द्यावर देवदत्तरावांनी स्वत:ही काही लेखन केले आहे, हे मी महत्वाचे मानतो! 'सभासदांनी येथे स्वत:चे लेखन करावे' या मिपाच्या धोरणाला हे साजेसेच आहे. अभिनंदन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 28/04/2008 - 23:08
धन्यवाद तात्या.. आणखी बरेच विचार असतात असे पण इथे येऊन लिहेपर्यंत काही विसरून जातो, काही वेळा दोन्ही मुद्दे आठवत नाही. आता एक आठवला तो लिहितो... वीजमंडळ भारनियमन करते काही कारणाकरीता. पण त्यातूनही असे वाटते. भारनियमन चांगले आहेच. ठराविक वेळ वीज न वापरल्याने वीजेची बचत होतेच. पण मग लगेच वाटते, अरे पण फायदा काय? जी वीजेची उपकरणे मी ती दिवसभरात त्याच प्रकारे वापरणार. त्यात जवळपास तेवढाच वीज वापर आहेच. पण मग तेच क्रिकेट, इतर समारंभात आपण वीज खर्ची घालतोच.
गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार." खरोखरच चांगला विचार. तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला, एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा ;)) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या.

मी (गंभीर) मराठी

आनंद घारे ·

विजुभाऊ 10/04/2008 - 18:57
पण सध्या तरी जी गोष्ट ज्या नांवाने माझ्यापर्यंत पोचली त्या नांवाला चमत्कारिक वाटणारे प्रतिशब्द न शोधता त्या नांवाचाच मराठी भाषेत समावेश करावा बरोबर आहे. एखादी भाषा टिकते / वाढते ती तिचा शुद्धपणा जपत/ सोवळे सांभळत बसल्यामुळे नव्हे तर रोज नवे नवे शब्द आत्मसात केल्यामुळे. मार्क टुली हा ब्रिटिश पत्रकार बी बी सी वर भारताबद्दल लिहायचा. त्याने एकदा एका हिन्दी माणसाची मुलाखत घेतान हिन्दी नसणारा शब्द वापरला तेंव्हा त्या हिन्दी माणसाने त्या शब्दाबद्दल त्याला टोकले. आपने जि लब्ज इस्तेमाल किय वि हिन्दी मे नही है, त्यावर मार्क टुली म्हणाला " अगर नही है तो अब होगा" हिन्दी चे या बाबत कौतुक करावे तेवढे थोडे आहे. ते लोक इंग्लीश शब्द किती सहज पणे त्यावर हिन्दी साज चढवुन आत्मसात करतात. उदा: तकनीक्... हा टेकनीक चे हिन्दी रूप आहे त्रासदी ...ट्रॅजेडी...उदा: भोपाल गैस त्रासदी. आपण मात्र बसलो आहोत्...कळफलक / पटल / अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक असले महा शब्द शोधत. पाहुया आपण नवे सोपे शब्द प्रचलात आणुया मिपा व तत्सम संस्थळे या बाबतीत खूप महत्वाची भूमिका बजावतील

