मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टवाळी

युयुत्सु ·

विजुभाऊ 09/02/2026 - 16:24
या लेखावर प्रतिक्रीया देण्याची इच्छा होत नाहिय्ये. नारळीकर कय किंवा विजय भटकर काय हे सर्वसामान्य लोकांसमवेत सहज मिसळायचे . या दोनही मराठी व्यक्तींच्या ज्ञानाबद्दल आणि कामाबद्दल अत्यंत आदर आहे. त्या दोघांबद्दलही कधी त्यानी कोणाबद्दल आकस धरून ठेवल्याचे की त्यानी कोणाबद्दल गैर उद्गार काढल्याचे ऐकीवात नाही. गोविंद स्वरूप यांच्या बद्दल काही राजकीय अडचणीची वक्त्वये आहेत. पण आपला मोठेपणा दाखवण्यासाठी नारळीकरांसारख्या व्यक्तीला हिणवणॅ नक्कीच आवडले नाहीय्ये

आहे. मला पूर्वी TIFR किंवा IIT मधे शिकलेल्या लोकांचे फार कौतुक वाटायचे मात्र नंतर त्यांचे मातीचे पाय आणि अत्यंत भंगार दर्जाच्या टेस्ट्स पाहून त्यांच्याविषयी फार काही वाटायचे बंद झाले. बहुतेकांना बुद्धिमत्तेच्या ऑब्जेक्टिव्हिटीपेक्षा खरेतर सोशल कॅपिटल मुळे अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळाला एवढेच सत्य. नंदा खऱ्यांनी तर एकदा या लोकांवर सरकार किती खर्च करत होते (आताच्या पैशात जवळ जवळ चार कोटी रुपये प्रति विद्यार्थी) हेही सविस्तर सांगितले होते आणि यातले बरेच जण नेहरूंची तत्कालीन सरकारांची बदनामी करत अमेरिकेत पळून गेली

युयुत्सु 10/02/2026 - 09:58
श्री० गा०पै० खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले. तेव्हा टवाळी व्यक्तीची की थिअरीची या प्रश्नाला फारसा अर्थ उरत नाही. शिवाय "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - त्याच्या विषयातील - म्हणजे इथे अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची आणि त्यात १०% तरी पुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो का हे सांगावे. विजुभाऊंच्या प्रतिसादाबद्द्ल काय बोलणार - लोकांमध्ये मिसळल्याने एखाद्या व्यक्तीचे काम मोठे होत असेल तर सगळंच कठीण आहे. हणमंतअण्णांच्या कॉमेण्ट वाचून - आय० आय० टी० च्या नावाने बोटे मोडणारा मोठा वर्ग आपल्या देशात आहे, त्याचीच आठवण झाली. आय० आय० टी० च्या विद्यार्थ्यांना देशात थांबवता येत नाही हा प्रॉब्लेम देशाचा की त्या विद्यार्थ्यांचा? अनेक प्रतिष्ठीत संस्था देशात - आय आय एस सी, एन आय डी, आयसर, बार्क इ०.त्यांच्याबद्दल हणमंतअण्णा काहीच बोलले नाहीत. पण हणमंतअण्णाकडून माझ्या फार अपेक्षा नाहीत.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 10/02/2026 - 11:08
आय आय टी च्या लोकांनी परदेशात जाणे यात गैर आहे असे नाही पण त्यांच्यावर केलेला खर्च त्यांनी परत करणे यासाठीतरी त्यांच्यावर बॉण्ड असायला हवा. जसा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातुन एम बी बी एस किंवा एम डी केल्यावर आहे. आणि बॉण्ड करायचा नसेल तर तेवढे पैसे सरकार जमा करायला हवेत. बाकी आय आय टी किंवा आय आय एम या संस्थेत *तुम्हीच* जगात सर्वात हुशार असा अहंगंड मोठ्या प्रमाणावर पसरवला जातो. जगात इतरही अनेक संस्था आहेत जेथे अतिशय हुशार माणसे शिकत असतात. भारताने अवकाश संशीधन किंवा क्षेपणास्त्रे किंवा अणुशक्ती या विषयात दैदिप्य मान प्रगती केली आहे. पण इसरो किंवा भाभा अणुकेंद्र सरकारी संस्था असल्यामुळे तेथे आय आय टी मधील विद्यार्थी जवळ जवळ नाहीतच. वैद्यकीय किंवा सनदी लेखापरीक्षण अर्थ शास्त्र अशा विषयात अत्यंत हुशार माणसे कार्यरत आहेत. पण ती आय आय टी ची नाहीत म्हणजे ती हुशार नाहीतच (असे बऱ्याच आय आय टीयन ना वाटते). असो. आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात काही कमी नाहीत.

In reply to by युयुत्सु

शिवाय "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - त्याच्या विषयातील - म्हणजे इथे अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची आणि त्यात १०% तरी पुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो का हे सांगावे.
शास्त्रात रिसर्चमध्ये प्रगती होत असते म्हणजे 'अ' या व्यक्तीने काही पायोनिअरींग काम केले ते 'ब' ने पुढे नेले, 'ब' चे काम 'क' ने काम पुढे नेले वगैरे. त्यामुळे ताजी पुस्तके घेतली तर त्यात कदाचित 'क' चे नाव असेल पण 'अ' चे नसेल. तसे असेल तर 'अ' हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शास्त्रज्ञ नाही असे म्हणता येईल का? आता प्रसिध्द होणार्‍या किती पेपरमध्ये किंवा पुस्तकांमध्ये न्यूटनचे नाव असेल? पण न्यूटनच्या दुसर्‍या लॉ वर बरेच काही अवलंबून आहे- उदाहरणार्थ नेव्हिअर-स्टोक्स चे इक्वेशन वगैरे. त्या नेव्हिअर-स्टोक्सचे नाव असेल पण न्यूटनचे असेलच असे नाही. म्हणजे न्यूटन बोगस होता असा त्याचा अर्थ होतो का? नारळीकरांच्या कामाविषयी असे काही होत असेल का? बाकी खगोलशास्त्र हा माझ्या अजिबात आवडीचा विषय नाही. खरं तर विज्ञानाचीही फार आवड आहे असे नाही आणि त्यात गतीही नाही. तरीही कोणत्याही रिसर्चच्या क्षेत्रात ही साधारण अशीच प्रोसेस असते एवढे माहित आहे. (एक बत्थड मेकॅनिकल इंजिअर आणि पी.एच.डी न झेपल्याने पळून आलेला) चंसूकु

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 10/02/2026 - 11:14
खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले पूर्वग्रह दूषित मन असलं कि अशी विधाने येतात. न्यूटनचे अनेक सिद्धांत आज दोषपूर्ण आहेत असे सिद्ध झाले म्हणू न्यूटनचे अफाट बुद्धिमत्ता आणि त्याने भौतिकशास्त्रात दिलेले मूलभूत योगदान कमी होत नाही. जसा काळ जातो तसे नवीन संशोधन येत राहते म्हणजे अगोदरचे सर्व मूर्ख ठरत नाहीत. अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची त्यात एखाद्या पुशतकात न्यूटनचा उल्लेख आढळेल तो सुद्धा अ‍ॅस्ट्रोफिजिक्स च्या इतिहासाच्या धंद्यात असेल. म्हणजे न्यूटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ नाही असे म्हणायचे? मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच

युयुत्सु 11/02/2026 - 10:29
श्री० चंद्रसूर्यकुमार तुमच्या युक्तीवादात फार गल्लत झाली आहे. प्रथम न्युटन आणि नारळीकर ही तूलना किंवा बरोबरी करायचा प्रयत्न अतिशय अयोग्य, हास्यास्पद आहे (आणि न्युटनला अपमानकारक). न्यूटन अजुनही रिलेव्हण्ट आहे कारण प्रकाशाच्या वेगाच्या तूलनेत बराच कमी वेग असलेल्या पदार्थ किंवा वस्तूना, कमी घर्षणात अजुनही न्युटन्चे नियम लागु पडतात. त्यामुळे न्युटन अजुनही शिकवणे आवश्यक ठरते. नारळीकरांच्या थिअरीला कचर्‍याची टोपली दाखवली गेली आहे. Historical dead end (हॉईल-नारळीकर सिद्धांत) vs useful limiting theory (न्युटनचे कार्य) हे आपण समजून घ्यायचा प्रय्त्न केला तर आपल्याला सत्य समजायला मदत होईल. बाकी. आय० आय० टी० च्या विद्यार्थ्यांकडून बॉण्ड लिहून घ्यायला माझी काहीच हरकत नाही. फक्त असा बॉण्ड लिहून घेतला तर सरकारची अवस्था अरेबियन नाईटस मधल्या वर्षातून फकत दोनदा खोटं बोलणार्‍या देखण्या, हुशार गुलामाच्या मालकासारखी होईल. बरं ते जाऊ दे, आय० आय० आय० टी०चे माजी विद्यार्थी बॉण्ड लिहून देत नसले तरी आपल्या मातृसंस्थांना किती भरभरून देत असतात ते एखाद्या आय० आय० आय० टी० च्या कॅम्पस मध्ये फेरफटका मारून आल्यावर समजेल. असो...

