मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गाण्यांच्या शोधात

ॐकार ·

मुक्तसुनीत 31/03/2008 - 04:20
ॐकाररावांचे मी सर्वप्रथम एका उत्तम प्रतीच्या स्फुटाच्या लिखाणाबद्दल अभिनंदन करतो. काही गोष्टी या अनेक वर्षांच्या सहवासाने , त्यांच्या वारंवार केलेल्या श्रवणाने, आवृतीने, दर्शनाने, (अगदी गंधाने सुद्धा !) आपल्या मनावर खोल संस्कार करतात. आणि काही थोड्या गोष्टी या आपल्या अबोध मनात वास करून असतात. ॐकार यांनी अशा जातीच्या एका अनुभवाला त्यांच्या अबोध मनातून एखाद्या प्रयोगशाळेतल्या वैज्ञानिकासारखे आपल्या शब्दांच्या चिमटीमधे पकडून , आपल्या विश्लेषणादि साधनांच्या मायक्रोस्कोपखाली घालून तपासले आहे. पण हा अभ्यास, हा मागोवा निर्जीव नाही., भावनारहित शुष्क नाही. या एका गाण्याचे नि आपले नाते काय ? त्या गाण्यातल्या व्यक्त झालेल्या अनुभवाचे नि आपले नाते काय ? एका पुरुषकवीने लिहिलेल्या एका स्त्रीच्या मनातील कल्लोळाला एक संगीतकार अशी , हृदयाच्या आर्त स्वरांच्या तारा छेडणारी चाल बांधतो. त्यातील निसर्गाच्या चित्रणाचे , त्या रौद्रभीषण पावसाळी रात्रीच्या पूराचे त्या चालीशी, त्यातल्या पार्श्वसंगीताशी असे काही नाते जुळलेले असते. आणि हे गाणे गाणारा तो दिव्य स्वर ! त्याचे वर्णन पामर शब्दानी काय करायचे ? आणि हे सगळे ऐकणारे आपण. >>>>> ह्या कडव्याचा मी अजून पत्ता शोधतो आहे. गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. पण तोवर जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्ह्या परत हे चित्रं आणखी ताकदीनं समोर उभं राहतं. त्या दुमडलेल्या कोपर्‍यासहित! एखादे गाणे कोट्यावधी लोक शेकडोवेळा ऐकतात. पण कुणीसे म्हण्टले आहे ना , "बडी मुष्किलसे होता है चमन में दीदावर पैदा !" ॐकार यांच्या दीदावरीला माझा कुर्निसात.

मीनल 31/03/2008 - 07:20
सुंदर! स्वरांबद्दल ,शब्दांबद्दल ,त्यातून तुम्हाला कळलेल्या ,न कळलेल्या अर्थाबद्दल छान लिहिले आहे. कधी कधी ही जुनी गाणी नुसतीच ऐकतो आपण. पण विचारच करत नाही त्या विषयाचा! चाल आठवून गात राहिली जातात काही गाणी त्यांचा अर्थ असा शोधावासा वाटतो तुम्ही लिहिलेल्या लेखावरून. हे गाण म्हणजे एक चित्र.आणि तुम्ही एक कोपरा. सर्वसाधारण पणे वाचक ,श्रोता ,प्रेक्षक स्वतःला केंद्रस्थानी मानतो आणि कथा आपल्या भोवती गुंडाळून घेतो. इथे नेमक वेगळ आहे काहीसं! असाधारण! आपल्या चित्रातील `दुमडलेल्या कोप-याची ` उपमा अप्रतिम आहे. `एका पुरूषाने स्वतःला स्त्री रूपात पाहणे `हे त्या गाण्याच श्रेय.लिहिणा-याच आणि गाणा-याच. पण तो श्रोता तितक्या प्रामाणिकपणे त्यात मिसळून जातो ही त्या श्रोत्याची रसिकता! आपले अजून असेच लेख वाचायला मिळावेत अशी इच्छा आहे.

विसोबा खेचर 31/03/2008 - 07:42
क्या बात है ॐकारशेठ! या गाण्याचं तू अतिशय सुरेख रसग्रहण केलं आहेस! काही गाणी ही सहजसोपी असतात व तेवढीच सुंदर असतात, तर काही गाणी सुंदर असतात परंतु तेवढी सहज सोपी नसतात, कठीण असतात. हृदयनाथ मंगेशकरांची बरीचशी गाणी ही या दुसर्‍या प्रकारात मोडतात. म्हणजे सुरेख परंतु तेवढीच कठीण! मला विचारशील तर हे 'असा बेभान...' हे गाणंही सर्वच दृष्टीने (म्हणजे शब्द,चाल, म्हणणे) अतिशय कठीण गाणं आहे तरीही फार सुरेख आहे! आणि या कठीण परंतु अत्यंत सुरेख गाण्याचं तू तेवढंच सुरेख रसग्रहणही केलं आहेस हे मला विशेष वाटतं! मनापासून अभिनंदन...! गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. नक्कीच लागेल! गाण्याची श्रवणभक्ति, गाण्याची साधना नेहमीच फलदायी होते! मात्र वारंवार डुबक्या मारून खोल समुद्राच्या तळाशी सतत जात राहिलं पाहिजे, त्यातली रत्न, माणिकमोती शोधण्यासाठी! एका सुंदर रसग्रहणाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन! खूप सुंदररित्या तू या गाण्याकडे बघितलं आहेस! अजूनही अश्याच काही तुझ्या मनाचा ठाव घेतलेल्या गाण्यांबद्दल इथे लिही, ही विनंती... आपला, (गानप्रेमी!) तात्या.

मदनबाण 31/03/2008 - 08:07
ॐकार सर आपल गाण्याच भाव विष्लेषण अगदी जबरदस्त आहे. आपले अजुन असेच लेख वाचण्याचा आनंद सर्व मि.पा करांना सदैव मिळो..... (एक-दोन तोडके मोडके शब्द सुद्धा सरळ न लिहु शकणारा) मदनबाण

सहज 31/03/2008 - 08:36
ॐकार, अतिशय सुंदर रसास्वाद!! मुक्तसुनित यांचा प्रतिसाद देखील नेहमीप्रमाणेच सुबोध.

प्राजु 31/03/2008 - 08:45
ॐकार, अतिशय सुंदर.. आपण इतके सुंदर रसग्रहण केले आहे की आता लगेच हे गाणे ऐकण्याची इच्छा होते आहे. कितिदा ऐकले तरी समाधान होत नाही. आपले अभिनंदन या सुंदर गाण्याच्या सुरेख रसग्रहणाबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

प्रमोद देव 31/03/2008 - 08:54
ॐकार अतिशय उत्तम असे रसग्रहण सादर केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! गाण्यातला भाव,त्या भावांना पोषक असे संगीत आणि रसिक श्रोत्याला त्यातून जाणवणारी अभिव्यक्ती , अशा तिन्ही अंगांचे अतिशय समर्पक शब्दात केलेले वर्णन आवडले.

आनंदयात्री 31/03/2008 - 10:38
हा बेभान ... हे गाणे तुम्ही म्हणता तसे खरोखरच चित्रदर्शी आहे. बाकी गाणे एकतांनाच्या रसग्रहणाचे, आपल्या मनातल्या भावभावनांचे तुम्ही अत्यंत सुंदर तरल पदर उलगडुन दाखवले आहेत, धन्यवाद. >>जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. १००% सहमत. अशाच रितीने गाण्याचा निखळ आनंद घ्यायला आवडतो.

नीलकांत 31/03/2008 - 12:50
वाह ! ओंकार खुप छान लिहीलं आहेस. गाणं माझ्या आवडीचं आहेच आता ते अधीक गहीरं झालं असं मी म्हणू शकतो. उत्तम रसग्रहणाबद्दल धन्यवाद. नीलकांत

प्रथम अभिनंदन कारण इतके सुंदर आणि सोपे रसग्रहण केले आहे म्हणून. आता विनंती अशाच सुंदर गाण्यांचे रसग्रहण आम्हाला वाचायला मिळू दे...

चतुरंग 31/03/2008 - 16:52
पाडगावकरांच्या ह्या शब्दांमागे काय भावना असतील ह्याचा शोध घेण्याचा अतिशय मर्मज्ञ प्रयत्न तुम्ही केलेला आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन! हृदयनाथांनी गाणे सुरू होतानाच्या वापरलेल्या व्हायोलिनच्या सूरलाटा एका क्षणात घोंघावणारे वारे आणि लाटांचा प्रत्ययकारी आसमंत उभा करतात आणि तीच लाट दीदी त्यांच्या स्वर्गीय आवाजाने कुठल्याकुठे घेऊन जातात, आताही माझ्या कानात ते गाणं घुमू लागलं आहे! चराचरातल्या अमरत्वाचा स्पर्श घेऊन आलेल्या अशा काही मोजक्याच कलाकृती असतात ज्या आपल्या दृश्य अस्तित्वापलीकडचा असा दिव्य अनुभव देऊन जातात जो ओंजळीत घेता येत नाही. तुमच्या रसग्रहणातून तुम्ही त्या मागच्या तुमच्या अनुभूती पोचवल्या आहेत की तुम्हाला आणि आम्हाला जोडून जातात! चतुरंग

केशवराव 31/03/2008 - 20:10
रसग्रहणाचा उत्तम नमुना पेश केल्याबद्दल खरच कौतूक. मनापासून कौतुक ! आपण गाणे कितीतरी वेळा ऐकतो. माझे अत्यंत आवडते गाणे. माझ्याच भावनांना आपण साकारल्या सारखे वाटले. हे श्रेय त्या गाण्याचे. अनेक जणांच्या मनांत एक सारखेच्य्ह चित्र साकारणे ,एकच परीणाम करणे, हे त्या गाण्याचेच श्रेय होय. ह्या गाण्याचे गीतकार, गायिका याचबरोबर संगितकार हा ही श्रेष्ठच होय . स्वरांतून चित्र उभे करणे निश्चीतच दाद देण्याजोगी गोष्ट आहे. पण या सर्वापेक्षा आपले रसग्रहण फारच उतम . त्रिवार कौतुक. - - - - - - - केशवराव.

मुक्तसुनीत 31/03/2008 - 04:20
ॐकाररावांचे मी सर्वप्रथम एका उत्तम प्रतीच्या स्फुटाच्या लिखाणाबद्दल अभिनंदन करतो. काही गोष्टी या अनेक वर्षांच्या सहवासाने , त्यांच्या वारंवार केलेल्या श्रवणाने, आवृतीने, दर्शनाने, (अगदी गंधाने सुद्धा !) आपल्या मनावर खोल संस्कार करतात. आणि काही थोड्या गोष्टी या आपल्या अबोध मनात वास करून असतात. ॐकार यांनी अशा जातीच्या एका अनुभवाला त्यांच्या अबोध मनातून एखाद्या प्रयोगशाळेतल्या वैज्ञानिकासारखे आपल्या शब्दांच्या चिमटीमधे पकडून , आपल्या विश्लेषणादि साधनांच्या मायक्रोस्कोपखाली घालून तपासले आहे. पण हा अभ्यास, हा मागोवा निर्जीव नाही., भावनारहित शुष्क नाही. या एका गाण्याचे नि आपले नाते काय ? त्या गाण्यातल्या व्यक्त झालेल्या अनुभवाचे नि आपले नाते काय ? एका पुरुषकवीने लिहिलेल्या एका स्त्रीच्या मनातील कल्लोळाला एक संगीतकार अशी , हृदयाच्या आर्त स्वरांच्या तारा छेडणारी चाल बांधतो. त्यातील निसर्गाच्या चित्रणाचे , त्या रौद्रभीषण पावसाळी रात्रीच्या पूराचे त्या चालीशी, त्यातल्या पार्श्वसंगीताशी असे काही नाते जुळलेले असते. आणि हे गाणे गाणारा तो दिव्य स्वर ! त्याचे वर्णन पामर शब्दानी काय करायचे ? आणि हे सगळे ऐकणारे आपण. >>>>> ह्या कडव्याचा मी अजून पत्ता शोधतो आहे. गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. पण तोवर जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्ह्या परत हे चित्रं आणखी ताकदीनं समोर उभं राहतं. त्या दुमडलेल्या कोपर्‍यासहित! एखादे गाणे कोट्यावधी लोक शेकडोवेळा ऐकतात. पण कुणीसे म्हण्टले आहे ना , "बडी मुष्किलसे होता है चमन में दीदावर पैदा !" ॐकार यांच्या दीदावरीला माझा कुर्निसात.

मीनल 31/03/2008 - 07:20
सुंदर! स्वरांबद्दल ,शब्दांबद्दल ,त्यातून तुम्हाला कळलेल्या ,न कळलेल्या अर्थाबद्दल छान लिहिले आहे. कधी कधी ही जुनी गाणी नुसतीच ऐकतो आपण. पण विचारच करत नाही त्या विषयाचा! चाल आठवून गात राहिली जातात काही गाणी त्यांचा अर्थ असा शोधावासा वाटतो तुम्ही लिहिलेल्या लेखावरून. हे गाण म्हणजे एक चित्र.आणि तुम्ही एक कोपरा. सर्वसाधारण पणे वाचक ,श्रोता ,प्रेक्षक स्वतःला केंद्रस्थानी मानतो आणि कथा आपल्या भोवती गुंडाळून घेतो. इथे नेमक वेगळ आहे काहीसं! असाधारण! आपल्या चित्रातील `दुमडलेल्या कोप-याची ` उपमा अप्रतिम आहे. `एका पुरूषाने स्वतःला स्त्री रूपात पाहणे `हे त्या गाण्याच श्रेय.लिहिणा-याच आणि गाणा-याच. पण तो श्रोता तितक्या प्रामाणिकपणे त्यात मिसळून जातो ही त्या श्रोत्याची रसिकता! आपले अजून असेच लेख वाचायला मिळावेत अशी इच्छा आहे.

विसोबा खेचर 31/03/2008 - 07:42
क्या बात है ॐकारशेठ! या गाण्याचं तू अतिशय सुरेख रसग्रहण केलं आहेस! काही गाणी ही सहजसोपी असतात व तेवढीच सुंदर असतात, तर काही गाणी सुंदर असतात परंतु तेवढी सहज सोपी नसतात, कठीण असतात. हृदयनाथ मंगेशकरांची बरीचशी गाणी ही या दुसर्‍या प्रकारात मोडतात. म्हणजे सुरेख परंतु तेवढीच कठीण! मला विचारशील तर हे 'असा बेभान...' हे गाणंही सर्वच दृष्टीने (म्हणजे शब्द,चाल, म्हणणे) अतिशय कठीण गाणं आहे तरीही फार सुरेख आहे! आणि या कठीण परंतु अत्यंत सुरेख गाण्याचं तू तेवढंच सुरेख रसग्रहणही केलं आहेस हे मला विशेष वाटतं! मनापासून अभिनंदन...! गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. नक्कीच लागेल! गाण्याची श्रवणभक्ति, गाण्याची साधना नेहमीच फलदायी होते! मात्र वारंवार डुबक्या मारून खोल समुद्राच्या तळाशी सतत जात राहिलं पाहिजे, त्यातली रत्न, माणिकमोती शोधण्यासाठी! एका सुंदर रसग्रहणाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन! खूप सुंदररित्या तू या गाण्याकडे बघितलं आहेस! अजूनही अश्याच काही तुझ्या मनाचा ठाव घेतलेल्या गाण्यांबद्दल इथे लिही, ही विनंती... आपला, (गानप्रेमी!) तात्या.

मदनबाण 31/03/2008 - 08:07
ॐकार सर आपल गाण्याच भाव विष्लेषण अगदी जबरदस्त आहे. आपले अजुन असेच लेख वाचण्याचा आनंद सर्व मि.पा करांना सदैव मिळो..... (एक-दोन तोडके मोडके शब्द सुद्धा सरळ न लिहु शकणारा) मदनबाण

सहज 31/03/2008 - 08:36
ॐकार, अतिशय सुंदर रसास्वाद!! मुक्तसुनित यांचा प्रतिसाद देखील नेहमीप्रमाणेच सुबोध.

प्राजु 31/03/2008 - 08:45
ॐकार, अतिशय सुंदर.. आपण इतके सुंदर रसग्रहण केले आहे की आता लगेच हे गाणे ऐकण्याची इच्छा होते आहे. कितिदा ऐकले तरी समाधान होत नाही. आपले अभिनंदन या सुंदर गाण्याच्या सुरेख रसग्रहणाबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

प्रमोद देव 31/03/2008 - 08:54
ॐकार अतिशय उत्तम असे रसग्रहण सादर केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! गाण्यातला भाव,त्या भावांना पोषक असे संगीत आणि रसिक श्रोत्याला त्यातून जाणवणारी अभिव्यक्ती , अशा तिन्ही अंगांचे अतिशय समर्पक शब्दात केलेले वर्णन आवडले.

आनंदयात्री 31/03/2008 - 10:38
हा बेभान ... हे गाणे तुम्ही म्हणता तसे खरोखरच चित्रदर्शी आहे. बाकी गाणे एकतांनाच्या रसग्रहणाचे, आपल्या मनातल्या भावभावनांचे तुम्ही अत्यंत सुंदर तरल पदर उलगडुन दाखवले आहेत, धन्यवाद. >>जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. १००% सहमत. अशाच रितीने गाण्याचा निखळ आनंद घ्यायला आवडतो.

नीलकांत 31/03/2008 - 12:50
वाह ! ओंकार खुप छान लिहीलं आहेस. गाणं माझ्या आवडीचं आहेच आता ते अधीक गहीरं झालं असं मी म्हणू शकतो. उत्तम रसग्रहणाबद्दल धन्यवाद. नीलकांत

प्रथम अभिनंदन कारण इतके सुंदर आणि सोपे रसग्रहण केले आहे म्हणून. आता विनंती अशाच सुंदर गाण्यांचे रसग्रहण आम्हाला वाचायला मिळू दे...

चतुरंग 31/03/2008 - 16:52
पाडगावकरांच्या ह्या शब्दांमागे काय भावना असतील ह्याचा शोध घेण्याचा अतिशय मर्मज्ञ प्रयत्न तुम्ही केलेला आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन! हृदयनाथांनी गाणे सुरू होतानाच्या वापरलेल्या व्हायोलिनच्या सूरलाटा एका क्षणात घोंघावणारे वारे आणि लाटांचा प्रत्ययकारी आसमंत उभा करतात आणि तीच लाट दीदी त्यांच्या स्वर्गीय आवाजाने कुठल्याकुठे घेऊन जातात, आताही माझ्या कानात ते गाणं घुमू लागलं आहे! चराचरातल्या अमरत्वाचा स्पर्श घेऊन आलेल्या अशा काही मोजक्याच कलाकृती असतात ज्या आपल्या दृश्य अस्तित्वापलीकडचा असा दिव्य अनुभव देऊन जातात जो ओंजळीत घेता येत नाही. तुमच्या रसग्रहणातून तुम्ही त्या मागच्या तुमच्या अनुभूती पोचवल्या आहेत की तुम्हाला आणि आम्हाला जोडून जातात! चतुरंग

केशवराव 31/03/2008 - 20:10
रसग्रहणाचा उत्तम नमुना पेश केल्याबद्दल खरच कौतूक. मनापासून कौतुक ! आपण गाणे कितीतरी वेळा ऐकतो. माझे अत्यंत आवडते गाणे. माझ्याच भावनांना आपण साकारल्या सारखे वाटले. हे श्रेय त्या गाण्याचे. अनेक जणांच्या मनांत एक सारखेच्य्ह चित्र साकारणे ,एकच परीणाम करणे, हे त्या गाण्याचेच श्रेय होय. ह्या गाण्याचे गीतकार, गायिका याचबरोबर संगितकार हा ही श्रेष्ठच होय . स्वरांतून चित्र उभे करणे निश्चीतच दाद देण्याजोगी गोष्ट आहे. पण या सर्वापेक्षा आपले रसग्रहण फारच उतम . त्रिवार कौतुक. - - - - - - - केशवराव.
कधी कधी बर्‍याच गाण्यांचा विचार डोक्यात घोळत असतो. विचार घोळवावा लागतो. गाणी एकरूपच असतात, ती घोळवावी लागत नाहीत. एखाद्या गाण्याचे शब्द, लय, ताल, राग, सुरावट लक्षात राहण्यामागे कारण काय असेल? जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. उदाहरणं अनेक आहेत . असा बेभान हा वारा हे गाणं ऐकताना मी नेहमी मला एका चित्राचा कोपरा समजत आलो आहे. ते चित्र इतकं सजीव आहे की मला ते अगदी तसंच शब्दात बांधणं जमत नाही.

उत्तर शोधायचे आहे!

ॐकार ·

विसोबा खेचर 31/03/2008 - 02:32
१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. सहमत आहे! २) पण एकटा बलवान पुरुष बाकी ४९ पुरुष एकत्र आले तर त्यांच्याशी दोन हात करू शकणार नाही. हम्म! भिती रास्त आहे! ३) तिसर्‍या स्त्रीला तर ही समस्याच वाटत नाही. जे काही चालले आहे ते आलबेल आहे असे तिला तिचे अनुभव पटवून देत होते. अगदी बरोबर. मग तिसर्‍या स्त्रीचं चुकलं कुठे? तिने तिच्या अनुभवाप्रमाणे उत्तर दिलंन त्यात तिला त्या संताने नापास करण्यासारखं काय होतं? कदाचित, त्या वेश्येकडे जगाचा अनुभव त्या संतापेक्षाही अधिक असावा! तिने अधिक दुनिया पाहिली असावी, तिचं अनुभवचिश्व त्या संतापेक्षा अधिक वास्तव असावं असंच निदान आम्ही तरी म्हणू! असो.. :) ४) चौथ्या स्त्रीला मात्र आपले अज्ञान उमगले. या स्त्रीबद्दल काही अधिक माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं! तिचं वय काय होतं? ती दिसायला कशी होती, वगैरे वगैरे! कदाचित, तो संत तिच्या रुपावर मोहीत झाला असेल आणि त्याने तिला शिष्य म्हणून पसंत केले असेल! शिवाय ती अज्ञानी आहे, अशी तिने स्वत:हूनच कबुली दिली होती, त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी अगदी पहिल्यापासून शिकवणे अधिक सोयिस्कर असाही विचार त्या संताने केला असेल! असो, परंतु तिच्या वयाबद्दल आणि रुपाबद्दल पुरेसा विदा उपलब्ध नसल्यामुळे तूर्तास तरी आम्ही आमचं मत राखीव ठेवत आहोत! :) --संत तात्याबा महाराज.

मदनबाण 31/03/2008 - 07:16
१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. खरच आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा होउच शकत नाही. आजच्या तरुण पिढी मधे मात्र आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे असे दिसुन येते, सामुहिक आत्महत्येचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. (अख्खे कुटुंब आत्महत्या करते किंवा त्यांचा कुटुंबप्रमुख त्यांना मारुन स्वतः ला संपवतो) आत्महत्या ही आजच्या काळातील भिषण समस्या आहे. आत्महत्या हे कुठल्या ही समस्येचे उत्तर नसुन ,तो फक्त पळपुटेपणा आहे असे मला वाटते. २)ज्याला आपले अज्ञान उमगते त्यालाच ज्ञानाचा मार्ग दाखवता येतो. अगदी सहमत..... (उत्तराच्या शोधात) मदनबाण

पहिल्या तिघींनाही काही तरी ज्ञान होते म्हणून तो सूफी संत त्यांना परत पाठवून देतो. चौथी म्हणते. 'ह्याबाबतीत मी अज्ञानी आहे.' ह्या विधानातून, तिच्या जवळही 'बाकी ज्ञान आहे', असा ती इन्डायरेक्ट दावा करते आहे. तरीही तो सूफी संत तिला आपली (?) शिष्या म्हणून पत्करतो. म्हणजेच 'ह्याबाबतीतले' ज्ञान तिला मिळवून देण्यासाठीच (फक्त) तो तिला निवडतो असे 'वरकरणी' तरी दिसते आहे.

विसोबा खेचर 31/03/2008 - 02:32
१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. सहमत आहे! २) पण एकटा बलवान पुरुष बाकी ४९ पुरुष एकत्र आले तर त्यांच्याशी दोन हात करू शकणार नाही. हम्म! भिती रास्त आहे! ३) तिसर्‍या स्त्रीला तर ही समस्याच वाटत नाही. जे काही चालले आहे ते आलबेल आहे असे तिला तिचे अनुभव पटवून देत होते. अगदी बरोबर. मग तिसर्‍या स्त्रीचं चुकलं कुठे? तिने तिच्या अनुभवाप्रमाणे उत्तर दिलंन त्यात तिला त्या संताने नापास करण्यासारखं काय होतं? कदाचित, त्या वेश्येकडे जगाचा अनुभव त्या संतापेक्षाही अधिक असावा! तिने अधिक दुनिया पाहिली असावी, तिचं अनुभवचिश्व त्या संतापेक्षा अधिक वास्तव असावं असंच निदान आम्ही तरी म्हणू! असो.. :) ४) चौथ्या स्त्रीला मात्र आपले अज्ञान उमगले. या स्त्रीबद्दल काही अधिक माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं! तिचं वय काय होतं? ती दिसायला कशी होती, वगैरे वगैरे! कदाचित, तो संत तिच्या रुपावर मोहीत झाला असेल आणि त्याने तिला शिष्य म्हणून पसंत केले असेल! शिवाय ती अज्ञानी आहे, अशी तिने स्वत:हूनच कबुली दिली होती, त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी अगदी पहिल्यापासून शिकवणे अधिक सोयिस्कर असाही विचार त्या संताने केला असेल! असो, परंतु तिच्या वयाबद्दल आणि रुपाबद्दल पुरेसा विदा उपलब्ध नसल्यामुळे तूर्तास तरी आम्ही आमचं मत राखीव ठेवत आहोत! :) --संत तात्याबा महाराज.

मदनबाण 31/03/2008 - 07:16
१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. खरच आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा होउच शकत नाही. आजच्या तरुण पिढी मधे मात्र आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे असे दिसुन येते, सामुहिक आत्महत्येचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. (अख्खे कुटुंब आत्महत्या करते किंवा त्यांचा कुटुंबप्रमुख त्यांना मारुन स्वतः ला संपवतो) आत्महत्या ही आजच्या काळातील भिषण समस्या आहे. आत्महत्या हे कुठल्या ही समस्येचे उत्तर नसुन ,तो फक्त पळपुटेपणा आहे असे मला वाटते. २)ज्याला आपले अज्ञान उमगते त्यालाच ज्ञानाचा मार्ग दाखवता येतो. अगदी सहमत..... (उत्तराच्या शोधात) मदनबाण

पहिल्या तिघींनाही काही तरी ज्ञान होते म्हणून तो सूफी संत त्यांना परत पाठवून देतो. चौथी म्हणते. 'ह्याबाबतीत मी अज्ञानी आहे.' ह्या विधानातून, तिच्या जवळही 'बाकी ज्ञान आहे', असा ती इन्डायरेक्ट दावा करते आहे. तरीही तो सूफी संत तिला आपली (?) शिष्या म्हणून पत्करतो. म्हणजेच 'ह्याबाबतीतले' ज्ञान तिला मिळवून देण्यासाठीच (फक्त) तो तिला निवडतो असे 'वरकरणी' तरी दिसते आहे.
ओशो रजनिश यांच्या संत कबीरांवरील प्रवचनांचे भाषांतर वाचण्याचा योग आला. त्यात ओशोंनी पुढील दाखला दिला आहे - एकदा चार बायका एक प्रसिद्ध सूफी संताकडे ज्ञानप्राप्तीकराता जातात आणि त्याने गुरू बनावे अशी विनवणी करतात. त्यांना त्याच्याकडून ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्याअय्चे असते. परंतु सूफी संत मात्र तयार होत नाही. त्या बायका तश्याच दाराशी भुकेल्या तहानलेल्या बसून राहतात. अखेर त्याला त्यांची दया येते. तो त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवतो. परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या स्त्रीला शिष्या करून घेण्यास तो तयार होतो.

विडंबनासंबंधी निवेदन

चतुरंग ·

सर्किट 28/03/2008 - 01:22
प्रत्येकाची श्रद्धा अभंगात किंवा देवाच्या गाण्यात असेलच असे नाही. माझ्या सारखे काही लोक भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची देखील भावभक्तीने पारायणे करतो. तेव्हा स्वतःवर बंधनेच घालून घेणार असाल, तर आमच्या भावनांची देखील पर्वा करावी, ही विनंती. तोवर आम्ही "घालून लोटांगण वर करी ढुं**" म्हणतो, चालीत. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग 28/03/2008 - 01:38
पण ते उत्तम असेल तर मला वर्ज्य नाही कारण अभंग/देवाची गाणी ह्यातल्या भावना ते लिहिणारी संत मंडळी आणि गज़ला ह्यात मी फरक करतो. बाकी तुमचं ते "घालून लोटांगण वर करी ढुं**" चालू दे!! चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 28/03/2008 - 01:48
कारण अभंग/देवाची गाणी ह्यातल्या भावना ते लिहिणारी संत मंडळी आणि गज़ला ह्यात मी फरक करतो. हम्म! हे मात्र पटले...! इव्हन, उद्या कुणी उठून जर बाबूजींच्या, 'दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगति पुत्र मनवाचा' या अत्यंत उच्च दर्जा असलेल्या गाण्याचे जर काही वायफळ विडंबन करू लागला तर मलाही ते सहन होणार नाही! असो, गेल्या काही दिवसांपासून मिपावरील विडंबनाचं गळू खूप सुजलं होतं. या चर्चाप्रस्तावाच्या निमित्ताने रंगाने त्या गळवाला सुई लावलीन हे एका अर्थी बरंच झालं! आता मिपावरील मंडळींचे याला काय नी कसे प्रतिसाद येतात, त्या प्रतिसादांतील एकंदरीत सूर कसा आहे हे पाहून मिपावर केले गेलेले विडंबन तसेच ठेवायचे की अप्रकाशित करायचे यावर जनरल डायर काय तो निर्णय घेतीलच! अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 28/03/2008 - 01:50
एकसाथ पेले भरता, दोष ना कुणाचा सुराधीन आहे जगती, पुत्रमानवाचा पण हे गाणे गदिमांनी लिहिलेले आहे. आता अपमान त्यांचा झाला की बाबूजींचा ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 28/03/2008 - 02:00
हे वाचून गदिमांनी हा विषय, पेले भरणे, ढोसणे, सुराधीनता इ. इ. त्यांच्या रचनांमधून/विडंबनांतून किती वेळा चघळले आहे, याची सांख्यिकीय तपासणी करायचा मोह झाला. (संख्याशास्त्री)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 28/03/2008 - 02:04
मुळात गदिमांनी विडंबने केली आहेत का ? माझ्या तरी वाचण्यात नाहीत. तुमचे सांख्यिकीचे अर्धे काम तर निपटले. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 28/03/2008 - 02:07
कान्ट से! त्याकरता मला विडंबन पूर्ण वाचावं लागेल. शिवाय मूळ गाणंही गदिमांचंच आहे तेव्हा त्यांना त्याच गाण्याच्या विडंबनाचाही अधिकार आहे असं मला वाटतं! आणि मुळात त्याकरता, जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात, दु:खमुक्त जगला कुणी जीवनात वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा! यासारख्या ओळी लिहायची विडंबनकाराची ताकद हवी, आणि ती गदिमांची होती! तेव्हा त्यांच्याच गाण्याचं विडंबन जर गदीमांनी केलं तर तो त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं, परंतु उद्या खुद्द गदिमांनी जरी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' या कुसुमाग्रजांच्या कवितेचं काही वायफळ विडंबन केलं तरी ते मला खटकेलच! आणि मी बाबूजींचा अपमान होतो आहे असं कुठेही म्हटलेलं नाही! आपण कृपया माझे प्रतिसाद नीट वाचत जावे ही विनंती... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 28/03/2008 - 02:13
यासारख्या ओळी लिहायची विडंबनकाराची ताकद हवी, आणि ती गदिमांची होती! हेच तर म्हणतो. विडंबनकाराची ताकद असती तर त्याने विडंबने का केली असती ? अशा ताकदवान ओळीच लिहिल्या असत्या की ! तेव्हा त्यांच्याच गाण्याचं विडंबन जर गदीमांनी केलं तर तो त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं म्हणजे, फक्त स्वतःच्याच कवितांचे/गझलांचे/अभंगांचे विडंबन करावे, असे तुमचे म्हणणे आहे का ? परंतु उद्या खुद्द गदिमांनी जरी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' या कुसुमाग्रजांच्या कवितेचं काही वायफळ विडंबन केलं तरी ते मला खटकेलच! केशवसुतांच्या "आम्ही कोण म्हणूनी.." चे अत्र्यांनी केलेले विडंबनही तुम्हाला वायफळ वाटते का ? की फक्त अत्रे इतरही काही लिहायचे, म्हणून ते विडंबन चांगले ? - सर्किट

In reply to by चतुरंग

प्राजु 28/03/2008 - 02:05
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे. अगदी खरे बोललात... मलाही असेच झाले आहे. आणि आपल्या निर्णयाचा मी आदर करते. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आम्हाला आपल्या भावनांची कदर आहे. पण मग तुम्ही पण भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची विडंबने करू आणि वाचू नका. वाचलात तर प्रतिसाद देऊ नका. तोपर्यंत आम्ही पण "भिजूनी पाण्यात सार्‍या बो* माझा कोरडा" असे म्हणतो चालीत. पुण्याचे पेशवे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सन्जोप राव 28/03/2008 - 08:32
माझ्या सारखे काही लोक भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची देखील भावभक्तीने पारायणे करतो. हे पटले. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

सर्किट 28/03/2008 - 08:51
संजू, तुला पटणारच ! वेगळे काहीतरी असेल तर सांग ! - सर्किट

In reply to by चतुरंग

बेसनलाडू 28/03/2008 - 01:57
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे. --- सहमत आहे. येथे कोणीतरी समदु:खी भेटल्याचे/ने बरे वाटले. तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. --- हे वाचूनही बरे वाटले. म्हणूनच एकूण निवेदन वाचून ((प्राप्त परिस्थिती कशीही असली तरी) जरा तरी)बरे वाटले, असे म्हटले. (स्पष्टीकारक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग 28/03/2008 - 02:02
आधीच्या प्रतिसादातल्या 'जर तरी' मधे तो 'जरा तरी' होता हे मला समजले नाही आणि म्हणून विचारले. धन्यवाद!! चतुरंग

विसोबा खेचर 28/03/2008 - 01:36
की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. मी ही हेच म्हणू पाहतो! परंतु अद्याप नक्की नाही! :) बाकी, रंगाचं निवेदन पाहून थोडासा विचारात पडलो आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन 29/03/2008 - 04:21
तात्या काय हे? विडंबना सारखा आमच्या जीव्हाळ्याच्या विषयावर चक्क तुम्ही बंदी आणायची भाषा करता आहात? (व्यथित) कारकुन

चतुरंग 28/03/2008 - 02:14
योग्य विडंबनांनाही इतके पटापट प्रतिसाद येत नाहीत पण इथे चर्चा मात्र कशी घसरवत न्यायची त्याला फाटे कसे फोडायचे बघण्यासारखे आहे! का कोण जाणे पण वैफल्यग्रस्त मनोवृत्तीचे निदर्शक आहे की काय असे वाटते. चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 28/03/2008 - 02:16
अहो, चर्चा म्हटले की हे होणारच. स्वानुभवावरून सांगतो ! असे वाईट नका वाटून घेऊ बुवा. सार्वजनिक संकेतस्थळावर वावरण्यासाठी गेंड्याची कातडी लागते. :-) - सर्किट

सचिन 28/03/2008 - 02:33
या विषयाला हात घातल्याबद्दल चतुरंगांचे आभार. मी मिपाचा नव्यातला सदस्य आहे..आणि कवितांमधे जास्त स्वारस्य असलेला. परंतु, गेले काही दिवस विडंबनाच्या अतिरेकामुळे अक्षरशः उबग आला आहे. (उबग येण्याच्या पुढच्या परिस्थितीला काय म्हणतात ते माहीत नाही..). कशाचे आणि कसे विडंबन करावे यावर कोणी काही बंधने (स्वतःवर अथवा दुसर्‍यावर) - घालोत वा न घालोत, पण कवितांचे वाचन बंद करून मी माझ्यापुरता प्रश्न सोडविला आहे. कविता वाईटच आहेत असे मी म्हणत नाही, मीही काही कविता आवडल्याचे प्रतिसाद दिले आहेत, पण अशा कवितांचा अतिरेक मात्र निश्चितच झाला आहे, आणि "जे न देखे..." मधले वैविध्य नष्ट झाले आहे. (वि.सू. : कोणत्याही विडंबनकारास दुखावण्याचा हेतू नाही..)