प्राजु 10/04/2008 - 19:18
विजुभाऊ म्हणतात ते बरोबर आहे. जीवंत भाषा ही प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी . हे धोरण सगळ्याच भाषांना लागू पडते. पण मराठी सारखी भाषा मात्र कळफलक, संस्थळ आशा काहिशा शब्दांमध्येच अडकल्यामुळे थोडी जड वाटते. माझा मुलगा (वय वर्षे ४)सध्या जी मराठी बोलतो बर्‍याचदा त्याचा प्रयत्न नीट मराठी बोलण्याकडे असतो. पण त्याला गोष्टी सांगताना, ज्या वस्तू त्याने पाहिलेल्या नाहीत त्यांना त्याच्या महितितील वस्तूंनी रिप्लेस करावे लागते. म्हणजे बिरबलाची खिचडी सांगताना, त्याला चूलीच्या भरपूर वरती त्याने एका दोराने खिचडीचे मडके टांगून ठेवले होते या ऐवजी त्याने गॅस पेटवला होता आणि खिचडी करण्याचा कूकर मात्र तिकडे लांब डायनिंग टेबल वर होता... असे सांगावे लागते. त्याने चूल किंवा मडके पाहिलेच नसेल तर त्या गोष्टीचा अर्थ तो समजू शकणार नाही अशी माझी भावना आहे... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सचिन 10/04/2008 - 22:26
"आनंदघन" यांच्याशी संपूर्ण सहमत आहे. भाषा जिवंत आणि प्रवाही राहाण्यासाठी इतर भाषांमधले शब्द तिने आत्मसात करायला हवेतच...पण हे होत असताना त्या भाषेचे स्वत्व हरपणार नाही याची काळजी घेतली जायला हवी. (नाहीतर मराठी WORDS REMEMBER करायला DIFFICULT होतं ). आज मी सुद्धा जेव्हा माझ्या आईशी, वडिलांशी किंवा कोल्हापूरच्या काकांशी बोलतो, तेव्हा वाटतं की ते मराठी बोलत आहेत, आणि मी कुठलीतरी "प्रदूषित" भाषा बोलतोय. साधे व्यवहारातले मराठी शब्दही सुचत नाहीत...आणि त्यांचं मराठी काही "कळफलक, संस्थळ" प्रकारातलं नसतं. उदहरणार्थ, "वास्तविक" किंवा "वास्तविक पाहता.." असा शब्द ते वापरतात, पण मी मात्र "ACTUALLY" म्हणतो. ते म्हणतात आम्ही "रांगेत तिष्ठत होतो", मी मात्र " LINE मधे BORE होतो". मुख्य म्हणजे, ते काही मुद्दाम शुद्ध मराठी बोलूया म्हणून बोलत नसतात...ते नैसर्गिकच असतं. ऑफिस, फाईल, कॉम्प्युटर..हे आपण टाळू शकत नाही, पण वर उल्लेख केलेले किंवा अजूनही त्यासारखे अनेक शब्द आपण वापरू शकतोच ना ? त्यामुळे माझ्या मते भाषा जिवंत राहील, आणि अटळ असलेले परभाषेतील शब्द वापरल्याने ती प्रवाही राहील. शेवटी असं म्हणेन, की आपल्या भाषेत अभिमानाने बोलता आले पाहिजे...पण तो दुराग्रह नसावा. ...आणि शुध्दलेखनाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर ..नकोच ! एक आख्खे नवे "संस्थळ" काढावे लागेल !!

चित्रा 11/04/2008 - 02:42
बर्‍याचशा मतांशी सहमत! मला वाटते की रोजच्या व्यवहारात काही इंग्रजी शब्द वापरायला हरकत नाही, पण नुकतेच महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात " फेस्टिवल", "थीम", ज्वेलरी", "शूज", "ट्रॅडिशनल", "फॅशन", "आउटफिटस" हे इंग्रजी शब्द होते. सात वाक्यात सात शब्द इंग्रजी. याची काही गरज आहे का असे वाटले. दागिने, पारंपारिक, असे रूढ शब्द वापरता आले असते. इतर बातम्यांमधील शब्द - गिफ्ट, हार्टशेप, स्पेशल गिफ्ट्सवरचे डिस्काऊंट, फ्लोअरिंग, मार्बल.. अजून एक - कॉस्मेटोलॉजी आणि डर्मो सर्जरी , "ट्रेनरपदाची ", नॅशनल आणि इण्टरनॅशनल असोसिएशनच्या अनेक एलिट पॅनेलवरही . " 'एजिंग' , लेझर ट्रीटमेण्ट्स, लेझर फोटो रेज्युव्हेनेशन , "या ट्रीटमेण्टमुळे त्वचा सॉफ्ट होते, "पिग्मेण्टेशन, रिंकल्स, स्कार्स रोखण्यास मदत होते. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2927333.cms हे एवढे अमराठी (इंग्लिश) शब्द वापरण्याची गरज आहे का? वरील शब्दांसाठी भेट, बदामी (किंवा हृदयाकृती), खास भेटवस्तूंवरच्या सवलती इत्यादी शब्द वापरले तर काही चुकते का? शक्य तेथे सोपे मराठी प्रतिशब्द तयार करावेत आणि ते वापरावेत - असे मला वाटते. काही शब्द तयार करूनही प्रचलित होणार नाहीत, पण काही सोपे असतील ते नक्कीच वापरले जातील. असे शब्द अंगवळणी पडायला सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे असे वाटते. व्य. नि. /खरडवही हे शब्द किती पटकन उपयोगात आले - त्याचे कारण ते सोपे आहेत.

आनंद घारे 11/04/2008 - 08:37
१. लिहिणार्‍याला ते परकीय शब्द आधिक ओळखीचे वाटतात. किंवा २. ते शब्द वाचकाला पटकन समजतील असे त्याला वाटते.

...कळफलक / पटल / अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक कळफलक आणि पटल हे शब्द समजायला आणि उच्चारायलाही कठीण नाहीत. 'अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक' ह्याला 'स्थानक' हा सर्वांना समजणारा प्रचलित शब्द आहेच. शब्द समजायला/उच्चारायला सोपे असावेत परंतु मराठी भाषेतील शब्दांचाच शक्यतो उपयोग करावा.

