Skip to main content

प्रकटन

महानगरीय संस्कृती

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 25/05/2010 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
आपला देश सोडून दूर, अनोळखी देशात रहायला आल्यावर तिथला एकूण रागरंग, आचार विचार, राहणीमान ह्या सगळ्यांचा तक्ता समजाऊन घेताघेता, आपल्या नकळत आपण कधी त्या तक्त्यामधला एक रकाना बनून गेलो ह्याचा आपल्याला पत्ता देखील लागत नाही! बाहेर आल्यावर आपल्यापैकी बहुतांश लोक कदाचित स्वत:ला आणि इतरांना सांगत असतील कि शेवटी आपला देशच बरा. दोन चार वर्षात आपण तर माघारी जाणार भैया! हा राग आलापता आलापता वर्षांमागून वर्षे उलटून जातात.

महिला कारागृहात काही तास

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 24/05/2010 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
आजची काही माझी तुरुंगातली पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही दोनदा आले होते मी इथे. पण दोन्ही खेपेस जरा घाईगडबडीत होते. ह्या वेळेला मात्र ठरवले होते की निवांतपणे जायचे. गेल्या खेपांमध्ये फक्त स्त्री कैद्यांच्या बराकी, भटारखाना आणि रोजगार प्रशिक्षणाची पत्र्याची शेड एवढाच परिसर ओझरता पाहिलेला. त्या भेटीत पाहिलेल्या बराकींमध्ये भिंतीलगत गुंडाळून ठेवलेल्या वळकट्या व दोर्‍यांवर लटकणार्‍या कपड्यांखेरीज ओक्याबोक्या भिंती होत्या फक्त!

अस्तित्वाचा पुरावा!

लेखक भोचक यांनी सोमवार, 24/05/2010 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झाल्यानंतर लगोलग बायकोने लॅबरोटरी टेक्निशियनचा (डिएमएलटी) पदवी अभ्यासक्रम केला. दुसरा क्रमांक पटकवून बायकोने आणलेले पदविकेचे प्रमाणपत्र बघितले. 'नागालॅंड' सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेने 'दिल्ली विद्यापीठातर्फे' घेतलेल्या लॅब टेक्निशियनचा तो कोर्स होता. आता सरकारी नोकर्‍यांच्या बाजारात या सर्टफिकिटला काय किंमत असेल याचा अंदाज सर्टफिकीटचा हा मुखडा पाहूनच आला. फाईलीत जाऊन पडलेलं, हे सर्टफिकिट त्यानंतर उघडलं गेलंच नाही.... --------------------------------------- मध्यंतरी बायकोला एका लेखनाचा चेक आला. साडेतीनशे रूपयांचा. म्हटलं बॅंकेत भरून टाकू.

इंद्रायणीकाठी

लेखक फटू यांनी रविवार, 23/05/2010 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडव्याचा दिवस होता. गुरुवार. नेमका आठवडयाच्या मध्ये आलेला. एक दिवसाच्या सुटटीचं काय करावं हा प्रश्नच होता. आता तुम्ही म्हणाल पुण्यातले थियेटर काय ओस पडलेत? घ्यायचं कुठल्या तरी पोरीला घ्यायचं आणि मस्त ई स्क्वेअरला जायचं. निदान सिटीप्राईडला तरी जायला काहीच हरकत नाही. हाय काय ना नाय काय. पण प्रॉब्लेम असा हाये की ना आपण पोरीबाळींच्या वाटेला जातो ना आपल्याला पिच्चर बगन्यात यिंटरेष्ट हाये. असो. गावी घरी जावं तर जायचे दिडशे आणि यायचे दिडशे असा तीनशे किलोमीटरचा प्रवास एका दिवसात करायला जीवावर येतं. दुसर्‍या दिवशी यायचं ठरवावं तर सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो.

