Skip to main content

विचार

तीर्थरूप

लेखक बिपिन६८ यांनी सोमवार, 07/04/2014 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
"तीर्थरूप" ८ जून 2012 तीर्थरूप या शब्दाचा अर्थ आहे जन्मदाते म्हणजेच "वडील" तीर्थरूप म्हणजे जे तीर्था समान आहेत ते ! हिंदू धर्मात तीर्थ हे सर्वात पवित्र आणि अनेक जन्माचा उद्धार करणारे मानले जाते, त्याच प्रमाणे वडील हे आपल्या मुलांचा त्या जन्माचा उद्धार करतात म्हणून वडिलांना तीर्थरूप हा शब्द ! पण आज काल या शब्दाचा उपयोग जेंव्हा विनोद निर्मिती करिता होतो आणि ,आणि जेंव्हा या शब्दावरून झालेले विनोद ऐकतो तेंव्हा खरेच काळजात चर्र..होते, असे विनोद करणाऱ्या लोकांच्या अकलेची कीव येते.

अनाम वीरा...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 05/04/2014 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
अनाम वीरा.... एखादे शब्द मनावर गारुड का करून जातात? जेंव्हा जीवनाची ठराविक एक अशी काहिही समज आलेली नसते,तेंव्हाही.आणि जेंव्हा ती आलेली आहे,असा भास होत असतो,तेंव्हांही!!! हे गाणं मी पूर्विही ऐकलय...आज घरी येता येता सहज ऐकलं. आणि ते तितक्याच सहजतेनी विसरलंही गेलं! आणि अत्ता कानात परत वाजू लागलं? का??? ही रात्रीची वेळ शांत असते म्हणून? की अणखि काही? मृत्यु..हा जिवनातला अविभाज्य भाग किंवा त्याचा शेवटचा परिणाम असला,तरी तो सहज/नैसर्गिक असेल तर नकोसा(च) वाटतो!

क्विन...

लेखक पिलीयन रायडर यांनी मंगळवार, 01/04/2014 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
परवा खुप दिवसांनी थेटर मध्ये जाऊन पिक्चर पाहिला.. पॉपकॉर्न खात.. क्विन! आवडला.. जाम आवडला.. क्विन मध्ये कंगनाचा अभिनय.. कथानक.. संवाद.. गाणी वगैरे सगळच आवडण्या सारखं असलं तरी मला तो वेगळ्याच कारणांसाठी आवडलाय.. भारत वर्षातली.. दिल्लीकडची.. अत्यंत पारंपारिक वातावरणात वाढलेली एक मुलगी.. अगदी लहान सहान गोष्टी पण आई वडीलांना विचारुन करणार.. बाहेर जाताना भावाला घेऊन जाणार.. पुढे जॉब करायचा की नाही हे होणार्‍या नवर्‍याला विचारणार.. तिच्याच शब्दात सांगायचं तर .."तुम सिर्फ नाम लो.. मैने उन सबकी बात सुनी है.." कॅटेगरी.. तिचं लग्न मोडतं.. भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे..

' दे टाळी ' - ' घे टाळी '

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 01/04/2014 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
च्यायला, च्यामारी ( घाटी शब्द ) लहानपणी तुम्ही मित्राला कधी टाळी दिली नाहीत का? आम्ही तर टाळीवरुन एक खेळ ही खेळायचो ' दे टाळी ' म्हणले की ' घे टाळी ' मग पुढे घे पोळी मग दुसरा म्हणायचा ' घे , गोळी' दे विडा आणि शेवटी खा . ' किडा ' असे म्हणायचे आणि खो खो हसायचे, गंमतीचे दिवस होते ( आमच्यात किडेगिरी करायची बी ही अशी लहानपणीच रुजली होती , असो ) मुंबईतली मुले असा खेळ खेळायची नाहीत का? बहुतेक नाहीच नाही तर एका समवयस्क भावाने ' घे टाळी ' म्हणले असताना दुसरा भाऊ , फोन नाही आला म्हणून रागावून बसला नसता.

महाभारत कथा: युद्धापूर्वी मंत्रीमंडळाची शेवटची बैठक

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 30/03/2014 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
(उपस्थित सदस्य: सम्राट दुर्योधन, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, दु:शासन, शकुनी, कर्ण आणि सभेत कधी कधी येणारा विकर्ण या शिवाय मुख्य शस्त्राधिकारी व गुप्तचर अधिकारी ) विकर्ण: महाराज, युद्धाचा निर्णय झाला आहे, पण आपण युद्धासाठी खरोखरच तैयार आहोत का?