आता आयुर्मान वाढले आहे. निवृत्ती नंतर अनेक जणांच्या आयुष्यात रिकामपण येते आणि ते २०,२५ वर्षे टिकते. काल परवा पर्यंत साहेब साहेब करत पुढे मागे करणाऱ्या मंडळींचा गोतावळा नसतो. निवृत्ती जसजशी जुनी होत जाते तसतशी घरात फारशी किंमत राहत नाही, वयोमानाप्रमाणे आदर दिला जातो पण दिलेले मत हे सल्ला म्हणून विचारात घेतले जात नाही. यामुळे लक्ष वेधून घेण्यासाठी अशी (सगळी नाही, अपवाद असतात) माणसे काही ना काही तर्हेवाईकपण करतात. जुन्या काळातल्या कर्तबगारीच्या खऱ्या किंवा खोट्या कथा एकत्र करून आजूबाजूच्या लोकांना सांगत राहतात, मोठ्या लोकांवर,सरकारवर, व्यवस्थेवर दुगाण्या झाडत राहतात. आता सोशल मीडियाचा उदय झाल्यानंतर तर अशा लोकांचे पेव फुटले आहे. बढाया मारण्यासाठी नवीन मंच उपलब्ध असतो आणि माणूस कोणालाही answerable सुद्धा नसतो. प्रशासनाने 'ज्येष्ठ नागरिक' मंडळींसाठी वेगळे सदरच सुरु करावे आणि असे धागे त्या सदरात हलवावेत म्हणजे सगळ्यांसाठी सोयीचे होईल.

गामा पैलवान 16/02/2026 - 23:39
लोकहो, युयुत्सु हे सदस्य आता इतिहासजमा झालेले आहेत. त्यांची दोन विधानं भाष्य करण्याजोगी वाटली. त्याबद्दल माझी मतं सांगतो. १.
खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले. तेव्हा टवाळी व्यक्तीची की थिअरीची या प्रश्नाला फारसा अर्थ उरत नाही.
आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची रुदरफोर्ड आणि सॉडी यांनी खिल्ली उडवली आहे. मात्र खुद्द आईनस्टाईनची कोणीही खिल्ली उडवीत नाही. २.
"आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - ....
माझ्या माहितीप्रमाणे जयंत नारळीकर स्वत: आंख्याशा म्हणून बिरूद मिरवीत नसंत. मात्र याबद्दल चूकभूल देणेघेणे. आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त 18/02/2026 - 19:07
फोटूतला दंताडा बाबाजी कोण, भटकरबाबा कोण, गोविंदस्वरूप कोण, हे मजसारख्या अडाण्याला ठाऊक नसणे सहाजिकच आहे (तसेच सहाजिक जयंत नारळीकर कोण हे ठाऊक असणेही आहे) पण ते सगळ्याच मिपाकरांना ठाऊक असावे, असे लेखकर्त्याला वाटते आहे का ? -- म्हणजे या लेखात जे काही लिहीले आहे, ते कळण्यासाठीही आयायटीयनच हवेत की काय ? -- मुळात ही जिलबी सोडण्यात मूळ हेतु काय आहे, काहीच समजले नाही. .

In reply to by चित्रगुप्त

गामा पैलवान 18/02/2026 - 20:15
फोटोतले गृहस्थ प्रा. गोविंद स्वरूप आहेत. पुण्यानजीक खोडद गावांत जायंट मीटरवेव्ह रेडियो टेलिस्कोप ( = GMRT ) उभारणारे प्रभृती. -गा.पै.

विजुभाऊ 09/02/2026 - 16:24
या लेखावर प्रतिक्रीया देण्याची इच्छा होत नाहिय्ये. नारळीकर कय किंवा विजय भटकर काय हे सर्वसामान्य लोकांसमवेत सहज मिसळायचे . या दोनही मराठी व्यक्तींच्या ज्ञानाबद्दल आणि कामाबद्दल अत्यंत आदर आहे. त्या दोघांबद्दलही कधी त्यानी कोणाबद्दल आकस धरून ठेवल्याचे की त्यानी कोणाबद्दल गैर उद्गार काढल्याचे ऐकीवात नाही. गोविंद स्वरूप यांच्या बद्दल काही राजकीय अडचणीची वक्त्वये आहेत. पण आपला मोठेपणा दाखवण्यासाठी नारळीकरांसारख्या व्यक्तीला हिणवणॅ नक्कीच आवडले नाहीय्ये

आहे. मला पूर्वी TIFR किंवा IIT मधे शिकलेल्या लोकांचे फार कौतुक वाटायचे मात्र नंतर त्यांचे मातीचे पाय आणि अत्यंत भंगार दर्जाच्या टेस्ट्स पाहून त्यांच्याविषयी फार काही वाटायचे बंद झाले. बहुतेकांना बुद्धिमत्तेच्या ऑब्जेक्टिव्हिटीपेक्षा खरेतर सोशल कॅपिटल मुळे अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळाला एवढेच सत्य. नंदा खऱ्यांनी तर एकदा या लोकांवर सरकार किती खर्च करत होते (आताच्या पैशात जवळ जवळ चार कोटी रुपये प्रति विद्यार्थी) हेही सविस्तर सांगितले होते आणि यातले बरेच जण नेहरूंची तत्कालीन सरकारांची बदनामी करत अमेरिकेत पळून गेली

युयुत्सु 10/02/2026 - 09:58
श्री० गा०पै० खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले. तेव्हा टवाळी व्यक्तीची की थिअरीची या प्रश्नाला फारसा अर्थ उरत नाही. शिवाय "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - त्याच्या विषयातील - म्हणजे इथे अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची आणि त्यात १०% तरी पुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो का हे सांगावे. विजुभाऊंच्या प्रतिसादाबद्द्ल काय बोलणार - लोकांमध्ये मिसळल्याने एखाद्या व्यक्तीचे काम मोठे होत असेल तर सगळंच कठीण आहे. हणमंतअण्णांच्या कॉमेण्ट वाचून - आय० आय० टी० च्या नावाने बोटे मोडणारा मोठा वर्ग आपल्या देशात आहे, त्याचीच आठवण झाली. आय० आय० टी० च्या विद्यार्थ्यांना देशात थांबवता येत नाही हा प्रॉब्लेम देशाचा की त्या विद्यार्थ्यांचा? अनेक प्रतिष्ठीत संस्था देशात - आय आय एस सी, एन आय डी, आयसर, बार्क इ०.त्यांच्याबद्दल हणमंतअण्णा काहीच बोलले नाहीत. पण हणमंतअण्णाकडून माझ्या फार अपेक्षा नाहीत.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 10/02/2026 - 11:08
आय आय टी च्या लोकांनी परदेशात जाणे यात गैर आहे असे नाही पण त्यांच्यावर केलेला खर्च त्यांनी परत करणे यासाठीतरी त्यांच्यावर बॉण्ड असायला हवा. जसा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातुन एम बी बी एस किंवा एम डी केल्यावर आहे. आणि बॉण्ड करायचा नसेल तर तेवढे पैसे सरकार जमा करायला हवेत. बाकी आय आय टी किंवा आय आय एम या संस्थेत *तुम्हीच* जगात सर्वात हुशार असा अहंगंड मोठ्या प्रमाणावर पसरवला जातो. जगात इतरही अनेक संस्था आहेत जेथे अतिशय हुशार माणसे शिकत असतात. भारताने अवकाश संशीधन किंवा क्षेपणास्त्रे किंवा अणुशक्ती या विषयात दैदिप्य मान प्रगती केली आहे. पण इसरो किंवा भाभा अणुकेंद्र सरकारी संस्था असल्यामुळे तेथे आय आय टी मधील विद्यार्थी जवळ जवळ नाहीतच. वैद्यकीय किंवा सनदी लेखापरीक्षण अर्थ शास्त्र अशा विषयात अत्यंत हुशार माणसे कार्यरत आहेत. पण ती आय आय टी ची नाहीत म्हणजे ती हुशार नाहीतच (असे बऱ्याच आय आय टीयन ना वाटते). असो. आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात काही कमी नाहीत.