In reply to by सचिन

सर्किट 28/03/2008 - 02:54
पण कवितांचे वाचन बंद करून मी माझ्यापुरता प्रश्न सोडविला आहे. हा अगदी अचूक निर्णय. कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. - सर्किट

कोलबेर 28/03/2008 - 03:02
अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल!
डायर साहेबांना जर बंदीच घालायची आहे आणि ती सदस्यांच्या आवडी निवडीवर आधारीत आणायची आहे तर मला, हिंदुत्ववादी/सनातनी, ज्योतिष, तंत्र मंत्र स्तोत्र, भाकड अंधश्रद्धा आणि चारोळ्या असल्या लिखाणावर विडंबनांआधी बंदी आणलेली आवडेल. (बिल्ला क्र. २१) कोलबेर

मिपा वर आणि लेखननियंत्रण? मला वाटत होतं की मिपा चा जन्मच मुळी अशा प्रकारच्या नियंत्रणांविरुद्ध बंडखोरी म्हणून झाला होता... कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. संपूर्ण सहमत! डायर साहेबांना जर बंदीच घालायची आहे आणि ती सदस्यांच्या आवडी निवडीवर आधारीत आणायची आहे तर मला, हिंदुत्ववादी/सनातनी, ज्योतिष, तंत्र मंत्र स्तोत्र, भाकड अंधश्रद्धा आणि चारोळ्या असल्या लिखाणावर विडंबनांआधी बंदी आणलेली आवडेल. भावनांशी सहमत, पण त्याची जरूर आहे असे वाटत नाही!! अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल! संपादकांनी वरील वाक्य म्हटल्यामुळेच आम्ही आमचे विचार इथे मांडत आहोत (नाहीतर या साठमारीत शिरण्याची आमची छाती नाही!!!!:)) विडंबन हा एक मान्यताप्राप्त साहित्यप्रकार आहे. कवीने कोणत्या काव्याचे विडंबन करावे आणि कोणत्या नाही हे ठरवण्याचा वाचकांना अधिकार आहे असे मला वाटत नाही. वाचकांना असे लिखाण न वाचण्याचा वा त्या लिखाणावर त्यांची अनुकूल/ प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा जरूर अधिकार आहे. व्यक्तिगत टीका किंवा भांडणे चालू असतील तर संपादक मंडळाने जरूर हस्तक्षेप करावा. कोणी जर संकेतस्थळाच्या नियमांचे उल्लंघन करीत असेल (कॉपीराईट वगैरे) तर जरूर लेखकाला समज द्यावी पण विषयाच्या/ लेखनाच्या प्रकाराच्या निवडीत हस्तक्षेप करू नये असे मला वाटते. जर विषय वा केलेले लिखाण फालतू असेल तर त्याचा प्रतिक्रियेतून समाचार घ्यायला सभासद समर्थ आहेतच की!! :))) मिपा चा सभासदवर्ग हा विस्तृत आहे त्यामुळे इथे वेगवेगळ्या विचारांची/ स्वभावांची माणसे येणार हे सहाजिकच आहे. सर्वांना सर्वच विषय/ लेखनप्रकार आवडतील असे मुळीच नाही. तेंव्हा आपल्याला जे रुचते ते वाचावे/ लिहावे, त्यावर प्रतिक्रिया द्यावी हे उत्तम!! आम्हाला खादाडी करायला आवडते पण पाककलेतील काही शष्प कळत नाही. तरीसुद्धा मामलेदाराच्या मिसळीची अचूक रेसेपी मिळाल्याबद्दल त्या लेखकांचे (स्वाती राजेश आणि पेठकरबुवा) आम्ही अनंत आभारी आहोत. मन जरा मोकळं ठेवलं की असे अनेक अनाहूत लाभ होतात... मिपा वर काय विषयावर लिखाण होतं आणि काय लेखनप्रकार हाताळले जातात यापेक्षा मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ही आम्हाला सर्वात आवडणारी गोष्ट आहे. आता अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलं की त्याचा थोडाफार डावा-उजवा उपयोग केला जातोच. पण त्याविरुद्ध उपाय म्हणून एखाद्या विषयावर किंवा साहित्यप्रकारावर बहिष्कार टाकायचा ही भूमिका पटू शकत नाही. विशेषतः विडंबन हे अतिप्रसिध्द साहित्याचंच होतं. हे विडंबन आहे हे माहिती व्हायला वाचकांना मूळ साहित्यकृती माहिती असणे आवश्यक असते. अप्रसिद्ध साहित्याचे विडंबन करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे प्रसिध्द गाणी/ कविता, अभंग/ओव्या यांचे विडंबनच प्रामुख्याने होणार! आता सेन्सेटिव्ह व्यक्ती त्यामुळे नाराज होण्याची शक्यता आम्ही नाकारीत नाही, पण त्यांच्यापुढे अशा प्रकारचे लेखन न वाचण्याचा पर्याय असतो. आणि ही सेंन्सिटिव्हिटी कालानुरूप बदलत असते. "आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेतही न वाली" हे काव्य रविकिरणमंडळाच्या काळात अनेकांना धक्का देउन गेलेच असते... असो. मिपा बद्दल आमच्या मनात आत्मियता व कौतुक आहे ते त्याने केलेल्या प्रस्थापितांविरुद्धच्या बंडखोरीबद्दल आणि येथील अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल! त्यामुळे आम्ही इतर कुठेही न लिहिता फक्त मिपावर लिहितो. म्हणून रहावले नाही आणि चार शब्द लिहिले. बाकी सर्व संपादकमंडळाच्या आणि मालकांच्या हाती! अधिकउणे लिहिले गेले असेल तर क्षमा असावी. -पिवळा डांबिस

सुशील 28/03/2008 - 08:24
सर्कीट साहेब आणी सर्व विडंबन समर्थक, त्या जोनी लिव्हर नावाच्या आचरट माकडान मागे एकदा राष्त्रगितावर नृत्य केले होते त्याविशयी आपले मत काय? उद्या इथे कोणि जन गण मन चे विडंबन केलेतर तुम्ही त्याचे स्वागतच करनार का? उत्तराचि वाट पहात आहे.

In reply to by सुशील

सर्किट 28/03/2008 - 08:40
नक्कीच. तो त्याचा अधिकार आहे ! (आता, जन गण मन चे विडंबन प्रकाशित करणार, नक्कीच. सर्व माकडांनी आपापल्या शेपट्या आवश्यक ठिकाणी घालाव्यात, ही विनंती.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 28/03/2008 - 08:44
ते विडंबन प्रकाशित करू देणार का/मिपावर राहू देणार का, याची उत्सुकता राहील. त्यावरून मिपाचे विडंबनविषयक धोरणही (हळूहळू)स्पष्ट होईल(च!) (उत्सुक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 28/03/2008 - 08:49
आपले तिरके प्रतिसाद कितीही आले, तरी आम्ही ते इथे टाकणारच, बेला ! आमच्या नावाखाली टाकणार, इतरांच्या नव्हे ! त्याची पूर्ण जबाबदारीही आमचीच, इतरांच्या टोपणनावाखाली नाही ते आम्ही ढकलणार. शेपट्या घालणारे माउली भक्त आम्ही नाही ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 28/03/2008 - 08:52
आम्ही फक्त काय होईल, काय नाही याबद्दल जास्त उत्सुक. धोरणांबद्दल उत्सुक. विडंबनाबद्दल कमी किंवा नल्. कुणी सांगावे, कदाचित एखादे जबरा टाकालही, जेणेकरून आपल्या पुढच्या कलाकृतींची उत्सुकता वाढेल. आपल्या हातचे असे काही वाचले नाही ना अजून! बाकी चालू द्यात तुमचे. (उत्सुक)बेसनलाडू

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

व्यंकट 28/03/2008 - 11:56
आमच्या मताला फारशी किंमत नाही हे आम्ही जाणून आहोत म्हणून आमच्या पुढील संभाव्यतः प्रक्षोभक वाक्यावरून गदारोळ होवू नये. जन, गण, मन हेच विडंबन आहे असे आमचे मत आहे. व्यंकट

In reply to by व्यंकट

धमाल मुलगा 28/03/2008 - 12:15
व्य॑कोबा, आपल्याशी सहमत. राजा जॉर्ज च्या स्तुतीप्रित्यर्थ हे गायले (भारतभाग्यविधाता) अस॑ वाचल्याच॑ स्मरत॑. असो, पुन्हा ह्यावर वाद होतील. सध्या वातावरण बिघडल॑ आहे ! आपला, -(सहमत) ध मा ल.

प्रमोद देव 28/03/2008 - 08:28
मिपा वर काय विषयावर लिखाण होतं आणि काय लेखनप्रकार हाताळले जातात यापेक्षा मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ही आम्हाला सर्वात आवडणारी गोष्ट आहे. आता अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलं की त्याचा थोडाफार डावा-उजवा उपयोग केला जातोच. पण त्याविरुद्ध उपाय म्हणून एखाद्या विषयावर किंवा साहित्यप्रकारावर बहिष्कार टाकायचा ही भूमिका पटू शकत नाही. विशेषतः विडंबन हे अतिप्रसिध्द साहित्याचंच होतं. हे विडंबन आहे हे माहिती व्हायला वाचकांना मूळ साहित्यकृती माहिती असणे आवश्यक असते. अप्रसिद्ध साहित्याचे विडंबन करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे प्रसिध्द गाणी/ कविता, अभंग/ओव्या यांचे विडंबनच प्रामुख्याने होणार! डांबीसरावांशी ह्या बाबतीत सहमत आहे. मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! रंगरावांशी ह्या बाबतीत सहमत आहे. ह्यातला विटंबनसत्र हा शब्द महत्वाचा. आता माझे मतः विडंबन कुणी करावे,का करावे,कशाचे करावे आणि कसे करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यात एक किमान दर्जा असावा अशी अपेक्षा मी एक वाचक म्हणून करतो. तसेच घेतले एखादे गीत,कविता,अभंग वगैरे वगैर आणि पँटमध्ये शर्ट खोचावा त्या पद्धतीने त्यात बाई,बाटली(हे फारच वाढलंय हल्ली) आणि तत्सम शब्द अधून मधून पेरले की झाले विडंबन.... असे बर्‍याच जणांना वाटते. क्षणभर एक गंमत म्हणून ते चालूनही जाते. पण माझ्या मते ते विडंबन नसून विटंबन(ना) असते. हातात कुंचला आणि काळ्या रंगाचा डबा आहे आणि दिसेल तिथे तो रंग फासायचा... अशा तर्‍हेचा अट्टाहास वाटतो त्यामागे. तेव्हा समस्त प्रतिभावंतांना माझी विनंती आहे की.... विडंबन आपण जरूर करा. त्यात दारू,बाई वगैरे विषय वर्ज्य नाहीत. पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. त्यात खरे तर तुमचेच कल्पनादारिद्र्य दिसून येते. म्हणून त्यात वैविध्य आणा आणि मुख्य म्हणजे विडंबनात कुठेही वैयक्तिक आकस,दुस्वास,शेरेबाजी असल्या गोष्टी येऊ देऊ नका. इथल्या समस्त विडंबनकारांनी हे आव्हान ताकतीने पेलावे असे मी त्यांना आवाहन करतो.

प्राजु 28/03/2008 - 08:55
तेव्हा समस्त प्रतिभावंतांना माझी विनंती आहे की.... विडंबन आपण जरूर करा. त्यात दारू,बाई वगैरे विषय वर्ज्य नाहीत. पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. त्यात खरे तर तुमचेच कल्पनादारिद्र्य दिसून येते. म्हणून त्यात वैविध्य आणा आणि मुख्य म्हणजे विडंबनात कुठेही वैयक्तिक आकस,दुस्वास,शेरेबाजी असल्या गोष्टी येऊ देऊ नका. प्रमोदकाका, हे म्हणणे तुमचे एकदम पटले... पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सुशील 28/03/2008 - 09:05
पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. प्राजुताई तुम्ही काही बोलु नका. मध्यंतरी दळण दळल्या सारखं तुम्ही देखिल चारोळ्या टाकल्या होत्यात तेव्हा सगळयांच्या टिकेमुळे मलापण माझे लिखाण थांबवावे लागले. मला खरं तर चारोळ्या लिहायला खुप आवडत पण त्यामुळे लिहु शकलो नाही ना. प्रामाणीकपणे सांगतो आहे कृपया राग मानु नका.

In reply to by सुशील

प्राजु 28/03/2008 - 09:14
प्राजुताई तुम्ही काही बोलु नका. मी बोलायचं की नाही हे तुम्ही नका ठरवू. तुम्हांला जे जमतं ते करा. मध्यंतरी दळण दळल्या सारखं तुम्ही देखिल चारोळ्या टाकल्या होत्यात तेव्हा सगळयांच्या टिकेमुळे मलापण माझे लिखाण थांबवावे लागले. मला खरं तर चारोळ्या लिहायला खुप आवडत पण त्यामुळे लिहु शकलो नाही ना. माफ करा.. पण मी त्या एकटिने नव्हत्या टाकल्या, मिपावरचे बरेच लोक होते इथे आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये एकच विषय नव्हता. तेव्हा सगळ्यांनी टिका केली असे कोणी सांगितले तुम्हाला? तेव्हा काय झाले हे माहिती नसेल तर तुम्हांला बोलण्याचा अधिकार नाही. आणि जमल्यास तो धागा काढून वाचा आणि तुम्ही लिहिलेल्या चारोळ्या आणि त्या धाग्यातील चारोळ्या यांचि तुलना करा.. म्हणजे तुम्ही कुठे आहात हे तुम्हालाच समजेल. आणि तुमच्या चारोळ्या जर चांगल्या असत्या तर त्याला नक्की प्रतिसाद मिळाला असता.. यावरूनच तुम्हि लक्षात घ्या काय ते. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सुशील 28/03/2008 - 09:22
माफ करा प्राजुताई मी राग मानु नका म्हणुन पण तुम्ही रागावलात. पण मला सांगा चारोळ्या टाकणारे अनेकजण असले तरी विडंबन टाकणारेपण अनेकच आहेत. आणि त्यामध्ये बहुतेक वेळा प्रेम वगैरे असा एकच विषय पण होता. तसेच माझ्या चारोळीना आलेले प्रतिसाद पुन्हा बघा. प्रतिसाद आणि वाचने मिळाले होते. मि कुठे आहे ते मला माहित आहे पण तुम्ही अशी माझी जागा दाखवुन तुम्ही कुठे आहेत ते दाखवले. यापुढे मला तुमच्याशी बोलायचे नाहि.

In reply to by सुशील

प्राजु 28/03/2008 - 18:35
तुमच्या या निर्णयाचा तुमच्या पेक्षा मलाच जास्ती आनंद झाला.... कीप इट अप. - (सर्वव्यापी)प्राजु

तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. मात्र चांगला/वाइट प्रतिसाद लिहिण्याचे शहाणपण सुदैवाने येथील वाचकाजवळ आहे, ज्याचा त्याचा निर्णय ज्याने त्याने घ्यावा. आम्ही आम्हाला आवडणार्‍या विडंबनांना विषय कोणतेही असले तरी दाद देत राहू . कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. सहमत आहे. मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट 28/03/2008 - 09:02
मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे. आपण प्राडॉ डायर आहात का ? - (अचंभित) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आपण प्राडॉ डायर आहात का ? नाही, आम्ही येथे आपल्यासारखेच एक वाचक आहोत. वाचक म्हणुन अशा लेखनावर बंदी किंवा असे लेखन अप्रकाशित होऊ नये असे वाटते. ( आपण कामात असता त्याचा आम्हाला आनंद असतो. आपण हे असे रिकामे झाले की आम्हाला आपल्याला प्रत्येक शब्दा शब्दाचे स्पष्टीकरण द्यावे लागते. )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुशील 28/03/2008 - 09:25
सर मी पण तुम्हाला संपादक समजत होतो तुम्ही जर फक्त वाचक आहे म्हणता आहात तर इतक्या ठोसपणे हे कसे म्हणालात? मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 28/03/2008 - 09:06
सर, कोणत्याही प्रकारच्या लेखनावर बंदी येणार नाही म्हणालात; पण आध्यात्मिक लेखन किंवा त्याच्या माध्यमातून पसरवले जाणारे (गैर)समज, (अंध)श्रद्धा, चमत्कार याबाबत अंतिम निर्णय डायर साहेबांचा असेल, असे जाहीर झाले आहे ना इकडेच? काय वाचावे, काय वाचू नये हे ठरवायचा वाचकांना अधिकार आहे, तर आध्यात्मिक गुरूंना बापड्यांन लिहऊ देत की. त्यावर बंदीची भाषा, पूर्वभाष्य अगर त्याची अंमलबजावणी कशासाठी? वाचायचे अगर नाही, मुद्दे खोडायचे की उचलून धरायचे हे सगळे सहभागी वाचक बघून घेतीलच ना? (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर 28/03/2008 - 09:13
त्यावर बंदीची भाषा, पूर्वभाष्य अगर त्याची अंमलबजावणी कशासाठी? वाचायचे अगर नाही, मुद्दे खोडायचे की उचलून धरायचे हे सगळे सहभागी वाचक बघून घेतीलच ना? आणीबाणीसदृष परिस्थितीत प्रश्न विचारायचे नसतात अशी आमची माहिती आहे! बाय द वे, जनरल डायर आत्ता या क्षणी काल रात्री चिक्कार उसाचा रस प्यायल्यामुळे गाढ झोपले आहेत! :) ते उठल्यावर तुमचे हे प्रश्न इथे शिल्लक राहतील किंवा नाही या बाबत आम्ही साशंक आहोत! :) बाकी चालू द्या! :) तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सन्जोप राव 28/03/2008 - 11:28
मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे. मिसळपावाच्या मालकांविषयी वैयक्तिक टिप्प्णी करणारा एक तुकडा इथे वाचला होता. तो आता दिसत नाही, हे कसे काय ,प्राध्यापक डॉक्टरसाहेब? सन्जोप राव

आनंदयात्री 28/03/2008 - 10:58
खरे तर अजिबात तोंड घालायची इच्छा नव्हती; कारण आम्ही विडंबने वाचायची तर सोडलीच आहेत इव्हन त्यावर गप्पा मारण्याचे पण सोडले आहे. या अशा कविता पडल्या पडल्या दुसर्‍या मिनिटाला होणार्‍या विडंबनांची तुलना मी रेल्वे स्टेशन वर मिळनार्‍या पिवळ्या पुस्तंकाशी मी करतो; रद्दी; दुर्लक्ष करण्याजोगी. चला पण वरिल चर्चेत अनेकांचा दुटप्पीपणा दिसुन आला, एरवी विडंबन पडल्या पडल्या त्यावर लगेच "वा वा","शवटुकार तुमच्या प्रतिभेला सलाम" वैगेरे वैगेरे प्रतिसाद देणारे लोक आता वेगळी वेगळी मते मांडतांना दिसत आहेत.

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 28/03/2008 - 11:22
एकिकडे आपण, कारण आम्ही विडंबने वाचायची तर सोडलीच आहेत इव्हन त्यावर गप्पा मारण्याचे पण सोडले आहे. असं म्हणता, व लगेच एरवी विडंबन पडल्या पडल्या त्यावर लगेच "वा वा","शवटुकार तुमच्या प्रतिभेला सलाम" विडंबनांना कुणाचे काय प्रतिसाद येतात हेही आपल्याला ठाऊक आहे याचे राहून राहून नवल वाटले! गंमतच आहे बॉ!:) यावरून विडंबनांचे आपले वाचन कुठपर्यंत सुरू होते आणि नेमकी कुठून आपण विडंबने वाचायची सोडून दिलीत हा एक अवांतर प्रश्न आम्हाला पडला आहे! :) असो, आपलाच, तात्या.

शेखर 28/03/2008 - 12:57
आपपसातील वादानेच किंवा हेव्यादाव्याने मराठेशाही बुडाली ...... याचे स्मरण असुद्या. - शेखर

In reply to by शेखर

धमाल मुलगा 28/03/2008 - 13:27
शेखरशेठ, आपपसातील वादानेच किंवा हेव्यादाव्याने मराठेशाही बुडाली ...... याचे स्मरण असुद्या. अगदी लाख बोललात ! हल्ली काय चालल॑य काही कळत नाही. लवकर ही परिस्थिती सुधारो हीच श्रीश॑भूचरणि प्रार्थना! -(व्यथित) ध मा ल.

लिखाळ 28/03/2008 - 19:34
विडंबने कशी असावित, असावित का? इत्यादी मते वैयक्तिक आहेत. वाचकांनी चांगले वाईट प्रतिसाद द्यावेत. त्यातून जे राहिल ते इथल्यांना आवडते असे समजले जाईल. बंदी वगैरे आणावी असे वाटत नाही. चतुरंग यांनी सुद्धा असे काही सुचवले नाही हे चांगलेच. --लिखाळ. सामर्थ्य आहे बडबडीचे जो जो करील तयाचे - पुल.

वरदा 29/03/2008 - 05:13
काय चाल्लंय्...चारोळ्याही आपण सगळ्यांनी एन्जॉय केल्या आणि बरीचशी विडंबनंही आपल्याला आवडली...थोडी अतिशयोक्ति झाली असेल तर होईल कमी आपोआप कुणी प्रतिसाद दिले नाहीत तर्..जी छान विडंबन असतील ती वाचूया बाकीची सोडून देऊ....सुशील तुम्हालाही आवडत होतं चारोळ्या लिहायला आणि तिथे लिहावसं वाटत नव्हतं तर वेगळा धागा उघडायचा माझ्या वेगळ्या चारोळ्या म्हणून....उगाच कशाला बोलता... आम्ही तर मस्त एन्जॉय केलं.... हल्ली काय चालल॑य काही कळत नाही. लवकर ही परिस्थिती सुधारो हीच श्रीश॑भूचरणि प्रार्थना! धमु १००% सहमत.... अरे तुम्ही सगळे एप्रिल फुल नाही ना करत? कालपर्यंत तर आपण सगळे धमाल करायचो मधेच काय झालं काय? सारखी ऑफिस आणि घरची टेन्शन्स असह्य झाली की आपण इथे येतॉ जरावेळ मजा करतो कीती बरं वाट्टं..इथेही तसच असेल तर कसं वाटेल यावसं?

In reply to by वरदा

विसोबा खेचर 29/03/2008 - 07:52
वरदा, तुझे प्रतिसाद वाचताना कॉलेजातली तेरावी, चौदावीतली एखादी मुलगी माझ्याशी बोलते आहे की काय असं वाटतं! :) स्वभावातला अवखळपणा, निरागसपणा असाच राहू दे! जप त्याला नेहमी... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 29/03/2008 - 08:05
वरदा, तुझे प्रतिसाद वाचताना कॉलेजातली तेरावी, चौदावीतली एखादी मुलगी माझ्याशी बोलते आहे की काय असं वाटतं! :) सांभाळून राहा हो ! अशा प्रतिसादांमुळे "तेराव्या चौदावीतल्या" मुलींना किती धोका आहे, हे सहज लक्षात येते ! - (खट्याळ) सर्किट

विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न. पहा. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2591450425237531522&... »

प्रत्येक वाचकाचा वाचनाधिकार अबाधित आहे. विडंबनकारांवर बंदी आणू नये. वाचकांनी आपापला वाचनाधिकार वापरावा. 'मला आवडत नाही ते साहित्य वाईट' असा संकुचित एप्रोच नसावा. (हा कुणावरही वैयक्तिक शेरा नाही.)

प्रत्येक वाचकाचा वाचनाधिकार अबाधित आहे. विडंबनकारांवर बंदी आणू नये. वाचकांनी आपापला वाचनाधिकार वापरावा. 'मला आवडत नाही ते साहित्य वाईट' असा संकुचित एप्रोच नसावा. (हा कुणावरही वैयक्तिक शेरा नाही.) » श्री. प्रभाकर पेठकर(खरं खुरं नांव वाचून आनंद झाला) यांच्या मताशी सहमत. चांगले/वाईट साहित्य असा भेद असूनही "माझ्या आवडीचे/नावडीचे" असाहि भेद नक्कीच असू शकतो.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

विसोबा खेचर 30/03/2008 - 12:51
श्री. प्रभाकर पेठकर(खरं खुरं नांव वाचून आनंद झाला) अहो पण 'प्रभाकर पेठकर' हे नांव तरी खरंखुरं कशावरून? त्यांचं खरं नांव 'धुरंधर भाटवडेकर' असंही एखादं असू शकतं! :)) आपला, तात्याभैय्या देवासकर.

सर्किट 28/03/2008 - 01:22
प्रत्येकाची श्रद्धा अभंगात किंवा देवाच्या गाण्यात असेलच असे नाही. माझ्या सारखे काही लोक भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची देखील भावभक्तीने पारायणे करतो. तेव्हा स्वतःवर बंधनेच घालून घेणार असाल, तर आमच्या भावनांची देखील पर्वा करावी, ही विनंती. तोवर आम्ही "घालून लोटांगण वर करी ढुं**" म्हणतो, चालीत. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग 28/03/2008 - 01:38
पण ते उत्तम असेल तर मला वर्ज्य नाही कारण अभंग/देवाची गाणी ह्यातल्या भावना ते लिहिणारी संत मंडळी आणि गज़ला ह्यात मी फरक करतो. बाकी तुमचं ते "घालून लोटांगण वर करी ढुं**" चालू दे!! चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 28/03/2008 - 01:48
कारण अभंग/देवाची गाणी ह्यातल्या भावना ते लिहिणारी संत मंडळी आणि गज़ला ह्यात मी फरक करतो. हम्म! हे मात्र पटले...! इव्हन, उद्या कुणी उठून जर बाबूजींच्या, 'दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगति पुत्र मनवाचा' या अत्यंत उच्च दर्जा असलेल्या गाण्याचे जर काही वायफळ विडंबन करू लागला तर मलाही ते सहन होणार नाही! असो, गेल्या काही दिवसांपासून मिपावरील विडंबनाचं गळू खूप सुजलं होतं. या चर्चाप्रस्तावाच्या निमित्ताने रंगाने त्या गळवाला सुई लावलीन हे एका अर्थी बरंच झालं! आता मिपावरील मंडळींचे याला काय नी कसे प्रतिसाद येतात, त्या प्रतिसादांतील एकंदरीत सूर कसा आहे हे पाहून मिपावर केले गेलेले विडंबन तसेच ठेवायचे की अप्रकाशित करायचे यावर जनरल डायर काय तो निर्णय घेतीलच! अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 28/03/2008 - 01:50
एकसाथ पेले भरता, दोष ना कुणाचा सुराधीन आहे जगती, पुत्रमानवाचा पण हे गाणे गदिमांनी लिहिलेले आहे. आता अपमान त्यांचा झाला की बाबूजींचा ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 28/03/2008 - 02:00
हे वाचून गदिमांनी हा विषय, पेले भरणे, ढोसणे, सुराधीनता इ. इ. त्यांच्या रचनांमधून/विडंबनांतून किती वेळा चघळले आहे, याची सांख्यिकीय तपासणी करायचा मोह झाला. (संख्याशास्त्री)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 28/03/2008 - 02:04
मुळात गदिमांनी विडंबने केली आहेत का ? माझ्या तरी वाचण्यात नाहीत. तुमचे सांख्यिकीचे अर्धे काम तर निपटले. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 28/03/2008 - 02:07
कान्ट से! त्याकरता मला विडंबन पूर्ण वाचावं लागेल. शिवाय मूळ गाणंही गदिमांचंच आहे तेव्हा त्यांना त्याच गाण्याच्या विडंबनाचाही अधिकार आहे असं मला वाटतं! आणि मुळात त्याकरता, जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात, दु:खमुक्त जगला कुणी जीवनात वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा! यासारख्या ओळी लिहायची विडंबनकाराची ताकद हवी, आणि ती गदिमांची होती! तेव्हा त्यांच्याच गाण्याचं विडंबन जर गदीमांनी केलं तर तो त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं, परंतु उद्या खुद्द गदिमांनी जरी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' या कुसुमाग्रजांच्या कवितेचं काही वायफळ विडंबन केलं तरी ते मला खटकेलच! आणि मी बाबूजींचा अपमान होतो आहे असं कुठेही म्हटलेलं नाही! आपण कृपया माझे प्रतिसाद नीट वाचत जावे ही विनंती... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 28/03/2008 - 02:13
यासारख्या ओळी लिहायची विडंबनकाराची ताकद हवी, आणि ती गदिमांची होती! हेच तर म्हणतो. विडंबनकाराची ताकद असती तर त्याने विडंबने का केली असती ? अशा ताकदवान ओळीच लिहिल्या असत्या की ! तेव्हा त्यांच्याच गाण्याचं विडंबन जर गदीमांनी केलं तर तो त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं म्हणजे, फक्त स्वतःच्याच कवितांचे/गझलांचे/अभंगांचे विडंबन करावे, असे तुमचे म्हणणे आहे का ? परंतु उद्या खुद्द गदिमांनी जरी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' या कुसुमाग्रजांच्या कवितेचं काही वायफळ विडंबन केलं तरी ते मला खटकेलच! केशवसुतांच्या "आम्ही कोण म्हणूनी.." चे अत्र्यांनी केलेले विडंबनही तुम्हाला वायफळ वाटते का ? की फक्त अत्रे इतरही काही लिहायचे, म्हणून ते विडंबन चांगले ? - सर्किट

In reply to by चतुरंग

प्राजु 28/03/2008 - 02:05
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे. अगदी खरे बोललात... मलाही असेच झाले आहे. आणि आपल्या निर्णयाचा मी आदर करते. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आम्हाला आपल्या भावनांची कदर आहे. पण मग तुम्ही पण भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची विडंबने करू आणि वाचू नका. वाचलात तर प्रतिसाद देऊ नका. तोपर्यंत आम्ही पण "भिजूनी पाण्यात सार्‍या बो* माझा कोरडा" असे म्हणतो चालीत. पुण्याचे पेशवे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सन्जोप राव 28/03/2008 - 08:32
माझ्या सारखे काही लोक भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची देखील भावभक्तीने पारायणे करतो. हे पटले. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

सर्किट 28/03/2008 - 08:51
संजू, तुला पटणारच ! वेगळे काहीतरी असेल तर सांग ! - सर्किट

In reply to by चतुरंग

बेसनलाडू 28/03/2008 - 01:57
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे. --- सहमत आहे. येथे कोणीतरी समदु:खी भेटल्याचे/ने बरे वाटले. तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. --- हे वाचूनही बरे वाटले. म्हणूनच एकूण निवेदन वाचून ((प्राप्त परिस्थिती कशीही असली तरी) जरा तरी)बरे वाटले, असे म्हटले. (स्पष्टीकारक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग 28/03/2008 - 02:02
आधीच्या प्रतिसादातल्या 'जर तरी' मधे तो 'जरा तरी' होता हे मला समजले नाही आणि म्हणून विचारले. धन्यवाद!! चतुरंग

विसोबा खेचर 28/03/2008 - 01:36
की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. मी ही हेच म्हणू पाहतो! परंतु अद्याप नक्की नाही! :) बाकी, रंगाचं निवेदन पाहून थोडासा विचारात पडलो आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन 29/03/2008 - 04:21
तात्या काय हे? विडंबना सारखा आमच्या जीव्हाळ्याच्या विषयावर चक्क तुम्ही बंदी आणायची भाषा करता आहात? (व्यथित) कारकुन

चतुरंग 28/03/2008 - 02:14
योग्य विडंबनांनाही इतके पटापट प्रतिसाद येत नाहीत पण इथे चर्चा मात्र कशी घसरवत न्यायची त्याला फाटे कसे फोडायचे बघण्यासारखे आहे! का कोण जाणे पण वैफल्यग्रस्त मनोवृत्तीचे निदर्शक आहे की काय असे वाटते. चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 28/03/2008 - 02:16
अहो, चर्चा म्हटले की हे होणारच. स्वानुभवावरून सांगतो ! असे वाईट नका वाटून घेऊ बुवा. सार्वजनिक संकेतस्थळावर वावरण्यासाठी गेंड्याची कातडी लागते. :-) - सर्किट

सचिन 28/03/2008 - 02:33
या विषयाला हात घातल्याबद्दल चतुरंगांचे आभार. मी मिपाचा नव्यातला सदस्य आहे..आणि कवितांमधे जास्त स्वारस्य असलेला. परंतु, गेले काही दिवस विडंबनाच्या अतिरेकामुळे अक्षरशः उबग आला आहे. (उबग येण्याच्या पुढच्या परिस्थितीला काय म्हणतात ते माहीत नाही..). कशाचे आणि कसे विडंबन करावे यावर कोणी काही बंधने (स्वतःवर अथवा दुसर्‍यावर) - घालोत वा न घालोत, पण कवितांचे वाचन बंद करून मी माझ्यापुरता प्रश्न सोडविला आहे. कविता वाईटच आहेत असे मी म्हणत नाही, मीही काही कविता आवडल्याचे प्रतिसाद दिले आहेत, पण अशा कवितांचा अतिरेक मात्र निश्चितच झाला आहे, आणि "जे न देखे..." मधले वैविध्य नष्ट झाले आहे. (वि.सू. : कोणत्याही विडंबनकारास दुखावण्याचा हेतू नाही..)

