Skip to main content

प्रकटन

अहिंसावाद प्रश्नोत्तरे आणि उहापोह

लेखक कोलबेर यांनी शुक्रवार, 05/12/2008 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
अहिंसावाद हिंसावाद ह्यांचा नको तितका उहापोह सध्या मिपावर चाललेला दिसतो हे मान्य असुनही काही गोष्टींचा खुलास करणे आवश्यक वाटल्याने हा प्रपंच. हिंसा/अहिंसा ह्यापैकी कुठल्याही तत्त्वाचा मी अभ्यासक नाही. मला ह्या दोन्हीविषयी जे अर्थ अभिप्रेत आहेत त्यातुन इथे लिहित आहे. गालावार डास बसलेला जाणवत असताना तो एका फटक्यात मारुन न टाकता उडुन जायची वाट बघणे असा काहीसा अहिंसावादाचा जो नेभळट अर्थ लावला जातो आहे तो मलातरी हास्यास्पद वाटतो. हिंसावादी असो अहिंसावादी असो कुणीही पटकन तो डास मारुनच टाकणार. असल्या शुल्लक घटनांमधुन कसल्याही तत्त्वाचा/विचारसरणीचा शिक्का कुणावरही लावता येणे शक्य नाही.

गांधीवाद्याची थप्पड

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 05/12/2008 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकीव्यतिरिक्त अनेक सामजिक कर्यावर सुद्धा उहापोह होत असे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांना सुद्धा खेळाच्या स्पर्धांप्रमाणेच भरगोस प्रतिसाद मिळे. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गांधीजी, डॉ सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंत्या आम्ही वादविवादासारख्या स्पर्धा भरवून साजर्‍या करत असू. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वल्ली होता जीवन जोशी, आमचा एक वर्गमित्र. गांधींविषयीची त्याची भक्ती सुपरिचित होती. कट्टयांवरच्या गप्पा असोत की चर्चासत्रे, तो मोठ्या चिकाटीने आणि विश्वासाने गांधीवादी विचारांचे मुद्दे मांडत असे.

नगरसेवक आमदार खासदारांना खुषखबर!

लेखक सुनील मोहन यांनी गुरुवार, 04/12/2008 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
निवडून आलेले अधिकारी, म्हणजेच नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यावर भ्रष्टाचार रोधक कायदा १९८८ (prevention of corruption act 1988) याअन्वये खटला भरता येत नाही असे न्यायमूर्ती पी.एच.माळी यांनी निकालपत्रात म्हणत मुंबईतील महालक्ष्मी इथले नगरसेवक चंद्रकांत पुगावकर यांची मुक्तता केली.नगरसेवक पुगावकर यांच्यावर चार हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली खटला सुरु होता. १९८८ च्या या कायद्याखाली खटला भरला जाणारी व्यक्ती ही नेमणूक केली गेलेली असली पाहिजे, निवडून आलेल्या व्यक्तीवर असा खटला भरता येत नाही.

ते ९६ भाग

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 04/12/2008 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा, गांधीवाद म्हणजे काय? रात्री ९.३० वाजता चिरंजिवांनी घरात गेल्या गेल्या प्रश्न विचारला. अरे, आपण उपवनात गेलो होतो तेंव्हा तळ्यात दोन बदके क्वॅक्,क्वॅक असा आवाज करत विहार करत होती, त्यांतले अत्यंत पांढरे शूभ्र बदक म्हणजे गांधीवाद.

मुसलमान अतिरेक्यांचा भारतावर झालेला हल्ला (शीर्षक संपादित)

लेखक भाष यांनी गुरुवार, 04/12/2008 05:28 या दिवशी प्रकाशित केले.
X( गेले वर्षभर मला या किंवा इतर मराठी स्थळांवर यावेसे वाटत नव्हते. मुंबईवर झालेल्या मुसलमानी आक्रमणामुळे या २-३ स्थळांवर काय चालले आहे हे सहज बघावे म्हनुण आलो तेव्हा असे आढळले कि उपक्रम वर या बाबत काहीच नाही, मनोगतावर थोडेफार लिहिले आहे. मिसळपाववर त्यामानाने जास्त लिखाण दिसले, म्हणून इथे ४ शब्द लिहीत आहे. २६ नोव्हेंबरला इथल्या सकाळी ११ वाजता ( भारतातल्या रात्री ९:३० ) रेडियोवर बातमी ऐकली. लगेच भावाला मुंबईला फोन लावला तो लागला नाही. शेवटी दुपारी २ वाजता लागला. वहिनी म्हणाली कि भाऊ नेमका कामाच्या बैठकीसाठी तेव्हाच ताजमध्ये गेला होता तो नुकताच आला आहे.

