Skip to main content

विचार

बिनडोक बनियान आणि मार्मीक मदिरा !

लेखक मारवा यांनी मंगळवार, 09/09/2014 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
बिइंग इडीयट मला इडीयट बॉक्स फ़ार आवडतो. मी बटाटा कोच ही आहे त्यामुळे तंगड्या वर करुन सतत बॉक्स बघत बसतो. सारख खात ही असतो (डीप्रेस्ड माणसं सारखी विनाकारण काही ना काही तोंडात टाकतच असतात त्याला स्ट्रेस इटींग अस कायतरी म्हणतात ) माझ वजन वाढतयं केस पांढरे होताहेत मात्र पगार काही केल्या वाढत नाहीये. सर्वच हातातुन निसटल्यासारख वाटतय. पुर्वीसारख पोरीं ना इम्प्रेस करणं जमतच नाहीये. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इम्प्रेस करण्याची तृष्णा च कमी कमी होत चाललीय हो हल्ली. हे म्हणजे खुप च झालय. हल्ली माझी आवडती मालिका होणार सुन मी ह्या घरची देखील मला अपील होत नाहीये.

रस्त्यावर वाहन चालविणारे

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 06/09/2014 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी सुनीलला भेटायला त्याच्या घरी गेलो. बिछान्यावर पडलेला होता. डाव्या पायाच्या मांडीत लोखंडी रॉड टाकलेली होती. त्याला विचारले, कसं झाले हे सर्व. तो म्हणाला, तुझ्या सारख्या नियम पाळणाऱ्या एका मूर्ख माणसामुळे ही पाळी आली. मी म्हणालो, साला स्पष्ट बोल कि काय म्हणायचं आहे ते. उगाच माझ्या डोक्यावर खापर नको फोडू? तुला माहितच आहे, बाईक चालविताना मी ट्रफिकचे कुठलेच नियम-कायदे पाळत नाही. किक मारल्या बरोबर बाईक हवेत उडाली पाहिजे तरच चालविण्यात मजा. त्या रात्री घरी परतताना असेच हवेत उडत जात होतो. एका ट्रफिक सिग्नल वर लाल बत्ती होती. नेहमीप्रमाणे पर्वा केली नाही.

फेसबुकची वचवच- आणि वचावचा करणारं फेसबुक!

लेखक अन्नू यांनी शुक्रवार, 05/09/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या सोशल नेटवर्किंगची क्रेझ चालू आहे मग ती ट्वीटरवरची टीवटीव असो नाहीतर, फेसबुकवरची गपशप असो. सगळीकडेच अगदी या साईट्स हातपाय पसरत असलेल्या दिसत आहेत. त्यात ट्वीटरचा विचार केला तर तिथे जास्तकरुन सेलिब्रिटीजचीच टीवटीव आपल्याला ऐकायला येते. सामान्य माणुस मात्र जास्त टीवटीवत नाही, त्यामुळेच कदाचित तो फेसबुकवर पडीक असतो! फेसबुक. म्हणजेच थोडक्यात आपलं- FB ! –यात एक गोष्ट मात्र मला जास्त इंटरेस्टींग वाटते, ती म्हणजे फोटो अपलोडींग आणि टॅगिंग. इथे प्रत्येकजण आपल्या भावना जास्तकरुन वेगवेगळ्या इमेजेसमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.

परिघ परिक्रमा

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 05/09/2014 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
बीजगणित हा माझा आवडता विषय. मला समीकरणांची उत्तरं शोधायची भारी हौस. पण 'डावीकडची बाजू उजवीकडच्या बाजूशी समान आहे हे सिद्ध करा' हा प्रश्न माझा स्वाभिमान दुखवत आलाय, आणि मला नाउमेद करत आलंय, नेहमीच. एकतर ज्या प्रश्नाचं उत्तर मला आधीपासूनच समोर दिसतंय तेच कसंतरी मटका मारून, नाहीतर पुस्तकात छापलेली पद्धत वापरून आपण आणणं अपेक्षित असतं. त्याचं कसलं कौतुक करायचं? आणि समजा ते उत्तर सिद्ध करता येत नसेल, मग तर माझं टाळकंच हटायचं. येत नाही म्हणजे काय! समोर एवढं ढळढळीतपणे दिसतंय म्हणजे यायलाच हवं. आपल्याला आधीपासूनच ठाऊक असलेल्या ठिकाणीच जर जायचं असेल तर प्रवासाचा उत्साह कसा निर्माण करावा माणसानं?

व्यक्त : कारण आणि परिणाम

लेखक वडापाव यांनी बुधवार, 03/09/2014 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाचं शरीर हा एक भव्य कारखाना आहे. या कारखान्यात बाहेरून कच्चा माल मागवला जातो, जो श्वासाच्या, अन्नाच्या, आणि कुठल्याही प्रकारच्या अनुभवाच्या रूपाने येतो. त्यावर प्रक्रिया होते. अन्नाचं पचन होतं. श्वास मंदज्वलनासाठी ऒक्सिजन पुरवतो. आणि अनुभवावर बेतलेली विचारप्रक्रिया मनात सुरू होते. या प्रक्रियांच्या अंताला आपल्या शरीराकडे बरीच उत्पादनं तयार झालेली असतात. काही वापरण्यासाठी, म्हणजे कृती करण्यासाठी; तर काही उत्सर्जित करण्यासाठी - ज्यांना आपण टाकाऊ म्हणतो. पण खरंच ती टाकाऊ असतात का? टाकाऊ म्हणजे नेमकी कुठल्या प्रकारची उत्पादनं असतात ही?