विजुभाऊ 10/04/2008 - 18:57
पण सध्या तरी जी गोष्ट ज्या नांवाने माझ्यापर्यंत पोचली त्या नांवाला चमत्कारिक वाटणारे प्रतिशब्द न शोधता त्या नांवाचाच मराठी भाषेत समावेश करावा बरोबर आहे. एखादी भाषा टिकते / वाढते ती तिचा शुद्धपणा जपत/ सोवळे सांभळत बसल्यामुळे नव्हे तर रोज नवे नवे शब्द आत्मसात केल्यामुळे. मार्क टुली हा ब्रिटिश पत्रकार बी बी सी वर भारताबद्दल लिहायचा. त्याने एकदा एका हिन्दी माणसाची मुलाखत घेतान हिन्दी नसणारा शब्द वापरला तेंव्हा त्या हिन्दी माणसाने त्या शब्दाबद्दल त्याला टोकले. आपने जि लब्ज इस्तेमाल किय वि हिन्दी मे नही है, त्यावर मार्क टुली म्हणाला " अगर नही है तो अब होगा" हिन्दी चे या बाबत कौतुक करावे तेवढे थोडे आहे. ते लोक इंग्लीश शब्द किती सहज पणे त्यावर हिन्दी साज चढवुन आत्मसात करतात. उदा: तकनीक्... हा टेकनीक चे हिन्दी रूप आहे त्रासदी ...ट्रॅजेडी...उदा: भोपाल गैस त्रासदी. आपण मात्र बसलो आहोत्...कळफलक / पटल / अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक असले महा शब्द शोधत. पाहुया आपण नवे सोपे शब्द प्रचलात आणुया मिपा व तत्सम संस्थळे या बाबतीत खूप महत्वाची भूमिका बजावतील

प्राजु 10/04/2008 - 19:18
विजुभाऊ म्हणतात ते बरोबर आहे. जीवंत भाषा ही प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी . हे धोरण सगळ्याच भाषांना लागू पडते. पण मराठी सारखी भाषा मात्र कळफलक, संस्थळ आशा काहिशा शब्दांमध्येच अडकल्यामुळे थोडी जड वाटते. माझा मुलगा (वय वर्षे ४)सध्या जी मराठी बोलतो बर्‍याचदा त्याचा प्रयत्न नीट मराठी बोलण्याकडे असतो. पण त्याला गोष्टी सांगताना, ज्या वस्तू त्याने पाहिलेल्या नाहीत त्यांना त्याच्या महितितील वस्तूंनी रिप्लेस करावे लागते. म्हणजे बिरबलाची खिचडी सांगताना, त्याला चूलीच्या भरपूर वरती त्याने एका दोराने खिचडीचे मडके टांगून ठेवले होते या ऐवजी त्याने गॅस पेटवला होता आणि खिचडी करण्याचा कूकर मात्र तिकडे लांब डायनिंग टेबल वर होता... असे सांगावे लागते. त्याने चूल किंवा मडके पाहिलेच नसेल तर त्या गोष्टीचा अर्थ तो समजू शकणार नाही अशी माझी भावना आहे... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सचिन 10/04/2008 - 22:26
"आनंदघन" यांच्याशी संपूर्ण सहमत आहे. भाषा जिवंत आणि प्रवाही राहाण्यासाठी इतर भाषांमधले शब्द तिने आत्मसात करायला हवेतच...पण हे होत असताना त्या भाषेचे स्वत्व हरपणार नाही याची काळजी घेतली जायला हवी. (नाहीतर मराठी WORDS REMEMBER करायला DIFFICULT होतं ). आज मी सुद्धा जेव्हा माझ्या आईशी, वडिलांशी किंवा कोल्हापूरच्या काकांशी बोलतो, तेव्हा वाटतं की ते मराठी बोलत आहेत, आणि मी कुठलीतरी "प्रदूषित" भाषा बोलतोय. साधे व्यवहारातले मराठी शब्दही सुचत नाहीत...आणि त्यांचं मराठी काही "कळफलक, संस्थळ" प्रकारातलं नसतं. उदहरणार्थ, "वास्तविक" किंवा "वास्तविक पाहता.." असा शब्द ते वापरतात, पण मी मात्र "ACTUALLY" म्हणतो. ते म्हणतात आम्ही "रांगेत तिष्ठत होतो", मी मात्र " LINE मधे BORE होतो". मुख्य म्हणजे, ते काही मुद्दाम शुद्ध मराठी बोलूया म्हणून बोलत नसतात...ते नैसर्गिकच असतं. ऑफिस, फाईल, कॉम्प्युटर..हे आपण टाळू शकत नाही, पण वर उल्लेख केलेले किंवा अजूनही त्यासारखे अनेक शब्द आपण वापरू शकतोच ना ? त्यामुळे माझ्या मते भाषा जिवंत राहील, आणि अटळ असलेले परभाषेतील शब्द वापरल्याने ती प्रवाही राहील. शेवटी असं म्हणेन, की आपल्या भाषेत अभिमानाने बोलता आले पाहिजे...पण तो दुराग्रह नसावा. ...आणि शुध्दलेखनाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर ..नकोच ! एक आख्खे नवे "संस्थळ" काढावे लागेल !!

