Skip to main content

विरंगुळा

जिंदगी ना मिलेगी दोबारा...(Revisited)

लेखक चिनार यांनी सोमवार, 07/01/2019 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेरणास्थान... साडेतीन शहाणे https://www.misalpav.com/node/43829 दिलो में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम... जावेद अख्तर लिखित वरील सुंदर ओळीवर जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा संपतो... ह्यानंतर कबीर (अभय देओल),इम्रान (फरहान अख्तर) आणि अर्जुन (ह्रितिक रोशन) आपापली जिंदगी जियायला निघून जातात. साधारण पाच वर्षांनी तिघेही मुंबईच्या एका बारमध्ये भेटायचं ठरवतात. कबीर आणि अर्जुन बारमध्ये आधीच पोहोचतात. इम्रान सवयीप्रमाणे अजून पोहोचला नाहीये. कबीर: इम्रान आला नाही यार अजून? अर्जुन: त्याचं नेहमीचंच आहे रे.

घोटाळा

लेखक चिनार यांनी शनिवार, 05/01/2019 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि माझ्या पत्नीने काहीतरी मोठा घोटाळा केला आहे असा आरोप करण्यात आला. आरोप करणाऱ्याने आम्हाला फेस टू फेस येण्याचे चॅलेंज दिले. आमच्यात झालेला संवाद खालीलप्रमाणे.. प्रश्न १. तुमचे आडनाव जोशी का आहे? माझे उत्तर : कारण माझ्या वडिलांचे आडनाव जोशी आहे. तो: माझा प्रश्न नीट ऐका. तुमचे आडनाव जोशी का आहे? उत्तर: कारण माझ्या वडिलांचे आडनाव जोशी आहे. आणि मी त्यांच्यापोटी जन्म घेतला. तो : "तुम्ही प्रश्नाचे उत्तर देत नाही आहात. काहीतरी लपवण्याचा डाव दिसतोय. मी असा सोडणार नाही तुम्हाला." "बरं" आता तो माझ्या पत्नीकडे वळला. प्रश्न: साल २०१३ चे कागदपत्रं माझ्या हातात आहेत.

आरंभशूर

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 02/01/2019 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
``तूच ठरवतेस, आज व्यायाम सुरू करायचा. आज डायरी लिहायला सुरुवात करायची, आजपासून कामात जास्त लक्ष द्यायचं, टाइमपास करायचा नाही, सोशल मीडिया कमी वापरायचं, व्हर्च्युअल जगात जास्त वावरायचं नाही, सकाळी लवकर उठायचं, माती नि मसणं करायचं!`` ``मग?`` ``मग` काय `मग`? तू मागचापुढचा विचार न करता संकल्पांना होकार देऊन टाकतेस आणि आम्हाला ते पाळत बसावे लागतात ना!``

३१ डिसेंबर (विज्ञान कथा)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 24/12/2018 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षीच्या (२०१८) "संवाद" या दिवाळी अंकात छापून आलेली माझी विज्ञान कथा !! (निमिष सोनार) दिनांक: 31 डिसेंबर, युरोपातील एका भूमिगत प्रयोगशाळेत - "डॉक्टर कोहेन, खरं तर मी वेळ ही गोष्ट लांबी, रुंदी आणि उंची याप्रमाणे एक मिती आहे हे मानत नाही. वेळ ही मानवाने निर्माण केलेली गोष्ट आहे. घडलेल्या घटना क्रमाने स्मरणात ठेवण्यासाठी. पण काळ, अंतर आणि वेग यांच्यातल्या गुणोत्तराचा वापर मात्र मी वेगवान प्रवासासाठी करून घेणार आहे!', शास्त्रज्ञ डॉ. रमण म्हणाले. कोहेन आणि रमण यांनी एकत्र विज्ञानाचे नवनवीन शोध लावले होते. दोघे एकमेकांचे खास मित्र झाले होते.

नंदिनीची डायरी - तेव्हा आता पुढे

लेखक aanandinee यांनी सोमवार, 10/12/2018 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
नंदिनीची डायरी - तेव्हा आता पुढे थोडं वैतागून, थोडं निराशेने मी फोन ठेवला. एका एजन्सीची नवीन ब्रांच आमच्या शहरात उघडणार होती. वेगवेगळ्या मेंटल हेल्थ एजन्सीसबरोबर काम करणं मला सोयीचं वाटतं. एकाच ठिकाणी पाच दिवस काम करण्यापेक्षा हे variation मला आवडतं. एकाच जागी बांधल्यासारखं वाटत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव मिळतात आणि flexibility ही राहते. या नवीन एजन्सीबरोबर काम करणंही मला आवडलं असतं. पण ते होण्यातलं दिसत नव्हतं. या घोळात घरून निघायलाही उशीर झाला. पेशंट्सबरोबर सेशन सुरू करण्याआधी थोडा वेळ पोहोचलं तर मला स्वतःचं मन शांत करायलाही काही वेळ मिळतो.