In reply to by सचिन

सर्किट 28/03/2008 - 02:54
पण कवितांचे वाचन बंद करून मी माझ्यापुरता प्रश्न सोडविला आहे. हा अगदी अचूक निर्णय. कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. - सर्किट

कोलबेर 28/03/2008 - 03:02
अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल!
डायर साहेबांना जर बंदीच घालायची आहे आणि ती सदस्यांच्या आवडी निवडीवर आधारीत आणायची आहे तर मला, हिंदुत्ववादी/सनातनी, ज्योतिष, तंत्र मंत्र स्तोत्र, भाकड अंधश्रद्धा आणि चारोळ्या असल्या लिखाणावर विडंबनांआधी बंदी आणलेली आवडेल. (बिल्ला क्र. २१) कोलबेर

मिपा वर आणि लेखननियंत्रण? मला वाटत होतं की मिपा चा जन्मच मुळी अशा प्रकारच्या नियंत्रणांविरुद्ध बंडखोरी म्हणून झाला होता... कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. संपूर्ण सहमत! डायर साहेबांना जर बंदीच घालायची आहे आणि ती सदस्यांच्या आवडी निवडीवर आधारीत आणायची आहे तर मला, हिंदुत्ववादी/सनातनी, ज्योतिष, तंत्र मंत्र स्तोत्र, भाकड अंधश्रद्धा आणि चारोळ्या असल्या लिखाणावर विडंबनांआधी बंदी आणलेली आवडेल. भावनांशी सहमत, पण त्याची जरूर आहे असे वाटत नाही!! अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल! संपादकांनी वरील वाक्य म्हटल्यामुळेच आम्ही आमचे विचार इथे मांडत आहोत (नाहीतर या साठमारीत शिरण्याची आमची छाती नाही!!!!:)) विडंबन हा एक मान्यताप्राप्त साहित्यप्रकार आहे. कवीने कोणत्या काव्याचे विडंबन करावे आणि कोणत्या नाही हे ठरवण्याचा वाचकांना अधिकार आहे असे मला वाटत नाही. वाचकांना असे लिखाण न वाचण्याचा वा त्या लिखाणावर त्यांची अनुकूल/ प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा जरूर अधिकार आहे. व्यक्तिगत टीका किंवा भांडणे चालू असतील तर संपादक मंडळाने जरूर हस्तक्षेप करावा. कोणी जर संकेतस्थळाच्या नियमांचे उल्लंघन करीत असेल (कॉपीराईट वगैरे) तर जरूर लेखकाला समज द्यावी पण विषयाच्या/ लेखनाच्या प्रकाराच्या निवडीत हस्तक्षेप करू नये असे मला वाटते. जर विषय वा केलेले लिखाण फालतू असेल तर त्याचा प्रतिक्रियेतून समाचार घ्यायला सभासद समर्थ आहेतच की!! :))) मिपा चा सभासदवर्ग हा विस्तृत आहे त्यामुळे इथे वेगवेगळ्या विचारांची/ स्वभावांची माणसे येणार हे सहाजिकच आहे. सर्वांना सर्वच विषय/ लेखनप्रकार आवडतील असे मुळीच नाही. तेंव्हा आपल्याला जे रुचते ते वाचावे/ लिहावे, त्यावर प्रतिक्रिया द्यावी हे उत्तम!! आम्हाला खादाडी करायला आवडते पण पाककलेतील काही शष्प कळत नाही. तरीसुद्धा मामलेदाराच्या मिसळीची अचूक रेसेपी मिळाल्याबद्दल त्या लेखकांचे (स्वाती राजेश आणि पेठकरबुवा) आम्ही अनंत आभारी आहोत. मन जरा मोकळं ठेवलं की असे अनेक अनाहूत लाभ होतात... मिपा वर काय विषयावर लिखाण होतं आणि काय लेखनप्रकार हाताळले जातात यापेक्षा मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ही आम्हाला सर्वात आवडणारी गोष्ट आहे. आता अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलं की त्याचा थोडाफार डावा-उजवा उपयोग केला जातोच. पण त्याविरुद्ध उपाय म्हणून एखाद्या विषयावर किंवा साहित्यप्रकारावर बहिष्कार टाकायचा ही भूमिका पटू शकत नाही. विशेषतः विडंबन हे अतिप्रसिध्द साहित्याचंच होतं. हे विडंबन आहे हे माहिती व्हायला वाचकांना मूळ साहित्यकृती माहिती असणे आवश्यक असते. अप्रसिद्ध साहित्याचे विडंबन करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे प्रसिध्द गाणी/ कविता, अभंग/ओव्या यांचे विडंबनच प्रामुख्याने होणार! आता सेन्सेटिव्ह व्यक्ती त्यामुळे नाराज होण्याची शक्यता आम्ही नाकारीत नाही, पण त्यांच्यापुढे अशा प्रकारचे लेखन न वाचण्याचा पर्याय असतो. आणि ही सेंन्सिटिव्हिटी कालानुरूप बदलत असते. "आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेतही न वाली" हे काव्य रविकिरणमंडळाच्या काळात अनेकांना धक्का देउन गेलेच असते... असो. मिपा बद्दल आमच्या मनात आत्मियता व कौतुक आहे ते त्याने केलेल्या प्रस्थापितांविरुद्धच्या बंडखोरीबद्दल आणि येथील अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल! त्यामुळे आम्ही इतर कुठेही न लिहिता फक्त मिपावर लिहितो. म्हणून रहावले नाही आणि चार शब्द लिहिले. बाकी सर्व संपादकमंडळाच्या आणि मालकांच्या हाती! अधिकउणे लिहिले गेले असेल तर क्षमा असावी. -पिवळा डांबिस

सुशील 28/03/2008 - 08:24
सर्कीट साहेब आणी सर्व विडंबन समर्थक, त्या जोनी लिव्हर नावाच्या आचरट माकडान मागे एकदा राष्त्रगितावर नृत्य केले होते त्याविशयी आपले मत काय? उद्या इथे कोणि जन गण मन चे विडंबन केलेतर तुम्ही त्याचे स्वागतच करनार का? उत्तराचि वाट पहात आहे.

In reply to by सुशील

सर्किट 28/03/2008 - 08:40
नक्कीच. तो त्याचा अधिकार आहे ! (आता, जन गण मन चे विडंबन प्रकाशित करणार, नक्कीच. सर्व माकडांनी आपापल्या शेपट्या आवश्यक ठिकाणी घालाव्यात, ही विनंती.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 28/03/2008 - 08:44
ते विडंबन प्रकाशित करू देणार का/मिपावर राहू देणार का, याची उत्सुकता राहील. त्यावरून मिपाचे विडंबनविषयक धोरणही (हळूहळू)स्पष्ट होईल(च!) (उत्सुक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 28/03/2008 - 08:49
आपले तिरके प्रतिसाद कितीही आले, तरी आम्ही ते इथे टाकणारच, बेला ! आमच्या नावाखाली टाकणार, इतरांच्या नव्हे ! त्याची पूर्ण जबाबदारीही आमचीच, इतरांच्या टोपणनावाखाली नाही ते आम्ही ढकलणार. शेपट्या घालणारे माउली भक्त आम्ही नाही ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 28/03/2008 - 08:52
आम्ही फक्त काय होईल, काय नाही याबद्दल जास्त उत्सुक. धोरणांबद्दल उत्सुक. विडंबनाबद्दल कमी किंवा नल्. कुणी सांगावे, कदाचित एखादे जबरा टाकालही, जेणेकरून आपल्या पुढच्या कलाकृतींची उत्सुकता वाढेल. आपल्या हातचे असे काही वाचले नाही ना अजून! बाकी चालू द्यात तुमचे. (उत्सुक)बेसनलाडू

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

व्यंकट 28/03/2008 - 11:56
आमच्या मताला फारशी किंमत नाही हे आम्ही जाणून आहोत म्हणून आमच्या पुढील संभाव्यतः प्रक्षोभक वाक्यावरून गदारोळ होवू नये. जन, गण, मन हेच विडंबन आहे असे आमचे मत आहे. व्यंकट

In reply to by व्यंकट

धमाल मुलगा 28/03/2008 - 12:15
व्य॑कोबा, आपल्याशी सहमत. राजा जॉर्ज च्या स्तुतीप्रित्यर्थ हे गायले (भारतभाग्यविधाता) अस॑ वाचल्याच॑ स्मरत॑. असो, पुन्हा ह्यावर वाद होतील. सध्या वातावरण बिघडल॑ आहे ! आपला, -(सहमत) ध मा ल.

प्रमोद देव 28/03/2008 - 08:28
मिपा वर काय विषयावर लिखाण होतं आणि काय लेखनप्रकार हाताळले जातात यापेक्षा मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ही आम्हाला सर्वात आवडणारी गोष्ट आहे. आता अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलं की त्याचा थोडाफार डावा-उजवा उपयोग केला जातोच. पण त्याविरुद्ध उपाय म्हणून एखाद्या विषयावर किंवा साहित्यप्रकारावर बहिष्कार टाकायचा ही भूमिका पटू शकत नाही. विशेषतः विडंबन हे अतिप्रसिध्द साहित्याचंच होतं. हे विडंबन आहे हे माहिती व्हायला वाचकांना मूळ साहित्यकृती माहिती असणे आवश्यक असते. अप्रसिद्ध साहित्याचे विडंबन करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे प्रसिध्द गाणी/ कविता, अभंग/ओव्या यांचे विडंबनच प्रामुख्याने होणार! डांबीसरावांशी ह्या बाबतीत सहमत आहे. मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! रंगरावांशी ह्या बाबतीत सहमत आहे. ह्यातला विटंबनसत्र हा शब्द महत्वाचा. आता माझे मतः विडंबन कुणी करावे,का करावे,कशाचे करावे आणि कसे करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यात एक किमान दर्जा असावा अशी अपेक्षा मी एक वाचक म्हणून करतो. तसेच घेतले एखादे गीत,कविता,अभंग वगैरे वगैर आणि पँटमध्ये शर्ट खोचावा त्या पद्धतीने त्यात बाई,बाटली(हे फारच वाढलंय हल्ली) आणि तत्सम शब्द अधून मधून पेरले की झाले विडंबन.... असे बर्‍याच जणांना वाटते. क्षणभर एक गंमत म्हणून ते चालूनही जाते. पण माझ्या मते ते विडंबन नसून विटंबन(ना) असते. हातात कुंचला आणि काळ्या रंगाचा डबा आहे आणि दिसेल तिथे तो रंग फासायचा... अशा तर्‍हेचा अट्टाहास वाटतो त्यामागे. तेव्हा समस्त प्रतिभावंतांना माझी विनंती आहे की.... विडंबन आपण जरूर करा. त्यात दारू,बाई वगैरे विषय वर्ज्य नाहीत. पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. त्यात खरे तर तुमचेच कल्पनादारिद्र्य दिसून येते. म्हणून त्यात वैविध्य आणा आणि मुख्य म्हणजे विडंबनात कुठेही वैयक्तिक आकस,दुस्वास,शेरेबाजी असल्या गोष्टी येऊ देऊ नका. इथल्या समस्त विडंबनकारांनी हे आव्हान ताकतीने पेलावे असे मी त्यांना आवाहन करतो.

प्राजु 28/03/2008 - 08:55
तेव्हा समस्त प्रतिभावंतांना माझी विनंती आहे की.... विडंबन आपण जरूर करा. त्यात दारू,बाई वगैरे विषय वर्ज्य नाहीत. पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. त्यात खरे तर तुमचेच कल्पनादारिद्र्य दिसून येते. म्हणून त्यात वैविध्य आणा आणि मुख्य म्हणजे विडंबनात कुठेही वैयक्तिक आकस,दुस्वास,शेरेबाजी असल्या गोष्टी येऊ देऊ नका. प्रमोदकाका, हे म्हणणे तुमचे एकदम पटले... पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सुशील 28/03/2008 - 09:05
पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. प्राजुताई तुम्ही काही बोलु नका. मध्यंतरी दळण दळल्या सारखं तुम्ही देखिल चारोळ्या टाकल्या होत्यात तेव्हा सगळयांच्या टिकेमुळे मलापण माझे लिखाण थांबवावे लागले. मला खरं तर चारोळ्या लिहायला खुप आवडत पण त्यामुळे लिहु शकलो नाही ना. प्रामाणीकपणे सांगतो आहे कृपया राग मानु नका.

In reply to by सुशील

प्राजु 28/03/2008 - 09:14
प्राजुताई तुम्ही काही बोलु नका. मी बोलायचं की नाही हे तुम्ही नका ठरवू. तुम्हांला जे जमतं ते करा. मध्यंतरी दळण दळल्या सारखं तुम्ही देखिल चारोळ्या टाकल्या होत्यात तेव्हा सगळयांच्या टिकेमुळे मलापण माझे लिखाण थांबवावे लागले. मला खरं तर चारोळ्या लिहायला खुप आवडत पण त्यामुळे लिहु शकलो नाही ना. माफ करा.. पण मी त्या एकटिने नव्हत्या टाकल्या, मिपावरचे बरेच लोक होते इथे आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये एकच विषय नव्हता. तेव्हा सगळ्यांनी टिका केली असे कोणी सांगितले तुम्हाला? तेव्हा काय झाले हे माहिती नसेल तर तुम्हांला बोलण्याचा अधिकार नाही. आणि जमल्यास तो धागा काढून वाचा आणि तुम्ही लिहिलेल्या चारोळ्या आणि त्या धाग्यातील चारोळ्या यांचि तुलना करा.. म्हणजे तुम्ही कुठे आहात हे तुम्हालाच समजेल. आणि तुमच्या चारोळ्या जर चांगल्या असत्या तर त्याला नक्की प्रतिसाद मिळाला असता.. यावरूनच तुम्हि लक्षात घ्या काय ते. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सुशील 28/03/2008 - 09:22
माफ करा प्राजुताई मी राग मानु नका म्हणुन पण तुम्ही रागावलात. पण मला सांगा चारोळ्या टाकणारे अनेकजण असले तरी विडंबन टाकणारेपण अनेकच आहेत. आणि त्यामध्ये बहुतेक वेळा प्रेम वगैरे असा एकच विषय पण होता. तसेच माझ्या चारोळीना आलेले प्रतिसाद पुन्हा बघा. प्रतिसाद आणि वाचने मिळाले होते. मि कुठे आहे ते मला माहित आहे पण तुम्ही अशी माझी जागा दाखवुन तुम्ही कुठे आहेत ते दाखवले. यापुढे मला तुमच्याशी बोलायचे नाहि.

In reply to by सुशील

प्राजु 28/03/2008 - 18:35
तुमच्या या निर्णयाचा तुमच्या पेक्षा मलाच जास्ती आनंद झाला.... कीप इट अप. - (सर्वव्यापी)प्राजु

तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. मात्र चांगला/वाइट प्रतिसाद लिहिण्याचे शहाणपण सुदैवाने येथील वाचकाजवळ आहे, ज्याचा त्याचा निर्णय ज्याने त्याने घ्यावा. आम्ही आम्हाला आवडणार्‍या विडंबनांना विषय कोणतेही असले तरी दाद देत राहू . कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. सहमत आहे. मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट 28/03/2008 - 09:02
मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे. आपण प्राडॉ डायर आहात का ? - (अचंभित) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आपण प्राडॉ डायर आहात का ? नाही, आम्ही येथे आपल्यासारखेच एक वाचक आहोत. वाचक म्हणुन अशा लेखनावर बंदी किंवा असे लेखन अप्रकाशित होऊ नये असे वाटते. ( आपण कामात असता त्याचा आम्हाला आनंद असतो. आपण हे असे रिकामे झाले की आम्हाला आपल्याला प्रत्येक शब्दा शब्दाचे स्पष्टीकरण द्यावे लागते. )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुशील 28/03/2008 - 09:25
सर मी पण तुम्हाला संपादक समजत होतो तुम्ही जर फक्त वाचक आहे म्हणता आहात तर इतक्या ठोसपणे हे कसे म्हणालात? मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 28/03/2008 - 09:06
सर, कोणत्याही प्रकारच्या लेखनावर बंदी येणार नाही म्हणालात; पण आध्यात्मिक लेखन किंवा त्याच्या माध्यमातून पसरवले जाणारे (गैर)समज, (अंध)श्रद्धा, चमत्कार याबाबत अंतिम निर्णय डायर साहेबांचा असेल, असे जाहीर झाले आहे ना इकडेच? काय वाचावे, काय वाचू नये हे ठरवायचा वाचकांना अधिकार आहे, तर आध्यात्मिक गुरूंना बापड्यांन लिहऊ देत की. त्यावर बंदीची भाषा, पूर्वभाष्य अगर त्याची अंमलबजावणी कशासाठी? वाचायचे अगर नाही, मुद्दे खोडायचे की उचलून धरायचे हे सगळे सहभागी वाचक बघून घेतीलच ना? (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर 28/03/2008 - 09:13
त्यावर बंदीची भाषा, पूर्वभाष्य अगर त्याची अंमलबजावणी कशासाठी? वाचायचे अगर नाही, मुद्दे खोडायचे की उचलून धरायचे हे सगळे सहभागी वाचक बघून घेतीलच ना? आणीबाणीसदृष परिस्थितीत प्रश्न विचारायचे नसतात अशी आमची माहिती आहे! बाय द वे, जनरल डायर आत्ता या क्षणी काल रात्री चिक्कार उसाचा रस प्यायल्यामुळे गाढ झोपले आहेत! :) ते उठल्यावर तुमचे हे प्रश्न इथे शिल्लक राहतील किंवा नाही या बाबत आम्ही साशंक आहोत! :) बाकी चालू द्या! :) तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सन्जोप राव 28/03/2008 - 11:28
मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे. मिसळपावाच्या मालकांविषयी वैयक्तिक टिप्प्णी करणारा एक तुकडा इथे वाचला होता. तो आता दिसत नाही, हे कसे काय ,प्राध्यापक डॉक्टरसाहेब? सन्जोप राव

आनंदयात्री 28/03/2008 - 10:58
खरे तर अजिबात तोंड घालायची इच्छा नव्हती; कारण आम्ही विडंबने वाचायची तर सोडलीच आहेत इव्हन त्यावर गप्पा मारण्याचे पण सोडले आहे. या अशा कविता पडल्या पडल्या दुसर्‍या मिनिटाला होणार्‍या विडंबनांची तुलना मी रेल्वे स्टेशन वर मिळनार्‍या पिवळ्या पुस्तंकाशी मी करतो; रद्दी; दुर्लक्ष करण्याजोगी. चला पण वरिल चर्चेत अनेकांचा दुटप्पीपणा दिसुन आला, एरवी विडंबन पडल्या पडल्या त्यावर लगेच "वा वा","शवटुकार तुमच्या प्रतिभेला सलाम" वैगेरे वैगेरे प्रतिसाद देणारे लोक आता वेगळी वेगळी मते मांडतांना दिसत आहेत.

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 28/03/2008 - 11:22
एकिकडे आपण, कारण आम्ही विडंबने वाचायची तर सोडलीच आहेत इव्हन त्यावर गप्पा मारण्याचे पण सोडले आहे. असं म्हणता, व लगेच एरवी विडंबन पडल्या पडल्या त्यावर लगेच "वा वा","शवटुकार तुमच्या प्रतिभेला सलाम" विडंबनांना कुणाचे काय प्रतिसाद येतात हेही आपल्याला ठाऊक आहे याचे राहून राहून नवल वाटले! गंमतच आहे बॉ!:) यावरून विडंबनांचे आपले वाचन कुठपर्यंत सुरू होते आणि नेमकी कुठून आपण विडंबने वाचायची सोडून दिलीत हा एक अवांतर प्रश्न आम्हाला पडला आहे! :) असो, आपलाच, तात्या.

शेखर 28/03/2008 - 12:57
आपपसातील वादानेच किंवा हेव्यादाव्याने मराठेशाही बुडाली ...... याचे स्मरण असुद्या. - शेखर

In reply to by शेखर

धमाल मुलगा 28/03/2008 - 13:27
शेखरशेठ, आपपसातील वादानेच किंवा हेव्यादाव्याने मराठेशाही बुडाली ...... याचे स्मरण असुद्या. अगदी लाख बोललात ! हल्ली काय चालल॑य काही कळत नाही. लवकर ही परिस्थिती सुधारो हीच श्रीश॑भूचरणि प्रार्थना! -(व्यथित) ध मा ल.

लिखाळ 28/03/2008 - 19:34
विडंबने कशी असावित, असावित का? इत्यादी मते वैयक्तिक आहेत. वाचकांनी चांगले वाईट प्रतिसाद द्यावेत. त्यातून जे राहिल ते इथल्यांना आवडते असे समजले जाईल. बंदी वगैरे आणावी असे वाटत नाही. चतुरंग यांनी सुद्धा असे काही सुचवले नाही हे चांगलेच. --लिखाळ. सामर्थ्य आहे बडबडीचे जो जो करील तयाचे - पुल.

वरदा 29/03/2008 - 05:13
काय चाल्लंय्...चारोळ्याही आपण सगळ्यांनी एन्जॉय केल्या आणि बरीचशी विडंबनंही आपल्याला आवडली...थोडी अतिशयोक्ति झाली असेल तर होईल कमी आपोआप कुणी प्रतिसाद दिले नाहीत तर्..जी छान विडंबन असतील ती वाचूया बाकीची सोडून देऊ....सुशील तुम्हालाही आवडत होतं चारोळ्या लिहायला आणि तिथे लिहावसं वाटत नव्हतं तर वेगळा धागा उघडायचा माझ्या वेगळ्या चारोळ्या म्हणून....उगाच कशाला बोलता... आम्ही तर मस्त एन्जॉय केलं.... हल्ली काय चालल॑य काही कळत नाही. लवकर ही परिस्थिती सुधारो हीच श्रीश॑भूचरणि प्रार्थना! धमु १००% सहमत.... अरे तुम्ही सगळे एप्रिल फुल नाही ना करत? कालपर्यंत तर आपण सगळे धमाल करायचो मधेच काय झालं काय? सारखी ऑफिस आणि घरची टेन्शन्स असह्य झाली की आपण इथे येतॉ जरावेळ मजा करतो कीती बरं वाट्टं..इथेही तसच असेल तर कसं वाटेल यावसं?

In reply to by वरदा

विसोबा खेचर 29/03/2008 - 07:52
वरदा, तुझे प्रतिसाद वाचताना कॉलेजातली तेरावी, चौदावीतली एखादी मुलगी माझ्याशी बोलते आहे की काय असं वाटतं! :) स्वभावातला अवखळपणा, निरागसपणा असाच राहू दे! जप त्याला नेहमी... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 29/03/2008 - 08:05
वरदा, तुझे प्रतिसाद वाचताना कॉलेजातली तेरावी, चौदावीतली एखादी मुलगी माझ्याशी बोलते आहे की काय असं वाटतं! :) सांभाळून राहा हो ! अशा प्रतिसादांमुळे "तेराव्या चौदावीतल्या" मुलींना किती धोका आहे, हे सहज लक्षात येते ! - (खट्याळ) सर्किट

विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न. पहा. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2591450425237531522&... »

प्रत्येक वाचकाचा वाचनाधिकार अबाधित आहे. विडंबनकारांवर बंदी आणू नये. वाचकांनी आपापला वाचनाधिकार वापरावा. 'मला आवडत नाही ते साहित्य वाईट' असा संकुचित एप्रोच नसावा. (हा कुणावरही वैयक्तिक शेरा नाही.)

प्रत्येक वाचकाचा वाचनाधिकार अबाधित आहे. विडंबनकारांवर बंदी आणू नये. वाचकांनी आपापला वाचनाधिकार वापरावा. 'मला आवडत नाही ते साहित्य वाईट' असा संकुचित एप्रोच नसावा. (हा कुणावरही वैयक्तिक शेरा नाही.) » श्री. प्रभाकर पेठकर(खरं खुरं नांव वाचून आनंद झाला) यांच्या मताशी सहमत. चांगले/वाईट साहित्य असा भेद असूनही "माझ्या आवडीचे/नावडीचे" असाहि भेद नक्कीच असू शकतो.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

विसोबा खेचर 30/03/2008 - 12:51
श्री. प्रभाकर पेठकर(खरं खुरं नांव वाचून आनंद झाला) अहो पण 'प्रभाकर पेठकर' हे नांव तरी खरंखुरं कशावरून? त्यांचं खरं नांव 'धुरंधर भाटवडेकर' असंही एखादं असू शकतं! :)) आपला, तात्याभैय्या देवासकर.
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे. तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. चतुरंग

नशीबानं मांडलेली थट्टा - पिंजरा संजोपराव हे पुस्तक प्रकाशित करत आहेत म्हणून अप्रकाशित. नीलकांत.

सन्जोप राव ·

बेसनलाडू 29/02/2008 - 10:53

तुमच्या लेखणीतून आज हे वाचायला मिळाले आणि भरून पावलो, असे म्हणावेसे वाटले. त्रयस्थ समीक्षकाप्रमाणे वृत्तपत्रीय समीक्षा न लिहिता "आपल्याला स्वतःला" काय वाटले, हे लिहिण्याचे तुमचे कसब प्रशंसनीय वाटते. कदाचित तेच समीक्षेसारख्या रुक्षशा लेखनप्रकारालाही वाचकांच्या बरेच जवळ नेऊन सोडते, असे मला वाटते.

संध्याबाईंच्या चेहर्‍यात मला बरेचदा अंमळ पुरुषी भाव दिसतात. त्यामुळे याच एका मुद्द्यावर 'पिंजरा'मधल्या भूमिकेसाठी त्यांची निवड व्हायला नको होती, असे वाटते. श्रीराम लागूंच्या अभिनयाचे, लावलेला आवाज आणि मॉड्युलेशन हे वैशिष्ट्य पहिल्यापासूनच राहिले आहे. त्यामुळे आज 'पिंजरा' पाहताना त्याचे विशेष कौतुक मला वाटत नाही. निळू फुले साहेब तर जबरदस्त ताकदीचे अभिनेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलावे! ज्यांनी त्यांचा अभिनय पाहिलेला नाही, त्या आजच्या पिढीतील युवकांनी नि होतकरू अभिनेत्यांनी नुकत्याच आलेल्या 'पांढर' चित्रपटातील त्यांची भूमिका पाहिली तर उत्तम. दुय्यम, नगण्य कालावधीची ती 'आबा'ची भूमिका इतकी नैसर्गिक आणि ताकदीची केली आहे त्यांनी!

एकच रुखरुख लागून राहिली, ती म्हणजे 'पिंजरा' मधल्या एक से बढकर एक गाण्यांबद्दल तुमचे मत वाचायला न मिळाल्याची. तेही लिहिले असतेत, तर अधिक आनंद वाटला असता. असो.

(आस्वादक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 29/02/2008 - 13:50

हेच म्हणतो..

तुमच्या लेखणीतून आज हे वाचायला मिळाले आणि भरून पावलो, असे म्हणावेसे वाटले. त्रयस्थ समीक्षकाप्रमाणे वृत्तपत्रीय समीक्षा न लिहिता "आपल्याला स्वतःला" काय वाटले, हे लिहिण्याचे तुमचे कसब प्रशंसनीय वाटते. कदाचित तेच समीक्षेसारख्या रुक्षशा लेखनप्रकारालाही वाचकांच्या बरेच जवळ नेऊन सोडते, असे मला वाटते. ........एकच रुखरुख लागून राहिली, ती म्हणजे 'पिंजरा' मधल्या एक से बढकर एक गाण्यांबद्दल तुमचे मत वाचायला न मिळाल्याची............

केशवसुमार..

(अवांतरः गाणी लिहिली असती तर कच्चा माल पण मिळाला असता)

नंदन 29/02/2008 - 11:05

रावसाहेब, परीक्षण आवडले. तात्याची खूप काळापासूनची रिक्वेष्ट तुम्ही तुमच्या नेहमीच्या शैलीत पूर्ण केलीत :).

अंतिम क्षणी रिते, रिकामे राहणारे पात्र हा जी. एं.च्या कथांची आठवण करून देणारा वाक्यप्रयोग, 'असतापैकी' आणि निळूभाऊंचे संवाद/शैली यासारख्या अनेक बारीक-सारीक गोष्टींकडे पुरवलेले लक्ष आणि निराळ्या उपमा या तुमच्या परीक्षणातल्या गोष्टी ;

है और भी दुनियाँ में सुखनवर बहुत अच्छे
कहते हैं कि गालिब का है अन्दाजे बयाँ और

सारखी दाद घेऊन जातात :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

राजमुद्रा 29/02/2008 - 11:02

'मदनाची लालडी' अशी ही चंद्रकला आहे. आपली जवानी आणि आपले सौष्ठव याची तिला पुरेपूर जाण आहे आणि ही अस्त्रे वापरुन आपण कुठल्याही पुरुषाला घायाळ करु शकतो असा ताठा - गर्वही. अशा भूमिकेत शिरणे संध्याबाईंना अंमळ कठीणच गेले आहे.

राजमुद्रा :)

सर्किट 29/02/2008 - 12:05
वा रावसाहेब !!

एकूण एक मुद्द्यांविषयी सहमत !

