Skip to main content

समीक्षा

रमन राघव २.०

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 15/07/2016 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्यतः समाजात चांगली आणि वाईट अशा दोन प्रव्रुत्तीची माणसं असतात असं मानतात. दोन्ही प्रव्रुत्तींचे रंग ही ठरलेले.....चांगल्यासाठी सफेद तर वाईटासाठी काळा. एवढ साध सरळ सोप असुनही आपण वर्गिकरण करण्यात चुकतो... बर्‍याच वेळा समोर असणारी व्रुत्ती ही फक्त चांगली वा वाईट एवढ्याच फरकात बसवता येत नाही किंबहुना ते ओळखणही खूप कठीण असतं. चांगला आणि वाईट, सफेद आणि काळा हे दोन्ही रंग जिथे एकमेकांना भिडतात तिथे अजुन एक छटा निर्माण होते....करडी(ग्रे शेड). कदाचित समोर दिसणारं करड्या छटेतलंही असु शकेल. काही प्रव्रुत्त्या, काही माणसं या ही छटेतली असतात...असु शकतात. समोर दिसणार तेवढच खर अस बर्‍याच वेळा नसतं.

सुलतान

लेखक समीर_happy go lucky यांनी रविवार, 10/07/2016 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आभासी जगाचा जमाना आहे, मग एखादा चित्रपट तिकीट बारीवर प्रचंड चालत असल्याचा आभास निर्माण करता येत असेल काय? हो कदाचित, कारण शंका असल्यास सुलतान हा चित्रपट बघून घ्यावा.चित्रपटाबद्दल आक्षेपार्ह काही नसेलही पण अति-पूर्वप्रसिद्धी?? यावर थोडा तरी चाप यशराज ने बसवावा माझ्यामते, सर्वाधिक विकेंड कलेक्शन - 500 कोटीच्या क्लबमधल्या काही मोजक्या कलाकृतींपैकी एक - सुपरस्टार सलमान च्या कारकिर्दीतील मैलाचा दगड इत्यादी इत्यादी इत्यादी पूर्वप्रसिद्धीने भुलून कदाचित, पण सध्या मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन दोन्हींचे दर आकाशाला भिडलेत. बरे असतीलही पण तितका प्रतिसाद चाहत्यांचा असेल काय??

जुनुनियत....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 08/07/2016 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट हे एक उत्तम माध्यम आहे कथाकथनाचं पण कथा मांडताना माध्यमाचा वापर योग्य पद्धतीनं झाला नाही तर चित्रपट फसतो. फक्त गोरे-गोरे, सुंदर चेहर्‍याचे कलाकार घेतले, कुठेतरी बर्फाळ प्रदेशात चित्रिकरण केलं आणि तिच घासुन घासुन चोथा झालेली कथा 'it's different' म्हणुन सादर केली कि चित्रपट होतो हा गैरसमज आहे. हा समज द्रुढ करणारा अजुन एक चित्रपट म्हणजे 'जुनुनियत....' कर्नल जोहान बक्षी- सुहानी कपूर या दोघांची ही कथा. टिपिकल प्रेमकथा पठडीतली..त्यामुळे अधिक लिहिणं गरजेच नाही. कथा ठिकठाक असली तरी पटकथा अत्यंत सुमार दर्जाची.

उडता पंजाब....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 28/06/2016 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे वगैरे एक समज आहे, निदान भारतात तरी. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट इतकी आणि इतकीच व्याख्या असलेल्या आपल्याकडच्या अनेक दिग्दर्शकांमुळे आपल्यालाही हिच सवय लागली आहे, कि चित्रपट हे फक्त वेळ घालवण्याचं माध्यम आहे. आपला एक गोड समज झाला आहे जो समज आहे कि गैरसमज हे ज्याने त्याने ठरवावं. परंतु या सगळ्यात बर्‍याच गोष्टी दुर्लक्षीत होतात. बरेच उत्तम प्रयत्न नजरेआड जातात. अन चुकुन एखादं वास्तव जर चित्रपट माध्यमातुन समोर आलच तर ते बहुतांश वेळा नाकारलं जातं. कलाक्रुती हा या नाण्याचा दुसरा मुद्दा पण मानसिकता अजुन पक्वतेकडे पोचली नाही हे नक्की.

उडता पंजाब....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 28/06/2016 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे वगैरे एक समज आहे, निदान भारतात तरी. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट इतकी आणि इतकीच व्याख्या असलेल्या आपल्याकडच्या अनेक दिग्दर्शकांमुळे आपल्यालाही हिच सवय लागली आहे, कि चित्रपट हे फक्त वेळ घालवण्याचं माध्यम आहे. आपला एक गोड समज झाला आहे जो समज आहे कि गैरसमज हे ज्याने त्याने ठरवावं. परंतु या सगळ्यात बर्‍याच गोष्टी दुर्लक्षीत होतात. बरेच उत्तम प्रयत्न नजरेआड जातात. अन चुकुन एखादं वास्तव जर चित्रपट माध्यमातुन समोर आलच तर ते बहुतांश वेळा नाकारलं जातं. कलाक्रुती हा या नाण्याचा दुसरा मुद्दा पण मानसिकता अजुन पक्वतेकडे पोचली नाही हे नक्की.

