Skip to main content

विचार

महा भारत

लेखक तिमा यांनी सोमवार, 22/11/2010 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
सन २०५१. नोव्हेंबरचा महिना. भारताची अभूतपूर्व प्रगती करुन दाखवणार्‍या महानेत्याचा सत्कार व प्रगट मुलाखत होती. वार्ताहरांचे थवे व्यासपीठाभोवती जमले होते. त्यांच्यामागे अफाट जनसागर पसरला होता. तो ट्रकने आणला नव्हता, तर उस्फूर्तपणे आला होता. प्रारंभी दोन चार नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रमुख विरोधी नेत्यातर्फे महानेत्याला नोटांचा हार घालण्यात आला. महानेत्याने सत्काराचा स्वीकार केला आणि तो भाषण द्यायला उभा राहिला. मित्रहो, तुमच्या प्रेमाने मला भरुन आले आहे. अल्पवर्षात या देशाची झालेली प्रगती पाहून मला देखील आश्चर्य वाटत आहे. पण या सर्वाचे श्रेय आमच्या गुरुंचे आहे.

घाण्या वरचा बैल

लेखक रणजित चितळे यांनी सोमवार, 22/11/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
(ईयत्ता सहावीच्या कवीतेवर आधारीत) गोष्ट एका गावातली. तेलाची घाणी अन् त्यात कोलुवर फिरणारा बैल. बैलाच्या गळ्यातली वाजणारी घंटा म्हातोबाला दिलासा द्यायची. म्हातोबा शेजारच्या खोपट्यात आडवा पडलेला. त्याला त्या घंटेचा आराम. जो पर्यंत ती घंटा किणकिणायची तो पर्यंत सगळे व्यवस्थित चालले आहे ह्याची त्याला खात्री. मग तो खुशाल झोप काढायचा. जेव्हा बैलाला तहान भुक लागायची तेव्हा घंटा वाजायची थांबायची. ती थांबली की लागलीच एक बादली आंबोण त्याच्या पुढे तो घालायचा. त्याच वेळेस सुकं खोबरे घाणीच्या तोटीत आहे का पाहुन लागेल तसा नवा घाणा तयार करायचा. हे असे संध्याकाळ पर्यंत चालायचे.

एखादा झकास लेख....

लेखक अर्धवट यांनी रविवार, 21/11/2010 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
रोज दिवसभर काहीतरी सुचत असतं, आज थोडं यावर लिहुया असंही मनाशी म्हणतोही तेव्हा... एखाद्या क्षणी हे अगदी उजळपणे जाणवतं की.. अरे.. हा... हाच.. हाच तर क्षण खूप सकस आहे.. खोल आहे.. किती उत्कट आहे.. आपल्या मित्रांना सांगायलाच हवा.. उलगडायलाच हवा निवांतपणे.. मनात नोंदही होते तशी पण.. पण... पण एक प्रॉब्लेम होतो.. हल्ली काही लिहायला घेतलं तर पुर्णच करता येत नाही... काहीतरी विचार घेउन कळफलक समोर घ्यावा... तर दोन चार वाक्यं लिहून होतात.. त्यापुढंच वाक्य लिहिता लिहिता विचारांची मालीका कुठेतरी भरकटत जाते.. धडाडती फास्ट ट्रेन.. सुसाट वेगाने रूळ बदलते.. मनाच्या अवकाशात असंख्य रंग उधळले जातात..

चिरंजीव चिंटू

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 18/11/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

सहभागप्रेरक एसेमेसचा आणि कॉल्सचा जमाना

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 17/11/2010 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
"और आज का हमारा घर बैठे लखपती बनानेवाला सवाल हैं - बासमती और परिमल यह किस खाद्यप्रकार की किस्में हैं? आपका उत्तर आप एसेमेस द्वारा इस नंबर पर भेज सकते हैं.....या फिर इस नंबर पर कॉल कर सकते हैं.... महानायकाने हा प्रश्न विचारल्यावर माझ्या मनात विचारचक्र सुरु झाले. अमिताभसारख्या अभिनयसम्राटाला टेलिशॉपिंगमधल्या पोपटपंची करणार्‍या दुय्यम अभिनेत्यांसारखी (आलोकनाथ, भाग्यश्री, श्वेता तिवारी, सुधीर पांडे, सुधीर दळवी इत्यादी मंडळी असल्या जाहिराती करतांना दिसतात) ही पोपटपंची करतांना बघून एसेमेसमधून आणि फोन कॉल्समधून मिळणार्‍या कोट्यवधींच्या कमाईचा अंदाज बांधता येतो.

अजब आहे ना ?

लेखक विनोद कोकने यांनी शनिवार, 13/11/2010 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
१०० रुपयांची नोट भरपूर मोठी वाटते ना जेव्हा गरिबाला द्यायची असेल?,.......पण हॉटेल मध्ये बसल्यावर खूप कमी वाटतात ..... ३ मिनिटे देवाची आठवण काढायची झाली तर अवघड वाटते ,........ पण ३ तासाचा बकवास सिनेमा बघायला सोपे जाते..... पूर्ण दिवस मेहनत केल्यावर संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत नाही .......... पण आपल्या आईवडिलांचे पाय चेपून द्यायला कंटाळा येतो ...... Valentine Day ला २०० रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन जाऊ शकतो.............. पण Mothers Day ला १ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही घेऊ शकत./..... असे लेख लिहायला खूप अवघड वाटते .........