मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घरवाले...बाहरवाले

इनोबा म्हणे ·

In reply to by चिरोटा

शितल 01/05/2009 - 22:22
>>>>इनोबा, तो लेख ५ फेब्रुवारी २००८ चा आहें. हो पण हे इनोबाने प्रकाशित ही कधी केला आहे ते पहावे. प्रेषक इनोबा म्हणे ( बुध, 02/06/2008 - 01:26) .

In reply to by चिरोटा

शितल 01/05/2009 - 22:22
>>>>इनोबा, तो लेख ५ फेब्रुवारी २००८ चा आहें. हो पण हे इनोबाने प्रकाशित ही कधी केला आहे ते पहावे. प्रेषक इनोबा म्हणे ( बुध, 02/06/2008 - 01:26) .
कृपया हे वाचा.. इच्छुकांनी या विषयावर आपापली मते नोंदवावीत व चर्चा करावी असा मानस आहे...

तूच आहेस तुझ्या र्‍हासाचा शिल्पकार

इनोबा म्हणे ·

विसोबा खेचर 06/02/2008 - 11:52
टिळक, पाटील, बेंडे, गोखले, या सर्वांच्या विचारांशी पूर्णत: सहमत... आपला, (उत्तम पगाराची नोकरी सोडून गुज्जू-मारवाड्यांच्या शेयर बाजारात स्वत:च्या कन्सल्टन्सीच्या धंद्याचा जम बसवलेला!) तात्या. अवांतर - उप्पाशी मरेन पण कुणाचीही चाकरी न करण्याचा, आणि कुणालाही 'हो साहेब', 'करतो साहेब', 'सॉरी साहेब!' असे न म्हणण्याचा आमचा मूळ स्वभाव बळावू लागला आणि आम्ही नोकरी सोडून धंद्यात जम बसवला. सुरवातीला खूप कष्ट पडले, प्रसंगी पदरी नैराश्यही आले, परंतु आता बरं चाललं आहे! :) तात्या.

रम्या 06/02/2008 - 13:46
एखादा माणूस आपलं गाव सोडून एखाद्या परक्या ठिकाणी जातो त्यावेळी सहजिकच त्याला धोका पत्करणं भाग असतं. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याला निरनिराळ्या वाटा पडताळून पाहणे सहाजिकच आहे. पण यामुळे मराठी माणूसच लेच्यापेच्या आणि सगळे प्ररप्रांतीय कष्टकरी असं कसं म्हणता येईल? आपण समस्त मराठी जनांबद्दल बोलतोय की फक्त महाराष्ट्रात राहणार्‍या मराठी माणासांबद्दल बोलतोय? समस्त मराठी जनांबद्दल बोलायचं असेल तर दुसर्‍या राज्यात राहून जम बसवलेल्या मराठी माणसं काय कामचुकार म्हणून त्या ठिकाणी राहू शकली? उद्या एखादा मराठी माणूस अमेरिकेत गेला तर तेथील स्थानीकांपेक्षा कितीतरी कमी पगारात तो काम करील. परक्या ठिकाणी राहून येणार्‍या असुरक्षिततेच्या भावनेतून तो कमी पगारात जास्त काम करावं लागलं तरी तो त्याची तक्रार करणार नाही. याचा अर्थ समस्त मराठी जन तेवढे कामचूकार आणि परप्रांतिय तेवढे कष्टकरी असा होत नाही. बिहार बद्दल बोलायचं तर बिहारी माणूस खरोखरंच कष्टकरी असेल, उद्यमशील असेल तर सगळ्या बिहारचाच विकास होणार नाही का? त्यासाठी त्याला दुसर्‍या राज्यात स्थलांतर करायची काय गरज? खर्‍याखुर्‍या कष्टकरी माणसाला संधीची काय आवश्यकता? सगळ्यांनी आपापल्या राज्यात रहावं आणि कष्ट करून आपापल्या राज्याचा विकास करावा असं शक्य होणार नाही का? असं केलं तर समस्त देशाचाच सर्वांगीण विकास होऊ शकेल.

आपण समस्त मराठी जनांबद्दल बोलतोय की फक्त महाराष्ट्रात राहणार्‍या मराठी माणासांबद्दल बोलतोय? समस्त मराठी जनांबद्दल बोलायचं असेल तर दुसर्‍या राज्यात राहून जम बसवलेल्या मराठी माणसं काय कामचुकार म्हणून त्या ठिकाणी राहू शकली? मला वाटतं आपण अशिक्षित/अर्धशिक्षित मराठी माणसांबद्दल बोलत आहोत. एकही मराठी माणूस सामाजिक/आर्थिक/राजकिय क्षेत्रात 'वरच्या' पदाला पोहोचलेला नाही असे विधान कोणीही करणार नाही. यशस्वी मराठी माणसांची खुप मोठी यादी देता येईल. पण आपण ह्या चर्चेत सर्वसाधारण बेरोजगार मराठी माणसांबद्दल बोलत आहोत.

In reply to by प्रभाकर पेठकर

अवांतर: चोप द्यायचा असेल तर तो लालूप्रसाद, अमरसिंग, मुलायमसिंग, रामविलास पासवान या नेत्याना द्या. त्या लोकांमुळेच कदाचित हे परप्रांतीय लोक आपला विकास स्वतःच्या राज्यात करू शकत नाहीयेत. मराठी माणूस : देखील मराठी नेत्यानी केलेल्या लाडांमुळे कष्ट करून पैसे मिळवू इच्छीत नाही. मी काही वर्षे स्वतः कोकणात राहीलो आहे. माझे गाव पोंभुर्ले हे खारेपाटण जवळ आहे. आमच्या गावात ९७-९८ साली आलेल्या एका भैय्याने आता चांगले चौसोपी घर बांधले आहे ते स्वत:च्या कमाई वर. तुम्ही आम्ही फक्त मुंबई घेऊन बसलो आहोत. पण संपूर्ण कोकणात भैया हे विष असे काही भिनले आहे की ते तिथला मराठी माणूस गिळूनच संपेल. या लोकांना कामे देणारे लोक जसे आपण आहोत तसेच त्याना कामे मिळायला मदत करणारे लोक हे ही आपले आळशी मराठी मजूरच आहेत. शेतीमधे पैसा नाही हे मान्य. पण हे लोक स्वतः शेती कसतही नाहीत आणि ती विकून येणार्‍या पैशात फुकटचे खाण्यात धन्यता मानतात. मराठी आंबा उत्पादक ४५०-५०० च्या पट्टीवर मारवाडी दलालास माल पाठवतो आणि तो माल दलाल २०० रु. डझनावारी विकतो. पहा विचार करा हे बदलायचे आहे. पण सुरूवात कशी करायची????? आहे कोणाकडे उत्तर? पुण्याचे पेशवे..

In reply to by llपुण्याचे पेशवेll

रम्या 07/02/2008 - 11:35
मराठी माणसाने प्रगती करायची असेल तर सहकार हा एक उपाय म्हणता येऊ शकेल. पश्चिम महाराष्ट्राने सहकाराने स्वतः चा बराच विकास करून घेतला आहे. पण कोकणात (कधीकाळी) मराठी माणसांसाठी लढणारी शिवसेना जशी रुजली तसा सहकार का रुजला नाही कुणास ठाऊक? (सहकारावर विश्वास असलेला) रम्या

विसोबा खेचर 06/02/2008 - 11:52
टिळक, पाटील, बेंडे, गोखले, या सर्वांच्या विचारांशी पूर्णत: सहमत... आपला, (उत्तम पगाराची नोकरी सोडून गुज्जू-मारवाड्यांच्या शेयर बाजारात स्वत:च्या कन्सल्टन्सीच्या धंद्याचा जम बसवलेला!) तात्या. अवांतर - उप्पाशी मरेन पण कुणाचीही चाकरी न करण्याचा, आणि कुणालाही 'हो साहेब', 'करतो साहेब', 'सॉरी साहेब!' असे न म्हणण्याचा आमचा मूळ स्वभाव बळावू लागला आणि आम्ही नोकरी सोडून धंद्यात जम बसवला. सुरवातीला खूप कष्ट पडले, प्रसंगी पदरी नैराश्यही आले, परंतु आता बरं चाललं आहे! :) तात्या.

रम्या 06/02/2008 - 13:46
एखादा माणूस आपलं गाव सोडून एखाद्या परक्या ठिकाणी जातो त्यावेळी सहजिकच त्याला धोका पत्करणं भाग असतं. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याला निरनिराळ्या वाटा पडताळून पाहणे सहाजिकच आहे. पण यामुळे मराठी माणूसच लेच्यापेच्या आणि सगळे प्ररप्रांतीय कष्टकरी असं कसं म्हणता येईल? आपण समस्त मराठी जनांबद्दल बोलतोय की फक्त महाराष्ट्रात राहणार्‍या मराठी माणासांबद्दल बोलतोय? समस्त मराठी जनांबद्दल बोलायचं असेल तर दुसर्‍या राज्यात राहून जम बसवलेल्या मराठी माणसं काय कामचुकार म्हणून त्या ठिकाणी राहू शकली? उद्या एखादा मराठी माणूस अमेरिकेत गेला तर तेथील स्थानीकांपेक्षा कितीतरी कमी पगारात तो काम करील. परक्या ठिकाणी राहून येणार्‍या असुरक्षिततेच्या भावनेतून तो कमी पगारात जास्त काम करावं लागलं तरी तो त्याची तक्रार करणार नाही. याचा अर्थ समस्त मराठी जन तेवढे कामचूकार आणि परप्रांतिय तेवढे कष्टकरी असा होत नाही. बिहार बद्दल बोलायचं तर बिहारी माणूस खरोखरंच कष्टकरी असेल, उद्यमशील असेल तर सगळ्या बिहारचाच विकास होणार नाही का? त्यासाठी त्याला दुसर्‍या राज्यात स्थलांतर करायची काय गरज? खर्‍याखुर्‍या कष्टकरी माणसाला संधीची काय आवश्यकता? सगळ्यांनी आपापल्या राज्यात रहावं आणि कष्ट करून आपापल्या राज्याचा विकास करावा असं शक्य होणार नाही का? असं केलं तर समस्त देशाचाच सर्वांगीण विकास होऊ शकेल.

आपण समस्त मराठी जनांबद्दल बोलतोय की फक्त महाराष्ट्रात राहणार्‍या मराठी माणासांबद्दल बोलतोय? समस्त मराठी जनांबद्दल बोलायचं असेल तर दुसर्‍या राज्यात राहून जम बसवलेल्या मराठी माणसं काय कामचुकार म्हणून त्या ठिकाणी राहू शकली? मला वाटतं आपण अशिक्षित/अर्धशिक्षित मराठी माणसांबद्दल बोलत आहोत. एकही मराठी माणूस सामाजिक/आर्थिक/राजकिय क्षेत्रात 'वरच्या' पदाला पोहोचलेला नाही असे विधान कोणीही करणार नाही. यशस्वी मराठी माणसांची खुप मोठी यादी देता येईल. पण आपण ह्या चर्चेत सर्वसाधारण बेरोजगार मराठी माणसांबद्दल बोलत आहोत.

In reply to by प्रभाकर पेठकर

अवांतर: चोप द्यायचा असेल तर तो लालूप्रसाद, अमरसिंग, मुलायमसिंग, रामविलास पासवान या नेत्याना द्या. त्या लोकांमुळेच कदाचित हे परप्रांतीय लोक आपला विकास स्वतःच्या राज्यात करू शकत नाहीयेत. मराठी माणूस : देखील मराठी नेत्यानी केलेल्या लाडांमुळे कष्ट करून पैसे मिळवू इच्छीत नाही. मी काही वर्षे स्वतः कोकणात राहीलो आहे. माझे गाव पोंभुर्ले हे खारेपाटण जवळ आहे. आमच्या गावात ९७-९८ साली आलेल्या एका भैय्याने आता चांगले चौसोपी घर बांधले आहे ते स्वत:च्या कमाई वर. तुम्ही आम्ही फक्त मुंबई घेऊन बसलो आहोत. पण संपूर्ण कोकणात भैया हे विष असे काही भिनले आहे की ते तिथला मराठी माणूस गिळूनच संपेल. या लोकांना कामे देणारे लोक जसे आपण आहोत तसेच त्याना कामे मिळायला मदत करणारे लोक हे ही आपले आळशी मराठी मजूरच आहेत. शेतीमधे पैसा नाही हे मान्य. पण हे लोक स्वतः शेती कसतही नाहीत आणि ती विकून येणार्‍या पैशात फुकटचे खाण्यात धन्यता मानतात. मराठी आंबा उत्पादक ४५०-५०० च्या पट्टीवर मारवाडी दलालास माल पाठवतो आणि तो माल दलाल २०० रु. डझनावारी विकतो. पहा विचार करा हे बदलायचे आहे. पण सुरूवात कशी करायची????? आहे कोणाकडे उत्तर? पुण्याचे पेशवे..

In reply to by llपुण्याचे पेशवेll

रम्या 07/02/2008 - 11:35
मराठी माणसाने प्रगती करायची असेल तर सहकार हा एक उपाय म्हणता येऊ शकेल. पश्चिम महाराष्ट्राने सहकाराने स्वतः चा बराच विकास करून घेतला आहे. पण कोकणात (कधीकाळी) मराठी माणसांसाठी लढणारी शिवसेना जशी रुजली तसा सहकार का रुजला नाही कुणास ठाऊक? (सहकारावर विश्वास असलेला) रम्या
नमस्कार, कृपया ही बातमी वाचा. आपल्याला काय वाटते? इच्छुकांनी या संदर्भात कृपया येथे चर्चा करावी असा मानस आहे..

सर्जनशीलता, लायकी आणि मार्केटिंग......आमच्या नाटकातला एक संवाद

भडकमकर मास्तर ·

देवदत्त 06/02/2008 - 21:49
छान आहे. अवांतरः तुमच्या लेखाला उद्देशून काही नाही. पण नावावरून आठवले. सर्जनशीलता आणि सृजनशीलता ह्यांचे अर्थ कोणी सांगेल का?

In reply to by देवदत्त

चतुरंग 07/02/2008 - 03:57
सर्जनशीलता आणि सृजनशीलता ह्या दोन्हीचाही अर्थ एकच आहे. संस्कृत जाणकार नेमका संधी कोणत्या दोन शब्दांचा होतो वैगेरे सांगू शकतील. चतुरंग

धनंजय 07/02/2008 - 03:18
पण अशा प्रकारे सडेतोडपणे मित्राच्या स्वयंपूर्णतेबद्दलच्या आत्मविश्वासाचा पाणउतारा करता येईल, आणि मैत्री धोक्यात येणार नाही, असे हृद्य संबंध चिन्मय आणि धीरज यांच्यात हवेत. या नाटकाच्या मुख्य संघर्षाच्या कथानकात हा संवाद होता का? असल्यास या वैचारिक संघर्षाचे निरसन कसे झाले?

In reply to by धनंजय

या नाटकाच्या कथानकाचा आशय एका वाक्यात... ( इंग्रजीतला प्रिमाइस?).... " श्रीमन्तीचा माज गुन्हा शाबित होण्यापासून वाचवतो..." ............शक्य तेवढ्या थोडक्यात कथा सांगतो... मोन्याच्या पार्टीमध्ये भरपूर नशा करून धीरज्च्या स्वत:च्या कारने दोघे धीरजच्या घरी परत आलेले आहेत.( धीरजच्या घरी सद्ध्या कोणी नसते, कुटुंबीय पोलीस ओफिसर वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने दूर गावी, हा शिक्षणासाठी पुण्यात)...धीरज हुशार, सज्जन आहे, छंद म्हणून प्राणिमित्र संघटनेत काम करतो...त्याच्या यूएस ला जाण्याच्या विसा चे काम काही कारणाने अडलेले आहे.........चिन्मय मुंबईत अभिनेता होण्यासाठी झगडत आहे आणि त्याचे फ़ारसे बरे चालले नाही.( उधारी, मोठी फ़िल्म मिळाली म्हणून उधारीवर पार्ट्या देणे वगरे प्रकार तो करतो)..त्याला असे वाटत आहे की त्याच्या गरीबीमुळे सानिया नावाच्या त्याच्या मैत्रिणीने त्याच्या प्रेमाला नकार दिला आणि आता ती मोन्या बरोबर जास्तच प्रेमाने वागत आहे ( कारण अर्थात तो श्रीमंत आणि क्रिएटिव्ह आहे)......त्यामुळे त्याचा मोन्याबद्दल द्वेष मधून मधून उफ़ाळून येतो..... यांच्या गप्पांमध्ये शाळेच्या आठवणी निघतात, घराजवळच्या चौकात कोपर्यावर बासरीवाला म्हातारा भिकारी बसायचा आणि त्याची गाणी हे रोज ऐकत असत वगैरे...गप्पांचा विषय श्रीमंत माणसे / सेलेब्रिटीजच्या गुन्ह्यांवर येतो, बेकायदेशीर शिकार प्रकरणावर आणि सलमानला झालेल्या शिक्षेवर तावातावाने चर्चा होते, धीरजमधला प्राणिमित्र पोटतिडीकीने बोलतो, "श्रीमंतीचा माज असणार्या गुन्हेगारांना भरपूर शिक्षा व्हायला हवी".. असे पुष्कळ आदर्शवादी बोलतो....नंतर मोन्याचा धीरजला फोन येतो , की त्याला गेले महिनाभर घाण शिव्या देणारे निनावी फोन येताहेत, वेगवेगळ्या बूथ वरून, आणि आता हद्द झाली,त्याला धीरजच्या मदतीने पोलीसांना भेटायचे आहे ..... धीरजला संशय येतो आणि तो चिन्मयला खोदून विचारतो तेव्हा चिन्मय मान्य करतो की मीच ते फोन करत होतो, ...एव्हाना दोघांची पुष्कळ उतरलेली आहे, आणि त्यांच्या लक्षात येते की येतानाच त्यांची कार कोपर्यावरच्या फ़ूट्पाथवर चढून म्हातार्या भिकार्याला उडवून आलेली आहे, आणि तो कदाचित त्यात जागेवरच गेला असावा... इथे धीरज घाबरून जातो पण पुढच्याच क्षणी म्हणतो, " या प्रकरणात अडकलो तर माझ्या व्हिसाचं काय?" ....धीरज सावरतो आणि शांतपणे त्याच्या ( वडिलांचे मित्र पोलीस ओफ़िसर , ) अंकलना फोन लावायला लागतो," काहीही करून मला या प्रकरणातून सोडवा वगैरे"...पार्श्वभूमीला धीरजने थोड्याच वेळापूर्वी बोललेले शब्द ऐकू येताहेत...," स्वत:च्या चुका मान्य करायला मनाची मोठी शक्ती लागते, त्यासाठी लागतात व्हॆल्यूज"......चिन्मय अवाक होउन धीरज मधला हा बदल पाहतोय, धीरज फोनवर अंकलना यातून सोडवायला सांगतोय.... पडदा

In reply to by धनंजय

होय..तसे मैत्रीचे संबंध दोघांच्यात आहेत...मुख्य संघर्षाच्या कथानकात हा संवाद नसला तरी धीरजची आणि मोन्याची श्रीमंती, आणि चिन्मयचा मोन्याबद्दलचा थोडासा पूर्वग्रह इथे प्रथम कळतो...

की हा पैसेवालाच मूल्य सोडून वागत आहे. कारण चिन्मय जरी परीस्थितीने गांजलेला वैफल्यग्रस्त असला तरी त्याचे गरळ तो सरळ सरळ ओकताना दिसतो. उगाच सभ्यतेचा बुरखा पांघरून असभ्य वर्तन तरी करत नाही. आणि घडल्या चुकीने एकदम बावरून तरी गेलेला नाही. पुण्याचे पेशवे

देवदत्त, चतुरंग आणि धनंजय, प्रतिसादाबद्दल धन्यवाद... मात्र फक्त हा पैसेवालाच मूल्य सोडून वागत आहे, असे सांगायचे नाही....... तर स्वत:वरती वेळ आल्यावर माणूस सर्व मूल्ये सोयीस्करपणे विसरतो ,( आणि आपण बुडणार असे दिसताच आदर्शवादी बड्बड करणारा माणूस मूल्ये पायाखाली घेऊन पाण्यावर राहायचा प्रयत्न करतो...).असे सांगायचा प्रयत्न आहे.......( चिन्मयचा गुन्हा त्यातल्या त्यात फालतु आहे, पण आहे...जो तो स्वतःच्या अर्थिक ,सामाजिक ताकदीप्रमाणे गुन्हे करतो आणि त्यातून वाचतो असे चिन्मयचेच तत्त्वज्ञान आहे..) ........... जालावरती विविध ब्लॉग्ज मध्ये शिकार प्रकरणातल्या शिक्षेच्या वेळी बरेच उलट सुलट वाचले होते , इतके लोक या गुन्हेगाराचे समर्थन कसे करत आहेत , याचे मनातून फार आश्चर्य वाटले आणि दु:ख होत होते ,....त्यावर चर्चात्मक काहीतरी लिहायचे मनात होते....पण लिहिता लिहिता सलमानचे तथाकथित सर्व गुन्हे आम्ही त्या त्या पात्रांना वाटून दिले आणि काम सोपे होऊन गेले...

हे प्रायोगिक रंगभुमी सुदर्शन रंगमंचावर प्रयोग झाले होते का? छान आहेत संवाद. अभिनंदन. रंगभुमीवर लागले की बघु आता. नांव तर ऐकलेले आहे. प्रकाश घाटपांडे

घाटपांडे साहेब, होय्...सुदर्शन वर याचे काही प्रयोग झाले २००७ मध्ये ...नंतर काही स्पर्धांमध्ये उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली....आणि आपण नाव ऐकलेले आहे हे ऐकून आनंद वाटला... धन्यवाद....

देवदत्त 06/02/2008 - 21:49
छान आहे. अवांतरः तुमच्या लेखाला उद्देशून काही नाही. पण नावावरून आठवले. सर्जनशीलता आणि सृजनशीलता ह्यांचे अर्थ कोणी सांगेल का?

In reply to by देवदत्त

चतुरंग 07/02/2008 - 03:57
सर्जनशीलता आणि सृजनशीलता ह्या दोन्हीचाही अर्थ एकच आहे. संस्कृत जाणकार नेमका संधी कोणत्या दोन शब्दांचा होतो वैगेरे सांगू शकतील. चतुरंग

धनंजय 07/02/2008 - 03:18
पण अशा प्रकारे सडेतोडपणे मित्राच्या स्वयंपूर्णतेबद्दलच्या आत्मविश्वासाचा पाणउतारा करता येईल, आणि मैत्री धोक्यात येणार नाही, असे हृद्य संबंध चिन्मय आणि धीरज यांच्यात हवेत. या नाटकाच्या मुख्य संघर्षाच्या कथानकात हा संवाद होता का? असल्यास या वैचारिक संघर्षाचे निरसन कसे झाले?

