संदीपच्या या कवितेविषयी लिहीण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही, फक्त एक उत्कट अनुभव आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतो. ही कविता कार्यक्रमात एकदा तरी सलीलऐवजी संदीपनं गावी, अशी अत्यंत प्रामाणिक इच्छा आहे, कारण तो ही कविता जगलायं.
आयुष्यातली सगळी नाती मान्यतेची आहेत कारण विवाह या बेसिक मान्यतेतून ती निर्माण होतात. पत्नी ही व्यक्ती नाही, ते तुम्ही घडवलेलं एक नातं आहे. जो हे नातं अत्यंत उत्कटतेनं आणि हृदयाची बाजी लावून घडवतो, त्याला ही कविता कळू शकेल.