Skip to main content

विचार

श्रीगणेश लेखमाला २: यंत्रोपवित

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 19/09/2015 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना माझे आई-बाबा मिपा वाचत नसले, तरीही सगळ्यात आधी त्यांचे आभार मानतो. कारण माझ्यावर त्यांनी कधीच तू अमुक एकच केलं पाहिजेस अशी सक्ती केली नाही. तुला वाटेल त्या गोष्टीमध्ये तुझं करिअर कर म्हणून त्यांनी मला मोकळीक दिली, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. "बाळा/बाळे, तू मोठी झालीस की कोण होणार?" असा प्रश्न साधारण वयाच्या पाचव्या वर्षीपासून न विचारलं गेलेलं बालक शोधून सापडायचं नाही बहुधा.

क्या हुवा तेरा वादा आणि शीना बोरा मर्डर केस

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 18/09/2015 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई पोलिस कमीशनर राकेश मारीया जो पर्यंत चार्ज मधे होते तो पर्यंत शीना बोरा मर्डर केस मधील उलट सुलट बातम्या, संभाव्य आरोपी इंद्राणी मुखर्जी तीचे तीन पती, ड्रायव्हर आणि अन्य यांचे धक्कादायक खुलासे यानी वर्तमानपत्रांची पाने आणि उपग्रह वाहिन्यांचे अनेक तास खर्ची पडले. माकडीण आपल्या मुलाला नाकातोडांत पाणी जाऊ लागल्यावरच नाईलाजाने पाण्याखाली दाबते पण सामाजीक प्रतिष्ठेच्या खुळचट कल्पना घेऊन एक आई आपल्या मुलीला मारत असेल अशी कल्पना हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या तद्दन गल्लाभरु चित्रपटांच्या लेखकांच्या मनाला सुध्दा स्पर्शुन गेली नसावी. चित्रपटातील कल्पनातुन खुन घडतात किंवा मुळच्या केसवर आधारीत सिनेमा/

एक पूर्ण ताट

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 17/09/2015 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
“या आजोबा बसा, काय हवय आपल्याला?” “थकलोय हो, खूप भूक लागलीय. काही खायला असेल तर द्या ना.” “कसली भूक?” “कसली म्हणजे? भूक काय वेगवेगळी असते?” “हो आजोबा या हॉटेलात येणाऱ्या प्रत्येक माणसाची भूक वेगळी असते. कुणाला ज्ञानाची भूक, कुणाला मनोरंजनाची भूक तर कुणाला फक्त मैत्रीची भूक.” “बापरे कठीण आहे एकंदरीत सारा प्रकार. इथे निदान पाणी तरी मिळेल का?” “मिळेल ना. कुठले पाणी हवेय आपल्याला काव्याचे कि साहित्याचे?” “अहो मला खरच भूक लागलीय हो. त्या कट्ट्यावरची माणसे म्हणत होती इथ मिनिटा मिनिटाला जिलब्या पडतात. ते ऐकूणच मी माझी भूक भागवायला इथवर आलोय.” “त्या जिलब्या वेगळ्या आजोबा, ती भूकही वेगळी.

पाऊस - वेगवेगळे रंग

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 16/09/2015 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ऑफिस मधून बाहेर पडलो. राजीव चौक मेट्रो स्टेशनच्या दिशेने चालू लागलो. भुरका-भुरका पाऊस पडत होता. भुरक्या पाऊसाचे एक चांगले आहे, आपल्याला पाऊसात भिजण्याचा आनंद हि मिळतो आणि आपण जास्त ओले चिंब हि होत नाही. नजरे समोर एक अंधुक आकृती दिसू लागली. असेच एकदा तिच्या सोबत एका संध्याकाळी भुरका-भुरका पाऊसाचा आनंद घेत नेहरू पार्कच्या हिरवळीवर फिरत होतो.... पण तो पाऊस.... केंव्हाच हवेत विरून गेला.. किर्रर्र बाईक थांबण्याचा आवाज, मी हादरलोच.. अंकलजी कहाँ खोये हो, कम से कम रास्ता तो देख कर पार किया करो. सॉरी, मी पुटपुटलो. हायसं वाटल.

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 16/09/2015 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद

अनुशेषाचा मुक्तीसंग्राम

लेखक pradnya deshpande यांनी बुधवार, 16/09/2015 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
अनुशेषाचा मुक्तीसंग्राम मुक्तीसाग्राम काही कामानिमित्ताने भोपाळ येथे एका परिषदेसाठी गेले असता आप मराठवाडासे आए हो ना? जहा शेतकरी आत्महत्या करते है असा प्रश्न एकाने विचारला तेव्हा रझाकारांशी झुंजणारा मराठवाडा या ओळखीपेक्षा शेतकरी आत्महत्या करणारा अशी नकोशी ओळख देशपातळीवर मराठवाड्याची झाली असल्याची जाणीव झाली. निजामाच्या जोखडातून १७ सप्टेंबर १९४७ रोजी मराठवाडा मुक्त झाला.

भाग २ गावातील गुढ(भयकथा)

लेखक दिनु गवळी यांनी मंगळवार, 15/09/2015 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
रवीचे लक्ष झाडावर गेले. पण रवीला तिथे काहीही दिसले नाही.तो पर्यंत ती असुरी शक्ती झाडाच्या पालवीत गुडूप(लपली) झाली होती. ******************"*********************************************** अचानक समोरच्या बोळातुन कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. रवी पळत पळत त्या बोळात आला पण तो येईपर्यंत तिथे त्या कुत्र्याचे मेलेल शरीरच त्याला दिसले.त्या कुत्र्याने काहीतरी भयानक पाहीले होते.हे मात्र नक्की... ! रवीने आजुबाजूला खुप शोध घेतला पण त्याला काहीच मिळालं नाही. ********** ********************************* १ वाजला होता . अजुनही रवी गावात इकडे तिकडे भटकत होता.

अन्नदाता सुखी भव भाग ३ - Waste not, want not !

लेखक शेखरमोघे यांनी मंगळवार, 15/09/2015 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन मी जर म्हटलं "मला काल पडलेल्या स्वप्नांत एक कोणी महापुरुष "मेरे प्यारे भाईयो और बहेनो" असे म्हणत म्हणत त्याच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या खिशात रु. ५०० सारतो आहे" तर ऐकणारे जे काय बोलतील त्यांत "भांग, धत्तुरा/धोत्रा, ठाण्याहून पळालेला दिसतो आहे, मते मिळवायला कै पण करतात" असे (वेचक) शब्द पेरलेले असतील!

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

दुष्काळवाडा..... अंतिम भाग मिशन म्हणून लढण्याची गरज

लेखक pradnya deshpande यांनी सोमवार, 14/09/2015 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळवाडा..... अंतिम भाग मिशन म्हणून लढण्याची गरज शेतकरी सततच्या दुष्काळाने सैरभैर झालेली जनता. सुरु असलेले पैसेवारीच्या आकडेवारीचे खेळ, दुष्काळाचे राजकारण करत एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न असलेले राजकारणी या पाश्र्वभूमीवर तिशी पस्तीशीत मरण कवटाळणारे तरुण शेतकरी. मराठवाडा कडेलोटावर येऊन ठेपला आहे. मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर सारखे सह्रदय अभिनेते दुष्काळाच्या खाईत उतरुन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देत आहेत.