In reply to by धनंजय

या नाटकाच्या कथानकाचा आशय एका वाक्यात... ( इंग्रजीतला प्रिमाइस?).... " श्रीमन्तीचा माज गुन्हा शाबित होण्यापासून वाचवतो..." ............शक्य तेवढ्या थोडक्यात कथा सांगतो... मोन्याच्या पार्टीमध्ये भरपूर नशा करून धीरज्च्या स्वत:च्या कारने दोघे धीरजच्या घरी परत आलेले आहेत.( धीरजच्या घरी सद्ध्या कोणी नसते, कुटुंबीय पोलीस ओफिसर वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने दूर गावी, हा शिक्षणासाठी पुण्यात)...धीरज हुशार, सज्जन आहे, छंद म्हणून प्राणिमित्र संघटनेत काम करतो...त्याच्या यूएस ला जाण्याच्या विसा चे काम काही कारणाने अडलेले आहे.........चिन्मय मुंबईत अभिनेता होण्यासाठी झगडत आहे आणि त्याचे फ़ारसे बरे चालले नाही.( उधारी, मोठी फ़िल्म मिळाली म्हणून उधारीवर पार्ट्या देणे वगरे प्रकार तो करतो)..त्याला असे वाटत आहे की त्याच्या गरीबीमुळे सानिया नावाच्या त्याच्या मैत्रिणीने त्याच्या प्रेमाला नकार दिला आणि आता ती मोन्या बरोबर जास्तच प्रेमाने वागत आहे ( कारण अर्थात तो श्रीमंत आणि क्रिएटिव्ह आहे)......त्यामुळे त्याचा मोन्याबद्दल द्वेष मधून मधून उफ़ाळून येतो..... यांच्या गप्पांमध्ये शाळेच्या आठवणी निघतात, घराजवळच्या चौकात कोपर्यावर बासरीवाला म्हातारा भिकारी बसायचा आणि त्याची गाणी हे रोज ऐकत असत वगैरे...गप्पांचा विषय श्रीमंत माणसे / सेलेब्रिटीजच्या गुन्ह्यांवर येतो, बेकायदेशीर शिकार प्रकरणावर आणि सलमानला झालेल्या शिक्षेवर तावातावाने चर्चा होते, धीरजमधला प्राणिमित्र पोटतिडीकीने बोलतो, "श्रीमंतीचा माज असणार्या गुन्हेगारांना भरपूर शिक्षा व्हायला हवी".. असे पुष्कळ आदर्शवादी बोलतो....नंतर मोन्याचा धीरजला फोन येतो , की त्याला गेले महिनाभर घाण शिव्या देणारे निनावी फोन येताहेत, वेगवेगळ्या बूथ वरून, आणि आता हद्द झाली,त्याला धीरजच्या मदतीने पोलीसांना भेटायचे आहे ..... धीरजला संशय येतो आणि तो चिन्मयला खोदून विचारतो तेव्हा चिन्मय मान्य करतो की मीच ते फोन करत होतो, ...एव्हाना दोघांची पुष्कळ उतरलेली आहे, आणि त्यांच्या लक्षात येते की येतानाच त्यांची कार कोपर्यावरच्या फ़ूट्पाथवर चढून म्हातार्या भिकार्याला उडवून आलेली आहे, आणि तो कदाचित त्यात जागेवरच गेला असावा... इथे धीरज घाबरून जातो पण पुढच्याच क्षणी म्हणतो, " या प्रकरणात अडकलो तर माझ्या व्हिसाचं काय?" ....धीरज सावरतो आणि शांतपणे त्याच्या ( वडिलांचे मित्र पोलीस ओफ़िसर , ) अंकलना फोन लावायला लागतो," काहीही करून मला या प्रकरणातून सोडवा वगैरे"...पार्श्वभूमीला धीरजने थोड्याच वेळापूर्वी बोललेले शब्द ऐकू येताहेत...," स्वत:च्या चुका मान्य करायला मनाची मोठी शक्ती लागते, त्यासाठी लागतात व्हॆल्यूज"......चिन्मय अवाक होउन धीरज मधला हा बदल पाहतोय, धीरज फोनवर अंकलना यातून सोडवायला सांगतोय.... पडदा

In reply to by धनंजय

होय..तसे मैत्रीचे संबंध दोघांच्यात आहेत...मुख्य संघर्षाच्या कथानकात हा संवाद नसला तरी धीरजची आणि मोन्याची श्रीमंती, आणि चिन्मयचा मोन्याबद्दलचा थोडासा पूर्वग्रह इथे प्रथम कळतो...

की हा पैसेवालाच मूल्य सोडून वागत आहे. कारण चिन्मय जरी परीस्थितीने गांजलेला वैफल्यग्रस्त असला तरी त्याचे गरळ तो सरळ सरळ ओकताना दिसतो. उगाच सभ्यतेचा बुरखा पांघरून असभ्य वर्तन तरी करत नाही. आणि घडल्या चुकीने एकदम बावरून तरी गेलेला नाही. पुण्याचे पेशवे

देवदत्त, चतुरंग आणि धनंजय, प्रतिसादाबद्दल धन्यवाद... मात्र फक्त हा पैसेवालाच मूल्य सोडून वागत आहे, असे सांगायचे नाही....... तर स्वत:वरती वेळ आल्यावर माणूस सर्व मूल्ये सोयीस्करपणे विसरतो ,( आणि आपण बुडणार असे दिसताच आदर्शवादी बड्बड करणारा माणूस मूल्ये पायाखाली घेऊन पाण्यावर राहायचा प्रयत्न करतो...).असे सांगायचा प्रयत्न आहे.......( चिन्मयचा गुन्हा त्यातल्या त्यात फालतु आहे, पण आहे...जो तो स्वतःच्या अर्थिक ,सामाजिक ताकदीप्रमाणे गुन्हे करतो आणि त्यातून वाचतो असे चिन्मयचेच तत्त्वज्ञान आहे..) ........... जालावरती विविध ब्लॉग्ज मध्ये शिकार प्रकरणातल्या शिक्षेच्या वेळी बरेच उलट सुलट वाचले होते , इतके लोक या गुन्हेगाराचे समर्थन कसे करत आहेत , याचे मनातून फार आश्चर्य वाटले आणि दु:ख होत होते ,....त्यावर चर्चात्मक काहीतरी लिहायचे मनात होते....पण लिहिता लिहिता सलमानचे तथाकथित सर्व गुन्हे आम्ही त्या त्या पात्रांना वाटून दिले आणि काम सोपे होऊन गेले...

हे प्रायोगिक रंगभुमी सुदर्शन रंगमंचावर प्रयोग झाले होते का? छान आहेत संवाद. अभिनंदन. रंगभुमीवर लागले की बघु आता. नांव तर ऐकलेले आहे. प्रकाश घाटपांडे

घाटपांडे साहेब, होय्...सुदर्शन वर याचे काही प्रयोग झाले २००७ मध्ये ...नंतर काही स्पर्धांमध्ये उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली....आणि आपण नाव ऐकलेले आहे हे ऐकून आनंद वाटला... धन्यवाद....
सर्जनशीलता, लायकी आणि मार्केटिंग...... आम्ही कॊलेजला एका वसतिग्रुहात शिकलो तेव्हा आमचा एक कविमनाचा मित्र होता... लायक माणसांना कौतुक लाभायच्या ऐवजी नेहमीच कोणा भलत्यालाच (त्याच्या अंगभूत गुणांच्याऐवजी काही इतर कारणांमुळे..उदा. सत्ता , पैसा, उच्च वर्तुळात संपर्क इ.) कौतुक लाभते असे जेव्हा दिसत असे, त्यावेळी आमच्या या मित्रास भयंकर वैफ़ल्य येत असे...हे वैफ़ल्य कधी वाजवी आणि कधी अत्यंत अयोग्य असे, पण त्याच्याशी फ़ार वेळ वाद घालणे शक्य होत नसे.... " श्रीमंत माणसे लायकी नसताना पैशांच्या जोरावर काहीही मिळवू शकतात" असे तो म्हणे, आणि चिडचिड करे....

नातेसंबंध लाख मोलाचे - सचिन

बापु देवकर ·

ले़ख छानच आहे.... आत्ता ऑस्ट्रेलिया दौर्यात टेस्ट मॅचेस मध्ये पुन्हा पूर्वीचाच आक्रमक सचिन पहायला मिळाला , फार बरे वाटले... मेल्बोर्न पहिली इनिंग पाहिल्यावरच (६२) असे वाटले होते की यावेळी साहेबांचा पवित्रा निराळा आहे...मेल्बोर्न दुसर्या इनिंग मध्ये त्याने पुन्हा ब्रेट ली वर आक्रमणाचा प्रयत्न केला आणि मग आउट झाला...मग सिडनी आणि ऍडिलेड मध्ये सुद्धा अप्रतिम शतके पाहायला मिळाली... ...गेल्या वर्षी पर्यंत दुखापतींनी वैतागलेला धीमा सचिन पाहता आम्ही प्रचंड दु़।खी झालो होतो....आणि ऑस्ट्रेलिया दौर्यात दौर्यात सचिन खेळला तर खरे, असे मानत होतो...पण आम्हास साहेबांनी अप्रतिम खेळ दाखवला, आणि खुश करून सोडले...... .......लगे रहो सचिनभाई........ ( २० -२० च्या जमान्यात टेस्ट क्रिकेट हेच बेष्ट मानणारा ) ( जुन्या आक्रमक सचिनचा चाहता) सतलज _भडकमकर

ले़ख छानच आहे.... आत्ता ऑस्ट्रेलिया दौर्यात टेस्ट मॅचेस मध्ये पुन्हा पूर्वीचाच आक्रमक सचिन पहायला मिळाला , फार बरे वाटले... मेल्बोर्न पहिली इनिंग पाहिल्यावरच (६२) असे वाटले होते की यावेळी साहेबांचा पवित्रा निराळा आहे...मेल्बोर्न दुसर्या इनिंग मध्ये त्याने पुन्हा ब्रेट ली वर आक्रमणाचा प्रयत्न केला आणि मग आउट झाला...मग सिडनी आणि ऍडिलेड मध्ये सुद्धा अप्रतिम शतके पाहायला मिळाली... ...गेल्या वर्षी पर्यंत दुखापतींनी वैतागलेला धीमा सचिन पाहता आम्ही प्रचंड दु़।खी झालो होतो....आणि ऑस्ट्रेलिया दौर्यात दौर्यात सचिन खेळला तर खरे, असे मानत होतो...पण आम्हास साहेबांनी अप्रतिम खेळ दाखवला, आणि खुश करून सोडले...... .......लगे रहो सचिनभाई........ ( २० -२० च्या जमान्यात टेस्ट क्रिकेट हेच बेष्ट मानणारा ) ( जुन्या आक्रमक सचिनचा चाहता) सतलज _भडकमकर
यशाच्या शिखरावर असलेला सचिन जेव्हा नातेसंबंधांवर बोलायला लागतो तेव्हा त्याच्या तोंडातून पहिलं वाक्‍य बाहेर पडतं, "ज्या यशाबद्दल मला श्रेय दिलं जातं हे यश माझ्या एकट्याचं नाही.' फार कमी वेळा सचिन क्रिकेट सोडून इतर विषयांवर बोलतो. या विषयावर मात्र तो भरभरून बोलला. ....... कोणत्याही मुलाचं सर्वांत मूलभूत नातं असतं ते आई-वडिलांबरोबरचं. निःसंकोचपणे मी सांगू शकतो, की माझ्या आयुष्यात सर्वांत जास्त प्रभाव कोणाचा असेल, तर तो माझ्या वडिलांचा. माझे वडील रमेश तेंडुलकर कमालीचे शांत होते. त्यांचे विचार प्रगल्भ असायचे. त्यांना कोणत्या गोष्टीची भुलावण नव्हती. पैशाचा किंवा कशाचाच त्यांना अजिबात लोभ नव्हता.

कुणी मत देता का मत?

विसोबा खेचर ·

प्राजु 26/01/2008 - 20:41
आहे ही. एस्.एम्.एस. मुळेच तर गायक .. नव्हे महागायक तयार होतात. आणि कित्येक तपं साधना करणारे मूर्ख ठरून "जोश" इ. घराण्यात काही महिने शिकून महागायक ही पदवीही भूषवितात. घराणी फक्त जयपूर, ग्वाल्हेर, किराना , आग्रा ... ही सामान्य लोकांसाठी आहेत. महागायकांची वेगळी असतात. आवांतर : तात्या, मुक्तछंदात चांगलं लिहिता तुम्ही. उगाच पद्याच्या नावने खडे का फोडता.. लिहा ना अशीच आणखी मुक्तछंदात काव्ये. - प्राजु.

धनंजय 26/01/2008 - 21:08
यात तळमळ आहे. हे विडंबन नसून नवी कृती शोभते. पण तरी एक प्रश्न विचारतो - कलाकाराला टाळ्या/वाहावा ची गरज पूर्वीही नव्हती का? हे एसेमेस म्हणजे त्याचाच प्रकार नाही काय? सवंग टाळ्या-जमवू कलाकार, नव्या माध्यमात वावरून जुन्या, तप केलेल्या गायकांवर लोकप्रियतेत विजय मिळवतात, असे पूर्वीही झालेले आहे. "हमिदाबाई" हे पात्र या विषयाला हात घालते - रेकॉर्डिंग आणि सिनेमागाण्यांचा पाणचट रतीब घालत पोरकट गायक-गायिकांनी बाजारपेठ काबीज केली, आणि आभिजात संगीत आळवणारी हमिदाबाईची कोठी ओस पडली. हे तर मागच्या (च्या मागच्या) पिढीत झाले. पण शेवटी असेच होते की जे नवीन तंत्रज्ञानातले "महागायक" असतात, ते फोल ठरतात, पाचोळ्यासारखे उडून जातात, आणि खरे कलाकार नवे माध्यमही काबीज करतात. हमिदाबाई बेजान डब्यात आवाज बंदिस्त करणार्‍या कलाकारांना तुच्छ लेखते. पण रेकॉर्डिंग हे माध्यम भिमसेन वगैरे श्रेष्ठ कलाकारांनी जिंकले आहे. बेजान डब्यात आवाज भरला म्हणून त्यांना तुच्छ लेखायची कोणाला छाती होऊ नये. एसेमेसची नवलाई संपून खरी स्पर्धा या माध्यमांत येईल तेव्हा उत्तम कलाकार टीव्ही वाहिन्या हे माध्यमही जिंकून दाखवतील. खुद्द नटसम्राटातही त्या महान कलाकारावर, काळ बदलता, थेटराच्या बाहेर उष्टे खायची वेळ येते. पण ते हृदयद्रावक सत्य मानले, तरी त्या नवीन नाट्यसृष्टीत पुढे उत्तम कलाकार निपजले हेही नकारता येत नाही. हे अवांतर विचार, बरे का... तुमची कविता/नाट्यमय गद्य आवडले, हे आधीच सांगितले आहे.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 27/01/2008 - 11:02
धन्याशेठ, कलाकाराला टाळ्या/वाहावा ची गरज पूर्वीही नव्हती का? हे एसेमेस म्हणजे त्याचाच प्रकार नाही काय? मुळीच नाही! माझ्या मते टाळ्या, वाहवा वेगळ्या आणि समस वेगळे! समस मागवण्यात पैशांचे राजकारण फार मोठ्या प्रमाणावर आहे! टाळ्या किंवा वाहवा याबद्दल कलाकाराला कुणाकडे भीक मागावी लागत नाही. टाळी ही उत्स्फूर्तपणे वाजवली जाते, वाहवा ही हृदयापासून नकळत उमटते!समसच्या बाबतीत, 'माझे गाणे आवडले असेल तर मला प्लीज प्लीज प्लीज समस करा हो' अशी जशी भीक मागितली जाते तशी टाळ्यावाहवांच्या बाबतीत मागितली जात नाही! कलाकाराचे काम म्हणजे प्रामाणिकपणे अधिकाधिक उत्तम रितीने आपली कला सादर करणे हे आणि एवढेच होय!लोकांकडे समस मागणे, टाळ्या-वाहवा मागणे हे कलाकाराचं काम नव्हे/असू नये! सवंग टाळ्या-जमवू कलाकार, नव्या माध्यमात वावरून जुन्या, तप केलेल्या गायकांवर लोकप्रियतेत विजय मिळवतात, असे पूर्वीही झालेले आहे. याचे उत्तर तुझ्या वरील वाक्यातच दडलेले आहे. टाळ्या-जमवू (हल्लीच्या युगात समस-जमवू!) कलाकारांच्या बाबतीत तूच सवंग हा शब्द वापरला आहेस! सो, यू सेड इट! "हमिदाबाई" हे पात्र या विषयाला हात घालते - रेकॉर्डिंग आणि सिनेमागाण्यांचा पाणचट रतीब घालत पोरकट गायक-गायिकांनी बाजारपेठ काबीज केली, आणि आभिजात संगीत आळवणारी हमिदाबाईची कोठी ओस पडली. हे तर मागच्या (च्या मागच्या) पिढीत झाले. पण शेवटी असेच होते की जे नवीन तंत्रज्ञानातले "महागायक" असतात, ते फोल ठरतात, पाचोळ्यासारखे उडून जातात, आणि खरे कलाकार नवे माध्यमही काबीज करतात. अगदी खरे आहे! परंतु लोकांकडून, तेही खास करून गायन स्पर्धेकरता समस मागवणे, ज्यात पैशांचे मोठे राजकारण आहे, तसेच समस पद्धतीत मोठे मॅन्युप्युलेशनही होऊ शकते, या प्रकाराला 'नवे तंत्रज्ञान' हा शब्द वापरणे हे मला अत्यंत चुकीचे, दिशाभूल करणारे, तसेच हास्यास्पदही वाटते! गाण्याची स्पर्धा असेल तर त्याबाबत निकाल देण्याचा अधिकार हा फक्त तज्ञ मंडळींकडेच असावा असे माझे मत आहे. शेवटी मायबाप रसिक ही आम जनताच असते, तेव्हा कुणाला दाद द्यायची, कुणाला नाही, कुणाला डोक्यावर घेऊन नाचायचे, कुणाला नाही, हे जनताच ठरवते हे मलाही मान्य, परंतु as far as spardhaa is concerned, त्या बाबतीत मात्र निकालाचे सर्वाधिकार फक्त आणि फक्त तज्ञ मंडळींच्या पॅनलकडेच असावेत. सध्याची समस पद्धती ही कलेला घातक तर आहेच, शिवाय खरोखरंच गुणी आणि लायक स्पर्धक कलाकाराच्या हिताच्या दृष्टीनेही घातक आहे असे माझे मत आहे... हमिदाबाई बेजान डब्यात आवाज बंदिस्त करणार्‍या कलाकारांना तुच्छ लेखते. पण रेकॉर्डिंग हे माध्यम भिमसेन वगैरे श्रेष्ठ कलाकारांनी जिंकले आहे. बेजान डब्यात आवाज भरला म्हणून त्यांना तुच्छ लेखायची कोणाला छाती होऊ नये. एसेमेसची नवलाई संपून खरी स्पर्धा या माध्यमांत येईल तेव्हा उत्तम कलाकार टीव्ही वाहिन्या हे माध्यमही जिंकून दाखवतील. खुद्द नटसम्राटातही त्या महान कलाकारावर, काळ बदलता, थेटराच्या बाहेर उष्टे खायची वेळ येते. पण ते हृदयद्रावक सत्य मानले, तरी त्या नवीन नाट्यसृष्टीत पुढे उत्तम कलाकार निपजले हेही नकारता येत नाही. माझ्या मते स्पर्धेकरता आम जनतेकडून समस मागवून केवळ अन केवळ पैशांचे राजकारण करून समस मागवणे आणि 'ध्वनिमुद्रण-तंत्रज्ञान' या दोन्ही गोष्टी पूर्णत: भिन्न आहेत. या दोन गोष्टींचा आपापसात दुरान्वयेही संबंध नाही. सबब, माझ्या मते वरील दाखला सदर चर्चेसंदर्भात अत्यंत गैरलागू व चुकीचा आहे! हे अवांतर विचार, बरे का... तुमची कविता/नाट्यमय गद्य आवडले, हे आधीच सांगितले आहे. धन्यवाद धन्याशेठ! तुझ्यासारख्या चोखंदळ समिक्षकाने आणि प्रतिभावंताने माझ्या प्रकटनाला क्षणभर का होईना परंतु 'कविता' असे म्हटले, आपल्या प्रतिसादाचे शीर्षक 'शिरवाडकरांना अप्रूप वाटेल' असे ठेवले, हे पाहून काव्यातले फारसे काही न कळणार्‍या माझ्यासारख्या माणसाला लाजेने गोरेगुलाबी अन चूरचूर व्ह्यायला झाले आहे! आज रविवार दुपारचे जेवण अंमळ दोन घास जास्तच जाऊन माझ्या अंगावर संध्याकाळपर्यंत मूठभर मास अधिक चढणार एवढे मात्र खरे! :) आपला, (नवा नवा कवी!) तात्या :))

तात्या, सर्वप्रथम कविता या प्रांतात आपल्या प्रवेशाचे कवींच्या वतीने प्रातेनिधीक स्वरुपात आम्ही आपले स्वागत करतो. :) ( इथे शाल, श्रीफळ आणि एक फुलांचा गुच्छ दिला असे चित्र डोळ्यासमोर आणावे ) मुक्तछंदातील कवितेच्या आशयाच्या संदर्भात डॊ. धनजय यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. काही काही गायक खरेच छान गातात. पण, ज्या पद्धतीने ते एस.एम.एस ने मते मागतात, ते दृष्य पाहवत नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 27/01/2008 - 11:16
( इथे शाल, श्रीफळ आणि एक फुलांचा गुच्छ दिला असे चित्र डोळ्यासमोर आणावे ) वा वा! आपल्या शाल आणि श्रीफळामुळे मी भारावून गेलो आहे! धन्यवाद शेठ...:) काही काही गायक खरेच छान गातात. पण, ज्या पद्धतीने ते एस.एम.एस ने मते मागतात, ते दृष्य पाहवत नाही. यू सेड इट, मला अगदी हेच म्हणायचे आहे! दुसरा मुद्दा म्हणजे समस पद्धत! स्पर्धा जरूर असाव्यात, परंतु सर्वात लायक आणि पात्र स्पर्धक हा समस पद्धतीने ठरवला जाऊ नये, तर त्याचा अधिकार हा फक्त तज्ञ मंडळींनाच असावा! हल्लीची समस पद्धत म्हणजे केवळ मोबाईल कंपन्यांचे आणि वाहिन्यांचे लाखो कऱोडो रुपये कमवायचे एक माध्यम झाले आहे, चरायचे कुरण झाले आहे! आणि या सगळ्या गदारोळात खरोखरंच एखाद्या गुणी स्पर्धक कलाकारावर अन्याय होऊ नये, तसेच लाखो-हजारोंमध्ये परमेश्वर एखाद्यालाच थोर गायककलेचे दान देऊन सन्मानित करतो अश्या व्यक्तिने, "माझा कोड अबक आहे, मला प्लीज प्लीज प्लीज समस करा हो" अशी लाचारी करणे मला अत्यंत चुकीचे, संतापजनक, लज्जास्पद, आणि घृणास्पद वाटते म्हणूनच केवळ वरील प्रकटनवजा कविता! असो...! आपला, (कुणाकडेही कधीही 'समस' करता हात न पसरलेल्या भीमण्णा-बाबूजींचा एकलव्य शिष्य!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

इनोबा म्हणे 27/01/2008 - 11:42
तात्यांची कविता आवडली आणि त्यांचे विचारही.... समस पद्धती चालू झाल्यामुळे,कलाकार लोक भिकार्‍यासारखे वागू लागले आहेत.समस पद्धतीने खरेतर चांगला व गुणी कलाकार येण्याऐवजी नको तेच निवडून येतात कारण सर्वात जास्त समस अमूक अमूक विजेत्याला मिळाले('सर्वात चांगला भिकारी'म्हणा हवे तर). मध्यंतरी हिंदी वॉईस ऑफ इंडीया मधे आसामच्या देबोजीतला भांडून भांडून विजय मिळाला,असला विजय काय कामाचा? आणि असले कलाकार तरी काय कामाचे? यांना कलाकार तरी कसे म्हणायचे? मराठीतील हास्यसम्राट मधेही असाच किस्सा घडला होता.या कलाकाराने आपला (समस पद्धतीने) पराजय होणार हे आधीच हेरले होते जणू,म्हणूनच अंतीम फेरीपुर्वीच्या कार्यक्रमात त्याने एक किस्सा ऐकवला तो असा.... एका कुस्तीच्या लढती दरम्यान एक नावाजलेला पैलवान जिंकणार जिंकणार असे वाटत असताना एका किरकोळ वाळक्या बांबू एवढ्या पैलवानाकडून चित होतो. आश्चर्याने एक दर्शक त्याला कारण विचारतो तेव्हा तो सांगतो,"मी जिंकणारच होतो,पण मला समस कमी पडले हो!". कालाय तस्मै नमः-दूसरे काय? (हताश) -इनोबा

धोंडोपंत 27/01/2008 - 12:18
वा तात्यासाहेब, आपले मुक्तछंदातील प्रकटन आवडले. तुम्ही वेदना उत्कृष्टपणे मांडली आहे. अभिनंदन. आयुष्यभर संगीतसाधना करूनही अत्यंत महान कलाकार आजच्या जमान्यात पडद्याआड गेले आहेत.(काळाच्या नव्हे.) आणि दोन चार अनुकरणे करणारे इंडियन आयडॉल आणि काय काय म्हणून मिरवून घेत आहेत. या परिस्थितीवर आपले भाष्य अत्यंत चांगले झाले आहे. मुक्तछंदातील अजून लेखन आपणाकडून अपेक्षित आहे. आपला, (उतावळा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

ऋषिकेश 27/01/2008 - 20:39
आपले मुक्तछंदातील प्रकटन आवडले. तुम्ही वेदना उत्कृष्टपणे मांडली आहे. अभिनंदन. असेच म्हणतो. रचना आवडली आणि व्यथा भिडली -ऋषिकेश

कवितेचा प्रकार वगैरे काही माहिती नाही पण वाचताना मजा आली. आमच्या भाषेत जी मनाला आनंद देते ती कविता उत्तम.

