Skip to main content

विचार

पर्यावरणवादी व शास्त्रज्ञांना सुचना

लेखक अमृतांजन यांनी बुधवार, 30/12/2009 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
कोपनहेगनची परिषद निष्फळ झाल्यामुळे मला राहवले नाही व मी निराश झाले. पृथ्वीवासियांना ग्लोबल वार्मिंगमुळे पडणाऱ्या कडाकाच्या थंडीत थोडीशी वैचारीक ऊब कशी देता येईल ह्याचा मी खूप विचार करता मला पुढील पर्याय दिसले; तेच मी आपणासमोर मांडत आहे. १. समुद्रात परागकण, बिया, सोडावीत. त्या तरंगतील व ढगांची निर्मीती होतांना त्या ढगात जातील. पावसाबरोबर जमीनीवर पडतील व विनासायास सगळीकडे जंगले वाढतील २. वरील उपायांबरोबरच खतेही अशाच प्रकारे त्या बियांबरोबर पुढील नक्षत्राच्या पावसाबरोबर पोहोचवता येतील. ३.

"रिश्ते में तो ..."

लेखक मीनल यांनी शनिवार, 19/12/2009 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
श्री आर बालकृष्णन बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला `पा` हा चित्रपट नुकताच प्रकाशित झाला आहे. या चित्रपटाची कथा इंटरनेट वर तसेच टीव्ही वरच्या जहिरातीतूनही सांगितली गेली आहे. कथा तशी वेगळी असली तरी दुर्बळ आहे. त्यामुळे उत्कंठा वाढवणारा हा चित्रपट नाही आणि कथेत खूप बदल घडवणारे प्रसंगही नाहीत. मध्यंतरा आधीच चित्रपटाचा शेवट काय असेल ह्याचा अंदाज बांधता येतो. कॉमेडी ,सस्पेन्स, थ्रीलर, ऍक्शन वगैरे प्रकारांच्या जवळूनही जाणारा ही सिनेमा नाही.

होतं असं कधी कधी...

लेखक अनामिक यांनी शुक्रवार, 18/12/2009 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी अगदी लहान होतो तेव्हा बाबांबरोबर घडलेली गोष्टं (मी ऐकलेली). माझ्या दादाचं शाळेत नाव घालायचं होतं म्हणून बाबा गावातल्याच शाळेत गेले. तिथले कर्मचारी, शिक्षक तसे ओळखीचेच होते, त्यामुळे आधी गप्पा झाल्या आणि नंतर दादाच्या नाव नोंदणीचा फॉर्म भरायला घेतला. त्यात मुलांचं नाव काय असं विचारलं आणि बाबा गोंधळात पडले... घरी दादाला 'दादा'च म्हणत होते सगळे आणि त्यामुळे बाबा त्याचं नावंच विसरले होते... झाली का पंचाईत! सगळे कर्मचारी हसायला लागले.... नाव काही केल्या आठवेना... तेव्हा लोकांसमोर हशा तर झालाच, पण घरी नाव विचारायला आल्यावर काय झालं ते विचारू नका.

तुमच्या गावाचे नाव काय?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/12/2009 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही खेडेगावात राहत असाल, शहरी असाल. तुम्ही राहता त्या गावाचे नाव घ्या, किंवा तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही गावाचे (किंवा गावांची नावे) नाव घ्या. त्या गावांची नावे कशी पडली असतील असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय? तुम्ही त्यावर विचार करून ते नाव का ठेवलेय असा कधी विचार केलाय? नक्कीच केला असणार. मी तर बुवा गावाचे नाव कसे पडले असेल त्याचा विचार करतो. उदाहरणच द्यायचे झाले तर: पिंपळगाव. गावात (पुर्वी) पिंपळाची झाडे जास्त. वडगाव : गावात (पुर्वी) वडाची झाडे जास्त होती. (आता कसली झाडे जास्त?) हे झाले आपले सरळसोट नावे असलेली गावे. पण काही गावांची नावे इरसाल असतात.

हिषेब्...जमा खर्चाचा

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 16/12/2009 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष संपत आले की प्रत्येक वर्षी हेच फीलिंग येते. कोनीतरी अगदी जवळचे दुरावणार असल्यासारखे राहून राहून वाटत असते. डिसेंबर चा पहिला पंध्रवडा या हुरहुरीत जातो अन दुसरा येतो कधी अन जातो कधी तेच कळत नाही इतक्या भर्रकन संपलेला असतो. या सरत्या वर्षात काय मिळवले काय गमावले याचा कधीतरी लेखाजोखा मांडुयात. नक्की काय अनुभव पदरी पडले ते पहाण्यात.प्रत्येक वर्षाखेरीला हा विचार मनात अख्खा महिनभर वारंवार डोकावत असतो. आणि आपण एखाद्या बेसावध क्षणी झोपायच्या तयारीत असताना हा विचार एकदम तोंड वर काढतो. झोपेची आराधना वगैरे करावे लागत नाही. विचारांची गाडी सुरू होते. आठवणींची स्टेशने मागे मागे जायला सुरुवात होते.