साहित्य सहवास

लेखक बिपिन६८ यांनी शुक्रवार, 28/03/2014 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
25th Mar 2014 २५ मार्च १९३३ - २६ जुन २००१ प्रिय वपु, आज तुमचा वाढदिवस, आपल्या समाजात नावाच्या मागे कै लागले कि जयंती म्हणायची पद्धत, पण खरेच तुम्ही गेलात का ? ज्या नियती बद्दल तुम्ही एवढे लिहून ठेवलेत ती नियती अशी का रुसली तुमच्या वर आणि का आमच्या पासून केवळ ६८ व्या वर्षी हिरावून घेतले? ६८ हे जाण्याचे वय नक्कीच नाही, पण शेवटी ग दि माडगुळकर म्हणून गेले तसेच आहे " पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" आज तुम्ही असतात तर आमच्या सारख्या असंख्य चाहत्यांनी, तुमच्या कुटुंबीयांनी नक्कीच तुमचे सहस्त्रचंद्र दर्शन केले असते, पण आता या सगळ्या जर तर च्या गोष्टी.

प्रवास

लेखक पैसा यांनी शुक्रवार, 28/03/2014 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांनी नवर्‍याबरोबर रेल्वेने एका छोट्या प्रवासाला निघाले होते. आदल्या दिवशीच पुण्याहून बसने परत आले होते आणि तत्कालमधे रिझर्व्हेशन करायलाही जमलं नव्हतं. तीन साडेतीन तासांचा प्रवास आहे, जाऊ जनरलमधे बसून म्हटलं आणि निघालो. स्टेशनवर पोचलो तर गाडी अर्धा तास लेट असल्याचं शुभवर्तमान कळलं. मग तिकीट काढून जनरलचा डबा समोर येईल अशा बेताने प्लॆटफॉर्मवरच पेपर टाकून मस्त बैठक मारली. रूळ क्रॉस करणार्‍या बर्‍याच मंडळीचं निरीक्षण करून झालं. एक पाणचट चहा पिऊन झाला. शेवट अर्धा तास उशीरा येणारी गाडी एक तास उशीरा येऊन प्लॆटफॉर्मला लागली.

शैक्षणीक वळण

लेखक रामदास यांनी बुधवार, 26/03/2014 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
साक्षात्कार वगैरे मला कधीच होत नव्हते पण गेल्या शुक्रवारी आमच्या एचआर डिपार्ट्मेंटनी एका एक दिवसीय झंझावाती कार्यशाळेला मला पाठवल्यानंतर हे असं काहीतरी मला व्हायला लागलं आहे. आयुष्यात शिकायचं थांबू नका-आयुष्य तुम्हाला रोज काहीतरी शिकवत राहील असं काहीतरी एक मुलायम कोमलांगी सांगत होती. आता खरं सांगायचं तर हे दिवस काही शिकण्याचे आहेत यावरून विश्वास उडलेल्या लोकांसाठी ही कार्यशाळा होती, म्हणजे आमच्या कंपनीने "पुढील शिक्षणास निकामी" असा शेरा मारलेल्या लोकांचा एक जथ्था या कार्यशाळेला पाठवला होता.

मोदी खरच पंतप्रधान बनतील का !

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 25/03/2014 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मोदी हे देशाचे जवळ जवळ पंतप्रधान बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या मोदीसमर्थकांचा उन्माद विशेष लक्षात येण्याजोगा आहे... मोदींहूनही मोदी भक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच मोदी येतील का ? त्यासाठी भाजपा किती जागा मिळवील ? अकाली, सेना, पासवान अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता येणारे सरकार खिचडी सरकार असेल. ते २ २|| वर्षे टिकेल

शिद्दत

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 24/03/2014 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात सावरकर जयंती होऊन गेली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपलं आयुष्य समर्पित केलेल्या असंख्य सेनांनीपैकी हा एक सेनानी, विनायक दामोदर सावरकर. एक युगपुरुषच म्हणावा लागेल; एक देवाचा अवतार. असीम देशभक्ती आणि ध्येयाचा पुतळा. अंदमान मधील तुरुंगात असताना त्यांनी जे हाल सोसले, ते वाचतानाही अंगावर काटा येतो. त्यांनी ते प्रत्यक्ष कसे सोसले असतील त्यांनाच ठाऊक. असेच आतोनात हाल भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक क्रांतिकारकाने कमी अधिक प्रमाणात सोसले होते.