Skip to main content

प्रतिसाद

ससा, सुसर आणि ससाणा

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 06/07/2010 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक मिपाप निती कथा. पुर्वी इसापाने जंगलमधले प्राणी पाहून इसाप निती कथा लिहील्या. मिपा नावाच्या ह्या तळ्यात किंवा मळ्यात (काय म्हणायच ते म्हणा) अनेक चित्रविचित्र प्राणी आहेत. स्वभावाप्रमाणे नावे वापरून जरी ते वावरायचा आव आणीत असले, तरी पुष्कळदा निळा रंग धूवून निघाल्यानंतर खरा कोल्हा उघडा पडला, तसेही होत असते. हे प्राणी अवलोकन करीत अनेक साधु-महात्मे, नाना अवलिया ह्या जंगलात स्वैर फिरत असतात. जंगलातील एका तळ्यात बुडी मारली तेव्हा, अशाच एका महान पुरुषा (ओह. सॉरी.

आवडती English गाणी.

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 14/06/2010 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
जरी आपण मराठी असलो तरी दुस-या भाषेतील कलेतला,गाण्यातला वरचढपणा (superior ह्या अर्थाने) हा आपल्या मनाला भावतोच!!

महिन्याचे वाढदिवस

लेखक आर्य यांनी गुरुवार, 03/06/2010 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे लहान बाळाचे - दर महिन्याला (एक वर्षापर्यंत) वाढदिवस साजरे करण्याची प्रथा आहे. दर महिन्याला वेगवेगळे पदार्थ करुन हे साजरे केले जातात, हे पदार्थ बाळाची वाढ-दर्शवणारे असतात. उदा: १ महिना -घावन / धिरडे, महिना २ - जिलेबी / कडबोळी - रिंगण घातल्यावर / गोल फिरल्यावर महिना ३ - करंजी (कुशीवर झाल्यावर) असे आणि या पुढील वाढदिवस कसे साजरे केले जातात याविषयी माहिती हवी आहे !

मायभूमीची नवी मराठी वेबसाईट

लेखक मड्डम यांनी गुरुवार, 03/06/2010 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
मायभूमी.कॉम महाराष्‍ट्राच्‍या कडेकपा-या आणि दगड-मातीतून इथला इतिहास दरवळतो. आपल्‍या तलवारीच्‍या बळावर इतिहास घडविणारी पोलादी मनगटाची नररत्ने जशी या भूमीत जन्‍माला आली तशीच आपल्‍या अनुभव विश्‍वाच्‍या आणि शिक‍वणुकीच्‍या बळावर पोलादी समाज मन घडवणा-या संत विभूतींनीही या भूमीला आपल्‍या अस्तित्‍वाने पावन केले आहे.

आपल्या आवडत्या websites कोणत्या ते कळेल का? खरोखर नवीन

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 02/06/2010 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
हे ठळक अक्षरात लिहलेल नवीन आहे. http://misalpav.com/node/12537 येथे पहील्या लेखावरच्या प्रतिक्रीयेत काही छान websites आहेत. पहील्यांदा पुण्याचे पेशवे ह्यांचे आभार.......त्यांच्या खवमधील प्रतिसादासाठी.भेंडी बाजार....मी बरा आहे,मित्रा.....माझे प्रतिसाद,लेख वाचुन आपल्याला अस विचारावस वाटल की काय?

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

आजच backward रुपवेडं जग...

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 26/05/2010 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
इ.पवार ह्यांचा "....तुझे देख के मेरी मधुबाला.....!!!!" हा धागा वाचला आणि मग प्रतिक्रिया दील्याशिवाय राहवल नाही...........ती प्रतिक्रीया जशीच्या तशी ईथे टाकतो(?) आहे. राग मानु नका व मनावरही घेउ नका(प्रतिक्रियेचा नी आपला संबधच नाही अस म्हणा हव तर).................पण जरा ह्या प्रतिक्रियेतुन थोड मनातल लिहतोय...... एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यामुळे त्याची/तीची प्रशंसा करणे ,त्याला/तिला ईतरांपेक्षा वेगळी वागणुक देणे म्हणजे शुद्र विचार होय........असे माझे मत. अहो शारीरीक सुंदरता कोणी स्वबळावर,मेहनतीवर कमवत का??मग एखाद्या व्यक्तीची त्यासाठी प्रशंसा का?? बुद्धीमता,चांगला स्वभाव्,बोलण्,चातुर्य,मानुस

मधूमेहाविरुद्ध लढा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 25/05/2010 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मधूमेहाविरुद्ध लढा अदिती ताईंच्या या प्रश्नामुळे मला लिहावेसे वाटले. मी मराठीचा उदोउदो करण्यासाठी भांडत असतांना एके ठिकाणी त्यांनी मला 'तुमच्या सहीत इंग्रजी आहे' ते बदला अन आताच्या प्रश्नात 'तुमच्या सहीतला 'ओ' आणि ते इंग्लिश वाक्य अजून तसंच आहे. आणि हो मधुमेहाशी कसं लढायचं?' असं विचारलं. त्यांचा चेष्टेचा अन मस्करीचा सूर मी समजलो अन त्यांना खालील उत्तरे तेथेच देवून आमची चेष्टा तेथेच थांबवता आली असती. पण प्रश्न हा सामाजिक जागृतीचा असल्याने नविन धागा काढून लिहीत आहे.

~*~*~*~ राजीव'जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 21/05/2010 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
राजीव गांधी!... आपल्या सर्वांचं एक आदरणीय आणि लाडकं व्यक्तिमत्व! भारताचे यशस्वी -माजी पंतप्रधान! २१ मे १९९१, रोजी रात्री, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तामिळनाडू येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्ब-हल्ल्यात झालेला राजीव'जींचा मृत्यू केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण विश्ववासीयांना मोठा मानसिक आघात देऊन गेला!..... राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ..... *~*~*~* STILL WE MISS YOU.... RAJEEV'JI...... LOVE YOU.......