सहज 27/01/2008 - 18:24
तात्या तुम्हाला संगीत/गायन आवडते पण हे ऐसेमेस मतदान प्रकरण नाही पण म्हणुन कविता हा प्रांत तुमचा नसला (असे तुम्ही म्हणता) तरी एक कविता निर्माण झाली हे तर छान झाले ना :-) शिवाय असो कलाप्रेमी तात्याला हा ऐसेमेस प्रकार आवडत नसेल पण शेयरसम्राट तात्याला मोबाइल कंपन्यांच्या समभागातून त्या त्रासाची नुकसान भरपाई (थोडी का होईना) होतीय ना? ;-) अहो चालायचेच!!!

तात्यांच्या वरिल कवितेत व विवेचनात म्हटल्याप्रमाणे हा उद्वेगजनक प्रकार बदलायला हवाय. अंतिम विजेता हा तज्ञांच्या निर्णयावर ठरविला जावा. ह्या एस्.एम्.एस. पद्धतीत काही गैरप्रकार घडतात उ.दा., स्पर्धा सुरु असताना एस्.टि.डि. बूथ अडवून, सारखे स.म.स. पाठवणे (त्यासाठी माणसे नेमुन त्यांना त्या कामाचे पैसे देणे इ.). तसेच, गावात घरोघरि जाउन, स्पर्धकाचे माता-पिता, काका-मामा, आजी-आजोबा स.म.स. चा जोगवा मागतात. माझ्या माहितितल्या एका स्पर्धकाच्या संबंधितांनी ह्या साठी अमाप पैसे खर्चले होते. आपल्या पाल्याला सहज सोप्या जीवनाची सवय लावल्यावर, त्याला यशही सहज सोपे हवे असते. पालकही ते मिळवून द्यायचा प्रयत्न करतात. शालेय जीवनात, मार्कांसाठी जसे विद्यार्थ्यास घासावे लागते, तेव्हडेच संगीतात (किंबहुना सर्वच क्षेत्रात उच्च गुणवत्तेसाठी) घासावे लागते, हे पालकांनी मुलांवर बिंबवणे आवश्यक आहे. स.म.स. बद्दल बोलायचे, तर, मोबईल कंपन्यांच्या आश्रयाशिवाय, तो सेटचा झगमगाट, परिक्षकांची फी, स्पर्धकांची झगमगीत प्रावरणे कोठुन येणार? आणि स्पर्धा आयोजक पैसे कोठुन कमावणार? संजय अभ्यंकर

केशवसुमार 27/01/2008 - 23:23
तुझी तळमळ समजते आहे.. पण तू म्हणतोस त्या स्पर्धा नसून तो एक मोबाईल कंपन्याचा मार्केटींगचा भाग आहे..पाश्चिमात्य देशातून उचललेले खूळ आहे कोणाला ही कला , कलाकार यांच्याशी मतलब नाही.. ना भाग घेणार्‍याला.. ना त्या परिक्षकाला.. ना त्या प्रयोजकाला..सब से बडा रुपया.. हेच खर बाबा.. उगाच त्रास करून घेऊ नको.. हे कर्यक्रम सुरु झाले की तो इडियट बॉक्स सरळ बंद करत जा.. आवांतर : तात्या, मुक्तछंदात चांगलं लिहिता तुम्ही. उगाच पद्याच्या नावने खडे का फोडता.. लिहा ना अशीच आणखी मुक्तछंदात काव्ये... प्राजुशी एकदम सहमत आहे..

सुनील 28/01/2008 - 07:30
तात्या, कविता आवडली. मुक्तछांदाचा फॉर्म छान जमलाय. समसमध्ये मोबाईल कंपन्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ते केवळ गाण्याच्या कार्यक्रमाताच नव्हे तर "करोडपती" सारख्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातदेखील जाणवून येत होते. मागे ठाण्यातच एका व्य्क्तीला आपल्या पत्नीलाच अश्लील समस पाठवला म्हणून अटक झाली तेव्हा हेही उघडकीस आले की, कार्यक्रमातील व्यक्तीच अनेक सीमकार्डे वितरीत करून आपल्याला अधिक समस येतील याची व्यवस्था करते! पण, ह्या तरुण, नवोदित कलाकारांना समसचा जोगवा मागावासा वाटला तर ते समजून घेता येईल. कारण शेवटी त्या स्पर्धेत जिंकणे ही त्यांचे अंतीम धेय नसते तर त्यांच्या करीयरची ती सुरुवात असते! आणि त्यासाठी जाणकारांच्या नजरेसमोर येणे जरूरीचे असते. आजच्या कित्येक बुजूर्ग नटांनी आपल्या करीयरचा सुरुवातीचा काळ नामवंत स्टुडियोबाहेरील फूटपाथवर घुटमळत घालवला आहे, तोही त्याच कारणासाठी! अर्थात समसपेक्षाही नामवंत परीक्षकांनी दिलेल्या निकालावर स्पर्धेचे विजेते ठरवावेत हे मान्य होण्यासारखे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्राजु 26/01/2008 - 20:41
आहे ही. एस्.एम्.एस. मुळेच तर गायक .. नव्हे महागायक तयार होतात. आणि कित्येक तपं साधना करणारे मूर्ख ठरून "जोश" इ. घराण्यात काही महिने शिकून महागायक ही पदवीही भूषवितात. घराणी फक्त जयपूर, ग्वाल्हेर, किराना , आग्रा ... ही सामान्य लोकांसाठी आहेत. महागायकांची वेगळी असतात. आवांतर : तात्या, मुक्तछंदात चांगलं लिहिता तुम्ही. उगाच पद्याच्या नावने खडे का फोडता.. लिहा ना अशीच आणखी मुक्तछंदात काव्ये. - प्राजु.

धनंजय 26/01/2008 - 21:08
यात तळमळ आहे. हे विडंबन नसून नवी कृती शोभते. पण तरी एक प्रश्न विचारतो - कलाकाराला टाळ्या/वाहावा ची गरज पूर्वीही नव्हती का? हे एसेमेस म्हणजे त्याचाच प्रकार नाही काय? सवंग टाळ्या-जमवू कलाकार, नव्या माध्यमात वावरून जुन्या, तप केलेल्या गायकांवर लोकप्रियतेत विजय मिळवतात, असे पूर्वीही झालेले आहे. "हमिदाबाई" हे पात्र या विषयाला हात घालते - रेकॉर्डिंग आणि सिनेमागाण्यांचा पाणचट रतीब घालत पोरकट गायक-गायिकांनी बाजारपेठ काबीज केली, आणि आभिजात संगीत आळवणारी हमिदाबाईची कोठी ओस पडली. हे तर मागच्या (च्या मागच्या) पिढीत झाले. पण शेवटी असेच होते की जे नवीन तंत्रज्ञानातले "महागायक" असतात, ते फोल ठरतात, पाचोळ्यासारखे उडून जातात, आणि खरे कलाकार नवे माध्यमही काबीज करतात. हमिदाबाई बेजान डब्यात आवाज बंदिस्त करणार्‍या कलाकारांना तुच्छ लेखते. पण रेकॉर्डिंग हे माध्यम भिमसेन वगैरे श्रेष्ठ कलाकारांनी जिंकले आहे. बेजान डब्यात आवाज भरला म्हणून त्यांना तुच्छ लेखायची कोणाला छाती होऊ नये. एसेमेसची नवलाई संपून खरी स्पर्धा या माध्यमांत येईल तेव्हा उत्तम कलाकार टीव्ही वाहिन्या हे माध्यमही जिंकून दाखवतील. खुद्द नटसम्राटातही त्या महान कलाकारावर, काळ बदलता, थेटराच्या बाहेर उष्टे खायची वेळ येते. पण ते हृदयद्रावक सत्य मानले, तरी त्या नवीन नाट्यसृष्टीत पुढे उत्तम कलाकार निपजले हेही नकारता येत नाही. हे अवांतर विचार, बरे का... तुमची कविता/नाट्यमय गद्य आवडले, हे आधीच सांगितले आहे.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 27/01/2008 - 11:02
धन्याशेठ, कलाकाराला टाळ्या/वाहावा ची गरज पूर्वीही नव्हती का? हे एसेमेस म्हणजे त्याचाच प्रकार नाही काय? मुळीच नाही! माझ्या मते टाळ्या, वाहवा वेगळ्या आणि समस वेगळे! समस मागवण्यात पैशांचे राजकारण फार मोठ्या प्रमाणावर आहे! टाळ्या किंवा वाहवा याबद्दल कलाकाराला कुणाकडे भीक मागावी लागत नाही. टाळी ही उत्स्फूर्तपणे वाजवली जाते, वाहवा ही हृदयापासून नकळत उमटते!समसच्या बाबतीत, 'माझे गाणे आवडले असेल तर मला प्लीज प्लीज प्लीज समस करा हो' अशी जशी भीक मागितली जाते तशी टाळ्यावाहवांच्या बाबतीत मागितली जात नाही! कलाकाराचे काम म्हणजे प्रामाणिकपणे अधिकाधिक उत्तम रितीने आपली कला सादर करणे हे आणि एवढेच होय!लोकांकडे समस मागणे, टाळ्या-वाहवा मागणे हे कलाकाराचं काम नव्हे/असू नये! सवंग टाळ्या-जमवू कलाकार, नव्या माध्यमात वावरून जुन्या, तप केलेल्या गायकांवर लोकप्रियतेत विजय मिळवतात, असे पूर्वीही झालेले आहे. याचे उत्तर तुझ्या वरील वाक्यातच दडलेले आहे. टाळ्या-जमवू (हल्लीच्या युगात समस-जमवू!) कलाकारांच्या बाबतीत तूच सवंग हा शब्द वापरला आहेस! सो, यू सेड इट! "हमिदाबाई" हे पात्र या विषयाला हात घालते - रेकॉर्डिंग आणि सिनेमागाण्यांचा पाणचट रतीब घालत पोरकट गायक-गायिकांनी बाजारपेठ काबीज केली, आणि आभिजात संगीत आळवणारी हमिदाबाईची कोठी ओस पडली. हे तर मागच्या (च्या मागच्या) पिढीत झाले. पण शेवटी असेच होते की जे नवीन तंत्रज्ञानातले "महागायक" असतात, ते फोल ठरतात, पाचोळ्यासारखे उडून जातात, आणि खरे कलाकार नवे माध्यमही काबीज करतात. अगदी खरे आहे! परंतु लोकांकडून, तेही खास करून गायन स्पर्धेकरता समस मागवणे, ज्यात पैशांचे मोठे राजकारण आहे, तसेच समस पद्धतीत मोठे मॅन्युप्युलेशनही होऊ शकते, या प्रकाराला 'नवे तंत्रज्ञान' हा शब्द वापरणे हे मला अत्यंत चुकीचे, दिशाभूल करणारे, तसेच हास्यास्पदही वाटते! गाण्याची स्पर्धा असेल तर त्याबाबत निकाल देण्याचा अधिकार हा फक्त तज्ञ मंडळींकडेच असावा असे माझे मत आहे. शेवटी मायबाप रसिक ही आम जनताच असते, तेव्हा कुणाला दाद द्यायची, कुणाला नाही, कुणाला डोक्यावर घेऊन नाचायचे, कुणाला नाही, हे जनताच ठरवते हे मलाही मान्य, परंतु as far as spardhaa is concerned, त्या बाबतीत मात्र निकालाचे सर्वाधिकार फक्त आणि फक्त तज्ञ मंडळींच्या पॅनलकडेच असावेत. सध्याची समस पद्धती ही कलेला घातक तर आहेच, शिवाय खरोखरंच गुणी आणि लायक स्पर्धक कलाकाराच्या हिताच्या दृष्टीनेही घातक आहे असे माझे मत आहे... हमिदाबाई बेजान डब्यात आवाज बंदिस्त करणार्‍या कलाकारांना तुच्छ लेखते. पण रेकॉर्डिंग हे माध्यम भिमसेन वगैरे श्रेष्ठ कलाकारांनी जिंकले आहे. बेजान डब्यात आवाज भरला म्हणून त्यांना तुच्छ लेखायची कोणाला छाती होऊ नये. एसेमेसची नवलाई संपून खरी स्पर्धा या माध्यमांत येईल तेव्हा उत्तम कलाकार टीव्ही वाहिन्या हे माध्यमही जिंकून दाखवतील. खुद्द नटसम्राटातही त्या महान कलाकारावर, काळ बदलता, थेटराच्या बाहेर उष्टे खायची वेळ येते. पण ते हृदयद्रावक सत्य मानले, तरी त्या नवीन नाट्यसृष्टीत पुढे उत्तम कलाकार निपजले हेही नकारता येत नाही. माझ्या मते स्पर्धेकरता आम जनतेकडून समस मागवून केवळ अन केवळ पैशांचे राजकारण करून समस मागवणे आणि 'ध्वनिमुद्रण-तंत्रज्ञान' या दोन्ही गोष्टी पूर्णत: भिन्न आहेत. या दोन गोष्टींचा आपापसात दुरान्वयेही संबंध नाही. सबब, माझ्या मते वरील दाखला सदर चर्चेसंदर्भात अत्यंत गैरलागू व चुकीचा आहे! हे अवांतर विचार, बरे का... तुमची कविता/नाट्यमय गद्य आवडले, हे आधीच सांगितले आहे. धन्यवाद धन्याशेठ! तुझ्यासारख्या चोखंदळ समिक्षकाने आणि प्रतिभावंताने माझ्या प्रकटनाला क्षणभर का होईना परंतु 'कविता' असे म्हटले, आपल्या प्रतिसादाचे शीर्षक 'शिरवाडकरांना अप्रूप वाटेल' असे ठेवले, हे पाहून काव्यातले फारसे काही न कळणार्‍या माझ्यासारख्या माणसाला लाजेने गोरेगुलाबी अन चूरचूर व्ह्यायला झाले आहे! आज रविवार दुपारचे जेवण अंमळ दोन घास जास्तच जाऊन माझ्या अंगावर संध्याकाळपर्यंत मूठभर मास अधिक चढणार एवढे मात्र खरे! :) आपला, (नवा नवा कवी!) तात्या :))

तात्या, सर्वप्रथम कविता या प्रांतात आपल्या प्रवेशाचे कवींच्या वतीने प्रातेनिधीक स्वरुपात आम्ही आपले स्वागत करतो. :) ( इथे शाल, श्रीफळ आणि एक फुलांचा गुच्छ दिला असे चित्र डोळ्यासमोर आणावे ) मुक्तछंदातील कवितेच्या आशयाच्या संदर्भात डॊ. धनजय यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. काही काही गायक खरेच छान गातात. पण, ज्या पद्धतीने ते एस.एम.एस ने मते मागतात, ते दृष्य पाहवत नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 27/01/2008 - 11:16
( इथे शाल, श्रीफळ आणि एक फुलांचा गुच्छ दिला असे चित्र डोळ्यासमोर आणावे ) वा वा! आपल्या शाल आणि श्रीफळामुळे मी भारावून गेलो आहे! धन्यवाद शेठ...:) काही काही गायक खरेच छान गातात. पण, ज्या पद्धतीने ते एस.एम.एस ने मते मागतात, ते दृष्य पाहवत नाही. यू सेड इट, मला अगदी हेच म्हणायचे आहे! दुसरा मुद्दा म्हणजे समस पद्धत! स्पर्धा जरूर असाव्यात, परंतु सर्वात लायक आणि पात्र स्पर्धक हा समस पद्धतीने ठरवला जाऊ नये, तर त्याचा अधिकार हा फक्त तज्ञ मंडळींनाच असावा! हल्लीची समस पद्धत म्हणजे केवळ मोबाईल कंपन्यांचे आणि वाहिन्यांचे लाखो कऱोडो रुपये कमवायचे एक माध्यम झाले आहे, चरायचे कुरण झाले आहे! आणि या सगळ्या गदारोळात खरोखरंच एखाद्या गुणी स्पर्धक कलाकारावर अन्याय होऊ नये, तसेच लाखो-हजारोंमध्ये परमेश्वर एखाद्यालाच थोर गायककलेचे दान देऊन सन्मानित करतो अश्या व्यक्तिने, "माझा कोड अबक आहे, मला प्लीज प्लीज प्लीज समस करा हो" अशी लाचारी करणे मला अत्यंत चुकीचे, संतापजनक, लज्जास्पद, आणि घृणास्पद वाटते म्हणूनच केवळ वरील प्रकटनवजा कविता! असो...! आपला, (कुणाकडेही कधीही 'समस' करता हात न पसरलेल्या भीमण्णा-बाबूजींचा एकलव्य शिष्य!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

इनोबा म्हणे 27/01/2008 - 11:42
तात्यांची कविता आवडली आणि त्यांचे विचारही.... समस पद्धती चालू झाल्यामुळे,कलाकार लोक भिकार्‍यासारखे वागू लागले आहेत.समस पद्धतीने खरेतर चांगला व गुणी कलाकार येण्याऐवजी नको तेच निवडून येतात कारण सर्वात जास्त समस अमूक अमूक विजेत्याला मिळाले('सर्वात चांगला भिकारी'म्हणा हवे तर). मध्यंतरी हिंदी वॉईस ऑफ इंडीया मधे आसामच्या देबोजीतला भांडून भांडून विजय मिळाला,असला विजय काय कामाचा? आणि असले कलाकार तरी काय कामाचे? यांना कलाकार तरी कसे म्हणायचे? मराठीतील हास्यसम्राट मधेही असाच किस्सा घडला होता.या कलाकाराने आपला (समस पद्धतीने) पराजय होणार हे आधीच हेरले होते जणू,म्हणूनच अंतीम फेरीपुर्वीच्या कार्यक्रमात त्याने एक किस्सा ऐकवला तो असा.... एका कुस्तीच्या लढती दरम्यान एक नावाजलेला पैलवान जिंकणार जिंकणार असे वाटत असताना एका किरकोळ वाळक्या बांबू एवढ्या पैलवानाकडून चित होतो. आश्चर्याने एक दर्शक त्याला कारण विचारतो तेव्हा तो सांगतो,"मी जिंकणारच होतो,पण मला समस कमी पडले हो!". कालाय तस्मै नमः-दूसरे काय? (हताश) -इनोबा

धोंडोपंत 27/01/2008 - 12:18
वा तात्यासाहेब, आपले मुक्तछंदातील प्रकटन आवडले. तुम्ही वेदना उत्कृष्टपणे मांडली आहे. अभिनंदन. आयुष्यभर संगीतसाधना करूनही अत्यंत महान कलाकार आजच्या जमान्यात पडद्याआड गेले आहेत.(काळाच्या नव्हे.) आणि दोन चार अनुकरणे करणारे इंडियन आयडॉल आणि काय काय म्हणून मिरवून घेत आहेत. या परिस्थितीवर आपले भाष्य अत्यंत चांगले झाले आहे. मुक्तछंदातील अजून लेखन आपणाकडून अपेक्षित आहे. आपला, (उतावळा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

ऋषिकेश 27/01/2008 - 20:39
आपले मुक्तछंदातील प्रकटन आवडले. तुम्ही वेदना उत्कृष्टपणे मांडली आहे. अभिनंदन. असेच म्हणतो. रचना आवडली आणि व्यथा भिडली -ऋषिकेश

कवितेचा प्रकार वगैरे काही माहिती नाही पण वाचताना मजा आली. आमच्या भाषेत जी मनाला आनंद देते ती कविता उत्तम.

सहज 27/01/2008 - 18:24
तात्या तुम्हाला संगीत/गायन आवडते पण हे ऐसेमेस मतदान प्रकरण नाही पण म्हणुन कविता हा प्रांत तुमचा नसला (असे तुम्ही म्हणता) तरी एक कविता निर्माण झाली हे तर छान झाले ना :-) शिवाय असो कलाप्रेमी तात्याला हा ऐसेमेस प्रकार आवडत नसेल पण शेयरसम्राट तात्याला मोबाइल कंपन्यांच्या समभागातून त्या त्रासाची नुकसान भरपाई (थोडी का होईना) होतीय ना? ;-) अहो चालायचेच!!!

तात्यांच्या वरिल कवितेत व विवेचनात म्हटल्याप्रमाणे हा उद्वेगजनक प्रकार बदलायला हवाय. अंतिम विजेता हा तज्ञांच्या निर्णयावर ठरविला जावा. ह्या एस्.एम्.एस. पद्धतीत काही गैरप्रकार घडतात उ.दा., स्पर्धा सुरु असताना एस्.टि.डि. बूथ अडवून, सारखे स.म.स. पाठवणे (त्यासाठी माणसे नेमुन त्यांना त्या कामाचे पैसे देणे इ.). तसेच, गावात घरोघरि जाउन, स्पर्धकाचे माता-पिता, काका-मामा, आजी-आजोबा स.म.स. चा जोगवा मागतात. माझ्या माहितितल्या एका स्पर्धकाच्या संबंधितांनी ह्या साठी अमाप पैसे खर्चले होते. आपल्या पाल्याला सहज सोप्या जीवनाची सवय लावल्यावर, त्याला यशही सहज सोपे हवे असते. पालकही ते मिळवून द्यायचा प्रयत्न करतात. शालेय जीवनात, मार्कांसाठी जसे विद्यार्थ्यास घासावे लागते, तेव्हडेच संगीतात (किंबहुना सर्वच क्षेत्रात उच्च गुणवत्तेसाठी) घासावे लागते, हे पालकांनी मुलांवर बिंबवणे आवश्यक आहे. स.म.स. बद्दल बोलायचे, तर, मोबईल कंपन्यांच्या आश्रयाशिवाय, तो सेटचा झगमगाट, परिक्षकांची फी, स्पर्धकांची झगमगीत प्रावरणे कोठुन येणार? आणि स्पर्धा आयोजक पैसे कोठुन कमावणार? संजय अभ्यंकर

केशवसुमार 27/01/2008 - 23:23
तुझी तळमळ समजते आहे.. पण तू म्हणतोस त्या स्पर्धा नसून तो एक मोबाईल कंपन्याचा मार्केटींगचा भाग आहे..पाश्चिमात्य देशातून उचललेले खूळ आहे कोणाला ही कला , कलाकार यांच्याशी मतलब नाही.. ना भाग घेणार्‍याला.. ना त्या परिक्षकाला.. ना त्या प्रयोजकाला..सब से बडा रुपया.. हेच खर बाबा.. उगाच त्रास करून घेऊ नको.. हे कर्यक्रम सुरु झाले की तो इडियट बॉक्स सरळ बंद करत जा.. आवांतर : तात्या, मुक्तछंदात चांगलं लिहिता तुम्ही. उगाच पद्याच्या नावने खडे का फोडता.. लिहा ना अशीच आणखी मुक्तछंदात काव्ये... प्राजुशी एकदम सहमत आहे..