एक तद्दन बाजारू चित्रपट, आणि लागूंच्या अभिनयकौशल्यावरचा एक काळाधब्बा, असे ह्याचे वर्णन करता येईल. निळूभाऊ मात्र जबरा.

- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 29/02/2008 - 13:32

चित्रपट आवडला नव्हता. गाणी मस्त होती. पण लेखात म्हटल्याप्रमाणे तो विनोदी वाटला होता. :(

लेख मात्र सुंदर झाला आहे.

(रसिक) आजानुकर्ण

धमाल मुलगा 29/02/2008 - 12:16
च्यायला....
आणि आम्ही मात्र अभिरुचीस॑पन्न (!) जन म्हणतात म्हणून आवडीन॑ हा चित्रपट पाहिला आणि टिपला नसताना तो॑ड फाटेस्तोवर स्तुती केली (एव्हढा काही मनापासून आवडला नसतानाही)..हो, उगाच कोणि आपल्याला चिल्लरमध्ये जमा करायला नको म्हणून!!!

बाकी निळूभाऊ आपले येकदम फेवर्‍येट. क॑च्याबी शिणेमात बघा, समोरच्याला पार खाऊन जात्यात.
त्ये॑ची बेरकी नजर, तो॑डावरचे हलकट भाव आणि फर्मास आवाज सगळ॑च आपल्याला लै म्ह॑जी लै आवडत॑.
पण एकदा त्या॑ना खरोखर भेटलो आणि चाट पडलो. एव्हढा मृदूभाषी, सत्शील माणूस हे असले रोल करू शकतो म्हणजे कम्मालेय बॉ!

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 29/02/2008 - 14:47

"बाकी निळूभाऊ आपले येकदम फेवर्‍येट. क॑च्याबी शिणेमात बघा,"..."
च्यायला आपली मते लैच जळतायत बघ, आपले पण लै फेवरीट आहेत निळूभाऊ.
आपल्याला लेटेस्ट आठवतं म्हणजे "सात च्या आत घरात " मधला फक्त "४ मिन्टाचा" त्यांचा "ग्रामिण नेतॄत्व असलेला ढोंगे पाटलाचा रोल ". ईन्शाल्ला , काय दम आहे भूमिकेत .... जबरा .....
आपण तर पार "फिदा" भाऊ त्याच्यावर ......

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

अवांतर : "पिंजरा" मधली 'गाणि आणि चित्रपट' दोन्हीही उत्तम ....
               आजही आम्ही कार्यालयात "आली ठूमकत नार लचकत् ...." या गाण्याचा मुक्त वापर करतो . [ आतल्या गोटातील गोष्ट म्हणजे, मराठी समजणारे कमी लोक असल्याने 'सापही मर जाता है और लाठी भी नही टूटती ....' ]

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 29/02/2008 - 15:11

 शाब्बास रे पठ्ठे !!! काय आठवण करून दिलीस!
सातच्या आत...मधले जबरा डायलॉग्स फक्त आणि फक्त निळूभाऊ॑साठीच असावेत अस॑ वाटत पाहताना...
"....पोरग॑ तिकड॑ चौकीत जायची येळ आलीय आन हा कारखान्यावर बसून राजकारन ख्येळतोय... डे॑गळ्या..माझ॑ जाकिट घे, जीप काढ.." लै भारी ! काय दम आहे अजून.

पोलिस चौकीत...
"हा नाहीsss हे ! युवराज त्या॑च॑ नाव! युवराज साहेबराव डोणजे-पाटील "
" हे बघा इन्सपेक्टर...(मा॑जरेकर्)...कोकनातले काय? ...(हो)...तरी पन ऐकायच॑............एव्हढ्यासाठी शी. यम.ला फोन लावायला लावू नका..."

"पोरान॑ दारू प्यावी, हवालदाराच्या कानफटात द्यावी अन् बापान॑ नायतर आज्ज्यान॑ हे नुसत॑ एका कर॑गळीवर निभावून न्याव॑..खानदानी रीत आहे आमची"

एक से बढकर एक... आपण पण  पार "फिदा" भाऊ त्याच्यावर ......

आजही आम्ही कार्यालयात "आली ठूमकत नार लचकत् ...." या गाण्याचा मुक्त वापर करतो .
हाण तिच्याआयला!!!!

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 29/02/2008 - 15:21

च्यायला वट्टात येवढे सगळे डवायलाक् तुला याद आहेत म्हणजे धन्य आहेस बाबा ....
जबरा रोल होता तो ... आख्खा पिक्चर त्या मकरंदने खल्ला होता पण आखरीच्या त्या ४ मिनिटात असा झटका दिला की पूछ मत .....

एक आखरी 'डॉयलाग"
"बर आता येक करायचं, युवराजांच नाव तुमच्या डायरी , एफाराय जिथं कुठ असलं तिथनं खोडायचं ....
बाकी पोरीला साडीचोळी .... ह्या आम्ही बघू की ते , अवो घराण्याची रित आहे ती आमच्या ........."


छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 29/02/2008 - 15:33
येस्स्स.....
साडीचोळीवाल॑ वाक्य तर एकदम खल्लास! निर्लज्ज राजकारणी कसा असावा ह्याच॑ अप्रतिम मार्गदर्शन !!

च्यायला वट्टात येवढे सगळे डवायलाक् तुला याद आहेत म्हणजे धन्य आहेस बाबा ....
कसच॑ कसच॑....
मला एक दुर्धर रोग आहे..नवा चित्रपट / नाटक पाहिल॑ की त्यातल्यास॑वादा॑ना रोजच्या आयुष्यात जस॑ च्या तस॑ फिट्ट बसवायचा प्रयत्न करणे... हा त्याचाच परिणाम हो..रोज रोज तेच ते बडबड्ल्यावर आणखी काय होणार?


In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 29/02/2008 - 16:01

च्यायला....
आणि आम्ही मात्र अभिरुचीस॑पन्न (!) जन म्हणतात म्हणून आवडीन॑ हा चित्रपट पाहिला आणि टिपला नसताना तो॑ड फाटेस्तोवर स्तुती केली (एव्हढा काही मनापासून आवडला नसतानाही)..हो, उगाच कोणि आपल्याला चिल्लरमध्ये जमा करायला नको म्हणून!!!

 

अगदी खर बोल्ला रे भो !!

एक अतिशय उत्कृष्ट समिक्षा वाचावयास मिळाली.

खया अर्थाने मराठी मातीतला. मास्तरांचे गाव, मास्तरांबाबत आदर - भक्तीच म्हणाना- ठेवून असलेले गावकरी, गावचे सज्जन पाटील, पाटलांचा बदफैली मुलगा बाजीराव आणि स्वत: मास्तर ही सगळी पात्रे अगदी अस्सल वाटावी अशी. नखरेल, मानी, थोडी गर्विष्ठच, अशी चंद्रकला, तिच्या फडातल्या इतर तमासगारिणी, नाचे आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक या सगळी पात्रेही दाद द्यावीशी अशी.

अगदी नेमके लिहिले आहे..

माझ्या मते लागूंच्या अभिनयात ( घाणेकर, पणशीकरांप्रमाणे ) मुळातच एक शैलीबाज कृत्रिमता आहे. कोकणस्थी रंगाचे,डोळ्यांचे लागू आदर्शवादी मास्तर म्हणून शोभतात खरे, पण त्यांच्या अभिनयातील कृत्रिमता लक्षात येते. ('सामना' मध्ये लागूंची व्यक्तीरेखा मुळातच विक्षिप्त, व्यसनी असल्याने त्यांनी 'लावलेला' आवाज हा त्या व्यक्तीरेखेशी सुसंगत असा वाटला होता.) 'पिंजरा' मध्ये चित्रपटाच्या पूर्वार्धात काहीशा अवघडल्यासारख्या वाटणार्‍या लागूंनी उत्तरार्धात चंद्रकलेच्या नादाने होणारी नैतिक घसरण आणि त्यातून येणारे वैफल्य छान दाखवले आहे.
सहमत आहे. भूमिकेतील हा आलेख ओळखून प्रत्यक्षात साकारणे हे कुणा ऐर्‍या-गैर्‍याचे काम नोहे.

जिने आपला दुखावलेला पाय दाखवण्यासाठी आपले लुगडे गुढग्याच्या वर ओढले आणि मास्तरांचा आयुष्यभराचा निग्रह ढासळला अशी चंद्रकला संध्याबाईंमधे मला तरी दिसली नाही.आणि लागूंनी तिच्या नादाने सगळी तपश्चर्या सोडून तमासगीर होणे म्हणजे बलराज सहानीने कल्पना अय्यरच्या नादाने डान्सबारमध्ये वेटरची नोकरी पत्करण्यासारखे आहे.
हे बरिक पटले नाही. रावसाहेब, आपणच वरती म्हणून ठेवले आहे,  वैराग्याची कवचं घालून शरीर आणि मनाला कडीकुलुपात बंद करुन ठेवलं तरी निसर्गाची सनातन प्रेरणा सतत आतून धडका देत रहाते. वासनेच्या, विकारांच्या मोहातून कोण सुटला आहे? 'त्या' क्षणाला काय 'केमिकल लोच्या' झाला असेल ते एक गुरुजीच जाणोत्. आपण त्या' क्षणा आधीच्या प्रसंगात कितीही एकरुप झालो तरी 'ती' भावना तितक्या उत्कटतेने आपल्या मनात जागृत होत नाही.(कारण ती काही नीळी चित्रफित नाही). तसेच, प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है| ह्या वचनातील वजन जाणण्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. त्यातून गुरुजी त्यांच्या त्या मध्यमवयात पोहोचेपर्यंत स्त्री देहा पासून दूरच राहिला आहे. त्यामुळे, त्याची 'विकेट' जाण्यामागील भावना 'अनुभवी' प्रेक्षकांना घिसाडघाईची वाटणं स्वाभाविक आहे.पण गुरूजींच्या भूमिकेतून पाहिल्यास, 'अनंतकाळ उपास घडलेल्या माणसास  पिठलेभातही पंचपक्वांनाच्या वरच्या श्रेणीतील वाटावा' हे नैसर्गिक वाटते. 

तरीपण, समिक्षा उत्कृष्टच.
असेच, वेळातवेळ काढून 'वळू' बद्दलही लिहावे ही विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

सन्जोप राव 29/02/2008 - 17:28

प्रतिसादाबद्दल (सर्वांचाच) आभारी आहे. 'वळू' विषयी आजानुकर्णाने 'मनोगत' वर सुरेख लिहून ठेवले आहे. मी 'हेच म्हणतो!'

सन्जोप राव

In reply to by प्रभाकर पेठकर

'त्या' क्षणाला काय 'केमिकल लोच्या' झाला असेल ते एक गुरुजीच जाणोत्. आपण त्या' क्षणा आधीच्या प्रसंगात कितीही एकरुप झालो तरी 'ती' भावना तितक्या उत्कटतेने आपल्या मनात जागृत होत नाही.(कारण ती काही नीळी चित्रफित नाही). तसेच, प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है| ह्या वचनातील वजन जाणण्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. त्यातून गुरुजी त्यांच्या त्या मध्यमवयात पोहोचेपर्यंत स्त्री देहा पासून दूरच राहिला आहे. त्यामुळे, त्याची 'विकेट' जाण्यामागील भावना 'अनुभवी' प्रेक्षकांना घिसाडघाईची वाटणं स्वाभाविक आहे.पण गुरूजींच्या भूमिकेतून पाहिल्यास, 'अनंतकाळ उपास घडलेल्या माणसास  पिठलेभातही पंचपक्वांनाच्या वरच्या श्रेणीतील वाटावा' हे नैसर्गिक वाटते. 

हेच मी म्हणतो. पूर्वी म्हणे नुसते पदर ढळणे म्हणजे सुद्धा फार मादक समजले जाई. अहो साधे बघाना सिनेमा मधे कमी कपड्यात वावरणार्‍या कुमारीका बघून काही वाटत नाही हो. पण त्याऐवजी एखादी हापिसातली कुमारी जर थोडेसे कमी कपडे घालून आली तर काय कठीण अवस्था होते काय सांगू तुम्हाला?

आणि आपल्याला तर बुवा 'कशी नशिबाने थट्टा आज मांडली' हे गाणे फार आवडते. 

बाकी परीक्षण उत्तम वाटले.

पुण्याचे पेशवे

लिखाळ 29/02/2008 - 17:35

वा ..  फार छान लेख.

पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी "ब्रम्हचर्य हेच जीवन" ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण.

अगदी असेच वाटते. 'डायरेकशन'च्या नादात 'रसिक' लोकांची वाहवा मिळवण्यासाठी !

त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते.
हे तर फार मजेदार. त्यात तिचे ते कसनुसा चेहरा करुन पलित्या सारखे हात हालवणे तर फार विनोदी !

चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री.

जोरात वाक्यं.

लेख सुंदर.

--लिखाळ.

'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

लिखाळ 01/03/2008 - 18:39
रावसाहेब, माझा वरिल प्रतिसाद नीट दिसत नसल्याच्या आपल्या सुचनेमुळे तो परत टंकित आहे. वा ... फार छान लेख. पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी "ब्रम्हचर्य हेच जीवन" ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण. अगदी असेच वाटते. 'डायरेक्शन' च्या नादात 'रसिक' प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यासाठी. त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते. हे तर फार मजेदार. त्यात तिचे कसनूसा चेहरा करुन पलित्यासारखे हात हलवणे फार विनोदी. चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री. जोरात वाक्य ! लेख सुंदर. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

सन्जोप राव 02/03/2008 - 06:47
हा प्रतिसाद परत टंकल्याबद्दल मी आपला आभारी आहे. 'पलित्यासारखे हात' हे अगदी हुबेहूब आहे. सन्जोप राव

सुवर्णमयी 29/02/2008 - 18:26

संजोपराव,

पिंजरा बद्दल तुमची मते आवडली. त्यामधले तुम्हाला काय आवडले का आणि का नाही ते उत्तम उतरले आहे.

 

नीलकांत 29/02/2008 - 18:52
रावसर,
खुप छान लिहीलं आहे. ह्या चित्रपटातील गाणे तर झकास आहेतच.
'तुम्हावरी..' आमचं आवडतं.

मस्तच बाकी.

नीलकांत

मीनल 29/02/2008 - 18:56

किती छान लिहिले आहे!

खर तर पहिल्यावेळी   आणि नंतर ही  तो सिनेमा पाहताना एवढा विचार केला नव्हता.पण तुम्ही लिहिलेले विचार आपलेच आहे असे प्रत्येक वेळी वाटले.

त्या जुना चित्रपटात काहीतरी नक्किच आहे ज्यामुळे त्यातील प्रसंग तुमचे परीक्षण वाचताना आठवावे लागत नाही. मला म्हणायच आहे की ते विसरले गेलेले नाहित.

अजून लिहा नविन सिनेमा बद्दल.

`मला कभी अलविदा ना कहेना` हा सिनेमा आवडला. भारतिय समाजाच्या रुढीला अमान्य असलेली कथा आहे .पचनी पडायला कठिण वाटते.तुम्हाला काय वाटते त्या बद्दल?

 

विसोबा खेचर 29/02/2008 - 19:29

रावशेठ,

अतिशय सुंदर लेखन.. सगळे बारकावे अगदी छान टिपले आहेत! अण्णा वणकुद्रेंचे पिंजरा आणि कुंकू हे माझे अतिशय आवडते चित्रपट!पिंजरावर तुम्ही अतिशय छान लिहाल याची खात्रीच होती आणि ते वाचायची बर्‍याच दिवसांपासूनची इच्छा होती ती आज पुरी झाली!

अवांतर -

रावसाहेब जोवर मिसळपाववर पिंजरावर लिहीत नाहीत तोपर्यंत त्यांनी दिलेली चंची वापरायची नाही अशी मी शपथ खाल्ली होती. चला आता बरं झाल! आजपासून आम्हाला रावसाहेबांनी प्रेमाने भेट म्हणून दिलेली खास कोल्हापुरी साजाची चंची वापरायला मिळणार! :)

असो! रावसाहेब, आज पिंजर्‍याच्या निमित्ताने तुमचे मिपावर अगदी जोरदार पुनरागमन झाले आहे याचा खूप आनंद वाटतो!

तवा आता र्‍हावा इथ्थंच आणि लिवा निवांतपणे! आता पुन्यांदा काय मनबिन उडून जाऊ दिऊ नका! चार म्हर्‍हाटी मानसं येकत्र आली की भाडनं ही व्हायचीच बगा! तवा त्याचं काय बी फारसं मनाला लावून घिऊ नका! वयनीसायबास्नी आमचा दंडवत सांगा. तात्या लौकरच पुन्यात येणारे म्हनावं, तवा वांग्याचं भरीत अन् भाकरी तैयात ठेवा! :)

असो, तुमच्या पिंजर्‍याला पुन्हा एकदा मनापासून दाद देऊन प्रतिसाद संपवतो!

आपला,
(चंचीमित्र) तात्या.

गांभीर्याने पाहिला तरी आपली सुरेख समीक्षा मात्र मनापासून वाचली. झकास.

 त्यांचे वैयक्तिक संध्यावेड ध्यानात घेतले तरी चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री

हे एकदम चपखल. प्रना संतांच्या भाषेत 'तंतोतंत.' वाचनाने अपार आनंद मिळाला. समीक्षा कशी असावी याचा वस्तुपाठच.

धन्यवाद.

मुक्तसुनीत 29/02/2008 - 21:14

"फुरसद हुई है यार को मेहमां किये हुए" असे समस्त मिसळपावकर्‍याना संजोपरावांबद्दल कितीतरी दिवसांपासून वाटत होते. आज त्याची भरपाई झाल्यासारखी वाटते आहे.

जवळजवळ प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषय असणार्‍या या चित्रपटावर त्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे, मार्मिक टिप्पणी करणारे हे लिखाण.  लेखकाने म्हण्टल्याप्रमाणे, या चित्रपटाचा संस्कार एका अतिशय संस्कारक्षम, संवेदनाक्षम अशा काळात झाल्यानंतर , अनेक वर्षे मुरलेल्या मद्याप्रमाणे , या चित्रपटाला आपल्या अबोध मनात मुरवून , त्याच्यातील श्रेयस-प्रेयसाचा सांगोपांग आढावा घेऊन हे लिखाण वर आलेले आहे.  या परिस्थितीत एका सिद्धहस्त लेखकाच्या हातून इतके सुंदर लिहून झाले नसते, तरच आश्चर्य.

अनेक लोकानी याआधीच या लिखाणाचा उत्तम रसास्वाद नोंदलाय. (आमचे थोडे वरातीमागून आलेले घोडेच म्हणायचे ! ;-) )  नंदनने जीएसदृष्य प्रतिमेवर अगदी मार्मिकपणे बोट ठेवलेय. जियो नंदन !  

काही प्रश्न मनात उरतात.

संजोपरावानी "आसक्ती आणि विरक्ती यांच्यातला संघर्ष" असा जो या पटाचा बोधस्वर वर्णिला आहे तो योग्यच. या व्यतिरिक्त , मला वाटते , ही एक शोकांतिका आहे. आणि तिला अनेक पदर आहेत. मास्तर आणि चंद्रकला एका नात्यात अडकलेले आहेत. पण या नात्यात ते भावनिकदृष्ट्या एका अक्षांश-रेखांशावर असतात ते केवळ त्यांच्या शरीरांच्या मीलनाच्या क्षणी. एरवी त्यांचा प्रवास विरुद्ध दिशानी होत रहातो. चंद्रकला पराकोटीचा द्वेष, ईर्षा, अहंकार, शारीर आकर्षण हे टप्पे पार करत करत मास्तरांवर प्रेम करायला लागते. त्या प्रेमाची परिणती अर्थातच विफलतेमधे होते. मास्तर त्या बाईला कःपदार्थ, हीन शीलाची समजणे, तिच्याबद्दल कुतूहल, तिच्याबद्द्लच्या शारीरीक आकर्षणाने  घायाळ होणे, आणि मग अपमान, उपेक्षा यांच्या आगीत जळणे, आणि शेवटी , आपली एक महात्मा ही ओळख कायम ठेवत फासावर जाणे या प्रवासाने जातात. त्यांच्या या सुट्या सुट्या प्रवासात एकच स्टेशन एकत्र लागते : शरीराचे, त्यांच्या मीलनाचे...

माझ्या मते नाट्याचा परमोत्कर्षाचा बिंदू म्हणजे ....कोर्टामधे खरी कहाणी सांगायच्या प्रसंगी चंद्रकलेची वाचा जाणे. मला वाटते, शांताराम बापूनी, आणि संध्याबाईनी "अखेर जिंकली" ती या प्रसंगात. 

संजोपरावानी येथे येत रहावे , लिहीत रहावे , अशी मनोमन इच्छा वाटते.

 

 

चतुरंग 29/02/2008 - 22:34

'पिंजरा'चे मार्मिक रसग्रहण आवडले. सगळ्यात पटणारे काय असेल तर तुम्हाला जे वाटले ते प्रामाणिकपणे आणि तरीही एक आब राखून लिहिले आहेत. त्याबद्दल तुमचे कौतुक वाटते आणि म्हणून अभिनंदन!

वैयक्तिकरीत्या मी लागूंच्या 'अभिनयाचा' चाहता नाही. अतिशय कृत्रिम अशी संवादफेक आणि जाणूनबुजून लावलेल्या आवाजामुळे ते भूमिकेतून कायमच एका ठराविक अंतरावरुन जात असलेले जाणवतात, तिच्यात मिसळून जात नाहीत.

निळूभाऊंबद्दल काय बोलावे? अतिशय नैसर्गिक, वाचिक आणि कायिक अभिनयाची जबरदस्त देणगी असलेला कलावंत! चेहरा, डोळे आणि संपूर्ण शरीर ह्याचा यथोचित वापर करुन ते जे काही साधतात त्यातून भल्याभल्यांना शिकण्यासारखे आहे (अवांतर - 'कूली' मधे अमिताभसमोर ते कसे काम करतात हे बघावे म्हणून मी तो सिनेमा बघितला आणि त्यांचे सफाईदार हिंदी उच्चार ऐकून आणि ताकदवान अभिनय बघून त्यांच्या पायावर मनोमन डोके ठेवले! एकाही संवादात असे पुसटही वाटत नाही की हा कलाकार मूळचा मराठी आहे, क्या बात है!!)
'पिंजरा' मधल्या मला सर्वात आवडलेल्या गोष्टी म्हणजे जगदीश खेबूडकरांची अप्रतिम गाणी (अगदी तुम्ही म्हणता तशी गदिमांच्या शब्दाशी सलगी करणारी गीतं) आणि रामभाऊंचं गावरान ठसकेबाज संगीत, जणूकाही कृष्णेकाठच्या हिरव्या वांग्यांची भाजी आणि भाकरीची मेजवानीच! मी स्वतः रामभाऊंना भेटलो आहे, त्यांच्याशी बोललो आहे, मातीतल्या एका सच्चा सुरांच्या त्या आठवणी जाग्या झाल्या!

तुमचे असेच लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा.

चतुरंग

"आरं बजरंगा नकोस घालू पिंगा हे वागनं बर नव्हं." अशी यल पी लागली कि मंग आमच याड पळायचं आदुगरच तमाशाचं गांव . बाजारच्या दिवशी तमाशा. पंचक्रोशीतल्या गावांची वाड्यातोड्यांची मेजवानीच.मुक्ताबाईच्या जत्रेला श्रावणी मंगळवार असला कि प्रत्येक आळीचा तमाशा. त्रिपुरी पौर्णीमेला बी तमाशा. बहिरोबाच्या जत्रेला तमाशा. बेल्हेश्वराच्या जत्रेला तमाशा. आमाला घरचे पघु द्यायचे नाई. आमचे देव गुरुजी सांगायचे कि आरे या तमाशातल्या बायांची सकाळी त्वांड बघा. वकायला येइन. चाल्ले तमाशाला. हायस्कुलच्या इमारत निधिला शाळेनच तमाशा ठेवला मंग काय करनार? प्रकाश घाटपांडे

झकासराव 01/03/2008 - 20:45
आपल्या लेखणीचा मी फॅन बनलो काही लेख वाचुन मनोगतावर. इकडे कधी फारसे लिहिले नाहीत. पण हा षटकार होता. :) लिहित रहा आम्ही वाचत राहु :)

प्रमोद देव 01/03/2008 - 20:56
पण एका गोष्टीत मतभिन्नता आहे. त्या मानाने 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' काहीसे बटबटीत वाटते. बाबुजींचा सूर सच्चा हे खरे, पण उच्चारात भाव काहीसे कोंबून बसवण्याच्या हट्टापायी म्हटलेले 'त्याच्या काळजाची तार तिनं छेडली' हे थोडेसे नाटकी वाटते. आणि त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते. माझ्या मते हे गाणे म्हणजे ह्या चित्रपटाचे सार आहे (आणि 'कळस'ही). चालही उत्तम आहे,बाबुजींनीही तितकेच उतम आणि समरसून गायलंय. हे गाणे वजा केले तर चित्रपटातली मजाच निघून जाईल. बाकी इतर बाबतीत रावसाहेबांशी सहमत आहे.

मस्त परीक्षण.... .......... संध्याबाईंची अभिनयाची पद्धत आम्हाला खूप खोटी खोटी आणि नाटकी वाटते...आणि ते उथळ न्हाई न्हाई, अगदी विनोदी....

धनंजय 02/03/2008 - 04:55
सुंदर गाणी, चांगली कथा, जरा भडक दिग्दर्शन, आणि संध्याबाईंचे काम विसरायची मनापासून इच्छा, या गोष्टी पिंजर्‍याबद्दल लक्षात राहातात. फारा दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळत आहे. परीक्षणाबद्दल धन्यवाद.

In reply to by धनंजय

विकास 02/03/2008 - 08:15
सुंदर गाणी, चांगली कथा, जरा भडक दिग्दर्शन, आणि संध्याबाईंचे काम विसरायची मनापासून इच्छा, या गोष्टी पिंजर्‍याबद्दल लक्षात राहातात.
अचूक वर्णन जरी दोन अडीच तासाच्या सवयीने संध्याचे काम आवडायला लागले असे वाटते.. :) यातील पथेटीक पर्सनॅलीटी म्हणून निळू फुलेंचे काम लक्षात रहाणारे आहे. तसेच आवडते गाणे हे उषाने म्हणलेले "तुम्हावरं केली मी मरर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल" हे आहे. (फक्त त्यातील पहील्या कडव्यात "जवळ यावं मला पुसावं.." असे ऐकल्यावर आमच्या वेळची पोर फिदीफिदी हसली होती...)

रावसाहेब, 'पिंजरा' चित्रपट आम्हाला आवडतो, शोकांतिका म्हणावी तसे गुण या चित्रपटात. त्यातली गाणीही आम्हाला तितकीच आवडतात. बाकी आपल्या चित्रपटाच्या परिक्षणाने आम्हाला या चित्रपटात असलेल्या बारकाव्यांकडे पाहण्याची एक दृष्टीही दिली, म्हणजे पिंजरा चित्रपटातल्या अनेक गोष्टी पाहण्याच्या राहिल्या असे आम्हाला वाटले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'ग..साजणी' हे पि॑जरा चित्रपटातील उत्कृष्ट गीत माझ्या माहितीनुसार (कै) 'वाघ्या' नामक एका 'फोक' गायकाने म्हटले आहे. ते गाणे ज्या ठसक्यात म्हटले आहे तसे आजतागायत इतर कुणालाही म्हणता आलेले नाही असे आमचे मत आहे.

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 10/03/2008 - 00:34
अथवा ...लीचा गायक अशा आणखी दोन व्युत्पत्ती शक्य आहेत. सिंगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे शिवणाचे यंत्र. "फोक सिंगर" म्हणजे छडीने डागडुजी केलेले शिवणयंत्र (फोक = छडी). फोक सिंग करणे म्हणजे एखादी खोटी कथा (फोक) सरदारजीचा विनोद म्हणून खपवणे. गंभीर चर्चेत डॉ.साहेबांनी चांगली माहिती मांडली, थट्टेचे नशीब तिच्या वाटेला आले पण आमच्याकडून, हे दुर्दैव.

प्राध्यापक 27/02/2013 - 20:48
अप्रतिम परीक्षण, खूप आवडले. चित्रपटातील पाटलाच्या पात्राचा अभिनय ही छान,{त्या जेष्ठ कलाकाराचे नाव माहीत नाही}.

हुप्प्या 28/02/2013 - 01:35
ह्यातील आवडलेल्या गोष्टी म्हणजे गाणी, गाणी आणि निळू फुले. बस्स. त्यातही आली ठुमकत नार आणि तुम्हावर केली मी मर्जी ही बेष्ट! ते दे रे कान्हा चोळी लुगडी गाणेही नको वाटते. उगाच अध्यात्म वगैरे घुसडायचा केविलवाणा प्रयत्न वाटतो. बाकी बटबटीतपणा अतीच आहे. परीक्षणात ह्या वर्मावर बोट ठेवले आहे. सिम्बॉलिजमचा अतिरेक हास्यास्पद होतो. व्ही शांताराम ह्यांना असल्या सिम्बॉलिक गोष्टींचा हव्यास आहे हे बाकी सिनेमातही दिसते. मुळात तो मास्तर लग्न बिग्न भानगडीपासून इतका फटकून का असतो आणि संध्यासारख्या भुताच्या प्रेमात का पडतो हे आजिबात पटत नाही. आणि त्या मास्तराच्या हत्येकरता त्यालाच फाशी देणे तर अचाट आणि आचरट वाटते. संध्या हे चित्रपटसृष्टीला पडलेले दु:स्वप्न आहे (माझ्या मते)! हा लेख वर आणल्याबद्दल आभारी आहे. आधी वाचला नव्हता.

In reply to by हुप्प्या

अर्धवटराव 28/02/2013 - 02:41
>>मुळात तो मास्तर लग्न बिग्न भानगडीपासून इतका फटकून का असतो आणि संध्यासारख्या भुताच्या प्रेमात का पडतो हे आजिबात पटत नाही. -- मास्तर लग्न बिग्न करत नाहि म्हणुनच कदाचीत भुतीण बाईच्या मागे लागला असावा ;) अर्धवटराव

तिमा 04/03/2013 - 18:52
चित्रपट बर्‍याच ठिकाणी बटबटीत वाटला होता आणि तरीही साधारण आवडला होता. पण रावांचं हे परीक्षण जास्त आवडले. संध्या , या नटीविषयी काय वाटायचे ते इतक्या नेमक्या शब्दात कधी सुचले नव्हते. धागा वर आणणार्‍यांचे आभार.

आबा 04/03/2013 - 19:24
परिक्षण आवडले अवांतर: मध्यंतरी "डेर ब्लाउ अ‍ॅन्गेल" नावाचा चित्रपट पाहण्यात आला होता पिंजरा आणि त्याचं कथानक सारखंच असल्याच लक्षात आलं. हा चित्रपट यूट्यूब वर उपलब्ध आहे !

हुप्प्या 28/03/2013 - 08:17
http://www.saamana.com/2013/March/28/Link/Mumbai2.htm लवकरच ह्या सिनेमाला ४१ वर्षे होतील. इथेही म्हटले आहे की हा सिनेमा ब्लू एंजल ह्या चित्रपटावर आधारित आहे. हा श्रीराम लागूंचा पहिलाच सिनेमा म्हणे. हे मला माहित नव्हते.

लई भारी 04/06/2015 - 23:57
परिक्षण एकदम आवडले. 'कोल्लापुरी' भाषेचा प्रभाव सहज जाणवतो. एक बारिक मुद्दा - >>>आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक हे वर्णन निळु भाउं साठी असेल तर माझ्या मते ते 'अक्का' च्या नादाने घरदार सोडून आलेले असतात, चंद्रकलाच्या नाही. बाकी भाउंच्या भूमिकेला तोड नाही हे खरेच. 'ग साजणे' परत शोधून ऐकले :)

सिरुसेरि 05/06/2015 - 12:54
पिंजराचे कथा , संवाद कोणी लिहिले ते समजुन घ्यायला आवडेल . संध्या यांना हा रोल चुकीच्या वयात मिळाला असे वाटते. बाकी त्यांचे 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा अशा अनेक गाजलेल्या हिन्दी चित्रपटातील काम उत्क्रुष्ट होते . तसेच 'नैन से नैन नाही मिलाओ' , 'अरे जारे जारे नटखट', आधा है चंद्रमा' , 'पंख होते तो उड आती रे' अशा अनेक गीतांवरचे अवघड न्रुत्यही खुप चांगल्या प्रकारे सादर केले .

तिमा 06/06/2015 - 14:43
बाकी त्यांचे 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा अशा अनेक गाजलेल्या हिन्दी चित्रपटातील काम उत्क्रुष्ट होते . तसेच 'नैन से नैन नाही मिलाओ' , 'अरे जारे जारे नटखट', आधा है चंद्रमा' , 'पंख होते तो उड आती रे' अशा अनेक गीतांवरचे अवघड न्रुत्यही खुप चांगल्या प्रकारे सादर केले . ही वाक्ये वाचून फारच हंसू आले. स्वतःच्या मानेची अनावश्य्क अति हालचाल आणि सदैव ते कमरेवर हात ठेवून डोळे मटकावत बोलणे, ह्या अभिनयाला आम्ही तरी अतिकृत्रिम समजत होतो.

