विचार
मी कोण? - एक प्रयोग
मी कोण? - एक प्रयोग
============
-राजीव उपाध्ये
मला ए०आय० बरोबर वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे, हे आता जगजाहिर आहे. विचारमंथनाबरोबर वेगवेगळ्या शक्यता/बाजूंचा अंदाज घेण्यासाठी ए०आय०चा उपयोग होऊ शकतो. मला हा उपयोग अ त्यंत महत्त्वाचा वाटतो. आता कुणाला या जिलब्या वाटतील तर कुणाला पिपाणी वाटेल, पण ज्यांना कल्पकतेचं अप्रुप वाटते त्यांना हा प्रयोग आवडेल. म्हणूनच करून बघावा.
इथे मि०पा०वर डावे-उजवे इ० लेबले लावण्यचा उद्योग जोरात चालतो. त्यात धर्म मला मुक्तीच्या मार्गातला अडसर वाटतो!गोल्डमेडल
ब्रेक के बाद..
ब्रेक या विषयावर मला खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. ब्रेक म्हणजे सिरीयल मधले ब्रेक बरं का! मध्ये मध्ये गॅप असते ना ती!
या गॅपमध्ये म्हणजे ब्रेकमध्ये मालिका दहा मिनिटे असते आणि ब्रेक वीस मिनिटांचा असतो. या ब्रेक मध्ये खूप गोष्टी काही काही जण करून घेतात. म्हणजे नॅचरल कॉल्स उरकून घेणे ,गाद्या घालणे , झोपण्यापूर्वी दात घासणे.
माझ्या सासूबाई तर म्हणायच्या", मी पटकन देवाचं म्हणून घेते. आणि देवापुढे दिवा लावायच्या .दोन स्तोत्रंही त्या म्हणायच्या. तरीही ब्रेक सुरूच असायचा. जेवणाचे ताट घेऊन खूप जण ब्रेकच्या वेळात जेवायला बसतात.
धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
मानव ऋषीने दगड घासून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली “हे अग्नी, सुख-समृद्धी दे, शत्रूंवर विजय मिळवून दे.” त्याने उच्चारले: “अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम.”
तेवढ्यात हवनकुंडातून एक धुरकट अशरीरी आकृती प्रकट झाली. हात जोडून उभी. ती म्हणाली, “मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझं भोजन. मानवाच्या इच्छा पूर्ण करणं, हाच माझा धर्म.”
ऋषीने मधमाश्यांच्या पोळ्याचं मध मागितलं. धूम्राक्षने धूर निर्माण केला, मधमाश्या निघून गेल्या. ऋषीला खोकला आला, पण मधुर मध चाखायला मिळाला.
मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
-राजीव उपाध्ये
२०२५ च्या अखेरीस 'नेचर कम्युनिकेशन्स' मध्ये प्रकाशित झालेल्या कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधनाने मानवी परिपक्वतेच्या पारंपारिक सीमांना पूर्णपणे बदलले आहे. या संशोधनाने मेंदूच्या रचनेचे पाच मुख्य कालखंड आणि ९, ३२, ६६ आणि ८३ हे चार कालखंड पाडले. या वयातील "वळण-बिंदू (टर्निंग पॉईण्ट) ओळखून, हे संशोधन असे स्पष्ट करते की मानवी मेंदू त्याच्या स्थिर आणि पूर्ण विकसित अवस्थेत चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच हे संशोधन असे सूचित करते की, ज्याला सध्या पौंडावस्था (adolescence) मानले जाते, ती अवस्था वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत सुरू राहते.
ए०आय० - एक नवे देवत्व!
ए०आय० - एक नवे देवत्व!
============================
- राजीव उपाध्ये
टीप - एक घोषणा करणे आवश्यक आहे - कदाचित हा लेख ए०आय० ला एक प्रॉम्प्ट देऊन लिहीला आहे, असे किरकिर करणार्यांना वाटू शकते. पण हे ए०आय० बरोबर केलेल्या **दीर्घ** विचारमंथनाचे संकलन आहे. त्यामुळे त्यावर माझे संस्कार झालेले आहेत.
सुमारे दोन वर्षापूर्वीचा म्ह० ए०आय० अवतीर्ण होऊन स्थिराऊ लागला तेव्हाचा एक गमतीदार प्रसंग आहे.निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा?
निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा?
-राजीव उपाध्ये
भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत काही संकल्पना इतक्या तेजस्वी वाटतात की त्या ऐकतानाच मन आपोआप नम्र होतं.
“निष्काम कर्मयोग” ही त्यातलीच एक. फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे, कर्तव्यनिष्ठ राहणे, अहंकार कमी करून समत्वाने जगणे—हे सगळं ऐकायला जितकं सुंदर आहे, तितकंच ते वास्तवात गुंतागुंतीचं आणि कधी कधी धोकादायकही ठरू शकतं. कारण कोणतीही उच्च किंवा आकर्षक कल्पना जेव्हा समाजाच्या असमान रचनेत उतरते, तेव्हा तिचं रूपांतर “आत्मविकासा"तून “सत्तेचं साधन” होण्यात वेळ लागत नाही.
उलाढाल
उत्कट, उत्स्फूर्त हे शब्द आणि या भावना आपण विसरत चाललोय का? अनंताची अगाध ओढ असणाऱ्या आपल्या जीवांना सगळं मिळमिळीत का आवडू लागलंय? पाण्याने बोजड झालेले अवाढव्य ढग एकमेकांना घासावेत असं गडगडाटी हास्य कुठे कोसळून कायमचं संपलं? बांध फुटल्यासारखे रडणारे डोळे आता कुठे आहेत? कुठल्या वाळवंटात गडप झाले? चहूकडे फक्त कोरडे डोळे दिसतात - खाली माना घातलेले; लाजेने! वर तरी कुणाकडे पाहतील? सगळ्याच माना खाली असतात. हनुमानाने भक्तीचा पुरावा दाखवायला स्वतःची छाती फाडली होती म्हणतात. इथे स्वतःचा हात स्वतःच्या छातीवर ठेवला तरी ऊर दडपायला होतं. अंत्ययात्राही निघत नाहीत राव आता. प्रेताकडे टक लावून पाहता यायचं.
[ताज्या जिलब्या] एक काल्पनिक प्रयोग
[ताज्या जिलब्या] एक काल्पनिक प्रयोग
==================
-राजीव उपाध्ये
पदार्थविज्ञानात ’काल्पनिक प्रयोग’ (थॉट एक्सपेरीमेण्ट) ही एक महत्त्वाची कल्पना आहे.
मिसळपाव