Skip to main content

विचार

लव्ह युवर जॉब. डु यु?

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 01/09/2010 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. आजकालच्या शक्यतो तरुण मंडळींच्या गप्पांमधे एक सर्रास आढळणारा विषय. आमीर खानच्या थ्री ईडीयट्स मधे सुद्धा हाच संदेश दिला आहे. जे आवडते ते मन लावुन करा, यशस्वी आणि आनंदी व्हाल. उगाच पैसे कमवायचे म्हणुन एखादे काम करु नका, त्यातुन पैसा मिळेल पण जीवनाचा आनंद नाही. ह्या विषयावर मी/तुम्ही सुद्धा कित्येक जणांशी चर्चा केली असेल. पण याच खरं उत्तर एखादा सामान्यवर्गीय (सामान्यवर्गीयांची व्याख्या व्यक्तीसापेक्ष) देऊ शकेल?

प्रिय राहूल देशपांडे,

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 01/09/2010 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय राहुल देशपांडे, (केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद, मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू म्हणून कुठेही दुराभिमान नाही, बडेजाव नाही, की त्यांची कुठे भ्रष्ट नक्कल नाही.

वेल् ... मला वाटलं ते लिहीलं

लेखक शुचि यांनी सोमवार, 30/08/2010 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन प्रकल्पावर रुजू झाले आहे. आत्तापर्यंत थोडेच सहकारी मिळाले आहेत. पैकी एक बराच संबंध येणारा सहकारी - त्याला आल्याआल्या ओळख झाल्यानंतर पहीला प्रश्न विचारल्याशिवाय रहावलं नाही - "फॅमिली इथे आहे का?" बर्‍याच जणांना नसत्या चौकशा लागतात तेही लगेच. नंतर २ दिवसात क्युबमधे येऊन विचारलं " तू काम सुरू केलंस का? तुला काही काम दिलय का?" मी म्हटलं "नाही फक्त फन्क्शनॅलिटीच शिकतेय." जरी मला काम दिलं असलं तरी मी कशाला माझे पत्ते उघडे करू हा काय माझा बॉस आहे का अपडेट्स मागायला? नोझी पीपल. परवा माझ्या क्युबिकलमधून खुर्ची मागुन घेऊन गेला ती परत केलीच नाही. हे साधे एटीकेट्स नाही का?

झोपाळा... आयुष्य...

लेखक एक अनामी यांनी सोमवार, 30/08/2010 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य... आयुष्य म्हणजे एक झोपाळाच... वेगात झोके घेत असतानाच कसा झोपाळ्यातला खरा आनंद लुटता येतो तसाच वेगवान आयुष्य जगत असताना जीवनातला खरा आनंद मिळतो... जसजसा झोपाळ्याचा वेग कमीकमी होत जातो अन त्यातला आनंद सरत जातो तेव्हा खरंतर पुन्हा स्वतःहून झोका घेऊ शकतो पण ते जरा कठीण असतं, त्याऐवजी झोका देण्यास कुणी असेल तर पुन्हा अलगद वेगावर स्वार होणं त्यामानाने सोपे असते... तसाच आयुष्याचा-जगण्याचा वेग कमी होतो, पुन्हा गाडी रूळावर यायला एकत्याचे प्रयत्न अपुरे पडतील की काय ? असा प्रश्न पडतो तेव्हा खरं कुणाच्यातरी आधाराची गरज असते...

दवबिंदू...

लेखक एक अनामी यांनी रविवार, 29/08/2010 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसं असतातंच अशी... दवबिंदूसारखी... त्यांचं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी असतं... पण ते कधी कुणाला जाणवतंच नाही... आणि जेव्हा जिथे त्यांचं अस्तित्व जाणवतं तेव्हा तिथे घालवलेले क्षण हे नेहमीच सुखदायक असतात... कधीतरी भल्यापहाटे दवबिंदूंनी ओल्या झालेल्या हिरव्यागार गवतावर शांतपणे निजुन तर पहा... पहा ते क्षण किती अविस्मरणीय असतात...!!!!!!!

शितावरून भाताची परीक्षा होऊ शकते, एक-दोन माणसावरून भगव्याची लायकी निघते. हिंदू लोक काय भात आहेत काय ?