सिरुसेरि 10/06/2015 - 12:42
"ही वाक्ये वाचून फारच हंसू आले. स्वतःच्या मानेची अनावश्य्क अति हालचाल आणि सदैव ते कमरेवर हात ठेवून डोळे मटकावत बोलणे, ह्या अभिनयाला आम्ही तरी अतिकृत्रिम समजत होतो." या प्रकारच्या अतिकृत्रिम लकबी तर वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना या सुद्धा करायच्या . पण त्या अमराठी त्यामुळे त्यांना सगळे माफ . घर की मुर्गी दाल बराबर .

In reply to by सिरुसेरि

नाही हो.. वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना ह्यांच्या लकबीत नाजुकपणा, अदाकारी असं काहीतरी होतं. संध्या ह्यांच्या लकबींना हिसके देणं म्हणता येईल. काहीतरी विचित्रच स्टाईल होती त्यांची.

सिरुसेरि 10/06/2015 - 15:17
एखादी मराठमोळी अभिनेत्री , अमराठी वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना यांच्या गर्दीत नायिका म्हणुन उभी राहते . शांताराम बापुंच्या थोड्या वेगळ्या पठडीतल्या / कथानकांच्या सिनेमांमध्ये नायिकेचा रोल निभावते . ('झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा ) . दिग्दर्शक , न्रुत्य दिग्दर्शक यांचा विश्वास सार्थ ठरविते . शांताराम बापुंच्या सिनेमांमध्ये त्याकाळचे टॉपचे नायक - जसे की देव , दिलिप , राज नसतानाही त्या मानाने कमी परिचित नायकांबरोबर (गोपिक्रिष्न , महिपाल ) आपली भुमिका चोख बजावते . व सिनेमाच्या यशामध्ये आपलेही योगदान देते. हे कर्तुत्व टाळता येणार नाही. कितीही जड वाटले तरी. 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , पिंजरा असे अनेक चित्रपट भारतात सर्वत्र व भारताबाहेरही लोकप्रिय व आर्थिक द्रुष्ट्याही यशस्वि झाले . व यश हे नेहमीच सांघिक कामगिरिमुळे साध्य होते.

बेसनलाडू 29/02/2008 - 10:53

तुमच्या लेखणीतून आज हे वाचायला मिळाले आणि भरून पावलो, असे म्हणावेसे वाटले. त्रयस्थ समीक्षकाप्रमाणे वृत्तपत्रीय समीक्षा न लिहिता "आपल्याला स्वतःला" काय वाटले, हे लिहिण्याचे तुमचे कसब प्रशंसनीय वाटते. कदाचित तेच समीक्षेसारख्या रुक्षशा लेखनप्रकारालाही वाचकांच्या बरेच जवळ नेऊन सोडते, असे मला वाटते.

संध्याबाईंच्या चेहर्‍यात मला बरेचदा अंमळ पुरुषी भाव दिसतात. त्यामुळे याच एका मुद्द्यावर 'पिंजरा'मधल्या भूमिकेसाठी त्यांची निवड व्हायला नको होती, असे वाटते. श्रीराम लागूंच्या अभिनयाचे, लावलेला आवाज आणि मॉड्युलेशन हे वैशिष्ट्य पहिल्यापासूनच राहिले आहे. त्यामुळे आज 'पिंजरा' पाहताना त्याचे विशेष कौतुक मला वाटत नाही. निळू फुले साहेब तर जबरदस्त ताकदीचे अभिनेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलावे! ज्यांनी त्यांचा अभिनय पाहिलेला नाही, त्या आजच्या पिढीतील युवकांनी नि होतकरू अभिनेत्यांनी नुकत्याच आलेल्या 'पांढर' चित्रपटातील त्यांची भूमिका पाहिली तर उत्तम. दुय्यम, नगण्य कालावधीची ती 'आबा'ची भूमिका इतकी नैसर्गिक आणि ताकदीची केली आहे त्यांनी!

एकच रुखरुख लागून राहिली, ती म्हणजे 'पिंजरा' मधल्या एक से बढकर एक गाण्यांबद्दल तुमचे मत वाचायला न मिळाल्याची. तेही लिहिले असतेत, तर अधिक आनंद वाटला असता. असो.

(आस्वादक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 29/02/2008 - 13:50

हेच म्हणतो..

तुमच्या लेखणीतून आज हे वाचायला मिळाले आणि भरून पावलो, असे म्हणावेसे वाटले. त्रयस्थ समीक्षकाप्रमाणे वृत्तपत्रीय समीक्षा न लिहिता "आपल्याला स्वतःला" काय वाटले, हे लिहिण्याचे तुमचे कसब प्रशंसनीय वाटते. कदाचित तेच समीक्षेसारख्या रुक्षशा लेखनप्रकारालाही वाचकांच्या बरेच जवळ नेऊन सोडते, असे मला वाटते. ........एकच रुखरुख लागून राहिली, ती म्हणजे 'पिंजरा' मधल्या एक से बढकर एक गाण्यांबद्दल तुमचे मत वाचायला न मिळाल्याची............

केशवसुमार..

(अवांतरः गाणी लिहिली असती तर कच्चा माल पण मिळाला असता)

नंदन 29/02/2008 - 11:05

रावसाहेब, परीक्षण आवडले. तात्याची खूप काळापासूनची रिक्वेष्ट तुम्ही तुमच्या नेहमीच्या शैलीत पूर्ण केलीत :).

अंतिम क्षणी रिते, रिकामे राहणारे पात्र हा जी. एं.च्या कथांची आठवण करून देणारा वाक्यप्रयोग, 'असतापैकी' आणि निळूभाऊंचे संवाद/शैली यासारख्या अनेक बारीक-सारीक गोष्टींकडे पुरवलेले लक्ष आणि निराळ्या उपमा या तुमच्या परीक्षणातल्या गोष्टी ;

है और भी दुनियाँ में सुखनवर बहुत अच्छे
कहते हैं कि गालिब का है अन्दाजे बयाँ और

सारखी दाद घेऊन जातात :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

राजमुद्रा 29/02/2008 - 11:02

'मदनाची लालडी' अशी ही चंद्रकला आहे. आपली जवानी आणि आपले सौष्ठव याची तिला पुरेपूर जाण आहे आणि ही अस्त्रे वापरुन आपण कुठल्याही पुरुषाला घायाळ करु शकतो असा ताठा - गर्वही. अशा भूमिकेत शिरणे संध्याबाईंना अंमळ कठीणच गेले आहे.

राजमुद्रा :)

सर्किट 29/02/2008 - 12:05
वा रावसाहेब !!

एकूण एक मुद्द्यांविषयी सहमत !

एक तद्दन बाजारू चित्रपट, आणि लागूंच्या अभिनयकौशल्यावरचा एक काळाधब्बा, असे ह्याचे वर्णन करता येईल. निळूभाऊ मात्र जबरा.

- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 29/02/2008 - 13:32

चित्रपट आवडला नव्हता. गाणी मस्त होती. पण लेखात म्हटल्याप्रमाणे तो विनोदी वाटला होता. :(

लेख मात्र सुंदर झाला आहे.

(रसिक) आजानुकर्ण

धमाल मुलगा 29/02/2008 - 12:16
च्यायला....
आणि आम्ही मात्र अभिरुचीस॑पन्न (!) जन म्हणतात म्हणून आवडीन॑ हा चित्रपट पाहिला आणि टिपला नसताना तो॑ड फाटेस्तोवर स्तुती केली (एव्हढा काही मनापासून आवडला नसतानाही)..हो, उगाच कोणि आपल्याला चिल्लरमध्ये जमा करायला नको म्हणून!!!

बाकी निळूभाऊ आपले येकदम फेवर्‍येट. क॑च्याबी शिणेमात बघा, समोरच्याला पार खाऊन जात्यात.
त्ये॑ची बेरकी नजर, तो॑डावरचे हलकट भाव आणि फर्मास आवाज सगळ॑च आपल्याला लै म्ह॑जी लै आवडत॑.
पण एकदा त्या॑ना खरोखर भेटलो आणि चाट पडलो. एव्हढा मृदूभाषी, सत्शील माणूस हे असले रोल करू शकतो म्हणजे कम्मालेय बॉ!

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 29/02/2008 - 14:47

"बाकी निळूभाऊ आपले येकदम फेवर्‍येट. क॑च्याबी शिणेमात बघा,"..."
च्यायला आपली मते लैच जळतायत बघ, आपले पण लै फेवरीट आहेत निळूभाऊ.
आपल्याला लेटेस्ट आठवतं म्हणजे "सात च्या आत घरात " मधला फक्त "४ मिन्टाचा" त्यांचा "ग्रामिण नेतॄत्व असलेला ढोंगे पाटलाचा रोल ". ईन्शाल्ला , काय दम आहे भूमिकेत .... जबरा .....
आपण तर पार "फिदा" भाऊ त्याच्यावर ......

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

अवांतर : "पिंजरा" मधली 'गाणि आणि चित्रपट' दोन्हीही उत्तम ....
               आजही आम्ही कार्यालयात "आली ठूमकत नार लचकत् ...." या गाण्याचा मुक्त वापर करतो . [ आतल्या गोटातील गोष्ट म्हणजे, मराठी समजणारे कमी लोक असल्याने 'सापही मर जाता है और लाठी भी नही टूटती ....' ]

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 29/02/2008 - 15:11

 शाब्बास रे पठ्ठे !!! काय आठवण करून दिलीस!
सातच्या आत...मधले जबरा डायलॉग्स फक्त आणि फक्त निळूभाऊ॑साठीच असावेत अस॑ वाटत पाहताना...
"....पोरग॑ तिकड॑ चौकीत जायची येळ आलीय आन हा कारखान्यावर बसून राजकारन ख्येळतोय... डे॑गळ्या..माझ॑ जाकिट घे, जीप काढ.." लै भारी ! काय दम आहे अजून.

पोलिस चौकीत...
"हा नाहीsss हे ! युवराज त्या॑च॑ नाव! युवराज साहेबराव डोणजे-पाटील "
" हे बघा इन्सपेक्टर...(मा॑जरेकर्)...कोकनातले काय? ...(हो)...तरी पन ऐकायच॑............एव्हढ्यासाठी शी. यम.ला फोन लावायला लावू नका..."

"पोरान॑ दारू प्यावी, हवालदाराच्या कानफटात द्यावी अन् बापान॑ नायतर आज्ज्यान॑ हे नुसत॑ एका कर॑गळीवर निभावून न्याव॑..खानदानी रीत आहे आमची"

एक से बढकर एक... आपण पण  पार "फिदा" भाऊ त्याच्यावर ......

आजही आम्ही कार्यालयात "आली ठूमकत नार लचकत् ...." या गाण्याचा मुक्त वापर करतो .
हाण तिच्याआयला!!!!

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 29/02/2008 - 15:21

च्यायला वट्टात येवढे सगळे डवायलाक् तुला याद आहेत म्हणजे धन्य आहेस बाबा ....
जबरा रोल होता तो ... आख्खा पिक्चर त्या मकरंदने खल्ला होता पण आखरीच्या त्या ४ मिनिटात असा झटका दिला की पूछ मत .....

एक आखरी 'डॉयलाग"
"बर आता येक करायचं, युवराजांच नाव तुमच्या डायरी , एफाराय जिथं कुठ असलं तिथनं खोडायचं ....
बाकी पोरीला साडीचोळी .... ह्या आम्ही बघू की ते , अवो घराण्याची रित आहे ती आमच्या ........."


छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 29/02/2008 - 15:33
येस्स्स.....
साडीचोळीवाल॑ वाक्य तर एकदम खल्लास! निर्लज्ज राजकारणी कसा असावा ह्याच॑ अप्रतिम मार्गदर्शन !!

च्यायला वट्टात येवढे सगळे डवायलाक् तुला याद आहेत म्हणजे धन्य आहेस बाबा ....
कसच॑ कसच॑....
मला एक दुर्धर रोग आहे..नवा चित्रपट / नाटक पाहिल॑ की त्यातल्यास॑वादा॑ना रोजच्या आयुष्यात जस॑ च्या तस॑ फिट्ट बसवायचा प्रयत्न करणे... हा त्याचाच परिणाम हो..रोज रोज तेच ते बडबड्ल्यावर आणखी काय होणार?


In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 29/02/2008 - 16:01

च्यायला....
आणि आम्ही मात्र अभिरुचीस॑पन्न (!) जन म्हणतात म्हणून आवडीन॑ हा चित्रपट पाहिला आणि टिपला नसताना तो॑ड फाटेस्तोवर स्तुती केली (एव्हढा काही मनापासून आवडला नसतानाही)..हो, उगाच कोणि आपल्याला चिल्लरमध्ये जमा करायला नको म्हणून!!!

 

अगदी खर बोल्ला रे भो !!

एक अतिशय उत्कृष्ट समिक्षा वाचावयास मिळाली.

खया अर्थाने मराठी मातीतला. मास्तरांचे गाव, मास्तरांबाबत आदर - भक्तीच म्हणाना- ठेवून असलेले गावकरी, गावचे सज्जन पाटील, पाटलांचा बदफैली मुलगा बाजीराव आणि स्वत: मास्तर ही सगळी पात्रे अगदी अस्सल वाटावी अशी. नखरेल, मानी, थोडी गर्विष्ठच, अशी चंद्रकला, तिच्या फडातल्या इतर तमासगारिणी, नाचे आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक या सगळी पात्रेही दाद द्यावीशी अशी.

अगदी नेमके लिहिले आहे..

माझ्या मते लागूंच्या अभिनयात ( घाणेकर, पणशीकरांप्रमाणे ) मुळातच एक शैलीबाज कृत्रिमता आहे. कोकणस्थी रंगाचे,डोळ्यांचे लागू आदर्शवादी मास्तर म्हणून शोभतात खरे, पण त्यांच्या अभिनयातील कृत्रिमता लक्षात येते. ('सामना' मध्ये लागूंची व्यक्तीरेखा मुळातच विक्षिप्त, व्यसनी असल्याने त्यांनी 'लावलेला' आवाज हा त्या व्यक्तीरेखेशी सुसंगत असा वाटला होता.) 'पिंजरा' मध्ये चित्रपटाच्या पूर्वार्धात काहीशा अवघडल्यासारख्या वाटणार्‍या लागूंनी उत्तरार्धात चंद्रकलेच्या नादाने होणारी नैतिक घसरण आणि त्यातून येणारे वैफल्य छान दाखवले आहे.
सहमत आहे. भूमिकेतील हा आलेख ओळखून प्रत्यक्षात साकारणे हे कुणा ऐर्‍या-गैर्‍याचे काम नोहे.

जिने आपला दुखावलेला पाय दाखवण्यासाठी आपले लुगडे गुढग्याच्या वर ओढले आणि मास्तरांचा आयुष्यभराचा निग्रह ढासळला अशी चंद्रकला संध्याबाईंमधे मला तरी दिसली नाही.आणि लागूंनी तिच्या नादाने सगळी तपश्चर्या सोडून तमासगीर होणे म्हणजे बलराज सहानीने कल्पना अय्यरच्या नादाने डान्सबारमध्ये वेटरची नोकरी पत्करण्यासारखे आहे.
हे बरिक पटले नाही. रावसाहेब, आपणच वरती म्हणून ठेवले आहे,  वैराग्याची कवचं घालून शरीर आणि मनाला कडीकुलुपात बंद करुन ठेवलं तरी निसर्गाची सनातन प्रेरणा सतत आतून धडका देत रहाते. वासनेच्या, विकारांच्या मोहातून कोण सुटला आहे? 'त्या' क्षणाला काय 'केमिकल लोच्या' झाला असेल ते एक गुरुजीच जाणोत्. आपण त्या' क्षणा आधीच्या प्रसंगात कितीही एकरुप झालो तरी 'ती' भावना तितक्या उत्कटतेने आपल्या मनात जागृत होत नाही.(कारण ती काही नीळी चित्रफित नाही). तसेच, प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है| ह्या वचनातील वजन जाणण्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. त्यातून गुरुजी त्यांच्या त्या मध्यमवयात पोहोचेपर्यंत स्त्री देहा पासून दूरच राहिला आहे. त्यामुळे, त्याची 'विकेट' जाण्यामागील भावना 'अनुभवी' प्रेक्षकांना घिसाडघाईची वाटणं स्वाभाविक आहे.पण गुरूजींच्या भूमिकेतून पाहिल्यास, 'अनंतकाळ उपास घडलेल्या माणसास  पिठलेभातही पंचपक्वांनाच्या वरच्या श्रेणीतील वाटावा' हे नैसर्गिक वाटते. 

तरीपण, समिक्षा उत्कृष्टच.
असेच, वेळातवेळ काढून 'वळू' बद्दलही लिहावे ही विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

सन्जोप राव 29/02/2008 - 17:28

प्रतिसादाबद्दल (सर्वांचाच) आभारी आहे. 'वळू' विषयी आजानुकर्णाने 'मनोगत' वर सुरेख लिहून ठेवले आहे. मी 'हेच म्हणतो!'

सन्जोप राव

In reply to by प्रभाकर पेठकर

'त्या' क्षणाला काय 'केमिकल लोच्या' झाला असेल ते एक गुरुजीच जाणोत्. आपण त्या' क्षणा आधीच्या प्रसंगात कितीही एकरुप झालो तरी 'ती' भावना तितक्या उत्कटतेने आपल्या मनात जागृत होत नाही.(कारण ती काही नीळी चित्रफित नाही). तसेच, प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है| ह्या वचनातील वजन जाणण्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. त्यातून गुरुजी त्यांच्या त्या मध्यमवयात पोहोचेपर्यंत स्त्री देहा पासून दूरच राहिला आहे. त्यामुळे, त्याची 'विकेट' जाण्यामागील भावना 'अनुभवी' प्रेक्षकांना घिसाडघाईची वाटणं स्वाभाविक आहे.पण गुरूजींच्या भूमिकेतून पाहिल्यास, 'अनंतकाळ उपास घडलेल्या माणसास  पिठलेभातही पंचपक्वांनाच्या वरच्या श्रेणीतील वाटावा' हे नैसर्गिक वाटते. 

हेच मी म्हणतो. पूर्वी म्हणे नुसते पदर ढळणे म्हणजे सुद्धा फार मादक समजले जाई. अहो साधे बघाना सिनेमा मधे कमी कपड्यात वावरणार्‍या कुमारीका बघून काही वाटत नाही हो. पण त्याऐवजी एखादी हापिसातली कुमारी जर थोडेसे कमी कपडे घालून आली तर काय कठीण अवस्था होते काय सांगू तुम्हाला?

आणि आपल्याला तर बुवा 'कशी नशिबाने थट्टा आज मांडली' हे गाणे फार आवडते. 

बाकी परीक्षण उत्तम वाटले.

पुण्याचे पेशवे

लिखाळ 29/02/2008 - 17:35

वा ..  फार छान लेख.

पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी "ब्रम्हचर्य हेच जीवन" ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण.

अगदी असेच वाटते. 'डायरेकशन'च्या नादात 'रसिक' लोकांची वाहवा मिळवण्यासाठी !

त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते.
हे तर फार मजेदार. त्यात तिचे ते कसनुसा चेहरा करुन पलित्या सारखे हात हालवणे तर फार विनोदी !

चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री.

जोरात वाक्यं.

लेख सुंदर.

--लिखाळ.

'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

लिखाळ 01/03/2008 - 18:39
रावसाहेब, माझा वरिल प्रतिसाद नीट दिसत नसल्याच्या आपल्या सुचनेमुळे तो परत टंकित आहे. वा ... फार छान लेख. पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी "ब्रम्हचर्य हेच जीवन" ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण. अगदी असेच वाटते. 'डायरेक्शन' च्या नादात 'रसिक' प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यासाठी. त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते. हे तर फार मजेदार. त्यात तिचे कसनूसा चेहरा करुन पलित्यासारखे हात हलवणे फार विनोदी. चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री. जोरात वाक्य ! लेख सुंदर. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

सन्जोप राव 02/03/2008 - 06:47
हा प्रतिसाद परत टंकल्याबद्दल मी आपला आभारी आहे. 'पलित्यासारखे हात' हे अगदी हुबेहूब आहे. सन्जोप राव

सुवर्णमयी 29/02/2008 - 18:26

संजोपराव,

पिंजरा बद्दल तुमची मते आवडली. त्यामधले तुम्हाला काय आवडले का आणि का नाही ते उत्तम उतरले आहे.

 

नीलकांत 29/02/2008 - 18:52
रावसर,
खुप छान लिहीलं आहे. ह्या चित्रपटातील गाणे तर झकास आहेतच.
'तुम्हावरी..' आमचं आवडतं.

मस्तच बाकी.

नीलकांत

मीनल 29/02/2008 - 18:56

किती छान लिहिले आहे!

खर तर पहिल्यावेळी   आणि नंतर ही  तो सिनेमा पाहताना एवढा विचार केला नव्हता.पण तुम्ही लिहिलेले विचार आपलेच आहे असे प्रत्येक वेळी वाटले.

त्या जुना चित्रपटात काहीतरी नक्किच आहे ज्यामुळे त्यातील प्रसंग तुमचे परीक्षण वाचताना आठवावे लागत नाही. मला म्हणायच आहे की ते विसरले गेलेले नाहित.

अजून लिहा नविन सिनेमा बद्दल.

`मला कभी अलविदा ना कहेना` हा सिनेमा आवडला. भारतिय समाजाच्या रुढीला अमान्य असलेली कथा आहे .पचनी पडायला कठिण वाटते.तुम्हाला काय वाटते त्या बद्दल?

 

विसोबा खेचर 29/02/2008 - 19:29

रावशेठ,

अतिशय सुंदर लेखन.. सगळे बारकावे अगदी छान टिपले आहेत! अण्णा वणकुद्रेंचे पिंजरा आणि कुंकू हे माझे अतिशय आवडते चित्रपट!पिंजरावर तुम्ही अतिशय छान लिहाल याची खात्रीच होती आणि ते वाचायची बर्‍याच दिवसांपासूनची इच्छा होती ती आज पुरी झाली!

अवांतर -

रावसाहेब जोवर मिसळपाववर पिंजरावर लिहीत नाहीत तोपर्यंत त्यांनी दिलेली चंची वापरायची नाही अशी मी शपथ खाल्ली होती. चला आता बरं झाल! आजपासून आम्हाला रावसाहेबांनी प्रेमाने भेट म्हणून दिलेली खास कोल्हापुरी साजाची चंची वापरायला मिळणार! :)

असो! रावसाहेब, आज पिंजर्‍याच्या निमित्ताने तुमचे मिपावर अगदी जोरदार पुनरागमन झाले आहे याचा खूप आनंद वाटतो!

तवा आता र्‍हावा इथ्थंच आणि लिवा निवांतपणे! आता पुन्यांदा काय मनबिन उडून जाऊ दिऊ नका! चार म्हर्‍हाटी मानसं येकत्र आली की भाडनं ही व्हायचीच बगा! तवा त्याचं काय बी फारसं मनाला लावून घिऊ नका! वयनीसायबास्नी आमचा दंडवत सांगा. तात्या लौकरच पुन्यात येणारे म्हनावं, तवा वांग्याचं भरीत अन् भाकरी तैयात ठेवा! :)

असो, तुमच्या पिंजर्‍याला पुन्हा एकदा मनापासून दाद देऊन प्रतिसाद संपवतो!

आपला,
(चंचीमित्र) तात्या.

गांभीर्याने पाहिला तरी आपली सुरेख समीक्षा मात्र मनापासून वाचली. झकास.

 त्यांचे वैयक्तिक संध्यावेड ध्यानात घेतले तरी चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री

हे एकदम चपखल. प्रना संतांच्या भाषेत 'तंतोतंत.' वाचनाने अपार आनंद मिळाला. समीक्षा कशी असावी याचा वस्तुपाठच.

धन्यवाद.

मुक्तसुनीत 29/02/2008 - 21:14

"फुरसद हुई है यार को मेहमां किये हुए" असे समस्त मिसळपावकर्‍याना संजोपरावांबद्दल कितीतरी दिवसांपासून वाटत होते. आज त्याची भरपाई झाल्यासारखी वाटते आहे.

जवळजवळ प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषय असणार्‍या या चित्रपटावर त्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे, मार्मिक टिप्पणी करणारे हे लिखाण.  लेखकाने म्हण्टल्याप्रमाणे, या चित्रपटाचा संस्कार एका अतिशय संस्कारक्षम, संवेदनाक्षम अशा काळात झाल्यानंतर , अनेक वर्षे मुरलेल्या मद्याप्रमाणे , या चित्रपटाला आपल्या अबोध मनात मुरवून , त्याच्यातील श्रेयस-प्रेयसाचा सांगोपांग आढावा घेऊन हे लिखाण वर आलेले आहे.  या परिस्थितीत एका सिद्धहस्त लेखकाच्या हातून इतके सुंदर लिहून झाले नसते, तरच आश्चर्य.

अनेक लोकानी याआधीच या लिखाणाचा उत्तम रसास्वाद नोंदलाय. (आमचे थोडे वरातीमागून आलेले घोडेच म्हणायचे ! ;-) )  नंदनने जीएसदृष्य प्रतिमेवर अगदी मार्मिकपणे बोट ठेवलेय. जियो नंदन !  

काही प्रश्न मनात उरतात.

संजोपरावानी "आसक्ती आणि विरक्ती यांच्यातला संघर्ष" असा जो या पटाचा बोधस्वर वर्णिला आहे तो योग्यच. या व्यतिरिक्त , मला वाटते , ही एक शोकांतिका आहे. आणि तिला अनेक पदर आहेत. मास्तर आणि चंद्रकला एका नात्यात अडकलेले आहेत. पण या नात्यात ते भावनिकदृष्ट्या एका अक्षांश-रेखांशावर असतात ते केवळ त्यांच्या शरीरांच्या मीलनाच्या क्षणी. एरवी त्यांचा प्रवास विरुद्ध दिशानी होत रहातो. चंद्रकला पराकोटीचा द्वेष, ईर्षा, अहंकार, शारीर आकर्षण हे टप्पे पार करत करत मास्तरांवर प्रेम करायला लागते. त्या प्रेमाची परिणती अर्थातच विफलतेमधे होते. मास्तर त्या बाईला कःपदार्थ, हीन शीलाची समजणे, तिच्याबद्दल कुतूहल, तिच्याबद्द्लच्या शारीरीक आकर्षणाने  घायाळ होणे, आणि मग अपमान, उपेक्षा यांच्या आगीत जळणे, आणि शेवटी , आपली एक महात्मा ही ओळख कायम ठेवत फासावर जाणे या प्रवासाने जातात. त्यांच्या या सुट्या सुट्या प्रवासात एकच स्टेशन एकत्र लागते : शरीराचे, त्यांच्या मीलनाचे...

माझ्या मते नाट्याचा परमोत्कर्षाचा बिंदू म्हणजे ....कोर्टामधे खरी कहाणी सांगायच्या प्रसंगी चंद्रकलेची वाचा जाणे. मला वाटते, शांताराम बापूनी, आणि संध्याबाईनी "अखेर जिंकली" ती या प्रसंगात. 

संजोपरावानी येथे येत रहावे , लिहीत रहावे , अशी मनोमन इच्छा वाटते.

 

 

चतुरंग 29/02/2008 - 22:34

'पिंजरा'चे मार्मिक रसग्रहण आवडले. सगळ्यात पटणारे काय असेल तर तुम्हाला जे वाटले ते प्रामाणिकपणे आणि तरीही एक आब राखून लिहिले आहेत. त्याबद्दल तुमचे कौतुक वाटते आणि म्हणून अभिनंदन!

वैयक्तिकरीत्या मी लागूंच्या 'अभिनयाचा' चाहता नाही. अतिशय कृत्रिम अशी संवादफेक आणि जाणूनबुजून लावलेल्या आवाजामुळे ते भूमिकेतून कायमच एका ठराविक अंतरावरुन जात असलेले जाणवतात, तिच्यात मिसळून जात नाहीत.

निळूभाऊंबद्दल काय बोलावे? अतिशय नैसर्गिक, वाचिक आणि कायिक अभिनयाची जबरदस्त देणगी असलेला कलावंत! चेहरा, डोळे आणि संपूर्ण शरीर ह्याचा यथोचित वापर करुन ते जे काही साधतात त्यातून भल्याभल्यांना शिकण्यासारखे आहे (अवांतर - 'कूली' मधे अमिताभसमोर ते कसे काम करतात हे बघावे म्हणून मी तो सिनेमा बघितला आणि त्यांचे सफाईदार हिंदी उच्चार ऐकून आणि ताकदवान अभिनय बघून त्यांच्या पायावर मनोमन डोके ठेवले! एकाही संवादात असे पुसटही वाटत नाही की हा कलाकार मूळचा मराठी आहे, क्या बात है!!)
'पिंजरा' मधल्या मला सर्वात आवडलेल्या गोष्टी म्हणजे जगदीश खेबूडकरांची अप्रतिम गाणी (अगदी तुम्ही म्हणता तशी गदिमांच्या शब्दाशी सलगी करणारी गीतं) आणि रामभाऊंचं गावरान ठसकेबाज संगीत, जणूकाही कृष्णेकाठच्या हिरव्या वांग्यांची भाजी आणि भाकरीची मेजवानीच! मी स्वतः रामभाऊंना भेटलो आहे, त्यांच्याशी बोललो आहे, मातीतल्या एका सच्चा सुरांच्या त्या आठवणी जाग्या झाल्या!

तुमचे असेच लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा.

चतुरंग

"आरं बजरंगा नकोस घालू पिंगा हे वागनं बर नव्हं." अशी यल पी लागली कि मंग आमच याड पळायचं आदुगरच तमाशाचं गांव . बाजारच्या दिवशी तमाशा. पंचक्रोशीतल्या गावांची वाड्यातोड्यांची मेजवानीच.मुक्ताबाईच्या जत्रेला श्रावणी मंगळवार असला कि प्रत्येक आळीचा तमाशा. त्रिपुरी पौर्णीमेला बी तमाशा. बहिरोबाच्या जत्रेला तमाशा. बेल्हेश्वराच्या जत्रेला तमाशा. आमाला घरचे पघु द्यायचे नाई. आमचे देव गुरुजी सांगायचे कि आरे या तमाशातल्या बायांची सकाळी त्वांड बघा. वकायला येइन. चाल्ले तमाशाला. हायस्कुलच्या इमारत निधिला शाळेनच तमाशा ठेवला मंग काय करनार? प्रकाश घाटपांडे

झकासराव 01/03/2008 - 20:45
आपल्या लेखणीचा मी फॅन बनलो काही लेख वाचुन मनोगतावर. इकडे कधी फारसे लिहिले नाहीत. पण हा षटकार होता. :) लिहित रहा आम्ही वाचत राहु :)

प्रमोद देव 01/03/2008 - 20:56
पण एका गोष्टीत मतभिन्नता आहे. त्या मानाने 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' काहीसे बटबटीत वाटते. बाबुजींचा सूर सच्चा हे खरे, पण उच्चारात भाव काहीसे कोंबून बसवण्याच्या हट्टापायी म्हटलेले 'त्याच्या काळजाची तार तिनं छेडली' हे थोडेसे नाटकी वाटते. आणि त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते. माझ्या मते हे गाणे म्हणजे ह्या चित्रपटाचे सार आहे (आणि 'कळस'ही). चालही उत्तम आहे,बाबुजींनीही तितकेच उतम आणि समरसून गायलंय. हे गाणे वजा केले तर चित्रपटातली मजाच निघून जाईल. बाकी इतर बाबतीत रावसाहेबांशी सहमत आहे.

मस्त परीक्षण.... .......... संध्याबाईंची अभिनयाची पद्धत आम्हाला खूप खोटी खोटी आणि नाटकी वाटते...आणि ते उथळ न्हाई न्हाई, अगदी विनोदी....

धनंजय 02/03/2008 - 04:55
सुंदर गाणी, चांगली कथा, जरा भडक दिग्दर्शन, आणि संध्याबाईंचे काम विसरायची मनापासून इच्छा, या गोष्टी पिंजर्‍याबद्दल लक्षात राहातात. फारा दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळत आहे. परीक्षणाबद्दल धन्यवाद.

In reply to by धनंजय

विकास 02/03/2008 - 08:15
सुंदर गाणी, चांगली कथा, जरा भडक दिग्दर्शन, आणि संध्याबाईंचे काम विसरायची मनापासून इच्छा, या गोष्टी पिंजर्‍याबद्दल लक्षात राहातात.
अचूक वर्णन जरी दोन अडीच तासाच्या सवयीने संध्याचे काम आवडायला लागले असे वाटते.. :) यातील पथेटीक पर्सनॅलीटी म्हणून निळू फुलेंचे काम लक्षात रहाणारे आहे. तसेच आवडते गाणे हे उषाने म्हणलेले "तुम्हावरं केली मी मरर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल" हे आहे. (फक्त त्यातील पहील्या कडव्यात "जवळ यावं मला पुसावं.." असे ऐकल्यावर आमच्या वेळची पोर फिदीफिदी हसली होती...)

