मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिसाद

पुरूषांच सोप्प लाईफ.......

पियुशा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुरूषांच सोप्प लाईफ....... सकाळी सकाळी नारया का उगवला ? पाळण्यातला छोटा भोंगा ट्या- ट्या करून वाजला, बॅचलर होतो तेव्हा भरपूर केला दंगा ,मस्ती मजा ,मारामारी झालाय लग्न, पडली संसाराची जबाबदारी ,(बोला विट्ठल पांडुरंग हरी) "काय यार कटकट ,अग तू लक्ष दे ना जरा ,किचनमध्ये काय करते ? "(आतून) ,मी डब्बा बनवते, थोडा वेळ सांभाळायला तुझे काय जाते ? आमच्या सुमधुर गाण्याने ते अजूनच बोंबा मारतय, कधी केस ,चष्मा ,तर कधी मिशी धरून ओढतय , तोंडात ब्रश खांद्यावर टॉवेल घेऊन निघाली स्वारी पण बापूस ने आमच्या बाथरूम अडवलाय, च्या मारी ! रोज मी त्यां

महामहोपाध्याय, जैन आणि अंगवस्त्र

भडकमकर मास्तर ·
अशोक जैन.. एक ज्येष्ठ वगैरे पत्रकार.... सर्व साहित्यिक वगैरे मंडळींचे पाय कसे मातीचेच असतात हे सांगणारे त्यांचा एका दिवाळी अंकातला लेख मित्राने खास रेकमेंड केल्याचे स्मरते... बर्‍याच थोरांची टर उडवणारा तो गंमतीदार लेख आवडला होता...

मेघस्पर्षी

मृत्युन्जय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळचा ७.३० चा गजर झाला आणि "तो" नाइलाजाने उठला. त्या आधी सव्वासातचा आणि सातचा गजरही वाजुन बंद झाला होता. कुंभकर्णापुढे नगारे वाजवले तरी तो उठणार नाही हे सरावाने माहिती झाल्यामुळे घरच्यांनीही दुर्लक्ष केले. उठताना त्याचा हात चुकुन उशीला लागला आणि स्वतःचीच लाळ हाताला लागली. झोपताना खंडाळ्याच्या बोगद्यासारखे सताड उघडे असलेले तोंड, त्यातुन आघाडीच्या सरकारमधुन आतबाहेर करणार्‍या प्रादेशिक पक्षांसारखे आतबाहेर करणारे डास आणि तोडातुन लिटर दीड लिटर बाहेर पडणारी लाळ या सगळ्याचीच त्याला किळस यायची. स्वतः बद्दल त्याला न आवडणार्‍या अनेक गोष्टींपैकी ती एक होती.

ठाणे खादाडी - क्षणचित्रे..

गवि ·
लेखनविषय:
आमच्या कट्ट्याचा जीव छोटा आहे हे माहीत असल्याने पुरेपूर कोल्हापूरमधे असलेलं चोवीस जणांची व्यवस्था असलेलं छोटंसंच ए.सी. कंपार्टमेंट आम्ही अडवून ठेवलं होतं. मी आणि स्पावड्या साडेसातालाच तिथे पोचलो. स्पावड्यासोबत सुधांशू आणि वपाडाव आलेले होते. नंतर बराच काळ डोक्यांचा काउंट चारवरच स्थिर होता. सगळेजण जमेपर्यंत म्हणजे साडेआठपर्यंत आम्ही चौघे तिथेच खड्या पारश्यासारखे पण गप्प न राहता गप्पा हाणत उभे राहिलो. आम्ही सर्वच जण (स्पावड्या धरुन) एकमेकांना पहिल्यांदाच बघत होतो. मग "ओळखा पाहू" चा मस्त राउंड झाला.

(यांना विसरुन कसे चालेल ? )

मृत्युन्जय ·
लेखनविषय:
जेव्हा आख्खा देश विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत होते तेव्हा भारताच्या विजयाच्या शिल्पकाराला आपण विसरत होतो असे मला वाटते. मिपा वर एवढे धागे येउन गेले पण एकानेही विजयाचे योग्य ते श्रेय या इसमाला दिले नाही याचा खेद वाटतो म्हणुन हा धागाप्रपंच. खरे म्हणजे या व्यक्तीशिवाय आपण विश्वचषक जिंकु शकत नाही हे सुरुवातीपासुनच सर्वांना माहिती होते. त्या अनुषंगाने मला सुरुवातीला काही ढकलपत्रे आणि काही भ्रमणध्वनी संदेश देखील आले. पण म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो (अर्थात कोणाला वाटले म्हणुन हा वैद्य मरेल असे नाही). त्या अनुषंगाने लोक या इसमाला विसरले. कोण आहे हा?

क्रिकेट विश्वचषक - २०११ 'अभिनंदन'

इंटरनेटस्नेही ·
लेखनविषय:
आय सी सी क्रिकेट विश्वचषक - २०११ जिंकल्याबद्द्ल भारतीय क्रिकेट संघाचे मनापासुन अभिनंदन! आपण एक इतिहास घडवलेला आहे! एक स्वप्न सत्यात उतरले! - (अतिशय आनंदी) इंट्या.:)

पारंपारिक प्रतिस्पर्धी

मृत्युन्जय ·
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर आज बघा. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनंतर २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे. आजचा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्‍या महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नाहीत. याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती.

ट्यार्पीचे शिलेदार-एक आधुनिकोत्तर पॅकेज.

Nile ·
मित्रांनो, आम्ही तुमच्या करता एक आधुनिकोत्तर असे पॅकेज घेउन आलेलो आहोत, पॅकेजचे नाव आहे "ट्यार्पीचे शिलेदार". आम्हाला खात्री आहे हे पॅकेज तुमच्यापैकी सर्वांना उपयोगी पडेल, ते कसे याची झलक आम्ही खाली दिलेलीच आहे. ही फक्त झलकच आहे. संपुर्ण पॅकेज ज्यांना हवं आहे त्यांनी व्यनीने संपर्क करणे. पहिल्या पाच गिर्‍हाईकांना १०% डिस्काउंट दिला जाईल. हे पॅकेज डेव्हलप करण्यामागे काही स्फुर्तीस्थानं आहेत त्यांच्या विसर पडायला नको. पहिले स्फुर्तीस्थान म्हणजे अर्थातच ३% वाले कुंदनसेट. त्यांनी (हवे तितके) ३%ने देण्याचे कबुल केले नसते तर हे पॅकेज डेव्हलप करणे शक्यच नव्हते.

ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे

कापूसकोन्ड्या ·
ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे प्रख्यात पत्रकार आणि मराठी इ-पत्रकारितेमधील एक अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणून श्री. निखील वागळे यांची ओळख आहे. त्यांच्या आय बी एन लोकमत या वाहिनी वर प्रत्येक सप्ताहांतराला प्रसारीत होणाया ग्रेट भेट या कार्यक्रमाचा मी फ्यान आहे. हो अगदी अठ्ठेचाळीस इंची. भारतात असेन तेव्हा मी हा कार्यक्रम जरुर पाहतो, अन्यथा मिळाला तर तू नळी वर (काही भाग मिळतच नाहीयेत.) या मुलाखतीं मध्ये पाहुण्यांची निवड करताना त्यांचे मराठी असणे आणि वेगवेगळ्या विषयामध्ये किर्ती आणि स्वत:ची एक स्वतंत्र ओळख असणे हे सुत्र बहुदा असावे.