त्यांनी जेव्हा मला विचारलं
आपण कोण!
तेव्हा माझ्या मनी प्रथम उत्तर आलं
या अफाट विश्वातला एक छटाक माणुस मी!
पण मनातलं उत्तर ओठांवर येण्याआधीच
कानी आला ओरडा
देशद्रोही, भारत माता की जय, जयहिंद!
अन तेव्हा मी म्हणलं
मी एक भारतीय हेच बरोबर उत्तर असेल बहुतेक!
तेव्हढ्यात कुणीतरी चिरकलं
काफीर, दार-उल-हर्ब, गर्व से कहो हम हिंदु है!
तेव्हा मी विचार केला
मी हिंदु असंच सांगण योग्य!
पण तेव्हढ्यात कानी आला गलका
घाटी, भांडी घासा आमची, घास रे रामा, जय महाराष्ट्र!
मग मनी म्हणलं
आहेच मी मराठी तर गरजेन जय महाराष्ट्र!
तोवर कुजबुज सुरु झाली
सवर्ण, दलीत, बामण, ९६ कुळी!
मग मला आठवली
जातीकरता खावी माती ही उक्ती!