सुनील 28/01/2008 - 07:30
तात्या, कविता आवडली. मुक्तछांदाचा फॉर्म छान जमलाय. समसमध्ये मोबाईल कंपन्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ते केवळ गाण्याच्या कार्यक्रमाताच नव्हे तर "करोडपती" सारख्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातदेखील जाणवून येत होते. मागे ठाण्यातच एका व्य्क्तीला आपल्या पत्नीलाच अश्लील समस पाठवला म्हणून अटक झाली तेव्हा हेही उघडकीस आले की, कार्यक्रमातील व्यक्तीच अनेक सीमकार्डे वितरीत करून आपल्याला अधिक समस येतील याची व्यवस्था करते! पण, ह्या तरुण, नवोदित कलाकारांना समसचा जोगवा मागावासा वाटला तर ते समजून घेता येईल. कारण शेवटी त्या स्पर्धेत जिंकणे ही त्यांचे अंतीम धेय नसते तर त्यांच्या करीयरची ती सुरुवात असते! आणि त्यासाठी जाणकारांच्या नजरेसमोर येणे जरूरीचे असते. आजच्या कित्येक बुजूर्ग नटांनी आपल्या करीयरचा सुरुवातीचा काळ नामवंत स्टुडियोबाहेरील फूटपाथवर घुटमळत घालवला आहे, तोही त्याच कारणासाठी! अर्थात समसपेक्षाही नामवंत परीक्षकांनी दिलेल्या निकालावर स्पर्धेचे विजेते ठरवावेत हे मान्य होण्यासारखे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मुक्तछंदात काही ओळी लिवायचा आमचा एक प्रयत्न! कुणी मत देता का मत? एका गायकाला कुणी मत देता का मत? खरं सांगतो बाबांनो, गायक आता लाचार झाला आहे! झी, सोनी, आणि स्टारप्लस आणि कुणी कुणी त्याला लाचार केला आहे...! कुणी मत देता का मत? एका गायकाला कुणी मत देता का मत? कुणी सांगितलं की कलाकार एखादाच असतो, अभिमानी असतो? कुणी सांगितलं की त्याचं फक्त कलेशीच इमान असतं म्हणून? खरं सांगतो बाबांनो, गायक आताशा एस एम एस मुळेच लहानमोठा ठरतो! कुणी सांगितलं की एस एम एस मुळे वाहिन्यांना लाख्खो रुपये मिळतात? कुणी सांगितलं की संगीतकला ही वाहिन्यांच्या दारातली एक बाजारबसवी रांड झाली आहे म्हणून? तसं काही नाही बाबा

बोधकथा

पिवळा डांबिस ·

इनोबा म्हणे 26/01/2008 - 11:27
वाह!खरे आहे. मन शांत ठेवायचे तर असले प्रयोग करायला हरकत नाही. पण फक्त शिव्याशापापुरते... आपल्याला कोणी हात लावल्यावर मात्र हा विचार डोक्यात येत नाही,त्यावेळी डोक्यात असते ते फक्त आपला हात आणि मारणार्‍याचे थोबाड. भगवान गौतम बुद्धांनी सांगीतलेले एक वाक्य आठवते;ते म्हणाले होते "स्वतःला जिंकणारा हा विश्वविजेत्यापेक्षा मोठा विजेता असतो". (बुद्धं शरणं गच्छामी) -इनोबा

विसोबा खेचर 26/01/2008 - 11:37
मला याचा स्वानुभव आलेला आहे म्हणून हे मी सर्वांसाठी शेअर करीत आहे. थोडे दिवस उपयोग करुन पहा व मला तुमचा अनुभव कळवा. शाब्बास रे माझ्या गौतमा! :) पाहू पाहू, आम्हीही हा अनुभव घेऊन पाहू... बाय द वे, बोधकथेची ष्टोरी आवडली बरं का रे पिवळ्या डांबिसा... आपला, तात्या आंबेडकर.

खरंच बुद्धाच्या सगळ्याच बोधकथा छान आहेत. आवडली. अशीच एक गोष्ट म. गांधींची पण आहे बहुतेक. लहानपणी शाळेत एक धडा होता आम्हाला. एकदा त्यांना एक अतिशय शिव्या देणारे पत्र येते. ते त्या पत्राला लावलेली टाचणी काढून घेतात आणि बाकीचे पत्र परत त्या पाठवणारर्‍या व्यक्तिलाच पाठवून देतात. सोबत एक ओळ लिहितात, "तुम्ही जे पाठवले त्यातले मला जे उपयोगी होते तेवढे मी ठेवून घेतले, ज्याचा मला उपयोग नाही ते मी परत पाठवत आहे." बिपिन.

प्राजु 27/01/2008 - 09:28
कोणी एक स्वामी असेच शांत असत . प्रसन्न असत. राग त्याना माहितीच नव्हता. एकदा काही लोकांनी त्यांची फजिती करायचे ठरवले. स्वामी स्नान आटोपून नदीतून बाहेर येताना पाहून त्यातील काही लोकांनी पान खाऊन त्यांच्या अंगावर पिंक थुंकली. ते स्वामी पुन्हा नदीत गेले आणि स्नान करून बाहेर आले. पुन्हा तसेच झाले. असेच ५-६ वेळा झाले. पण ते स्वामी काहीही न बोलता नदीतून पुन्हा पुन्हा स्नान करून बाहेर येत होते. शेवटी त्या लोकांनी स्वामींना विचारले, "आम्ही इतक्या वेळेला ही घाण आपल्या अंगावर थुंकली, तुम्हाला राग नाही का आला?" स्वामी म्हणाले, "घाण? पण ही तर काही वेळापूर्वी तुमच्या तोंडात होती.. तुम्ही घाण खाता का?" ते लोक काय समजायचे ते समजले आणि स्वामींची माफी मागून खाली मान घालून निघून गेले. लहानपणी बाबांनी सांगितली होती ही गोष्ट. - (गोष्टीत रमणारी) प्राजु

In reply to by प्राजु

लिखाळ 21/11/2008 - 20:07
बहुधा एकनांथाच्या जीवनातील प्रसंग आहे. ते म्हणतात की चला या योगे मला १०८ वेळा स्नान घडले.. असे काहीतरी.. -- लिखाळ.

आजानुकर्ण 21/11/2008 - 19:49
डांबीसपंत, नाक पुसून कथा वाचली. बोधकथा फार आवडली. आम्हालाही कोणी सहजपणे शिव्या घातल्या तर आम्ही त्या स्वतःकडे घेत नाही. त्या त्यांच्याकडेच राहतात. आपला, (बुद्धम् शरणम् गच्छामि) आजानुकर्ण

लिखाळ 21/11/2008 - 20:06
देणार्‍यांची तोंडे हजारो.. माझ्याकडे आरसा :) कथा छान आहे.. आवडली.. याचसारखी एक कथा (बहुधा ओशोंच्या पुस्तकात) वाचली होती. एका साधूला एक मनुष्य शिवी देतो. त्यावर तो साधू त्याला आशिर्वाद देतो त्यावर तो साधू त्याला आशिर्वाद देतो. माणूस चमकतो.. साधू म्हणतो 'तुझ्याकडे जे देण्यासारखे होते ते तू दिलेस.. माझ्याकडे जे देण्यासारखे होते ते मी दिले '. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

आजानुकर्ण 21/11/2008 - 20:19
साधू म्हणतो 'तुझ्याकडे जे देण्यासारखे होते ते तू दिलेस.. माझ्याकडे जे देण्यासारखे होते ते मी दिले '.
मस्त!!! आपला, (साधू) ओशो आजानुकर्ण

सुनील 21/11/2008 - 20:16
हम्म. वाचायला छान पण आचरणात आणायला कठीण आहे बॉ. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कपिल काळे 21/11/2008 - 20:18
सध्याच्या तंग वातावरणात सर्वांनी हे आचरणात आणावे . http://kalekapil.blogspot.com/

In reply to by कपिल काळे

लिखाळ 21/11/2008 - 20:23
सर्वांनी? अहो कुणी एकाने शिव्या दिल्या तर दुसर्‍याला शिकवण आचरणात आणण्याची संधी मिळणार ना ! त्यामुळे जो शिव्या देईल तो समोरच्याला बुद्धाची शिकवण आचरण्याची संधी देत आहे असे समजावे. कुणी आपणहून समाजसेवा करत असेल तर करु द्यावी :) (हघ्याहेसांनलगे) -- लिखाळ.

In reply to by कपिल काळे

अभिज्ञ 21/11/2008 - 21:01
डांबिसि बोधकथा आवडली. अभिनंदन. असो, अभिज्ञ. अवांतर (फाटे)-सध्याचे तंग वातावरण? असे अचानक काय घडले आहे कि वातावरण तंग व्हावे? कपिलदादा तुम्ही बुवा फारच लोड घेताय असे दिसते. ;) नवीन सदस्यांकरिता इतिहासाची उठाठेव खरच गरजेची आहे असे नमुद करावेसे वाटते.

In reply to by अभिज्ञ

सर्किट 23/11/2008 - 06:08
नवीन सदस्यांकरिता इतिहासाची उठाठेव खरच गरजेची आहे असे नमुद करावेसे वाटते. अभिज्ञशी सहमत आहे... -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

शितल 21/11/2008 - 20:19
कथा माहित होती, आणि त्या कथे नुसार वागण्याचा प्रयत्न तरी नक्की करेन. :) आता पर्यत अधे मध्ये तो प्रयत्न डळमळायचा, पण जाणिव पुर्वक तो न डळमळण्याचा प्रयत्न करेन. :)

टवाळचिखलू 21/11/2008 - 20:21
मस्तच. मीही ही युक्ती वापरुन पाहीन. - (बॉस या व्यक्तीपासुन वैतागलेला) चिखलू

कोलबेर 21/11/2008 - 21:07
एका किराणा मालाच्या दुकानात रोज एक गिर्‍हाइक तिथल्या शेठजीला अर्वाच्य शिव्या देउन जात असतो. ह्यावर एकदा न राहवुन तिथला पोर्‍या शेठजीला विचारतो, 'आपको गुस्सा नही आता क्या?' ह्यावर शेठजी थंडपणे उत्तर देतो ' कुछ देकेही जा रहा है ना? कुछ लेके तो नही ना जा रहा..फिर ठीक है! " (बनिया) कोलबेर

In reply to by कोलबेर

सर्किट 23/11/2008 - 06:10
कोलबेरा, हल्ली आपले शेठजीही असेच काहीसे थंडसे झालेले आहेत, असे फक्त मलाच वाटते आहे, की तुलाही ?? (मार्केट धबाधबा पडल्याने तशी बरीच देवमाणसे सध्या थंड झाली आहेत रे !) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

टारझन 21/11/2008 - 21:07
आहो डांबिषकाका ... हे असले प्रकार काय जमणार णाही , हो शिव्यांची उत्तरं तितक्याच घाण शिव्याणी णाही देणार ... मी माझ्याच शारिरीक भाषेत उत्तर देईल ... बुद्द , गांधी , किंवा संत हे भूतकाळ आहेत .. तेंव्हाच्या गोष्टी आता चालतील असं पटत नाही. चुकी असेल तर शिव्या खाण्याचा संयम अंगी आहे, पण कोणी विणाकारण णडला तर फोडण्याशिवाय पर्याय आम्हाला णाही. महाभारतात आम्हाला युधिष्ठीरापेक्षा भिमार्जून आवडले. कारण त्या बैल युधिष्ठीरामुळेच महायुद्ध झालं,नको ते फंडे लाउन दुर्योधनाला सुधारण्याचा मुर्खपणा केला. आजकाल दुर्योधनांची संख्या जास्त आहे . (आडव्या डोक्याचा) टारझन उभे

In reply to by टारझन

हे असले प्रकार काय जमणार णाही , हो शिव्यांची उत्तरं तितक्याच घाण शिव्याणी णाही देणार ... मी माझ्याच शारिरीक भाषेत उत्तर देईल ... बुद्द , गांधी , किंवा संत हे भूतकाळ आहेत ...... टारू, म्हणूनच प्लास्टिक सर्जरीची गरज पडते. बाकी बोधकथा आवडली/ल्या. अदिती (टारूबाळाची आज्जी)

वेताळ 21/11/2008 - 22:41
आता कोण विनाकारण शिव्या देत असेल तर त्याला कृतीतुन उत्तर देण्याचा जमाना आहे. कथा छान आहे. आजकाल रागावर नियंत्रण राहणे खुप कठिण आहे. पण पिडांकाका तुमचा सल्ला लक्षात नक्की ठेऊ. वेताळ

तुम्हा मिपाकर मित्रांची पण कमाल आहे राव!!! मी ही कथा लिहिली होती जानेवारी मध्ये... तुम्ही अभिप्राय देताय नोव्हेंबर मध्ये..... नाय म्हणजे इतके महिने काय कथेवर चिंतन-मनन करत होता काय? ही तर खुद्द गौतम बुद्धाच्या वरताण झाली की!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

अभिज्ञ 22/11/2008 - 01:03
काका, तुम्ही म्हणता ते खरे आहे, पण माझ्या वाचनातून हि कथा खरच मिस झाली होती. अभिज्ञ.

यशोधरा 22/11/2008 - 00:09
तुम्ही उदाहरणच असा दणदणीत दिल्यात मां काका, मगे काय करतीत मिपाकर तरी?? :)

मनीषा 22/11/2008 - 05:50
(मी आजच वाचली) खरोखर बोध घेण्या सारखी .. या कथेत सांगीतल्या प्रमाणे वागणे जमले तर सगळेच बुद्ध होतील. पण तसे होत नाही म्हणून इतकी वर्ष झाली तरी दूसरा बुद्ध झाला नाही .

In reply to by मनीषा

कोण म्हणतो दुसरा बुद्ध झाला नाही? एकदा सदर्न कॅलिफोर्नियात चक्कर मारा..... दुसरा बुद्ध दाखवतो!!!! :) आणि जर स्वतःबरोबर शिवास रीगल घेऊन आलांत तर.... बुद्ध, पैगंबर, श्रीकृष्ण, सगळे दाखवतो....... :)

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट 22/11/2008 - 09:14
आणि जर स्वतःबरोबर शिवास रीगल घेऊन आलांत तर.... बुद्ध, पैगंबर, श्रीकृष्ण, सगळे दाखवतो....... मस्त !!!! मी मात्र महावीर... -- (बाहुबली) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मी मात्र महावीर... -- (बाहुबली) सर्किट होय रे होय!!!! तो दिगंबर महावीर मात्र तूच!!!:) ती "जालनागडा" (संदर्भः मिसळप्रेमी!) ही पदवी काय उगाचच मिळाली काय तुला?:) कासोटा घट्ट आवळलेला, पिडां

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 23/11/2008 - 02:13
असे हे आधुनिक बुद्ध आणि महावीर बघून मी मात्र हतबुद्ध झालोय खरा!! ;) (खुद के साथ बातां : रंगा, आता तू ही शंकराचार्य बनणे सुरु कर बाबा!! ;) ) चतुरंग

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट 23/11/2008 - 06:13
Namo ariha.ntaaNaM Namo siddhaaNaM Namo aayariyaaNaM Namo uvajjhaayaaNaM Namo loe savvasaahuNaM eso pa.ncha Namokaaro savva paavapaNaasaNo ma.ngalaaNaM cha savvesim paDhamaM hava{ii} ma.ngalaM -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

जैनाचं कार्ट 23/11/2008 - 09:02
क्या बात है ! आमच्या खानदानात एकुलता एक मी ज्यानं याची देही.. याची डोळी.... विदेशी भाषा मध्ये नमोकार मत्रं वाचला =)) धन्य हो प्रभु सर्किट ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ

In reply to by मनीषा

ती शिवास रिगल कि काय ... ती कुठे मिळते? आरारारं! तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला इकती शिंपल गोष्ट म्हायती नाय? सांगतो.... मध्य रेल्वेची लोकलगाडी पकडून ठाण्याला उतरायचं.... तिथे अभ्यंकरभटजी कुठे रहातात म्हणून विचारायचं...... त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे "उसाचा रस" मागायचा...... आणि ते फडताळात लपवलेली (त्यांच्या मातोश्री लय कडक आहेत!!!!) बाटली देतील ती घेऊन तडक आमच्याकडे यायचं!!!! :) पुजे साठी आणखी काय काय साहित्य लागते? आणखी बर्फ लागतो. पण तो आम्ही देवस्थानातर्फे मोफत पुरवतो.... :)

अनामिका 23/11/2008 - 00:15
तुमची बोधकथा आवडली पण हे करता आल तर बर्‍याच अंशी आमच देखिल आयुष्य सुसह्य होईल. प्रयत्न करुन बघु एकदा जमतय का ते? कठीण दिसतय पण????????? "अनामिका"

इनोबा म्हणे 26/01/2008 - 11:27
वाह!खरे आहे. मन शांत ठेवायचे तर असले प्रयोग करायला हरकत नाही. पण फक्त शिव्याशापापुरते... आपल्याला कोणी हात लावल्यावर मात्र हा विचार डोक्यात येत नाही,त्यावेळी डोक्यात असते ते फक्त आपला हात आणि मारणार्‍याचे थोबाड. भगवान गौतम बुद्धांनी सांगीतलेले एक वाक्य आठवते;ते म्हणाले होते "स्वतःला जिंकणारा हा विश्वविजेत्यापेक्षा मोठा विजेता असतो". (बुद्धं शरणं गच्छामी) -इनोबा

विसोबा खेचर 26/01/2008 - 11:37
मला याचा स्वानुभव आलेला आहे म्हणून हे मी सर्वांसाठी शेअर करीत आहे. थोडे दिवस उपयोग करुन पहा व मला तुमचा अनुभव कळवा. शाब्बास रे माझ्या गौतमा! :) पाहू पाहू, आम्हीही हा अनुभव घेऊन पाहू... बाय द वे, बोधकथेची ष्टोरी आवडली बरं का रे पिवळ्या डांबिसा... आपला, तात्या आंबेडकर.

खरंच बुद्धाच्या सगळ्याच बोधकथा छान आहेत. आवडली. अशीच एक गोष्ट म. गांधींची पण आहे बहुतेक. लहानपणी शाळेत एक धडा होता आम्हाला. एकदा त्यांना एक अतिशय शिव्या देणारे पत्र येते. ते त्या पत्राला लावलेली टाचणी काढून घेतात आणि बाकीचे पत्र परत त्या पाठवणारर्‍या व्यक्तिलाच पाठवून देतात. सोबत एक ओळ लिहितात, "तुम्ही जे पाठवले त्यातले मला जे उपयोगी होते तेवढे मी ठेवून घेतले, ज्याचा मला उपयोग नाही ते मी परत पाठवत आहे." बिपिन.

प्राजु 27/01/2008 - 09:28
कोणी एक स्वामी असेच शांत असत . प्रसन्न असत. राग त्याना माहितीच नव्हता. एकदा काही लोकांनी त्यांची फजिती करायचे ठरवले. स्वामी स्नान आटोपून नदीतून बाहेर येताना पाहून त्यातील काही लोकांनी पान खाऊन त्यांच्या अंगावर पिंक थुंकली. ते स्वामी पुन्हा नदीत गेले आणि स्नान करून बाहेर आले. पुन्हा तसेच झाले. असेच ५-६ वेळा झाले. पण ते स्वामी काहीही न बोलता नदीतून पुन्हा पुन्हा स्नान करून बाहेर येत होते. शेवटी त्या लोकांनी स्वामींना विचारले, "आम्ही इतक्या वेळेला ही घाण आपल्या अंगावर थुंकली, तुम्हाला राग नाही का आला?" स्वामी म्हणाले, "घाण? पण ही तर काही वेळापूर्वी तुमच्या तोंडात होती.. तुम्ही घाण खाता का?" ते लोक काय समजायचे ते समजले आणि स्वामींची माफी मागून खाली मान घालून निघून गेले. लहानपणी बाबांनी सांगितली होती ही गोष्ट. - (गोष्टीत रमणारी) प्राजु

In reply to by प्राजु

लिखाळ 21/11/2008 - 20:07
बहुधा एकनांथाच्या जीवनातील प्रसंग आहे. ते म्हणतात की चला या योगे मला १०८ वेळा स्नान घडले.. असे काहीतरी.. -- लिखाळ.

आजानुकर्ण 21/11/2008 - 19:49
डांबीसपंत, नाक पुसून कथा वाचली. बोधकथा फार आवडली. आम्हालाही कोणी सहजपणे शिव्या घातल्या तर आम्ही त्या स्वतःकडे घेत नाही. त्या त्यांच्याकडेच राहतात. आपला, (बुद्धम् शरणम् गच्छामि) आजानुकर्ण

लिखाळ 21/11/2008 - 20:06
देणार्‍यांची तोंडे हजारो.. माझ्याकडे आरसा :) कथा छान आहे.. आवडली.. याचसारखी एक कथा (बहुधा ओशोंच्या पुस्तकात) वाचली होती. एका साधूला एक मनुष्य शिवी देतो. त्यावर तो साधू त्याला आशिर्वाद देतो त्यावर तो साधू त्याला आशिर्वाद देतो. माणूस चमकतो.. साधू म्हणतो 'तुझ्याकडे जे देण्यासारखे होते ते तू दिलेस.. माझ्याकडे जे देण्यासारखे होते ते मी दिले '. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

आजानुकर्ण 21/11/2008 - 20:19
साधू म्हणतो 'तुझ्याकडे जे देण्यासारखे होते ते तू दिलेस.. माझ्याकडे जे देण्यासारखे होते ते मी दिले '.
मस्त!!! आपला, (साधू) ओशो आजानुकर्ण

सुनील 21/11/2008 - 20:16
हम्म. वाचायला छान पण आचरणात आणायला कठीण आहे बॉ. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कपिल काळे 21/11/2008 - 20:18
सध्याच्या तंग वातावरणात सर्वांनी हे आचरणात आणावे . http://kalekapil.blogspot.com/

In reply to by कपिल काळे

लिखाळ 21/11/2008 - 20:23
सर्वांनी? अहो कुणी एकाने शिव्या दिल्या तर दुसर्‍याला शिकवण आचरणात आणण्याची संधी मिळणार ना ! त्यामुळे जो शिव्या देईल तो समोरच्याला बुद्धाची शिकवण आचरण्याची संधी देत आहे असे समजावे. कुणी आपणहून समाजसेवा करत असेल तर करु द्यावी :) (हघ्याहेसांनलगे) -- लिखाळ.