In reply to by युयुत्सु

शिवाय "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - त्याच्या विषयातील - म्हणजे इथे अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची आणि त्यात १०% तरी पुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो का हे सांगावे.
शास्त्रात रिसर्चमध्ये प्रगती होत असते म्हणजे 'अ' या व्यक्तीने काही पायोनिअरींग काम केले ते 'ब' ने पुढे नेले, 'ब' चे काम 'क' ने काम पुढे नेले वगैरे. त्यामुळे ताजी पुस्तके घेतली तर त्यात कदाचित 'क' चे नाव असेल पण 'अ' चे नसेल. तसे असेल तर 'अ' हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शास्त्रज्ञ नाही असे म्हणता येईल का? आता प्रसिध्द होणार्‍या किती पेपरमध्ये किंवा पुस्तकांमध्ये न्यूटनचे नाव असेल? पण न्यूटनच्या दुसर्‍या लॉ वर बरेच काही अवलंबून आहे- उदाहरणार्थ नेव्हिअर-स्टोक्स चे इक्वेशन वगैरे. त्या नेव्हिअर-स्टोक्सचे नाव असेल पण न्यूटनचे असेलच असे नाही. म्हणजे न्यूटन बोगस होता असा त्याचा अर्थ होतो का? नारळीकरांच्या कामाविषयी असे काही होत असेल का? बाकी खगोलशास्त्र हा माझ्या अजिबात आवडीचा विषय नाही. खरं तर विज्ञानाचीही फार आवड आहे असे नाही आणि त्यात गतीही नाही. तरीही कोणत्याही रिसर्चच्या क्षेत्रात ही साधारण अशीच प्रोसेस असते एवढे माहित आहे. (एक बत्थड मेकॅनिकल इंजिअर आणि पी.एच.डी न झेपल्याने पळून आलेला) चंसूकु

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 10/02/2026 - 11:14
खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले पूर्वग्रह दूषित मन असलं कि अशी विधाने येतात. न्यूटनचे अनेक सिद्धांत आज दोषपूर्ण आहेत असे सिद्ध झाले म्हणू न्यूटनचे अफाट बुद्धिमत्ता आणि त्याने भौतिकशास्त्रात दिलेले मूलभूत योगदान कमी होत नाही. जसा काळ जातो तसे नवीन संशोधन येत राहते म्हणजे अगोदरचे सर्व मूर्ख ठरत नाहीत. अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची त्यात एखाद्या पुशतकात न्यूटनचा उल्लेख आढळेल तो सुद्धा अ‍ॅस्ट्रोफिजिक्स च्या इतिहासाच्या धंद्यात असेल. म्हणजे न्यूटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ नाही असे म्हणायचे? मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच

युयुत्सु 11/02/2026 - 10:29
श्री० चंद्रसूर्यकुमार तुमच्या युक्तीवादात फार गल्लत झाली आहे. प्रथम न्युटन आणि नारळीकर ही तूलना किंवा बरोबरी करायचा प्रयत्न अतिशय अयोग्य, हास्यास्पद आहे (आणि न्युटनला अपमानकारक). न्यूटन अजुनही रिलेव्हण्ट आहे कारण प्रकाशाच्या वेगाच्या तूलनेत बराच कमी वेग असलेल्या पदार्थ किंवा वस्तूना, कमी घर्षणात अजुनही न्युटन्चे नियम लागु पडतात. त्यामुळे न्युटन अजुनही शिकवणे आवश्यक ठरते. नारळीकरांच्या थिअरीला कचर्‍याची टोपली दाखवली गेली आहे. Historical dead end (हॉईल-नारळीकर सिद्धांत) vs useful limiting theory (न्युटनचे कार्य) हे आपण समजून घ्यायचा प्रय्त्न केला तर आपल्याला सत्य समजायला मदत होईल. बाकी. आय० आय० टी० च्या विद्यार्थ्यांकडून बॉण्ड लिहून घ्यायला माझी काहीच हरकत नाही. फक्त असा बॉण्ड लिहून घेतला तर सरकारची अवस्था अरेबियन नाईटस मधल्या वर्षातून फकत दोनदा खोटं बोलणार्‍या देखण्या, हुशार गुलामाच्या मालकासारखी होईल. बरं ते जाऊ दे, आय० आय० आय० टी०चे माजी विद्यार्थी बॉण्ड लिहून देत नसले तरी आपल्या मातृसंस्थांना किती भरभरून देत असतात ते एखाद्या आय० आय० आय० टी० च्या कॅम्पस मध्ये फेरफटका मारून आल्यावर समजेल. असो...

आता आयुर्मान वाढले आहे. निवृत्ती नंतर अनेक जणांच्या आयुष्यात रिकामपण येते आणि ते २०,२५ वर्षे टिकते. काल परवा पर्यंत साहेब साहेब करत पुढे मागे करणाऱ्या मंडळींचा गोतावळा नसतो. निवृत्ती जसजशी जुनी होत जाते तसतशी घरात फारशी किंमत राहत नाही, वयोमानाप्रमाणे आदर दिला जातो पण दिलेले मत हे सल्ला म्हणून विचारात घेतले जात नाही. यामुळे लक्ष वेधून घेण्यासाठी अशी (सगळी नाही, अपवाद असतात) माणसे काही ना काही तर्हेवाईकपण करतात. जुन्या काळातल्या कर्तबगारीच्या खऱ्या किंवा खोट्या कथा एकत्र करून आजूबाजूच्या लोकांना सांगत राहतात, मोठ्या लोकांवर,सरकारवर, व्यवस्थेवर दुगाण्या झाडत राहतात. आता सोशल मीडियाचा उदय झाल्यानंतर तर अशा लोकांचे पेव फुटले आहे. बढाया मारण्यासाठी नवीन मंच उपलब्ध असतो आणि माणूस कोणालाही answerable सुद्धा नसतो. प्रशासनाने 'ज्येष्ठ नागरिक' मंडळींसाठी वेगळे सदरच सुरु करावे आणि असे धागे त्या सदरात हलवावेत म्हणजे सगळ्यांसाठी सोयीचे होईल.

गामा पैलवान 16/02/2026 - 23:39
लोकहो, युयुत्सु हे सदस्य आता इतिहासजमा झालेले आहेत. त्यांची दोन विधानं भाष्य करण्याजोगी वाटली. त्याबद्दल माझी मतं सांगतो. १.
खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले. तेव्हा टवाळी व्यक्तीची की थिअरीची या प्रश्नाला फारसा अर्थ उरत नाही.
आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची रुदरफोर्ड आणि सॉडी यांनी खिल्ली उडवली आहे. मात्र खुद्द आईनस्टाईनची कोणीही खिल्ली उडवीत नाही. २.
"आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - ....
माझ्या माहितीप्रमाणे जयंत नारळीकर स्वत: आंख्याशा म्हणून बिरूद मिरवीत नसंत. मात्र याबद्दल चूकभूल देणेघेणे. आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त 18/02/2026 - 19:07
फोटूतला दंताडा बाबाजी कोण, भटकरबाबा कोण, गोविंदस्वरूप कोण, हे मजसारख्या अडाण्याला ठाऊक नसणे सहाजिकच आहे (तसेच सहाजिक जयंत नारळीकर कोण हे ठाऊक असणेही आहे) पण ते सगळ्याच मिपाकरांना ठाऊक असावे, असे लेखकर्त्याला वाटते आहे का ? -- म्हणजे या लेखात जे काही लिहीले आहे, ते कळण्यासाठीही आयायटीयनच हवेत की काय ? -- मुळात ही जिलबी सोडण्यात मूळ हेतु काय आहे, काहीच समजले नाही. .

In reply to by चित्रगुप्त

गामा पैलवान 18/02/2026 - 20:15
फोटोतले गृहस्थ प्रा. गोविंद स्वरूप आहेत. पुण्यानजीक खोडद गावांत जायंट मीटरवेव्ह रेडियो टेलिस्कोप ( = GMRT ) उभारणारे प्रभृती. -गा.पै.
 टवाळी -- राजीव उपाध्ये (पूर्वप्रसिद्धी - फेसबुक) १९९३-९४ च्या सुमारास भटकरांनी माझे रखडवलेले प्रमोशन करायचेच असा विडा एका सहकारी-हितचिंतकाने उचलला. माझी बढती रखडवण्याची जी कारणे होती त्यातले एक ठळक कारण म्हणजे भटकरांनी पाळलेले एक मांजर मी त्याच्या हाताखाली पी०एच०डी० करावी म्हणून माझ्या मागे हात धुवून लागले होते.

मी कोण? - एक प्रयोग

युयुत्सु ·

युयुत्सु 06/02/2026 - 08:39
श्री० अभ्या मजेशीर टिप्प्णी आवडली. श्री० कंजूस इतर (आजुबाजुचे) कर्मदरिद्री, अर्धवट डोक्याचे किंवा मंदबुद्धीचे असतील तर काहीही उपयोग नाही. पण वरील प्रयोगाला आणखी एक पूरक प्रयोग करणे आवश्यक ठरते. तो असा- माणसाच्या कर्तबगारीवर दोन गोष्टी प्रामुख्याने प्रभाव पाडतात - इतरांनी आयुष्यात केलेली ढवळाढवळ आणि त्या व्यक्तीचे "सेल्फ-लिमिटींग बिलिफ्स". "सेल्फ-लिमिटींग बिलिफ्स" म्हणजे स्वतःला जखडून टाकणार्‍या धारणा/श्रद्धा/बेड्या. या कळणे पण स्वतःला ओळखण्यासाठी आवश्यक ठरते. यासाठी पण ए०आय० चा उपयोग मानवी समुपदेशकापेक्षा चांगला होतो. कारण ए०आय० माणसासारखा मूलतः दूष्ट नाही.

