Skip to main content

विचार

वयम् मोठम् खोटम्!

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 17/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस हा एक विचीत्र प्राणी आहे. जे आपल्यापाशी नाही त्यासाठी झुरत असतो. ईतरांचे सोडा, पण आपल्यापाशी जे आहे त्याचे कौतूक त्याला स्वत:लाच नसते. कुणीतरी नमूद करून ठेवलेच आहे. आपल्या सर्व मित्रांची मुले आज्ञाधारक आणि हुशार असतात. समोरच्या बसस्टॉपवर उभ्या असलेल्या माणसांसाठी पटापट एकाच नंबरच्या दोन दोन बसेस येतात. आपल्या बाजूला मात्र हवी असलेली बस एक तास वाट पहायला लावून येते, आणि आपल्या पुढल्या माणसाला आंत घेतल्यावर कंडक्टर आपल्यावर खेकसतो "दरवाजा छोडो". एकूण आपल्याला जे हवे असते ते आपल्याला मिळतच नाही.

काही माणसं

लेखक ग्रीष्म यांनी बुधवार, 17/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणस काही माणस जगत असतात मरणाच्या आशेने, थोडेच असतात वेडे जे चालत जातात सरळ मरणाच्या दिशेने. दगडाला वेदना टाकिचे घाव सोसतांना, त्या मूर्तीला यातना ह्या बडव्याना पोसताना. अहो वर्दिला दुखः नको त्याना सलामी, बंदुकी ढाळतात अश्रु नशिबी दहशतवादाची गुलामी. माइकचा कंठ दाटे भ्रष्ट मंत्री खोकताना, लाउड स्पिकराचा जीव जाई खोट्या घोषणा ओकताना. गेंड्यालाही शरम वाटे ह्यांची जाड कातडी बघताना, डासही मुकतात जिवाला रक्त्त यांचे शोषताना. खादीला लाज वाटे ह्या नंग्याना झाकताना, खाकीचा उर फाटे त्या दंग्याना थोपताना. तिरंग्याचा घुतातो प्राण पार्थिव त्यांच झाकताना. स्मशानाला नकोसा जीव प्रेतांचा दुख: सोसताना
Taxonomy upgrade extras

रूपक

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 15/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
एक जंगलात एक माकड रहात होते.माकडाला एकदा वाटले की यदाकदाचित कधी जंगलाचा इतिहास लिहीला गेला तर आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जावे. आपल्या नातू पणतू खापरपणतू यानी आपली नाव अभिमानाने घ्यावे. आपल्या नावाने खानादानाला ओळखले जावे. त्या लोकानी मिशांवर ताव देत म्हणायला हवे की आमचे आजोबा पणजोबा खापरपणजोब इतके शूर होते इतके पराक्रमी होते.त्यानी भिंतीवर फ़ोटो मिरवायला हवे. पुतळे रोज हारानी मढवले जायला हवेत झाले; माकडाने ते मनावरच घेतले.एखादी संधी मिळाली की झाले. शौर्य दाखवायला मिळायला हवे. मग बघतोच .

किती सुंदर विचार

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 15/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.त्याना जरा बरं नव्हतं.मला म्हणाले, "तुमच्या सहवासात राहून मला पण काही विचारांची प्रेरणा येते." मी म्हणालो, "भाऊसाहेब,जे सुचतं ते निर्मिती होण्यासाठीच असतं.तुम्हाला जे सुचेल तेच मला सुचणार नाही.आणि हीच तर गम्मत आहे.निसर्गातच बघा,किती विवीधता आहे.एका सारखं दुसरं नाही.मी वाचलंय समुद्रात असंख्य जीवजंतू,वनस्पती आहेत की पुढली हजार वर्ष जरी माणसाने त्याची डेटाबेस करायची ठरवली तरी प्रयत्न पुरा होणार नाही.बरं ते राहूदे तुम्हाला काय सुचतं ते सांगा" मला म्हणाले, "निसर्गाकडून खूप काही शिकता येतं.दुसऱ्याला काही देताना गर्वाने अथवा घमेंड करून देऊ नये.उलट आदराने व प्रे

मास्तरांची "एक प्रश्नपत्रिका"

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 14/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरची रहदारी जोरात आहे सध्या, भरपूर नवीन सदस्य येत आहेत... तर नवनवीन सदस्यांना असलेली माहिती तपासून पाहण्यासाठी आणि आपल्याला काय माहिती असलं पाहिजे हे समजण्यासाठी ही एक प्रश्नपत्रिका. ( अर्थात अभ्यासक्रम व्यापक आहे, आणि प्रश्नपत्रिका अतिशय छोटी आहे..ती सर्वसमावेशक आहे असा अजिबात दावा नाही... खूप महत्त्वाचे उल्लेख राहिले असणार... आपण आपापले प्रश्न प्रतिसादात लिहू शकता..) संदर्भासहित स्पष्टीकरण करा. १. झेपेल तितका वेळ चालवेन नाहीतर बंद करून टाकेन. २.शुभे़च्छा आहेतच पण लोकशाही आली तर बरं होईल. ३.मी आंतरजालीय शरद पवार आहे.

का असे केलेस?

लेखक मीनल यांनी शुक्रवार, 12/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
ई सकाळ मधील पैलतीर मधे आजच माझी ही कविता प्रकाशित झाली.

ऋण मातीचे..

लेखक राघव यांनी गुरुवार, 11/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
ऋण मातीचे कसे विसरले? कुठे सोडली लाज मुलांनी? पैशाच्या माजात गोठती श्वास कोवळे कणाकणांनी.. का अब्रुचे धिंडवडे अन् देहाचे बाजार निघावे? व्यापाराचा बाज निराळा, पाप जोडती मणामणांनी.. चहुबाजूंना कोंदटलेली डबकी-नाल्या-उघडी गटारे, एक झराही दुर्लभ झाला, घाण पसरते मणामणांनी.. वाट कुणाची बघतो आपण?

राख.....

लेखक किरण मल्लाव यांनी बुधवार, 10/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
राख..... नाकात कापुस घालु नका, संगतीने माझ्या चालु नका.... प्राण माझे कधीच गमवले, परत मला मारु नका..... रडण माझ नाही ऍकल, आता तुम्ही रडु नका.... लग्नात मी सजलो नव्हतो, सरणावर मला सजवु नका.... संकटात कोणी नाही आले, बघ्यांची गर्दी करु नका...... जीव गेला पाणी-पाणी करता, दोन-दोन घोट पाजु नका..... देवाला कधी पुजले का तुम्ही...? राम नाम तोंडात घेऊ नका.... कोणी एक बोट नाही दिले, चार-चार खांदे देऊ नका..... शरीर जळुन गेले माझे, उरलेली राख जाळु नका...... किरण रामचंद्र मल्लाव..08 @धन्यवाद........!
Taxonomy upgrade extras