क्रिकेटचा वर्ल्डकप सुरु झाला आणि सगळे राष्ट्र टी व्ही कडे डोळे लावून बसले.
काय होतय, काय होतय ? उत्कंठा होती.
१९८३ मधे जिंकला, यावेळी जिंकणार का ! त्यात पुन्हा सचिनचा शेवटचा वर्ल्डकप.
बेट्याने नेहमीप्रमाणे शतके ठोकली.
पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांच्यावर मात करीत २०११ चा
वर्ल्डकप भारताने जिंकला.
सचिनला भारतरत्न द्यावे ही मागणी होउ लागली.
४ दिवस जातात तोच अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी आंदोलन सुरु केले.
ते दिल्लीमधे उपोषणाला बसले.
एप्रिल नंतर ऑगस्टमधे पुन्हा उपोषणाला बसले. पूर्वीहून अधिक प्रतिसाद मिळाला.
आंदोलन प्रचंड यशस्वी.