रावसाहेब, 'पिंजरा' चित्रपट आम्हाला आवडतो, शोकांतिका म्हणावी तसे गुण या चित्रपटात. त्यातली गाणीही आम्हाला तितकीच आवडतात. बाकी आपल्या चित्रपटाच्या परिक्षणाने आम्हाला या चित्रपटात असलेल्या बारकाव्यांकडे पाहण्याची एक दृष्टीही दिली, म्हणजे पिंजरा चित्रपटातल्या अनेक गोष्टी पाहण्याच्या राहिल्या असे आम्हाला वाटले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'ग..साजणी' हे पि॑जरा चित्रपटातील उत्कृष्ट गीत माझ्या माहितीनुसार (कै) 'वाघ्या' नामक एका 'फोक' गायकाने म्हटले आहे. ते गाणे ज्या ठसक्यात म्हटले आहे तसे आजतागायत इतर कुणालाही म्हणता आलेले नाही असे आमचे मत आहे.

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 10/03/2008 - 00:34
अथवा ...लीचा गायक अशा आणखी दोन व्युत्पत्ती शक्य आहेत. सिंगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे शिवणाचे यंत्र. "फोक सिंगर" म्हणजे छडीने डागडुजी केलेले शिवणयंत्र (फोक = छडी). फोक सिंग करणे म्हणजे एखादी खोटी कथा (फोक) सरदारजीचा विनोद म्हणून खपवणे. गंभीर चर्चेत डॉ.साहेबांनी चांगली माहिती मांडली, थट्टेचे नशीब तिच्या वाटेला आले पण आमच्याकडून, हे दुर्दैव.

प्राध्यापक 27/02/2013 - 20:48
अप्रतिम परीक्षण, खूप आवडले. चित्रपटातील पाटलाच्या पात्राचा अभिनय ही छान,{त्या जेष्ठ कलाकाराचे नाव माहीत नाही}.

हुप्प्या 28/02/2013 - 01:35
ह्यातील आवडलेल्या गोष्टी म्हणजे गाणी, गाणी आणि निळू फुले. बस्स. त्यातही आली ठुमकत नार आणि तुम्हावर केली मी मर्जी ही बेष्ट! ते दे रे कान्हा चोळी लुगडी गाणेही नको वाटते. उगाच अध्यात्म वगैरे घुसडायचा केविलवाणा प्रयत्न वाटतो. बाकी बटबटीतपणा अतीच आहे. परीक्षणात ह्या वर्मावर बोट ठेवले आहे. सिम्बॉलिजमचा अतिरेक हास्यास्पद होतो. व्ही शांताराम ह्यांना असल्या सिम्बॉलिक गोष्टींचा हव्यास आहे हे बाकी सिनेमातही दिसते. मुळात तो मास्तर लग्न बिग्न भानगडीपासून इतका फटकून का असतो आणि संध्यासारख्या भुताच्या प्रेमात का पडतो हे आजिबात पटत नाही. आणि त्या मास्तराच्या हत्येकरता त्यालाच फाशी देणे तर अचाट आणि आचरट वाटते. संध्या हे चित्रपटसृष्टीला पडलेले दु:स्वप्न आहे (माझ्या मते)! हा लेख वर आणल्याबद्दल आभारी आहे. आधी वाचला नव्हता.

In reply to by हुप्प्या

अर्धवटराव 28/02/2013 - 02:41
>>मुळात तो मास्तर लग्न बिग्न भानगडीपासून इतका फटकून का असतो आणि संध्यासारख्या भुताच्या प्रेमात का पडतो हे आजिबात पटत नाही. -- मास्तर लग्न बिग्न करत नाहि म्हणुनच कदाचीत भुतीण बाईच्या मागे लागला असावा ;) अर्धवटराव

तिमा 04/03/2013 - 18:52
चित्रपट बर्‍याच ठिकाणी बटबटीत वाटला होता आणि तरीही साधारण आवडला होता. पण रावांचं हे परीक्षण जास्त आवडले. संध्या , या नटीविषयी काय वाटायचे ते इतक्या नेमक्या शब्दात कधी सुचले नव्हते. धागा वर आणणार्‍यांचे आभार.

आबा 04/03/2013 - 19:24
परिक्षण आवडले अवांतर: मध्यंतरी "डेर ब्लाउ अ‍ॅन्गेल" नावाचा चित्रपट पाहण्यात आला होता पिंजरा आणि त्याचं कथानक सारखंच असल्याच लक्षात आलं. हा चित्रपट यूट्यूब वर उपलब्ध आहे !

हुप्प्या 28/03/2013 - 08:17
http://www.saamana.com/2013/March/28/Link/Mumbai2.htm लवकरच ह्या सिनेमाला ४१ वर्षे होतील. इथेही म्हटले आहे की हा सिनेमा ब्लू एंजल ह्या चित्रपटावर आधारित आहे. हा श्रीराम लागूंचा पहिलाच सिनेमा म्हणे. हे मला माहित नव्हते.

लई भारी 04/06/2015 - 23:57
परिक्षण एकदम आवडले. 'कोल्लापुरी' भाषेचा प्रभाव सहज जाणवतो. एक बारिक मुद्दा - >>>आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक हे वर्णन निळु भाउं साठी असेल तर माझ्या मते ते 'अक्का' च्या नादाने घरदार सोडून आलेले असतात, चंद्रकलाच्या नाही. बाकी भाउंच्या भूमिकेला तोड नाही हे खरेच. 'ग साजणे' परत शोधून ऐकले :)

सिरुसेरि 05/06/2015 - 12:54
पिंजराचे कथा , संवाद कोणी लिहिले ते समजुन घ्यायला आवडेल . संध्या यांना हा रोल चुकीच्या वयात मिळाला असे वाटते. बाकी त्यांचे 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा अशा अनेक गाजलेल्या हिन्दी चित्रपटातील काम उत्क्रुष्ट होते . तसेच 'नैन से नैन नाही मिलाओ' , 'अरे जारे जारे नटखट', आधा है चंद्रमा' , 'पंख होते तो उड आती रे' अशा अनेक गीतांवरचे अवघड न्रुत्यही खुप चांगल्या प्रकारे सादर केले .

तिमा 06/06/2015 - 14:43
बाकी त्यांचे 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा अशा अनेक गाजलेल्या हिन्दी चित्रपटातील काम उत्क्रुष्ट होते . तसेच 'नैन से नैन नाही मिलाओ' , 'अरे जारे जारे नटखट', आधा है चंद्रमा' , 'पंख होते तो उड आती रे' अशा अनेक गीतांवरचे अवघड न्रुत्यही खुप चांगल्या प्रकारे सादर केले . ही वाक्ये वाचून फारच हंसू आले. स्वतःच्या मानेची अनावश्य्क अति हालचाल आणि सदैव ते कमरेवर हात ठेवून डोळे मटकावत बोलणे, ह्या अभिनयाला आम्ही तरी अतिकृत्रिम समजत होतो.

सिरुसेरि 10/06/2015 - 12:42
"ही वाक्ये वाचून फारच हंसू आले. स्वतःच्या मानेची अनावश्य्क अति हालचाल आणि सदैव ते कमरेवर हात ठेवून डोळे मटकावत बोलणे, ह्या अभिनयाला आम्ही तरी अतिकृत्रिम समजत होतो." या प्रकारच्या अतिकृत्रिम लकबी तर वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना या सुद्धा करायच्या . पण त्या अमराठी त्यामुळे त्यांना सगळे माफ . घर की मुर्गी दाल बराबर .

In reply to by सिरुसेरि

नाही हो.. वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना ह्यांच्या लकबीत नाजुकपणा, अदाकारी असं काहीतरी होतं. संध्या ह्यांच्या लकबींना हिसके देणं म्हणता येईल. काहीतरी विचित्रच स्टाईल होती त्यांची.

सिरुसेरि 10/06/2015 - 15:17
एखादी मराठमोळी अभिनेत्री , अमराठी वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना यांच्या गर्दीत नायिका म्हणुन उभी राहते . शांताराम बापुंच्या थोड्या वेगळ्या पठडीतल्या / कथानकांच्या सिनेमांमध्ये नायिकेचा रोल निभावते . ('झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा ) . दिग्दर्शक , न्रुत्य दिग्दर्शक यांचा विश्वास सार्थ ठरविते . शांताराम बापुंच्या सिनेमांमध्ये त्याकाळचे टॉपचे नायक - जसे की देव , दिलिप , राज नसतानाही त्या मानाने कमी परिचित नायकांबरोबर (गोपिक्रिष्न , महिपाल ) आपली भुमिका चोख बजावते . व सिनेमाच्या यशामध्ये आपलेही योगदान देते. हे कर्तुत्व टाळता येणार नाही. कितीही जड वाटले तरी. 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , पिंजरा असे अनेक चित्रपट भारतात सर्वत्र व भारताबाहेरही लोकप्रिय व आर्थिक द्रुष्ट्याही यशस्वि झाले . व यश हे नेहमीच सांघिक कामगिरिमुळे साध्य होते.
3

मिसळपाव- एक कुरण..

प्राजु ·

बेसनलाडू 25/02/2008 - 02:15

लयबद्ध झालीये कविता. वर्णन आवडले.

(आस्वादक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 26/02/2008 - 21:11
म्हणतो..

लयबद्ध झालीये कविता. वर्णन आवडले.

(लाडवी गझला फाडणारा)सुमारकेशव

विसोबा खेचर 25/02/2008 - 07:34

प्राजू, तुझी कविता खरंच सर्वव्यापी आहे! मस्त वाटली वाचायला...!:)

कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती
एकमेका घेऊन सोबती, गगनावरती.... वेलू नेती.

क्या बात है...!

इथे फक्त 'गगनावरती.... वेलू नेती' च्या ऐवजी 'गगनावेरी.... वेलू नेती' असे पाहिजे असे वाटते. ज्ञानोबामाउलीनेही 'तयाचा वेलू गेला गगनावेरी' असेच म्हटले आहे..

असो...

आपला,
(मेंढपाळ) तात्या.

धमाल मुलगा 25/02/2008 - 12:28
प्राजुताई, झकास! कुठून सुचत॑ बॉ तुम्हा लोका॑ना एव्हढ॑ छान लिहायला?
एखाद॑ औषध वगैरे आहे का त्यासाठी? घ्याब॑ म्हणतो...५-७ लिटर :))

कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती

एकमेका घेऊन सोबती, गगनावेरी.... वेलू नेती.

हे एकदम मस्त.

स्कॉच सारखा पिवळा डांबिस एखादी चरोळी तोंडात टाकतो,
मुलगा तो धमाल म्हणत ऋषिकेशही एक गझल हाणतो..

च्यामारी, ऋषिकेशला कशाला बिचार्‍याला आमच्या प॑क्तीत बसवल॑ बुवा?

(कुरणातली शेळी)प्राजु

ह.ह .पु.वा.

-कुरणातल॑ नाठाळ कोकरू
ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

ऋषिकेश 26/02/2008 - 00:25

च्यामारी, ऋषिकेशला कशाला बिचार्‍याला आमच्या प॑क्तीत बसवल॑ बुवा?

असं का रे धमाल? मला का बॉ 'ऑड मॅन आउट' काढतोयस? ;) मला धमाल आली त्या पंक्तीत बसायला :प

-(ऑड मॅन)ऋषिकेश

राजमुद्रा 25/02/2008 - 12:43

किती मिसळून गेली आहेस ग मिसळपावमध्ये ! इतकी की स्वता:ला सुध्दा विसरलीस?

आज तू मला अशी वाटलीस-

 

मिसळलीस तू अलगद, मन विचारी रंग तुझा कोणता?

तू म्हणालीस पाण्यासारखा, 

लाल मिसळता प्रेमा, हिरवा मिसळता हरीता, 

पिवळा मिसळता तेजा, निळा मिसळता सरीता.

 

राजमुद्रा :)

 

प्राजु, मस्तच जमली आहे कविता...

कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती

हे मात्र एकदम चपखल बसले आहे.

बिपिन कार्यकर्ते.

विसोबा खेचर 25/02/2008 - 14:03

ह्या सुंदर कवितेकरता प्राजूचे तर कौतुक निश्चितच आहे, परंतु त्याही पलिकडे जाऊन खालील एक विचार सहजच आत्ता मनात डोकावला.

अवघ्या चारसहा महिन्यांच्या कालावधीतच मिपावर वावरणार्‍या इतक्या सार्‍या मंडळींच्या लेखनानुसार, वावर-विशेषानुसार एक सुंदर कविता लिहिली जावी, ही माझ्यामते मिपाकरता नक्कीच भूषणावह गोष्ट आहे!

मिपाकरांचा मिपावरील अगदी घरच्यासारखा वावर, कुठेतरी माणसांबद्दलची आपुलकी आणि ओढ, थोडीशी पारिवारीक, कौटुंबिक भावना इत्यादी गोष्टी असल्याशिवाय अशी कविता जन्म घेत नाही असं मला वाटतं!

असो...!

आपला,
(समाधानी परंतु अंतर्मूख!) तात्या.

किशोरी 25/02/2008 - 14:24

अरे वा प्राजु एकदम मस्त कविता,या कुरनाचे रुप सुदधा एकदम पालतुन गेले आहे
वा सगळ्च छान वाटते आहे!!मस्त....
(कुरनात चरायला येनार मेंढृरु)किशोरी

 

माझी दुनिया 25/02/2008 - 16:48
अरे वा ! माझाही उल्लेख आला की. अर्थात तो नसता तरी कौतुक केलं असतंच.मस्तच जमलीय कविता.

माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

शेळीताई,

कुरण आवडले......

छोटी टिंगी ;)

अवांतर : दोन ओळींमध्ये इतकी जागा रिकामी कशी ? लाईन स्पेसिंगचा प्रॉब्लेम आहे का? 

In reply to by ब्रिटिश टिंग्या

प्राजु 25/02/2008 - 20:19

अरे धनंजय काळा..  शिफ्ट पकडून एन्टर मार.. म्हणजे लाईन स्पेसिंग कमी होईल.

- (सर्वव्यापी)प्राजु

कुरणात उतरली चारोळ्यांची परी.

खास मिपाकरांसाठी. झकास. मी तर अवघ्या महिन्यादोनमहिन्यापूर्वी आलो. आपल्या सहज आपुलकीने केव्हा मिपा कर झालो कळलेहि नाही.

असाच सर्वांचा लोभ असूद्या.

प्राजु 25/02/2008 - 19:57

आपण सर्वांनी ही येडी कविता.. गोड मानून घेतलीत यातच सगळं मला मिळालं..
राजमुद्राताई,
तू माझ्यावर लिहिलेल्या रंगित ओळी खूप आवडल्या. मनापासून धन्यवाद.

बिरूटे सरांच्या "तात्या मनोगतावर .." या लेखातूनच खरंतर मला स्फुर्ती मिळाली असं मी म्हंटल तर वावगं ठरू नये. मी सरांची आभारी आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

प्राजुताई, *** मिपाकरांचा एकूण स्वभाव पाहता तुमची ओळ म्हणजे फारच

सौजन्याचे लक्षण आहे म्हणायचे. तुमच्याऐवजी दुसरा कोणी मिपाकर असता 

तर नक्की उकिरडा किंवा तत्सम शब्द वाचायला मिळाला असता या विषयी 

शंका नाही.

*** मूळ वाक्य पु.लंच्या असा मी असामी मधील. ऐका इथे : 

http://ideasnext.com/marathimusic/Kathakathan/index.htm

In reply to by सृष्टीलावण्या

प्राजु 25/02/2008 - 20:25

अहो यात काही वेगळा अर्थ नाहिये. तुम्ही 'पसारा" या विषयावर इथे चर्चा घडवून आणली होती ना म्हणून तो संदर्भ तुमच्या नावासोबत घेतला. तसेच शेखर चा संबंध   "मेतकुट भात" या चर्चेशी निगडीत आहे. वरदाच संबंध " ओफिस मध्ये काम नसताना तुम्ही काय करता? " या तिच्या लेखनाशी, सुधिर कांदळकरांचा 'वाट फुटेल तिकडे" शी, प्रभाकर पेठकरांचा त्यांच्या ओमान मधल्या रेस्टॉरंटशी.. बस्स!

- (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

मला अधून मधून असामी असा मी चे डायलॉग विनाकारण फेकायची 

सवयच आहे... असो.

तुमचे नाव प्राजु न असता प्रांजळा असायला हवे होते असे मला वाटते...

अभिनंदन प्राजु.

प्रभाकराच्या हाटिलात मात्र फुकट खाण्याची स्वप्ने सदा..
स्वप्ने कशा करीता? 'सत्यात' सर्वांनाच निमंत्रण आहे. चला, जमवा कट्टा. जेवण स्पॉन्सर करु.

धन्यवाद.

 

छानच लिहिली आहेस, प्राजु, तू ही कविता!

आगे बढते रहो...

तात्यांनू, कुरणांत ही बरीच शेरडं, मेंढरं, कोकरं जमायला लागली की हो!

बरं झालं, च्यायला, सागुतीची घरच्याघरीच सोय झाली, आता सकाळी-सकाळी उठून अब्दुलखाटकाकडे जायला नको.:))))

काय मस्त लिहिली आहेस ग? एकदम सही$$$$ तुझ्या भाषेत.
खरे तर एका कवितेत सर्वांची ओळख झाली आहे.
नविन सदस्यांना ही कविता वाचली तरी एक एक सभासदांच्या कला (कळा)
काय आहेत ते कळेल.....:)
फारच छान.

दिवाळी अंकात फराळाची कविता कशी येते तसे वाटले.

अवलिया 26/02/2008 - 19:05

मेंढरांमधे आमचा समावेश न करुन आमच्यावर अन्याय झाला असे आम्ही मानतो व जाहिर निषेध व्यक्त करतो:)

 

नाना

मुक्तसुनीत 26/02/2008 - 21:36

कविता वाचून एकदम घरगुती, उबदार , छान वाटते. इंदिराबाईंच्या एका कवितेची अर्धी ओळ आठवते :

"असेच काही द्यावे.... घ्यावे....

म्हणून दिधला एक मरवा..."

 

रंजन 29/02/2008 - 22:45

याला काय गंम्त म्हणायची वाटत. इथे काय मेंढर रचायला येतात असे वाटावे इतके हिरवे कायि दिसले नाहि.

In reply to by रंजन

आयला, मेंढरांची तर हिथं लयलूटच हाय!  काही आपखूशीनं येणारी मेंढरं आनी काही स्वतःला न कळत येणारी मेंढरं!!!!!! :))

लबाड मुलगा 01/03/2008 - 15:50
च्यायला अपन जरा ङ्याक्चीक मधे फिराय्ला काय गेल्तो तर कुर्णातुन अप्लया नावाचआ पत्ता क्ट प्राजु.... हे चांग्ला नाय याचा तुला लय त्रास हुइल हा.... सांगुन ठिव्तोय अपन यक्दम डेंजर हाय पक्या

मस्तानी 13/01/2011 - 03:50
प्राजू ... आता "आजचे नवीन खेळाडू" घेऊन अशीच एक सही रचना होऊन जाऊ दे :) या नवीन "शोध" सुविधेमुळे असंच काही जुन - चांगलं वाचायला मिळतंय सध्या !

In reply to by मस्तानी

स्वानन्द 13/01/2011 - 09:36
धन्यवाद मस्तानी... हा धागा वर आणल्याबद्दल. एवढी मस्त कविता वाचायची राहून गेली असती. बाकी याचा सिक्वेल येऊन जाऊ देच.

सुधीर काळे 14/01/2011 - 08:42
प्राजू, तुझ्या धमन्यात कविता दौडत असते याचाच प्रत्यय पुन्हा आला! वाटाफोडित जातो सुधिर, शेखर म्हणे मेतकुटभात बरा.. ही ओळ वाचल्यावर जरासे 'आँ' झाले होते (कारण 'म्या पामरा'ने कुठल्याही वाटा फोडल्या-बिडल्याची जाणीव तरी नाहीं) पण ते सुधीर कांदळकर आहेत हे कळल्यावर 'हुश्श' झाले.

अरुण मनोहर 14/01/2011 - 09:32
छान कविता आहे. अदृष्य मेंढरू असण्याचे फायदे नेहमीच मिपावर मला मिळतात. पुन्हा एकदा तो फायदा देण्यासाठी प्राजूचे अभिनंदन. संपादित-> अरेच्चा! हा धागा दोन वर्षांनी वर आणण्यात आला आहे तर! पण एनी वे, आमचे अदृष्य पणाचे फायदे अजूनही तसेच सुरू आहेत. नो प्रॉब्लेम!

बेसनलाडू 25/02/2008 - 02:15

लयबद्ध झालीये कविता. वर्णन आवडले.

(आस्वादक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 26/02/2008 - 21:11
म्हणतो..

लयबद्ध झालीये कविता. वर्णन आवडले.

(लाडवी गझला फाडणारा)सुमारकेशव

विसोबा खेचर 25/02/2008 - 07:34

प्राजू, तुझी कविता खरंच सर्वव्यापी आहे! मस्त वाटली वाचायला...!:)

कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती
एकमेका घेऊन सोबती, गगनावरती.... वेलू नेती.

क्या बात है...!

इथे फक्त 'गगनावरती.... वेलू नेती' च्या ऐवजी 'गगनावेरी.... वेलू नेती' असे पाहिजे असे वाटते. ज्ञानोबामाउलीनेही 'तयाचा वेलू गेला गगनावेरी' असेच म्हटले आहे..

असो...

आपला,
(मेंढपाळ) तात्या.

धमाल मुलगा 25/02/2008 - 12:28
प्राजुताई, झकास! कुठून सुचत॑ बॉ तुम्हा लोका॑ना एव्हढ॑ छान लिहायला?
एखाद॑ औषध वगैरे आहे का त्यासाठी? घ्याब॑ म्हणतो...५-७ लिटर :))

कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती

एकमेका घेऊन सोबती, गगनावेरी.... वेलू नेती.

हे एकदम मस्त.

स्कॉच सारखा पिवळा डांबिस एखादी चरोळी तोंडात टाकतो,
मुलगा तो धमाल म्हणत ऋषिकेशही एक गझल हाणतो..

च्यामारी, ऋषिकेशला कशाला बिचार्‍याला आमच्या प॑क्तीत बसवल॑ बुवा?

(कुरणातली शेळी)प्राजु

ह.ह .पु.वा.

-कुरणातल॑ नाठाळ कोकरू
ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

ऋषिकेश 26/02/2008 - 00:25

च्यामारी, ऋषिकेशला कशाला बिचार्‍याला आमच्या प॑क्तीत बसवल॑ बुवा?

असं का रे धमाल? मला का बॉ 'ऑड मॅन आउट' काढतोयस? ;) मला धमाल आली त्या पंक्तीत बसायला :प

-(ऑड मॅन)ऋषिकेश

राजमुद्रा 25/02/2008 - 12:43

किती मिसळून गेली आहेस ग मिसळपावमध्ये ! इतकी की स्वता:ला सुध्दा विसरलीस?

आज तू मला अशी वाटलीस-

 

मिसळलीस तू अलगद, मन विचारी रंग तुझा कोणता?

तू म्हणालीस पाण्यासारखा, 

लाल मिसळता प्रेमा, हिरवा मिसळता हरीता, 

पिवळा मिसळता तेजा, निळा मिसळता सरीता.

 

राजमुद्रा :)

 

प्राजु, मस्तच जमली आहे कविता...

कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती

हे मात्र एकदम चपखल बसले आहे.

बिपिन कार्यकर्ते.

विसोबा खेचर 25/02/2008 - 14:03

ह्या सुंदर कवितेकरता प्राजूचे तर कौतुक निश्चितच आहे, परंतु त्याही पलिकडे जाऊन खालील एक विचार सहजच आत्ता मनात डोकावला.

अवघ्या चारसहा महिन्यांच्या कालावधीतच मिपावर वावरणार्‍या इतक्या सार्‍या मंडळींच्या लेखनानुसार, वावर-विशेषानुसार एक सुंदर कविता लिहिली जावी, ही माझ्यामते मिपाकरता नक्कीच भूषणावह गोष्ट आहे!

मिपाकरांचा मिपावरील अगदी घरच्यासारखा वावर, कुठेतरी माणसांबद्दलची आपुलकी आणि ओढ, थोडीशी पारिवारीक, कौटुंबिक भावना इत्यादी गोष्टी असल्याशिवाय अशी कविता जन्म घेत नाही असं मला वाटतं!

असो...!

आपला,
(समाधानी परंतु अंतर्मूख!) तात्या.

किशोरी 25/02/2008 - 14:24

अरे वा प्राजु एकदम मस्त कविता,या कुरनाचे रुप सुदधा एकदम पालतुन गेले आहे
वा सगळ्च छान वाटते आहे!!मस्त....
(कुरनात चरायला येनार मेंढृरु)किशोरी

 

माझी दुनिया 25/02/2008 - 16:48
अरे वा ! माझाही उल्लेख आला की. अर्थात तो नसता तरी कौतुक केलं असतंच.मस्तच जमलीय कविता.

माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

शेळीताई,

कुरण आवडले......

छोटी टिंगी ;)

अवांतर : दोन ओळींमध्ये इतकी जागा रिकामी कशी ? लाईन स्पेसिंगचा प्रॉब्लेम आहे का? 

In reply to by ब्रिटिश टिंग्या

प्राजु 25/02/2008 - 20:19

अरे धनंजय काळा..  शिफ्ट पकडून एन्टर मार.. म्हणजे लाईन स्पेसिंग कमी होईल.

- (सर्वव्यापी)प्राजु

कुरणात उतरली चारोळ्यांची परी.

खास मिपाकरांसाठी. झकास. मी तर अवघ्या महिन्यादोनमहिन्यापूर्वी आलो. आपल्या सहज आपुलकीने केव्हा मिपा कर झालो कळलेहि नाही.

असाच सर्वांचा लोभ असूद्या.

प्राजु 25/02/2008 - 19:57

आपण सर्वांनी ही येडी कविता.. गोड मानून घेतलीत यातच सगळं मला मिळालं..
राजमुद्राताई,
तू माझ्यावर लिहिलेल्या रंगित ओळी खूप आवडल्या. मनापासून धन्यवाद.

बिरूटे सरांच्या "तात्या मनोगतावर .." या लेखातूनच खरंतर मला स्फुर्ती मिळाली असं मी म्हंटल तर वावगं ठरू नये. मी सरांची आभारी आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

प्राजुताई, *** मिपाकरांचा एकूण स्वभाव पाहता तुमची ओळ म्हणजे फारच

सौजन्याचे लक्षण आहे म्हणायचे. तुमच्याऐवजी दुसरा कोणी मिपाकर असता 

तर नक्की उकिरडा किंवा तत्सम शब्द वाचायला मिळाला असता या विषयी 

शंका नाही.

*** मूळ वाक्य पु.लंच्या असा मी असामी मधील. ऐका इथे : 

http://ideasnext.com/marathimusic/Kathakathan/index.htm

In reply to by सृष्टीलावण्या

प्राजु 25/02/2008 - 20:25

अहो यात काही वेगळा अर्थ नाहिये. तुम्ही 'पसारा" या विषयावर इथे चर्चा घडवून आणली होती ना म्हणून तो संदर्भ तुमच्या नावासोबत घेतला. तसेच शेखर चा संबंध   "मेतकुट भात" या चर्चेशी निगडीत आहे. वरदाच संबंध " ओफिस मध्ये काम नसताना तुम्ही काय करता? " या तिच्या लेखनाशी, सुधिर कांदळकरांचा 'वाट फुटेल तिकडे" शी, प्रभाकर पेठकरांचा त्यांच्या ओमान मधल्या रेस्टॉरंटशी.. बस्स!

- (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

मला अधून मधून असामी असा मी चे डायलॉग विनाकारण फेकायची 

सवयच आहे... असो.

तुमचे नाव प्राजु न असता प्रांजळा असायला हवे होते असे मला वाटते...

अभिनंदन प्राजु.

प्रभाकराच्या हाटिलात मात्र फुकट खाण्याची स्वप्ने सदा..
स्वप्ने कशा करीता? 'सत्यात' सर्वांनाच निमंत्रण आहे. चला, जमवा कट्टा. जेवण स्पॉन्सर करु.

धन्यवाद.

 

छानच लिहिली आहेस, प्राजु, तू ही कविता!

आगे बढते रहो...

तात्यांनू, कुरणांत ही बरीच शेरडं, मेंढरं, कोकरं जमायला लागली की हो!

बरं झालं, च्यायला, सागुतीची घरच्याघरीच सोय झाली, आता सकाळी-सकाळी उठून अब्दुलखाटकाकडे जायला नको.:))))

काय मस्त लिहिली आहेस ग? एकदम सही$$$$ तुझ्या भाषेत.
खरे तर एका कवितेत सर्वांची ओळख झाली आहे.
नविन सदस्यांना ही कविता वाचली तरी एक एक सभासदांच्या कला (कळा)
काय आहेत ते कळेल.....:)
फारच छान.

दिवाळी अंकात फराळाची कविता कशी येते तसे वाटले.

अवलिया 26/02/2008 - 19:05

मेंढरांमधे आमचा समावेश न करुन आमच्यावर अन्याय झाला असे आम्ही मानतो व जाहिर निषेध व्यक्त करतो:)

 

नाना

मुक्तसुनीत 26/02/2008 - 21:36

कविता वाचून एकदम घरगुती, उबदार , छान वाटते. इंदिराबाईंच्या एका कवितेची अर्धी ओळ आठवते :

"असेच काही द्यावे.... घ्यावे....

म्हणून दिधला एक मरवा..."

 

रंजन 29/02/2008 - 22:45

याला काय गंम्त म्हणायची वाटत. इथे काय मेंढर रचायला येतात असे वाटावे इतके हिरवे कायि दिसले नाहि.

In reply to by रंजन

आयला, मेंढरांची तर हिथं लयलूटच हाय!  काही आपखूशीनं येणारी मेंढरं आनी काही स्वतःला न कळत येणारी मेंढरं!!!!!! :))

लबाड मुलगा 01/03/2008 - 15:50
च्यायला अपन जरा ङ्याक्चीक मधे फिराय्ला काय गेल्तो तर कुर्णातुन अप्लया नावाचआ पत्ता क्ट प्राजु.... हे चांग्ला नाय याचा तुला लय त्रास हुइल हा.... सांगुन ठिव्तोय अपन यक्दम डेंजर हाय पक्या

मस्तानी 13/01/2011 - 03:50
प्राजू ... आता "आजचे नवीन खेळाडू" घेऊन अशीच एक सही रचना होऊन जाऊ दे :) या नवीन "शोध" सुविधेमुळे असंच काही जुन - चांगलं वाचायला मिळतंय सध्या !

In reply to by मस्तानी

स्वानन्द 13/01/2011 - 09:36
धन्यवाद मस्तानी... हा धागा वर आणल्याबद्दल. एवढी मस्त कविता वाचायची राहून गेली असती. बाकी याचा सिक्वेल येऊन जाऊ देच.

सुधीर काळे 14/01/2011 - 08:42
प्राजू, तुझ्या धमन्यात कविता दौडत असते याचाच प्रत्यय पुन्हा आला! वाटाफोडित जातो सुधिर, शेखर म्हणे मेतकुटभात बरा.. ही ओळ वाचल्यावर जरासे 'आँ' झाले होते (कारण 'म्या पामरा'ने कुठल्याही वाटा फोडल्या-बिडल्याची जाणीव तरी नाहीं) पण ते सुधीर कांदळकर आहेत हे कळल्यावर 'हुश्श' झाले.

अरुण मनोहर 14/01/2011 - 09:32
छान कविता आहे. अदृष्य मेंढरू असण्याचे फायदे नेहमीच मिपावर मला मिळतात. पुन्हा एकदा तो फायदा देण्यासाठी प्राजूचे अभिनंदन. संपादित-> अरेच्चा! हा धागा दोन वर्षांनी वर आणण्यात आला आहे तर! पण एनी वे, आमचे अदृष्य पणाचे फायदे अजूनही तसेच सुरू आहेत. नो प्रॉब्लेम!

इथे वरचेवर लिहिणारे, वावरणारे सभासद, लेखक यांच्यासाठी ही कविता. कोणतेही कवितेचे बंधन न पाळता लिहिलेली. जितकी नावे आठवली इथे सापडली आणि कवितेत गुंफण्यास सोपी वाटली त्या सभासदांचि नावे घेतली आहेत.. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. ही निव्वळ कविता आहे.. आणि सगळ्यांनी हलकी घ्यावी हि विनंती..

मिसळपाव नावाच्या कुरणामध्ये लहानमोठी मेंढरं जमवतो,
तात्या मेंढपाळ स्वतःला मात्र विसोबा खेचर म्हणवतो..

