मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिसाद

सुलभ शौचालय - अशोक नायगांवकरांची कविता

यकु ·
विक्रोळीच्या संपतला मी म्हटले तु रूळावर काय शी करायला बसतोस? अरे केवढी मोठी गाडी आणि माणसे जातात या रूळावरून? तु संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस? अरे सरळ शौलायात जावे सुसंकृतपणे तशी संपत म्हणाला - साहेब

एक नवा घोर

सन्जोप राव ·
पार्श्वभूमी - हातकणंगले तालुक्यातल्या मौजे रांजणवाडी बुद्रुक मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. म्हणजे घटनाच आहे, पण सत्य आहे. किंवा सत्यच आहे, पण घटना आहे. ______ काही दिवसांपूर्वी रांजणवाडी बुद्रुकमध्ये ग्रामसभा होती. या सभेमध्ये सकाळच्या पारी गावाबाहेर 'बसायला' जाणार्‍या ग्रामस्थांना आणि त्यांच्या मुलांना सरपंचानी आमंत्रित केले होते. हेतू हा होता की सरकारच्या नव्या नियमांची या लोकांना माहिती द्यावी आणि लोकांना घरोघरी बांधकामासाठी प्रोत्साहित करावे. पण झाले भलतेच. या सरपंचांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला.

संगीत नाटक - ०१ - कट्यार का़ळजांत घुसली

५० फक्त ·
किंचित मंद उजेड, दोन बॆठका, एक तसबिर,मागच्या कोनाड्यात मुरलीधराची मुर्ती आणि कुणाची तरी कुठेतरी जायची तयारी चालु आहे. अरे हि तर उमा, घर सोडायची तयारी करते आहे. हो पण तिच्यावर हे घर सोडायची वेळ का यावी? जाउन विचारावं का? नको ही मोठ्या घरची माणसं आपण आपलं थोडं हातभर अंतर राखुनच रहावं. हे काय दिवाणजी पण आले, म्हणजे नक्की काहीतरी झालंय त्याशिवाय अशा मोठया हुद्द्यावरची माणसं सहजासहजी दिसत नाहीत होत हो. थांबा थोडं इथंच आणि पाहु काय आहे प्रकार तो. काय ! छे छे हे कसं होईल, अशक्य असं कसं झालं.

गुंजग्रामीचे दिवस

यकु ·
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी.

चिरंजीव चिंटू-२

डावखुरा ·
दि : २१.नोव्हें.२०१०; आज आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रमालिकेतुन प्रसिद्ध होउन लहानांपासुन मोठ्यांपर्यंत ईतर कोणत्याही बातमी कडे कटाक्ष टाकण्यापुर्वी चिंटू कडे जायला भाग पाडतो...ह्यातच ह्या मालिकेचे यश सामावलेय.. सतत दोन दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चिंटू २० व्यात पदार्पण करणार. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांचा मानसपुत्र असलेला

चिरंजीव चिंटू

डावखुरा ·
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

काही अतरंगी संभाषणे.

शानबा५१२ ·
लेखनविषय:
मी तशा खुप प्रकारच्या लोकांना भेटलो आहे,त्यांच्याबद्दल जास्त काही लिहु ईच्छीत नाही,पण त्यात उच्च पातळीच्या वैज्ञानिकांपासुन ते 'भाई' ह्या श्रेणीत येणारे सर्व येतात.मग मी प्रत्येकाशी बोलताना वापरले जाणारे शब्द,चेह-यावरचे भाव इतकेच काय अंगात घातलेले कपडे ह्यांचाही विचार करतो,हे सर्व 'जैसा देस वैसा भेस' ह्या नियमाचे कटेकोर पालन व्हावं ह्या उद्देशाने केलेले असते. पण संभाषणावेळी कधी कधी काय होतं,पुढची व्यक्ती मी गृहीत धरलेल्या तिच्या प्रतिभेला तडा जाईल असे काही शब्द बोलते,मी चाट पडतो,"अरे हेच बोलले का?". मला जे सांगायचय ते मी काही उदारणांसहीत स्पष्ट करतो. १) मी.नेने,ह्या माणसात तशे खुप गुण,त्यातल

मानवनिर्मित वातावारणबदल (climate change)

निकित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सोयीस्कर असत्ये लोकसत्तेमध्ये काही महिन्यांपूर्वी मुग्धा कर्णिक यांचा “गैरसोयीची असत्ये” हा लेख प्रकाशित झाला. त्यामध्ये त्यांनी जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदल हे नैसर्गिकच असून त्याला कार्बन डाय ऑक्साईड व इतर हरितगृह वायू जबाबदार नाहीत अशा प्रकारचा दावा केला आहे. त्याकरिता त्यांनी काही शास्त्रज्ञांचे दाखलेसुद्धा दिले आहेत. तथापि, त्यांच्या लेखातील अनेक मुद्दे हे सोयीस्कररित्या अपुऱ्या व अवैज्ञानिक माहितीवर आधारित आणि हास्यास्पद आहेत.

बॉडी डबल

मृत्युन्जय ·
बॉडी डबल हा शब्द पहिल्यांदा वाचनात आला तेव्हा माझ्यासारखे जे बोडीने डबल आहेत त्यांच्यासाठी हा शब्द वापरत असावेत असा माझा ग्रह झाला होता. मंदाकिनिचा कुठलातरी चित्रपट होता आणि मित्राने सांगितले बॉडी डबल आहे. मी असले चित्रपट का बघतो असे विचारु नका. असाही हा प्रश्न विचारायचा हक्क फक्त असले चित्रपट न बघितलेल्या लोकांना आहे. (हे अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना की मोत्यांना हात लावायचा हक्क फक्त वारा न सरलेल्या माणसांना आहे त्या धर्तीवर वाचावे) अस्मादिक बराच काळ विचारात पडले होते की मंदाकिनी काही इतकी डबल नाही आहे.

"आदर्श" सोसायटी.

मितभाषी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लष्करी अधिकाऱ्यांनी बेकायदा बांधलेल्या आदर्श सोसायटीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सासूबाईंचा फ्लॅट असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी हा महिती प्रसिद्धी माध्यमांना दिल्याचे समजते. भगवती मनोहरलाल शर्मा या चव्हाण यांच्या सासूबाई आहेत. तसेच यातील १०३ क्रमांकाचा फ्लॅट एस. बी. चव्हाण या नावाने असून मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचे नाव शंकरराव भाऊराव चव्हाण असल्याने मुख्यमंत्र्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचं दिसून येत असल्याची चर्चा आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्यांच्या पत्नींना घरे देण्यासाठी हा भूखंड लष्करी अधिकाऱ्यांनी मिळवला.