कांचीवरम

लेखक किसन शिंदे यांनी मंगळवार, 21/06/2016 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
कांचीवरम! रेशीम धाग्यापासून साडी विणण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले नगर! 'फुलांमधे जति, पुरूषांमधे विष्णू, स्त्रियांमधे रंभा आणि नगरांमध्ये कांची' असे महाकवी कालिदासही संस्कृतामध्ये ज्या नगराचे वर्णन करतो ते कांचीवरम. भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आहे, पण तरीही सामान्याना ब्रिटीशांपासून मिळालेलं स्वातंत्र्य खर्‍या अर्थाने उपभोगता येत नाहीच. याचं मुख्य कारण म्हणजे सावकार-जमीनदारांनी सामान्य लोकांची चालवलेली पिळवणूक. व्यापारी लोकं स्वतःचा नफा वाढवण्यासाठी मजूरांना अगदी कमी मजूरीत प्रचंड काम करवून घेत आहेत.

झोप उडवणारा 'उडता पंजाब'

लेखक चलत मुसाफिर यांनी शनिवार, 18/06/2016 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
(कोणताही रहस्यभेद/रसभंग होऊ नये अशी काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे) वा! काय झटका बसला राव. अगदी नटबोल्ट हलून गेले. जिभेची चित्र-चव हल्ली, तेच तेच भंगार साजिदछाप विनोद, सलमानछाप भीमउड्या, शाहरुखछाप मर्कटलीला आणि आचरट, अतर्क्य प्रेमकथांचा रतीब पाहून रद्दीत गेलेली होती, ती या 'उडता पंजाब' नामक झणझणीत मिर्चीच्या थेंबाने आधी खवळली, मग तृप्त झाली. शाब्बाश लेको! निदान चोवीस तास चित्रपट डोक्यातून जाणार नाही याची खात्री असू द्या! सर्वात आधी, सेन्सॉरशी खमकेपणाने लढून, न्यायालयाकडे दाद मागून, आर्थिक नुकसानाचा धोका पत्करून हा चित्रपट हट्टाने जसाच्या तसा ठेवल्याबद्दल निर्मात्यांचे अभिनंदन.

धुमसता पंजाब

लेखक विअर्ड विक्स यांनी शनिवार, 18/06/2016 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य हे नागवे असते , त्याला कोणत्या कुबड्यांची गरज भासत नाही , ते कटू असले तरी पचवावे लागते, ते सुन्न करू शकते वा एखाद्यास पेटवून उठवू शकते. असे फार कमी चित्रपट असतात की ज्यांना सत्य घटनेवर आधारित अश्या कुबड्यांची व बुरख्यांची गरज भासत नाही , जे दाखवितात ते वास्तवच असते नि असे पडद्यावर दाखवण्यात आलेले वास्तव प्रत्यक्षात बदल (निवडणुकांतून ) घडवू शकते. नि असा बदल त्यांनी घडावावा ही पंजाबच्या जनतेकडून अपेक्षा!!!!! फार तत्वज्ञान न सांगतां मुद्द्यावर येतो. आजच " उडता पंजाब " मॅटीनी शोला पाहिला आणि चित्रपट आवडला.

'फुंथ्रू'..........

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी रविवार, 12/06/2016 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपट्स्रुष्टी हीच भारतीय चित्रपट्स्रुष्टीची जननी आहे यात कितीही वाद असले तरी ते सत्य आहे. बर मग सांगा कि पहिला चित्रपट हिंदी होता का मराठी असले गौण प्रश्न विचारण्यात काहीही अर्थ नाही. या मराठी चित्रस्रुष्टीचे आजपर्यंत तीन भाग पडतात- एक १९१३ ते १९८० चा काळ ज्यात विविध प्रयोग रसिकांसमोर येत होते. या बाबतीत तरी मराठी हिंदी चित्रस्रुष्टीपेक्षा पुढे होती. दुसरा भाग म्हणजे १९८१ ते २००४ पर्यंतचा काळ. या कालखंडात एक निराशावादी मरगळजन्य स्थिती निर्माण झाली होती. काही वेळानंतर २००४ साली 'श्वास' प्रदर्शीत झाला. तिसरा म्हणजे श्वासपासुन म्हणजे २००४ ते आज २०१६ पर्यंतचा काळ.

डिअर डॅड....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 10/06/2016 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच गोष्टी या त्यांच्या साधेपणामुळेच आवडतात, मनाला भावतात. तो साधेपणा, ती सादगी मनाला कुठेतरी स्पर्श करते. चित्रपटांचही असच असतं. एकाच पठडीतल्या कथा, रंजकतेसाठी वापरलं जाणारं धक्कातंत्र, उगाचच घुसवलेली भडक द्रुश्य हे सगळ कितीही वेगळेपणानं मांडलं तरीही कंटाळा हा येतोच. या सगळ्यामधे एक साधी सरळ, अजिबात धक्का न देणारी कथा, शांत अभिनय असलेली आणि मुख्यातः गल्ला भरणे हाच मुद्दा नसलेली एक चित्रक्रुती जेव्हा समोर येते तेव्हा आपण पाहतोच. ती मनाला कुठेतरी अलवारपणे स्पर्श करते अगदी तो चित्रपट उत्तम वा उत्क्रुष्ट नसला तरीही...