ओंकार,निलकांत असती या कुरणाचे राखणकर्ता,
दाढा कोरत बसतो प्रसाद, बिपिन म्हणे मी कार्यकर्ता..

तात्या ,मनोगतावर परतला....!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

विसोबा खेचर 24/02/2008 - 13:19
च्यायला बिरुटेशेठ! अत्यंत जोरदार आणि खुसखुशीत लेख... तुम्ही तर सिक्सरच मारलीत तिच्यायला! :)) हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन........ :) आत्ता जरा नीलकांतासोबत मिपाच्या मुखपृष्ठाच्या गडबडीत आहे, नंतर सवडीने विस्तृत प्रतिसाद टाकतो... बाय द वे, मनो-मिसळ हे नांव क्लासच आहे! :) असो, या आंतरजालीय जगात त्या वेलणकराला माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आणि मलाही त्याच्याशिवाय दुसरं कुणी नाही हेच बाकी खरं!:) पण घाबरू नका बिरुटेशेठ. आम्ही कुठंही जात नाही. आता आम्हाला पुन्हा मनोगतावर घेणार नाहीत! आणि घेतलं तरी 'कसा नाक मुठीत धरून परत आला फोकलिचा!' असंच सगळे म्हणतील! :) आपला, (मूळचा मनोगतप्रेमी तरीही आता कट्टर मिपाकर!) तात्या.

एक कार्यक्रम होत असे गणेशोत्सवात. त्याची आठवण झाली. त्यात लोकप्रिय व्यक्तींवर विविध आरोप केले जात. त्याची आठवण झाली. खरे म्हणजे मला हा पुर्वेतिहास ठाऊक नाही. पण अंदाज बांधू शकतो. मजा आली.

परीचा परा 24/02/2008 - 15:10
येवढे सगळे वाचून शॉकच बसला व्हता... पण शेवटी दिलेल्या गोष्टीने खुलासा झाला... सुचना:- वरील लेखन काल्पनिक आहे, तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र वरील लेखात आलेली नावे, त्यांच्या तोंडी असलेली विधाने, काल्पनिक आहेत. ती नावे, विधाने कोणास आपली वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !!! :) नाय तर आम्हाला आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे वाटत होते... म्हटले आत्ताच आलोय इथे आणि संकेतस्थळ बंद करायच्या भाषा कसल्या चालू झाल्या? डॉक्टरसाहेब आमच्या तोंडचे पाणीच पळवले होते तुम्ही.... (तात्या गेले तर तर मिसळपावाची तर्रर्रीच गेल्यासारखं वाटलं असतं....) नाहीतरी संकेतस्थळ काढून सदस्यांचा विश्वासघात करणारे बरेच आहेत बाजारात.... त्याला मिसळपाव १००% अपवाद आहे ह्याची खात्री पटल्यावरच इथला सदस्य झालो ... डॉक्टरसाहेब बाँब फोडत जा हो... पण तळटीप सगळ्यात आधी लिहित जावा राव... बरं झालं तात्यांनी पहिलाच प्रतिसाद दिला... नाही तर आम्ही इथला गाशा गुंडाळायचंच ठरवलं होतं.....आमच्यासारखे भडक माथ्याचे लोक तळटीप न वाचताच गोंधळास सुरुवात करतील.... :) {परीच्या प्रतिक्षेत} परा ....

धोंडोपंत 24/02/2008 - 15:22
प्राध्यापक साहेब, अप्रतिम खुमासदार लेख. क्या बात है!!!!!! प्रत्येक मिपासदस्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू फार सुंदरपणे टिपलेत तुम्ही. वा वा. लेख फार फार आवडला. अतिशय मस्त भट्टी जमली आहे. ती अशीच धगधगत राहू दे. आमचा रविवार तुमच्या लेखाने फार आनंदात गेला. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत. आपला, (स्नेही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

व्व्व्वा ! मजा आली तिच्यायला... बर्‍याच दिवसांनी इतके फर्मास आणि चविष्ट लिखाण वाचले. लाजवाब. प्रा. साहेब लगे रहो. त्वाड्डा जवाब नही. बिपिन.

प्रियाली 24/02/2008 - 18:57

सर, तुम्ही नाss काही तरी घेऊन येता बॉ.......चाल्लाय तर जाऊ दे......तुम्हाला काय त्याचा त्रास होतोय......... सध्या अमेरिकेत घराचे बांधकाम सुरू केलंय....त्याचसाठी 'चित्राचे,गेल्या शतकांतील अमेरिकन घरे - ४ - वाचते आहे, तेव्हा सध्या मला वेळ नाही. प्लीज नंतर बोलते.......!!!"

वरील लेखन काल्पनिक आहे, तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र वरील लेखात आलेली नावे, त्यांच्या तोंडी असलेली विधाने,  काल्पनिक आहेत. ती नावे, विधाने  कोणास आपली वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !!! :)

हे काल्पनिक???? :)))))))) आता हे लेखन काल्पनिक नाही हे सांगायला आमच्या गरीब झोपड्याचा फोटू इथे टाकायला हवा!!

आणि अधोरेखित वाक्य तुम्हाला कुठे कुठे मिळालं? ऑर्कुटावर नक्की ;-) कारण तिथे तुम्ही मला भेट देऊन गेलात आणि माझ्या आणि जयश्री अंबासकरांच्या गप्पा वाचून गेलात हेही नक्की!

पण माझ्यावरही कोणी गस्त ठेवून असतं याची कल्पना नव्हती बॉ!!!

ह. घ्या.

आणि हो, अद्याप मी चित्राचा लेख वाचलेला नाही. वेळ नाही हो!  घर पाहावे बांधून..... ;-) म्हणूनच तात्याच्या गजालींकडेही लक्ष देत नाही ;-)

बाकी, लेख वाचून मजा आली.

आपली,

(डिटेक्टीव नं १) प्रियाली

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 24/02/2008 - 19:04

आणि अधोरेखित वाक्य तुम्हाला कुठे कुठे मिळालं? ऑर्कुटावर नक्की ;-) कारण तिथे तुम्ही मला भेट देऊन गेलात आणि माझ्या आणि जयश्री अंबासकरांच्या गप्पा वाचून गेलात हेही नक्की!

आयला! हा बिरुट्या ऑर्कुटवरही लोकांच्या खरडवह्या वाचत फिरत असतो म्हणायचा! :) मग हा डाक्टरकी आणि प्राध्यापकी तरी केव्हा करतो? :))
--(स्वगत!)

बाय द वे प्रियाली, नव्या घरात सत्यनारायण घालशील तेव्हा जेवायला ह्या तात्याभटालाही बोलाव बरं का! :)

असो,

बिरुटेंच्या ऑर्कुट भटकंती करता शुभेच्छा!

प्रियालीच्या नव्या वास्तूबद्दल शुभेच्छा!

आपला,
(शुभेच्छुक!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 24/02/2008 - 19:07

सत्यनारायण यदाकदाचित घातला तर पूजा घालायलाच बोलावते तुम्हाला :)) आणि नाही घातला तरी आमंत्रणाची विशेष गरज नाही, या कधीही.

 

आयला! हा बिरुट्या ऑर्कुटवरही लोकांच्या खरडवह्या वाचत फिरत असतो म्हणायचा! :) मग हा डाक्टरकी आणि प्राध्यापकी तरी केव्हा करतो? :))
--(स्वगत!)

हाहा!! १००% सहमत.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 24/02/2008 - 19:17

सत्यनारायण यदाकदाचित घातला तर पूजा घालायलाच बोलावते तुम्हाला :))

चालेल! तुझ्या घरच्या सत्यनारायणाला जर हा मच्छीखाऊ भट चालणार असेल तर आपली काय पण हरकत नाय! आपण नक्की येऊ आणि आलटून पालटून अथर्वशीर्ष म्हणू! कारण त्याशिवाय आपल्याला संस्कृतातले दुसरे कोणतेच शिलोक येत नायत! :)

आपला,
(संस्कृत 'ढ'!) तात्या.

विकास 24/02/2008 - 19:04

एकदम मस्त लेख सर! ह. ह. पु. वा. 

अजून येउद्यात!

 

फक्त त्यात माझे नाव दिसले तर ४००० शद्बांचा संदर्भ हीन व्य.नि. आपल्याला येइल)आणि तो योगायोग नसेल!

चित्रा 24/02/2008 - 19:48

टपल्या चांगल्या जमल्या आहेत!   प्रियालीताईंच्या घराला शुभेच्छा!

सन्जोप राव 24/02/2008 - 20:20

जबरदस्त लिखाण! प्राध्यापक डॉक्टरसाहेब, आपला हा पैलू आम्हाला माहीतच नव्हता! 'मनोगत' वरील संमेलनाची आणि 'उपक्रम' च्या पहिल्या वाढदिवसाची आठवण झाली (ही नावे घेतली नाहीत तर प्रतिक्रिया गंभीरपणे घेतली जात नाही म्हणे!)
मात्र, पुण्याचा एका प्राध्यापकाने आणि त्यांच्या एक शिष्याने हे सर्व घडवून आणल्याचा आमचा संशय आहे.
हे मत तुमचे की सर्किटरावांचे? आणि कोण हो हे प्राध्यापक? जरा त्यांना भेटावे म्हणतो!

सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 24/02/2008 - 22:40

'मनोगत' वरील संमेलनाची आणि 'उपक्रम' च्या पहिल्या वाढदिवसाची आठवण झाली

हेच म्हणतो!

चला, या निमित्ताने संजोप रावांनी आपली लेखणी पुन्हा मिसळपावर उमटवली याचा आम्हाला आनंद वाटतो! आता इथून पुढे कुठलेही कडू-गोड अनुभव विसरून जाऊन संजोप रावांनी पुन्हा नव्याने मिपावर नियमित लेखन करावे अशी आमची इच्छा आहे!

आम्ही आत्तापर्यंत संजोप रावांना किमान दहा वेळा तरी पिंजरा या चित्रपटावर मिसळपाववर काहीतरी जोरदार लिहा अशी विनंती केली आहे. त्यातील नऊ विनंत्यांचा अवमान आम्हाला मान्य आहे परंतु दहाव्यांदा तरी संजोप रावांनी आमचा शब्द ठेवावा असे वाटते!

त्यांनी आम्हाला खास कोल्हापुरी साजाची एक चंची सप्रेम भेट म्हणून दिली आहे. जो पर्यंत संजोप राव मिसळपाववर लिहीत नाहीत तो पर्यंत आम्हीही ती चंची वापरणार नाही अशी शपथ खाल्ली आहे. सध्या तरी ती चंची नुसतीच धूळ खात पडून आहे. तरी आम्हाला ती चंची लवकरात लवकर वापरायला मिळावी हीच इच्छा आहे!

पुढे मर्जी संजोपरावांची!

असो..

आपला,
(चंचीप्रेमी) तात्या.

धनंजय 24/02/2008 - 20:27
धनंजय, म्हणाले की "लोकमित्रमंडळाचा उद्देशच आहे, की उत्तमातल्या उत्तम लेखनाची जशी ओळख व्हावी, त्याप्रमाणे.......जालावरील लेखकांचेही आदानप्रदान झाले पाहिजे. "

हे बहुधा काल्पनिक नाही. माझे तुमच्याशी बोलण्यात हे वाक्य नक्की येऊन गेले आहे!

तात्या, मनोगतावर जाताहेत ही चांगली गोष्ट आहे.
त्यामुळे हा विचारही त्या विचाराला जोडून...

येणा-या बाल, तरुण, वयस्कांनी हे मिसळपावचे गोकूळ फुलत जावे. मिसळपाव खाता खाता, मिसळपावचे अभंग गावेत, म्हणावेत. आपली साहित्यकला फुलवावी. वाचकांनी भरभरून दाद द्यावी, कोणत्याही मद्याचे दोन थेंब समाधीवर शिंपडावे......
+१

 

प्रा. डॉ. आल्फ्रेड बिरुटे ( किंवा प्रा.डॉ.  दिलीप हिचकॉक)...

डॉ. साहेब....

आपले धक्कातंत्र पाहून हिचकॉक साहेब आठवले!

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

प्राजु 24/02/2008 - 21:45

केवळ लेखनावरून व्यक्तीचित्रण छान जमलं आहे.

प्राजु.........."जाणार होतास तर बोलावलेच कशाला.
मनोगतावर, फुले,पाने, गोड गोड बोला.
मिसळपाववर चारोळी, मायबोलीवर आरोळी,
आकाशवाणी, सुखाचे, दुःखाचे दिवस,पुरण पोळी."

 काय पण भारी आशय आहे हो या चारोळीत. बाय द वे.. तात्या मनोगतावर जाणे म्हणजे मुंग्यानी मेरू पर्वत तर गिळला नाही ना.. या प्रकारचे आहे? आणि तात्या जर मनोगतवर गेलेच तर.. आमचा मिसळपाव ला राम राम..!कळ्ळलं का हो  तात्या..?

- (१००% मिसळप्रेमी) प्राजु

ऋषिकेश 24/02/2008 - 21:46

हा हा हा :)) आज सकाळी सकाळीच हा लेख वाचून मजा आली :) मस्त धक्कातंत्र ;) बर्‍याचशा खर्‍या, काहिश्या काल्पनिक प्रसंगांची उत्तम गुंफण :) खूप सह्ही!!!!

सर, एकदम सहि रे सहि!! :)

-ऋषिकेश

 

 

बेसनलाडू 25/02/2008 - 00:55

धमाल लेखन. रविवारची दणदणीत सुरुवात झाली.

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत. रावसाहेबांच्या कल्पनाविलासात ही तक्रार करण्याची वेळ कधी आली नव्हती. असो.

(वाचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्रियाली 25/02/2008 - 00:58

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत

सहमत आहे. :-) ती टाळूनही लेखन खुमासदारच राहीले असते.

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 25/02/2008 - 02:07

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत. रावसाहेबांच्या कल्पनाविलासात ही तक्रार करण्याची वेळ कधी आली नव्हती. असो.

ऑर्कुटवरील खरडींविषयी ही टिप्पणी असेल तर असहमत. ऑर्कुट मधील खरडी खासगी ठेवायच्या की सार्वजनिक हे सभासदावर अवलंबून असते. प्रियाली ताईंनी त्यांच्या खरडी सार्वजनिक ठेवल्या आहेत. तेव्हा प्रा.डॉ नी खाजगीतील बोलणी सार्वजनिक केली असे वाटत नाहीत.

कोलबेर 25/02/2008 - 02:11

 लै भारी लेख सर. आमचा अतिशय आवडता लेखन प्रकार तुम्ही मस्त हाताळला आहे

घाटपांडे साहेब, अजून बिट्टू च्या धक्यातून सावरले नसल्यामुळे त्यांनी फार डिटेल्स मध्ये उत्तर दिले नाही. 'ज्योतिषविषयक लेख पुन्हा वाचावा त्यात त्याचे उत्तर आहे' असे त्यांनी कळवले.

हे तर सहीच...

नंदन 25/02/2008 - 02:52

धमाल लेख. शेवटचे धक्कातंत्रही मस्त :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

चतुरंग 25/02/2008 - 21:30

तर्रीचा जोरदार भुरका मारला आणि ठसकाच लागला!!

आपली धक्कादायक धक्काबुक्की आवडली!

आपले विद्यार्थी किती धकाधकीचं जिणं जगत असतील ह्याची कल्पना आली (असा कल्पक मास्तर मिळणे विरळाच असते हो! :) (ह्.घ्या);}

चतुरंग

प्रमोद देव 25/02/2008 - 22:12
खूपच मार्मिक निरीक्षण आणि तितक्याच ताकदीने ते शब्दात मांडणे ह्या दोन्ही कला आपल्याला अवगत आहेत हे सिद्ध केलेत.
असेच लिहिते रहा! मजा आली.

श्री. डॉ. प्रा. दिलीप बिरूटे,

लेख मस्त जमवला आहे.सुरुवातीला मीही गोंधळात पडलो होतो. पण लवकरच सत्य ओळखले आणि रंगत वाढत गेली.

मस्त लिहीले आहे.

सहज 29/02/2008 - 10:22

अप्रतिम कल्पनाविलास.

वाचनखुणामधे साठवला आहे, परत परत वाचायला. :-)

जबरी!!!!

दिगम्भा 29/02/2008 - 11:16

छान लेख, बेहद्द आवडला. रावसाहेबांच्या मसालेदार मालिकेत चमचमीत भर टाकलीत.
- दिगम्भा

सर्किट 29/02/2008 - 12:11
जमलं ! जमलं !!!

थोडक्यात काय, तर छानच झालंय !!

(ह्या साहित्यप्रकारातली रावसाहेबांची मोनॉपोली निकालात काढलीत. आता चित्रपट परीक्षण लिहा बघू..)

चालू द्या !! आम्ही वाचतोच आहोत !

- सर्किट

लेखात उल्लेख झालेल्या सर्वच मित्रांनी या लेखास हलकेच घेतले, त्याबद्दल सर्वांचे आभार, जे कोणी रागावले असेल,दुखावले असेल त्याबद्दल दिलगीरी व्यकत करतो. या लेखनावर शुद्धलेखनाचे सर्व संस्कार करुन इथे लेखन टाकण्याचा आग्रह धरला त्याबद्दल एका ' अनामिकाचेही ' विशेष आभार. अनेक मित्रांच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहायचा होता, पण आता वेळ खूप पुढे गेलेली आहे. तेव्हा लेखनावर प्रेम करणा-या वाचकांचे, प्रतिसाद देणार्‍यांचे सर्वांचे आभार मानतो !!! आपण सर्व आमच्या तोडक्या-मोडक्या लेखनाबद्दल आमची कौतुकाने पाठ थोपटता, म्हणुन आम्हाला लिहिण्याचे बळ येते !!! धन्यवाद !!! अवांतर :- तांत्रिक अडचणी दूर केल्याबद्दल सरपंचाचे विशेष आभार !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 01/03/2008 - 19:12
अवांतर :- तांत्रिक अडचणी दूर केल्याबद्दल सरपंचाचे विशेष आभार !!! बिरुटेशेठ, सध्या गमभनची पुन्हा जुनीच आवृत्ती जोडली आहे. त्याने काही फरक पडतो का ते पाहू. अजूनही काही चाचण्याही सुरू आहेत. एखाद्या संस्थळाच्या उभारणीमध्ये अधनंमधनं अश्या काही तांत्रिक अडचणी येतात परंतु त्यातूनच सुधारणा होत असतात/होतात. कृपया सांभाळून घ्या. आपलाच, तात्या.

एखाद्या संस्थळाच्या उभारणीमध्ये अधनंमधनं अश्या काही तांत्रिक अडचणी येतात परंतु त्यातूनच सुधारणा होत असतात/होतात. कृपया सांभाळून घ्या. आम्ही त्याबद्दल कधी तक्रार केली ? हे तुमचे संस्थळ आहे तसे आम्हालाही आमचे वाटते, आणि संस्थळाच्या उभारणीसाठी, वेगवेगळ्या बदलांसाठी आमच्या शुभेच्छा आहेतच !!!! आज ब-याच दिवसानंतर प्रतिसाद लिहिता आला म्हणुन सरपंचाचे विशेष आभार असे म्हणालो, त्यातून काही अर्थाचा,अनर्थ निघाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व !!! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरपंच 01/03/2008 - 19:49
हे तुमचे संस्थळ आहे तसे आम्हालाही आमचे वाटते, तुमचेच आहे! :) आम्ही फक्त ट्रस्टी आहोत! :) त्यातून काही अर्थाचा,अनर्थ निघाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व !!! अहो त्यात क्षमा कसली? कुठलाही अनर्थ निघालेला नाही. आम्ही या आयडीवरून कुणाला प्रतिसाद देत नाही, तो आज पेश्शल तुम्हाला देत आहोत यातच काय ते समजा! :) आपला, तात्या सरपंच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तात्यांच्या कुठल्याही पोस्टवर 'व्वा तात्या, तुसी छा गये, तुम्ही नशिबवान आहात तात्या,' वगैरे वगैरे शाब्दिक चौर्‍या ढाळणारे अनेक जणं फेसबुकावर तात्यांना सापडले आहेत. तिथे त्यांचे अगदी व्यवस्थित आणि सुखनैव चालू आहे. आणि मिपावर प्रकट होणे त्यांच्यासाठी 'सोयिस्कर' राहिले नसावे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

जे सोडून गेलेले आहेत त्यांची नावं घेऊन उगाच कढ का काढावे? (असं मी नाही, प्रा. डॉ. बिरुटेच म्हणतात) लेखात नावं घेतलेल्यांपैकी तात्या, प्रियाली, गुंडोपंत, सहज, धनंजय, मुक्तसुनीत, वाचक्नवी, बेला, राजे, धोंडोपंत ही मंडळी लिहितात का सध्या मिपावर?

In reply to by टवाळ कार्टा

टारझन का गेला, सर्किट का गेला, आमचे धोंडोपंत का गेले, गुंडोपंत का गेले. परा का गेला, प्रमोद देव का गेले, अमुक का गेला आणि धमुक का गेला. अहो, हे येणं जाणंच चालूच असणार आहे. आयडींनी काय लेखन केलं. लेखनाचा किती आनंद मिळाला. आपले आ.जालावर सुखाचे क्षण किती गेले हे महत्त्वाचे. अनेकांना वाटलं आम्ही मिपावरुन गेलो की जगबुडी होऊन जाईल. अनेक थोर थोर आयडी माझ्या पाहण्यात होते. अनेक थोर थोर आयडींनी किरकोळ कारणावरुन स्वसंपादनाचा फायदा घेत लेखन काढून टाकलेत, प्रतिसाद काढून टाकलेत. मिपाचा रंगमंच ओस पडेल असं अनेकांना वाटलं. पण तसं कधीच झालं नाही आणि होणारही नाही. आयडी येतील आणि जातील. प्रत्येक आयडीची एक स्टोरी असेल किंवा नसेल. नवे येतील आणि जसे जमेल ते लिहितील आणि जुन्यांप्रमाणे जातीलही. नव्या-जुन्या लेखनाचा आनंद वाचक घेतील. वाचक वाचतील आणि विसरुनही जातील. कोणताच क्षण कोणासाठी थांबत नाही, तो क्षण येतो आणि जातो. आपणही आज आहोत उद्या नसु.... आपण संकेतस्थळ किती इंजॉय केलं हे महत्वाचं. बाकी, प्रश्न मला तरी कधीच महत्वाचे वाटले नाहीत. मिपा एक चालता बोलता रंगमंच आहे, अनेक आयडी येतील जातील. आज आपण आठवणीत आहोत उद्या लोक विसरुनही जातील.....The Show Must Go On -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऐशी ची तैशी करुन टाकली.
मिपाचा रंगमंच ओस पडेल असं अनेकांना वाटलं. पण तसं कधीच झालं नाही आणि होणारही नाही....आपण संकेतस्थळ किती इंजॉय केलं हे महत्वाचं. बाकी, प्रश्न मला तरी कधीच महत्वाचे वाटले नाहीत. मिपा एक चालता बोलता रंगमंच आहे, अनेक आयडी येतील जातील. आज आपण आठवणीत आहोत उद्या लोक विसरुनही जातील.....

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्मशून्य 31/05/2014 - 17:34
पण प्रश्न इतका सोपा असता तर राहुल का नाही पंतप्रधान बनला ? मान्य विचार अवांतर भासेल पण शो चालु राहणे प्रमाणेच कोण चालवतो याला रसिकांच्या दृष्टीने फार महत्व असते हे एक रसिक म्हणुन आपण णाकारनार काय ....?

इरसाल 31/05/2014 - 15:10
सभ्य सभासद मिपा हेच पुर्ण जग या समजातुन मी इथे जिंकलो की सगळ जग जिंकल या अविर्भावात असतात. या नादात कहीतरी करुन बसतात, मग कधी कधी हे* मिळतंया मग हितुन जाव लागतयां. 

विसोबा खेचर 24/02/2008 - 13:19
च्यायला बिरुटेशेठ! अत्यंत जोरदार आणि खुसखुशीत लेख... तुम्ही तर सिक्सरच मारलीत तिच्यायला! :)) हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन........ :) आत्ता जरा नीलकांतासोबत मिपाच्या मुखपृष्ठाच्या गडबडीत आहे, नंतर सवडीने विस्तृत प्रतिसाद टाकतो... बाय द वे, मनो-मिसळ हे नांव क्लासच आहे! :) असो, या आंतरजालीय जगात त्या वेलणकराला माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आणि मलाही त्याच्याशिवाय दुसरं कुणी नाही हेच बाकी खरं!:) पण घाबरू नका बिरुटेशेठ. आम्ही कुठंही जात नाही. आता आम्हाला पुन्हा मनोगतावर घेणार नाहीत! आणि घेतलं तरी 'कसा नाक मुठीत धरून परत आला फोकलिचा!' असंच सगळे म्हणतील! :) आपला, (मूळचा मनोगतप्रेमी तरीही आता कट्टर मिपाकर!) तात्या.

एक कार्यक्रम होत असे गणेशोत्सवात. त्याची आठवण झाली. त्यात लोकप्रिय व्यक्तींवर विविध आरोप केले जात. त्याची आठवण झाली. खरे म्हणजे मला हा पुर्वेतिहास ठाऊक नाही. पण अंदाज बांधू शकतो. मजा आली.

परीचा परा 24/02/2008 - 15:10
येवढे सगळे वाचून शॉकच बसला व्हता... पण शेवटी दिलेल्या गोष्टीने खुलासा झाला... सुचना:- वरील लेखन काल्पनिक आहे, तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र वरील लेखात आलेली नावे, त्यांच्या तोंडी असलेली विधाने, काल्पनिक आहेत. ती नावे, विधाने कोणास आपली वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !!! :) नाय तर आम्हाला आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे वाटत होते... म्हटले आत्ताच आलोय इथे आणि संकेतस्थळ बंद करायच्या भाषा कसल्या चालू झाल्या? डॉक्टरसाहेब आमच्या तोंडचे पाणीच पळवले होते तुम्ही.... (तात्या गेले तर तर मिसळपावाची तर्रर्रीच गेल्यासारखं वाटलं असतं....) नाहीतरी संकेतस्थळ काढून सदस्यांचा विश्वासघात करणारे बरेच आहेत बाजारात.... त्याला मिसळपाव १००% अपवाद आहे ह्याची खात्री पटल्यावरच इथला सदस्य झालो ... डॉक्टरसाहेब बाँब फोडत जा हो... पण तळटीप सगळ्यात आधी लिहित जावा राव... बरं झालं तात्यांनी पहिलाच प्रतिसाद दिला... नाही तर आम्ही इथला गाशा गुंडाळायचंच ठरवलं होतं.....आमच्यासारखे भडक माथ्याचे लोक तळटीप न वाचताच गोंधळास सुरुवात करतील.... :) {परीच्या प्रतिक्षेत} परा ....

धोंडोपंत 24/02/2008 - 15:22
प्राध्यापक साहेब, अप्रतिम खुमासदार लेख. क्या बात है!!!!!! प्रत्येक मिपासदस्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू फार सुंदरपणे टिपलेत तुम्ही. वा वा. लेख फार फार आवडला. अतिशय मस्त भट्टी जमली आहे. ती अशीच धगधगत राहू दे. आमचा रविवार तुमच्या लेखाने फार आनंदात गेला. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत. आपला, (स्नेही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

व्व्व्वा ! मजा आली तिच्यायला... बर्‍याच दिवसांनी इतके फर्मास आणि चविष्ट लिखाण वाचले. लाजवाब. प्रा. साहेब लगे रहो. त्वाड्डा जवाब नही. बिपिन.

प्रियाली 24/02/2008 - 18:57

सर, तुम्ही नाss काही तरी घेऊन येता बॉ.......चाल्लाय तर जाऊ दे......तुम्हाला काय त्याचा त्रास होतोय......... सध्या अमेरिकेत घराचे बांधकाम सुरू केलंय....त्याचसाठी 'चित्राचे,गेल्या शतकांतील अमेरिकन घरे - ४ - वाचते आहे, तेव्हा सध्या मला वेळ नाही. प्लीज नंतर बोलते.......!!!"

वरील लेखन काल्पनिक आहे, तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र वरील लेखात आलेली नावे, त्यांच्या तोंडी असलेली विधाने,  काल्पनिक आहेत. ती नावे, विधाने  कोणास आपली वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !!! :)

हे काल्पनिक???? :)))))))) आता हे लेखन काल्पनिक नाही हे सांगायला आमच्या गरीब झोपड्याचा फोटू इथे टाकायला हवा!!

आणि अधोरेखित वाक्य तुम्हाला कुठे कुठे मिळालं? ऑर्कुटावर नक्की ;-) कारण तिथे तुम्ही मला भेट देऊन गेलात आणि माझ्या आणि जयश्री अंबासकरांच्या गप्पा वाचून गेलात हेही नक्की!

पण माझ्यावरही कोणी गस्त ठेवून असतं याची कल्पना नव्हती बॉ!!!

ह. घ्या.

आणि हो, अद्याप मी चित्राचा लेख वाचलेला नाही. वेळ नाही हो!  घर पाहावे बांधून..... ;-) म्हणूनच तात्याच्या गजालींकडेही लक्ष देत नाही ;-)

बाकी, लेख वाचून मजा आली.

आपली,

(डिटेक्टीव नं १) प्रियाली

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 24/02/2008 - 19:04

आणि अधोरेखित वाक्य तुम्हाला कुठे कुठे मिळालं? ऑर्कुटावर नक्की ;-) कारण तिथे तुम्ही मला भेट देऊन गेलात आणि माझ्या आणि जयश्री अंबासकरांच्या गप्पा वाचून गेलात हेही नक्की!

आयला! हा बिरुट्या ऑर्कुटवरही लोकांच्या खरडवह्या वाचत फिरत असतो म्हणायचा! :) मग हा डाक्टरकी आणि प्राध्यापकी तरी केव्हा करतो? :))
--(स्वगत!)

बाय द वे प्रियाली, नव्या घरात सत्यनारायण घालशील तेव्हा जेवायला ह्या तात्याभटालाही बोलाव बरं का! :)

असो,

बिरुटेंच्या ऑर्कुट भटकंती करता शुभेच्छा!

प्रियालीच्या नव्या वास्तूबद्दल शुभेच्छा!

आपला,
(शुभेच्छुक!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 24/02/2008 - 19:07

सत्यनारायण यदाकदाचित घातला तर पूजा घालायलाच बोलावते तुम्हाला :)) आणि नाही घातला तरी आमंत्रणाची विशेष गरज नाही, या कधीही.

 

आयला! हा बिरुट्या ऑर्कुटवरही लोकांच्या खरडवह्या वाचत फिरत असतो म्हणायचा! :) मग हा डाक्टरकी आणि प्राध्यापकी तरी केव्हा करतो? :))
--(स्वगत!)

हाहा!! १००% सहमत.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 24/02/2008 - 19:17

सत्यनारायण यदाकदाचित घातला तर पूजा घालायलाच बोलावते तुम्हाला :))

चालेल! तुझ्या घरच्या सत्यनारायणाला जर हा मच्छीखाऊ भट चालणार असेल तर आपली काय पण हरकत नाय! आपण नक्की येऊ आणि आलटून पालटून अथर्वशीर्ष म्हणू! कारण त्याशिवाय आपल्याला संस्कृतातले दुसरे कोणतेच शिलोक येत नायत! :)

आपला,
(संस्कृत 'ढ'!) तात्या.

विकास 24/02/2008 - 19:04

एकदम मस्त लेख सर! ह. ह. पु. वा. 

अजून येउद्यात!

 

फक्त त्यात माझे नाव दिसले तर ४००० शद्बांचा संदर्भ हीन व्य.नि. आपल्याला येइल)आणि तो योगायोग नसेल!

चित्रा 24/02/2008 - 19:48

टपल्या चांगल्या जमल्या आहेत!   प्रियालीताईंच्या घराला शुभेच्छा!

सन्जोप राव 24/02/2008 - 20:20

जबरदस्त लिखाण! प्राध्यापक डॉक्टरसाहेब, आपला हा पैलू आम्हाला माहीतच नव्हता! 'मनोगत' वरील संमेलनाची आणि 'उपक्रम' च्या पहिल्या वाढदिवसाची आठवण झाली (ही नावे घेतली नाहीत तर प्रतिक्रिया गंभीरपणे घेतली जात नाही म्हणे!)
मात्र, पुण्याचा एका प्राध्यापकाने आणि त्यांच्या एक शिष्याने हे सर्व घडवून आणल्याचा आमचा संशय आहे.
हे मत तुमचे की सर्किटरावांचे? आणि कोण हो हे प्राध्यापक? जरा त्यांना भेटावे म्हणतो!

सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 24/02/2008 - 22:40

'मनोगत' वरील संमेलनाची आणि 'उपक्रम' च्या पहिल्या वाढदिवसाची आठवण झाली

हेच म्हणतो!

चला, या निमित्ताने संजोप रावांनी आपली लेखणी पुन्हा मिसळपावर उमटवली याचा आम्हाला आनंद वाटतो! आता इथून पुढे कुठलेही कडू-गोड अनुभव विसरून जाऊन संजोप रावांनी पुन्हा नव्याने मिपावर नियमित लेखन करावे अशी आमची इच्छा आहे!