आळस

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 02/09/2014 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मला जराही धीर धरवत नाही यासाठी मी स्वतःला आधी दोष द्यायचो. आता नाही. अभिमान आहे मला मी उतावळा असल्याचा. माणूस सतत धावत असतो, पळत असतो. समोरची ट्रेन सुटली आणि तिच्यानंतर अजून एक ट्रेन येणार असली तरी मनातून एक आवाज उमटतो जो ओरडून ओरडून आपल्याला ती सुटणारी ट्रेन पकडायला सांगतो, आणि मग आपण जीवाची पर्वा न करता ती ट्रेन पकडायला धावत सुटतो. का? कारण समोर दिसणारी संधी सोडायला मन कधीच धजावत नाही. मनाला अनुभवाची भूक असते आणि प्रत्येक अनुभव एक वेगळीच शिकवण देऊन जात असतो. ही भूक भागवायची, वाढवायची प्रत्येक संधी मन हेरत असतं. आपल्याला मागे धरून ठेवतो तो शिकण्याचा आळस.

वर्धमान ते महावीर

लेखक दशानन यांनी मंगळवार, 26/08/2014 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
सुवर्णमयी पालखीतून मुलायम असा गौरवर्णीय हात बाहेर आला, व पालखी जागेवरच थांबली. पालखीतून तो खाली उतरला, नगर खूप मागे राहिले होते, समोर हिरवेगार जंगल दोन्ही हात पसरून जसे याच्या स्वागतासाठी उभे होते.. पश्चिमेला मावळत असलेल्या सूर्याला त्याने मनलावून नमस्कार केला व मागे वळून त्याच्या मागोमाग आलेल्या जनसमुदायाला देखील विनम्रपणे नमस्कार केला. आपल्या जन्मभूमीला वंदन केले आणि अंगावरील दागिने एक एक करून काढून बाजूच्या दगडावर ठेवले, शरीरावरील रेशमी, राजेसी वस्त्रे तेथेच त्याने काढून ठेवली. चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवताना सहजच हात कानापाशी थबकले...

दहीहंडी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 24/08/2014 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षीप्रमाणेच कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह जोर धरत होता. दहीहंडीसाठी शहराशहरात, गावागावात गोविंदापथकं तयारी करत होती. पण जेमतेम दोन हजार लोकवस्तीच्या सुजाणपूर मधलं चित्रं काही वेगळंच होतं. सरपंचांच्या आदेशानंतर दहीहंडीला एक आठवडा उरलेला असल्यापासूनच गावात हंड्या उभारल्या गेल्या होत्या. गावाच्या प्रत्येक पाड्याची एक हंडी अशा प्रकारे एकूण दहा दहीहंड्या गावात उभारल्या गेल्या. या हंड्या गोपाळकाल्याच्या पाच दिवस आधीपासूनच उभारल्या गेल्या. या हंड्यांची उंची इतकी होती की जिथे लहानात लहान मुलाचाही हात सहज पोचेल. म्हणजे जेमतेम दोन फूट.

चलती का नाम गाडी- ५: वाहन चौर्य प्रतिबंधन

लेखक खेडूत यांनी शनिवार, 23/08/2014 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२: गुंतागुंत चलती का नाम गाडी-३: नवी फीचर्स चलती का नाम गाडी-४: प्रदूषण नियंत्रण (युरो नॉर्मस) मागील भागांमध्ये आपण वाहन उद्योगातले विविध घटक आणि त्यांचा परस्पर संबंध याविषयी माहिती घेतली. महाग गाड्या का महाग होत असतात हे आपण पाहिलं. त्यातले आणखी बारकावे समजण्यासाठी थोडी अधिक माहिती घेऊयात.

. . हत्या आणि राजकारण !

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 23/08/2014 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे पहा. हत्येचेही कसे राजकारण केले जाते. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली. त्यानंतर ६ महिने झाले तरी त्यांच्या हत्येचा तपास लागू शकला नाही. त्यावेळी काही लोकांनी फेसबुकवर तपास न लागण्याचा निषेध केला. फेबुवर आपला प्रोफाईल काळा ठेवला. आता हे लोक कोण होते ? यातले अनेक जण असे होते ज्यांनी दाभोळकर, त्यांची अनिस, त्यांची विचारधारा याला कायम विरोध केला. मग अचानक या लोकांचे दाभोळकर प्रेम कसे उफाळून आले ? ज्या काळात हत्या झाली आणि तपास सुरु होता त्या काळात राज्यात आणि देशात काँग्रेस आणि रा काँ यांचे सरकार होते.