युयुत्सु 06/02/2026 - 08:39
श्री० अभ्या मजेशीर टिप्प्णी आवडली. श्री० कंजूस इतर (आजुबाजुचे) कर्मदरिद्री, अर्धवट डोक्याचे किंवा मंदबुद्धीचे असतील तर काहीही उपयोग नाही. पण वरील प्रयोगाला आणखी एक पूरक प्रयोग करणे आवश्यक ठरते. तो असा- माणसाच्या कर्तबगारीवर दोन गोष्टी प्रामुख्याने प्रभाव पाडतात - इतरांनी आयुष्यात केलेली ढवळाढवळ आणि त्या व्यक्तीचे "सेल्फ-लिमिटींग बिलिफ्स". "सेल्फ-लिमिटींग बिलिफ्स" म्हणजे स्वतःला जखडून टाकणार्‍या धारणा/श्रद्धा/बेड्या. या कळणे पण स्वतःला ओळखण्यासाठी आवश्यक ठरते. यासाठी पण ए०आय० चा उपयोग मानवी समुपदेशकापेक्षा चांगला होतो. कारण ए०आय० माणसासारखा मूलतः दूष्ट नाही.
 मी कोण? - एक प्रयोग ============ -राजीव उपाध्ये मला ए०आय० बरोबर वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे, हे आता जगजाहिर आहे. विचारमंथनाबरोबर वेगवेगळ्या शक्यता/बाजूंचा अंदाज घेण्यासाठी ए०आय०चा उपयोग होऊ शकतो. मला हा उपयोग अ त्यंत महत्त्वाचा वाटतो. आता कुणाला या जिलब्या वाटतील तर कुणाला पिपाणी वाटेल, पण ज्यांना कल्पकतेचं अप्रुप वाटते त्यांना हा प्रयोग आवडेल. म्हणूनच करून बघावा. इथे मि०पा०वर डावे-उजवे इ० लेबले लावण्यचा उद्योग जोरात चालतो. त्यात धर्म मला मुक्तीच्या मार्गातला अडसर वाटतो!

गोल्डमेडल

युयुत्सु ·

सोत्रि 04/02/2026 - 13:19
छान, प्रा. अभ्यंकर यांची ओळख आवडली! पण, शेवटच्या परिच्छेदाची गरज नव्हती, त्याने लेखाला गालबोट लागलं असं वाटून गेलं! - (गणितात अनप्युअर आणि ढ असणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

युयुत्सु 04/02/2026 - 13:29
मानवी लेखक प्रांमाणिकपणे लिहू लागला की गहजब होतो आणी त्याने ए०आय० सारखे लिहावे अशी अपेक्षा निर्माण होते. पण प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!

In reply to by सोत्रि

सुबोध खरे 04/02/2026 - 18:38
प्रा जयंत नारळीकर यांच्या वर अशी टीका करणे अनाठायी आहे याबद्दल प्रचंड सहमत. त्यांचे एकंदर काम पाहिल्यास हे नक्की जाणवते.

In reply to by सुबोध खरे

कांदा लिंबू 04/02/2026 - 19:32
प्रा जयंत नारळीकर यांच्या वर अशी टीका करणे अनाठायी आहे याबद्दल प्रचंड सहमत. पिपाणी सापडलेले बालक थोरामोठ्यांचा मुलाहिजा न बाळगता त्यांच्या कानाजवळ जाऊन कर्कश्य आवाज करते.

मानवी लेखक प्रांमाणिकपणे लिहू लागला की गहजब होतो आणी त्याने ए०आय० सारखे लिहावे अशी अपेक्षा निर्माण होते. एकंदरीत सगळीकडेच आई (Artificial intelligence) घालायची म्हटल्यास अवघड आहे :) ह्या पाचकळ विनोदावर आपणास हसू नाही आले तरी चालेल पण राग येणार नाही अशी अपेक्षा आहे बाकी हा लेख छान आहे. आवडला. लिहित रहा.

In reply to by धर्मराजमुटके

कांदा लिंबू 04/02/2026 - 19:38
एकंदरीत सगळीकडेच आई (Artificial intelligence) घालायची म्हटल्यास अवघड आहे :) या चिनी डाव्यांची सवयच असते, "हे चांगलं आहे" असं नुसतं सांगून त्यांचं समाधान होत नाही; "आमचं हे चांगलं आहे पण तुमचं ते वाईट आहे" असा त्यांचा नेहमी सूर असतो.

गामा पैलवान 05/02/2026 - 02:38
युयुत्सु, मला वाटतं की नारळीकरांनी लिहिलेल्या परीकथा नसून विज्ञानकथा आहेत. बाकी, तुमच्या मनातला भयगंड घालवणे ही नारळीकरांची जबाबदारी नाही. अभ्यंकरांचीही नाही. ती केवळ तुमचीच आहे. ती तुम्ही पार पाडलीत त्याबद्दल अभिनंदन. आ.न., -गा.पै.

विजुभाऊ 05/02/2026 - 17:44
भारतात इतकी विद्यापीठे आहेत. दरवर्षे त्यातून काही हजार लोक पि एच डी होतात. हे सगळे संशोधक आहेत. आणि त्यानी काहीतरी संशोधन केलेले असते. जर भारतात इतके सगळे संशोधन होत असेल तर आपण त्याचा व्यवहारात उपयोग का करत नाही. या संशोधनाच्या पेपर्स चे रद्दी या व्यक्तिरीक्त इतर काय उपयोग केले जातात ?

सुबोध खरे 05/02/2026 - 19:03
त्यातून काही हजार लोक पि एच डी होतात. त्यातले बहुसंख्य मास्तरकी करतात आणि उरल्या वेळात देशाच्या संरक्षण प्रणाली वर किंवा विमान कसे चालवू नये यावर सार्वजनिक न्यासावर विशेष टिप्पण्या करतात. आता खान्देशातील वांग्याच्या पिकावरील पिसवांचा प्रादुर्भाव आणि मराठी साहित्यातील त्याचा संदर्भ यांचा तौलनिक अभ्यास यावर पी एच डी केल्यावर अजून काय अपेक्षा आहेत?. हा का ना का

सोत्रि 04/02/2026 - 13:19
छान, प्रा. अभ्यंकर यांची ओळख आवडली! पण, शेवटच्या परिच्छेदाची गरज नव्हती, त्याने लेखाला गालबोट लागलं असं वाटून गेलं! - (गणितात अनप्युअर आणि ढ असणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

युयुत्सु 04/02/2026 - 13:29
मानवी लेखक प्रांमाणिकपणे लिहू लागला की गहजब होतो आणी त्याने ए०आय० सारखे लिहावे अशी अपेक्षा निर्माण होते. पण प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!

In reply to by सोत्रि

सुबोध खरे 04/02/2026 - 18:38
प्रा जयंत नारळीकर यांच्या वर अशी टीका करणे अनाठायी आहे याबद्दल प्रचंड सहमत. त्यांचे एकंदर काम पाहिल्यास हे नक्की जाणवते.

In reply to by सुबोध खरे

कांदा लिंबू 04/02/2026 - 19:32
प्रा जयंत नारळीकर यांच्या वर अशी टीका करणे अनाठायी आहे याबद्दल प्रचंड सहमत. पिपाणी सापडलेले बालक थोरामोठ्यांचा मुलाहिजा न बाळगता त्यांच्या कानाजवळ जाऊन कर्कश्य आवाज करते.

मानवी लेखक प्रांमाणिकपणे लिहू लागला की गहजब होतो आणी त्याने ए०आय० सारखे लिहावे अशी अपेक्षा निर्माण होते. एकंदरीत सगळीकडेच आई (Artificial intelligence) घालायची म्हटल्यास अवघड आहे :) ह्या पाचकळ विनोदावर आपणास हसू नाही आले तरी चालेल पण राग येणार नाही अशी अपेक्षा आहे बाकी हा लेख छान आहे. आवडला. लिहित रहा.

In reply to by धर्मराजमुटके

कांदा लिंबू 04/02/2026 - 19:38
एकंदरीत सगळीकडेच आई (Artificial intelligence) घालायची म्हटल्यास अवघड आहे :) या चिनी डाव्यांची सवयच असते, "हे चांगलं आहे" असं नुसतं सांगून त्यांचं समाधान होत नाही; "आमचं हे चांगलं आहे पण तुमचं ते वाईट आहे" असा त्यांचा नेहमी सूर असतो.

गामा पैलवान 05/02/2026 - 02:38
युयुत्सु, मला वाटतं की नारळीकरांनी लिहिलेल्या परीकथा नसून विज्ञानकथा आहेत. बाकी, तुमच्या मनातला भयगंड घालवणे ही नारळीकरांची जबाबदारी नाही. अभ्यंकरांचीही नाही. ती केवळ तुमचीच आहे. ती तुम्ही पार पाडलीत त्याबद्दल अभिनंदन. आ.न., -गा.पै.

विजुभाऊ 05/02/2026 - 17:44
भारतात इतकी विद्यापीठे आहेत. दरवर्षे त्यातून काही हजार लोक पि एच डी होतात. हे सगळे संशोधक आहेत. आणि त्यानी काहीतरी संशोधन केलेले असते. जर भारतात इतके सगळे संशोधन होत असेल तर आपण त्याचा व्यवहारात उपयोग का करत नाही. या संशोधनाच्या पेपर्स चे रद्दी या व्यक्तिरीक्त इतर काय उपयोग केले जातात ?

सुबोध खरे 05/02/2026 - 19:03
त्यातून काही हजार लोक पि एच डी होतात. त्यातले बहुसंख्य मास्तरकी करतात आणि उरल्या वेळात देशाच्या संरक्षण प्रणाली वर किंवा विमान कसे चालवू नये यावर सार्वजनिक न्यासावर विशेष टिप्पण्या करतात. आता खान्देशातील वांग्याच्या पिकावरील पिसवांचा प्रादुर्भाव आणि मराठी साहित्यातील त्याचा संदर्भ यांचा तौलनिक अभ्यास यावर पी एच डी केल्यावर अजून काय अपेक्षा आहेत?. हा का ना का
 "गोल्डमेडल" ======================== - राजीव उपाध्ये (पूर्वप्रसिद्धी ऑक्टोबर २०१३) ही गोष्ट आहे मी कॉलेजात असतानाची... तेव्हा शुद्ध गणितात चमकणार्‍या ईश्वराच्या लाडक्या पुत्रांबद्दल माझ्या मनात एक असूया निर्माण झाली होती. या माझ्या मनातल्या असूयेने मी त्यावेळेला गणितात गोडी वाढविण्यासाठी काहीसे दिशाहीन प्रयत्न करत होतो. ते बघुन माझा एक मित्र मला म्हणाला, "तुला प्युअर मॅथ्समध्ये interest असेल तर माझ्या बरोबर प्रा. श्रीराम अभ्यंकरांकडे चल.

