Skip to main content

विचार

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

लेखक जीएस यांनी मंगळवार, 21/10/2014 05:57 या दिवशी प्रकाशित केले.
उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ? उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे. आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते. कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत.

पाणी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 19/10/2014 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख प्रहार वृत्तपत्रात प्रकाशित झालेला असून त्याचा दुवा हा: http://prahaar.in/collag/257578 काही दिवसांपूर्वी एका ट्रेकला गेलो होतो. डोंगरदऱ्यांतून फिरण्याची मजा जितकी वेगळी असते, तितकीच वेगळी असते ती म्हणजे अशा भटकंतीतून होत जाणारी स्वत:ची आणि जगाची ओळख. आपल्या ‘कंफर्ट झोन’मधून बाहेर गेल्यावर, गावातून खेडय़ांतून प्रवास केल्यावर तिथलं जीवन समोर येतं, तेव्हा कळतं की प्रत्येक गोष्टीला किती किंमत आहे आणि महत्त्व आहे. ट्रेक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे कुठली असावी, तर ती म्हणजे ‘पाणी’.

बंधारा

लेखक सतिश गावडे यांनी शनिवार, 18/10/2014 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
त्या बंधार्‍याला तसं फारसं पाणी कधीच नसायचं. कधीतरी एखादी पावसाची सर आली तर थोडं फार पाणी साचायचं. कधीतरी मालक पंप लावून बंधार्‍यात पाणी ठेवण्याचा प्रयत्न करायचे. मात्र त्याचा फारसा उपयोग व्हायचा नाही. पुढे मालकांनी बंधारा असलेली जमिन विकली असं कानावर आलं. ज्यांना विकली ते मालकांसोबत कधीतरी दिसायचे. हे नवे मालक फार मोठे बागायतदार असावेत असं त्यांच्या बोलण्यातून वाटायचं. नेहमी मी इथे अमकं पीक घेतलं, तिथं तमक्या पिकाचं इतकं उत्पादन घेतलं, कृषी खात्यानं आपला धडपडया शेतकरी म्हणून गौरव केला असं बंधार्‍र्‍याच्या काठावर बसून बोलायचे.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१६

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 17/10/2014 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग-१५ आणि श्टेजवरून खर्‍या अर्थानी एक्झिट होतात... पुढे चालू... =========================== मग सुरु होतो एक छोटा खेळ..सूनमुखाचा.पण हा ही तयार-झालेला एक विधी आहे. हल्ली एक भलामोठ्ठा आरसा(मंगल-कार्यालयातूनच!) दिला जातो. मग सासूबाई अगदी हौसेनी त्यात आपल्यासह मुलाचा सुनेचा चेहेरा बघतात.फोटुवाले त्यांच्या मागनं खास कलात्मक फोटु घेतात.

मला न आवडलेली पुस्तके: आत्मचरित्रे/चरित्रे

लेखक पुस्तकमित्र यांनी बुधवार, 15/10/2014 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 http://www.misalpav.com/node/29133 ------------------------------------------------------------------------------- या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल. चरित्रे/आत्मचरित्रे न आवडण्याची कारणे काही अशी सांगता येतील की त्या पुस्तकात सत्याचा विपर्यास झालेला कधी कधी दिसतो. तर कधी आत्मप्रौढीचा वास येतो.

मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र

लेखक पुस्तकमित्र यांनी बुधवार, 15/10/2014 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 ________________________________________________________ नमस्कार मंडळी. काही अपरिहार्य अडचणींमुळे हा पुढचा भाग टाकायला उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमस्व. याआधीच्या भागात आपण आपल्याला आवडलेल्या कादंबर्‍यांबद्दल लिहिले होते. या वेळी आपल्या आवडत्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल थोडक्यात लिहूया! आधीच्या यशस्वी भागांप्रमाणेच तुमच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे! चला तर लिहूया आपल्या आवडत्या आत्मचरित्र किंवा चरित्रांबद्दल!

