Skip to main content

विचार

दुष्काळवाडा ... भाग ६ घुसमट श्रावणाची……..

लेखक pradnya deshpande यांनी गुरुवार, 03/09/2015 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
घुसमट श्रावणाची…….. shravan आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातकचोचीने प्यावा वर्षाऋूतू तरी काळ्या ढेकाळांच्या गेला गंध भरुन कळ्यात काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत कविवर्य बा.सी.मर्ढेकरांनी श्रावणाचे केलेले हे वर्णन प्रत्येक वर्षी श्रावण आला आठवत राहते. श्रावणाचे हे मोहक रुप कथा कादंबऱ्या, कवितांमधून वाचताना होणारा आनंद कुठे हिरावलाय कोण जाणे? श्रावण सरी कुठे लोप पावल्या?

नात्यातले लहान मोठे

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 03/09/2015 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वयाने मोठा असतो त्याचेकडून सतत कर्तृत्वाची आणि कर्तव्याची अपेक्षा केली जाते. केवळ वयाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व हौसे मौजेला मुरड घालावी लागते. पण हाच मोठा असलेला व्यक्ती जेव्हा लहानाला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र त्याचे लहान जर त्याचे ऎकत नसतील आणि मोठ्यांना योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

दुष्काळवाडा...... भाग ५ काठोकाठ भरू द्या प्याला

लेखक pradnya deshpande यांनी बुधवार, 02/09/2015 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४ दुष्काळवाडा...... भाग ५ काठोकाठ भरू द्या प्याला बियर लेखाचे शीर्षक वाचल्यावर कदाचित मराठवाड्यातील पाणी टंचाईवर आजचा लेख असणार असे वाटण्याची शक्यता आहे. तसे नाही. मी येथे चर्चा करणार आहे ती मद्याची. अर्थात औरंगाबादमधील बियर इंडस्ट्रीची.

दुष्काळवाडा........ भाग ४ - सैरभैर हात

लेखक pradnya deshpande यांनी मंगळवार, 01/09/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३ सैरभैर हात या हाताना काम हवे एका प्रकल्पाच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तीन गावात सलग बैठका घ्यायच्या होत्या. लवकर पोहचले नाही तर शेतकरी भेटणार नाहीत या भितीने आठच्या आतच पहिले गाव गाठले. दरम्यान रस्त्यातच अनेक जण भेटले.

दुष्काळवाडा.... भाग ३ कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास

लेखक pradnya deshpande यांनी सोमवार, 31/08/2015 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास ऊस तोडणी औरंगाबादमध्ये साखर कारखाना संचालकांची बैठक दोन दिवसांपूर्वीच झाली. या वर्षीचा गळीत हंगाम पाण्याअभावी कसा रेटायचा हा प्रश्न कारखान्याच्या संचालकांसमोर होता.

अजब महाभारत

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 29/08/2015 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे. 'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे. वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते. १. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १) २. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) ३.

दुष्काळवाडा......... भाग-२ ढगात अडकला कृत्रिम पाऊस

लेखक pradnya deshpande यांनी शनिवार, 29/08/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
हजारो कोटींची तातडीची मदत जाहीर करण्यापेक्षा कोटीत कृत्रिम पावसाची यंत्रणा उभी राहते. आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न म्हणून मायबाप राज्य सरकारने मराठवाड्यासाठी कृत्रिम पावसाचे केंद्र मराठवाड्याला दिले. पाऊस पाडण्याचं नियोजन कृषी राज्यमंत्र्यांनी जाहीर केले. जुलैच्या पहिल्या महिन्यात झालेल्या या घोषणेला प्रत्यक्षात यायला ऑगस्टचा पहिला आठवडाच उजाडला.

दुष्काळवाडा........

लेखक pradnya deshpande यांनी शुक्रवार, 28/08/2015 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जेव्हा निसर्ग चक्र उलटे फिरते तेव्हा तेव्हा मराठवाड्यातील शेतकरी फासाचा दोर जवळ करतात. मागील एक वर्षात मराठवाड्यात सुमारे चारशेच्यावर शेतकNयांनी आत्महत्या केल्या. अजूनही हा सिलसीला थांबलेला नाही. सततच्या दुष्काळाने उद्धस्त झालेली शेती व्यवस्था आणि निष्क्रीय उपाय योजनांमुळे मराठवाड्याची ओळख साNया देशाला आत्महत्या करणाNया शेतकNयांचा दुष्काळवाडा म्हणून होईल की काय याची भीती वाटते.

सांगलीकरांचे काही खास शब्द

लेखक दा विन्ची यांनी शुक्रवार, 28/08/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक गावाच्या बोली भाषेचा एक विशिष्ट ढंग /लहेजा असतो. बऱ्याचदा हे काही खास शब्द ऐकल्यावर आपल्याला आपल्या गावाला गेल्याची अनुभूती येते. मिपा वरती तसे पुणेकर , मुंबईकर, कोल्हापूरकर आणि नागपूरकर व त्यांची भाषा आणि खास ढंग यावर बरेच धागे आहेत . खाली काही खास सांगलीचे शब्द आहेत. कोल्हापूर अगदीच शेजारी असल्याने काही शब्द दोन्हीकडेही असणे शक्य आहे .

सयाना (मांत्रिक इ.) आणि फेसबुक (मिडिया इ.)

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 27/08/2015 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
(या लेखाचा उद्देश्य घटनेची सत्य/ असत्यता पडताळणे नव्हे तर लोकांच्या मनोवृतीवर प्रकाश टाकण्याचा आहे) मागासलेली गरीब अनाडी जनता आपल्या समस्या सोडविण्यासाठी गावातल्या सयाना (मांत्रिक म्हणा, ओझा म्हणा ) कडे जाते. या सयानाचे सरळ देवा सोबत कॅनेक्शन असते. भूत, प्रेत, हडळ, चुड़ैल या सर्वाना काबूत ठेवण्यात तो समर्थ असतो. गावात किंवा पंचक्रोशीत काहीही वाईट घडले असेल, कुणाचा अकाल मृत्यू झाला असेल किंवा कुणाचे नवजात मुल दगावले असेल. तर कुणाच्या करणी मुळे असे झाले हे सयाना बरोबर हुडकून काढतो. एकदा जादू टोना, करणी करणार्या हडळ / चुड़ैल कोण आहे हे कळले कि मग काय विचारावे.