नवनिर्माण समिती

लेखक सरपंच यांनी रविवार, 23/05/2010 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आधी जाहिर केल्याप्रमाणे मिसळपाववर सुधारणा करण्यासाठी खालिल समितीची स्थापना करीत आहे. १. नवनिर्माण समिती या समितीने मिसळपाववर असलेल्या तांत्रिक सुविधांचा अभ्यास करावा आणी त्यांतील त्रुटी शोधून काढाव्यात. तसेच मिसळपाववर कोणत्या तांत्रिक सुधारणा अपेक्षित आहेत याचाही आढावा घ्यावा. मिसळपावचे रुपरंग बदलण्यास वाव असेल तर तसेही सुचवावे. काही नविन सुविधा देता येणे शक्य असल्यास त्यांच्या अहवालात तसा उल्लेख करावा. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर तो लोकाभिमुख होईल, आणी नंतर अहवालातील सुचवण्यांनुसार बदल केले जातील.

नवीन संपादक

लेखक सरपंच यांनी रविवार, 23/05/2010 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावचा वाढता व्याप लक्षात घेता या लेखाद्वारे मिसळपाववर तीन नवीन संपादकांच्या नावाची घोषणा करतो आहे. १) रामदास २) छोटा डॉन ३)निखील देशपांडे या आधीच्या संपादकांप्रमाणेच हे सुध्दा मिसळपाव.कॉम वरील संपादनाच्या कामात असतील. त्यांनी सक्रिय काम करावे ही अपेक्षा आहे. लवकरच मिसळपाव मध्ये काही बदल घडणे अपेक्षीत आहे. त्या योगे सध्याचे संपादक मंडळ सक्रिय सहभाग देत आहेतच. आता या नवीन सहकार्‍यांमुळे कामाला गती येईल.

~*~*~*~ राजीव'जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 21/05/2010 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
राजीव गांधी!... आपल्या सर्वांचं एक आदरणीय आणि लाडकं व्यक्तिमत्व! भारताचे यशस्वी -माजी पंतप्रधान! २१ मे १९९१, रोजी रात्री, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तामिळनाडू येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्ब-हल्ल्यात झालेला राजीव'जींचा मृत्यू केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण विश्ववासीयांना मोठा मानसिक आघात देऊन गेला!..... राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ..... *~*~*~* STILL WE MISS YOU.... RAJEEV'JI...... LOVE YOU.......

काही छंद

लेखक सुचेल तसं यांनी शुक्रवार, 21/05/2010 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
बायो-डेटामधे हॉबीज म्हणून एक सेक्शन असतो. मला वाटतं ९०% लोकांच्या हॉबीज अगदी सारख्या निघतील. वाचन, संगीत, क्रिकेट (पहाणं ), पोहोणं, इत्यादि. आपले असे पण काही छंद असू शकतात की जे आपण तिथे लिहू शकत नाही. ते छंद पाहून मुलाखत तिसरीकडेच भरकटेल म्हणून कदाचित लोकं (ज्यात मी पण आलो) उल्लेख करत नसतील. मला लहानपणी काडेपेट्यांचे कव्हर (टिक्के) जमवायचा छंद होता. त्या नादापायी मी आणि माझा चुलतभाऊ नाही नाही तिथे भटकलो. शाळा सुटली रे सुटली की ३-३, ४-४ किलोमीटर आम्ही वणवण हिंडायचो आणि नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. आता लक्षात येतंय की समोरच्याला ते एकदम येडछापसारखं दिसत असणार.

माझ्या मनातले राऊळ

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 20/05/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
(विचारतरंग जसे उमटलेत तसे मांडलेत. कदाचित विस्कळित वाटतील. पण त्यांच्यातील सच्चाई समजून घ्यावी! ) देऊळ म्हटलं की आपल्या किती ठराविक संकल्पना असतात, नाही? जे जे उदात्त, उत्तम असते त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे मंदिर - देऊळ. पंचमहाभूतांना मानवी संकल्पनेत बंदिस्त करून त्या द्वारे संपन्न अनुभव व आत्मिक समाधान प्राप्त करण्याचे स्थान मानले जाते देऊळ. पण कितीतरी वेळा आपण अशा अनुभवाला काही छोट्यामोठ्या कारणांनी पारखे होतो. कधी ते कारण गर्दी असते, तर कधी त्या ठिकाणची अस्वच्छता. कधी भक्तीचा बाजार आपल्याला उबग आणतो तर कधी लोकांच्या अंधश्रद्धा! आणि मग ज्या कारणासाठी देवळात गेलो ते कारणच बाजूला पडते.