Skip to main content

विचार

सदू भारतीय क्रिकेट टीम मध्ये?

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 20/08/2014 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीयुत सदानंद सुखात्मे उर्फ सदू, खरा मुंबईकर. सचिवालयात कार्यरत. मुंबईत सध्या अच्छे दिन आल्या नसल्याने, सदूची सुखाची नौकरी सुरु आहे. सकाळी ९ वाजता सदू घर सोडतो आणि सांयकाळी ५.३० वाजता पुन्हा घरात. अशी ८ तासाची सुख-चैनीची सरकारी नौकरी. खरोखरंच सदू नावाप्रमाणे सुखात्मे अर्थात सुखी आहे. सचिवालयातल्या इतर बाबूंप्रमाणे सदूला ही क्रिकेटचा भयंकर शौक. क्रिकेट वर ‘एक्स्पर्ट कॉमेन्ट’ देण्यात सदू स्वत:ला पटाईत समजत होता. कुठल्या खेडाळूने कसे खेळले पाहिजे त्याचे विशद वर्णन तो करत असे. इंग्लंड सिरीजमध्ये भारतीय टीमची दुर्दशा पाहून इतरांप्रमाणे तो ही दुखी होता.

बँकेची कर्जवसुली आणी कारवाई (माहीती हवी आहे )

लेखक विलासराव यांनी शुक्रवार, 15/08/2014 05:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझे वडील पंचायत समीतीमधे काम करत असत.२००३ ला ते गेले. त्यानंतर रीतसर पेपर्स जमा केल्यावर आईला पेन्शन चालु झाली.तब्बल १० वर्षांनी २०१३ ला पंचायत समीती मधुन आईला फोन आला की तुम्हाला डबल पेन्शन येत आहे. आनी तुम्हाला जवळपास ६ लाख रुपये भरावे लागतील. तुम्ही येउन भेटा. आई तर घाबरुनच गेली. मला फोन आला, मी तिला म्हनालो मग भरुन टाकु ,तुझ्याकडे असतीलच ना जादाचे पैसे. ती म्हणाली मला काय माहित होते का? मी आलेले पैसे खर्च केलेत. थोडेफार आहेत पन ईतके? मग मी तिला तिकडे न जाण्याचा सल्ला दिला.

स्वच्छता आणि आपली मानसिकता

लेखक वडापाव यांनी सोमवार, 04/08/2014 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझं डोकं हटलं होतं. कॉलेजमध्ये भांडण झालं होतं. त्याच विचारात घरी परतत होतो. दुपारची वेळ होती. त्यामुळे साहजिकच वातावरण तापलेलं होतं. ट्रेनमध्ये गर्दी कमी होती. माझ्यासमोर एक माझ्याच वयाचा, कृश शरीरयष्टीचा (हे महत्त्वाचं आहे) मुलगा दाणे खात बसला होता. दाण्याची सालं खाली टाकत होता. ज्या प्लॅस्टीकच्या पिशवीतून खात होता ती पिशवी खाऊन झाल्यावर त्याने खिडकीतून बाहेर फेकून दिली. मी हा सगळा प्रकार मुकाट्याने बघत होतो. त्याने खिशातून दुसरी पिशवी काढून त्यातनं पुन्हा दाणे खायला आणि साल खाली टाकायला सुरुवात केल्यावर मात्र माझा ताबा सुटला. आधीच डोकं भडकलेलं असल्याने बोलण्यात चेव सुद्धा होताच.

माफ करायचं...

लेखक धन्या यांनी सोमवार, 04/08/2014 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात केव्हा ना केव्हा आपण कुणाकडून तरी दुखावले जातो. कधी शब्दांनी तर कधी कृतीने. मनाला जखम होते. कधी वरच्या वर तर कधी खोलवर. वरच्या वर झालेली जखम थोडासा काळ जाताच भरुन येते. खोलवर झालेली जखम मात्र अधिकाधिक खोलवर जात राहते. ठुसठुसत राहते, मनाला वेदना देत राहते. माणसाला राग येतो, मन कडवटपणाने भरुन जाते.

अक्कलदाढ - एक काढणे

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी गुरुवार, 31/07/2014 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यात वर असलेली तळटीपः यातली अक्कलदाढ काढणे, सुरवातीला शिकाऊ आणि पकाऊ आणि मग योग्य डॉक्टरांकडे जाणे इत्यादी भाग वगळता लेख फुगवायला अनेक काल्पनिक गोष्टी घातल्या आहेत हे आधीच अतीचाणाक्ष वाचकांनी ध्यानात घ्यावे ही विनंती. तसेच महिला वर्ग, शेतकरी किंवा कामगार वर्ग, प्राणीपक्षीप्रेमी संघटना इत्यादींचा कोणत्याही प्रकारे अवमान करण्याचा हेतू नाही हे ही लक्षात घ्यावे. डिड आय लीव्ह आउट एनिबडी? हा विनोदी लेख आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. तर आता वाचा... अक्कलदाढ - एक काढणे तर, झालं असं की वुडहाऊसचं 'लाफिंग गॅस' वाचणे सुरु आहे.