अब पछतावेसे क्या फायदा ( उत्तरार्ध)

लेखक कपिल काळे यांनी बुधवार, 03/12/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी सांगतो तिथे जा म्हणाला. तुझे घर गिरवी ठेवलंय ना ते सोडवून देतो. अब्बुकडे कुठे एवढे पैसे. घर सुटतंय म्हणून मी हो म्हणालो.>> पहिला भाग इथे वाचा
मौलवीचा दोस्त दुसरया दिवशी आला. त्याच्याबरोबर गेलो. रात्र भर आर्मीच्या ट्रकात बसलो होतो. पिंडीवरुन निघून मरकज़-तय्यबा ह्या गा्वात आलो. रात्रभर आर्मीच्या खुल्या ट्रकमध्ये बसून थंडीने नको जान झाली. माझ्याबरोबर अजून अशीच १२- १५ पोरं होती. सगळी अशीच गरीब.

अब पछतावेसे क्या फायदा ( पूर्वार्ध)

लेखक कपिल काळे यांनी बुधवार, 03/12/2008 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी कासीम. मुंबईवर हमला करुन मी एकटाच कैद झालो.बॉसने सायनाइडची गोळी दिली होती. पुलिसने पकडले तर खायला. पण इथली मुंबईची पुलिस एकदम चुस्त. ज्या अफसरवर गोळी चालवली त्याने शेवटचा सास भरण्याआधी दरोगाला तेच सांगितले. दरोगाने माझे हाथच पकडून ठेवले आणि ती गोळी काढून घेतली. म्हणूनच तर पकडला गेलो. पण आमच्या पुलिसपेक्षा इथली पुलिस एकदम जांबाज. आमच्या हाथात रायफल , तरीपण एकसाथ दोन हविलदार कूदले आमच्यावर. अमीन तर अल्ला ला प्यारा झाला. बदनसीबीने मी कैद झालो. आता पुलिसला सांगतोय मला मरु दया.माझ्या घरवाल्यांना जिंदगी हराम करतील आता आर्मीवाले.

पुन्हा जिवंत परत आले तर

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 03/12/2008 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा जिवंत परत आले तर मरण अटळ आहेच... रोज जीव वाचला याच समाधान मिळावे असेही घडते.. पण जगायच कस ते ठरवता आल असत तर?
Taxonomy upgrade extras

कोण कोम???

लेखक सुनील मोहन यांनी बुधवार, 03/12/2008 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
चार वेळा महिला मुष्टीयुद्ध विश्वविजेती एम्.सी. मेरी कोम यांच्याबद्दल असे उद्गार काढलेत अर्जुन आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मिल्खा सिंग यांनी. भारतीय मुष्टियोद्धा संघटनेने मेरी कोम यांची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली होती. फ्लाईंग सिख या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिल्खासिंग यांनी ही महिला कोणता खेळ खेळते हेच माहिती नाही असे म्हटले. मणिपूरच्या मेरी कोमने सलग चारवेळा महिला विश्वविजेती होण्याचा सन्मान मिळविला आहे.

अजुन मी...

लेखक राघव यांनी बुधवार, 03/12/2008 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या दिवसापासूनच खूप अस्वस्थ होतो. काहीतरी लिहावे असे सारखे मनात येई पण शब्दच सुचत नव्हते. शेवटी काल ते स्फुरले अन् खालील कविता झाली. पण वाचून झाल्यावर माझेच मला फार विषण्ण वाटले. श्रावणदांना विचारले कि काही बदल करू का म्हणून, पण त्यांनीही तशीच असू देत असे सांगीतले आणि काही मौलिक सुचनाही केल्या.