चित्रा 11/04/2008 - 02:42
बर्‍याचशा मतांशी सहमत! मला वाटते की रोजच्या व्यवहारात काही इंग्रजी शब्द वापरायला हरकत नाही, पण नुकतेच महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात " फेस्टिवल", "थीम", ज्वेलरी", "शूज", "ट्रॅडिशनल", "फॅशन", "आउटफिटस" हे इंग्रजी शब्द होते. सात वाक्यात सात शब्द इंग्रजी. याची काही गरज आहे का असे वाटले. दागिने, पारंपारिक, असे रूढ शब्द वापरता आले असते. इतर बातम्यांमधील शब्द - गिफ्ट, हार्टशेप, स्पेशल गिफ्ट्सवरचे डिस्काऊंट, फ्लोअरिंग, मार्बल.. अजून एक - कॉस्मेटोलॉजी आणि डर्मो सर्जरी , "ट्रेनरपदाची ", नॅशनल आणि इण्टरनॅशनल असोसिएशनच्या अनेक एलिट पॅनेलवरही . " 'एजिंग' , लेझर ट्रीटमेण्ट्स, लेझर फोटो रेज्युव्हेनेशन , "या ट्रीटमेण्टमुळे त्वचा सॉफ्ट होते, "पिग्मेण्टेशन, रिंकल्स, स्कार्स रोखण्यास मदत होते. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2927333.cms हे एवढे अमराठी (इंग्लिश) शब्द वापरण्याची गरज आहे का? वरील शब्दांसाठी भेट, बदामी (किंवा हृदयाकृती), खास भेटवस्तूंवरच्या सवलती इत्यादी शब्द वापरले तर काही चुकते का? शक्य तेथे सोपे मराठी प्रतिशब्द तयार करावेत आणि ते वापरावेत - असे मला वाटते. काही शब्द तयार करूनही प्रचलित होणार नाहीत, पण काही सोपे असतील ते नक्कीच वापरले जातील. असे शब्द अंगवळणी पडायला सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे असे वाटते. व्य. नि. /खरडवही हे शब्द किती पटकन उपयोगात आले - त्याचे कारण ते सोपे आहेत.

आनंद घारे 11/04/2008 - 08:37
१. लिहिणार्‍याला ते परकीय शब्द आधिक ओळखीचे वाटतात. किंवा २. ते शब्द वाचकाला पटकन समजतील असे त्याला वाटते.

...कळफलक / पटल / अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक कळफलक आणि पटल हे शब्द समजायला आणि उच्चारायलाही कठीण नाहीत. 'अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक' ह्याला 'स्थानक' हा सर्वांना समजणारा प्रचलित शब्द आहेच. शब्द समजायला/उच्चारायला सोपे असावेत परंतु मराठी भाषेतील शब्दांचाच शक्यतो उपयोग करावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठी भाषेच्या शुध्दतेचा आग्रह धरण्यावर ' मी मराठी' या लेखात मी मिसळपावावर उपहासाने लिहिले होते. त्यावर बर्‍याच जणांचे प्रतिसाद आले. " त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी हा लेख गंभीरपणे विचार करायला प्रवृत्त करतो." अशा प्रकारचे कोणीतरी लिहिले होते. असा थोडासा 'गंभीर विचार' मी लेख लिहिण्यापूर्वीच केलेला होता. हातासरशी तो सांगून टाकावा, त्यासाठी उगाच वाचकांच्या डोक्याला वेगळा शीण नको म्हणून मीच त्यावर एक गंभीर स्वरूपाचा प्रतिसाद लिहिला. पण बहुधा कोणीच तो वाचला नसावा. ते ही तसे बरोबरच आहे. मिसळ तयार झाल्यावर ती लगेचच फस्त करतात. ती शिळी झाल्यानंतर कोणीही तिच्याकडे पहात नाही.