लय भारीचा टाइमपास

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 29/07/2014 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
हा काही लय भारी किंवा टाइमपासचा रिव्ह्यू नाही. तसेही या शिर्षकाचा आणि खालील लेखाचा काही संबंध नाही. मागे एकदा बहुदा महेश माजरेकरांनीच म्हटल्याचे आठवते मराठी सिनेमा हा कंटेन्टवर चालतो. मराठी सिनेमात कंटेन्ट फार महत्वाचे असते. हे खरेच होते. श्वास नंतर मराठी सिनेमाचा प्रवास बघितला तर हेच दिसते. श्वास कधी कोणी अरुण नलावडे किंवा अमृता सुभाष साठी बघायला गेले नाही तर एक वेगळा विषय आणि त्याची वेगळी मांडणी हे त्याचे मुख्य आकर्षण होते. ऑस्कवारी हे जरी एक कारण असले तर त्याचा विषय आणि त्याची सामान्य प्रेक्षकांना पचेल अशी मांडणी हे प्रमुख कारण होते.

कचरा

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 28/07/2014 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार-रविवार म्हणजे मॉल. मॉल म्हणजे शॉपिंग. मॉल म्हणजे खादाडी, अशी समीकरणं आता रूढ झालेली आहेत. ठाणे-मुंबईसारख्या जागा म्हणजे तर या दृष्टीने मॉलामाल आहेत. मोठेच्या मोठे मॉल्स, त्यातली लखलख, चकचक, ब्रँडेड वस्तूंची दुकानं, दालनं हेच शनिवार-रविवारचं डेस्टिनेशन झालेलं आहे. या मॉल्समधून असंख्य लोक पैसे खर्च करायच्या उदात्त हेतूने ओसंडून वाहत असतात. याची ‘शहरातली जत्रा’ यापेक्षा समर्पक व्याख्या मला करता येत नाही. याच जत्रेत येणा-या प्रत्येकाला आनंद वाटावा म्हणून पडद्यामागच्या कलाकाराप्रमाणे प्रामाणिक मेहनत घेणारे अनेक लोकही असतात. उदाहरणार्थ, सफाई कामगार किंवा हाउसकीपिंग पीपल.

मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास

लेखक बॅटमॅन यांनी शनिवार, 19/07/2014 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
पुलंची अनेक पुस्तके अनेकांनी वाचली असतील आणि त्यातील बरेच उतारे कैकांच्या लक्षात असतील. पण टिपिकल 'पु.ल. कॅनन' मध्ये 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' या छोटेखानी परंतु अप्रतीम पुस्तकाचा समावेश होत नाही. तुलनेने या पुस्तकाचे वाचक कमी आहेत असे चर्चेवरून लक्षात आले. मिपाकरांपैकी बर्‍याच जणांना हे पुस्तक नक्की माहिती असेल यात शंका नाहीच, पण सामान्यतः या पुस्तकाबद्दल व्हावी तितकी चर्चा होताना दिसत नाही हेही तितकेच खरे. तस्मात हा धागा या पुस्तकाबद्दल चर्चा करण्यासाठी काढलेला आहे. या पुस्तकातील आवडते उतारे, याची प्रेरणास्थाने, इ.इ. सर्व प्रकारची चर्चा होणे इथे अपेक्षित आहे.

पहाटे येणारी नर्स

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 19/07/2014 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
हॉस्पिटल म्हंटले कि नर्सेस या आल्याच! या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. शिवाय म्हणतात न खुदा मेहरबान तो गधा पेहलवान, या धर्तीवर माझ्या रूम मध्ये येणाऱ्या सर्वच नर्सेस पंचविसिच्या आतल्या आणि सुंदरच होत्या. भल्या पहाटे पाच सव्वा-पाचच्या सुमारास येणारी नर्सच्या बाबतीत काय म्हणावं, तिचे मोठे काळे डोळे, लांब सडक केस, सरळ नाक, सुबक देहयष्टी व शिवाय उजळ रंग. जणू स्वर्गातील अप्सराच. बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नासा काढल्या मुळे, पायांना ही टाके लागलेले.

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता

लेखक माहितगार यांनी बुधवार, 16/07/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
"एकशे वीस कोटींचा देश; बारा क्रिकेटपटू निवडण आणि टिम म्हणून खेळणं जड जाते" हि माझी नवी म्हण, क्रिकेटवरची कॉमेंट मुळीच नाही. आमचाच पक्ष ग्रेट म्हणून टिमकी वाजवणार्‍या (सर्वच भारतीय) राजकीय पक्षांना भारतासारख्या खंदप्राय देशातून पदाला शोभेलसे चार कॅबीनेट मंत्री (गृह,संरक्षण,अर्थ,परराष्ट्र) निवडण जड जाते, असे का ? काळ बदलला इकॉनॉमीची वाटचाल समाजवादाकडन भांडवलशाहीकडे निघाली तरी, एकाधिकार शाही असलेल्या काँग्रेस पक्षाला प्रणव मुखर्जींचा (आर्थीक दृष्टीकोण असलेला) प्रभाव कमी करण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे, राष्ट्रपतीपदावर नेमणूक करावी लागली. चला आपण याही गोष्टीच अभिनंदन करू. पि.