Skip to main content

विचार

फोनवरचा संवाद व काही प्रश्न

लेखक शानबा५१२ यांनी गुरुवार, 09/09/2010 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,नमस्कार............ मी काही दीवसांपुर्वी "सल्ला हवा आहे" वगैरे काहीतरी एक लेख लिहला होता व विचारल होतं की अमुक व्यक्तीला फोन करायचा आहे.काय बोलु वगैरे.ती माझ्या वर्गात होती.आम्ही ५ ते १०वी एकत्र होतो. मला ह्या लेखातुन काहीतरी सांगायच आहे व विचारायच आहे.आजचा संवाद सांगितल्यानंतर विचारतो. "हॅलो"मी "कोण?"ती. "कोण लीना? मी सुशांत बोलतोय" मी ८-९ वर्षांनी तिच्याशी बोलत होतो.पाहील्याला पण तेवढीच वर्षे झाली. "सुशांत.....हा बोलना"तिचा शंकेने भरलेला सुर. "कुठे आहेस?"मी "कोण सुशांत?" "मी तुझ्या वर्गात होतो ना?.............तो" "तु कोणी वेगळ आहेस का?

किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना?

लेखक भानस यांनी गुरुवार, 09/09/2010 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
' अ वेनस्डे ',' अब तक छप्पन ' हे दोन्ही सिनेमे मी कमीतकमी २५-३० वेळा पाहिले असतील. शिवाय कधीकधी तर कुठूनही सुरवात करून कुठेही बंद केले... असेही पाहिलेत. हे दोन्ही सिनेमे पाहताना वारंवार वाटते, असे खरेही कधी घडावे. हा ' स्टुपिड कॉमन मॅन ' मला हवाय. आतुरतेने मी त्याची वाट पाहतेय. ते आमचे शेकड्याने मारत आहेत तर किमान त्यांचे दोन तरी मारले गेलेले मला पाहायचेत. कुठलाही अतिरेकी हमला झाला की जीव मुंडके अर्धवट चिरलेल्या कोंबडीसारखा तडफडू लागतो. खरे तर मुंडके कधीचेच चिरलेय, त्यावर पुन्हा पुन्हा नव्याने सुरी फिरवली जाते. कधी छातीवर तर कधी पाठीवर.... वारच वार. अव्याहत व पद्धतशीर.

खीर

लेखक भानस यांनी सोमवार, 06/09/2010 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
तिचे हात एक एक टाका सफाईदारपणे घालत होते. झरझर. एकसारखा. टपोरा. लवकरात लवकर तिला ही दुलई पुरी करून द्यायची होती. शक्य झाले तर आजच. त्या बदल्यात मिळणार्‍या शंभर रुपयात तिच्या जागोजागी फाटलेल्या संसारात निदान मीठ-मिरची-तेलाचे ठिगळ लागले असते. दोन्ही पोरींच्या तोंडात चार दिवस दोन घास पडले असते. दिवसभर मान मोडून पाठीचा काटा पुरा ढिल्ला करून एकदाची दुलई पुरी झाली. जोरदार झटकून तिवर अजूनही लोचटासारखे चिकटलेले धागेदोरे तिने काढले. वरच्या तारेवर दुलई टाकून निरखून पाहू लागली. दुलई सुंदरच झालेली. मऊमऊ. निगुतीने टाचलेली. एकही ओळ वाकडी नाही का एकाही तुकड्याचा तोल ढळलेला.

द्यायचाच आहे तर असा एखादा वर दे माऊली..

लेखक मेघवेडा यांनी सोमवार, 06/09/2010 03:16 या दिवशी प्रकाशित केले.
"श्रीपाद.." आवाज ओळखीचा नव्हता. श्रीपादपंत डोळे चोळत उठून बसले. काळामिच्च अंधार. त्या अंधारात त्यांच्या समोर एक तेजस्वी आकृती उभी होती! ते काही बोलणार इतक्यात ती आकृतीच पुढे बोलू लागली, "श्रीपाद, तू आयुष्यभर माझी नि:स्वार्थ सेवा करीत आला आहेस. तुझ्या या परार्थसिद्ध सेवेने मी प्रसन्न झाले आहे. माग, आज तुला हवा तो वर माग वत्सा!" "माऊली! साक्षात श्री देवी माऊली! खरंच विश्वास बसत नाही!" म्हणत श्रीपादपंतांनी साष्टांग नमस्कार घातला. कृतकृत्य भाव त्यांच्या चेहर्‍यावर उमटले. "आज तुझ्या दर्शनाने जन्माचे सार्थक झाले आहे माते. आता मला आणखी काही नको." "आयुष्यभर स्वतःसाठी काही मागितलं नाहीस.

वाचा आणि शोधा

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी सोमवार, 06/09/2010 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
१. तुम्ही तुमचं शरीर सोडून कधीच कुठंही जाऊ शकत नाही. २. तुम्हाला वाटते की तुम्ही हुशार आहात, नो!!!! सर्व माणसे मानसिकदृष्ट्या महामूर्ख असतात, येस!!! पण प्रत्येकाचे शरीर हुशार असते. ती एक वेगळी संस्था आहे (इथे वैद्यकिय दृष्टीकोणातून पाहू नये) पुढच्या वेळी नखे वाढतील तेव्हा नजर ठेवा. तुम्ही कधीच सरळ उठून नखे काढायला सुरूवात करीत नाही. आधी हात तुमच्या डोळ्यांसमोर येतो, तुम्हाला नखे वाढल्याचे दिसून येते (हा अक्षरश: शरीराच्या विशिष्ट भागाने दिलेला सिग्नल असतो) आणि मग नखे काढण्याचा विचार करता. ३. मोठ्ठा आवाज होतो तेव्हा, शरीर एकदम दचकते.

गैरब्राह्मणी ब्राह्मण

लेखक सारंग कुलकर्णी यांनी शुक्रवार, 03/09/2010 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कित्येक दिवस, मराठा आरक्षणाचा मुद्दा बराच गाजत आहे. कोणी त्याला विरोध करतो तर कोणी पूर्ण ताकतीनिशी पाठींबा व्यक्त करत आहे. समित्या नेमल्या जात आहेत, न्यायालयात खटले दाखल केले जात आहेत. आठवड्यातून एकदा तरी या संदर्भात बातमी वाचायला मिळतेच. मुळातच आरक्षण या विषयाचा फिरून एकदा विचार केला पाहिजे. लहानपणी मराठीच्या पुस्तकात “महापुरुषांचा पराभव” म्हणून धडा होता.