Skip to main content

विचार

अपेक्षा २०११ कडून

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 31/12/2010 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ कडून माफक अपेक्षा
  • कांदे तोळ्यावर विकत घेण्याची वेळ येऊ नये. अगदी तशीच वेळ आल्यास कांद्यांचा तोळ्याचा भाव सोन्याच्या भावापेक्षा कमी असावा.
  • पेट्रोल रु. ११२/लीटर होऊ नये. तशीच वेळ आल्यास 'वर्क फ्रॉम होम' चा फतवा सरकारने जारी करावा. सगळ्यांनी घरूनच काम करावे, अगदी चितळे बंधूंनी सुद्धा!
  • डाळी, धान्ये विकत घेण्यासाठी बँकेचे कर्ज घेण्याची वेळ येऊ नये.
  • सुरेश कलमाडींचे राजकीय पुनर्वसन होऊ नये. त्यांचे राजकीय पुनर्वसन करायचेच असल्यास त्यांना 'एनएसयुआय' च्या श्रमदान समितीमध्ये सदस्य म्हणून घ्यावे.

अल्कोहोलिक कॅलोरीस

लेखक खादाड अमिता यांनी शुक्रवार, 31/12/2010 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर १: मद्यपान आपल्या स्वास्थ्या साठी हानिकारक असते. ह्या लेखाचा हेतू - 'कुठली ड्रिंक घेतलेली चांगली' हे सांगायचा नसून, 'कुठली ड्रिंक प्यायलात तर किती कॅलोरीस शरीरात वाढतील?' हे सांगण्याचा आहे. धन्यवाद. ३१ डिसेंबर ची पार्टी. 'अरे आज मस्त बसू या.. उद्या काय हापिसात सुट्टी. उगीच लवकर उठायचे टेन्शन नाही!' 'आज आम्ही के. पी. ला जाणार आहोत. हार्ड रॉक कॅफे ला. फुल धमाल.' 'आम्ही सगळे मित्र मंडळी नेहमीच त्या बीच रिसोर्ट ला जातो.' असे आज बहुतेक लोकांचे पार्टी प्लान्स असतील... म्हणजे आमच्या सारखे नसाल तर. आमच्या ह्यांना प्लानिंग करायला खूप आवडत.

नव्या वर्षांच्या शुभेच्छा

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 31/12/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो. दरवर्षी नेमाने येणारा क्षण आज पुन्हा येतोय या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षात प्रवेश कराण्याचा क्षण. नवी नवरी माहेराहून सासरी जाताना तिच्या मनात असते तशी हुरहुर आणि आनन्द अशा सम्मिश्र भवना घेवून आपण हे क्षण जगत असतो. सरत्या वर्षात काय गमावले /काय कमावले याचे जमाखर्च मांडत आपण नव्या वर्षात काय करणार याचे मनसुबे रचत असतो. लहानपणी १ जानेवारीला मी गेल्या वर्षी झोपलो ते एकदम थेट्या वर्षीच उठलो असे सांगायचो. ते खरे देखील होते. ३१ दिसेंबरला टीव्हीवर फारतर रात्री ११ पर्यन्त कार्यक्रम असायचे. गावात एखादा गाण्याचा कार्यक्रम वगैरे असायचा. ३१ डिसेंबर हा इवेन्ट झालेला नव्हता.

जोएल कटलर..

लेखक गवि यांनी गुरुवार, 30/12/2010 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
कुठूनतरी मरणाशी संबंध असलेली पोस्ट वाटली तरी त्यातली आशा सर्वांना दिसेल अशी आशा आहे. ............
त्याचं नाव जोएल कटलर.
तिचं नाव क्रिस्टीन कटलर. जोएलची बायको.
त्यांना चार मुलं आहेत. सर्वजण चांगल्या स्थितीत आहेत. वेळ सेटल्ड.
जोएलनं आयुष्यभर कष्टाची कामं केली.

स्वागत २०११ !!!

लेखक पर्नल नेने मराठे यांनी गुरुवार, 30/12/2010 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ चे स्वागत करुयात !!! २०१० ह्याही वर्शी अनेक मित्र्-मैत्रीणी मिळालेत. बरेचदा आपली मैत्री होते, २-४दा फोनही होतात, मात्र मग कामकाजाच्या व्यापात संपर्कात रहाणे राहुन जाते . ऑनलाइन मित्र्-मैत्रीणींच्या बाबतितही तसेच हेच नातेवाईकांनाही लागु. मावस बहिण शेजारच्या एमिरेट्समधे रहात असुनही माझ्याकडुन फोन केला जात नाही. म्हणुन ही मैत्री /नाते टिकवण्यासाठी मात्र मी २०११ मधे प्रयत्नशिल रहाणार आहे. हाच माझा नविन वर्शाचा संकल्प म्हणायला हरकत नाही. आता तुमचे संकल्प शेअर करा की !!!

क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी...

लेखक मितान यांनी गुरुवार, 30/12/2010 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
"खजिना" चा अनुवाद करताना माझ्याजवळच्या खजिन्याचे विचार मनात येत होते. खरोखर प्रत्येकाजवळ फक्त त्याच्यासाठीचा अमूल्य खजिना असतोच असतो. खरंय हे. विशेषतः आपण निसर्गासोबत एकट्याने अनुभवलेले क्षण.... ते पुन्हा फिरून कधीच येणार नसतात. आणि ते तसे येणार नाहीत याची खूप वेळा आपल्याला जाणीवही नसते. नंतर उरते ती त्या अनुभवाची मनावर उमटलेली नक्षी. असे 'एकट्याचे क्षण' खरंच किती मूल्यवान ! त्या क्षणी त्या अनुभवाच्या संदर्भात झालेला आत्मसाक्षात्कारच असतो तो ! आणि एक साक्षात्कार त्याच क्षणी झालेला असतो " हे पुन्हा कधीच अनुभवणे नाही !" खूप अवघड होतंय हे सगळं. काही अनुभव सांगते.

हिमवादळ !

लेखक मीली यांनी बुधवार, 29/12/2010 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
न्यू जर्सी मध्ये यंदा खूप म्हणजे खूप बर्फ पडला.आमच्या घराची बाल्कनी तर बर्फाने पूर्ण भरून गेली होती.त्याचे काही फोटो ! बर्फा मध्ये अडकलेल्या गाड्या काढताना नाकी नऊ आले होते अगदी! बर्फाने झोडपलेल्या खिडक्या व बाल्कनी.

शेवटी "कुकर्म" अंधारातच उरकावे लागले...

लेखक अमोल देशमुख यांनी मंगळवार, 28/12/2010 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात मनपामध्ये जो राडा झाला, त्याबद्दल काय प्रतीक्रीया द्यावी , हे लोक काहीतरी निर्णय घेतात आणि आपण फक्त "प्रतीक्रीयावादी" बनुन प्रतीक्रीया द्यायच्या आणि परत आपासतात वाद घालायचा, हे कुठपर्यंत चालणार ? महाराष्ट्रात हे जातीपातीचे, जातीयद्वेषाचे टोकाला पोहोचलेले राजकारण कधी संपणार ? हे न संपणारे प्रश्न आहेत.