In reply to by कपिल काळे

अभिज्ञ 21/11/2008 - 21:01
डांबिसि बोधकथा आवडली. अभिनंदन. असो, अभिज्ञ. अवांतर (फाटे)-सध्याचे तंग वातावरण? असे अचानक काय घडले आहे कि वातावरण तंग व्हावे? कपिलदादा तुम्ही बुवा फारच लोड घेताय असे दिसते. ;) नवीन सदस्यांकरिता इतिहासाची उठाठेव खरच गरजेची आहे असे नमुद करावेसे वाटते.

In reply to by अभिज्ञ

सर्किट 23/11/2008 - 06:08
नवीन सदस्यांकरिता इतिहासाची उठाठेव खरच गरजेची आहे असे नमुद करावेसे वाटते. अभिज्ञशी सहमत आहे... -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

शितल 21/11/2008 - 20:19
कथा माहित होती, आणि त्या कथे नुसार वागण्याचा प्रयत्न तरी नक्की करेन. :) आता पर्यत अधे मध्ये तो प्रयत्न डळमळायचा, पण जाणिव पुर्वक तो न डळमळण्याचा प्रयत्न करेन. :)

टवाळचिखलू 21/11/2008 - 20:21
मस्तच. मीही ही युक्ती वापरुन पाहीन. - (बॉस या व्यक्तीपासुन वैतागलेला) चिखलू

कोलबेर 21/11/2008 - 21:07
एका किराणा मालाच्या दुकानात रोज एक गिर्‍हाइक तिथल्या शेठजीला अर्वाच्य शिव्या देउन जात असतो. ह्यावर एकदा न राहवुन तिथला पोर्‍या शेठजीला विचारतो, 'आपको गुस्सा नही आता क्या?' ह्यावर शेठजी थंडपणे उत्तर देतो ' कुछ देकेही जा रहा है ना? कुछ लेके तो नही ना जा रहा..फिर ठीक है! " (बनिया) कोलबेर

In reply to by कोलबेर

सर्किट 23/11/2008 - 06:10
कोलबेरा, हल्ली आपले शेठजीही असेच काहीसे थंडसे झालेले आहेत, असे फक्त मलाच वाटते आहे, की तुलाही ?? (मार्केट धबाधबा पडल्याने तशी बरीच देवमाणसे सध्या थंड झाली आहेत रे !) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

टारझन 21/11/2008 - 21:07
आहो डांबिषकाका ... हे असले प्रकार काय जमणार णाही , हो शिव्यांची उत्तरं तितक्याच घाण शिव्याणी णाही देणार ... मी माझ्याच शारिरीक भाषेत उत्तर देईल ... बुद्द , गांधी , किंवा संत हे भूतकाळ आहेत .. तेंव्हाच्या गोष्टी आता चालतील असं पटत नाही. चुकी असेल तर शिव्या खाण्याचा संयम अंगी आहे, पण कोणी विणाकारण णडला तर फोडण्याशिवाय पर्याय आम्हाला णाही. महाभारतात आम्हाला युधिष्ठीरापेक्षा भिमार्जून आवडले. कारण त्या बैल युधिष्ठीरामुळेच महायुद्ध झालं,नको ते फंडे लाउन दुर्योधनाला सुधारण्याचा मुर्खपणा केला. आजकाल दुर्योधनांची संख्या जास्त आहे . (आडव्या डोक्याचा) टारझन उभे

In reply to by टारझन

हे असले प्रकार काय जमणार णाही , हो शिव्यांची उत्तरं तितक्याच घाण शिव्याणी णाही देणार ... मी माझ्याच शारिरीक भाषेत उत्तर देईल ... बुद्द , गांधी , किंवा संत हे भूतकाळ आहेत ...... टारू, म्हणूनच प्लास्टिक सर्जरीची गरज पडते. बाकी बोधकथा आवडली/ल्या. अदिती (टारूबाळाची आज्जी)

वेताळ 21/11/2008 - 22:41
आता कोण विनाकारण शिव्या देत असेल तर त्याला कृतीतुन उत्तर देण्याचा जमाना आहे. कथा छान आहे. आजकाल रागावर नियंत्रण राहणे खुप कठिण आहे. पण पिडांकाका तुमचा सल्ला लक्षात नक्की ठेऊ. वेताळ

तुम्हा मिपाकर मित्रांची पण कमाल आहे राव!!! मी ही कथा लिहिली होती जानेवारी मध्ये... तुम्ही अभिप्राय देताय नोव्हेंबर मध्ये..... नाय म्हणजे इतके महिने काय कथेवर चिंतन-मनन करत होता काय? ही तर खुद्द गौतम बुद्धाच्या वरताण झाली की!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

अभिज्ञ 22/11/2008 - 01:03
काका, तुम्ही म्हणता ते खरे आहे, पण माझ्या वाचनातून हि कथा खरच मिस झाली होती. अभिज्ञ.

यशोधरा 22/11/2008 - 00:09
तुम्ही उदाहरणच असा दणदणीत दिल्यात मां काका, मगे काय करतीत मिपाकर तरी?? :)

मनीषा 22/11/2008 - 05:50
(मी आजच वाचली) खरोखर बोध घेण्या सारखी .. या कथेत सांगीतल्या प्रमाणे वागणे जमले तर सगळेच बुद्ध होतील. पण तसे होत नाही म्हणून इतकी वर्ष झाली तरी दूसरा बुद्ध झाला नाही .

In reply to by मनीषा

कोण म्हणतो दुसरा बुद्ध झाला नाही? एकदा सदर्न कॅलिफोर्नियात चक्कर मारा..... दुसरा बुद्ध दाखवतो!!!! :) आणि जर स्वतःबरोबर शिवास रीगल घेऊन आलांत तर.... बुद्ध, पैगंबर, श्रीकृष्ण, सगळे दाखवतो....... :)

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट 22/11/2008 - 09:14
आणि जर स्वतःबरोबर शिवास रीगल घेऊन आलांत तर.... बुद्ध, पैगंबर, श्रीकृष्ण, सगळे दाखवतो....... मस्त !!!! मी मात्र महावीर... -- (बाहुबली) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मी मात्र महावीर... -- (बाहुबली) सर्किट होय रे होय!!!! तो दिगंबर महावीर मात्र तूच!!!:) ती "जालनागडा" (संदर्भः मिसळप्रेमी!) ही पदवी काय उगाचच मिळाली काय तुला?:) कासोटा घट्ट आवळलेला, पिडां

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 23/11/2008 - 02:13
असे हे आधुनिक बुद्ध आणि महावीर बघून मी मात्र हतबुद्ध झालोय खरा!! ;) (खुद के साथ बातां : रंगा, आता तू ही शंकराचार्य बनणे सुरु कर बाबा!! ;) ) चतुरंग

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट 23/11/2008 - 06:13
Namo ariha.ntaaNaM Namo siddhaaNaM Namo aayariyaaNaM Namo uvajjhaayaaNaM Namo loe savvasaahuNaM eso pa.ncha Namokaaro savva paavapaNaasaNo ma.ngalaaNaM cha savvesim paDhamaM hava{ii} ma.ngalaM -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

जैनाचं कार्ट 23/11/2008 - 09:02
क्या बात है ! आमच्या खानदानात एकुलता एक मी ज्यानं याची देही.. याची डोळी.... विदेशी भाषा मध्ये नमोकार मत्रं वाचला =)) धन्य हो प्रभु सर्किट ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ

In reply to by मनीषा

ती शिवास रिगल कि काय ... ती कुठे मिळते? आरारारं! तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला इकती शिंपल गोष्ट म्हायती नाय? सांगतो.... मध्य रेल्वेची लोकलगाडी पकडून ठाण्याला उतरायचं.... तिथे अभ्यंकरभटजी कुठे रहातात म्हणून विचारायचं...... त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे "उसाचा रस" मागायचा...... आणि ते फडताळात लपवलेली (त्यांच्या मातोश्री लय कडक आहेत!!!!) बाटली देतील ती घेऊन तडक आमच्याकडे यायचं!!!! :) पुजे साठी आणखी काय काय साहित्य लागते? आणखी बर्फ लागतो. पण तो आम्ही देवस्थानातर्फे मोफत पुरवतो.... :)

अनामिका 23/11/2008 - 00:15
तुमची बोधकथा आवडली पण हे करता आल तर बर्‍याच अंशी आमच देखिल आयुष्य सुसह्य होईल. प्रयत्न करुन बघु एकदा जमतय का ते? कठीण दिसतय पण????????? "अनामिका"
गौतम बुद्धांची एक कथा. बुद्ध हे मनोविजयी होते हे सर्वज्ञात आहे. ते नेहमी शांत, सस्मित, आणि प्रसन्न असत. त्यांच्या सहवासात येणारया लोकांनाही या प्रसन्नतेचा लाभ होत असे. पण काही लोक असेही होते की त्यांना गौतमांना मिळणारा सन्मान सहन होत नसे. त्यांचा अगदी जळफळाट होत असे. असाच एक माणूस एकदा गौतमांना रागवावयास भाग पाडायचेच, त्यांचा अपमान करायचाच, फजिती करायचीच असे ठरवून त्यांच्या प्रवचनाच्या ठिकाणी आला. प्रचंड जनसमुदाय जमला होता. तथागत शांतपणे त्या समुदायाला मार्गदर्शन करत होते. तेंव्हा हा माणूस तेथे पोचला आणि सर्वांसमोर त्याने गौतमांना न भूतो न भविष्यति अश्या शिव्या दिल्या.

कादंबरी "शाळा " ...लेखक .. मिलिंद बोकील

भडकमकर मास्तर ·

प्राजु 25/01/2008 - 18:20
परिक्षण वाचून मलाही आमच्या शाळेची आठवण झाली. पण कादंबरीची ही खूपच थोडी ओळख इथे दिली आहे आपण. नुसती शाळा कशी होती आणि त्या शाळेशी मुलाचा संबंध इतकाच विषय आहे की , त्यात त्या मुलाची कथाही आहे? बाकीचा पात्र परिचय थोडा आला असता तर आणखी उत्सुकता वाढली असती. असो.. भारतात आल्यावर मिळाली वाचायला तर बघू.. - प्राजु.

छोटा डॉन 25/01/2008 - 20:23
काय झकास व थोडक्यात परिक्षण लिहले आहे राव तुम्ही... मान गये ऊस्ताद ............. आम्ही पण बरेच महिने झाले हे पूस्तक वाचण्याची मनिषा बाळगून आहोत, पण अजून योग जमला नाही... बरेच ऐकले आहे पूस्तकाविषयी, पण आज तुमचा लेख वाचून पूस्तक वाचण्याच्या ईच्छेला पून्हा एकदा "किल्ली दिली" गेली.... पूण्यात असताना हे पूस्तक कधी वाचयला मिळालेच नाही. आता पूण्यापासून दूर एकही मराथी शब्द न बोलला न जाणार्‍या भागात तर मिळण्याची आशाच सोडा... हे पूस्तक "ऑनलाईन" विकायला असल्याची कोणास माहिती असल्यास संपर्क साधावा .....

In reply to by छोटा डॉन

माझी दुनिया 01/02/2009 - 15:20
हे पूस्तक "ऑनलाईन" विकायला असल्याची कोणास माहिती असल्यास संपर्क साधावा
'पंकज कुरूलकरां'च्या ग्रंथायन ला विचारा की राव ! :)] माझी दुनिया

ओळख थोडी आहे हे खरंच्...फक्त "किती विस्ताराने सांगितल्यावर रसभंग होणार नाही!" याचा अंदाज घेत लिहिले इतकेच.... गोष्ट मुकुंद जोशी या मुलाचीच आहे, त्याच्या ग्रुपची आहे,त्याला आवडणार्‍या मुलीला पटवण्यासाठी , तिला इम्प्रेस करण्यासाठी (साधारणपणे नववीचे वर्ष सुरू झाल्यापासून नववीचा रिझल्ट लागेपर्यंत ) त्याने केलेल्या नाना खटपटी लटपटी यांची आहे.... ..........जोशा चाळीत राहतो.....त्याला कॉलेजात जाणारी बहीण आहे, शिक्षण खात्यात नोकरी करणारे बाबा आहेत...आई आहे, तिला तो वर्णनात आईसाहेब म्हणतो...आणि त्याचा एक नरूमामा आहे, ( वयाने तरूण आणि मित्रासारखा) तो कॉलेजात इंग्रजी शिकवतो आणि "प्रेमात पडणार्‍यांनी कसे वागले पाहिजे , काय टाळले पाहिजे" याविषयी त्याला सल्ले देतो... .......................शाळेतल्या मास्तरांची मास्तरणींची तर अप्रतिम शब्दचित्रे आहेत...."प्रिंसिपल च्या खोलीचे वर्णन आमच्या शाळेतल्यासारखेच कसे काय ?" असे वाटावे इतके तंतोतंत जुळले.... ....सहज एक विचार आला की ( प्रकाश ना. संतांचा ) लंपन (वनवास, शारदासंगीत, झुंबर,पंखा) मोठा झाला की या मुकुंद जोशासारखाच होईल....सज्जन, सुसंस्कारी फ़क्त त्याला मोठं करून प्रेमात पाडायचे...

In reply to by भडकमकर मास्तर

....सहज एक विचार आला की ( प्रकाश ना. संतांचा ) लंपन (वनवास, शारदासंगीत, झुंबर,पंखा) मोठा झाला की या मुकुंद जोशासारखाच होईल.... आता तो मोठा होईल? :-(

सुनील 25/01/2008 - 23:53
पुस्ताकाचे प्रकाशक, पृष्ठांची संख्या, किंमत तसेच उपलब्धता यावरही काही सांगा. परीक्षण उत्कंठावर्धक आहे. आम्ही लाईन देणे ऐवजी लाईन मारणे असा शब्द्प्रयोग वापरीत असू! (भरपूर लायनी मारलेला) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

एक 26/01/2008 - 00:04
"..आम्ही लाईन देणे ऐवजी लाईन मारणे असा शब्द्प्रयोग वापरीत असू!..." दोन्ही क्रियापदं बरोबर आहेत. पण त्यांचे कर्ते वेगळे आहेत ;-) मुले लाईन मारतात (नेहमीच) मुली लाईन देतात (फार फार दुर्मिळ प्रकार :-()

पुस्तक उपलब्ध होण्यासाठी हा दुवा मदत करेल काय पाहावे... http://kharedi.maayboli.com/shop/product.php?printable=Y&productid=16280&cat=266&page=1 ....पुस्तक ३०० पानी आहे, किंमत २०० रू. ; मला वाटते मॆजेस्टिक प्रकाशन असावे... ____________________________________________ ___________________________________________ त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.............. ___________________________________________

धन्यवाद प्प्राजु,छोटा डॊन आणि सुनिल आणि एक.. ______________________________ आणखी एक सांगायचे राहिले, की मुलींनी मुलांशी अजिबात म्हणजे अजिबातच बोलायचे नसे त्या काळातल्या शाळेतल्या या घटना आहेत.... ज्या वाचकाला हे समजून घेणे अवघड जाईल ( सद्ध्या असले काही नसते म्हणे, माझा एक तरूण मित्र सांगतो की त्याच्या इंग्रजी शाळेत प्रत्येक मुलाला नियमाप्रमाणे एका मुलीच्या शेजारीच बसावे लागे, इच्छा असो वा नसो...) असा वाचक "जोशा आवडत्या मुलीशी एखादे वाक्य बोलता यावे म्हणून एवढ्या खटपटी करतो " त्या कशा समजून घेईल ??असे मला वाटते...

वाटाड्या... 26/01/2008 - 00:32
हेवा वाटतो तुमच्या सगळ्यांचा...आमच्या शाळेत पोरिच नव्हत्या..

In reply to by वाटाड्या...

शुचि 02/03/2010 - 03:18
आमच्या शाळेत मुलंच नव्हती. दातार क्लासला मला एक लाल चुटूक स्वेटर घलणारा गोरापान , वर्गातील सर्वात हुशार मुलगा आवडायचा. वर्गात प्रश्न विचार्ला की याचा हात वर असायचा नेहेमी. नंतर आता आम्ही एकमेकांचे बर्‍यापैकी म्हणजे ओके ओके मित्र आहोत. पण तो त्याच्या संसारात , मी माझ्या. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मिलिंद बोकिलांचे वैचारिक लेख असलेले एक पुस्तक अलिकडेच प्रसिध्द झाले. त्याचे नाव "समुद्रापारचे समाज". ...उदकाचिया आर्ती आणि झेन गार्डन पण त्यांचे खूप चांगले कथासंग्रह आहेत

नुकतेच 'शाळा' वाचून संपवले. (मास्तरांचे परीक्षण वाचून ह्या भारतवारीतून ते घेऊनच आले होते.) शाळेच्या दिवसांची आठवण करून देणारे पुस्तक आहे. एका कुमारवयीन मुलाचे भावविश्व वाचताना काळाची पाने पलटून कधी मागे जातात ते समजतच नाही.. आणखी एक सांगायचे राहिले, की मुलींनी मुलांशी अजिबात म्हणजे अजिबातच बोलायचे नसे त्या काळातल्या शाळेतल्या या घटना आहेत.... अगदी .. पुस्तक ३०० पानी आहे, किंमत २०० रू. ; मला वाटते मॆजेस्टिक प्रकाशन असावे... मौज प्रकाशन स्वाती

सुचेल तसं 22/08/2008 - 16:58
मास्तर, चांगल्या विषयाला हात घातलात तुम्ही. माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे "शाळा". शेवट तर एकदम चटका लावणारा आहे. ("आणि उरतं दहावी नावाचं भयाण वर्ष" असं काहीतरी शेवटचं वाक्य आहे.) नववी-दहावीतल्या मुलाच्या भावविश्वाचे फार सुंदर वर्णन आहे. त्या वयातलं त्याला आणि त्याच्या मित्रांना वाटणारं मुलींबद्दलचं आकर्षण, प्रत्येकाला आवडणारी एक मुलगी . मग शाळेच्या अलिकडल्या एका बांधकाम चालू असलेल्या घरातून जेव्हा "ती" शाळेत जायची तेव्हा तिला पहायचं. शब्दप्रयोग तर केवळ अप्रतिम "इचिभना", "आंबे पाडले पाहिजेत", इत्यादि. http://sucheltas.blogspot.com

मास्तर ... माझ्या एकदम आवडत्या पुस्तकाचा विषय काढलात ... धन्स :) ---------------- शाळा वाचल्यानंतर असं जाणवलं की नकळत मराठीमधे एक ट्रायोलॉजीसारखा प्रकार झाला आहे. तीन वेगवेगळ्या दशकांत, तीन वेगवेगळ्या लेखक...पण तीनही पुस्तके मस्त आहेत. जिज्ञासूंसाठी अधिक माहिती --- 'कोसला' -- भालचंद्र नेमाडे 'दुनियादारी' -- सुहास शिरवळकर 'शाळा' - मिलिंद बोकील

In reply to by संदीप चित्रे

मुक्तसुनीत 22/08/2008 - 18:54
कोसला हे स्वतंत्र पुस्तक. कोसलाचा नायक : पांडुरंग सांगवीकर. ट्रिलॉजी ची पुस्तके : झूल जरीला बिढार नायक : चांगदेव पाटील

In reply to by संदीप चित्रे

कोसला +२१९८७८२७८२७४८३४ कोसला जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा तेव्हा पांडुरंग सांगवीकर मला अस्वस्थ करुन जातो. दर वेळी त्या पुस्तकाचा एक नवाचं अर्थ लागत जातो.

शितल 22/08/2008 - 18:57
पुस्तक परिक्षण आवडले. संदीप तु़झ्याकडे आहे ना मग ते पुस्तक आणि अजुन जी तु़झ्याकडे असतील ती मी आमच्या घरी आणण्याची व्यवस्थित व्यवस्था करीन. ;) शाळा हा विषयच सर्वाच्या जिव्हाळ्याचा असतो.

मास्तर, मस्त झालंय परीक्षण. पण जरा लहान झालंय. शिवाय बोकिलांच्या बाकीच्या कथासंग्रहांवरपण लिहा ना. बाय दी वे, तुम्ही त्यांची 'एकम' ही दीर्घकथा / लघुकादंबरी वाचलीय का हो? कुणी वाचली असेल तर प्लीज आपलं मत सांगा. मला अजिबात नाही आवडलीय. बोकिलांच्या लौकिकाला अज्याबात साजेशी नाहीय.

अभिज्ञ 23/08/2008 - 01:28
"शाळा" कादंबरी अफलातुनच आहे.पौगंडा अवस्थेतील मुलांच्या भारलेल्या दिवंसाचे अतिशय वास्तविक चित्रण ह्या कादंबरीत जाणवले.वाचून तर चाटच पडलो. लेखकाने दाखवलेला काळ हा आणिबाणीतला आहे ,साधारण १९७५-१९७६ च्या आसपासचा. कादंबरितील वर्णने आमच्या वेळेसहि फिट बसतात. परिक्षण आवडले. अभिज्ञ. अवांतर : "शाळा" व "बाकि शुन्य" ची सुरुवातीची काहि पाने एकाच धाटणीची आहेत. आधि "शाळा" वाचले अन मग "बाकि शुन्य" वाचले. "शाळा" चा प्रभाव असेल का ते सांगता येत नाही परंतु "बाकि शुन्य" पहिल्या काहि पानातच "शुन्य" व "कृत्रिम" वाटू लागले. "बाकि शुन्य" हे थोडेसे "भडक" रंग वापरून रंगवलेले वाटले.

आपला अभिजित 24/08/2008 - 17:22
मला पण भन्नाट आवडली `शाळा.' एकतर माझी वाचन परंपरा फारच अफाट आहे. सलग आणि संपूर्ण वाचलेली अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी पुस्तकं आहेत माझी. `शाळा' उटी दौर्‍यात निलं होतं वाचायला. ट्रेनमध्येच वाचून पूर्ण केलं. `शाळा'तले बरेच धंदे आम्हीही शाळेत केलेत. त्यामुळे अगदी भावलं पुस्तक. अगदी पोरींवर लायनी मारणं, तिच्या लाइन देण्याविषयी चर्चा, सायकल फास्ट मारून केलेलं शायनिंग, बायांना वेगवेगळी नावं ठेवणं अगदी मनापासून केलं. पण शाळेला दांड्या बिंड्या नाही मारल्या. आठवणी खूप आहेत. एकदा वर्गात कुणीतरी खाजकुयली टाकली म्हणून अख्ख्या वर्गाला मैदानावर उभं केलं होतं. आम्ही टेक्निकलला ज्या दिवशी जायचो, नेमकी त्या दिवशी दुसर्‍या दिवसाच्या शाळेच्या वेळेत बदलाची नोटीस फिरवायचे. आमचे टेक्निकल शाळेबाहेर असल्याने आम्हाला तो निरोपच मिळायचा नाही. मग आम्ही निरोप कळला, तरी मुद्दाम नेहमीच्या वेळी शाळेत जायचो. या `बंडखोरी'बद्दल अनेकदा काळ्या यादीत पण जायचो. पण खुमखुमी जास्त होती. ही कादंबरी वाचून शाळेतले सगळे धंदे आठवले. धमाल आली! मी पण कादंबरीविषयी टॉपिक टाकणार होतो. पण मुहूर्त लागला नव्हता. भडकमकर मास्तरांचे अभिनंदन!