आम्ही आत्तापर्यंत संजोप रावांना किमान दहा वेळा तरी पिंजरा या चित्रपटावर मिसळपाववर काहीतरी जोरदार लिहा अशी विनंती केली आहे. त्यातील नऊ विनंत्यांचा अवमान आम्हाला मान्य आहे परंतु दहाव्यांदा तरी संजोप रावांनी आमचा शब्द ठेवावा असे वाटते!

त्यांनी आम्हाला खास कोल्हापुरी साजाची एक चंची सप्रेम भेट म्हणून दिली आहे. जो पर्यंत संजोप राव मिसळपाववर लिहीत नाहीत तो पर्यंत आम्हीही ती चंची वापरणार नाही अशी शपथ खाल्ली आहे. सध्या तरी ती चंची नुसतीच धूळ खात पडून आहे. तरी आम्हाला ती चंची लवकरात लवकर वापरायला मिळावी हीच इच्छा आहे!

पुढे मर्जी संजोपरावांची!

असो..

आपला,
(चंचीप्रेमी) तात्या.

धनंजय 24/02/2008 - 20:27
धनंजय, म्हणाले की "लोकमित्रमंडळाचा उद्देशच आहे, की उत्तमातल्या उत्तम लेखनाची जशी ओळख व्हावी, त्याप्रमाणे.......जालावरील लेखकांचेही आदानप्रदान झाले पाहिजे. "

हे बहुधा काल्पनिक नाही. माझे तुमच्याशी बोलण्यात हे वाक्य नक्की येऊन गेले आहे!

तात्या, मनोगतावर जाताहेत ही चांगली गोष्ट आहे.
त्यामुळे हा विचारही त्या विचाराला जोडून...

येणा-या बाल, तरुण, वयस्कांनी हे मिसळपावचे गोकूळ फुलत जावे. मिसळपाव खाता खाता, मिसळपावचे अभंग गावेत, म्हणावेत. आपली साहित्यकला फुलवावी. वाचकांनी भरभरून दाद द्यावी, कोणत्याही मद्याचे दोन थेंब समाधीवर शिंपडावे......
+१

 

प्रा. डॉ. आल्फ्रेड बिरुटे ( किंवा प्रा.डॉ.  दिलीप हिचकॉक)...

डॉ. साहेब....

आपले धक्कातंत्र पाहून हिचकॉक साहेब आठवले!

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

प्राजु 24/02/2008 - 21:45

केवळ लेखनावरून व्यक्तीचित्रण छान जमलं आहे.

प्राजु.........."जाणार होतास तर बोलावलेच कशाला.
मनोगतावर, फुले,पाने, गोड गोड बोला.
मिसळपाववर चारोळी, मायबोलीवर आरोळी,
आकाशवाणी, सुखाचे, दुःखाचे दिवस,पुरण पोळी."

 काय पण भारी आशय आहे हो या चारोळीत. बाय द वे.. तात्या मनोगतावर जाणे म्हणजे मुंग्यानी मेरू पर्वत तर गिळला नाही ना.. या प्रकारचे आहे? आणि तात्या जर मनोगतवर गेलेच तर.. आमचा मिसळपाव ला राम राम..!कळ्ळलं का हो  तात्या..?

- (१००% मिसळप्रेमी) प्राजु

ऋषिकेश 24/02/2008 - 21:46

हा हा हा :)) आज सकाळी सकाळीच हा लेख वाचून मजा आली :) मस्त धक्कातंत्र ;) बर्‍याचशा खर्‍या, काहिश्या काल्पनिक प्रसंगांची उत्तम गुंफण :) खूप सह्ही!!!!

सर, एकदम सहि रे सहि!! :)

-ऋषिकेश

 

 

बेसनलाडू 25/02/2008 - 00:55

धमाल लेखन. रविवारची दणदणीत सुरुवात झाली.

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत. रावसाहेबांच्या कल्पनाविलासात ही तक्रार करण्याची वेळ कधी आली नव्हती. असो.

(वाचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्रियाली 25/02/2008 - 00:58

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत

सहमत आहे. :-) ती टाळूनही लेखन खुमासदारच राहीले असते.

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 25/02/2008 - 02:07

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत. रावसाहेबांच्या कल्पनाविलासात ही तक्रार करण्याची वेळ कधी आली नव्हती. असो.

ऑर्कुटवरील खरडींविषयी ही टिप्पणी असेल तर असहमत. ऑर्कुट मधील खरडी खासगी ठेवायच्या की सार्वजनिक हे सभासदावर अवलंबून असते. प्रियाली ताईंनी त्यांच्या खरडी सार्वजनिक ठेवल्या आहेत. तेव्हा प्रा.डॉ नी खाजगीतील बोलणी सार्वजनिक केली असे वाटत नाहीत.

कोलबेर 25/02/2008 - 02:11

 लै भारी लेख सर. आमचा अतिशय आवडता लेखन प्रकार तुम्ही मस्त हाताळला आहे

घाटपांडे साहेब, अजून बिट्टू च्या धक्यातून सावरले नसल्यामुळे त्यांनी फार डिटेल्स मध्ये उत्तर दिले नाही. 'ज्योतिषविषयक लेख पुन्हा वाचावा त्यात त्याचे उत्तर आहे' असे त्यांनी कळवले.

हे तर सहीच...

नंदन 25/02/2008 - 02:52

धमाल लेख. शेवटचे धक्कातंत्रही मस्त :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

चतुरंग 25/02/2008 - 21:30

तर्रीचा जोरदार भुरका मारला आणि ठसकाच लागला!!

आपली धक्कादायक धक्काबुक्की आवडली!

आपले विद्यार्थी किती धकाधकीचं जिणं जगत असतील ह्याची कल्पना आली (असा कल्पक मास्तर मिळणे विरळाच असते हो! :) (ह्.घ्या);}

चतुरंग

प्रमोद देव 25/02/2008 - 22:12
खूपच मार्मिक निरीक्षण आणि तितक्याच ताकदीने ते शब्दात मांडणे ह्या दोन्ही कला आपल्याला अवगत आहेत हे सिद्ध केलेत.
असेच लिहिते रहा! मजा आली.

श्री. डॉ. प्रा. दिलीप बिरूटे,

लेख मस्त जमवला आहे.सुरुवातीला मीही गोंधळात पडलो होतो. पण लवकरच सत्य ओळखले आणि रंगत वाढत गेली.

मस्त लिहीले आहे.

सहज 29/02/2008 - 10:22

अप्रतिम कल्पनाविलास.

वाचनखुणामधे साठवला आहे, परत परत वाचायला. :-)

जबरी!!!!

दिगम्भा 29/02/2008 - 11:16

छान लेख, बेहद्द आवडला. रावसाहेबांच्या मसालेदार मालिकेत चमचमीत भर टाकलीत.
- दिगम्भा

सर्किट 29/02/2008 - 12:11
जमलं ! जमलं !!!

थोडक्यात काय, तर छानच झालंय !!

(ह्या साहित्यप्रकारातली रावसाहेबांची मोनॉपोली निकालात काढलीत. आता चित्रपट परीक्षण लिहा बघू..)

चालू द्या !! आम्ही वाचतोच आहोत !

- सर्किट

लेखात उल्लेख झालेल्या सर्वच मित्रांनी या लेखास हलकेच घेतले, त्याबद्दल सर्वांचे आभार, जे कोणी रागावले असेल,दुखावले असेल त्याबद्दल दिलगीरी व्यकत करतो. या लेखनावर शुद्धलेखनाचे सर्व संस्कार करुन इथे लेखन टाकण्याचा आग्रह धरला त्याबद्दल एका ' अनामिकाचेही ' विशेष आभार. अनेक मित्रांच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहायचा होता, पण आता वेळ खूप पुढे गेलेली आहे. तेव्हा लेखनावर प्रेम करणा-या वाचकांचे, प्रतिसाद देणार्‍यांचे सर्वांचे आभार मानतो !!! आपण सर्व आमच्या तोडक्या-मोडक्या लेखनाबद्दल आमची कौतुकाने पाठ थोपटता, म्हणुन आम्हाला लिहिण्याचे बळ येते !!! धन्यवाद !!! अवांतर :- तांत्रिक अडचणी दूर केल्याबद्दल सरपंचाचे विशेष आभार !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 01/03/2008 - 19:12
अवांतर :- तांत्रिक अडचणी दूर केल्याबद्दल सरपंचाचे विशेष आभार !!! बिरुटेशेठ, सध्या गमभनची पुन्हा जुनीच आवृत्ती जोडली आहे. त्याने काही फरक पडतो का ते पाहू. अजूनही काही चाचण्याही सुरू आहेत. एखाद्या संस्थळाच्या उभारणीमध्ये अधनंमधनं अश्या काही तांत्रिक अडचणी येतात परंतु त्यातूनच सुधारणा होत असतात/होतात. कृपया सांभाळून घ्या. आपलाच, तात्या.

एखाद्या संस्थळाच्या उभारणीमध्ये अधनंमधनं अश्या काही तांत्रिक अडचणी येतात परंतु त्यातूनच सुधारणा होत असतात/होतात. कृपया सांभाळून घ्या. आम्ही त्याबद्दल कधी तक्रार केली ? हे तुमचे संस्थळ आहे तसे आम्हालाही आमचे वाटते, आणि संस्थळाच्या उभारणीसाठी, वेगवेगळ्या बदलांसाठी आमच्या शुभेच्छा आहेतच !!!! आज ब-याच दिवसानंतर प्रतिसाद लिहिता आला म्हणुन सरपंचाचे विशेष आभार असे म्हणालो, त्यातून काही अर्थाचा,अनर्थ निघाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व !!! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरपंच 01/03/2008 - 19:49
हे तुमचे संस्थळ आहे तसे आम्हालाही आमचे वाटते, तुमचेच आहे! :) आम्ही फक्त ट्रस्टी आहोत! :) त्यातून काही अर्थाचा,अनर्थ निघाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व !!! अहो त्यात क्षमा कसली? कुठलाही अनर्थ निघालेला नाही. आम्ही या आयडीवरून कुणाला प्रतिसाद देत नाही, तो आज पेश्शल तुम्हाला देत आहोत यातच काय ते समजा! :) आपला, तात्या सरपंच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तात्यांच्या कुठल्याही पोस्टवर 'व्वा तात्या, तुसी छा गये, तुम्ही नशिबवान आहात तात्या,' वगैरे वगैरे शाब्दिक चौर्‍या ढाळणारे अनेक जणं फेसबुकावर तात्यांना सापडले आहेत. तिथे त्यांचे अगदी व्यवस्थित आणि सुखनैव चालू आहे. आणि मिपावर प्रकट होणे त्यांच्यासाठी 'सोयिस्कर' राहिले नसावे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

जे सोडून गेलेले आहेत त्यांची नावं घेऊन उगाच कढ का काढावे? (असं मी नाही, प्रा. डॉ. बिरुटेच म्हणतात) लेखात नावं घेतलेल्यांपैकी तात्या, प्रियाली, गुंडोपंत, सहज, धनंजय, मुक्तसुनीत, वाचक्नवी, बेला, राजे, धोंडोपंत ही मंडळी लिहितात का सध्या मिपावर?

In reply to by टवाळ कार्टा

टारझन का गेला, सर्किट का गेला, आमचे धोंडोपंत का गेले, गुंडोपंत का गेले. परा का गेला, प्रमोद देव का गेले, अमुक का गेला आणि धमुक का गेला. अहो, हे येणं जाणंच चालूच असणार आहे. आयडींनी काय लेखन केलं. लेखनाचा किती आनंद मिळाला. आपले आ.जालावर सुखाचे क्षण किती गेले हे महत्त्वाचे. अनेकांना वाटलं आम्ही मिपावरुन गेलो की जगबुडी होऊन जाईल. अनेक थोर थोर आयडी माझ्या पाहण्यात होते. अनेक थोर थोर आयडींनी किरकोळ कारणावरुन स्वसंपादनाचा फायदा घेत लेखन काढून टाकलेत, प्रतिसाद काढून टाकलेत. मिपाचा रंगमंच ओस पडेल असं अनेकांना वाटलं. पण तसं कधीच झालं नाही आणि होणारही नाही. आयडी येतील आणि जातील. प्रत्येक आयडीची एक स्टोरी असेल किंवा नसेल. नवे येतील आणि जसे जमेल ते लिहितील आणि जुन्यांप्रमाणे जातीलही. नव्या-जुन्या लेखनाचा आनंद वाचक घेतील. वाचक वाचतील आणि विसरुनही जातील. कोणताच क्षण कोणासाठी थांबत नाही, तो क्षण येतो आणि जातो. आपणही आज आहोत उद्या नसु.... आपण संकेतस्थळ किती इंजॉय केलं हे महत्वाचं. बाकी, प्रश्न मला तरी कधीच महत्वाचे वाटले नाहीत. मिपा एक चालता बोलता रंगमंच आहे, अनेक आयडी येतील जातील. आज आपण आठवणीत आहोत उद्या लोक विसरुनही जातील.....The Show Must Go On -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऐशी ची तैशी करुन टाकली.
मिपाचा रंगमंच ओस पडेल असं अनेकांना वाटलं. पण तसं कधीच झालं नाही आणि होणारही नाही....आपण संकेतस्थळ किती इंजॉय केलं हे महत्वाचं. बाकी, प्रश्न मला तरी कधीच महत्वाचे वाटले नाहीत. मिपा एक चालता बोलता रंगमंच आहे, अनेक आयडी येतील जातील. आज आपण आठवणीत आहोत उद्या लोक विसरुनही जातील.....

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्मशून्य 31/05/2014 - 17:34
पण प्रश्न इतका सोपा असता तर राहुल का नाही पंतप्रधान बनला ? मान्य विचार अवांतर भासेल पण शो चालु राहणे प्रमाणेच कोण चालवतो याला रसिकांच्या दृष्टीने फार महत्व असते हे एक रसिक म्हणुन आपण णाकारनार काय ....?

इरसाल 31/05/2014 - 15:10
सभ्य सभासद मिपा हेच पुर्ण जग या समजातुन मी इथे जिंकलो की सगळ जग जिंकल या अविर्भावात असतात. या नादात कहीतरी करुन बसतात, मग कधी कधी हे* मिळतंया मग हितुन जाव लागतयां. 
मित्र हो, अनेकांना माहीत आहे, तात्याने मनोगत सोडले त्याला आता वर्ष दीड वर्ष उलटले, त्यांच्याबरोबर आम्ही काही मावळ्यांनी तिथून काढता पाय घेतला. एकमेव कारण " लेखन अनुमतीचे धोरण, प्रतिसाद आणि लेखन प्रसिद्ध होण्यासाठी घ्यावी लागणारी संपादकाची अनुमती. " त्यानंतर मग वादावादी झाली. खूप शिव्यागाळ झाली. आणि त्याबाबत संपादकांनी कोणतेही कारण दिले नाही. आम्ही तेव्हा नेहमीप्रमाणे जोरदार भांडण केले नाही. तेव्हा आम्ही प्ले ग्रुप ला होतो आणि बालवाडीच्या उंबरठ्यावर.....!!! नंतर आम्ही सर्वांनी उपक्रम जॉईन केले. मित्र हो....

अभिनयक्षमता

सृष्टीलावण्या ·

नंदन 24/02/2008 - 02:41
आहे व्हिडिओ. भाषा सुद्धा बंगालीसारखी कानाला गोड वाटतेय ऐकायला. कुठली आहे (फ्रेंच/इटालियन?) याचा मात्र काही पत्ता लागत नाही :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

आईची भाषा तुर्की आणि मुलीची भाषा ती वैश्विक भाषा आहे जी सर्व लहान 

मुले बोलता यायला येण्यापूर्वी बोलतात. त्या मुलीला बेबी टीव्ही पहायचा 

आहे जो कार्टून नेटवर्क सारखे कार्यक्रम दाखवतो. पण तिला बेबी टिव्ही 

हा शब्द माहित नाही म्हणून ती आईला जोजो, जेटिक्स इ. त्यावरच्या 

पात्रांची नावे सांगते आणि ती वाहिनी लावायला लावते.

चतुरंग 25/02/2008 - 21:03

इतका उत्स्फूर्त आणि जिवंत परफॉर्मन्स फक्त देवाच्या तालमीत तयार झालेल्या लहानग्यांमधेच असतो, बाकी माणसाच्या तालमीत एकदा ती आली की सुरु होतात ती 'नाटकं'!

चतुरंग

नंदन 24/02/2008 - 02:41
आहे व्हिडिओ. भाषा सुद्धा बंगालीसारखी कानाला गोड वाटतेय ऐकायला. कुठली आहे (फ्रेंच/इटालियन?) याचा मात्र काही पत्ता लागत नाही :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

आईची भाषा तुर्की आणि मुलीची भाषा ती वैश्विक भाषा आहे जी सर्व लहान 

मुले बोलता यायला येण्यापूर्वी बोलतात. त्या मुलीला बेबी टीव्ही पहायचा 

आहे जो कार्टून नेटवर्क सारखे कार्यक्रम दाखवतो. पण तिला बेबी टिव्ही 

हा शब्द माहित नाही म्हणून ती आईला जोजो, जेटिक्स इ. त्यावरच्या 

पात्रांची नावे सांगते आणि ती वाहिनी लावायला लावते.

चतुरंग 25/02/2008 - 21:03

इतका उत्स्फूर्त आणि जिवंत परफॉर्मन्स फक्त देवाच्या तालमीत तयार झालेल्या लहानग्यांमधेच असतो, बाकी माणसाच्या तालमीत एकदा ती आली की सुरु होतात ती 'नाटकं'!

चतुरंग

लहान मुले आपले म्हणणे खरे करून दाखवतातच, त्यांना बरोब्बर पालकांना कसे गुंडाळायचे ते माहित असते.... विशेषत: TV वर त्यांचा आवडता कार्यक्रम असेल तर कोणाची काय बिशाद दुसरा कार्यक्रम / दुसरी वाहिनी लावायची...

मराठी भाषा दिन(हुतात्म्यांना अभिवादन व गार्‍हाणे)

इनोबा म्हणे ·

विसोबा खेचर 22/02/2008 - 09:23
मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या कार्याला माझ्याही अनेकानेक शुभेच्छा! तात्या.

"हे बहिणाबाईच्या बहिणाबाई मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे गाणे ऐकवशील का ? या रांडव मराठी भाषेला पुन्हा सवाष्ण होतांना पाहायचंय मला........!!!! -नामदेव ढसाळ

जैसे हरळांमाजी रत्नकिळा । कि रत्नांमाजी हिरा निळा । तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ।। जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी । परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी । भाषा मराठी ।। पखियांमध्ये मयोरु । रुखियांमध्ये कल्पतरु । भाषांमध्ये मान थोरु । मराठीयेसी ।। तारांमध्ये बारा राशी । सप्तवारांमध्ये रवि-शशि । या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी । बोली मराठीया ।। - फादर स्टिफन्स

विसोबा खेचर 22/02/2008 - 09:23
मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या कार्याला माझ्याही अनेकानेक शुभेच्छा! तात्या.

"हे बहिणाबाईच्या बहिणाबाई मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे गाणे ऐकवशील का ? या रांडव मराठी भाषेला पुन्हा सवाष्ण होतांना पाहायचंय मला........!!!! -नामदेव ढसाळ

जैसे हरळांमाजी रत्नकिळा । कि रत्नांमाजी हिरा निळा । तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ।। जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी । परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी । भाषा मराठी ।। पखियांमध्ये मयोरु । रुखियांमध्ये कल्पतरु । भाषांमध्ये मान थोरु । मराठीयेसी ।। तारांमध्ये बारा राशी । सप्तवारांमध्ये रवि-शशि । या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी । बोली मराठीया ।। - फादर स्टिफन्स
"डोक्यावर सोनेरी मुकूट मात्र अंगावर फाटकी वस्त्रे" अशी दयनीय अवस्था झालेल्या मराठीच्या समृद्धीसाठी झटणारे कविवर्य कुसूमाग्रज यांचा जन्मदिन मराठी दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होतो. मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.या संस्थेच्या वतीने मराठी दिनाचे दिवशी - बुधवार दि. २७ फेब्रूवारी रोजी दूपारी १ वा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करुन मराठी भाषेच्या विकासाकरीता गार्‍हाणे घालण्यात येणार आहे.

"कसं जगायचं , कसं वागायचं ? कुणी सांगेल का मला ?????

छोटा डॉन ·

विसोबा खेचर 21/02/2008 - 23:46
छोटे डॉनराव, तुमचा लेख अगदी तंतोतंत पटला बरं का! आपण तर भैय्या पार हैराण होऊन गेलो आहोत अश्या प्रकारच्या मेल्समुळे! ऊठसूट आज कोणीही कोणाच्याही बंगल्याचे फोटो पाठवतो , हा काय तर फ्रेंच राजवाडा की जिथे 'मित्तलच्या पोरीचे लग्न झाले , हा पहा 'दुबईच्या किंवा ब्रुनोईच्या सुलतानाचा १७६० खोल्या असलेला महाल , हा बिल गेट्सचा प्रासाद , हे जगातील एकमेव '७ स्टार' दर्जाचे हॉटेल , हा जगातला सगळ्यात मोठ्ठा 'कॅसिनो' , हा पाण्यावरच तरंगता महाल , इत्यादी इत्यादी ............... हा हा हा! हे मात्र अगदी खरं आहे! मेल्समधून येणार्‍या हे नाना तर्‍हेचे बंगल्याबिंगल्यांचे, गाड्या विमानांचे, कुत्र्यामांजराचे फोटू पाहून मी देखील साफ कंटाळून गेलो आहे. अगदी वात आणतात हे फोटू! तात्या.

प्राजु 22/02/2008 - 02:47
असे मेल्स न वाचताच डिलीट करते... जाम कंटाळा येतो. मला आश्चर्य वाटतं मला ते फोर्वर्ड करणार्‍यांचं.. त्यांनाही कंटाळा येत असेलच ना मग ते का पाठवतात तेच मेल पुढे? आपल्या डोक्याचा त्रास दुसर्‍याच्या डोक्याला व्हावा म्हणून का? न सुटलेला प्रश्न. - प्राजु.

मनस्वी 22/02/2008 - 10:22
अशा मेल्स न बघताच डिलीट करते- हे करा, ते करू नका, मदत करा, चमत्कार होइल, कुत्री, मांजरी इत्यादी. पण काही काही मेल्स (विनोदी वगैरे) असतात चांगल्या. त्या मी पण देते फॉरवर्ड करून! मनस्वी

भुमन्यु 22/02/2008 - 12:25
हे खरय यार मई पण जाम वे॓ताग येतोय...आणि आतातर् नविनच प्रकार बघतोय आणि तो आहे होरोस्कोप पाठवायचा. आणि बर्‍याचदा तर अस बघायला मिळतं की अशा मित्रांना आपली आठवण असे फालतु मेल्स पाठवायला मिळतो अशा मित्रांना मी मेल करुन रागवण्याचं करतोय्......कोणाला दुसरा पर्याय माहित असेल तर सांगा.....

अनिला 22/02/2008 - 12:39
अशा मेल्स न बघताच डिलीट करते- हे करा, ते करू नका, मदत करा, चमत्कार होइल, कुत्री, मांजरी इत्यादी. पण काही काही मेल्स (विनोदी वगैरे) असतात चांगल्या. त्या मी पण देते फॉरवर्ड करून! मनस्वी

शेखर 22/02/2008 - 14:02
ह्यावर उपाय म्हणजे तीच मेल ज्याने पाठवली आहे त्यालाच ती मेल १०० पाठवावी. एकादा त्रास होईल पण अश्या मेल येणे बंद होईल. शेखर.

In reply to by शेखर

विसोबा खेचर 22/02/2008 - 14:06
ह्यावर उपाय म्हणजे तीच मेल ज्याने पाठवली आहे त्यालाच ती मेल १०० पाठवावी. एकादा त्रास होईल पण अश्या मेल येणे बंद होईल. हा हा हा! हा उपाय मात्र ब्येस वाटतो! :) तात्या.

विसोबा खेचर 21/02/2008 - 23:46
छोटे डॉनराव, तुमचा लेख अगदी तंतोतंत पटला बरं का! आपण तर भैय्या पार हैराण होऊन गेलो आहोत अश्या प्रकारच्या मेल्समुळे! ऊठसूट आज कोणीही कोणाच्याही बंगल्याचे फोटो पाठवतो , हा काय तर फ्रेंच राजवाडा की जिथे 'मित्तलच्या पोरीचे लग्न झाले , हा पहा 'दुबईच्या किंवा ब्रुनोईच्या सुलतानाचा १७६० खोल्या असलेला महाल , हा बिल गेट्सचा प्रासाद , हे जगातील एकमेव '७ स्टार' दर्जाचे हॉटेल , हा जगातला सगळ्यात मोठ्ठा 'कॅसिनो' , हा पाण्यावरच तरंगता महाल , इत्यादी इत्यादी ............... हा हा हा! हे मात्र अगदी खरं आहे! मेल्समधून येणार्‍या हे नाना तर्‍हेचे बंगल्याबिंगल्यांचे, गाड्या विमानांचे, कुत्र्यामांजराचे फोटू पाहून मी देखील साफ कंटाळून गेलो आहे. अगदी वात आणतात हे फोटू! तात्या.

प्राजु 22/02/2008 - 02:47
असे मेल्स न वाचताच डिलीट करते... जाम कंटाळा येतो. मला आश्चर्य वाटतं मला ते फोर्वर्ड करणार्‍यांचं.. त्यांनाही कंटाळा येत असेलच ना मग ते का पाठवतात तेच मेल पुढे? आपल्या डोक्याचा त्रास दुसर्‍याच्या डोक्याला व्हावा म्हणून का? न सुटलेला प्रश्न. - प्राजु.

मनस्वी 22/02/2008 - 10:22
अशा मेल्स न बघताच डिलीट करते- हे करा, ते करू नका, मदत करा, चमत्कार होइल, कुत्री, मांजरी इत्यादी. पण काही काही मेल्स (विनोदी वगैरे) असतात चांगल्या. त्या मी पण देते फॉरवर्ड करून! मनस्वी

भुमन्यु 22/02/2008 - 12:25
हे खरय यार मई पण जाम वे॓ताग येतोय...आणि आतातर् नविनच प्रकार बघतोय आणि तो आहे होरोस्कोप पाठवायचा. आणि बर्‍याचदा तर अस बघायला मिळतं की अशा मित्रांना आपली आठवण असे फालतु मेल्स पाठवायला मिळतो अशा मित्रांना मी मेल करुन रागवण्याचं करतोय्......कोणाला दुसरा पर्याय माहित असेल तर सांगा.....

अनिला 22/02/2008 - 12:39
अशा मेल्स न बघताच डिलीट करते- हे करा, ते करू नका, मदत करा, चमत्कार होइल, कुत्री, मांजरी इत्यादी. पण काही काही मेल्स (विनोदी वगैरे) असतात चांगल्या. त्या मी पण देते फॉरवर्ड करून! मनस्वी

शेखर 22/02/2008 - 14:02
ह्यावर उपाय म्हणजे तीच मेल ज्याने पाठवली आहे त्यालाच ती मेल १०० पाठवावी. एकादा त्रास होईल पण अश्या मेल येणे बंद होईल. शेखर.

In reply to by शेखर

विसोबा खेचर 22/02/2008 - 14:06
ह्यावर उपाय म्हणजे तीच मेल ज्याने पाठवली आहे त्यालाच ती मेल १०० पाठवावी. एकादा त्रास होईल पण अश्या मेल येणे बंद होईल. हा हा हा! हा उपाय मात्र ब्येस वाटतो! :) तात्या.
"प्रशांत दामलेंच " एक मस्त गाणं आहे बघा "कसं जगायचं , कसं वागायचं ? कोणी सांगेल का मला ? " अशीच माझी अवस्था झाले आहे आज. का म्हणून काय विचारता ? सांगतो .......... काल मस्त सुट्टी घेतली आणि आज जरा फ्रेश मूड मध्ये कार्यालयात आलो . आल्यावर नेहमीच्या प्रघातासारखे काही महत्वाच्या व्यक्तींना "गूड मॉर्निंग घालून" झाल्यावर [ त्या बाबतीत आम्ही अगदी 'बापू काण्यांच्या' हातावर हात मारला आहे] आमचा 'मेलबॉक्स' ऊघडला. पाहतो तर काय एकूण ५२ 'अनरीड मेल्स ".

खर्डेघाशी

बेसनलाडू ·

बेसनलाडू 20/02/2008 - 11:53
कृपया शेवटचा शेर - जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी असा वाचावा. (सुधारक)बेसनलाडू अवांतर - प्रतिसाद आलेला नसताना प्रकाशित साहित्यकृतीचे संपादन करण्याची सोय आहे ना तात्या? असे संपादन कसे करायचे, याबद्दल मार्गदर्शन कराल काय?

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर 20/02/2008 - 12:18
प्रतिसाद आलेला नसताना प्रकाशित साहित्यकृतीचे संपादन करण्याची सोय आहे ना तात्या? हो, आहे खरी! परंतु मला त्याबद्दल अधिक तांत्रिक माहिती नाही. नीलकांतराव काय तो खुलासा करतील.. कृपया शेवटचा शेर - जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी असा वाचावा. (सुधारक)बेसनलाडू तूर्तास, तशी सुधारणा केली आहे. काही गैरसोय झाली असल्यास क्षमस्व! धन्यवाद, तात्या.

विसोबा खेचर 20/02/2008 - 12:12
छान कविता... बांधू जेथे घरटे आपण तिथेच मथुरा,तिथेच काशी तुझ्याविना जगण्याची शिक्षा हीच का मरेस्तोवर फाशी? या ओळी सुंदर...! तात्या.

नंदन 20/02/2008 - 12:29
फोडासम जपलेले शैशव खपली धरते तळहाताशी हा आणि 'उपाशी'चा शेर आवडले. आजच तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर जावे लागल्यामुळे गझल अगदी समयोचित वाटली :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

अविनाश ओगले 20/02/2008 - 19:58
तुझ्या बटांशी खेळुन जावे, वार्‍याची इतकी बदमाशी? जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी हे शेर उत्तम.

ऋषिकेश 20/02/2008 - 20:04
तुझ्या बटांशी खेळुन जावे, वार्‍याची इतकी बदमाशी?
हाए हाए!!
भुकेल्यांस भाकरी नसे, अन् खाणारे खाऊन उपाशी
भाई वा! मस्तच!! गझल अतिशय आवडली!! -ऋषिकेश

वरदा 21/02/2008 - 07:47
बांधू जेथे घरटे आपण तिथेच मथुरा,तिथेच काशी हे मनापासून आवडंलं....खूप छान आहे गझल....

बेसनलाडू 20/02/2008 - 11:53
कृपया शेवटचा शेर - जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी असा वाचावा. (सुधारक)बेसनलाडू अवांतर - प्रतिसाद आलेला नसताना प्रकाशित साहित्यकृतीचे संपादन करण्याची सोय आहे ना तात्या? असे संपादन कसे करायचे, याबद्दल मार्गदर्शन कराल काय?

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर 20/02/2008 - 12:18
प्रतिसाद आलेला नसताना प्रकाशित साहित्यकृतीचे संपादन करण्याची सोय आहे ना तात्या? हो, आहे खरी! परंतु मला त्याबद्दल अधिक तांत्रिक माहिती नाही. नीलकांतराव काय तो खुलासा करतील.. कृपया शेवटचा शेर - जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी असा वाचावा. (सुधारक)बेसनलाडू तूर्तास, तशी सुधारणा केली आहे. काही गैरसोय झाली असल्यास क्षमस्व! धन्यवाद, तात्या.

विसोबा खेचर 20/02/2008 - 12:12
छान कविता... बांधू जेथे घरटे आपण तिथेच मथुरा,तिथेच काशी तुझ्याविना जगण्याची शिक्षा हीच का मरेस्तोवर फाशी? या ओळी सुंदर...! तात्या.

नंदन 20/02/2008 - 12:29
फोडासम जपलेले शैशव खपली धरते तळहाताशी हा आणि 'उपाशी'चा शेर आवडले. आजच तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर जावे लागल्यामुळे गझल अगदी समयोचित वाटली :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

अविनाश ओगले 20/02/2008 - 19:58
तुझ्या बटांशी खेळुन जावे, वार्‍याची इतकी बदमाशी? जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी हे शेर उत्तम.

ऋषिकेश 20/02/2008 - 20:04
तुझ्या बटांशी खेळुन जावे, वार्‍याची इतकी बदमाशी?
हाए हाए!!
भुकेल्यांस भाकरी नसे, अन् खाणारे खाऊन उपाशी
भाई वा! मस्तच!! गझल अतिशय आवडली!! -ऋषिकेश

वरदा 21/02/2008 - 07:47
बांधू जेथे घरटे आपण तिथेच मथुरा,तिथेच काशी हे मनापासून आवडंलं....खूप छान आहे गझल....
3