कदाचित चित्रपट परिचय : अभय (कमल हासनचा नव्हे)

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 15/10/2014 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
मला नाना पाटेकरचा एक जुना हिंदी चित्रपट आठवतो दूरदर्शनवर बघितलेला. रविवारी दुपारी चुकून हिंदीच लावला होता. नाना एका हवेलीमध्ये रहात असतो. जुना संस्थानिक वगैरे काही. वैतागलेला, चिडलेला असा नेहमीचाच. मरतो काही कारणानं. मेल्यानंतर त्याचा आत्मा तिथं राहून येणारांना पळवून लावत असतो. भंडावून सोडून, घाबरवून, चिडचिड करुन. एक कुटुंब येतं तिथं. मुलं आणि आईवडील. नाना सातत्यानं चिरडीला येऊन ह्यांना पळवून लावण्याच्या प्रयत्नात. कधी नुसतं शरीर तर कधी नुसतं डोकं दाखवून वगैरे. पण त्या कुटूंबातली एक चिमुरडी धीट असते, अजिबात न घाबरणारी. ती त्याला महाराज वगैरे म्हणायला लागते. का चिडचिड करतोस म्हणे.

क्लास

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 14/10/2014 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रहार वृत्तपत्रात गेल्या रविवारी प्रकाशित झालेला माझा हा लेख इथे सादर करत आहे. मुंबई रेलवे ही भारतातल्या सर्वाधिक गर्दीच्या परिवहन सेवांपैकी एक आहे. दररोज सुमारे २५०० लोकल सेवा या मार्गांवर धावतात आणि सरासरी ७५ लाख प्रवाशांची ने-आण करतात. या रेल्वेचं मुंबईकरांशी असलेलं नातं, मुंबईकरांनाच नव्हे तर मुंबई बाहेरच्यांनाही जवळचं वाटणारं आहे. 'जवळचं' म्हणताना गर्दी, चेंगराचेंगरी नाही आठवली तरंच नवल. प्रचंड गर्दीच्या या मुंबईतील लोकल प्रवासात, भाग्यवंतांनाच बसायला मिळतं, एरवी घोड्यासारखं उभं रहाण्यावाचून पर्याय नसतो.

मराठी बाणा/ मोडेल पण वाकणार नाही ?????

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 12/10/2014 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
(तीन पूर्वी ब्लॉग वर लिहलेला लेख, त्या वेळच्या संदर्भात,कुणाची ही भावना दुःखविण्याचा हेतु नाही) ते देवतेचे दर्शनास दिल्ली दरबारात आले. सहज विषय निघाला. दरबारात मुजरा करावा लागतो ही रीत. पण मुजरा करण्या साठी पाठीचा कणा मोडावा लागतो व मान ही झुकवावी लागते, हे आलंच. शिवाजी महाराज मुग़ल दरबारात आले होते. त्यानी बादशाहास मुजरा केला नाही. बादशाह समोर ही त्यांची मान ताठ होती व पाठीचा कणा सरळ होता. मान झुकवण्या एवजी त्यानी कारावास पत्करला. ते म्हणाले, आम्ही ही मराठा, एका अर्थी त्यांचेच वंशज! स्वाभिमानी! खरे मराठा! मोडेन पण वाकणार नाही हाच आमचा बाणा??? आम्ही ही मुजरा करत नाही.

कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफझाई.

लेखक बाबा पाटील यांनी शनिवार, 11/10/2014 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
कैलाश आणी मलाला,तुमचा अभिमान आहे, नव्हे त्यापेक्षाही वेगळ काही वाटत तुमच्याविषयी, कुठे तरी आशेचा किरण जाणवतोय्,की जगात सगळेच प्रश्न काही तलवारीच्या धारेवर आणी बंदुकीच्या गोळीने सुटत नाहीत्,तुमच्याकडे पाहुन पटतय मला की प्रेमानेही आणी अहिंसेने बरच काही शक्य होते,ज्या सिद्धार्थ गौतमाचे,महात्म्याचे,आणी दिनदुबळ्यांची आई मदर तेरेसाच्या तुम्ही प्रतिनिधित्व करताय त्या माझ्या भारतभुमीचा उर आज आनंदाने भरुन आला असेल.