आज हा धागा परत वर आला. त्या मुळे अजून हे पुस्तक वाचायचे आहे अशी टोचणी परत लागली आहे. मास्तर छान ओळख करुन दिलीत. बिपिन.

मैत्र 08/10/2008 - 00:47
पुस्तक वाचलंच पाहिजे आता... शाळा आणि ते सातवी ते दहावीचे मस्त दिवस. आणि किमान बोकीलांच्या समान आडनावाला जागलं पाहिजे... मास्तर धन्यवाद...

विजुभाऊ 08/10/2008 - 11:11
आमच्या शाळेत कशी कोण जाणे पण एक विचित्र प्रथा होती दहावीतली मुले एकमेकाना वडीलांच्या नावाने हाक मारीत. आणि ऐकणारालाही ते सवयीचे झालेले असायचे. एकदा मी एका मित्राच्या घरी गेलो. त्याचे नाव सुधीर व त्याच्या वडीलांचे नाव मधुकर होते. त्या मित्राला आम्ही मधु म्हणुनच हाक मारायचो. तो ही ओ द्यायचा मी त्याच्या घरी गेलो आणि दारातुन हाक मारली मधु आहे का? कोण हवे विचारत त्याचे वडील बाहेर आले. मी पुन्हा विचारले की मधु आहे का ? त्यानी पुन्हा विचारले कोण हवे आहे म्हणुन मी पुन्हा तेच म्हणालो " मधु आहे का?" त्यानी माझ्याकडे पूर्ण पाहिले. कसला तरी मजेदार चेहेरा करुन ते म्हणाले मीच मधु ...तुला बहुतेक सुधीर हवा असेल. तो दहावीत आहे. एव्हाना तो मित्रही दारात आला होता. मला आणि सुधीरला दोघानाही रामायणात घडले होते तसे धरती दुभंगुन आपण त्यात गडप व्हावे असे झाले होते.

मास्तर तुम्हाला सान्गु इचितो कि या कादंबरी वर प्रथम एक एकांकिका लिहली गेलि ति होति ग्.म्.भ.न. रुईया महविद्यालय त्यात प्रथम आले होते नंतर आले ते नाटक माझ्याकडे त्या एकांकिके चि सिडि आहे.................... मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?

बर्‍याच दिवसांपासून 'टू बी रेड' यादीत असलेली 'शाळा' कादंबरी ह्या भारतभेटीत लक्षात ठेवून विकत घेतलं. (खरं तर विसरलोच होतो, मुसुभाऊने आठवण नीट करून दिली होती.) पुस्तक घेऊन पण १-२ आठवडे गेले. परवा एक कंटाळवाणा प्रवास नशिबी आला होता. म्हणून प्रवासात वाचायला म्हणून घेतलं पुस्तक बरोबर. तेव्हा पासून आत्तापर्यंत दोनदा वाचून झालंय!!! वरती मास्तरांनी पात्र परिचय दिलाच आहे. 'मुकुंद जोशी' ह्या नववीमधल्या मुलाची ही कथा. ही कथा साधारण सप्टेंबर ते एप्रिल (साल साधारण १९७६ असावं... आणिबाणीचे संदर्भ आणि मॅट्रिक संपून एसेस्सी नुकतीच सुरू झालेली असते) ह्या एवढ्याच कालावधीत घडते. ह्या छोट्या कालावधीत 'जोशा' एका खूप मोठ्या मानसिक (आणि शारिरीक) स्थित्यंतरातून जातो... त्या स्थित्यंतराची ही कहाणी. त्याचे 'बाबा', 'आईसाहेब' (आई) आणि 'अंबाबाई' (मोठी बहिण) असं हे कुटुंब. मित्रा सारखा वागणारा नरूमामा. शाळेतले ३ जवळचे मित्र आणि इतर मित्र. वर्गातल्या मुली आणी 'केवडा', 'शिरोडकर' वगैरे नामवंत मुली. चाळीतली इतर मंडळी, पोंक्षेकाका, वरच्या मजल्यावर राहणारे ३ जण आणि त्यांचे आणिबाणीविरोधातले काम ही अजून काही पात्रं. एवढ्या भांडवलावर लेखकाने अक्षरशः एक वेगळीच सृष्टी निर्माण केली आहे. अशी सृष्टी की शाळेत गेलेला / ली प्रत्येक जण तिथे काही काळ का होईना राहून आलेला / ली आहे आणि ही कादंबरी वाचल्यावर परत एकदा तिथे राहून येतो / ते. जोशा आणि शिरोडकर ह्या दोघांच्या मधे काय चाललंय हा जरी मुख्य धागा असला तरी नववीतल्या मुलाच्या नजरेतून जग कसे दिसते आहे हे पण तितक्याच प्रभावी पणे लिहिले आहे. त्या अनुषंगाने ह्या मुलांच्या तोंडची भाषा पण हुबेहूब जमली आहे. (माझ्या ज्ञानात भर म्हणजे काही शब्द अमर आहेत... कधीच बदलणार नाहीत... 'लाईन', 'बाटली' वगैरे!!!) माझ्या पुरतं बोलायचं तर ह्यातल्या काही घटना हुबेहूब माझ्या बाबतीत पण घडल्या आहेत!!! साला ह्या मिलिंद बोकिलला कश्या कळल्या? हा माझ्याच शाळेत तर नव्हता? प्रत्येकाने जरूर वाचावे असे हे पुस्तक. लोकप्रियतेचे एकच उदाहरण द्यायचे तर --- पहिली आवृत्ति १४ जून २००४ ........... सहावी आवृत्ति २० फेब्रुवारी २००८.... अजून काय लिहू? शाळा मिलिंद बोकिल मौज प्रकाशन गृह किंमत रू. २००/- पृष्ठ संख्या ३०३ बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मास्तर आणि बिपीनने पुस्तकाचा आत्मा पकडला आहे. मी पण अलिकडेच पुस्तक वाचलं. हातात घेतलं आणि सोडवतच नव्हतं. रस्त्यात चालतानाही जरा कमी गर्दीचा रस्ता होता तिथे पुस्तक वाचत चालत होते.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मस्त रे... खूप चांगलं केलंस की ते पुस्तक विकत घेतलयस. अदिती म्हणाली तसं हे पुस्तक वाचायला घेतलं की खाली ठेववतच नाही. तू भालचंद्र नेमाडेंचं 'कोसला' आणि सुहास शिरवळकरांचं 'दुनियादारी' वाचली आहेत का? नसतील तर जरूर वाच.

In reply to by संदीप चित्रे

शाळा कादंबरीवर आधारित 'ग म भ न' ही रूईया महाविद्यालयाने सादर केलेली एकांकिक आपली मराठी या वेबसाईटवर पाहिली. कादंबरीचं सादरीकरण खूप छान केलं आहे. ’शाळा’च्या पंख्यांनी जरूर पहावी.

बोका 25/12/2008 - 11:07
वरील बहुतेक जणांना हे पुस्तक वाचून आपले शाळेतील दिवस आठवले. मलाही ! आणि आपण अनुभवलेले शालेय जीवन व कादंबरीतील वर्णन यातील साम्यामुळे ही कादंबरी अधिकच आवडते. मिपा वरील बहुतेक वाचकवर्ग १९७५- १९९० या काळात शाळेत गेलेला असावा. त्यामुळे बहुतेकांना 'शाळा' आवडली. मला पडलेला प्रश्न असा की, १९९०-२००० या काळात ९वी/१०वी त असलेल्यांना ही कथा / वातावरण जवळचे वाटेल का ? 'वर्गातल्या मुलामुलींनी आपापसात न बोलणे' या सारख्या गोष्टी त्यांना पचतील का ?

In reply to by बोका

मला पडलेला प्रश्न असा की, १९९०-२००० या काळात ९वी/१०वी त असलेल्यांना ही कथा / वातावरण जवळचे वाटेल का ? 'वर्गातल्या मुलामुलींनी आपापसात न बोलणे' या सारख्या गोष्टी त्यांना पचतील का ? बोकोबा, मी ९६साली दहावी झाले. ठाण्यातली मराठी माध्यमाची प्रसिद्ध शाळा आणि हेच असंच सगळं. अर्थात मी काही बिल्डींगमधे बसून मुलींवर कमेंटस मारायचे नाही! ;-) पण आमच्याही वर्गात मुलं-मुली एकमेकांशी बोलायचे नाहीत. माझ्या बिल्डींगमधलाच एक मुलगा माझ्या वर्गात होता. लहानपणी अगदी झिंजा उपटणे, चिखल उडवणे, चिमटे काढणे इथपासून भांडणं केली, पुढेसुद्धा एकत्र बसून अभ्यास करायचो, पण वर्गात ... मी एकदा कधीतरी व्हरांड्यात त्याच्याशी बोलले तर घरी आल्या-आल्या त्याने मला दम मारला. माझा सख्खा भाऊ दोन वर्ष पुढे होता, मी ही एकदा त्याच्याशी बोलले तर घरी आल्यावर काय संकट कोसळलं होतं असा आव आणला होता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी २००२ ला १०वी झालो. मराठी मीडीयम. १० वी च्या गॅदरींगपर्यंत मुला-मुलींनी एकमेकांशी बोलायची प्रथा नव्हती. गॅदरींगनंतर जरा मोकळेपणा आला तोपर्यंत शाळा संपुन पण गेली. तेव्हा आमचे गुर्जी गुर्जीणी शिक्षा म्हणुन दोन मुलींच्या मधे बसवायचे. वाळीत टाकल्यापे़क्षा भयानक शिक्षा वाटायची ही. कॉलेजमधे गेल्यावर पण पहीली दोन वर्ष असा अवघडलेपणा असायचा. कॉन्व्हेंट मधले पोरं पोरी खुशाल डेट बिट करत फिरायचे. हेवा वाटायचा त्यांचा.

In reply to by बोका

आजानुकर्ण 26/12/2008 - 08:34
बोकापंत, आमच्या शाळेतही मुलामुलींनी एकमेकांशी बोललेले (आवडत असले तरी) खपवून घेतले जात नसे. त्यामुळे आम्ही कॉलेजात पण मुलींशी बोलायला (मास्तरांना आवडणार नाही असे वाटून) घाबरायचो. आपला (आज्ञाधारक) आजानुकर्ण मात्र शाळेतल्याच काही मंडळींनी एकमेकांशी लग्ने केल्याच्या बातम्या आता कळत आहेत त्यामुळे बरेच छुपे रुस्तम यशस्वी झाल्याचा (व मास्तरांवर सूड उगवल्याचा) आनंद होत आहे. (व आम्ही तसे काहीच न करता पुस्तकात माना खुपसून बसलो याचे दुःख होत आहे) मात्र त्यामुळेच ह्या कादंबरीतील वातावरणाला समजून घेता आले असे वाटते. आपला (गप्पिष्ट) आजानुकर्ण

आबा 25/12/2008 - 20:55
"शाळेत गेलेल्या सर्वांसाठी" अशी या पुस्तकाचि अर्पणपत्रिका आहे गणपतीच्या देवळातला प्रसंग फारच छान आहे. बाकी मास्तर, परीक्षण सुरेख झालंय हो!

तुम्ही लिहिलेला पुस्तक परिचय आणि मिपा सदस्यांच्या प्रतिक्रीया वाचुन आता कधी एकदा पुस्तक वाचेन असे झाले आहे... खुप आभारी आहे.... अवांतर : लंपू ची आठवण करुन दिल्याबद्दल पण खुप खुप आभार...लंपू चे सगळे कारनामे मी ५३० वेळा तरी ( लंपूच्या भाषेत) वाचले आहेत..आज गेल्या गेल्या परत पुस्तक नक्की उघडणार :-) ....सहज एक विचार आला की ( प्रकाश ना. संतांचा ) लंपन (वनवास, शारदासंगीत, झुंबर,पंखा) मोठा झाला की या मुकुंद जोशासारखाच होईल.... आता तो मोठा होईल? :-( हेच म्हणते :-( -(लंपूची मैत्रिण)स्मिता

बबलु 31/01/2009 - 14:54
मागच्याच आठवड्यात "शाळा" ३ वेळा वाचून संपवलं..... सूम मध्ये. या वेळच्या भारतभेटीत विकत घेतलं. ज. ब. रा. कादंबरी. आयला... हा मिलिंद बोकिल लैच भरी की राव. सालं... शेवटचं पान वाचून झालं की पुन्हा पहिल्या पासून सुरुवात आपली. खास बोले तो खासच. डाउट खायला जागाच नाही. कौतुक करावं तेव्हढं थोडंच आहे. "A MUST READ". ....बबलु

मिहिर 31/01/2009 - 22:36
मला पुस्तकाचा पुर्वार्ध (सुर्या वगैरे) आवडला नाही. मध्य ठीक. शेवट आवडला

हुप्प्या 01/02/2009 - 04:46
इतकी वर्षे होऊन गेली तरी चांगले काही मराठी वाचू असा विचार केला की नेहमीचेच पुल, चि.वि. जोशी, अत्रे, क्वचित गो नी दाण्डेकर अशीच नावे सुचायची. कुणी नवा लेखक का सापडत नाही आपल्याला अशी खंत वाटायची. एकदा कुणीतरी हे पुस्तक सुचवले. मला इतके आवडले की काही विचारू नका. एक अगदी ब्रँड न्यू स्टाईल, वेगळा विषय, वेगळा काळ जो मी अगदी जवळून पाहिला होता. मलाही ह्यात वर्णन केलेल्या अनेक घटना अगदी माझ्या शाळेतल्याच आहेत असे वाटून गेले. एक द्विधा मनःस्थिती झाली म्हणजे हे पुस्तक वाचायला लागल्यावर थांबूच नये असेही वाटायचे आणि पुस्तक संपू नये असेही वाटायचे. शेवट खूपच रुखरुख लावून गेला. (माझ्याकरता) एका नव्या मराठी साहित्यिकाशी ओळख झाल्याचा आनंद झाला. बोकिलांची अजून काही पुस्तके कुणी वाचली आहेत का? कशी आहेत? पुढच्या भारतभेटीत आणखी काही वाचेन म्हणतो.

बबलु 01/02/2009 - 10:36
माझंही अगदी असच झालं. हे पुस्तक वाचायला लागल्यावर थांबूच नये असंही वाटायचं आणि पुस्तक कधीच संपू नये असंही वाटायचं. स्वतः मिलिंद बोकिलांशी या पुस्तकावर चर्चा करायला मिळाली तर किती बहार येइल असा विचार आला मनात. ("शाळे"चा जबरदस्त फॅन) ....बबलु

अस्मी 01/03/2010 - 11:05
अगदी कालच 'शाळा' वाचून पूर्ण केल आणि आज हे परीक्षण वाचनात आलं... खरच मला खूप आवडल शाळा...
मला पडलेला प्रश्न असा की, १९९०-२००० या काळात ९वी/१०वी त असलेल्यांना ही कथा / वातावरण जवळचे वाटेल का ?
ह्म्म्म...मला पण आधी असंच वाटलं होत की मुल-मुली बोलत नाहीत म्हणजे... :? पण तो काळ लक्षात घेता ते ठीक आहे.... - मधुमती

In reply to by अस्मी

बेसनलाडू 01/03/2010 - 23:33
मी १९९९ मध्ये १०वी पास झालो. त्यावेळीही मुले-मुली बोलत नसत. आमची शाळा फक्त मुलांची शाळा होती आणि मुलींची शाळाही आमच्या बाजूलाच होती. त्या शाळेतील मुली इयत्ता १ली ते ४थी पर्यंत आमच्याच वर्गात, आमच्याबरोबरच एकत्र शिकल्या होत्या. मात्र ५वी ते १०वी मध्ये शाळा वेगळ्या होत. त्यामुळे वर्गातील एखादा मुलगा त्यांच्या शाळेतील मुलींशी बोलताना आढळल्यास (शाळेबाहेर ट्यूशनच्या वगैरे निमित्ताने) तसेच एखदी मुलगी मुलाशी बोलताना आढळल्यास पुढे त्या दोघांवर काय परिस्थिती बेतायची याबाबत न बोललेलेच बरे ;) आता हे चित्र बदलले आहे आणि दोन्ही शाळांमध्ये वर्गांमध्ये मुलामुलींचे 'नांदा सौख्यभरे' चित्र दिसते आहे. १९९३ ते १९९९ पर्यंतचे माझे शालेय जीवन लक्षात घेता याबद्दल काहीसे हळहळायला होते ;) 'शाळा' मी एका अमेरिका ते भारत प्रवासात जाताना-येताना अशी दोन वेळा वाचली. आता पारायणे झाली आहेत. पहिल्या पानापासून वाचायला घेतले की शेवट होईतोवर खाली ठेववत नाही. यावर आधारीत 'गमभन' ही एकांकिकाही पाहिली. ती फारशी आवडली नाही. मात्र सुर्‍याचे पात्र खास झाले आहे. पुस्तकातील चित्र्याचे पात्र जास्त आवडले. लेखकाच्या भगिनींचा 'अंबाबाई' असा उल्लेख फारच लक्षात राहण्याजोगा. घासू गोखल्या, बिबीकर, चिमण्या, शिरोडकर, सुकडी सगळीच मंडळी आपलीशी वाटणारी, लक्षात राहणारी. अंबाबाई नि शिरोडकरचे नाव शेवटपर्यंत कळत नाही, ही आणखी एक गूढ, मनोरंजक बाब. असो. 'शाळा' बद्दल जितके बोलावे-लिहावे तितके कमीच! (शाळकरी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

टारझन 02/03/2010 - 00:36
'शाळा' मी एका अमेरिका ते भारत प्रवासात जाताना-येताना अशी दोन वेळा वाचली.
हो का? मी अमेरिकेला जाताना दोन पेग मारुन झोपणे प्रिफर करतो यू नो :)
पहिल्या पानापासून वाचायला घेतले की शेवट होईतोवर खाली ठेववत नाही.
अहो खरं काय? माझ्या मित्राला पण असल्यास घाणेरड्या सवयी आहेत..पण बेला तुम्ही तसे वाटत नाही...म्हणूनच विचारले काय? बाकी प्रतिसाद छाणच! -(माळकरी) झेला

In reply to by टारझन

पाषाणभेद 02/03/2010 - 05:58
टार्‍या, मागे तू काही पेग वैगेरे घेत नाही असा उल्लेख केलेला आठवतोय. अन आपले पुणेरी पत्रकार यांच्या समावेत तुम्ही सगळे "बसलेले" असतांना तुझ्या पुढ्यात थंड असल्याचा फोटोही बघीतल्याचे आठवते. खरे काय समजावे? आत्ताचे बोलणे की तो फोटो अन तो उल्लेख? की आत्ता सुरू केलीय? बाकी भडकमकर मास्तर खरे बोललात: "सगळ्या शाळा सारख्याच...जो तो पोरगा आपापल्या कर्त्रुत्त्वाने पुढे जातो, हेच खरे..." आत्ताचे आमचे कर्तृत्व पाहून आमचे मास्तर अन आमची शाळा (त्यांच्या) तोंडात बोटेच घालतील. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

बाकी सगळं आधीच इतरांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे मला जे नवीन वाटतं तेवढंच लिहितो. ही जरी त्या मुलाची गोष्ट असली, आणि पौगंडावस्थेत पदार्पण करण्याच्या वयाचा कॅनव्हास घेतला असला तरी ही जास्त व्यापक कथा आहे असं वाटलं. बालपणात, तारुण्यात जीवनाविषयी खूप अपेक्षा असतात. सगळीकडे काहीना काही रस घेण्यासारखं घडत असतं, इतकं की कुठे लक्ष देऊ आणि कुठे नको असं झालेलं असतं. एक वेळ अशी येते की आपण जगरहाटीला जुंपले जातो. या गमतीजमती मागे पडतात आणि पुढे उरतं ते भकास कष्टप्रद सत्य जीवन. याची ही कथा आहे. लेखकाने हे साधण्यासाठी तंत्र उत्कृष्ट रीतीने वापरलेलं आहे. घनिष्ठ मैत्र्या, स्वच्छंद जीवन, पहिलंवहिलं प्रेम, राजकीय घडामोडींशी जवळून संबंध, बिल्डिंगमधल्या लोकांची संगत या सगळ्या आकर्षक, तारुण्याशी संलग्न गोष्टी समांतरपणे खुलवलेल्या आहेत. शेवटच्या काही पानांत या सगळ्या एकामागोमाग एक मोडून पडतात. ते इतकं चांगल्या प्रकारे साधलंय की तो हे तंत्र वापरतो आहे हे जाणवत पण नाही. सगळी जादू उत्तम रीतीने गुंफलेल्या मोहक बारकाव्यांमध्ये आहे. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

शैलेन्द्र 01/03/2010 - 16:20
अगदी अगदी, शेवटच्या पानावरची काही वाक्य अगदी मनावर कोरली गेलीत, "आता हळु-हळु माझ्या सगळ लक्षात यायला लागलं-----" आणि मग शिरोड्करच निघुन जाण, सुर्‍याचे मागे पडण, नरुमामाचं लग्न इत्यादी इत्यादी... शेवट चटका देतो.

In reply to by राजेश घासकडवी

आशु जोग 30/07/2014 - 12:27
अगदी बरोबर राजेश. तुम्ही नेमक्या शब्दात सांगितलेत.

प्राजु 25/01/2008 - 18:20
परिक्षण वाचून मलाही आमच्या शाळेची आठवण झाली. पण कादंबरीची ही खूपच थोडी ओळख इथे दिली आहे आपण. नुसती शाळा कशी होती आणि त्या शाळेशी मुलाचा संबंध इतकाच विषय आहे की , त्यात त्या मुलाची कथाही आहे? बाकीचा पात्र परिचय थोडा आला असता तर आणखी उत्सुकता वाढली असती. असो.. भारतात आल्यावर मिळाली वाचायला तर बघू.. - प्राजु.

छोटा डॉन 25/01/2008 - 20:23
काय झकास व थोडक्यात परिक्षण लिहले आहे राव तुम्ही... मान गये ऊस्ताद ............. आम्ही पण बरेच महिने झाले हे पूस्तक वाचण्याची मनिषा बाळगून आहोत, पण अजून योग जमला नाही... बरेच ऐकले आहे पूस्तकाविषयी, पण आज तुमचा लेख वाचून पूस्तक वाचण्याच्या ईच्छेला पून्हा एकदा "किल्ली दिली" गेली.... पूण्यात असताना हे पूस्तक कधी वाचयला मिळालेच नाही. आता पूण्यापासून दूर एकही मराथी शब्द न बोलला न जाणार्‍या भागात तर मिळण्याची आशाच सोडा... हे पूस्तक "ऑनलाईन" विकायला असल्याची कोणास माहिती असल्यास संपर्क साधावा .....