ब्रेक के बाद..

आजी ·

गवि 03/02/2026 - 18:21
रात्री जेवायला बसल्यावर टीव्हीवर हमखास हार्पिकने लोकांचे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारचे कूप स्वच्छ होताना त्यांतील किटाणूंच्या वर्धित प्रतिमांसह पाहणे टाळता येणे अशक्य. येतेच ते समोर.

विजुभाऊ 03/02/2026 - 19:11
गवि ना पडला तो प्रश्न मलाही पडतो. याना कसे कळते की आम्ही जेवायला बसलोय , नेमके त्याच वेळेस हार्पीक च्या झैराती येतात. आज्जी बाई. तुम्ही गायबला होतात हे जानवलं होते. त्यामुअ‍ॅळ तुमचा लेख दिसलयावर लै बरे वाटले

In reply to by विजुभाऊ

सोत्रि 06/02/2026 - 13:38
याना कसे कळते की आम्ही जेवायला बसलोय, नेमके त्याच वेळेस हार्पीक च्या झैराती येतात.
तुम्ही जेवायला बसला आहात की नाही ह्याच्याशी त्यांना काहीही देणे-घेणे नसते हो विजुभौ!

I will display 😂

- (जाहिरातबाज) सोकाजी

गामा पैलवान 03/02/2026 - 19:48
पनवेलच्या पुढे प्रवासी रेलवे सेवा नुकतीच सुरू झाली होती, तेव्हाची गोष्ट. आम्ही दिव्याहून गाडी पकडली व पनवेलच्या पुढे जाणार होतो. पनवेलास समोरचा माणूस उठून गेला. त्यानंतर गाडी जी थांबली ती हलायचं नावंच घेईना. शेवटी पाऊण तासाने गाडी हलली. तेव्हढ्यात समोरचा माणूस येऊन बसला व म्हणाला की लवकर निघाली गाडी. आम्ही प्रश्नार्थक मुद्रेने पाहिल्यावर म्हणतो की नेहमी एक तास तरी लागतोच. मागील महिन्यात त्या एका तासात त्याने बहिणीकडे जाऊन भाऊबीजही आटोपली होती, अशी बहुमोल माहिती पुरवली. तो रेलवेत कामास होता. पुढे म्हणाला की पनवेलास मोटरमनास कागदी अर्ज भरून पुढील प्रवासाची परवानगी ( ब्लॉक क्लिअरन्स ) घ्यावी लागते व तिची एक प्रत इंजिनात ठेवावी लागते. त्यामुळे एक तास मोडतो. अहाहा, काय तो ब्रेक होता. हल्ली असे ब्रेक मिळंत नाहीत. दुसऱ्या ब्रेकची कथाही दिवा पनवेल मार्गाशी संबंधित आहे. असाच दिव्याहून पनवेलच्या दिशेने पाशिंजर पकडून चाललो होतो. पाणी मिळणार नाही म्हणून घरून पाणी भरपूर पिऊन निघालो होतो. आणि थंडीचे दिवस होते. मग काय जलनिष्कासावेग जरा जास्तंच जाणवू लागला. म्हणून निळजे स्थानकात खाली उतरून जमिनीचे क्षारवर्धन अभियान राबवू लागलो. सुदैवाने फलाट नसल्याने गाडीपासून दूर जावं लागलं नाही. मोहीम ऐन भरात असतांना गाडी हलली. मग काय, कसंबसं अभियान आवरलं आणि गाडीत चढलो. मग उरलेलं अभियान पुढल्या स्थानकात तळोजात पूर्ण केलं. परत एकदा सुदैवाने फलाटाची रुंदी अगदी नगण्य असल्याने गाडीपासनं जवळंच कार्यभाग आटोपता आला. असा हा अभियानी ब्रेक घेण्याची वेळ कोणावर येऊ नये. -गा.पै.

In reply to by प्रचेतस

मूकवाचक 06/02/2026 - 14:10
'भक्त' आणि 'रूग्ण' यांच्या किंवा अन्य वैचारिक रणकंदनातून 'ब्रेक' घेऊन असे काही सहज सुंदर लेखन वाचले की मिपावर आल्याचे सार्थक होते.

निनाद 05/02/2026 - 11:15
८० किंवा त्या आधीच्या काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांना भुसावळला बराच वेळ थांबायच्या. बहुदा इंजिने आणि डब्यांमध्ये पाणी भरण्यासाठी खूप वेळ लागायचा. एकदा आमची गाडी आऊटरलाच उभी राहिली. उन्हाचे दिवस भयंकर गरमी आणि पंखे गरम हवा मारायचे. गाडी थांबली की पंखे बंद व्हायचे कारण डब्याला असलेली ब्याटरी डाऊन. असे आमचे हाल चाललेले असतांना शेजारच्या बर्थवरचे एक काका शांतपणे सामानाची राखण सोडून खाली उतरले आणि चक्क रेल्वे लाईन ओलांडून पलीकडच्या कॉलनीत निघून गेले. आम्ही आपले काळजीत की या माणसाची गाडी सुटली तर काय? खूप वेळ झाला तरी ते आलेच नाही.. नंतर ते काका, हातात घरचा डबा घेऊन पाऊण तासाने परत आले, ते म्हणाले, माझा भैण रेल्वेच्या वसाहतीत राहते. तिचा नवरा म्हणजे म्येव्हणा त्याला शिफ ड्युटी. झोपला स्टेशनवर यायला नव्हता, मग मीच विचार केला की इंजिन पाणी घेईपर्यंत आणि 'सिग्नल क्लिअरस्तोर घरची चौकशी करून येतो. गाडी काय १० मिनिटात सुटायचं नाही. गा पै मुळे असा ही एक ब्रेक आठवला. त्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांची क्वार्टर्स आणि रेल्वेचे स्टेशन्स यांच्यात एक अनोखं समीकरण होतं. त्यातही मोठी जंक्शन स्टेश्न्स जरा वेगळीच असायची. अवांतराबद्दल क्षमस्व!

वेलकम ब्याक आज्जी. असेच खुसखुशीत लेख लिहुन आम्हाला हसवत रहा. बाकी आजकाल चेपु ,ईन्स्टाआणि तूनळीवरील रील्स मुळे ब्रेक असा तो काय मिळतच नाही बघा. दोन मीटीन्गांमध्ये किवा रात्री बेरात्री क्लायंटच्या शिव्या ऐकुन संपल्या की ब्रेक घ्यावा न झोपावे तर हे रील्स स्क्रोल करत अजुन १ तास निघुन जातो. माझा एक कलीग म्हण्तो "सर, मै तो सुब्बे सुब्बे पॉटी करते हुवे रातभरके टिम्स चॅट पढ लेता हुं, क्या पता बॉस का कॉल आ जाये......" बायो ब्रेकमधेही टीम्स वर काय काय मेसेज येउन पडलेत ते बघावे लागते.आता बोला.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गेले वर्षभर इंस्टा नी फेसबूल बंद केले आहे, युट्यूबही उडवले! रिल्स पासून सुटका मिळाली, प्रचंड मोकळा वेळ नी शांतात मिळतेय. माझ्या बरोबरीच्या अनेकांनी हे केले आहे.

गणेशा 05/02/2026 - 15:28
छान लेख :) तुम्ही विना ब्रेक कायम लिहित रहावे हि इच्छा. बाकी tv २०२१ पासून नाही.. त्यामुळे बरे आहे सध्या.. असले ब्रेक बघायलच नको.. परंतु क्रिकेट match पाहतानाच्या जाहिराती जरा बऱ्या असतात असे माझे मत.. बाकी थिएटरात पैसे देऊन गेल्यावर, सिनेमा चालू होण्या अगोदर आनी interval नंतर ती खैनी, पान, गुठख्या ची जाहिरात डोक्यात जाते... आम्हीच सापडलो काय दाखवायला असे वाटते..

आजी 10/02/2026 - 22:12
माझ्या पोस्टचं तुम्ही सर्वांनी इतकं भरभरून स्वागत केलंत की माझ्या मनात आलं की मी पुन्हा लिहायला लागून "कोई गलती नहीं की" (हे वाक्य शोलेतल्या संजीव कुमार च्या आवाजात वाचावं.) मित्रमैत्रिणींनो हजाराच्या पार पोहोचणारी वाचने, आणि पंधराच्या आसपास प्रतिसाद या पोस्ट ला आले.तुमच्या मैत्रीपूर्ण,स्नेहपूर्ण प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार मानते. यांत अनेकांनी स्वतःच्या अनुभवांबद्दलही लिहिलं. त्यांचीही विशेष दखल घ्यावीशी वाटते. पुन्हा एकदा सर्वांचेच आभार मानते आणि लवकरच एक गंमतीदार लेख घेऊन येते आहे.