वाढदिवस

लेखक निओ यांनी मंगळवार, 04/12/2018 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा आज वाढदिवस. सकाळी अंथरुणात उठून बसला. काल रात्री बारा पर्यंत जागाच होता. पण शुभेच्छा द्यायला तो सोडून कोणीच जागे नव्हते. whats app वरचे काही फुटकळ मेसेज तपासून हा पण शहाण्या सारखा गपचूप झोपी गेला. तर सकाळी उठून बसला. कोणाची काही चर्चा नाही, भेटवस्तू काय हवी विचारणा नाही, बाहेर कोठे जायचे काही तयारी नाही. आपला वाढदिवस विसरले कि काय हे लोक, असंच त्याला वाटून गेलं. इतक्यात आलीच ...लगबगीने हसत हसतच बायको आली. येऊन सरळ मांडीवरच बसली. आयला हे काय... ! म्हणजे एकीकडे बरे वाटले.

पानाची गोष्ट

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 23/11/2018 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज झाड़ फार खुष होत. त्याच्या छोटयाश्या कोवळशा फांदीला नवीन पालवी फुटली होती. झाडाला अगदी नातवंड झाल्याचा आनंद होत होता. बाकीच्या पान, फांदया, नवीन बाळानतीणी सारख्या त्या कोवळ फांदीचे कौतुक करीत होत्या. त्यातही ते छोटेसे कोवळ पान खुप सुंदर दिसत होत. पोपटी रंगांच ते पान लहान गोंडस बाळा सारख वाटत होत. दिवसागणिक ते पान हळू हळू वाढत होत. पोपटी रंग जाऊन हिरवा रंग बाळस धरत होत. मुबलक सूर्यप्रकाश आणि पाण्याने त्याच तेज वाढत होत. त्याचा फांदीशी असलेला संबंध अधिकाधीक दृढ़ होत होता. हिरवा रंग अधिकाधीक घट्ट होत होता. झाड़ नियमित पणे त्या मोठ्या होणाऱ्या पानाच कोड कौतुक पुरवत होत.

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ९

लेखक कलम यांनी शुक्रवार, 23/11/2018 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात आपण खूप चुका करतो... काही लहान सहान, काही खूप मोठ्या तर काही माफी सुद्धा नसणाऱ्या. आपण करतच जातो त्या चुका, कारण काहीही असो.. कधी त्या चुका करणं हि आपलीच चूक असते, कधी परिस्थितीची गरज असते तर कधी जाणून बुजून आपण ते सर्व करतो. चुका कुठल्याही असोत, आयुष्यात झालेली प्रत्येक चूक आपली सावली बनते आणि आपण सरणावर जाईपर्यंत आपला पिच्छा करते...सगळा वेळ, आपल्याही नकळत. आपण एखादी चूक सुधारतो, सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला वाटतं कि सगळं कसं पूर्वीसारखं ठीक होईल, पण नाही.. केलेल्या चुकांचे फास आपल्याला कधीतरी आवळतातच... कुठंतरी, कुठल्यातरी वळणावर आपल्या समोर उभे ठाकतातच.

ॲडमिशन Engineeringची : एक नाट्यछटा

लेखक चिगो यांनी शनिवार, 17/11/2018 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक : कोणी का असेना. स्थळ : इशान्य भारतातील एक राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे कार्यालय पात्र : सरकारी बाबू ( श्री. ना.पा. सघोडे) पिता ( श्री. फा.र. चतापलेले) पुत्र ( संदर्भास) इतर सोयीनुसार पार्श्वभुमी : अभियांत्रिकी शिक्षणासाठीच्या जागांचे सुयोग्य आणि यथार्थ वाटप व्हावे, म्हणून केंद्र सरकारने CSAB - NEUT ( Central Seat Allotment Board - North East & Union Territories) ची निर्मिती केली आहे. सदर प्रक्रियेनुसार जागांचे वाटप व भरती होऊन आता जवळपास दोन महीने लोटले आहेत. ( पडदा वर जातो. सरकारी बाबू कार्यसिद्धी करताहेतसे दाखवून समयप्रलाप करीत आहेत.

लघुकथा: खड्डा

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 09/11/2018 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
"पिळकर, ते कंत्राट भरा लवकर. त्याच्या मंजूरीचं काय ते मी पाहून घेईन! सरकारी माणसं आपल्या खिशातआहेत!", कीटवानी आत्मविश्वासाने म्हणाले. पिळकरांना माहिती होते की कंत्राट भरणं ही औपचारिकता आहे. अनेकांचा खिसा गरम करून कीटवानी साहेब ते कंत्राट खिशात घालणार आणि आपल्यालाही त्यातला काही मलिदा खायला मिळणार! काही महिन्यांनी कंत्राट कीटवानीलाच मिळालं. शहरातील एका रस्त्याचे बांधकाम आता किटवानी करणार होता. गेल्या वर्षी अशाच एका उड्डाण पुलाचे कंत्राट मिळवून त्याने निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरला होता पण पावसाळ्यात पूल कोसळून अनेक वाहनांचे नुकसान होऊन दहा माणसे ठार झाली होती.