In reply to by छोटा डॉन

माझी दुनिया 01/02/2009 - 15:20
हे पूस्तक "ऑनलाईन" विकायला असल्याची कोणास माहिती असल्यास संपर्क साधावा
'पंकज कुरूलकरां'च्या ग्रंथायन ला विचारा की राव ! :)] माझी दुनिया

ओळख थोडी आहे हे खरंच्...फक्त "किती विस्ताराने सांगितल्यावर रसभंग होणार नाही!" याचा अंदाज घेत लिहिले इतकेच.... गोष्ट मुकुंद जोशी या मुलाचीच आहे, त्याच्या ग्रुपची आहे,त्याला आवडणार्‍या मुलीला पटवण्यासाठी , तिला इम्प्रेस करण्यासाठी (साधारणपणे नववीचे वर्ष सुरू झाल्यापासून नववीचा रिझल्ट लागेपर्यंत ) त्याने केलेल्या नाना खटपटी लटपटी यांची आहे.... ..........जोशा चाळीत राहतो.....त्याला कॉलेजात जाणारी बहीण आहे, शिक्षण खात्यात नोकरी करणारे बाबा आहेत...आई आहे, तिला तो वर्णनात आईसाहेब म्हणतो...आणि त्याचा एक नरूमामा आहे, ( वयाने तरूण आणि मित्रासारखा) तो कॉलेजात इंग्रजी शिकवतो आणि "प्रेमात पडणार्‍यांनी कसे वागले पाहिजे , काय टाळले पाहिजे" याविषयी त्याला सल्ले देतो... .......................शाळेतल्या मास्तरांची मास्तरणींची तर अप्रतिम शब्दचित्रे आहेत...."प्रिंसिपल च्या खोलीचे वर्णन आमच्या शाळेतल्यासारखेच कसे काय ?" असे वाटावे इतके तंतोतंत जुळले.... ....सहज एक विचार आला की ( प्रकाश ना. संतांचा ) लंपन (वनवास, शारदासंगीत, झुंबर,पंखा) मोठा झाला की या मुकुंद जोशासारखाच होईल....सज्जन, सुसंस्कारी फ़क्त त्याला मोठं करून प्रेमात पाडायचे...

In reply to by भडकमकर मास्तर

....सहज एक विचार आला की ( प्रकाश ना. संतांचा ) लंपन (वनवास, शारदासंगीत, झुंबर,पंखा) मोठा झाला की या मुकुंद जोशासारखाच होईल.... आता तो मोठा होईल? :-(

सुनील 25/01/2008 - 23:53
पुस्ताकाचे प्रकाशक, पृष्ठांची संख्या, किंमत तसेच उपलब्धता यावरही काही सांगा. परीक्षण उत्कंठावर्धक आहे. आम्ही लाईन देणे ऐवजी लाईन मारणे असा शब्द्प्रयोग वापरीत असू! (भरपूर लायनी मारलेला) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

एक 26/01/2008 - 00:04
"..आम्ही लाईन देणे ऐवजी लाईन मारणे असा शब्द्प्रयोग वापरीत असू!..." दोन्ही क्रियापदं बरोबर आहेत. पण त्यांचे कर्ते वेगळे आहेत ;-) मुले लाईन मारतात (नेहमीच) मुली लाईन देतात (फार फार दुर्मिळ प्रकार :-()

पुस्तक उपलब्ध होण्यासाठी हा दुवा मदत करेल काय पाहावे... http://kharedi.maayboli.com/shop/product.php?printable=Y&productid=16280&cat=266&page=1 ....पुस्तक ३०० पानी आहे, किंमत २०० रू. ; मला वाटते मॆजेस्टिक प्रकाशन असावे... ____________________________________________ ___________________________________________ त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.............. ___________________________________________

धन्यवाद प्प्राजु,छोटा डॊन आणि सुनिल आणि एक.. ______________________________ आणखी एक सांगायचे राहिले, की मुलींनी मुलांशी अजिबात म्हणजे अजिबातच बोलायचे नसे त्या काळातल्या शाळेतल्या या घटना आहेत.... ज्या वाचकाला हे समजून घेणे अवघड जाईल ( सद्ध्या असले काही नसते म्हणे, माझा एक तरूण मित्र सांगतो की त्याच्या इंग्रजी शाळेत प्रत्येक मुलाला नियमाप्रमाणे एका मुलीच्या शेजारीच बसावे लागे, इच्छा असो वा नसो...) असा वाचक "जोशा आवडत्या मुलीशी एखादे वाक्य बोलता यावे म्हणून एवढ्या खटपटी करतो " त्या कशा समजून घेईल ??असे मला वाटते...

वाटाड्या... 26/01/2008 - 00:32
हेवा वाटतो तुमच्या सगळ्यांचा...आमच्या शाळेत पोरिच नव्हत्या..

In reply to by वाटाड्या...

शुचि 02/03/2010 - 03:18
आमच्या शाळेत मुलंच नव्हती. दातार क्लासला मला एक लाल चुटूक स्वेटर घलणारा गोरापान , वर्गातील सर्वात हुशार मुलगा आवडायचा. वर्गात प्रश्न विचार्ला की याचा हात वर असायचा नेहेमी. नंतर आता आम्ही एकमेकांचे बर्‍यापैकी म्हणजे ओके ओके मित्र आहोत. पण तो त्याच्या संसारात , मी माझ्या. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मिलिंद बोकिलांचे वैचारिक लेख असलेले एक पुस्तक अलिकडेच प्रसिध्द झाले. त्याचे नाव "समुद्रापारचे समाज". ...उदकाचिया आर्ती आणि झेन गार्डन पण त्यांचे खूप चांगले कथासंग्रह आहेत

नुकतेच 'शाळा' वाचून संपवले. (मास्तरांचे परीक्षण वाचून ह्या भारतवारीतून ते घेऊनच आले होते.) शाळेच्या दिवसांची आठवण करून देणारे पुस्तक आहे. एका कुमारवयीन मुलाचे भावविश्व वाचताना काळाची पाने पलटून कधी मागे जातात ते समजतच नाही.. आणखी एक सांगायचे राहिले, की मुलींनी मुलांशी अजिबात म्हणजे अजिबातच बोलायचे नसे त्या काळातल्या शाळेतल्या या घटना आहेत.... अगदी .. पुस्तक ३०० पानी आहे, किंमत २०० रू. ; मला वाटते मॆजेस्टिक प्रकाशन असावे... मौज प्रकाशन स्वाती

सुचेल तसं 22/08/2008 - 16:58
मास्तर, चांगल्या विषयाला हात घातलात तुम्ही. माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे "शाळा". शेवट तर एकदम चटका लावणारा आहे. ("आणि उरतं दहावी नावाचं भयाण वर्ष" असं काहीतरी शेवटचं वाक्य आहे.) नववी-दहावीतल्या मुलाच्या भावविश्वाचे फार सुंदर वर्णन आहे. त्या वयातलं त्याला आणि त्याच्या मित्रांना वाटणारं मुलींबद्दलचं आकर्षण, प्रत्येकाला आवडणारी एक मुलगी . मग शाळेच्या अलिकडल्या एका बांधकाम चालू असलेल्या घरातून जेव्हा "ती" शाळेत जायची तेव्हा तिला पहायचं. शब्दप्रयोग तर केवळ अप्रतिम "इचिभना", "आंबे पाडले पाहिजेत", इत्यादि. http://sucheltas.blogspot.com

मास्तर ... माझ्या एकदम आवडत्या पुस्तकाचा विषय काढलात ... धन्स :) ---------------- शाळा वाचल्यानंतर असं जाणवलं की नकळत मराठीमधे एक ट्रायोलॉजीसारखा प्रकार झाला आहे. तीन वेगवेगळ्या दशकांत, तीन वेगवेगळ्या लेखक...पण तीनही पुस्तके मस्त आहेत. जिज्ञासूंसाठी अधिक माहिती --- 'कोसला' -- भालचंद्र नेमाडे 'दुनियादारी' -- सुहास शिरवळकर 'शाळा' - मिलिंद बोकील

In reply to by संदीप चित्रे

मुक्तसुनीत 22/08/2008 - 18:54
कोसला हे स्वतंत्र पुस्तक. कोसलाचा नायक : पांडुरंग सांगवीकर. ट्रिलॉजी ची पुस्तके : झूल जरीला बिढार नायक : चांगदेव पाटील

In reply to by संदीप चित्रे

कोसला +२१९८७८२७८२७४८३४ कोसला जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा तेव्हा पांडुरंग सांगवीकर मला अस्वस्थ करुन जातो. दर वेळी त्या पुस्तकाचा एक नवाचं अर्थ लागत जातो.

शितल 22/08/2008 - 18:57
पुस्तक परिक्षण आवडले. संदीप तु़झ्याकडे आहे ना मग ते पुस्तक आणि अजुन जी तु़झ्याकडे असतील ती मी आमच्या घरी आणण्याची व्यवस्थित व्यवस्था करीन. ;) शाळा हा विषयच सर्वाच्या जिव्हाळ्याचा असतो.

मास्तर, मस्त झालंय परीक्षण. पण जरा लहान झालंय. शिवाय बोकिलांच्या बाकीच्या कथासंग्रहांवरपण लिहा ना. बाय दी वे, तुम्ही त्यांची 'एकम' ही दीर्घकथा / लघुकादंबरी वाचलीय का हो? कुणी वाचली असेल तर प्लीज आपलं मत सांगा. मला अजिबात नाही आवडलीय. बोकिलांच्या लौकिकाला अज्याबात साजेशी नाहीय.

अभिज्ञ 23/08/2008 - 01:28
"शाळा" कादंबरी अफलातुनच आहे.पौगंडा अवस्थेतील मुलांच्या भारलेल्या दिवंसाचे अतिशय वास्तविक चित्रण ह्या कादंबरीत जाणवले.वाचून तर चाटच पडलो. लेखकाने दाखवलेला काळ हा आणिबाणीतला आहे ,साधारण १९७५-१९७६ च्या आसपासचा. कादंबरितील वर्णने आमच्या वेळेसहि फिट बसतात. परिक्षण आवडले. अभिज्ञ. अवांतर : "शाळा" व "बाकि शुन्य" ची सुरुवातीची काहि पाने एकाच धाटणीची आहेत. आधि "शाळा" वाचले अन मग "बाकि शुन्य" वाचले. "शाळा" चा प्रभाव असेल का ते सांगता येत नाही परंतु "बाकि शुन्य" पहिल्या काहि पानातच "शुन्य" व "कृत्रिम" वाटू लागले. "बाकि शुन्य" हे थोडेसे "भडक" रंग वापरून रंगवलेले वाटले.

आपला अभिजित 24/08/2008 - 17:22
मला पण भन्नाट आवडली `शाळा.' एकतर माझी वाचन परंपरा फारच अफाट आहे. सलग आणि संपूर्ण वाचलेली अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी पुस्तकं आहेत माझी. `शाळा' उटी दौर्‍यात निलं होतं वाचायला. ट्रेनमध्येच वाचून पूर्ण केलं. `शाळा'तले बरेच धंदे आम्हीही शाळेत केलेत. त्यामुळे अगदी भावलं पुस्तक. अगदी पोरींवर लायनी मारणं, तिच्या लाइन देण्याविषयी चर्चा, सायकल फास्ट मारून केलेलं शायनिंग, बायांना वेगवेगळी नावं ठेवणं अगदी मनापासून केलं. पण शाळेला दांड्या बिंड्या नाही मारल्या. आठवणी खूप आहेत. एकदा वर्गात कुणीतरी खाजकुयली टाकली म्हणून अख्ख्या वर्गाला मैदानावर उभं केलं होतं. आम्ही टेक्निकलला ज्या दिवशी जायचो, नेमकी त्या दिवशी दुसर्‍या दिवसाच्या शाळेच्या वेळेत बदलाची नोटीस फिरवायचे. आमचे टेक्निकल शाळेबाहेर असल्याने आम्हाला तो निरोपच मिळायचा नाही. मग आम्ही निरोप कळला, तरी मुद्दाम नेहमीच्या वेळी शाळेत जायचो. या `बंडखोरी'बद्दल अनेकदा काळ्या यादीत पण जायचो. पण खुमखुमी जास्त होती. ही कादंबरी वाचून शाळेतले सगळे धंदे आठवले. धमाल आली! मी पण कादंबरीविषयी टॉपिक टाकणार होतो. पण मुहूर्त लागला नव्हता. भडकमकर मास्तरांचे अभिनंदन!

आज हा धागा परत वर आला. त्या मुळे अजून हे पुस्तक वाचायचे आहे अशी टोचणी परत लागली आहे. मास्तर छान ओळख करुन दिलीत. बिपिन.

मैत्र 08/10/2008 - 00:47
पुस्तक वाचलंच पाहिजे आता... शाळा आणि ते सातवी ते दहावीचे मस्त दिवस. आणि किमान बोकीलांच्या समान आडनावाला जागलं पाहिजे... मास्तर धन्यवाद...

विजुभाऊ 08/10/2008 - 11:11
आमच्या शाळेत कशी कोण जाणे पण एक विचित्र प्रथा होती दहावीतली मुले एकमेकाना वडीलांच्या नावाने हाक मारीत. आणि ऐकणारालाही ते सवयीचे झालेले असायचे. एकदा मी एका मित्राच्या घरी गेलो. त्याचे नाव सुधीर व त्याच्या वडीलांचे नाव मधुकर होते. त्या मित्राला आम्ही मधु म्हणुनच हाक मारायचो. तो ही ओ द्यायचा मी त्याच्या घरी गेलो आणि दारातुन हाक मारली मधु आहे का? कोण हवे विचारत त्याचे वडील बाहेर आले. मी पुन्हा विचारले की मधु आहे का ? त्यानी पुन्हा विचारले कोण हवे आहे म्हणुन मी पुन्हा तेच म्हणालो " मधु आहे का?" त्यानी माझ्याकडे पूर्ण पाहिले. कसला तरी मजेदार चेहेरा करुन ते म्हणाले मीच मधु ...तुला बहुतेक सुधीर हवा असेल. तो दहावीत आहे. एव्हाना तो मित्रही दारात आला होता. मला आणि सुधीरला दोघानाही रामायणात घडले होते तसे धरती दुभंगुन आपण त्यात गडप व्हावे असे झाले होते.

मास्तर तुम्हाला सान्गु इचितो कि या कादंबरी वर प्रथम एक एकांकिका लिहली गेलि ति होति ग्.म्.भ.न. रुईया महविद्यालय त्यात प्रथम आले होते नंतर आले ते नाटक माझ्याकडे त्या एकांकिके चि सिडि आहे.................... मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?

बर्‍याच दिवसांपासून 'टू बी रेड' यादीत असलेली 'शाळा' कादंबरी ह्या भारतभेटीत लक्षात ठेवून विकत घेतलं. (खरं तर विसरलोच होतो, मुसुभाऊने आठवण नीट करून दिली होती.) पुस्तक घेऊन पण १-२ आठवडे गेले. परवा एक कंटाळवाणा प्रवास नशिबी आला होता. म्हणून प्रवासात वाचायला म्हणून घेतलं पुस्तक बरोबर. तेव्हा पासून आत्तापर्यंत दोनदा वाचून झालंय!!! वरती मास्तरांनी पात्र परिचय दिलाच आहे. 'मुकुंद जोशी' ह्या नववीमधल्या मुलाची ही कथा. ही कथा साधारण सप्टेंबर ते एप्रिल (साल साधारण १९७६ असावं... आणिबाणीचे संदर्भ आणि मॅट्रिक संपून एसेस्सी नुकतीच सुरू झालेली असते) ह्या एवढ्याच कालावधीत घडते. ह्या छोट्या कालावधीत 'जोशा' एका खूप मोठ्या मानसिक (आणि शारिरीक) स्थित्यंतरातून जातो... त्या स्थित्यंतराची ही कहाणी. त्याचे 'बाबा', 'आईसाहेब' (आई) आणि 'अंबाबाई' (मोठी बहिण) असं हे कुटुंब. मित्रा सारखा वागणारा नरूमामा. शाळेतले ३ जवळचे मित्र आणि इतर मित्र. वर्गातल्या मुली आणी 'केवडा', 'शिरोडकर' वगैरे नामवंत मुली. चाळीतली इतर मंडळी, पोंक्षेकाका, वरच्या मजल्यावर राहणारे ३ जण आणि त्यांचे आणिबाणीविरोधातले काम ही अजून काही पात्रं. एवढ्या भांडवलावर लेखकाने अक्षरशः एक वेगळीच सृष्टी निर्माण केली आहे. अशी सृष्टी की शाळेत गेलेला / ली प्रत्येक जण तिथे काही काळ का होईना राहून आलेला / ली आहे आणि ही कादंबरी वाचल्यावर परत एकदा तिथे राहून येतो / ते. जोशा आणि शिरोडकर ह्या दोघांच्या मधे काय चाललंय हा जरी मुख्य धागा असला तरी नववीतल्या मुलाच्या नजरेतून जग कसे दिसते आहे हे पण तितक्याच प्रभावी पणे लिहिले आहे. त्या अनुषंगाने ह्या मुलांच्या तोंडची भाषा पण हुबेहूब जमली आहे. (माझ्या ज्ञानात भर म्हणजे काही शब्द अमर आहेत... कधीच बदलणार नाहीत... 'लाईन', 'बाटली' वगैरे!!!) माझ्या पुरतं बोलायचं तर ह्यातल्या काही घटना हुबेहूब माझ्या बाबतीत पण घडल्या आहेत!!! साला ह्या मिलिंद बोकिलला कश्या कळल्या? हा माझ्याच शाळेत तर नव्हता? प्रत्येकाने जरूर वाचावे असे हे पुस्तक. लोकप्रियतेचे एकच उदाहरण द्यायचे तर --- पहिली आवृत्ति १४ जून २००४ ........... सहावी आवृत्ति २० फेब्रुवारी २००८.... अजून काय लिहू? शाळा मिलिंद बोकिल मौज प्रकाशन गृह किंमत रू. २००/- पृष्ठ संख्या ३०३ बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मास्तर आणि बिपीनने पुस्तकाचा आत्मा पकडला आहे. मी पण अलिकडेच पुस्तक वाचलं. हातात घेतलं आणि सोडवतच नव्हतं. रस्त्यात चालतानाही जरा कमी गर्दीचा रस्ता होता तिथे पुस्तक वाचत चालत होते.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मस्त रे... खूप चांगलं केलंस की ते पुस्तक विकत घेतलयस. अदिती म्हणाली तसं हे पुस्तक वाचायला घेतलं की खाली ठेववतच नाही. तू भालचंद्र नेमाडेंचं 'कोसला' आणि सुहास शिरवळकरांचं 'दुनियादारी' वाचली आहेत का? नसतील तर जरूर वाच.

In reply to by संदीप चित्रे

शाळा कादंबरीवर आधारित 'ग म भ न' ही रूईया महाविद्यालयाने सादर केलेली एकांकिक आपली मराठी या वेबसाईटवर पाहिली. कादंबरीचं सादरीकरण खूप छान केलं आहे. ’शाळा’च्या पंख्यांनी जरूर पहावी.

बोका 25/12/2008 - 11:07
वरील बहुतेक जणांना हे पुस्तक वाचून आपले शाळेतील दिवस आठवले. मलाही ! आणि आपण अनुभवलेले शालेय जीवन व कादंबरीतील वर्णन यातील साम्यामुळे ही कादंबरी अधिकच आवडते. मिपा वरील बहुतेक वाचकवर्ग १९७५- १९९० या काळात शाळेत गेलेला असावा. त्यामुळे बहुतेकांना 'शाळा' आवडली. मला पडलेला प्रश्न असा की, १९९०-२००० या काळात ९वी/१०वी त असलेल्यांना ही कथा / वातावरण जवळचे वाटेल का ? 'वर्गातल्या मुलामुलींनी आपापसात न बोलणे' या सारख्या गोष्टी त्यांना पचतील का ?

In reply to by बोका

मला पडलेला प्रश्न असा की, १९९०-२००० या काळात ९वी/१०वी त असलेल्यांना ही कथा / वातावरण जवळचे वाटेल का ? 'वर्गातल्या मुलामुलींनी आपापसात न बोलणे' या सारख्या गोष्टी त्यांना पचतील का ? बोकोबा, मी ९६साली दहावी झाले. ठाण्यातली मराठी माध्यमाची प्रसिद्ध शाळा आणि हेच असंच सगळं. अर्थात मी काही बिल्डींगमधे बसून मुलींवर कमेंटस मारायचे नाही! ;-) पण आमच्याही वर्गात मुलं-मुली एकमेकांशी बोलायचे नाहीत. माझ्या बिल्डींगमधलाच एक मुलगा माझ्या वर्गात होता. लहानपणी अगदी झिंजा उपटणे, चिखल उडवणे, चिमटे काढणे इथपासून भांडणं केली, पुढेसुद्धा एकत्र बसून अभ्यास करायचो, पण वर्गात ... मी एकदा कधीतरी व्हरांड्यात त्याच्याशी बोलले तर घरी आल्या-आल्या त्याने मला दम मारला. माझा सख्खा भाऊ दोन वर्ष पुढे होता, मी ही एकदा त्याच्याशी बोलले तर घरी आल्यावर काय संकट कोसळलं होतं असा आव आणला होता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी २००२ ला १०वी झालो. मराठी मीडीयम. १० वी च्या गॅदरींगपर्यंत मुला-मुलींनी एकमेकांशी बोलायची प्रथा नव्हती. गॅदरींगनंतर जरा मोकळेपणा आला तोपर्यंत शाळा संपुन पण गेली. तेव्हा आमचे गुर्जी गुर्जीणी शिक्षा म्हणुन दोन मुलींच्या मधे बसवायचे. वाळीत टाकल्यापे़क्षा भयानक शिक्षा वाटायची ही. कॉलेजमधे गेल्यावर पण पहीली दोन वर्ष असा अवघडलेपणा असायचा. कॉन्व्हेंट मधले पोरं पोरी खुशाल डेट बिट करत फिरायचे. हेवा वाटायचा त्यांचा.

In reply to by बोका

आजानुकर्ण 26/12/2008 - 08:34
बोकापंत, आमच्या शाळेतही मुलामुलींनी एकमेकांशी बोललेले (आवडत असले तरी) खपवून घेतले जात नसे. त्यामुळे आम्ही कॉलेजात पण मुलींशी बोलायला (मास्तरांना आवडणार नाही असे वाटून) घाबरायचो. आपला (आज्ञाधारक) आजानुकर्ण मात्र शाळेतल्याच काही मंडळींनी एकमेकांशी लग्ने केल्याच्या बातम्या आता कळत आहेत त्यामुळे बरेच छुपे रुस्तम यशस्वी झाल्याचा (व मास्तरांवर सूड उगवल्याचा) आनंद होत आहे. (व आम्ही तसे काहीच न करता पुस्तकात माना खुपसून बसलो याचे दुःख होत आहे) मात्र त्यामुळेच ह्या कादंबरीतील वातावरणाला समजून घेता आले असे वाटते. आपला (गप्पिष्ट) आजानुकर्ण

आबा 25/12/2008 - 20:55
"शाळेत गेलेल्या सर्वांसाठी" अशी या पुस्तकाचि अर्पणपत्रिका आहे गणपतीच्या देवळातला प्रसंग फारच छान आहे. बाकी मास्तर, परीक्षण सुरेख झालंय हो!