गवि 03/02/2026 - 18:21
रात्री जेवायला बसल्यावर टीव्हीवर हमखास हार्पिकने लोकांचे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारचे कूप स्वच्छ होताना त्यांतील किटाणूंच्या वर्धित प्रतिमांसह पाहणे टाळता येणे अशक्य. येतेच ते समोर.

विजुभाऊ 03/02/2026 - 19:11
गवि ना पडला तो प्रश्न मलाही पडतो. याना कसे कळते की आम्ही जेवायला बसलोय , नेमके त्याच वेळेस हार्पीक च्या झैराती येतात. आज्जी बाई. तुम्ही गायबला होतात हे जानवलं होते. त्यामुअ‍ॅळ तुमचा लेख दिसलयावर लै बरे वाटले

In reply to by विजुभाऊ

सोत्रि 06/02/2026 - 13:38
याना कसे कळते की आम्ही जेवायला बसलोय, नेमके त्याच वेळेस हार्पीक च्या झैराती येतात.
तुम्ही जेवायला बसला आहात की नाही ह्याच्याशी त्यांना काहीही देणे-घेणे नसते हो विजुभौ!

I will display 😂

- (जाहिरातबाज) सोकाजी

गामा पैलवान 03/02/2026 - 19:48
पनवेलच्या पुढे प्रवासी रेलवे सेवा नुकतीच सुरू झाली होती, तेव्हाची गोष्ट. आम्ही दिव्याहून गाडी पकडली व पनवेलच्या पुढे जाणार होतो. पनवेलास समोरचा माणूस उठून गेला. त्यानंतर गाडी जी थांबली ती हलायचं नावंच घेईना. शेवटी पाऊण तासाने गाडी हलली. तेव्हढ्यात समोरचा माणूस येऊन बसला व म्हणाला की लवकर निघाली गाडी. आम्ही प्रश्नार्थक मुद्रेने पाहिल्यावर म्हणतो की नेहमी एक तास तरी लागतोच. मागील महिन्यात त्या एका तासात त्याने बहिणीकडे जाऊन भाऊबीजही आटोपली होती, अशी बहुमोल माहिती पुरवली. तो रेलवेत कामास होता. पुढे म्हणाला की पनवेलास मोटरमनास कागदी अर्ज भरून पुढील प्रवासाची परवानगी ( ब्लॉक क्लिअरन्स ) घ्यावी लागते व तिची एक प्रत इंजिनात ठेवावी लागते. त्यामुळे एक तास मोडतो. अहाहा, काय तो ब्रेक होता. हल्ली असे ब्रेक मिळंत नाहीत. दुसऱ्या ब्रेकची कथाही दिवा पनवेल मार्गाशी संबंधित आहे. असाच दिव्याहून पनवेलच्या दिशेने पाशिंजर पकडून चाललो होतो. पाणी मिळणार नाही म्हणून घरून पाणी भरपूर पिऊन निघालो होतो. आणि थंडीचे दिवस होते. मग काय जलनिष्कासावेग जरा जास्तंच जाणवू लागला. म्हणून निळजे स्थानकात खाली उतरून जमिनीचे क्षारवर्धन अभियान राबवू लागलो. सुदैवाने फलाट नसल्याने गाडीपासून दूर जावं लागलं नाही. मोहीम ऐन भरात असतांना गाडी हलली. मग काय, कसंबसं अभियान आवरलं आणि गाडीत चढलो. मग उरलेलं अभियान पुढल्या स्थानकात तळोजात पूर्ण केलं. परत एकदा सुदैवाने फलाटाची रुंदी अगदी नगण्य असल्याने गाडीपासनं जवळंच कार्यभाग आटोपता आला. असा हा अभियानी ब्रेक घेण्याची वेळ कोणावर येऊ नये. -गा.पै.

In reply to by प्रचेतस

मूकवाचक 06/02/2026 - 14:10
'भक्त' आणि 'रूग्ण' यांच्या किंवा अन्य वैचारिक रणकंदनातून 'ब्रेक' घेऊन असे काही सहज सुंदर लेखन वाचले की मिपावर आल्याचे सार्थक होते.

निनाद 05/02/2026 - 11:15
८० किंवा त्या आधीच्या काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांना भुसावळला बराच वेळ थांबायच्या. बहुदा इंजिने आणि डब्यांमध्ये पाणी भरण्यासाठी खूप वेळ लागायचा. एकदा आमची गाडी आऊटरलाच उभी राहिली. उन्हाचे दिवस भयंकर गरमी आणि पंखे गरम हवा मारायचे. गाडी थांबली की पंखे बंद व्हायचे कारण डब्याला असलेली ब्याटरी डाऊन. असे आमचे हाल चाललेले असतांना शेजारच्या बर्थवरचे एक काका शांतपणे सामानाची राखण सोडून खाली उतरले आणि चक्क रेल्वे लाईन ओलांडून पलीकडच्या कॉलनीत निघून गेले. आम्ही आपले काळजीत की या माणसाची गाडी सुटली तर काय? खूप वेळ झाला तरी ते आलेच नाही.. नंतर ते काका, हातात घरचा डबा घेऊन पाऊण तासाने परत आले, ते म्हणाले, माझा भैण रेल्वेच्या वसाहतीत राहते. तिचा नवरा म्हणजे म्येव्हणा त्याला शिफ ड्युटी. झोपला स्टेशनवर यायला नव्हता, मग मीच विचार केला की इंजिन पाणी घेईपर्यंत आणि 'सिग्नल क्लिअरस्तोर घरची चौकशी करून येतो. गाडी काय १० मिनिटात सुटायचं नाही. गा पै मुळे असा ही एक ब्रेक आठवला. त्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांची क्वार्टर्स आणि रेल्वेचे स्टेशन्स यांच्यात एक अनोखं समीकरण होतं. त्यातही मोठी जंक्शन स्टेश्न्स जरा वेगळीच असायची. अवांतराबद्दल क्षमस्व!

वेलकम ब्याक आज्जी. असेच खुसखुशीत लेख लिहुन आम्हाला हसवत रहा. बाकी आजकाल चेपु ,ईन्स्टाआणि तूनळीवरील रील्स मुळे ब्रेक असा तो काय मिळतच नाही बघा. दोन मीटीन्गांमध्ये किवा रात्री बेरात्री क्लायंटच्या शिव्या ऐकुन संपल्या की ब्रेक घ्यावा न झोपावे तर हे रील्स स्क्रोल करत अजुन १ तास निघुन जातो. माझा एक कलीग म्हण्तो "सर, मै तो सुब्बे सुब्बे पॉटी करते हुवे रातभरके टिम्स चॅट पढ लेता हुं, क्या पता बॉस का कॉल आ जाये......" बायो ब्रेकमधेही टीम्स वर काय काय मेसेज येउन पडलेत ते बघावे लागते.आता बोला.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गेले वर्षभर इंस्टा नी फेसबूल बंद केले आहे, युट्यूबही उडवले! रिल्स पासून सुटका मिळाली, प्रचंड मोकळा वेळ नी शांतात मिळतेय. माझ्या बरोबरीच्या अनेकांनी हे केले आहे.

गणेशा 05/02/2026 - 15:28
छान लेख :) तुम्ही विना ब्रेक कायम लिहित रहावे हि इच्छा. बाकी tv २०२१ पासून नाही.. त्यामुळे बरे आहे सध्या.. असले ब्रेक बघायलच नको.. परंतु क्रिकेट match पाहतानाच्या जाहिराती जरा बऱ्या असतात असे माझे मत.. बाकी थिएटरात पैसे देऊन गेल्यावर, सिनेमा चालू होण्या अगोदर आनी interval नंतर ती खैनी, पान, गुठख्या ची जाहिरात डोक्यात जाते... आम्हीच सापडलो काय दाखवायला असे वाटते..

आजी 10/02/2026 - 22:12
माझ्या पोस्टचं तुम्ही सर्वांनी इतकं भरभरून स्वागत केलंत की माझ्या मनात आलं की मी पुन्हा लिहायला लागून "कोई गलती नहीं की" (हे वाक्य शोलेतल्या संजीव कुमार च्या आवाजात वाचावं.) मित्रमैत्रिणींनो हजाराच्या पार पोहोचणारी वाचने, आणि पंधराच्या आसपास प्रतिसाद या पोस्ट ला आले.तुमच्या मैत्रीपूर्ण,स्नेहपूर्ण प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार मानते. यांत अनेकांनी स्वतःच्या अनुभवांबद्दलही लिहिलं. त्यांचीही विशेष दखल घ्यावीशी वाटते. पुन्हा एकदा सर्वांचेच आभार मानते आणि लवकरच एक गंमतीदार लेख घेऊन येते आहे.
ब्रेक या विषयावर मला खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. ब्रेक म्हणजे सिरीयल मधले ब्रेक बरं का! मध्ये मध्ये गॅप असते ना ती! या गॅपमध्ये म्हणजे ब्रेकमध्ये मालिका दहा मिनिटे असते आणि ब्रेक वीस मिनिटांचा असतो. या ब्रेक मध्ये खूप गोष्टी काही काही जण करून घेतात. म्हणजे नॅचरल कॉल्स उरकून घेणे ,गाद्या घालणे , झोपण्यापूर्वी दात घासणे. माझ्या सासूबाई तर म्हणायच्या", मी पटकन देवाचं म्हणून घेते. आणि देवापुढे दिवा लावायच्या .दोन स्तोत्रंही त्या म्हणायच्या. तरीही ब्रेक सुरूच असायचा. जेवणाचे ताट घेऊन खूप जण ब्रेकच्या वेळात जेवायला बसतात.

धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य

विवेकपटाईत ·

कॉमी 07/02/2026 - 13:11
टॉल्किन साहेबांचे एक पुस्तक नुकतेच (मृत्यूपश्चात) प्रकाशित झाले - The Bovadium Fragments ह्यात गाड्या व्हीलन आहेत.
As scholars pour over fragments unearthed from the archeological site at Bovadium, a handful of documents written in two languages reveal the secrets of this ancient place, which have lain buried for centuries. Evidently once upon a time a Daemon arose in nearby Vaccipratum, who by his cunning devised abominable machines, which he called Motores. The people of Bovadium first became enamoured of these machines, but soon became their slaves; and as the roads were gridlocked and the city polluted by their fumes, the end of Bovadium was nigh.

कॉमी 07/02/2026 - 13:11
टॉल्किन साहेबांचे एक पुस्तक नुकतेच (मृत्यूपश्चात) प्रकाशित झाले - The Bovadium Fragments ह्यात गाड्या व्हीलन आहेत.
As scholars pour over fragments unearthed from the archeological site at Bovadium, a handful of documents written in two languages reveal the secrets of this ancient place, which have lain buried for centuries. Evidently once upon a time a Daemon arose in nearby Vaccipratum, who by his cunning devised abominable machines, which he called Motores. The people of Bovadium first became enamoured of these machines, but soon became their slaves; and as the roads were gridlocked and the city polluted by their fumes, the end of Bovadium was nigh.
मानव ऋषीने दगड घासून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली “हे अग्नी, सुख-समृद्धी दे, शत्रूंवर विजय मिळवून दे.” त्याने उच्चारले: “अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम.” तेवढ्यात हवनकुंडातून एक धुरकट अशरीरी आकृती प्रकट झाली. हात जोडून उभी. ती म्हणाली, “मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझं भोजन. मानवाच्या इच्छा पूर्ण करणं, हाच माझा धर्म.” ऋषीने मधमाश्यांच्या पोळ्याचं मध मागितलं. धूम्राक्षने धूर निर्माण केला, मधमाश्या निघून गेल्या. ऋषीला खोकला आला, पण मधुर मध चाखायला मिळाला.

मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन

युयुत्सु ·
मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन -राजीव उपाध्ये २०२५ च्या अखेरीस 'नेचर कम्युनिकेशन्स' मध्ये प्रकाशित झालेल्या कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधनाने मानवी परिपक्वतेच्या पारंपारिक सीमांना पूर्णपणे बदलले आहे. या संशोधनाने मेंदूच्या रचनेचे पाच मुख्य कालखंड आणि ९, ३२, ६६ आणि ८३ हे चार कालखंड पाडले. या वयातील "वळण-बिंदू (टर्निंग पॉईण्ट) ओळखून, हे संशोधन असे स्पष्ट करते की मानवी मेंदू त्याच्या स्थिर आणि पूर्ण विकसित अवस्थेत चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच हे संशोधन असे सूचित करते की, ज्याला सध्या पौंडावस्था (adolescence) मानले जाते, ती अवस्था वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत सुरू राहते.

ए०आय० - एक नवे देवत्व!

युयुत्सु ·

युयुत्सु 28/01/2026 - 11:26
एक - गंमत खालील प्रश्न डीपसीक, ग्रोक , जेमिनी आणि चॅटजीपीटी यांना विचारला- Is the following essay AI generated? फक्त जेमिनी सोडून इतर सर्वांना हा मानवनिर्मित लेख वाटला.

गवि 28/01/2026 - 11:30
लांब डॅशेस हे चॅट जिपीटी वरून थेट कॉपी पेस्ट असल्याचे सर्वात ठळक लक्षण असते. मानवी लिखाणात अशा लांब डॅशेस दिल्या जात नाहीत आणि चॅट जिपीटी मात्र आवर्जून त्या वापरतो. जसे: शक्यता वाढते—कारण अधिकार हेतूने काम करत नाही—तो डेटावर

युयुत्सु 28/01/2026 - 15:37
ए०आय०च्या मदतीने लिखाण करताना माझा स्वत:चा स्वतंत्र अल्गो आहे. ० जेव्हा एखाद्या विषयावर भरपूर वाचून आणि पाहून (युटुयूब वरील व्याख्याने आणि सादरीकरणे) झाले की साधारण काय मांडायचे याची जुळवा-जुळव करायला सुरुवात होते. बर्‍याचवेळा या टप्प्यावर अनेक कारणांनी रेंगाळायला होते. इथे प्रॉम्प्ट देऊन निबंध/लेख पाडण्य़ापेक्षा ए०आय० कडुन प्रस्तावित लेखाविषयी रूपरेषा मागवायची. ही रुपरेषा जशीतशी स्वीकारणे दरवेळेला असतेच शहाणपणाचे असे नाही. मग अशा वेळेस त्या रूपरेषेत आपल्या मर्जीप्रमाणे बदल हा महत्त्वाचा संस्कार ठरतो. आपल्याला काय सांगायचे याचा मसुदा तयार झाला की ए०आय० बरोबर विचारमंथन करता येते. या पायरीमध्ये आपल्या वाचनात आलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने ए०आय०चे मत मागवता येते. प्रश्न विचारता येतात, जे मत महत्त्वाचे असते त्याचा सोईचे ए०आय० मॉडेल वापरून विस्तार करता येतो. मग यांत्रिक मराठीतून मानवी मराठीत आणायचा संकार करावा. ० असे करताना यांत्रिक वाक्यरचनांकडे दूर्लक्ष होऊ शकते. अशा वाक्य रचना शक्य तेव्हढ्या आपण दुरुस्त कराव्यात, जिथे शक्य नाही तिथे उपलब्ध साधनांची मदत घ्यावी. यात आणखी काही टप्पे आहेत ते सर्वच इथे देणे शक्य नाही. पण सरसकट ए०आय० ला नाके मुरडणे हा त्या तंत्रज्ञानाचा घोर अपमान आहे...

युयुत्सु 31/01/2026 - 08:58
सक्काळी सक्काळी चहाचे घुटके घेताना मनात आलेला -खोड्साळ- विचारः लोकांना कोणत्याही दगडाला शेंदूर फासलेला, गुलाल-फुले वाहिलेल्या यंत्रातला देव चालतो, तसेच मानसिक पंगुपण निर्माण करणारी कालबाह्य पोथ्यापुराणे वंदनीय असतात. ए०आय० मध्ये 'देव' 'माणूस' शोधलेला चालत नाही... माणूस दुट्टपीपणामध्ये कधी हारेल असं वाटत नाही.

In reply to by युयुत्सु

कांदा लिंबू 31/01/2026 - 12:10
मानसिक पंगुपण निर्माण करणारी कालबाह्य पोथ्यापुराणे वंदनीय असतात तुम्ही दास कॅपिटलाबद्धल बोलताय की कुराणाबद्धल?

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 01/02/2026 - 15:34
युयुत्सु, मी नेहमीच दुटप्पी असेन. कारण की दुटप्पीपणा काम करतो. हेच पहा ना, मी आळश्यासारखा कोचावर पहुडलो होतो. टीव्हीवरचा कार्यक्रम बदलायचा होता. उशाशी रिमोट होतं. दाबलं बटण आणि बदललं च्यानेल. हाय काय नाय काय. बघितलंत मी किती दुटप्पी आहे ते ! च्यायला, रिमोटचा ट्रान्समीटर बल्ब बनवलाय प्रकाशतरंग प्रक्षेपित करण्यासाठी. आणि टीव्हीचा ग्राहक ( = रीसीव्हर ) बनवलाय तो प्रकाशाचे कण गृहीत धरून. मी इतका दुटप्पी आहे की माझी दोन्ही मान्यतांवर श्रद्धा आहे. बटण दाबून काम होत असेल तर दुटप्पीपणास काय हरकत आहे? आ.न., -गा.पै.

युयुत्सु 31/01/2026 - 11:56
या अभ्यासात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्जनशील व्यावसायिकांची जागा घेईल या भीतीबाबत एक समतोल दृष्टीकोन मांडला आहे. काही विशिष्ट कामांमध्ये AI प्रणाली आता सरासरी मानवी सर्जनशीलतेइतकी किंवा त्याहून अधिक कामगिरी करू शकतात; मात्र त्यांना अजूनही स्पष्ट मर्यादा आहेत आणि त्या मानवी मार्गदर्शनावरच अवलंबून असतात. https://www.sciencedaily.com/releases/2026/01/260125083356.htm

स्वधर्म 01/02/2026 - 02:48
हा पारंपारिक देवांचा मृत्युलेख आहे की काय असे वाटले. ते ठीकच. पण नव्या देवाच्या स्वागताचा पाळणा नसावा.