लेखक गांधीवादी यांनी शुक्रवार, 27/08/2010 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सगळ्यांचे लाडके लुंगी पुचाट केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी 'भगवा दहशतवाद' असे संबोधून जो हिंदूंचा अपमान केला आहे तो हिंदू कधीच विसरणार नाही, आम्ही एक शब्द देखील तोंडातून काढला तर आमच्यावर आगपाखड होते काही पांढरपेशा लोकांची ह्य संकेत स्थळावर, पण हे लुंगी पुचाट वाट्टेल ते बडबडतात ते मात्र सगळे मुग गिळून गप्पा बसतात, अरे पण काहून सुद्धा थुंकायची लायकी नाही असल्या लोकांची. हिंदूंची सहनशीलता हि आता हळूहळू भेकडपना बनू पाहत आहे , काही पेटी मतांसाठी हे लोक समग्र हिंदू लोकांना दुखवू पाहतात, पण ह्यांना कोण अक्कल शिकवणार ?

श्री. श्री धमाल मुलगा यांचे अभिनंदन

लेखक निखिल देशपांडे यांनी शुक्रवार, 27/08/2010 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल मिपाचा दर्जा खुप खालवलाय म्हणे.. सारखे कैच्या कैच फुटकळ धागे येत असतात!!!! मग अशा फुटकळ धाग्यात आम्हीही एक भर घालावीच म्हणतो. संपादक मंडळाला आमचा धागा उडवायचा पुर्ण अधिकार आहे याचे भान आम्हाला आहेच. पण मिपाच्या लेखनप्रकारात आम्हाला सद्भावना, शुभेच्छा आणि अभिनंदन असे लेखनप्रकार दिसले आणि आम्ही हा लेख लिहायची हिम्मत केली. (आता तुम्हाला म्हणून सांगतो, आम्हाला कळलंय की संपादक मंडळाला असे अभिनंदनाचे धागे आवडत नाहीत. कोण म्हणे रे तो आम्हाला कसे कळले??? अरे संपादक मंडळात राहुन अशा बातम्या कळत नाहीत रे भौ. त्यासाठी खास उपक्रमावर जाऊन रिकामटेकड्या लोकांचा खरडवह्या चाळ्यावा लागतात Wink.

खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 26/08/2010 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत सध्या खासदारांच्या पगारवाढीचा मुद्दा देशात सर्वदूर गाजतोय. खासदारांच्या पगारवाढीबद्दल सर्वसामान्य जनतेत विशेषत: शेतकरी वर्गात प्रचंड रोष असणारच, असे गृहीत धरून आलेली संधी "कॅश" करायला हवी, अशा उद्देशाने एका संपादकाने मला मेल केली. त्यातील मजकूर असा.

आतून किर्तन-वरून तमाशा

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी गुरुवार, 26/08/2010 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या वाचकांनो सप्रेम नमस्कार!!! मिसळपावची मनसबदारी मिळाल्याचा विरोप येऊन पडला होता पण दरबारात हजर झालो नव्हतो. आता झालो आणि एक पोस्ट टाकलीसुध्दा. आता ही माझी स्वत:ची ओळख करून देणारी पोस्ट - मिसळपाववर अशी पध्दत आहे की नाही ते माहित नाही पण अपने बारे में जरूर कुछ कहना चाहुंगा. तसा कानूनी पूछताछ करणारा रेडिमेड फॉर्म आहे व्यक्तिरेखा तयार करताना पण त्यात जास्त काही सांगता येत नाही. म्हणून इतर सगळ्या फॉर्म सारखा तोही निम्मा-अर्धा कोराच सोडून दिलाय. इथे का आलो?? येऊन काय करणार?? नसतो आलो तर काय फरक पडला असता? काय मिळणार इथे येऊन?

पहिला अनुयायी (बाबागिरीच्या साबणाचा गिऱ्हाइक) असा मिळवावा

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 22/08/2010 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांनी 'पहिला अनुयायी कसा मिळवावा' यावर काथ्याकूट टाकला, त्यावर खूप मोठी चर्चा झाली, श्रद्धा, अंधश्रद्धा, नास्तिकपणा वगैरे विषय चघळले गेले. 'कुंभार थोडे गाढवं फार, त्यामुळे हे सोपं असतं' किंवा 'अमुक बाबाला नशीबाने असे अनुयायी मिळाले' वगैरे आख्यायिका झाल्या. तरी अदितीच्या 'पहिला अऩुयायी कसा मिळवावा?' मूळ प्रश्नाला उत्तरं मिळालीच नाहीत. ती देण्याचा हा प्रयत्न. तो धागा जवळपास 200 पर्यंत गेल्याने इथे त्याची नवीन सुरूवात करतो आहे. पामरावर श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांचा कोप होणार नाही अशी आशा.