तुम्ही लिहिलेला पुस्तक परिचय आणि मिपा सदस्यांच्या प्रतिक्रीया वाचुन आता कधी एकदा पुस्तक वाचेन असे झाले आहे... खुप आभारी आहे.... अवांतर : लंपू ची आठवण करुन दिल्याबद्दल पण खुप खुप आभार...लंपू चे सगळे कारनामे मी ५३० वेळा तरी ( लंपूच्या भाषेत) वाचले आहेत..आज गेल्या गेल्या परत पुस्तक नक्की उघडणार :-) ....सहज एक विचार आला की ( प्रकाश ना. संतांचा ) लंपन (वनवास, शारदासंगीत, झुंबर,पंखा) मोठा झाला की या मुकुंद जोशासारखाच होईल.... आता तो मोठा होईल? :-( हेच म्हणते :-( -(लंपूची मैत्रिण)स्मिता

बबलु 31/01/2009 - 14:54
मागच्याच आठवड्यात "शाळा" ३ वेळा वाचून संपवलं..... सूम मध्ये. या वेळच्या भारतभेटीत विकत घेतलं. ज. ब. रा. कादंबरी. आयला... हा मिलिंद बोकिल लैच भरी की राव. सालं... शेवटचं पान वाचून झालं की पुन्हा पहिल्या पासून सुरुवात आपली. खास बोले तो खासच. डाउट खायला जागाच नाही. कौतुक करावं तेव्हढं थोडंच आहे. "A MUST READ". ....बबलु

मिहिर 31/01/2009 - 22:36
मला पुस्तकाचा पुर्वार्ध (सुर्या वगैरे) आवडला नाही. मध्य ठीक. शेवट आवडला

हुप्प्या 01/02/2009 - 04:46
इतकी वर्षे होऊन गेली तरी चांगले काही मराठी वाचू असा विचार केला की नेहमीचेच पुल, चि.वि. जोशी, अत्रे, क्वचित गो नी दाण्डेकर अशीच नावे सुचायची. कुणी नवा लेखक का सापडत नाही आपल्याला अशी खंत वाटायची. एकदा कुणीतरी हे पुस्तक सुचवले. मला इतके आवडले की काही विचारू नका. एक अगदी ब्रँड न्यू स्टाईल, वेगळा विषय, वेगळा काळ जो मी अगदी जवळून पाहिला होता. मलाही ह्यात वर्णन केलेल्या अनेक घटना अगदी माझ्या शाळेतल्याच आहेत असे वाटून गेले. एक द्विधा मनःस्थिती झाली म्हणजे हे पुस्तक वाचायला लागल्यावर थांबूच नये असेही वाटायचे आणि पुस्तक संपू नये असेही वाटायचे. शेवट खूपच रुखरुख लावून गेला. (माझ्याकरता) एका नव्या मराठी साहित्यिकाशी ओळख झाल्याचा आनंद झाला. बोकिलांची अजून काही पुस्तके कुणी वाचली आहेत का? कशी आहेत? पुढच्या भारतभेटीत आणखी काही वाचेन म्हणतो.

बबलु 01/02/2009 - 10:36
माझंही अगदी असच झालं. हे पुस्तक वाचायला लागल्यावर थांबूच नये असंही वाटायचं आणि पुस्तक कधीच संपू नये असंही वाटायचं. स्वतः मिलिंद बोकिलांशी या पुस्तकावर चर्चा करायला मिळाली तर किती बहार येइल असा विचार आला मनात. ("शाळे"चा जबरदस्त फॅन) ....बबलु

अस्मी 01/03/2010 - 11:05
अगदी कालच 'शाळा' वाचून पूर्ण केल आणि आज हे परीक्षण वाचनात आलं... खरच मला खूप आवडल शाळा...
मला पडलेला प्रश्न असा की, १९९०-२००० या काळात ९वी/१०वी त असलेल्यांना ही कथा / वातावरण जवळचे वाटेल का ?
ह्म्म्म...मला पण आधी असंच वाटलं होत की मुल-मुली बोलत नाहीत म्हणजे... :? पण तो काळ लक्षात घेता ते ठीक आहे.... - मधुमती

In reply to by अस्मी

बेसनलाडू 01/03/2010 - 23:33
मी १९९९ मध्ये १०वी पास झालो. त्यावेळीही मुले-मुली बोलत नसत. आमची शाळा फक्त मुलांची शाळा होती आणि मुलींची शाळाही आमच्या बाजूलाच होती. त्या शाळेतील मुली इयत्ता १ली ते ४थी पर्यंत आमच्याच वर्गात, आमच्याबरोबरच एकत्र शिकल्या होत्या. मात्र ५वी ते १०वी मध्ये शाळा वेगळ्या होत. त्यामुळे वर्गातील एखादा मुलगा त्यांच्या शाळेतील मुलींशी बोलताना आढळल्यास (शाळेबाहेर ट्यूशनच्या वगैरे निमित्ताने) तसेच एखदी मुलगी मुलाशी बोलताना आढळल्यास पुढे त्या दोघांवर काय परिस्थिती बेतायची याबाबत न बोललेलेच बरे ;) आता हे चित्र बदलले आहे आणि दोन्ही शाळांमध्ये वर्गांमध्ये मुलामुलींचे 'नांदा सौख्यभरे' चित्र दिसते आहे. १९९३ ते १९९९ पर्यंतचे माझे शालेय जीवन लक्षात घेता याबद्दल काहीसे हळहळायला होते ;) 'शाळा' मी एका अमेरिका ते भारत प्रवासात जाताना-येताना अशी दोन वेळा वाचली. आता पारायणे झाली आहेत. पहिल्या पानापासून वाचायला घेतले की शेवट होईतोवर खाली ठेववत नाही. यावर आधारीत 'गमभन' ही एकांकिकाही पाहिली. ती फारशी आवडली नाही. मात्र सुर्‍याचे पात्र खास झाले आहे. पुस्तकातील चित्र्याचे पात्र जास्त आवडले. लेखकाच्या भगिनींचा 'अंबाबाई' असा उल्लेख फारच लक्षात राहण्याजोगा. घासू गोखल्या, बिबीकर, चिमण्या, शिरोडकर, सुकडी सगळीच मंडळी आपलीशी वाटणारी, लक्षात राहणारी. अंबाबाई नि शिरोडकरचे नाव शेवटपर्यंत कळत नाही, ही आणखी एक गूढ, मनोरंजक बाब. असो. 'शाळा' बद्दल जितके बोलावे-लिहावे तितके कमीच! (शाळकरी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

टारझन 02/03/2010 - 00:36
'शाळा' मी एका अमेरिका ते भारत प्रवासात जाताना-येताना अशी दोन वेळा वाचली.
हो का? मी अमेरिकेला जाताना दोन पेग मारुन झोपणे प्रिफर करतो यू नो :)
पहिल्या पानापासून वाचायला घेतले की शेवट होईतोवर खाली ठेववत नाही.
अहो खरं काय? माझ्या मित्राला पण असल्यास घाणेरड्या सवयी आहेत..पण बेला तुम्ही तसे वाटत नाही...म्हणूनच विचारले काय? बाकी प्रतिसाद छाणच! -(माळकरी) झेला

In reply to by टारझन

पाषाणभेद 02/03/2010 - 05:58
टार्‍या, मागे तू काही पेग वैगेरे घेत नाही असा उल्लेख केलेला आठवतोय. अन आपले पुणेरी पत्रकार यांच्या समावेत तुम्ही सगळे "बसलेले" असतांना तुझ्या पुढ्यात थंड असल्याचा फोटोही बघीतल्याचे आठवते. खरे काय समजावे? आत्ताचे बोलणे की तो फोटो अन तो उल्लेख? की आत्ता सुरू केलीय? बाकी भडकमकर मास्तर खरे बोललात: "सगळ्या शाळा सारख्याच...जो तो पोरगा आपापल्या कर्त्रुत्त्वाने पुढे जातो, हेच खरे..." आत्ताचे आमचे कर्तृत्व पाहून आमचे मास्तर अन आमची शाळा (त्यांच्या) तोंडात बोटेच घालतील. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

बाकी सगळं आधीच इतरांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे मला जे नवीन वाटतं तेवढंच लिहितो. ही जरी त्या मुलाची गोष्ट असली, आणि पौगंडावस्थेत पदार्पण करण्याच्या वयाचा कॅनव्हास घेतला असला तरी ही जास्त व्यापक कथा आहे असं वाटलं. बालपणात, तारुण्यात जीवनाविषयी खूप अपेक्षा असतात. सगळीकडे काहीना काही रस घेण्यासारखं घडत असतं, इतकं की कुठे लक्ष देऊ आणि कुठे नको असं झालेलं असतं. एक वेळ अशी येते की आपण जगरहाटीला जुंपले जातो. या गमतीजमती मागे पडतात आणि पुढे उरतं ते भकास कष्टप्रद सत्य जीवन. याची ही कथा आहे. लेखकाने हे साधण्यासाठी तंत्र उत्कृष्ट रीतीने वापरलेलं आहे. घनिष्ठ मैत्र्या, स्वच्छंद जीवन, पहिलंवहिलं प्रेम, राजकीय घडामोडींशी जवळून संबंध, बिल्डिंगमधल्या लोकांची संगत या सगळ्या आकर्षक, तारुण्याशी संलग्न गोष्टी समांतरपणे खुलवलेल्या आहेत. शेवटच्या काही पानांत या सगळ्या एकामागोमाग एक मोडून पडतात. ते इतकं चांगल्या प्रकारे साधलंय की तो हे तंत्र वापरतो आहे हे जाणवत पण नाही. सगळी जादू उत्तम रीतीने गुंफलेल्या मोहक बारकाव्यांमध्ये आहे. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

शैलेन्द्र 01/03/2010 - 16:20
अगदी अगदी, शेवटच्या पानावरची काही वाक्य अगदी मनावर कोरली गेलीत, "आता हळु-हळु माझ्या सगळ लक्षात यायला लागलं-----" आणि मग शिरोड्करच निघुन जाण, सुर्‍याचे मागे पडण, नरुमामाचं लग्न इत्यादी इत्यादी... शेवट चटका देतो.

In reply to by राजेश घासकडवी

आशु जोग 30/07/2014 - 12:27
अगदी बरोबर राजेश. तुम्ही नेमक्या शब्दात सांगितलेत.
बर्याच दिवसांपासून मित्र-मैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून या कादंबरीबद्दल वाचून पहा अशी शिफ़ारस केली जात होती...( त्यावर निघालेले नाटक.."ग म भ न", नुकताच रिलीज झालेला सिनेमा, तोही हिंदी, " हमने जीना सीख लिया"..., बर्याच लोकांच्या नुकत्याच वाचलेल्या चांगल्या पुस्तकांत त्याचा समावेश..त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढलेली होती)...शेवटी वाचनाचा मुहूर्त लागला या आठवड्यात...इथे यावर चर्चा झडलेली आहे की नाही ते मला माहित नाहीये, पण वाचून मस्त वाटलं, आणि ते इथे सांगावंसं वाटलं.... .....कादंबरीचा नायक एक नववीत गेलेला मुलगा आहे, नववीचे वर्ष नुकतेच सुरू झालेले आहे, (हा आणीबाणीचा १९७६ चा काळ आणि बहुधा हे डोंब

खाऊ नाही तर मरू

मीनल गद्रे. ·

विसोबा खेचर 24/01/2008 - 07:02
मरतील बक-या तसेच पक्षी मरतील मछल्या,पडतील भक्षी आम्ही सातत चरू, खाऊ नाही तर मरू वा वा! अप्रतिम विडंबन... मिनल मॅडम, आपल्या प्रतिभेला प्रणाम! अजूनही अशीच उत्तमोत्तम विडंबने येऊ द्यात प्लीज.. आपला, (खादाड) तात्या.

किशोरी 24/01/2008 - 18:36
मीनलजी छान आहे विडंबन आम्ही सतत चरु,खाऊ नाहीतर मरु..मस्त!

प्राजु 24/01/2008 - 23:42
मिनल, मस्त आहे हे विडंबन.. देह आमुचा हाडमासांचा,रक्त आणिक जिवपेशींचा शक्तिवान तो करू, खाऊ नाहीतर मरू आणि भुकेसाठी खाद्यच उत्तर, जिव्हा न थांबे जरा तसूभर पोट आपुले भरू, खाऊ नाही तर मरू हे एकदम जबरा... - प्राजु

विसोबा खेचर 24/01/2008 - 07:02
मरतील बक-या तसेच पक्षी मरतील मछल्या,पडतील भक्षी आम्ही सातत चरू, खाऊ नाही तर मरू वा वा! अप्रतिम विडंबन... मिनल मॅडम, आपल्या प्रतिभेला प्रणाम! अजूनही अशीच उत्तमोत्तम विडंबने येऊ द्यात प्लीज.. आपला, (खादाड) तात्या.

किशोरी 24/01/2008 - 18:36
मीनलजी छान आहे विडंबन आम्ही सतत चरु,खाऊ नाहीतर मरु..मस्त!

प्राजु 24/01/2008 - 23:42
मिनल, मस्त आहे हे विडंबन.. देह आमुचा हाडमासांचा,रक्त आणिक जिवपेशींचा शक्तिवान तो करू, खाऊ नाहीतर मरू आणि भुकेसाठी खाद्यच उत्तर, जिव्हा न थांबे जरा तसूभर पोट आपुले भरू, खाऊ नाही तर मरू हे एकदम जबरा... - प्राजु
जुन्या गाण्याच्या चालीवर पुढील काव्य गावे. माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सरू जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू शरीराच्या त्या गरजेसाठी यज्ञकर्म ते करू खाऊ नाही तर मरू,खाल्ल नाही तर मरू खाऊ नाही तर मरू लढतिल सैनिक , लढू नागरिक लढतिल महिला, लढतिल बालक शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू मरतील बक-या तसेच पक्षी मरतील मछल्या,पडतील भक्षी आम्ही सातत चरू, खाऊ नाही तर मरू

वाच पुस्तके

अविनाश ओगले ·

इनोबा म्हणे 23/01/2008 - 20:53
अप्रतिम काव्य... वा! अविनाशराव....अशाच कविता करित रहा.... स्वत्व संस्कृती माय मराठी हवी जपाया मातीचा अभिमान पाहिजे, वाच पुस्तके या ओळी विशेष आवडल्या..

सुनील 23/01/2008 - 20:58
अशा विषयावरदेखील उत्तम गझल लिहिता येते असे वाटले नव्हते! रामदासस्वामींच्या प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ह्या ओळीची आठवण झाली! (वाचक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश 23/01/2008 - 21:43
हॅट्स ऑफ अविनाशराव..ही बघा टोपी उडवली :) एक गझल म्हणूनहि परिपूर्ण आहे -ऋषिकेश

प्राजु 23/01/2008 - 23:13
खूप छान आहे ही गजल... अशीच आणखी ही येऊदे. - प्राजु.

विसोबा खेचर 24/01/2008 - 07:23
आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके वा! सुंदर गझल... तात्या.

तळीराम 26/01/2008 - 22:02
गझल म्हणजे फक्त प्रेम, विरह, मद्य, साकी वगैरे अशीच आमची समजूत होती. या असल्या विषयावर गझल? सरकार इकडे लक्ष देईल काय?

इनोबा म्हणे 23/01/2008 - 20:53
अप्रतिम काव्य... वा! अविनाशराव....अशाच कविता करित रहा.... स्वत्व संस्कृती माय मराठी हवी जपाया मातीचा अभिमान पाहिजे, वाच पुस्तके या ओळी विशेष आवडल्या..

सुनील 23/01/2008 - 20:58
अशा विषयावरदेखील उत्तम गझल लिहिता येते असे वाटले नव्हते! रामदासस्वामींच्या प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ह्या ओळीची आठवण झाली! (वाचक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश 23/01/2008 - 21:43
हॅट्स ऑफ अविनाशराव..ही बघा टोपी उडवली :) एक गझल म्हणूनहि परिपूर्ण आहे -ऋषिकेश

प्राजु 23/01/2008 - 23:13
खूप छान आहे ही गजल... अशीच आणखी ही येऊदे. - प्राजु.

विसोबा खेचर 24/01/2008 - 07:23
आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके वा! सुंदर गझल... तात्या.

तळीराम 26/01/2008 - 22:02
गझल म्हणजे फक्त प्रेम, विरह, मद्य, साकी वगैरे अशीच आमची समजूत होती. या असल्या विषयावर गझल? सरकार इकडे लक्ष देईल काय?
वाच पुस्तके जगण्याचे जर भान पाहिजे, वाच पुस्तके! जगती जर सन्मान पाहिजे, वाच पुस्तके! साहित्याविण अर्थहीन हे अवघे जीवन जिंदगीत जर जान पाहिजे, वाच पुस्तके संस्कारांनी घडतो माणूस... मोठा होतो मानाचे जर पान पाहिजे, वाच पुस्तके सहा रिपूंच्या हल्ल्यापासून वाचवणारा हृदयी जर भगवान पाहिजे, वाच पुस्तके आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके स्वत्व संस्कृती माय मराठी हवी जपाया मातीचा अभिमान पाहिजे, वाच पुस्तके ----अविनाश ओगले

इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल!

चतुरंग ·

वेडा 21/01/2008 - 10:40
माझी आवड्ती गझल... का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा? की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा! भेटून वादळाला, इतुके विचार आता शाबूत एवढाही, का, कोपरा असावा ही नवीन २ कडवी समजली.. शतशः धन्यवाद चतुरंग

विसोबा खेचर 21/01/2008 - 12:28
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा क्या बात है! सुंदर... चतुरंगराव, ही गझल इथे दिल्याबद्दल आपलेही अनेक आभार.. तात्या.

धोंडोपंत 21/01/2008 - 15:30
इलाही जमादारांची ही गझल आमची अत्यंत आवडती आहे. ती येथे दिल्याबद्दल धन्यवाद. 'जखमा अशा सुगंधी' मधील अनेक गझला आमच्या आवडीच्या आहेत. आपला, (आभारी) धोंडोपंत तात्या --- तुझा फोन येऊन गेल्यावर आम्ही लगेच इलाहींना फोन केला होता. ते १६ फेब्रुवारीला मुंबईत येत आहेत. तेव्हा भेटायचे ठरवले आहे. आपला, (मध्यस्थ) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 21/01/2008 - 18:04
ते १६ फेब्रुवारीला मुंबईत येत आहेत. तेव्हा भेटायचे ठरवले आहे. इलाहीसाहेबांचा आवडता ब्रँड कोणता ते सांग फक्त! सगळी यथास्थित वेवस्था करू आणि झकासपैकी मैफल जमवू! इलाहीसाहेबांना खास मिपावर टाकण्यासाठी एखादी नवी पेशल गझल लिहायला सांगू.. :) आपला, (मैफलीत रमणारा) तात्या.

ऋषिकेश 22/01/2008 - 20:00
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा क्या बात है. इलाहींच्या गझला मी वाचलेल्या नाहित. 'जखमा अशा सुगंधी' हे पुस्त्क आहे की आल्बम? -ऋषिकेश

In reply to by आवशीचो घोव्

प्रमोद देव 25/10/2008 - 22:17
वाचलेली ऐकलेली, माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली, माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो, आरशावरती अता आरशाला भावलेली, माणसे गेली कुठे

प्राजु 25/10/2008 - 20:35
यांची माझी अतिशय आवडति गझल आहे ही.. किती वेळा वाचली असेल मी कोण जाणे.. जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा काय जबरदस्त आहे हा शेर..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आनंद 25/10/2008 - 20:49
मस्तच गझल,शोधतच होतो. पण मिपाच्या नियमात बसते? इतकी आवडती गझल वाचतानाही हे मनात आलच. कधी कधी नियमालही अपवाद ही असावेत.

In reply to by आनंद

चतुरंग 25/10/2008 - 22:17
ही गजल मी जेव्हा दिली तेव्हा मी नुकताच सभासद झालो होतो आणि तेव्हा मिपाही सुरुवातीच्या दिवसात असल्याने नियम वगैरे बनायचे होते. पुढे पुढे जालावरील ढकल साहित्य आणी कॉपी इतकी होऊ लागली की नियमात बदल करणे क्रमप्राप्त होते. असो. चतुरंग

चौथा कोनाडा 06/12/2019 - 08:46
सहजच मिपा चाळत असताना ही सुंदर गझल पुन्हा"भेटली" बाय द वे वे, आज सायंकाळी ७ वाजता, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, आगरकर रस्ता, पुणे इथं इलाही जमादार यांची प्रकट मुलाखत आहे !

ज्ञान 08/12/2019 - 17:10
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा माथ्यावरी नभाचे ओझे सदा ईलाही दाही दिशा कशाच्या हा पिन्जरा असावा – इलाहि जमादार

वेडा 21/01/2008 - 10:40
माझी आवड्ती गझल... का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा? की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा! भेटून वादळाला, इतुके विचार आता शाबूत एवढाही, का, कोपरा असावा ही नवीन २ कडवी समजली.. शतशः धन्यवाद चतुरंग

विसोबा खेचर 21/01/2008 - 12:28
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा क्या बात है! सुंदर... चतुरंगराव, ही गझल इथे दिल्याबद्दल आपलेही अनेक आभार.. तात्या.

धोंडोपंत 21/01/2008 - 15:30
इलाही जमादारांची ही गझल आमची अत्यंत आवडती आहे. ती येथे दिल्याबद्दल धन्यवाद. 'जखमा अशा सुगंधी' मधील अनेक गझला आमच्या आवडीच्या आहेत. आपला, (आभारी) धोंडोपंत तात्या --- तुझा फोन येऊन गेल्यावर आम्ही लगेच इलाहींना फोन केला होता. ते १६ फेब्रुवारीला मुंबईत येत आहेत. तेव्हा भेटायचे ठरवले आहे. आपला, (मध्यस्थ) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 21/01/2008 - 18:04
ते १६ फेब्रुवारीला मुंबईत येत आहेत. तेव्हा भेटायचे ठरवले आहे. इलाहीसाहेबांचा आवडता ब्रँड कोणता ते सांग फक्त! सगळी यथास्थित वेवस्था करू आणि झकासपैकी मैफल जमवू! इलाहीसाहेबांना खास मिपावर टाकण्यासाठी एखादी नवी पेशल गझल लिहायला सांगू.. :) आपला, (मैफलीत रमणारा) तात्या.

ऋषिकेश 22/01/2008 - 20:00
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा क्या बात है. इलाहींच्या गझला मी वाचलेल्या नाहित. 'जखमा अशा सुगंधी' हे पुस्त्क आहे की आल्बम? -ऋषिकेश

In reply to by आवशीचो घोव्

प्रमोद देव 25/10/2008 - 22:17
वाचलेली ऐकलेली, माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली, माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो, आरशावरती अता आरशाला भावलेली, माणसे गेली कुठे

प्राजु 25/10/2008 - 20:35
यांची माझी अतिशय आवडति गझल आहे ही.. किती वेळा वाचली असेल मी कोण जाणे.. जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा काय जबरदस्त आहे हा शेर..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आनंद 25/10/2008 - 20:49
मस्तच गझल,शोधतच होतो. पण मिपाच्या नियमात बसते? इतकी आवडती गझल वाचतानाही हे मनात आलच. कधी कधी नियमालही अपवाद ही असावेत.

In reply to by आनंद

चतुरंग 25/10/2008 - 22:17
ही गजल मी जेव्हा दिली तेव्हा मी नुकताच सभासद झालो होतो आणि तेव्हा मिपाही सुरुवातीच्या दिवसात असल्याने नियम वगैरे बनायचे होते. पुढे पुढे जालावरील ढकल साहित्य आणी कॉपी इतकी होऊ लागली की नियमात बदल करणे क्रमप्राप्त होते. असो. चतुरंग

चौथा कोनाडा 06/12/2019 - 08:46
सहजच मिपा चाळत असताना ही सुंदर गझल पुन्हा"भेटली" बाय द वे वे, आज सायंकाळी ७ वाजता, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, आगरकर रस्ता, पुणे इथं इलाही जमादार यांची प्रकट मुलाखत आहे !

ज्ञान 08/12/2019 - 17:10
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा माथ्यावरी नभाचे ओझे सदा ईलाही दाही दिशा कशाच्या हा पिन्जरा असावा – इलाहि जमादार
अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा? की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा! काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा भेटून वादळाला, इतुके विचार आता शाबूत एवढाही, का, कोपरा असावा दारात ती उभी अन्‌, नयनी अबोल अश्रू लाचार ती असावी, तो, उंबरा असावा माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही' दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा - इलाही जमादार