चामुंडराय 04/02/2026 - 05:11
AI म्हणजे दशावतारातील साडे-नववा सर्वज्ञानी, सर्व-आंजाव्यापी अवतार आहे. लवकरच त्याला देवत्व प्राप्त होईल. नेट पॅक चा नैवेद्य दाखवला आणि दक्षिणा दिली की माहितीची पोतडी तुमच्या समोर उपडी करतो.

युयुत्सु 28/01/2026 - 11:26
एक - गंमत खालील प्रश्न डीपसीक, ग्रोक , जेमिनी आणि चॅटजीपीटी यांना विचारला- Is the following essay AI generated? फक्त जेमिनी सोडून इतर सर्वांना हा मानवनिर्मित लेख वाटला.

गवि 28/01/2026 - 11:30
लांब डॅशेस हे चॅट जिपीटी वरून थेट कॉपी पेस्ट असल्याचे सर्वात ठळक लक्षण असते. मानवी लिखाणात अशा लांब डॅशेस दिल्या जात नाहीत आणि चॅट जिपीटी मात्र आवर्जून त्या वापरतो. जसे: शक्यता वाढते—कारण अधिकार हेतूने काम करत नाही—तो डेटावर

युयुत्सु 28/01/2026 - 15:37
ए०आय०च्या मदतीने लिखाण करताना माझा स्वत:चा स्वतंत्र अल्गो आहे. ० जेव्हा एखाद्या विषयावर भरपूर वाचून आणि पाहून (युटुयूब वरील व्याख्याने आणि सादरीकरणे) झाले की साधारण काय मांडायचे याची जुळवा-जुळव करायला सुरुवात होते. बर्‍याचवेळा या टप्प्यावर अनेक कारणांनी रेंगाळायला होते. इथे प्रॉम्प्ट देऊन निबंध/लेख पाडण्य़ापेक्षा ए०आय० कडुन प्रस्तावित लेखाविषयी रूपरेषा मागवायची. ही रुपरेषा जशीतशी स्वीकारणे दरवेळेला असतेच शहाणपणाचे असे नाही. मग अशा वेळेस त्या रूपरेषेत आपल्या मर्जीप्रमाणे बदल हा महत्त्वाचा संस्कार ठरतो. आपल्याला काय सांगायचे याचा मसुदा तयार झाला की ए०आय० बरोबर विचारमंथन करता येते. या पायरीमध्ये आपल्या वाचनात आलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने ए०आय०चे मत मागवता येते. प्रश्न विचारता येतात, जे मत महत्त्वाचे असते त्याचा सोईचे ए०आय० मॉडेल वापरून विस्तार करता येतो. मग यांत्रिक मराठीतून मानवी मराठीत आणायचा संकार करावा. ० असे करताना यांत्रिक वाक्यरचनांकडे दूर्लक्ष होऊ शकते. अशा वाक्य रचना शक्य तेव्हढ्या आपण दुरुस्त कराव्यात, जिथे शक्य नाही तिथे उपलब्ध साधनांची मदत घ्यावी. यात आणखी काही टप्पे आहेत ते सर्वच इथे देणे शक्य नाही. पण सरसकट ए०आय० ला नाके मुरडणे हा त्या तंत्रज्ञानाचा घोर अपमान आहे...

युयुत्सु 31/01/2026 - 08:58
सक्काळी सक्काळी चहाचे घुटके घेताना मनात आलेला -खोड्साळ- विचारः लोकांना कोणत्याही दगडाला शेंदूर फासलेला, गुलाल-फुले वाहिलेल्या यंत्रातला देव चालतो, तसेच मानसिक पंगुपण निर्माण करणारी कालबाह्य पोथ्यापुराणे वंदनीय असतात. ए०आय० मध्ये 'देव' 'माणूस' शोधलेला चालत नाही... माणूस दुट्टपीपणामध्ये कधी हारेल असं वाटत नाही.

In reply to by युयुत्सु

कांदा लिंबू 31/01/2026 - 12:10
मानसिक पंगुपण निर्माण करणारी कालबाह्य पोथ्यापुराणे वंदनीय असतात तुम्ही दास कॅपिटलाबद्धल बोलताय की कुराणाबद्धल?

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 01/02/2026 - 15:34
युयुत्सु, मी नेहमीच दुटप्पी असेन. कारण की दुटप्पीपणा काम करतो. हेच पहा ना, मी आळश्यासारखा कोचावर पहुडलो होतो. टीव्हीवरचा कार्यक्रम बदलायचा होता. उशाशी रिमोट होतं. दाबलं बटण आणि बदललं च्यानेल. हाय काय नाय काय. बघितलंत मी किती दुटप्पी आहे ते ! च्यायला, रिमोटचा ट्रान्समीटर बल्ब बनवलाय प्रकाशतरंग प्रक्षेपित करण्यासाठी. आणि टीव्हीचा ग्राहक ( = रीसीव्हर ) बनवलाय तो प्रकाशाचे कण गृहीत धरून. मी इतका दुटप्पी आहे की माझी दोन्ही मान्यतांवर श्रद्धा आहे. बटण दाबून काम होत असेल तर दुटप्पीपणास काय हरकत आहे? आ.न., -गा.पै.

युयुत्सु 31/01/2026 - 11:56
या अभ्यासात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्जनशील व्यावसायिकांची जागा घेईल या भीतीबाबत एक समतोल दृष्टीकोन मांडला आहे. काही विशिष्ट कामांमध्ये AI प्रणाली आता सरासरी मानवी सर्जनशीलतेइतकी किंवा त्याहून अधिक कामगिरी करू शकतात; मात्र त्यांना अजूनही स्पष्ट मर्यादा आहेत आणि त्या मानवी मार्गदर्शनावरच अवलंबून असतात. https://www.sciencedaily.com/releases/2026/01/260125083356.htm

स्वधर्म 01/02/2026 - 02:48
हा पारंपारिक देवांचा मृत्युलेख आहे की काय असे वाटले. ते ठीकच. पण नव्या देवाच्या स्वागताचा पाळणा नसावा.

चामुंडराय 04/02/2026 - 05:11
AI म्हणजे दशावतारातील साडे-नववा सर्वज्ञानी, सर्व-आंजाव्यापी अवतार आहे. लवकरच त्याला देवत्व प्राप्त होईल. नेट पॅक चा नैवेद्य दाखवला आणि दक्षिणा दिली की माहितीची पोतडी तुमच्या समोर उपडी करतो.
 ए०आय० - एक नवे देवत्व! ============================ - राजीव उपाध्ये टीप - एक घोषणा करणे आवश्यक आहे - कदाचित हा लेख ए०आय० ला एक प्रॉम्प्ट देऊन लिहीला आहे, असे किरकिर करणार्‍यांना वाटू शकते. पण हे ए०आय० बरोबर केलेल्या **दीर्घ** विचारमंथनाचे संकलन आहे. त्यामुळे त्यावर माझे संस्कार झालेले आहेत. सुमारे दोन वर्षापूर्वीचा म्ह० ए०आय० अवतीर्ण होऊन स्थिराऊ लागला तेव्हाचा एक गमतीदार प्रसंग आहे.

निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा?

युयुत्सु ·
निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा? -राजीव उपाध्ये भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत काही संकल्पना इतक्या तेजस्वी वाटतात की त्या ऐकतानाच मन आपोआप नम्र होतं. “निष्काम कर्मयोग” ही त्यातलीच एक. फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे, कर्तव्यनिष्ठ राहणे, अहंकार कमी करून समत्वाने जगणे—हे सगळं ऐकायला जितकं सुंदर आहे, तितकंच ते वास्तवात गुंतागुंतीचं आणि कधी कधी धोकादायकही ठरू शकतं. कारण कोणतीही उच्च किंवा आकर्षक कल्पना जेव्हा समाजाच्या असमान रचनेत उतरते, तेव्हा तिचं रूपांतर “आत्मविकासा"तून “सत्तेचं साधन” होण्यात वेळ लागत नाही.

उलाढाल

अनुस्वार ·
उत्कट, उत्स्फूर्त हे शब्द आणि या भावना आपण विसरत चाललोय का? अनंताची अगाध ओढ असणाऱ्या आपल्या जीवांना सगळं मिळमिळीत का आवडू लागलंय? पाण्याने बोजड झालेले अवाढव्य ढग एकमेकांना घासावेत असं गडगडाटी हास्य कुठे कोसळून कायमचं संपलं? बांध फुटल्यासारखे रडणारे डोळे आता कुठे आहेत? कुठल्या वाळवंटात गडप झाले? चहूकडे फक्त कोरडे डोळे दिसतात - खाली माना घातलेले; लाजेने! वर तरी कुणाकडे पाहतील? सगळ्याच माना खाली असतात. हनुमानाने भक्तीचा पुरावा दाखवायला स्वतःची छाती फाडली होती म्हणतात. इथे स्वतःचा हात स्वतःच्या छातीवर ठेवला तरी ऊर दडपायला होतं. अंत्ययात्राही निघत नाहीत राव आता. प्रेताकडे टक लावून पाहता यायचं.

[ताज्या जिलब्या] एक काल्पनिक प्रयोग

युयुत्सु ·
[ताज्या जिलब्या] एक काल्पनिक प्रयोग ================== -राजीव उपाध्ये पदार्थविज्ञानात ’काल्पनिक प्रयोग’ (थॉट एक्सपेरीमेण्ट) ही एक महत्त्वाची कल्पना आहे.