Skip to main content

विचार

भुर्जपत्र ते वेबपेज

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 03/03/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
भुर्जपत्र ते वेबपेज हा साहित्यप्रवास उलगडणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात संमेलन पुर्व संमेलनात झाला. किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. डॊ सतिश देसाई यांनी एकुण कार्यक्रमाची रुपरेषा व संकल्पना सांगितली. परिसंवादाला प्रसिद्ध लेखक अनिल अवचट, मराठी अंकाचे ई संपादक व कवि महेश घाटपांडे, साहित्यक व समन्वयक मिलिंद जोशी, पत्रकारिता क्षेत्रातील माजी संपादिका साप्ताहिक सकाळ श्रीमती संध्या टांकसाळे, वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख उज्वला बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी ब्लॊगर व स्टार माझाचे सहा. निर्माते प्रसन्न जोशी यांनी केले. अनिल अवचटांनी आपला संगणक प्रवास सांगितला.

बांगड्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 28/02/2010 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
नगरला लहानपणी वाड्या मधे कासार यायचा..पाठीवर पेटारा असायचा... आत रंगी बेरंगी बांगड्या..आला कि मजेदार आरोळी द्यायचा...बांगड्या घ्या बांगड्या ..बायकाना विकत..पुरुषाना फुकट..असे एकले की आम्ही मुले हसायचो...आज आठवले कि त्याच्या त्या स्लोगन च्या कल्पकतेची मजा वाटते.

गृहप्रवेश

लेखक स्मृती यांनी शनिवार, 27/02/2010 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
"पसंत आहे हं आमच्या जयला तुमची लेक" आईंचा फोन आला आणि आमच्या घरचं वातावरण एकदाचं मोकळं झालं. दहा-बारा मुलगे बघितल्यावर आपल्या नकटीला हा जयदीप चित्रे पसंत पडलाय तर आता त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळतोय की नाही या चिंतेत आई बाबा होते. त्या रात्री काही मला झोप म्हणून लागली नाही. आपलं लग्न होणार आता, म्हणजे नवीन घरात रहायला जायचं, दिवसाचं रूटीन पुर्णपणे बदलणार. आई, बाबा, चिनूला भेटायला परवानग्या काढाव्या लागतील की काय?!... आणि मुख्य म्हणजे हा प्राणी जयदीप.. तसा त्या दिवशी बरा वाटला.. सुलझा हुआ, डिसेंट, लेव्हल हेडेड वगैरे वगैरे, पण खरंच तसा असेल ना??...

कंट्रोल....

लेखक भानस यांनी गुरुवार, 25/02/2010 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
( साधारण सव्वासात-साडेसातच्या दरम्यान मीनल व महेश घरी येत असत. बहुतेक वेगवेगळे क्वचित ठरवून स्टेशनवर भेटलेच तर बरोबर. मीनलचे भाजीपाला-खाऊ, गरजेच्या गोष्टी खरेदीत महेश वैतागत असे त्यामुळे शक्यतो ही सारी कामे मीनल एकटीच करी. आजही नेहमीप्रमाणे भाजी घेऊन मीनल पाळणाघरात गेली. चार वर्षाची मधुरा आईची वाट पाहतच होती. रिक्शातून उतरून मीनलने तिला हात केला तशी मावशींना टाटा करून मधुरा तिची छोटीशी बॅग घेऊन खाली आली व मीनलला मिठी मारून बसली. दिवसभराच्या अनेक गोष्टी आईला सांगायच्या असल्याने मधुराने चिवचिवाट सुरू केला. मायलेकी दहा मिनिटात घरी पोचल्या.

ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली

लेखक नितीनमहाजन यांनी गुरुवार, 25/02/2010 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात एकांतवासात असताना त्यांची काव्यप्रतिभा बहरली. त्या उर्मीतच त्यांना "कमला" सारखी खंडकाव्येही स्फुरली. या कविता शब्दबध्द करण्यासाठी त्यांनी बारीबाबाकडे कागद व टाकाची मागणी केली. त्या अक्कलशून्य, बिनडोक व उलट्या काळजाच्या बारीबाबाने ती मागणी मान्य केली नाही. सावरकरांची काव्यप्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी त्यांच्या कोठडीच्या छोट्याशा गवाक्षातून दिसणार्‍या आकाशाला विनंती केली की तू माझ्यासाठी कागद व्हायला तयार आहेस का? त्या घमेंडखोर आकाशाने उत्तर दिले: तुझी लायकी आहे का माझ्याशी बरोबरी करायची?

ए देवबप्पा....

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 24/02/2010 06:17 या दिवशी प्रकाशित केले.
ए देवबप्पा ऐकू येते का रे काही तुला त्या आरतीच्या गोंगाटात टाळ्या अन झांजेच्या खणखणाटात लोक काय काय मागत असतात अन गार्‍हाणी सांगत असतात कुणाला काय हवे असते रुपं देही धनं देही पुत्रं देही सर्व कामांशा देही मे गात असतात किती ते तुझे गोडवे अन म्हणतात की जो गाईल ही आरती मिळेल त्याला सर्व हवे ते पण खरे सांग एकदा खरेच ऐकु येते का रे तुला? सांग ना..... ए देवबप्पा दिसते कारे काही तुला गाभार्‍याच्या बाहेरचे त्या चिमुकल्या दाराच्या फटीतून किंवा त्या जाळीच्या दरवाजाच्या पलीकडचे त्या रोषणाईच्या झगमगटात? किती डोळे लागलेले असतात आशेचे डोहाळे घेऊन आलेले असतात ताटकळत उभे असतात दर्शनासाठी तुझ्यावर केलेल्या रो

अशीच जर आमुची आई असती........

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 20/02/2010 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच जर आमुची आई असती........ असे हो कोणी दिनीचा तो वार लागला होता महाराजांचा दरबार आमचे मध्ये राजे भोवती सरदार स्वराजाचा चाले असा कारभार जी........

<फालतू धागे आणि विडंबने>

लेखक लंबूटांग यांनी मंगळवार, 16/02/2010 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
ती - तुला हे २-४ ओळींचे धागे, लोणची/थालिपीठांचे कौल, काथ्याकूट आवडतात? तो - नाही ती - अरसिक कुठचा! तो - मी अरसिक म्हणून तर मिपा आवडते. ;) ती - चूप्प . एकदम चूप्प!! तो - तुला कुठे विडंबने आवडतात? ती - त्यात काय असतं आवडण्यासारखं? तो - तेच जे तुमच्या २ ओळींच्या धाग्यांत, लोणची/थालिपीठांच्या कौलांत, काथ्याकूटांत असतं ती - तुझी विडंबने लई खवट आहेत. तो - असल्या धाग्यांवरूनच तर ती सुचतात. मग ते धागे फालतू की विडंबने ? :P ती - मी नाही ज्जा!! विडंबनेच का नाही लिहीत? तो - कारण ती तुझ्या धाग्यांसारखी मनात आले की पाडता येत नाहीत, आणि फार काळ मालक/ संपादकांपासून सुरक्षित राहातही नाहीत. :) ती - अजून काही?