Skip to main content

विचार

स्त्रीमुक्ती - विस्कळीत विचार

लेखक चित्रा यांनी सोमवार, 10/01/2011 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
पाश्चिमात्य तसेच भारतातील स्त्रीमुक्तीवादी चळवळींचा माझा अभ्यास नाही, हे या लहानशा लेखाच्या प्रारंभीच सांगून टाकते. तेव्हा या लेखात जे काही आहे, ते माझ्या वैयक्तिक निरीक्षणांमधून आले आहे, त्यात माझे अनुभव जेव्हा कधीतरी स्त्रीमुक्तीवादी लेखिकांच्या स्त्री किंवा मिळून सार्‍याजणी सारख्या मासिकांमधून ज्या कथा/कादंबर्‍या किंवा लेख हाती लागले त्यांच्याशी आपोआप जोडले गेले, कधी त्यात आणि माझ्या मध्यमवर्गीय आयुष्यात मी जे काही समान पाहिले त्यामधून ही मते कधी टोकदार तर कधी बोथट होत गेली.

चित्रपटातील "तानापिहिनिपाजा"

लेखक इन्द्र्राज पवार यांनी सोमवार, 10/01/2011 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
'चित्रपट' हे असे एक माध्यम आहे की ज्याच्या जादूने जगातील सर्वच स्तरावरील लोक प्रभावित झालेले असतात. सुरूवातीच्या काळात दोन घटकांची करमणूक असे जरी चित्रपटाचे स्वरूप असले तरी कालानुरूप त्याला विविध तंत्राची जोड लाभली, नवनवीन कल्पना मूर्त स्वरूपात पडद्यावर मांडून त्यावर रसिकांची मते जाणून घ्यावीत असे या क्षेत्रातील दिग्गजांना वाटू लागले, वेळोवेळी नव्या प्रवाहाची त्यात भर पडत गेली आणि जगभर 'चित्रपट म्हणजे निव्वळ मनोरंजन’ नव्हे तर तो एक अभ्यासही होऊ लागला.

एकटेपण...!

लेखक जयवी यांनी रविवार, 09/01/2011 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाला सगळ्यात जास्त भिती कशाची वाटत असेल …..मरणाची ?? अं हं……चुकलात…. !! अहो… एकटेपणाची. बाकी कुठल्याही संकटाला तो तोंड देऊ शकतो पण एकटं राहण्याची वेळ आली तर मात्र तो ढेपाळतो. किंबहुना ह्या गोष्टीचा तो विचार करणंही टाळतो. कधी कधी गोंधळ, गर्दीचा इतका वैताग येतो की असं वाटतं दूर दूर पर्यंत कोणीच दिसायला नको, जवळ असायला नको. एकांत हवा. पण एकांत आणि एकटेपणा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकांत सुद्धा काही वेळापुरताच हवासा वाटतो. नंतर त्या एकांताचं रुपांतर एकटेपणात होतं आणि मग तो नकोसा होतो. लहानपणी तर आपल्याला कायम कोणीतरी सोबत खेळायला हवं असतं शिवाय आई, बाबा सुद्धा हवे असतात.

वन लाइनर्स

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 07/01/2011 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभुमी : हा थ्रेड माझा मिसळपाव वरील पहिलाच थ्रेड होता, आता नविन ओळखी नविन मित्र त्यांच्या साठी पुन्हा येथे देत आहे. (कोणी आधी वाचला असेल तर पुन्हा येथे दिल्यामुळे शमस्व) व.पु. काळे हे माझे आवडते लेखक, त्यांच्या मुळे वाचनाचे वेड आनखिन वाढले होते .. त्यांच्या कथा कादंबरी आणि त्यातील वाक्य म्हणजे ग्रेटच त्यातल्ता त्यात पार्टनर .. आपण सारे अर्जुन.. तु भ्रमत आहासी वाया .. हय कादंबर्या म्हणजे कळसच . त्यांच्याच प्रेरणेतुन काही तरी लिखान हाती घेतले आणि त्यात आलेली माझी वाक्य मलाच आवडुन गेली.. कविता ह्या आत्मकेंद्रीत असल्याने सार्वभौमत्व लवकर मिळत नाहि त्यांना.

फॅट फ्री मद्य

लेखक खादाड अमिता यांनी शुक्रवार, 07/01/2011 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
सगळेच मद्य मुळात 'फॅट फ्री' असते. अगदी खरच! पोर्ट वाईन आणि रोझे वाईन सारख्या काही ड्रिंक्स मधे नेग्लीजीबल प्रमाणात ट्रेस फॅट असते. पण अगदी 'आहे काय न नाही काय' असे. मग तरी, सर्व सामान्य समाजाप्रमाणे जी व्यक्ती मद्य पान करतात ती जाड का असतात? फर्स्ट थिंग्स फर्स्ट: जाडी हा खूप 'unexclusive' विषय आहे. अमुक अमुक माणसंच जाड असतात आणि बाकी नाही असे अजिबात नाही. व्हेजिटेरियन, नोन व्हेजिटेरियन, व्हेगन किंवा इंडियन, अमेरिकन, ओस्त्रेलीयन ई. कुणी पण जाड असू शकत किंवा जाड होऊ शकत.

'फेसबुक' वर आहेस का?

लेखक दैत्य यांनी गुरुवार, 06/01/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुक........फेसबुक चा तो निळा रंग बघूनच कंटाळा येतो... कधी ह्या कंटाळ्याचा डोंगर पार करून समजा बघितलं तर पुलंनी वर्णन केलेल्या पानवाल्याच्या ठेल्याची आठवण येते...हेच पहा ना.... सगळ्या मित्रांचे ठराविक फोटोज ( गळ्यात हात टाकून 'ये दोस्ती नही छोडेंगे' वगैरे)........काही मित्रांचा ग्रुप ---ज्यांचे नेहेमी दारू पिताना फोटोज ( टायटल: 'इश्कने दर्दी बनाया' किंवा 'आज थोडी पी ली है' ).... ....मग अजून एक मित्रांचा समूह ज्यांचे नेहेमी कुठल्या तरी गोऱ्या मुलीबरोबर किंवा मेणाचा पुतळा असलेल्या गोऱ्या अभिनेत्री-बरोबर (उदा. शकिरा वगैरे) फोटोज...

दहशतवाद

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 05/01/2011 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
भारत स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तान भारताला एखाद्या कुत्र्यासारखा चावतोय. लचका तोडतो आणि मग भ्याडासारखा शेपूट घालून पळून जातो. १९९२ चे जबरी बॉम्बस्फोट, २६/११ चा रक्तपात, लोकल ट्रेनमधले आणि बेस्ट बसमधले बॉम्बस्फोट, अक्षरधाम मंदिरावरचा हल्ला, संसदेवरचा हल्ला, जर्मन बेकरीतला स्फोट, हैदराबादचा स्फोट...काही विचारू नका. शिवाय जगभर धर्मांध अतिरेक्यांनी घातलेला धुमाकूळ तर संतापजनक आहे. ९/११ चा विमाने घुसवून इमारती पाडण्याचा अघोरी प्रकार असो की अजून कुठल्याही देशात होणारा रक्तपात असो, धर्मांध अतिरेकी जगाला बुडवायला निघालेले आहेत. सगळ्या देशांनी या 'जिहादीं'ची धास्ती घेतलेली आहे.