आभास
आभास
आभास फक्त होता, मी थांबले कितीदा
माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा
पाने झडून गेली,पक्षी उडून गेले
मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा
गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला?
मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा
पत्ता जुनाच होता, रस्ता तसाच होता
मुद्दाम आठवांना त्या टाळले कितीदा
होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे
( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा)
नव्हते म्हणे कुणाच्या यादीत नाव माझे
मुद्दाम त्यास त्यांनी डागाळले कितीदा
सोनाली जोशी
Taxonomy upgrade extras
मिसळपाव

आज चैत्र पाडवा! नव्या वर्षाची सुरुवात.
आज आपण घरोघरी गुढी उभारुन हा नवा दिवस साजरा करतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. आल्हाददायक असे उल्हसित करणारे वातावरण मन प्रसन्न करते.
आपण जी गुढी उभी करतो त्याला आंब्याची डहाळी, साखरेची माळ, एक वस्त्र आणि तांब्या लावतो. घरी जरी गोड्-धोड असले तरी एक प्रकार शास्त्रकारांनी सांगितला आहे; तो म्हणजे कडुनिंबाची चटणी. हा खाद्यप्रकार बर्याच जणांना आवडत नाही. अनेक लोक तेवढे सोडून बाकी सर्व काही करतात.