मराठी कुठं बोलावं..

लेखक सुवर्णा यांनी बुधवार, 16/12/2009 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावर मिपावर खूप वेळा चर्चा झालेली आहे पण आज असा एक अनुभव आला की हा लेख लिहावासा वाटला.. आज आमच्या हापिसामधे चहा-पानाच्या वेळी घडलं हे: मी, २ अमराठी सहकारी (जे माझे ब~यापैकी चांगले मित्र आहेत) आणि ३ मराठी सहकारी असे कट्टा करुन चकाट्या पिटत होतो.. वातावरण खेळीमेळीचं होतं.. आणि वायफ़ळ विषयावर विनोद वगैरे चालू होते.. त्यात मी एका मराठी सहका~याशी मराठीत विनोद केला (काय ते आता माझ्याही लक्षात नाहीये, काहीतरी फ़ुटकळच होतं) तर ही अमराठी मैत्रीण म्हणाली "तुम्हारा ये मराठी मंडल कही और लेके जाओ. (ती मजेत बोलुन गेली असावी)"..

एक अस्वस्थ रात्र

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 16/12/2009 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री एकचा सुमार असेल. काळी कभिन्न रात्र! थंडीचा कडाका अर्धवट झोपेत जाणवत होता. बेडरूममधला छोटा दिवा मिणमिणत होता. त्याचा पांढुरका मंद प्रकाश खवळलेल्या अंधाराला भगदाड पाडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. अंधाराने जणू त्या मंद आणि रडवेल्या प्रकाशाचे धड आपल्या मुठीत गच्च पकडून ठेवल्याचा भास होत होता. मी एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर वळत पुन्हा गाढ झोपी जाण्याचा प्रयत्न केला. नाही जमलं. अर्धवट झोप आणि विचारांची अविरत चालणारी चक्की! शांत झोप लागत नव्हती. झोपण्याच्या काही क्षण आधीच मित्राचा एसएमेस वाचला होता.

खरी कमाई....

लेखक भानस यांनी बुधवार, 16/12/2009 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय साध्या साध्या गोष्टी किती सुख देऊन जातात. अनेकदा त्या करणाऱ्याला त्याचा गंधही नसतो. तो आपला नेहमीच्या रहाटगाडग्यात अगदी नकळत ते करून जात असतो. पण ते दुसरे मन मात्र हा चांगुलपणा टिपत असते. आणि कुठेतरी त्या मनातही या अनपेक्षित मदतीच्या ओघाचा जन्म होतो. त्यातल्या निखळ सुखाची त्याला एकदा का गोडी कळली की आपसूक तोही त्या साखळीचा हिस्सा होऊन जातो. मी याबाबतीत खूपच भाग्यवान. अनेक मित्र-मैत्रिणी, ओळखीचे, अनोळखीही माझ्या जीवनात अनेकप्रकारे बंध निर्माण करून गेलेत. ही ’ खरी कमाई ’. सहजी केलेली निरपेक्ष गुंतवणूक.

सिंहगड माझ्या नजरेने....

लेखक दशानन यांनी सोमवार, 14/12/2009 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
रवीवारचा सुस्त दिवस सार्थक लावावा ह्या विचाराने आपली यामाहा घेऊन सरळ सिंहगडचा रस्ता पकडला, सकाळ सकाळी १० वाजता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ पाहून मन आनंदीत झाले. मस्तपैकी इकडे तिकडे बघत कधी चढ संपवून गडावर पोहचलो ते समजलेच नाही. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड दिसतो कसा ह्यांची मनात खुप हुरहुर लागून राहिली होती व गडावर पोहचतात चारीबाजूची गर्दी पाहताच मन निराशेने भरले. जसे एखाद्या पिकनिक स्पॉटचे वातावरण असते तसेच वातावरण गडावर ही दिसत होते, चारचाकी-दुचाकी गाड्यांचे ताफेच्या ताफे उभे होते.

......आणि मग

लेखक मन यांनी शनिवार, 12/12/2009 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
......आणि मग शुभ कार्याची तुझ्या उडेल लगिन घाई,येइल तुझ्या वसंत आयुष्यी- पहाटपालवी तिच्या अवखळ ,अल्लड, सोनपावलांनी. तिच्या ओल्-स्वभावी बनेल माझी पुत्री. जोडुन नाती ,रचुन नवी प्रेमबंधनं घर बनविल ती प्रेमनिवास. येताच माहेर आल्हाद आठवणी,जोडिल ती -घडवील सासर तशाच साठवणी ..... लागेल लळा,जुळतील मने ,नर्म प्रसन्न दर्शानाची तिच्या सवय होइल . रामप्रहरी दोघांचा सुहास्य दिनारंभ होइल. दिस जातिल, स्वर एक होतिल. सासु-सुनेची स्पर्धा न राहता माय्-लेकिची मेणमउ माया बनेल . चौघांच्या आपला मित्र मैफिली जमतील.