अण्णांची उपेक्षा आणि उपहास करणार्यात काही संसद सदस्य, तथाकथित विचारवंत आणि काही पत्रकारही होते. या सर्वांनी एकमुखाने 'अण्णा संसदेची प्रतिष्ठा आणि घटनेचे पावित्र्य धोक्यात आणित आहेत' अशि हकाटी सुरु केली. आंदोलनकर्त्यां ला बसल्या जागीच निष्प्रभ करणारे हे एक ठेवणीतले अस्त्र आहे आणि मोठ्या कुटीलतेने त्याचा उपयोग केला गेला.
मागील दहा दिवस एक इतिहास घडतांना पाहिला त्या बद्दल आपण स्वतःला भाग्यशाली समजायला हवं. अण्णा हजारे यांनी गांधीजींच्या अहिंसक मार्गाने ही शांततामय क्रांती घडवून आणली याची नोंद इतिहासात पक्की झाली आहे.